मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माहिती

चला "मायक्रोसॉफ्ट एक्सेल" शिकूया.. (भाग १)

मोदक ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
"मोदक, तू कॉमर्स बॅकग्राऊंडचा असूनही आयटी कंपनी मध्ये कसे काय..?" या प्रश्नाचे नेमके उत्तर काय द्यावे हा क्रायसीस बरीच वर्षे मागे लागला आहे.

'प्रेमाची गोष्ट' . . .

आशु जोग ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
'प्रेम' ही खरेच इतकी मोहक गोष्ट आहे का ! चित्रपटसृष्टीत अनेकांनी अनेक तर्‍हेनी हाताळूनसुद्धा अजून शोध घेणे संपलेले नाही. -- आत्तापर्यंत असंभव, अग्निहोत्र अशा मालिका आणि गैर, मुम्बई पुणे मुम्बई, एक डाव धोबीपछाड असे चित्रपट काढल्यानंतर दिग्दर्शक सतिश राजवाडे यांचा 'प्रेमाची गोष्ट' नावाचा हा चित्रपट. त्यांचा गैर सारखा सस्पेन्स थ्रिलर हिट्ट होऊनही ते बहुधा मुम्बई पुणे मुम्बई, एका लग्नाची दुसरी गोष्ट सारख्या चित्रपटांसाठी जास्त ओळखले जाऊ लागले असावेत. हा चित्रपट जरा वेगळ्या पद्धतीने घेतला आहे. डॉ. विवेक बेळे नावाचे एक नाटककार आहेत.

मोजमापं आणि त्रुटी - १

राजेश घासकडवी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
(आज भारतीय विज्ञान दिनानिमित्त मोजमापं आणि त्रुटी या विषयावर लिहितो आहे. प्रत्येकाला करून बघण्यासारखा मोजमाप करण्याचा प्रयोग आहे. त्यात सहभाग घ्यावा ही विनंती.) आपण आपल्या दैनंदिन जीवनात अनेक गोष्टी मोजतो. मुलाला आलेला ताप थर्मोमीटरने मोजतो. डाएट करत असो वा नसो, अधूनमधून आपलं वजन मोजतो. स्वयंपाक करताना पोळ्यांसाठी कणीक मोजून घेतो. काही वेळा प्रत्यक्ष मोजत नाही, नुसताच अंदाज घेतो. म्हणजे आरशात बघून 'पोट सुटलंय आताशा' असं म्हणतात. किंवा बाहेर पडल्यापडल्या 'काय थंडी आहे' म्हणतो. हे अंदाज घेणं हेही एक प्रकारे मोजमापच असतं.

आज हुतात्मा चंद्रशेखर आजाद यांचा हौतात्म्यदिन

सर्वसाक्षी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आज दिनांक २७ फेब्रुवारी. आजपासून ८२ वर्षांपूर्वी याच दिवशी,हिंदुस्थान समाजवादी प्रजासत्ताकसेनेचे सेनापती हुतात्मा चंद्रशेखर आजाद (चंद्रशेखर सीताराम तिवारी) यांना आल्फ्रेड पार्क, अलाहबाद येथे वीरमरण प्राप्त झाले होते. हुतात्मा चंद्रशेखर आजाद यांना त्यांच्या हौतात्म्यदिनी विनम्र अभिवादन.

स्त्रियाना नक्की काय पाहिजे?

लिलि काळे ·
लेखनविषय:
नमसकार, इथे लिहिन्याचा माझा हा पहिलाच टाईम आहे. मला मिसळपाव खुप आवडल. माझे मराठी चान्गले नाही. पन ईथे भप्रुर वाचनार व लिहिनार आहे,मग इम्प्रोव होईल. मला हि तेच पाहिजे. मला खत्री वाट्ते तुम्ही मदत कराल याची. आज मी एक गोश्ट बोलते मला खुप खुप आवडलेली.

