आपले प्रोसेस्सेड पदार्थांचे वाढलेले सेवन आणि दिवसंदिवस कमी खाण्यात येणारा पारंपारिक स्वयंपाक- ह्यानी, हल्ली बऱ्याच व्यक्तींना जीवन सत्व बी १२ च्या डेफिश्यन्सी चा त्रास होतो. ह्या डेफिश्यन्सी ची सगळ्यात आधी आढळून येणारी लक्षणं म्हणजे दम लागणं, छातीत धड धड्ण, चेहरा निस्तेज होणं, अकारण थकवा, चिडचिड होणं इ. बरेचदा अगदी व्यवस्थित सकाळ संध्याकाळ पोळी भाजी आमटी भात- असा आहार असलेल्या व्यक्तींना पण अशी बी १२ ची उणीव होऊ शकते. हे असं का होतं? तेच आज जाणून घेऊया.
आहारात बी १२ ची मात्रा कमी असणे किंवा शरीरात बी १२ कमी शोषले जाण्यानी त्याची उणीव होते.