Skip to main content

प्रकटन

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ अब्दुल कलाम यांना, त्यांचे नाव एका जीवाणूच्या नामकरणासाठी वापरून, नासाने सन्मानित केले !

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी मंगळवार, 23/05/2017 23:58 या दिवशी प्रकाशित केले.
भारतासाठी एक अभिमानास्पद गोष्ट! "भारतासाठी अभिमानास्पद" असे मुद्दाम लिहिले आहे. कारण आज डॉ अब्दुल कलाम हयात असते तर त्यांना त्यांच्या अनेक सन्मानांसारखेच या सन्मानाचेही फारसे अप्रूप वाटले नसते. परंतु, त्यांच्या व्यक्तिमत्वाने भारलेल्या माझ्यासारख्या चाहत्याला या क्षणी अवर्णनीय आनंद झाला नसता तरच आश्चर्य! असामान्य शास्त्रज्ञांचा सन्मान, शास्त्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या गोष्टीचे नामकरण त्यांचे नाव वापरून करण्याचा प्रघात आहे. ते कधी एखाद्या जैविक प्रजातीचे नाव, तर कधी एखाद्या ग्रह/तारा/खगोलशास्त्रीय समूहाचे नाव, तर कधी एखाद्या परिमाण/नियम/संकल्पनेचे नाव, इत्यादी असते.

दस का बीस

लेखक किसन शिंदे यांनी सोमवार, 22/05/2017 17:19 या दिवशी प्रकाशित केले.
तारीख : अशीच कुठलीतरी वेळ : सकाळी पावणे नऊ/नऊ वा. ठिकाण : गडकरी रंगायतनचे अ‍ॅडव्हान बूकिंग काऊंटर 'साखर खाल्लेला माणूस' या नाटकाची अ‍ॅडव्हान बूकिंग सुरू व्हायची होती. सुरूवातीच्या चार-पाच ओळीत जागा मिळावी म्हणून थोडा धावत पळतच गेलो काऊंटरवर. रंगायतनच्या नियमाप्रमाणे सकाळी साडे आठला बूकिंग सुरू होते. मी तिथे पोचलो साधारण पावणे नऊ/ नऊ वाजता. काऊंटर ठेवलेला बूकिंग चार्ट पाहून आश्चर्याचा धक्का बसला, कारण 'A' पासून ते 'R' पर्यंतच्या सगळ्या सीट्स भरल्या होत्या.

भारताचा एक खरा पण अप्रसिद्ध नायक (अनसंग हिरो) : माथुन्नी मॅथ्यूज

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी रविवार, 21/05/2017 23:47 या दिवशी प्रकाशित केले.
काही माणसे अतिशय प्रतिकूल परिस्थितीत, स्वतःच्या सुरक्षेची पर्वा न करता, जगावेगळे धैर्य दाखवून, आपल्याशी तसा काही तडक संबंध नसलेल्या लोकांना वाचविण्यासाठी असामान्य कार्य करतात. अश्या माणसांना बर्‍याचदा पुरेशी प्रसिद्धी मिळत नाही आणि थोडीबहूत मिळाली तरी, यातली बरीच माणसे प्रसिद्धिपराङमुख असल्याने, जनतेच्या आठवणीतून सहज निघून जातात. मात्र, अशी माणसे खर्‍या अर्थाने नायक (हिरो) असतात. असाच एक, मुथुन्नी मॅथ्युज नावाचा, भारतिय सुपुत्र आणि नायक काल (२० मे २०१७ रोजी) आपल्यातून कायमचा निघून गेला आहे. आज हे नाव कोणाला सहजपणे आठवणार नाही.

नाणी ते नोटा छपाई : नाशिक उद्योग ०७

लेखक सुधीर मुतालीक यांनी शुक्रवार, 19/05/2017 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
पैसे छापणे हा नाशिकचा खुप जुना व्यवसाय आहे. आजही नाशकात भद्रकाली परिसरात एक टांकसाळ गल्ली आहे. इथल्या टांकसाळे वाड्यात मुठ्ठल नामक परिवार राहायचा. त्यांना पेशव्यांनी टांकसाळे हे आडनांव दिले होते. बडोद्याचे गायकवाड नाशकातल्या टांकसाळीतून १७६९ ते सुमारे १७७२ या कालावधीत आपली नाणी पाडत असत. पेशवाईत नाणी पडण्याच्या भानगडीत सरकार पडत नसे. नाणी पाडणे हा खाजगी धंदा असायचा. हा व्यवसाय सुरु करायला सरकारची परवानगी मात्र घ्यावी लागे. अर्थात सरकार नाणी पडण्याचा मोबदला मात्र घेत असे.

बिडी जलायले.....: नाशिकचा उद्योग ०६

लेखक सुधीर मुतालीक यांनी गुरुवार, 11/05/2017 19:42 या दिवशी प्रकाशित केले.
( उत्तरार्ध ) : नाशिकच्या आर्थिक आणि सामाजिक बदलाबरोबर नाशिकचा भूगोल बदलायची ही सुरुवात होती. कारण पारंपरिक किंवा जाती किंवा वर्ण व्यवस्थेवर आधारित करण्याच्याच्या व्यवस्थेला नाशिकपुरते तरी बिडी व्यवसायानेच एका अर्थाने सुरुंग लावला. विशेषतः बहुजन समाजातल्या विशेषतः मागास जातीतील कुटुंबाना त्यांच्या पारंपरिक व्यवसायाव्यतिरिक्त पैसे मिळवण्याची पहिली संधी बिडी उद्योगानेच दिली ही एका अत्यंत महत्वाच्या स्थित्यंतराची सुरुवात होती. आपापली कामे झाल्यावर उरलेल्या वेळात सुरुवातीला बिडीच्या कारखान्यात जाऊन काम करण्याची संधी विशेषतः बहुजन समाजाच्या लोकांना मिळत असे.

