मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लेख

निरोप घेताना..

प्राजु ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
निरोप घेताना... नमस्कार मंडळी. निरोप!! निरोप देणं आणि निरोप घेणं या जशा दोन वेगवेगळ्या कृती आहेत त्याच प्रमाणे त्यांचे अर्थही संदर्भानुसार बदलतात. "जा, जरा समोरच्या काकूला निरोप दे, दुपारी बाजारात जाऊया म्हणून." असं आई म्हणते तेव्हा समोरच्या काकूला आईनं सांगितलेलं सांगणं.. याला आपण निरोप देणं असं म्हणू शकतो. निरोप घेणं यामध्ये सुद्धा बरेच अर्थ निघू शकतात. जसं, " मी बाहेर जाते आहे, आजोबांचा फोन आला तर निरोप घेऊन ठेव." यामध्ये आजोबा जे सांगतील ते लक्षात ठेव असा अर्थ असतो.पण बर्‍याचदा"निरोप घेणं" याचा अर्थ "टाटा, बाय बाय" असाच घेतला जातो. मुलगी सासरी जाताना आई-बाबांचा निरोप घेते.

जेव्हा डोळे पाणावतात.

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मनोहरच्या आणि माझ्या नेहमीप्रमाणे गप्पा चालल्या होत्या. "अलिकडच्या मुलांना शाळा कॉलेजात इतका अभ्यास असतो,की मान वर काढायला वेळ मिळत नाही.कारण तशी समाजात जिकडे तिकडे चूरस चालली आहे.मग लाखोनी शिकणार्‍या मुलांच्या परिक्षेत आणि पुढच्या करिअरमधे तशीच चूरस कायम राहिली तर त्यात नवल काय.?" असं मनोहर मला म्हणाला. मनोहरचं म्हणणं अगदी खरं वाटलं मला.जसजसं जग पुढे चाललं आहे तसतसं बदल हा होतच राहणार.आमच्या वेळेला असं असं होतं म्हणून आताही तसंच असलं पाहिजे हा काही प्रगल्भ विचार म्हणता येणार नाहीत. "आमचे आजी आजोबा आणि आम्ही ह्या मधलं नातं,जवळीक,ह्या गोष्टी त्यावेळच्या त्या समाजाच्या जडणघडणीवर बर्‍याचश्या अवल

सर्व मिपाकरांना आग्रहाचे निमंत्रण !!!

घाशीराम कोतवाल १.२ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
माझ्या लग्नाची पत्रीका सर्व मिपाकरांना आग्रहाचे निमंत्रण देतोय लग्न दिनांक ७ मे २००९ गुरुवार ह्या दिवशी आहे

दुनियादारी !

संदीप चित्रे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
“तू गपे xxxच्या ! अजून दुनियादारी वाचलं नाहीयेस आणि म्हणे माझं लग्नं करा !” हे ठेवणीतलं वाक्य यायचं आलं की वाक्याचा recipient आपोआप गप्प व्हायचा. बरोबर आहे, वर्मावर का कुठे म्हणतात तिथे बोट ठेवलं जायचं. आपण सुहास शिरवळकरांची जवळपास सगळी पुस्तकं पारायणं करून वाचली पण अजून मास्टर पीस वाचला नाहीये ! मारे ढीगभर हिंदी सिनेमा पाहिले पण ‘शोले नाही पाहिला अजून? ‘दुनियादारी’ नेमकं आत्ताच out of print? हॅत्त तेरी तर !!! एक दिवस अचानक मिळालं. हुर्रे !!! जिओ यार…पुणे नगर वाचनालय जिंदाबाद !! एक दिवसात परत करायच्या बोलीवर मित्राकडून कसंबसं मिळालं. पुस्तक नुसतं हाताळतानाही थरारलो.

फिरेन्झ -कलानगरी

स्वाती दिनेश ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
खरं तर 'रोमायण' घडल्यापासून इटलीला जायचा मी धसकाच घेतला होता. दिनेश कामानिमित्त मिलानला ३,४ दा जाऊन आला तरी प्रत्येक वेळी मी आपली कारणं काढून घरीच थांबले होते पण फिरेन्झ, काप्री ,नापोली आणि अशी कितीतरी जणं खुणावत होती, बोलावत होती. ते आकर्षण होतंच दडलेलं.. अशातच विपिनचं डॉर्टमुंडचं बिर्‍हाड फिरेंझला हललं. आता तिथे एक आपलं घर आहे, विपिनने फिरेन्झशी चांगली दोस्ती केली आहे, आता इटलीला जायला हरकत नाही असं मनाला समजावून, बजावून शेवटी इस्टरच्या सुटीत फिरेन्झचे बुकिंग केले.

