Skip to main content

प्रकटन

लोकल (लघु भयकथा)

लेखक स्पा यांनी गुरुवार, 09/04/2015 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
पण माझीच चूक आहे असं का वाटतंय मला? साला हा एक विचार मनातून जातच नाहीये, आजचा दहावा दिवस. घरी बसून आहे मी, उद्यापासून ऑफिस ला जावच लागणार, नाहीतर नोकरी जायची. कितीही मन रमवायचा प्रयत्न केला तरी ती रात्र डोक्यातून जातच नाही. ट्रेन चा भयंकर गोंधळ झाला होता त्या रात्री.नाहीतर ११ :३५ ची कसारा किती रिकामी असते. पण त्या दिवशी तब्बल ३ तास ट्रेन बंद होत्या, आणि त्यानंतर सुटणारी हि पहिली ट्रेन होती. काय भयंकर गर्दी होती.मी कसाबसा लटकत भायखळ्याहून आत चढलो. आत कसला जेमतेम दारात उभं राह्यला मिळेल इतकीच जागा होती.ट्रेन दणदणत निघाली,पुढील स्टेशन दादर. मागून लोंढा अंगावर कोसळला, पण आत जायला जागाच नव्हती.

सांगावा (शतशब्दकथा)

लेखक खेडूत यांनी बुधवार, 08/04/2015 19:46 या दिवशी प्रकाशित केले.
गुटख्याचा भपकारा आला तशी पारू सावध झाली. वासामागनं आन्ना ग्रामशेवक आला. कसल्यातरी फॉर्मवर आंगटा घ्यायाचा म्हनला . येका आटावड्यात तिसऱ्यांदा आलंय. निराधार योजनेचं काम करतो म्हनतुया - बगू. जाताना म्हनला, '' काय ? आटापलं सैपाकपानी-आंगुळ ? '' नस्त्या चौकशा मुडद्याला ! *** जैवंता मेल्यावर दादा म्हनलावता वडगावला चल परत. पन पोरास्नी घिउन कुटं तेनच्यात ऱ्हानार ! आपलीच झोळी फाटकी. नगु मनलं. पेन्शल मिळंल . पर गावातल्या मानसांची नजरच लई वंगाळ ! काय वाटलं अचानक - आन गेली कासाराच्या दुकानात. फोनच्या मशिनीत त्येनंच नंबर फिरीवला. दादाचा आवाज आल्याव रुपाया टाकला. मंग आवाजच फुटंना !

कालबाह्य बी.बी.रॉय आणि त्याची बायको!

लेखक खेडूत यांनी गुरुवार, 26/03/2015 19:37 या दिवशी प्रकाशित केले.
फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट. म्हणजे जेव्हा आम्ही अकरावीला इलेक्ट्रोनिक्स शाखेत प्रवेश घेतला तेव्हाची. तीस वर्षे होऊन गेली . अख्ख्या होल पश्चिम महाराष्ट्रात दोनच ठिकाणी अकरावीला इलेक्ट्रोनिक्स सुरु झालं होतं. इलेक्ट्रोनिक्स म्हणजे काय ते कुणालाच माहीत नव्हतं पण काय तरी हुच्च आहे इतकंच कळत होतं. मग काय, मिळतोय प्रवेश म्हटल्यावर घेऊन टाकला! अगदी सुरुवातीला एक आठवडा भौतिक शास्त्राची उजळणी झाली अन मग मुख्य विषय सुरु झाला. सुरुवातीलाच काम्पोनंटस ची ओळख वगैरे झाली. मग सरांनी शिकवले रेझिस्टन्स (रोधक) आणि त्याचे कलर कोड्स! हा भाग फारच मनोरंजक होता. आधी रंग ओळीने लिहायला सांगत.

जर्मनविंग्ज 4U 9525.. लॉक्ड इन ?!

