Skip to main content

प्रकटन

हरवले मधुमुरलीचे सूर.........

लेखक तिरकीट यांनी गुरुवार, 12/12/2013 16:31 या दिवशी प्रकाशित केले.
"शेठ, निलेश बोलतोय...काय चाललय?" "अरे वा!.....बोला.....मी मस्त, तु काय म्हणतोयस..?" बोलण्यात कुठलाही अभिनिवेश नाही...समाधानी आवाज ऐकला की खुप बरं वाटायचं.. खरं तर त्याने फोन उचलुच नये असंही वाटायचं...त्याला फोन केला की छान बासरी ऐकु यायची, त्यानेच कुठल्यातरी मैफिलीत वाजवलेली....मधुकंस असेल बहुतेक..त्याचा आवडता राग.... उणीपुरी ५-७ वर्षांची ओळख आमची....कॉलेजमधल्या कुठल्याश्या स्पर्धेमधे झाली असेल......तेव्हा १-२ वेळेला भेटलो असु.

चावडीवरच्या गप्पा - 'आप'आपली मते

लेखक सोत्रि यांनी मंगळवार, 10/12/2013 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
chawadee “पवारसाहेबांनी राष्ट्रवादीच्या वेबसाइटवर त्यांच्या एका ब्लॉग पोस्टवर कसले सणसणीत आणि परखड विश्लेषण केले आहे दिल्ली विधानसभा निवडणुकांचे!”, बारामतीकर, चावडीवर प्रवेश करत. “वेबसाइट, ब्लॉग...बरं... बरं... काय म्हणताहेत तुमचे आदरणीय शरदचंद्ररावजी पवारसाहेब?”, नारुतात्या उपहासात्मक सुरात. “मग, साहेब नवीन तंत्रज्ञानातही आघाडीवर आहेत! असो, सर्वांचीच कानउघाडणी केली आहे त्यांनी!

सत्याची झडती

लेखक सस्नेह यांनी मंगळवार, 10/12/2013 13:39 या दिवशी प्रकाशित केले.
रस्त्यावरून जात होते. अचानक कानावर आरोळी आली. ‘कोणतेही पुस्तक , शंभर रुपये...’ पावलांना प्रतिक्षिप्तपणे ब्रेक लागला. वळून पहिले तर फुटपाथवर एकदोन इंच जाडीची बरीच पुस्तके मांडली होती. पायांनी लगबग केली. मांडलेल्या पुस्तकांवर नजर टाकली, तर दोन नजरेत भरली. ‘सत्याचे प्रयोग’ --- मो. क. गांधी. ‘झाडाझडती’ --- विश्वास पाटील. पण घ्यायचे धाडस होईना. राजकारण आणि भजन या दोन प्रकरणांपासून मी चार हात लांबच राहते. श्रीयुत मो. क. गांधी या दोन विषयांबद्दलच जादातर प्रसिद्ध ! आणि ‘पानिपत’ वाचून आलेली उद्विग्नता अजुनी आठवणीत आहे. त्यामुळे ही दोन पुस्तके हातात घेताना मन साशंक.

टेरीचा बाश्शाखान : रोमांचकारी अनुभव !

लेखक सुधीर मुतालीक यांनी रविवार, 08/12/2013 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
असे माझे होते कधी कधी ! मित्राच्या आग्रहाखातर एखादी गोष्ट केली जाते किंवा बघितली जाते. माझ्या दृष्टीने ती गोष्ट फारशी दखलपात्र नसेल, माझी रुची नसेल. पण झाल्यावर वा बघितल्यावर असे वाटते की आपण हे केले नसते तर आयुष्यातल्या केवढ्या मोठ्या आनंदाला मुकलो असतो.…. गेल्या आठवड्यात असेच घडले. ज्येष्ठ पत्रकार, भास्कर समूहाच्या दिव्य मराठीचे मुख्य संपादक पद्मश्री कुमार केतकर माझे स्नेही आहेत. "खास एवढ्यासाठी यावे लागले तरी ये तुझी मुंबई वारी व्यर्थ जाणार नाही हे निश्चित." निमंत्रण होते एका माहितीपटाच्या सादरीकरणाचे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी मिपावर प्रकल्प

लेखक क्लिंटन यांनी रविवार, 08/12/2013 20:28 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, २०१४ च्या लोकसभा निवडणुकांसाठीची "सेमीफायनल" समजल्या जाणाऱ्या राज्य विधानसभा निवडणुका पूर्ण झाल्या आणि निकालही जवळपास पूर्ण जाहिर झाले आहेत.आता लवकरच लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागतील.या निवडणुकांसाठी मिपावर पुढील दोन प्रकल्प चालवायचा माझा इरादा आहे. १. प्रश्नमंजुषा: लोकसभा निवडणुकांवर मी बऱ्यापैकी काठिण्यपातळीचे एकूण २० प्रश्न तयार केले आहेत.

टी एन शेषन , केजरीवाल अन भारत ....

