स्वस्तिक
खुप वर्षापुर्विची नव्हे तर अगदी अलिकडची गोष्ट आहे.रम्य पहाटेची वेळ. मंद गार वारा वाहतो आहे आणि अशावेळी काहीच घडत नाही. सर्व गोष्टींची सुरवात रम्य पहाटेने व्हावी असे काही नाही.असो.
रात्र्ी मित्र्ांसोबत[फक्त मित्रच हं] फिरताना नेहमीप्रमाणे अचानक मोबाईल वाजला.फोन अक्षयचा. "स्वस्तिकला बघितल का बे?" " नाय बा काय झाला?" "अरे ते येड्याxx कालपासुन गायब आहे." माझ्या पायाखालची वाळुच काय दगड माती सगळच सरकलं.
" घरच्यांशी भांडुन गेला तो आलाच नाही अजुन. आत्ता फोन केलो तेव्हा कळालं." " मग आता?" " ए मंद बुद्धी सुंद काम निघ आणि माझ्या घरी ये."
गाडीवरुन लगेच निघालो.
मिसळपाव