किन्ग आर्थर आणि चेटकिण

एकदा शेजारच्या राजाच्या राजाने किंग आर्थर बेसावाध होता त्यावेळी हल्ला करून त्याला पकडले व जेलमध्ये टाकले. पण तरुण आर्थरच्या विचाराने ते इम्प्रेस्स झाले व त्यानी त्याला मारायचे नाही असे ठरवले. त्यानी आर्थरला म्हटले तुला आम्ही एक खुप अवघड प्रश्न सान्ग्णार, त्याचे उत्तर तु एक वर्शाच्या आतमधी द्यायचे.

3D प्रिंटींग - म्हणजे काय रे भाऊ?

सोत्रि ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मागे एकदा एका मेल मधून 3D प्रिंटींगच्या व्हिडियोची एक मेल आली होती. ती बघितल्यावर काहीतरी गीमीक असावे म्हणून तिकडे लक्ष दिले नव्हते. पण परवा ही बातमी वाचली आणि हबकलोच. त्यावेळी तो व्हिडियो बघून त्या 3D प्रिंटींगला सीरियसली न घेतल्याबद्दल मन खाऊ लागले आणि 3D प्रिंटींगबद्दल ज्ञान वाढविण्यासाठी त्याची माहिती घेणे चालू केले.

आयटीच्या गोष्टी - ऑनसाईट (१)

धन्या ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आयटीच्या गोष्टी - नमन आयटीच्या गोष्टी - ऑन द बेंच शिक्षण संपलेलं असतं. नोकरीलाही आता जवळपास दोन वर्ष होत आलेली असतात. इथे आता कामात मन लागत नसतं, डोळ्यांना तिकडचे वेध लागलेले असतात. मॅनेजरला तसं आडून आडून सुचवणं चालू असतं. मनात आशा निराशेचा हिंदोळा झुलत असतो. कारण, आयटीत नोकरीला लागल्यानंतर अगदी पहिल्या दिवसापासून ज्या गोष्टीसाठी देव पाण्यात बुडवून ठेवलेले असतात ती गोष्ट वास्तवात उतरण्याची वेळ आलेली असते.

"शत्रुघ्न"च्या निमित्ताने

शरद ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
श्री. मृत्युंजय यांचा "शत्रुघ्न" हा लेख वाचकांना आवडला व त्यावर प्रतिसादही भरपूर आले. रामायणातील एका अप्रसिद्ध म्हणावे अशा व्यक्तिचित्रावर लेख मीही प्रथमच बघत होतो. लेख मलाही आवडला पण वाचतांना जाणवले कीं वाल्मिकी रामायण व हा लेख यांतील तपशिलात फरक आहेत. मग रामायण काढून हे सर्ग परत वाचले. पण हे तपशीलातील फरक किरकोळ आहेत व एकूण लेखावरील त्यांच्या प्रतिपादनात त्यांनी फरक पडत नाही. शिवाय जर श्री. वल्ली यांच्यासारखी अधिकारी,अभ्यासू व्यक्ती ( हे तर संदर्भ म्हणून थेट वाल्मिकी रामायणातील संस्कृत श्लोकच देतात, मानले !) जर काही बोलत नसेल तर ते दुरुस्त करण्यातही काही हशील नव्हता.

यावे दुर्गपूजेला..!-शिवाजी ट्रेल

अत्रुप्त आत्मा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
......गेल्या वर्षी मी शिवाजी ट्रेल या संघटने बद्दल माहितीवजा लेखन इथे केलं होतं... http://misalpav.com/node/20831 ... तसा दरवर्षी नवा गड असतो..पण गेल्याच वर्षी क्षिरसागर सर(शिवाजी ट्रेलचे प्रमुख आणी सर्व काही...) म्हणाले होते,की हा गड अतिशय दुर्लक्षित आणी विषेश निधि न मिळालेला असल्यानी याचं काम २/३ वर्ष चालेल...त्यामुळे गेल्या वर्षीच्या धाग्याची लिंक मुद्दामच डकवली आहे...कारण या वर्षीही तोच किल्ला आहे...