शनिवारवाड्याचे रहस्य (कथा)

सागर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मित्रांनो, पुढील कथा मी कॉलेजमधे शिकत असताना लिहिली होती. त्या कथेत माफक बदल करुन मी ही कथा सर्व वाचकांच्या सेवेस सादर करत आहे, वाचकांना विनंती की आपले अभिप्राय जरुर द्यावेत. - सागर ------------------------------------------------------------ शनिवारवाड्याचे रहस्य -१- रात्री मी "पोल्टरगिस्ट" चा शेवटचा शो पाहून निघालो होतो. एखादा हॉरर् चित्रपट पाहून रात्री बारा वाजता रस्त्यावरुन जाणे म्हणजे काय असते? हे सांगून कळणार नाही. मी चित्रपट पाहून जाम घाबरलो होतो...असली भुते-खेते बघायची वेळ आपल्यावर येऊ नये अशी मनोमन प्रार्थना करीत आणि मारुतीचे नाव घेत मी घरी निघालो होतो.

हे जीवन इरादा ठेऊन सर्वांना शिकवतं, काय तर -जग.ह्या क्षणी आणि क्षणोक्षणी.

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
प्रो.देसायांना थोरला भाऊ आहे हे मला हल्लीच कळलं.काल प्रो.देसाई मला म्हणाले, "माझा थोरला भाऊ माधव काही दिवस माझ्याकडे राहायला येणार आहे.आल्यावर मी त्याला नक्कीच तळ्यावर घेऊन येतो." कीडकीडीत शरिरयष्टीचे,काठीचा आधार न घेता चालणारे भाऊसाहेबांचा जुळाभाऊ वाटणारे माधव, भाऊसाहेबांपेक्षा दहा वर्षानी मोठे होते.पंचायशी वर्षावर त्यांची ठणठणीत प्रकृती पाहून मी त्यांना म्हणालो, "तुमचं वय तुम्ही सांगितल्यावर मला कळलं.

अचानक पुणे-३० कट्टा

बिपिन कार्यकर्ते ·
लेखनप्रकार
मागच्या काही दिवसांपासून पुण्यनगरीत मुक्काम आहे. पुण्यात आलो तसे मिपाकर मित्रांचे फोन यायला सुरूवात झाली. "काय मग? कधी भेटताय?" "पुण्यात आलास, कळवत पण नाही. बघून घेऊ आम्ही पण." "या वेळी भेटायचंच बरं का, मागच्या वेळी टांग दिलीस." एक ना दोन. मलापण भेटायचंच होतं मिपावरच्या काही महान, थोर इ.इ. व्यक्तिमत्वांना. काल थोडा वेळ मिळाला म्हणून जरा फोनाफोनी केली दुपारी. परा, दाढे डॉक्टर आणि श्रावण मोडक एवढे मासे गळाला लागले. म्हणलं, आधी पराला भेटू. तिथून डॉक्टरकडे जाऊ आणि मग मिष्टर मोडकांना भेटू. थोडका आणि आटोपशीर कार्यक्रम ठरवून निघालो. पुण्याच्या जगप्रसिद्ध 'पुणे-३०' परिसरात पोचलो.

शीत गोडाऊन..

प्राजु ·
काय!!!! समजलं नाही ना, नक्की काय नाव आहे लेखाचं?? सांगते. मित्रहो, बर्‍याच वर्षांपूर्वी, म्हणजे साधारण ३० एक वर्षापूर्वी, दूध नासण्याचे प्रकार फार होत होते. मग गृहीणी, बाया-बापड्या, नोकरदार स्त्रीया दूधाचं विरझण लावायच्या आणि मग नंतर त्याचं ताक, लोणी शेवटी तूप. घरात माणसंही भरपूर होती.. आणि डायटींगची ओझी नसल्याने "अरे घे रे भरपूर तूप" असं सर्वसाधारण प्रकृतीच्या माणसाला आग्रहाने सांगितलं जायचं. केवळ दूधाचंच नव्हे.. तर भाज्या, फळे, आमटी.. तोंडीलावणी. या सगळ्याचीच सांगता कामवालीला देऊन, नाहीतर थलीपीठात बेमालूम पणे घालून नवा पदार्थ बनवण्यात व्हायची. ..

एकाच रंगातून मिळणारी भरपूर समझ-ऊन्हाचा चष्मा.

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
काही लोकांचं जीवनच दुःखदायी असतं.बरेच वेळां त्याना वाटत असतं की आपण दुःख घेऊनच जन्माला आलो आहो.माझा चुलत भाऊ गिरीश ह्याचं जीवन काहीसं असंच आहे.आयुष्याच्या ऐन उमेदीच्या काळात बिचार्‍याची दहा वर्षाची मुलगी एका अपघातात गेली.त्याच्याच हलगर्जीपणामुळे वीणा गेली हे त्याच्या मनाला लागलं होतं.वीणा गेल्याचा धक्का गिरीशला एव्हडा बसला की त्याला जीवनच नकोसं झालं होतं.पण निसर्गाची गंमत आहे बघा.निर्मीती ही निसर्गाची आवश्यक जरूरी असल्याने जीवनाचा र्‍हास होणे त्याला न लगे. म्हणून कुणाचाही सहजासहजी मृत्युला मिठीमारण्याचा प्रयास निसर्गच उधळून लावतो.