हरवले मधुमुरलीचे सूर.........
"शेठ, निलेश बोलतोय...काय चाललय?"
"अरे वा!.....बोला.....मी मस्त, तु काय म्हणतोयस..?"
बोलण्यात कुठलाही अभिनिवेश नाही...समाधानी आवाज ऐकला की खुप बरं वाटायचं..
खरं तर त्याने फोन उचलुच नये असंही वाटायचं...त्याला फोन केला की छान बासरी ऐकु यायची, त्यानेच कुठल्यातरी मैफिलीत वाजवलेली....मधुकंस असेल बहुतेक..त्याचा आवडता राग....
उणीपुरी ५-७ वर्षांची ओळख आमची....कॉलेजमधल्या कुठल्याश्या स्पर्धेमधे झाली असेल......तेव्हा १-२ वेळेला भेटलो असु.
मिसळपाव
“पवारसाहेबांनी राष्ट्रवादीच्या वेबसाइटवर त्यांच्या एका ब्लॉग पोस्टवर कसले सणसणीत आणि परखड विश्लेषण केले आहे दिल्ली विधानसभा निवडणुकांचे!”, बारामतीकर, चावडीवर प्रवेश करत.
“वेबसाइट, ब्लॉग...बरं... बरं... काय म्हणताहेत तुमचे आदरणीय शरदचंद्ररावजी पवारसाहेब?”, नारुतात्या उपहासात्मक सुरात.
“मग, साहेब नवीन तंत्रज्ञानातही आघाडीवर आहेत! असो, सर्वांचीच कानउघाडणी केली आहे त्यांनी!
तसे एखाद्या संस्थेला पन्नास वर्षे पूर्ण होणे आता विशेष वाटत नाही. अनेक संस्थांनी शंभर किंवा दीडशे वर्षे पूर्ण केल्याचे आपण वाचत असतो. इतकेच काय आता आयटी कंपन्या पण रौप्य महोत्सव करू लागल्यात. पण हा कालखंड खरे तर सापेक्ष असतो. कुठल्या परिस्थितीत ती संस्था सुरु झाली, कशी चालविली आणि आता कशी आहे, यावर बरेच अवलंबून असावे.
आमचे पहिले-वहिले महाविद्यालय म्हणजे लातूरचे शासकीय तंत्रनिकेतन. पुरणमल लाहोटी शासकीय तंत्र निकेतन (पी. एल. जी.