म्हणे चोख्याची महारी
भारतातील सर्वांत जास्त अन्याय झालेला समाजाचा वर्ग कोणता? (टारगटपणा नकोय, "नवरे" कोण म्हणाला तिकडे? आणि तेही इकडेतिकडे बघत, तोंडातल्या तोंडात पुटपुटत? गप बसा! हा धागा गंभिर आहे)
अर्थात दलित. त्यांना ना शिक्षणाचा अधिकार, ना आर्थिक सुबत्ता मिळवावयाला वाव, नाही सामाजिक समतेचा वारा आणि नाही ज्या धर्मात त्यांनी जन्म घेतला त्या धर्मातील देवाला बघण्याचीही परवानगी. शेतात राबणारा बैल बरा, त्याला वर्षातून एकदा कां होईना गळ्यात माळा घालून रस्त्याने मिरवत जाता यावयाचे, मोठ्या घरची मालकीण त्याला ओवाळून, पुरणपोळीचा घास भरवावयाची! आणि बैलाचा स्पर्श झाला म्हणून कोणी अंघोळ करत नव्हता.