मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लेख

आठवणींची निर्मिती.

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आज आमच्या शेजारांच्या घरात खूपच गडबड आणि आवाज होत होता.त्यांना दरवाजा खटखटून चौकशी करण्याचा माझा मानस नव्हता.पण काही वेळाने माझाच दरवाजा खटखटून गडकर्‍यांची भारती आली आणि मला म्हणाली, "काका,एकदोन खूर्च्या कमी पडतायत,तुमच्या खुर्च्या मिळतील काय?" मी म्हणालो, "त्यात विचारायचं काय घे तुला हव्या तेव्हड्या. पण काय गं भारती कसली गडबड चालली आहे बर्‍यांच बायकांचा आवाज येतोय." मला म्हणाली, "आज आमच्या घरी "पॉटलक" आहे." "म्हणजे ग काय?" ह्या माझ्या प्रश्नाचं उत्तर न देता हात करीत म्हणाली "मग सांगते.

"तुझ्या डोक्यावर आलेली बला टोपीने झेलली."

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आज मी गुरूनाथला विचारलं, "तुझी ती गांधी टोपी,किंवा सफेद टोपी म्हणूया ती वापरायचं तू केव्हा पासून सोडून दिलंस?" त्याच्या त्या सफेद टोपीची "ष्टोरी" माझ्या अजून लक्षात आहे हे समजल्यावर गुरूनाथ हंसायला लागला. "अरे तू एव्हडा हंसतोस का?" असं मी त्याला म्हणालो. "ती टोपी आणि मी हंसतो कां?

<strong>आता रायगडावर रहावत नाही.....</strong>

उदय सप्रे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आता रायगडावर रहावत नाही..... आजच्या या इंग्रजाळलेल्या वातावरणात वाढलेल्या माझ्या तमाम भारतीय बांधवांनो आणि भगिनींनो , स्वराज्याच्या पहिल्या छत्रपतींचा तुम्हा सर्वांना नमस्कार ! तुमच्या हल्लीच्या इंग्रजी दिनदर्शिकेप्रमाणे , आज ६ जून २००९. म्हणजे आज आमचा राज्याभिषेक ३३६ वर्षांचा झाला - म्हणजेच आज ३३५ वा वर्धापन दिन !पर्यायाने तुमच्या हे ही लक्षात आलं असेलच की , आज ३३५ व्या वर्धापन दिनानिमित्त , आणि आमच्या निर्वाण दिनानंतर ३२९ वर्षांनी पण आमचा आत्मा तुमच्याशी संपर्क साधतोय म्हणजे ही सारी वर्षे आम्ही होरपळतोय !

"आनंदी आनंद गडे!"

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आज बरेच दिवसानी प्रो.देसायांचा नातू आणि त्याचा मित्र असे दोघे लगबगीने माझ्याजवळ येताना पाहून मी समजलो की आज भाऊसाहेब काही तळ्यावर फिरायला येत नाहीत. "आम्हाला पाहून तुम्ही समजला असालच" असं म्हणता म्हणता निमीश म्हणाला, "हा माझा मित्र नितीन मतकरी.आत्ताच हा वकीली परिक्षा पास झाला, आणि सध्या एका कंपनीत काम करतो.सध्या म्हणण्याचं कारण, तो ही कंपनी सोडून दुसर्‍या एका कंपनीत वरच्या पोस्टवर जॉईन होणार आहे." हे ऐकून मी म्हणालो, "बरं आहे तुमचं,आमच्या जमान्यात आम्ही एका कंपनीत काम करायला लागलो की निवृत्त होई पर्यंत त्याच कंपनीत चिकटून असायचो.आणि त्यावेळी आम्हाला तेव्हडे मोके मिळत नव्हते.पण एक मात्र खरं म

साखरेचे खाणार त्याला..!

चतुरंग ·
लेखनविषय:
तसा मी लहानपणापासूनच गोडघाशा. साजूक तुपातला शिरा, केळ्याचे काप घातलेला सत्यनारायणाचा शिरा असेल तर विचारूच नका, माझा य-य आवडता पदार्थ आहे! (आई सत्यनारायणाच्या प्रसादासाठी मोठ्या पातेल्यात आणि माझ्या खादाडीसाठी वेगळा छोट्या पातेल्यात शिरा काढून ठेवायची आणि लहानपणी मला कधीच तीर्थप्रसाद देण्यासाठी बसवले जात नसे! :S ) (पण इथे एक धोक्याचा इशारा द्यायला मी विसरेन असे वाटते त्याआधीच सांगतो - मुगाचा साजूक तुपातला शिरा हा पदार्थ मी एकदाच खाल्ला -आणि अक्षरशः मुगदळासारखा पुढचा संपूर्ण दिवस बसून होतो! एवढा जड पदार्थ मी आयुष्यात पुन्हा खाल्ला नाही.

"आजचाच दिवस योग्य आहे तुम्हाला तुमच्यासाठी तुतारी विकत घ्यायला"

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
त्यादिवशी मी दादरला एका मित्राकडे गेलो होतो.घरी परत येताना दादर स्टेशन जवळच्या दादर बुक डेपोत जाऊन नवीन पुस्तकं चाळत होतो.

"मला तुझ्यावर भरवंसा आहे." चार जादूचे शब्द.

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
माझा भाऊ सुधाकर त्यादिवशी माझ्या घरी सहजच म्हणून मला भेटायला आला होता.त्याच्या बरोबर जी व्यक्ति आली होती तिला पाहून माझी स्मृती माझ्या तरूण वयात गेली.त्या गृहस्थाने माझ्याकडे पाहून स्मितहास्य केलं.त्या हंसलेल्या त्याच्या चेहर्‍याकडे पाहून माझी स्मृती मला आणखी ताण द्यायला लागली.ह्याला पाहिलंय, पण कुठे ते आणि याचं नांव काय हे लक्षात येत नव्हतं. "काय मला ओळखलं नाही?" असा त्याने पहिला प्रश्न केल्यावर परत माझी आठवण मला त्याच्या आवाजाची माझ्या मेमरीतली लोकेशन त्रास द्यायला लागली. मी थोडं शरमल्यासारखं करून गंमतीत म्हणालो, "age became" तो हंसला आणि म्हणाला, "अरे बाबा!

अण्णामामा.

चतुरंग ·
लेखनविषय:
३० मे २००८. मी ऑफिसला निघण्याची तयारी करत होतो. सकाळी सकाळी फोनची रिंग वाजली, नंबरात ९१ आकडा दिसत होता म्हणजे भारतातून फोन होता. शुक्रवारी सकाळी फोन? जरा चमत्कारिक वाटलं. "दादा, अण्णामामा गेला!" पलीकडून बहीण बोलत होती. "आं...कधी? कसा काय?" "आजच. मल्टिपल ऑर्गन फेल्युअर! हा फोन झाल्यावर आईला लग्गेच फोन कर. तिला खूप टेन्शन आलंय!" तिचा आवाज कापत होता. ऐकत होतो. शेजारच्या खुर्चीत खचलो. हार्ट ऍटॅक नंतर हॉस्पिटलमधे भरती केल्यावर एकेक सिस्टिम फेल होत गेली आणि शेवटी गेला. मुलगा स्वतःच डॉक्टर त्यामुळे काळजी घेण्याची परिसीमा असणार हे उघड होतं. अमेरिकेतून मुलगीही आलेली होती.