लेखक गवि यांनी गुरुवार, 26/03/2015 12:51 या दिवशी प्रकाशित केले.
जर्मनविंग्ज फ्लाईट नंबर फोर-यू-नाईनर फाय टू फाय या उड्डाणाच्या आल्प्समधे झालेल्या क्रॅशला फॉलो करण्यासाठी ही जागा आहे. अपडेट्स वेगाने येताहेत. काही ऑब्सोलीट होताहेत आणि काही वेगळ्याच दिशेला नेताहेत. संकलनाचा हेतू आहे. लुफ्तांझा कंपनीची चाईल्ड कंपनी असलेली जर्मनविंग्ज १९९७ मधे सुरु झाली होती. आजरोजी कंपनीकडे जवळजवळ ऐंशी विमानं आहेत. त्यापैकी निम्मी एअरबस ए ३१९-१०० सीरीजची आहेत. उर्वरितांमधे निम्मी एअरबस ३२०-२०० सीरीज आणि निम्मी बंबार्डियर जातीची विमानं आहेत. अपघातग्रस्त विमानाची जात: एअरबस ३२०-२११.

कर्मयोगी ली कुआन यू

लेखक अरुण मनोहर यांनी बुधवार, 25/03/2015 13:17 या दिवशी प्रकाशित केले.
ब्रिटीशांनी मलाया म्हणून एक राष्ट्र स्वतंत्र करून दिले होते. त्यांत सिंगापूर देखील होते. भारत पाकिस्थानच्या पेक्षा अगदी वेगळे घडले येथे. पाकिस्थान ला फुटून वेगळे व्हायचे होते. पण इथे, त्यावेळचे पंतप्रधान टुंकू अब्दूल रहमान ह्यांना अशी भिती होती की चायनिजपुढे मलेय लोकांचा निभाव लागणे कठीण आहे. भविष्यात कदाचित हे लोक आपल्याला दाबून टाकतील. म्हणून स्वतंत्र मलायाने चायनिजला सांगितले की सिंगापूर हा तुमचा देश वेगळा करून तुम्ही -हावा ! टुंकूला वाटले होते की हा टिचभर देश काय टिकतोय! हा आपलाच आश्रित बनेल! ली यांना मुळीच वेगळे व्हायचे नव्ह्ते. त्यांनी एकत्र रहाण्यासाठी खूप समजावले.

तो, ती आणि एक सामान्य घटना

लेखक मित्रहो यांनी मंगळवार, 24/03/2015 23:02 या दिवशी प्रकाशित केले.
आजूबाजूला दिसनारी सर्वसामान्य माणसे किंवा आसपास घडनाऱ्या आणि वरकरणी सामान्य वाटनाऱ्या घटना कधीकधी बरेच काही शिकवून जातात. साधारण दोन महीन्यापूर्वीची गोष्ट मी कुटुंबासमवेत म्हैसूरवरुन बंगलोरकडे येत होतो. स्थळ: बंगलोर म्हैसूर रोडवरील मदुरच्या जवळचे एक अॅदीगॅसचे जॉइंट. वेळ: रात्रीचे सव्वानउ साडेनउ. बंगलोरमधे अॅदीगॅसच्या कुठल्याही जॉइंटमधे जितकी गर्दी असते तितकीच गर्दी इथेही होती. बऱ्याच कार पार्क होत्या. आम्हीही जेवायला तिथेच थांबायचे ठरविले. कार पार्क केली. आत गेलो. आतपण गर्दी होती, बराच गोंधळ होता. आम्हाला बसायला अगदी कोपऱ्यात जागा मिळाली.

मानवी स्पंज आणि स्प्रिंग!