लेखक चौकटराजा यांनी रविवार, 08/12/2013 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
आजच चार विधानसभांचे निवडणूक परिणाम प्राप्त झालेले आहेत. व त्यात भाजप ची सरकारे चारही राज्यात येणार हे दिसते आहे. भाजपाला असलेला पाठिंबा वाढला आहे का ? याचे उत्तर हे निकाल देउ शकणार नाहीत त्यासाठी मतदानाची आकडेवारी अभ्यासावी लागेल. आम आदमी चा दिल्लीतील उदय हा एक ऐतिहासिक क्षण आहे. पूर्वी एक नोकरशहा ने असा इतिहास घडवलेला आहे. त्यांचे नाव श्री टी एन शेषन . पण शेषन साहेब काही निवडून येउ शकलेले नाहीत. केजरीवाल ना जे यश मिळालेले आहे त्याची दिलखुलास दाद देताना अण्णा हजारे यांची जीभ लटपटते आहे तर केजरीवाल यांची फजिती होणार आहे असे काही लिखित माध्यमाचे संपादक म्हणू लागले आहेत.

गीतगुंजन - २१ -> Locomotive Breath

लेखक प्रास यांनी रविवार, 08/12/2013 01:36 या दिवशी प्रकाशित केले.
'इयन अ‍ॅन्डरसन' बद्दल मला अनेक वर्षांपासून कुतूहल वाटायचं. आज वयाच्या सहासष्टीत असलेल्या इयनला मी पहिल्यांदा पाहिलं, ऐकलं ऐंशीच्या दशकात. १९७२ पासून भारतात नियमितपणे कार्यक्रम करणार्‍या 'जेथ्रो टल' या प्रोग्रेसिव्ह-हार्ड रॉक ग्रूपचा निमंत्रक आणि म्होरक्या गायक म्हणून इयन प्रसिद्ध आहे. मला पाश्चात्य संगीतामधलं ओ की ठो कळत नसताना, (अर्थात आताही मला काही फार कळतंय, अशातला भाग नाही पण तरीही) मला त्याच्या शैलीबद्दल अगदी अप्रूप वाटायचं. त्याची साधी गाणीही ऐकायला काहीशी वेगळीच वाटायची, ती त्याच्या त्या शैलीमुळेच.

एका संस्थेची पन्नास वर्षे...

लेखक खेडूत यांनी शनिवार, 07/12/2013 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
. तसे एखाद्या संस्थेला पन्नास वर्षे पूर्ण होणे आता विशेष वाटत नाही. अनेक संस्थांनी शंभर किंवा दीडशे वर्षे पूर्ण केल्याचे आपण वाचत असतो. इतकेच काय आता आयटी कंपन्या पण रौप्य महोत्सव करू लागल्यात. पण हा कालखंड खरे तर सापेक्ष असतो. कुठल्या परिस्थितीत ती संस्था सुरु झाली, कशी चालविली आणि आता कशी आहे, यावर बरेच अवलंबून असावे. आमचे पहिले-वहिले महाविद्यालय म्हणजे लातूरचे शासकीय तंत्रनिकेतन. पुरणमल लाहोटी शासकीय तंत्र निकेतन (पी. एल. जी.

बंड्याचे बुद्धिबळ

लेखक विश्वनाथ मेहेंदळे यांनी शनिवार, 07/12/2013 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
मी शाळेत असतानाची गोष्ट आहे. उन्हाळ्याची सुट्टी चालू होती. मी माझ्या कुठल्याशा नातेवाईकांकडे काही दिवसांकरिता राहायला गेलो होतो. ज्या बिल्डींग मध्ये आमचे नातेवाईक राहत होते तिथे भरपूर मुले होती माझ्या वयाची. त्यात एक बंड्या नावाचा मुलगा होता. बंड्या तसा हुशार आणि बोलावागायला बरा होता. कधी कधी जरा तऱ्हेवाईक पणे वागायचा. एकटा आणि लाडावलेला असल्याने असेल कदाचित पण आपले तेच खरे करायची त्याला सवय होती. एकदा असेच गप्पा मारताना कळले की हा बंड्या बुद्धिबळ उत्तम खेळायचा म्हणे. नुसते उत्तम नाही तर पूर्ण सोसायटीत त्याला आजवर कुणीही हरवू शकले नव्हते.

सेन्टी - मेन्टी : वो शाम कुछ ...........

लेखक सुहास.. यांनी शनिवार, 07/12/2013 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
एखाद्या पहाडावर, रणरणत्या उन्हात , पायी चालुन शरीर थकलेले असताना , त्याच पहाडावरच्या शिवालयात, नाजुक घंटानाद चालु असताना , फुलांचा सुंगध श्वासात शिरत असताना , पिंडीसमोरच्या , काळ्या कातळाचा पायाच्या तळव्यांना स्पर्श झालाय कधी ? कस वाटत त्यावेळी ? ती मनात येणारी भावना बोलुन लिहुन दाखवता येते ?? येईल ही कदाचित .......पण पुन्हा दुसर्‍या एखाद्या साध्याच मंदीरात गेल्यावर ती अनुभुती येते ? माझ उत्तर आहे ... नाही !! पण मन मात्र त्या अनुभुतीच्या अनुभुतीसाठी कासावीस होतो का ?