Skip to main content

प्रकटन

कल जो पी थी अजी ये तो उसका नशा है, तुम्हारी क़सम आज पी ही नही |३|

लेखक संजय क्षीरसागर यांनी बुधवार, 26/04/2017 21:10 या दिवशी प्रकाशित केले.
इतकी प्रदीर्घ शेरोशायरी आजपावेतो कोणत्याही गज़ल पूर्वी झालेली नाही. पण हीच फैझची ख़ासियत आहे. त्याच्या सृजनात्मकतेचा ठाव घेता येत नाही. प्रत्येक ओळीगणिक तो आणखी जादूमय होत जातो आणि नशेची खुमारी वाढत जाते. कल जो पी थी अजी, ये तो उसका नशा है, तुम्हारी क़सम आज पी ही नही | प्रियकर प्रेयसीला समजावतोयं, मला जी नशा आहे ती कालच्या दारुची आहे. आज, तुझी शपथ, मी प्यालेलो नाही ! ________________ आज कुछ तो नशा, आपकी बात का है, और थोडा नशा, धिमी बरसात का है, हमें आप यूं ही, शराबी न कही ये, ये दिलपे असर, तो मुलाक़ात का, ...

बौद्धिक संपदा हक्क दिवस २०१७

लेखक खेडूत यांनी बुधवार, 26/04/2017 14:14 या दिवशी प्रकाशित केले.
h . . (प्रासंगिक) सोशल मिडीया आपल्या बोटावर नाचायला लागल्यापासून चांगलं काय झालं याचं मोजमाप प्रत्येकाचं वेगळं असेल. सोय आणि मनोरंजनाचे साधन म्हणून ते आवश्यक झालेय. पण दुष्परिणामही कमीअधिक प्रमाणात अनुभवायला मिळत आहेत. एक मोठा प्रॉब्लेम म्हणजे कसलीही खातरजमा ना करता, मूळ लेखकाला डावलून (कधी कधी तर वाचायच्या आधीच) पुढे ढकलण्याची प्रवृत्ती.

मिपा कट्टा वृत्तांत: २३ एप्रिल २०१७, न्यूपोर्ट मॅाल, जर्सी सिटी

लेखक आषाढ_दर्द_गाणे यांनी बुधवार, 26/04/2017 02:52 या दिवशी प्रकाशित केले.
"जरासा उशीर होईल, पोचतोचे" राघवेंद्र ह्यांच्या आलेल्या फोनवरची माझी दिलगिरी ऐकून "पण तू जाऊन नक्की करणार काय तिथे? ओळख आहे का कोणाशी?" मित्राच्या वडिलांनी विचारले. "अहो काही नाही तर खफवर मारतो तश्या रँडमगप्पा मारून येईन..." मी. "कश्यावर?" मित्रवडील एक तर गोरज मुहूर्तावर न्यूयोर्कात आल्यापासून सबवेने वेळेचं गणित आधीच चुकवलेलं. वरुन 'मिसळपाव' काये, गेल्या आठवड्यातून ह्या आठवड्यात कट्टा कसा ढकलला गेला आणि मी सात तास बसमध्ये बसून वर्जिनियातून त्याच्या घरी नक्की कशाला उलथलो ह्या सगळ्याचे मित्रास (सहकुटूंब. त्याचे.) स्पष्टीकरण्यात कट्ट्याचा अकराचा मुहूर्त टळून गेलेला.

महाराष्ट्र दिन २०१७ : चारोळी स्पर्धा

लेखक साहित्य संपादक यांनी मंगळवार, 25/04/2017 19:58 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो. नुकतेच भरगच्च उपक्रम पार पडलेले असल्याने थोडासा विसावा घेऊन मिपाकरांना जरा हलक्या फुलक्या लिखाणासाठी आता मस्त संधी आहे. १ मे रोजी होणार्‍या महाराष्ट्रदिनानिमित्त मिपाकरांनी चारोळ्यांची बरसात करावी अशी इच्छा आहे. शीघ्रकवी, चारोळी स्पेशालिस्ट, विडंबन, सुडंबन स्पेशालिस्ट, विनोदी कवी, प्रेमकविता अन निसर्गकवितांची झडी लावणार्‍या कवी/कवयत्रींची मिपाला कधीच कमी पडली नाही. आता विषय सोपा, जिव्हाळ्याचा अन स्पेशल आहे. तेंव्हा किबोर्डावर नाचू देत आपली बोटे. येऊ देत काही चारोळ्या. नव्हे......

पान

लेखक अज्ञात यांनी मंगळवार, 25/04/2017 16:07 या दिवशी प्रकाशित केले.
पान म्हणालं की कलकत्ता सादा आठवतं, मग मसाला मग मगई... त्यापलीकडे कधी मजल गेली नाही! पण ह्या पाना आधी एक महत्वाचं पान म्हणजे आपलं... केळीचं पान! आठवतं का केळीचं पान, आता त्यावर जेवण मिळवणे म्हणजे जरा "नशीब वान आहेस लेका!" वगैरे म्हणावं लागतं! पारंपरिक गोष्टींचा रितिरिवाजांचा जसा ऱ्हास होत चाललाय, तसाच ह्या पानांवर जेवण केरण्याचा ही, बरोबर आहे म्हणा! आता जागा नसते ना, जिथे जागा असते तिथे भलत्याच गोष्टींनी जागा घेतलेली आहे आज काल! असो... केळीच्या पानावरचे जेवण लहानपणी खूप अनुभवले, त्यावर तरंगणारे पाणी, अगदी बरोब्बर मध्ये असलेल्या लांब देठाचा मोठेपणा! मोठेपणा म्हणजे...

