Skip to main content

माहिती

माझी पहिली कादंबरी ................

लेखक ईश आपटे यांनी रविवार, 12/06/2011 या दिवशी प्रकाशित केले.
रसिक आणि मिसळपावकर मित्र हो ................. माझी पहिली वहिली मराठी कादंबरी " सर्गारंभ" ही नुकतीच प्रकाशित झाली(मनोरमा प्रकाशन). सत्य आणि आभास ह्यांच्या सीमारेषा जेव्हा पुसट होतात, तेव्हा जाणीव आपल्याला नक्की काय दाखवतेय हेच कळेनासे होते. बौध्द वैज्ञानवाद्यांच्या मते, इंद्रियांना येणारे अनुभव व ज्या वस्तुंचे अनुभव येतात त्यांमध्ये भिन्नता नसते. आकाशात दिसणारा चंद्र व मी चंद्र पाहिला हे मनाला होणारे ज्ञान, एकच आहे. वेदान्तातला दृष्टि-सृष्टिवाद ही असाच काहीसा आहे.

साखर आणि फॅट चे खरे गुपित

लेखक खादाड अमिता यांनी शनिवार, 11/06/2011 या दिवशी प्रकाशित केले.
'आहो, मधुमेह झालाय न? सगळी साखर बंद करा!' ' मी सध्या काही गोड किंवा तळलेले पदार्थ खात नाही- वजन कमी करायला हो!' 'उत्कृष्ट आरोग्याची गुरुकिल्ली- कुठलाही स्वरूपात साखर टाळणे'. हे आणि असे अजून बरेच समज/गैरसमज- साखर, तूप, तेल, वनस्पती, फॅट - विषयी आपण वाचून किंवा ऐकून असतो. आपल्याला जमेल तेवढं आपण आरोग्य जपण्याचा आणि आहारात फेरफरक करण्याचा प्रयत्न करत असतो. पण बऱ्याचदा आपण अपूर्ण किंवा चुकीच्या माहितीला बळी जातो. उ.दा. शुगर फ्री चॉक्लेट.

मकबूल फिदा उर्फ एम. एफ. हुसेनची चित्रशैली: एक धावता परिचय

लेखक चिंतातुर जंतू यांनी शनिवार, 11/06/2011 या दिवशी प्रकाशित केले.
हुसेनच्या मृत्यूची बातमी कळताच अपेक्षेनुसार या संस्थळावर सडक्या प्रतिक्रियांचा एक ओघ येऊन गेला. काहींनी मेल्या माणसाबद्दल हे असं बोलणं कसं रुचिहीन आणि सभ्यतेची पातळी सोडून आहे हे सांगितलं. अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी किंवा वृद्ध हुसेनना जो देशत्याग करावा लागला त्याविषयी अनेक उदारमतवादी लोकांनी अनेक ठिकाणी या निमित्तानं पुन्हा एकदा खेद व्यक्त केला. पण मुळात चित्रकार म्हणून हुसेन यांचं कर्तृत्व काय याचा थोडा परिचय करून द्यावा यासाठी हा लेख लिहिला आहे. त्याआधी थोडी स्वातंत्र्यपूर्व भारतातली कलासंस्कृती पाहणं गरजेचं आहे. इंग्रजांनी १८५७ साली मुंबई विद्यापीठाची स्थापना केली. त्याच साली जे.जे.

शिवराज्याभिषेक सोहळा ६ जून २०११

लेखक मालोजीराव यांनी शुक्रवार, 10/06/2011 या दिवशी प्रकाशित केले.
रायगडावर ६ जून रोजी हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा ३३८ वा राज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.जबरदस्त पावसात आणि धुक्यात सोमवारी पहाटे मुख्य सोहळ्याला सुरुवात झाली. मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर कुलदेवतेला स्मरून शिवरायांच्या सुवर्णमूर्तीवर श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते राज्याभिषेक संपन्न झाला.यावेळी महाराजांच्या जयजयकाराने सारा आसमंत दणाणून गेला होता. पोवाडे, ललकारी,तुतारी च्या आवाजाने वातावरण भारुन गेलं होतं. यावेळी नितीन देसाई यांनी पुढील वर्षी सोहळा आणखी दिमाखदार आणि भव्य होणार असल्याचा सांगितलं....तसंच रायगड,राजगड आणि सिंधुदुर्ग

नवीन सदस्यांप्रति जून्या सदस्यांचे वर्तन.

लेखक नीलकांत यांनी गुरुवार, 09/06/2011 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आज मिसळपाववर येणार्‍या नवीन सदस्यांच्या अडचणी आणि त्याबाबत जूण्या सदस्यांचे वर्तन यावर चर्चा करावी म्हणून हा लेख आहे. असे साधारण निरीक्षण आहे की नवीन लोक साधारण ६ महिने ते १ वर्ष केवळ वाचनमात्र अवस्थेत असतात. त्यानंतर कधीतरी ते सदस्यं होतात. ते झाल्यावर सुध्दा प्रतिक्रिया लिहीण्यापासून ते लेख लिहीण्यापर्यंतचा प्रवास नवीन सदस्यासाठी जरा अडचणीचाच असतो. त्यामुळे हा प्रवाह जरा हळू चालतो. असं सगळं करून एखादा नवीन सदस्यं जेव्हा एखादा लेख लिहीतो तेव्हा तो पहिलाच लेख खूपच चांगला व्हावा किंवा अतिशय मुद्देसुद वगैरे व्हावा अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे असं वाटतं.

लेखन काढले.

लेखक आंसमा शख्स यांनी गुरुवार, 09/06/2011 या दिवशी प्रकाशित केले.
लेखन काढले. तसदी बद्दल क्षमस्व असे लेखन येथे येणार नाही याची काळजी घेईन.

आई गं! काय ती जळजळ!

लेखक खादाड अमिता यांनी सोमवार, 06/06/2011 या दिवशी प्रकाशित केले.
जळ-जळणे, आम्लपित्त, घश्याशी येणे, अ‍ॅसीडीटी मुळे पोटात/छातीत दुखणे- काही वर्षांपूर्वी ही लक्षणं फक्त पन्नाशीच्या पुढच्या व्यक्तींमध्ये आढळून येत होती. पण गेल्या काही वर्षात दिवसंदिवस तरुण वयोगटात पण अ‍ॅसीडीटी चा विकार वाढत चाललाय. असं अचानक कसं झालं? हे अचानक झालेलं नसून बऱ्याच वर्षांपासूनच्या खाण्या पिण्याच्या सवयी पूर्णपणे बदलून टाकल्यामुळे झालंय. शाळेत असे पर्यंत रोज दिवस भरात ६ वेळा खाणारी मुलं, कॉलेजला गेल्यावर फक्त चहा/कॉफी, पफ/पॅटीस व इतर जंक फूड आणि वरचेवर बाहेरचं अन्न खायला लागली. स्लिम फिगर च्या नादात तरुण मुलींनी 'ताटभर जेवण म्हणजे विष' असल्यासारखे त्याचा बहिष्कार केला.