बिडी: नाशिक उद्योग - ०५ : बिडीने "वळवले" नाशिकचे अर्थकारण
ती १९/२० वर्षाची असेल. साल सुमारे १९८०. काशा तिचा धाकटा भाऊ. मी अन काशा घट्ट मित्र. शाळेतले. त्यावेळी आम्ही पाचवीत. खेळायला आम्ही एकमेकांच्या घरी किंवा गल्लीत पडीक. काशाची आक्का (ताई) मला किती तरी वर्षे राखी बांधायची. आमची तिघांची घट्ट गट्टी. आक्काचं लग्न चारच महिन्यापूर्वी करंडीच्या जल्लोषात झालं होतं. करंडी हे आमच्या निपाणीचे खास वाद्य. लग्नानंतर चारच महिन्यांनी त्यादिवशी कामगार वस्तीतल्या त्यांच्या एक खोलीच्या घरात जोरात रडारड.कल्ला. आक्की रडत होती. आई मोठ्यानं शिव्या देत रडत होती. आबा ओरडून समजावत होता. मला एवढंच आज नक्की आठवतं, आक्की शेवटी ओरडून म्हणाली होती "....
मिसळपाव
माझ्या कडे लिहायला काही नाहीये सध्या, सीरियल्स, चित्रपट, गाणी आणि अन्वयाचे छोटे किस्से सोडले तर काहीच लिहिले नाहीये गेले वर्ष, दीड वर्ष... आणि तितक्यात एक लेख वाचला, लेखाची सुरुवात काहीशी अशी - 'तंत्रज्ञानाने ज्या पिढीला गुदगुल्या केल्या ती आमची पहिली पिढी.' आणि शेवट असा - 'दुःख गाव हरवल्याचं आपल्याला कधीच नव्हतं. गाव हरवला हरकत नाही. गावपण हरवायला नको होतं.'
ह्या लेखावरून मी परत गेलो ना...
नाकातून परत रक्त यायला लागलं. मी खिशातल्या रूमालाने नाक पुसलं. कमाल आहे, यावेळचं रक्त लालऐवजी काळपट दिसत होतं. कदाचित रस्त्यावरच्या उघडझाप होणाऱ्या दिव्यांमुळे तसं दिसत असावं.
“मुव्ही आवडला का रे?” प्लियानीने आपला रेशमी हात माझ्या गळ्यात टाकत विचारलं. ती माझ्या इतकी जवळ असूनसुद्धा तिचा सहवास मला जाणवत नव्हता. पण परफ्युमचा मंद मोहक चंदनी सुगंध मात्र मनाला मोहवून टाकत होता. हा सुगंध मला पृथ्वीची आठवण करून देतो.
“तुला मुव्ही आवडला का ?” तिने परत विचारलं.
“हो.