प्रिय सचिन

लेखक चिनार यांनी सोमवार, 24/04/2017 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रे सचिन...!! आजकाल तुझ्याविषयी बोलणं..लिहिणं...इतकंच काय तुला टीव्हीवर बघणंही सोडून दिलंय मी.. का म्हणजे काय?? त्रास होतो रे..खरंच खूप त्रास होतो... आज तुझा वाढदिवस आहे...म्हटलं बघूया, जमतंय का काही लिहायला.. लिहायला लागतंच काय रे??

पुस्तकं

लेखक मितान यांनी रविवार, 23/04/2017 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
पुस्तकं जिवंत असतात. जन्माला यायच्या आधीच लेखकाच्या हृदयात ती धडधडत असतात. एखादं नवजात पुस्तक हळुवार जवळ घेतलंत तर जावळांचा वासही येतो. अनोळखी हातात ती आधी फडफडतात पण एकदा त्या हातानी आपलं म्हणलं की त्याच्या नजरेखाली शांत निवांत होतात. काही पुस्तकं वाढतात,विकसित होतात, थोर होतात आभाळएवढी; काही खुरटी च राहतात. अधलीमधली सामान्य माणसासारखी आयुष्यभर अजून एक पायरी वर चढायची धडपड करत राहतात.

नाशिकचा उद्योग ०३ : याज्ञिकीने तारले !

लेखक सुधीर मुतालीक यांनी शनिवार, 22/04/2017 16:14 या दिवशी प्रकाशित केले.
औरंगजेबाच्या मृत्यू नंतर म्हणजे इस १७०७ नंतर काही वर्षांनी पेशवाईचा ऱ्हास होई पर्यंत म्हणजे इस १८१८ पर्यंत नाशकात संपूर्ण मराठयांची राजवट होती म्हणजे पेशवाई होती. पेशवाई अवतरणे हा सर्वार्थाने एक प्रचंड मोठा बदल होता. पेशव्यांचा एकूणच मराठी मुलुखाच्या औद्योगिक उत्कर्षासाठी कसून प्रयत्न सुरु होता असे दिसते. पण त्या प्रयत्नांची दिशा आजच्या संदर्भातच नव्हे पण तत्कालीन जागतिक संदर्भात सुद्धा जी होती ती तशी का होती असा प्रश्न पडतो. युरोपातला उद्योग ज्वालामुखी सारखा अगदी तोंडाशी येऊन खदखदत होता. फार पुढे नव्हे १७५० साल युरोपातल्या औद्योगिक क्रांतीचे पडघम वाजु लागले होते.

गती

लेखक नरेंद्र गोळे यांनी शनिवार, 22/04/2017 09:46 या दिवशी प्रकाशित केले.
अन्न, वस्त्र, निवारा किंवा “आहार निद्रा भय मैथुनंच” इतक्याच काय त्या जीवनाच्या मूलभूत गरजा असतात, असा आपला समज असतो. तसा तो सततच करून दिला जात असतो. मात्र हे खरे नाही. जीवनाला आवश्यकता असते ती गतीची. ह्याची आपल्याला जाणीवही क्वचितच करून दिली जात असते. काळाची गती अपरंपार असते. काळासारखी गतीमान वस्तू तर जगात दुसरी कुठलीही नसेल. मनुष्य कालवश होतो. मग आपण सांत्वना करत असतो, की ईश्वर मृतात्म्यास सद्-गती देवो. म्हणजेच गतीला आपण हवीशी मानत असतो. मनुष्याच्या पूर्वसुकृतांनुरूप चांगली वा वाईट गती त्यास प्राप्त होतच असते. मात्र गतीविरहित जीवनाची कल्पनाच करता येत नाही. सर्व चराचर सृष्टी सततच बदलत असते.

श्रीसाईसच्चरित भाग २. अध्याय १ . शब्दार्थ आणि भावार्थ

लेखक aanandinee यांनी गुरुवार, 20/04/2017 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
श्रीसाईसच्चरित भाग २. अध्याय १ मंगलाचरण ओवी १३ ते ४२ भावार्थ आजच्या टू मिनिट नूडल्सच्या जगात बर्याच जणांना हे भलं मोठ्ठं मंगलाचरण म्हणजे पाल्हाळ वाटू शकतो. मी माझ्या वैद्यकीय विद्यार्थीदशेत असताना जेव्हा श्रीसाईसच्चरित वाचत असे तेव्हा मी हे मंगलाचरण पटकन 'वाचून टाकत' असे कारण मला मुख्यत्वे रस कथांमध्ये होता. आता मी विचार करते की हेमाडपंतांना इतक्या सगळ्या लोकांना वंदन करण्याची गरज का वाटली असेल? बरं त्यातही नावं न घेतल्यामुळे ही मंडळी, जसं की वेगवेगळे देव, ऋषी,संत हे रागावणार होते असंही नाही. मग एवढी मोठी यादी कशाला? उत्तर आहे हेमाडपंतांच्या मनात असलेली 'कृतज्ञता'.