मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रकटन

समुद्राच्या लाटांवर माझ्या विचारांची खलबल.

श्रीकृष्ण सामंत ·
कधी कधी अ-वास्तव विषयावर लिहिणं सुद्धा मनोरंजक असू शकतं.माझा खालिल लेख तसाच काहिसा नमुना आहे. मला समुद्राजवळ बसून निळ्या काळ्या लाटांकडे पाहयाला आवडतं. मला असं वाटतं की जर मी तिथे बराच वेळ बसलो आणि माझ्या “मनाला” खरोखर इकडे तिकडे फिरू दिलं तर लाटांपर्यंत पोहोचेपर्यंत वाळूमध्ये, कमी झालेल्या पाण्यात पडून, माझं मन वाळूत रूतलं जाईल. आणि पुन्हा एखादी मोठी लाट येऊन पाण्याबरोबर फरफटत जाईल. आणि माझे विचार पुन्हा एकदा समुद्रात नेले जातील. किनाऱ्यावर माझं शरीर खारट वाऱ्याची झुळूक अंगावर घेऊन, माझ्या विचारांना मंथन करणाऱ्या लाटांच्या आवाजाचा आनंद घेत राहिन .मी अनेकदा माझ्या विचारांना उभारी देतो.

वाट पहाणं

श्रीकृष्ण सामंत ·
वाट पाहाणं “सखी,मंद झाल्या तारका आता तरी येशील का?” हे गाणं माझ्या कानावर पडलं.किती आतुरतेने सखा तिची “वाट” पहात आहे,हा विचार मनात आला आणि वाटलं, आपण आपल्या आयुष्यात किती वेळा वाट पाहतअसतो?आपण छोट्या छोट्या गोष्टींची वाट पाहत असतो. रेस्टॉरंट्समध्ये जेवणासाठी. नवीन चित्रपट पाहण्याकरता तिकिटांसाठी. नव्या फूलांचा सुगंधी वास दरवळून आणणाऱ्या वसंत ऋतु येण्यासाठी. आतुरतेने मोठ्या गोष्टींची वाट पाहतो. मेलमधील आपल्या स्वीकृत पत्रांसाठी.आपल्या कुटुंबांतील व्यक्ती परदेशी असताना काम झाल्यावर परत घरी येण्यासाठी. आपल्या सेवानिवृत्तीसाठी. करिअरच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी.

समाजात वावरताना इतरांशी सामना कसा करावा

श्रीकृष्ण सामंत ·
आज प्रो.देसाई आणि मी संध्याकाळी तळ्यावर भेटल्यावर एका सामाजिक विषयावर चर्चा करीत होतो.विषय होता, "समाजात वावरताना इतरांशी सामना कसा करावा" सुरवातीला भाऊसाहेब मला म्हणाले, "आपण आपल्या आयुष्यात निर्माण केलेली नाती, अनेकदा, त्यातून आपल्याला मिळणारे परिणाम काय आहेत ती ठरवतात. आपण आपल्या आयुष्यात लाखो लोकांना भेटतो. यापैकी अनेक भेटण्याचे प्रयत्न आपल्याकडून विसरले जातात. आणि पुन्हा कधीही त्याचा विचारही केला जात नाही. तथापि,आपण त्यातले काही प्रयत्न नेहमी लक्षात ठेवतो आणि त्यांना स्मृती म्हणून जतन करतो.

ब्रम्हांडं आणि कृष्णविवर (ब्ल्याक होल)

श्रीकृष्ण सामंत ·
आज मी प्रो.पोंक्षना, कृष्णविवर(ब्ल्याक होल) ह्या विषयावर बोलून थोडी माहिती द्यावी अशी विनंती केली. ते म्हणाले, “ कृष्णविवर,म्हणजेच ज्याला,ब्ल्याक होल म्हणतात ते, आपण पाहू शकत नाही, असं असूनही आपण दावा करतो की ते अस्तित्वात आहे. आपण हा दावा कोणत्या आधारावर करतो?