विंटर स्पोर्ट - स्कीईंग...भाग२

लेखक इडली डोसा यांनी बुधवार, 10/05/2017 12:55 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ पहिल्या लेसनमध्ये काहीच पडझड न झाल्यामुळं मी दुसऱ्या लेसनची उत्साहात वाट बघत होते. लौकर उठून पटापट आवरून निघालो, जरा आधी पोचलो तर जाऊन थोडी उतारावर थांबायची प्रॅक्टिस करता येईल असा माझा विचार होता. पण पीक सीजन असल्यामुळं स्काय लिफ्टसाठी भली मोठी रांग होती. डोंगराच्या पायथ्यापासून ते स्की एरियापर्यंत पोचायला ८ मिनिटे लागतात. यथावकाश आमचा नंबर लागून आम्ही स्की एरियामध्ये पोचलो तोपर्यंत आमच्या टीम ने थोडी प्रॅक्टिस करायला सुरुवातही केली होती.

एका पुस्तकाचा शोध..

लेखक मोदक यांनी रविवार, 07/05/2017 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
. ...अरे हो, हे पुस्तक बघ. तुला नक्की आवडेल. डिसेंबर महिन्यात एका काकाच्या घरी दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान बराच वेळ गप्पा, जेवण आणि इतर विषय बोलून झाल्यानंतर काकाकडे असलेले कैलास मानस सरोवर यात्रेवरील एक पुस्तक वाचून संपवले. रात्री झोपण्याआधी काकाने अचानक एक पुस्तक हातात ठेवले. भरभक्कम वजनाचे ते पुस्तक बघून आणि विशेषतः त्यातील अनुक्रमणिका बघून झोप उडालीच.

पुष्पक

लेखक अज्ञात यांनी रविवार, 07/05/2017 13:58 या दिवशी प्रकाशित केले.
तो पुष्पक सिनेमा काय मस्त घर करून बसलाय मनात, मधूनच कधीतरी आठवतो, मग काही फारच गमतीदार आणि काही फारच गंभीर प्रसंग आठवतात त्यातले! १९८८ साली पुण्यात निलायम थेटरात पाहिलेला म्हणे आम्ही हा चित्रपट, मी पाहिलेला थेटरातला पहिला वहिला चित्रपट (मला आठवत नाही, आई सांगते की आपण पाहिलेला... बाजूलाच अशोका हॉटेल मध्ये होतो आपण वगैरे) असो नंतर दूरदर्शन मग घरी व्हीडीओ फाईल वरून पारायणं झाली ह्याची. असो... पार्श्वसंगीत तर इतकं आवडलं की मी चक्क व्हीडीओ फाईल मधून एक एक पीस ऑडिओ कन्व्हर्ट केलेत.

बिडी: नाशिक उद्योग - ०५ : बिडीने "वळवले" नाशिकचे अर्थकारण

लेखक सुधीर मुतालीक यांनी रविवार, 07/05/2017 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
ती १९/२० वर्षाची असेल. साल सुमारे १९८०. काशा तिचा धाकटा भाऊ. मी अन काशा घट्ट मित्र. शाळेतले. त्यावेळी आम्ही पाचवीत. खेळायला आम्ही एकमेकांच्या घरी किंवा गल्लीत पडीक. काशाची आक्का (ताई) मला किती तरी वर्षे राखी बांधायची. आमची तिघांची घट्ट गट्टी. आक्काचं लग्न चारच महिन्यापूर्वी करंडीच्या जल्लोषात झालं होतं. करंडी हे आमच्या निपाणीचे खास वाद्य. लग्नानंतर चारच महिन्यांनी त्यादिवशी कामगार वस्तीतल्या त्यांच्या एक खोलीच्या घरात जोरात रडारड.कल्ला. आक्की रडत होती. आई मोठ्यानं शिव्या देत रडत होती. आबा ओरडून समजावत होता. मला एवढंच आज नक्की आठवतं, आक्की शेवटी ओरडून म्हणाली होती "....

हाऊ टू लीव अँड डाय : खुशवंत सिंग !

लेखक संजय क्षीरसागर यांनी रविवार, 07/05/2017 00:54 या दिवशी प्रकाशित केले.
खुशवंत, सिंग वन-शॉर्ट-ऑफ अ सेंश्युरी वर बाद झाले. त्यांनी आनंदानं जगायला (आणि मरायला) नक्की काय लागतं याची १० सूत्रं मांडली. मध्यंतरी याचा एक वॉटस-अ‍ॅप फॉरवर्ड पण फिरत होता. तरीही ही सूत्रं वाचून आंमलात आणण्याजोगी नक्कीच आहेत, त्या निमित्तानं हा लेखनप्रपंच ! खुशवंत म्हणतात, मी अनेकदा सुख नक्की कशात आहे, माणसाला सुखानं जगायला नक्की काय करायला हवं याचा विचार केलायं. १) तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे शरीरस्वास्थ्य ! जर शरीरस्वास्थ्य नसेल तर माणूस सुखी होऊ शकत नाही. साधीशी का असेना, एखादी जरी व्याधी असेल तर ती जगण्याचं सुख कमी करते. २) दुसरी गोष्ट म्हणजे आर्थिकस्वास्थ्य !