लेखक निमिष सोनार यांनी मंगळवार, 24/03/2015 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही दु:खात आणि ताणतणावात असाल तर शक्यतो कुणाला सांगू नका. कारण दु:खावर खरी सहानुभूती देणारे तुम्हाला भेटणार नाहीत किंवा खूपच कमी भेटतील. उलट तुम्ही दु:खी मन:स्थितीत किंवा समस्यांनी वेढलेले आहात हे पाहून तुम्हाला आणखी त्रास देण्याचा प्रयत्न जरूर होईल. त्या मन:स्थितीचा फायदा घेतला जाईल. उदाहरण द्यायचे झाले तर आधीच चोळामोळा झालेला कागद रस्त्यावर पडलेला असला तर त्याला आणखी पायाखाली दाबून किंवा आणखी चोळामोळा करणारे आणि समुद्रात फेकून देणारे लोक जास्त असतील.

या गावाचं काही खरं नाही!

लेखक सर्वसाक्षी यांनी सोमवार, 23/03/2015 22:35 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी ली क्वान युंचे देहावसान झाल्याचे वृत्त कानी आले. बंड्याला त्याच्या वॉसप वर लिहिलं, 'शनिवार रविवार उंडारुन झालं, आज पुन्हा सोमवारी सुटी!' बंड्याचा दोन मिनिटांनी थंड प्रतिसाद. 'कसली सुट्टी?' अरे! एवढा मोठा नेता गेला आणि सुट्टी नाही? हां, बरोबर; अंतिम संस्कार उद्या असतील, सुट्टी उद्या देतील. पाच मिनिटांनी उत्तर आलं, 'मला काम आहे. तुलाही असावं अशी माफक अपेक्षा आहे. संध्याकाळी बोलु आरामात'. अरे देवा! काय हा माणुस की काय? सुट्टी नसल्याचं काहीच सोयर सुतक नाही? साधा माझ्यापाशी खाजगीत निषेधही नाही? असो. संध्याकाळी बघु. सोमवार असूनही रस्त्याला गर्दी बेताची होती, अवघ्या एका तासात घरी आलो.

मोरूचा मिपासंन्यास...!

लेखक खेडूत यांनी गुरुवार, 19/03/2015 09:03 या दिवशी प्रकाशित केले.
गुढीपाडवा आला. सकाळ झाली . पूर्वी मोरूचा बाप मोरूला म्हणे - ''अरे मोरू, उठ ! आज गुढीपाडवा आहे. आटपून तयार हो लवकर. वगैरे '' लहानपणापासून मोरूला सवयच तशी होती. मोरूची हालचाल झाली पण डोळे मुळीच उघडेनात. बाबांनी उठवल्याशिवाय मोरूला मुळीच जाग येत नसे- गजराने तर नाहीच नाही . पण आताचा हा आवाज वेगळाच अन नाजूक होता , ''अरे मोरू, उठ ना ! चहा घे -गार होईल …'' '' हे काय भलतंच ! बाबा चहा घेऊन आले कि काय? अन त्यांचा आवाज असा बायकी का झालाय? '' थांबा जरा '' म्हणून कुशीवर वळला , तेव्हढ्यात ''अरे आता उs s ठ ना ! '' असा दीर्घ पुकारा झाल्यावर उठून बसणं भाग होतं.

आमच्या विवाहाची कहाणी - ३

लेखक सुबोध खरे यांनी बुधवार, 18/03/2015 13:24 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या विवाहाची कहाणी १ - http://www.misalpav.com/node/30588 आमच्या विवाहाची कहाणी - २- http://www.misalpav.com/node/30631 सर्व जण जाईपर्यंत साडे सहा वाजलेले होते. घरचे पाच जण आता थोडा वेळ आहे म्हणून शांत बसलो होतो. मला रात्री नउच्या चेन्नई एक्स्प्रेसने पुण्याला जायचे होते. पहिल्यांदा वडिलांनी विचारले कि मग आता काय विचार आहे. मी पहिल्यांदा मत देण्यास का कू करत होतो पण वडिलांनी सांगितले प्रथम तुझे मत हवे आहे त्यानंतर आम्ही आमची मते सांगू.