काळ्या अमावास्या रात्री पाहिलेलं तारांगण

श्रीकृष्ण सामंत ·
काळ्या अमावास्या रात्री पाहिलेलं तारांगण मला आठवतं, अलीकडे मी जेव्हा कोकणात रजा घेऊन गेलो होतो, तेव्हा नेहमीच्या शिरस्त्या नुसार ,चक्क ढगा विरहीत रात्र शोधण्याच्या प्रक्रियेत, यशस्वी होत आहे असं पाहून, त्या रात्री समुद्राच्या चौपाटीवर वाळूत बसून तारे पहाण्याचा छंद पूरा करण्याच्या इराद्याने, चौपाटीवर गेलो होतो. योगायोगाने,ती अमावास्येची रात्र होती.उशिरा घरी आल्यावर,जेवण आटोपून झोपण्याच्या उद्देशाने,पाठ टेकून डोळे मिटून मनाने परत चौपाटीवर गेलो.आणि डोक्यात विचार यायला लागले. आकाशात काळ्याकुट्ट रात्री, म्हणजेच अमावास्येच्या रात्री, ताऱ्यांकडे पाहण्यात,कल्पनेच्या आधाराने त्यांच्या जवळ पोहोचण्या

वय निघून गेले

श्रीकृष्ण सामंत ·
परवा प्रो.देसाईंचा ७४ वा जन्म दिवस.वय जसं निघून जातं तसं आयुष्यात होणाऱ्या चमत्कारांचा आणि सत्यतेचा अर्थ पटायला लागतो.स्पष्ट विचार प्रदर्शीत करताना संकोच आड येत नाही.प्रत्येकाच्या आठवणीतल्या यादीत फरक असणं स्वाभावीक आहे. भाऊसाहेब मला म्हणाले “माझ्या काही आठवणी आहेत.त्या मी तुम्हाला सांगतो.तुम्ही त्या कवितेत उतारा.गद्या पेक्षा पद्यात ऐकाला मला बरं वाटेल” असं म्हणून त्यानी मला आपल्या आठवणी सांगितल्या.त्या मी खलील कवितेत लिहिल्या.

एका मधमाशीचं प्रेत

श्रीकृष्ण सामंत ·
माझ्या आजोबांच्या शेतात एक मोठ्ठं फणसाचं झाडं होतं.बरेच पक्षी निरनिराळ्या फांद्यांवर घरटी बांधून रहायचे.एका उंच फांदीवर एक मोठं मधमाशांचे पोळं होतं.पण आणखी काही फांद्यांवर लहान लहान पोळी होती. ज्याजावेळेला मध काढून घेण्यासाठी लोक यायचे तेव्हा मी शेतातून कुठेतरी लांब जात असे. मला असं वाटतं की मधमाश्या मारल्या जाऊ नयेत. जेव्हा या उडणाऱ्या मधमाशीसारख्या कीटकांपैकी एखाद्याच्या बाह्यांगावर चिरडण्याचा दाब पाडला जातो हे मी पाहतो तेव्हा मला माझ्या पोटात गोळा आल्याचं जाणवतं.

एकटेपणा

श्रीकृष्ण सामंत ·
एकटेपणा काल मी आणि प्रो. देसाई दोघेच तळ्यावर आलो होतो.मी त्यांना गप्पांच्या ओघात विचारलं, “भाऊसाहेब,इंग्रजीत “Live me alone “ असं एखादा एखाद्याला म्हणतो. बरेच वेळेला वृद्धावस्थेत एकाकी पडून रहाण्याचा कल असतो. पण करत्या-सवरत्या वयात तुम्हाला कधी अशा ह्या एकटेपणाची आवश्यकता वाटली का?” मला प्रो देसाई म्हणाले, “माझा एकाकीपणाच्या सामर्थ्यावर विश्वास आहे. शांत रस्त्यावरून एकटाच धावण्यापासून, खिडकीजवळ बसून पाऊस पडतो ते पाहण्यापर्यंत एकटेपणाचे अनेक प्रकार असू शकतात.

समुद्र किनाऱ्यावर वाळूत पाय खुपसून बसायला मला आवडतं.

श्रीकृष्ण सामंत ·
“लोकांना समुद्र का आवडतो? याचे कारण असं की लोकांना ज्या गोष्टींचा विचार करायला आवडतं त्या गोष्टींचा विचार करायला लावण्याची शक्ती समुद्रात असते.असं कुणी तरी म्हटलं आहे. माझा सागराच्या सामर्थ्यावर विश्वास आहे, त्याहूनही अधिक, वाळूमध्ये बोटं खुपसून राहणं मला आवडतं. समुद्रकिनारा हे एक मजेदार, घटना घडवणारं, खेळकर आणि अस्तव्यस्तीक ठिकाण आहे, त्याच वेळी ते आश्चर्यकारकपणे सुखद, शांत, उपचार करणारं ठिकाण आहे.