Skip to main content

लेख

दिव्याची आवस

लेखक ज्योति अळवणी यांनी शनिवार, 22/07/2017 01:19 या दिवशी प्रकाशित केले.
दिव्यांची आवस आपण ज्याला 'गटारी अमावस्या' म्हणतो ती खर तर 'दिव्याची आवस' किंवा 'दर्श अमावस्या' आहे. दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिन्याला सुरवात होते. आपल्यला श्रावणात उपवास करायचे असतात; नॉनवेज आणि दारू याला हात लावायचा नसतो; अस मानलं जातं. अलीकडे मात्र कितीजण हे पाळतात कोण जाणे. पण गटारी अमावास्या मात्र अनेकजण साजरी करतात. आठवडा-पंधरा दिवस अगोदरच आपल्याला whatsaap वर यासंदर्भातले जोक्स यायला लागतात. आपण ते कधी वाचतो... कधी दुर्लक्ष करतो. पण 'गटारी अमावस्या' याव्यतिरिक्त या दिवसाचे काही महत्व आहे हे आपल्याला माहित नाही आणि सहसा कोणी माहित करून घ्यायचा प्रयत्न देखील करत नाही.

तू तेंव्हा तशी...!

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 21/07/2017 00:13 या दिवशी प्रकाशित केले.
http://misalpav.com/node/40301 या इथून प्रेरणा घेऊन तुला मी फार मिस्स करतो .. खरे तर हे तुला मुद्दाम सांगायचे नाही हे मी ठरवलंय . तुलाच काय पण मला स्वतःलाही हे सांगायचं नाहिय्ये. एका वळणावर येवून आपण त्या नंतर कसे हरवलो हे मला कळालेच नाही. मुद्दाम नाही. पण.... ते झाले हे खरे. मी अ‍ॅक्सेप्ट करतो. चार वर्षे झाली. हे वाक्य मी रोज म्हणतो. रोज सकाळी उठवल्यावर "आज तुझी आठवण अज्जीबात काढायची नाही" हे पण ठरवतो. पण.... तुझ्याशिवाय जगायची सवय झाली आहे पण तुझा विचारांशिवाय जगायची सवय अजून लागली नाही.

लोकल मधले लोकल्स.

लेखक रघुनाथ.केरकर यांनी गुरुवार, 20/07/2017 15:05 या दिवशी प्रकाशित केले.
असाच एक कुठलासा सोमवार होता, संध्याकाळचे ६.३० होउन गेले होते, मी पावसाचं कारण सांगुन ऑफ़ीस मधुन मोठ्या उत्साहात लवकर पळालो होतो. पण स्टेशन वर येताच पावसानी त्यावर पाणी फ़िरवलं होतं. घाटकोपर स्टेशन च्या १ नंबर फ़लाटावर प्रवांशाचे उधाण आले होते. पहील्या प्रयत्नात गाडी मिळेल ह्याची शक्यताच नव्हती. किमान ३ -४ गाड्या सोडाव्या लागणार होत्या. ते कमी झाले म्हणुन की काय वरुन वरुण राजा बरसत होता. का कुणास ठावुक पण असे वाटतं होत की सगळे डाउन वाले प्रवासी फ़क्त स्लो लाइन वरुनच प्रवास करु इच्छीत होते.

भुकेले आणि माजलेले

लेखक हेमंतकुमार यांनी मंगळवार, 18/07/2017 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
प्रसंग पहिला : परगावचा मुक्काम संपवून मी ट्रेनने माझ्या गावी परत येतोय. प्रवास अगदी शेवटच्या टप्प्यात आलाय. आमची ट्रेन आता प्लॅटफॉर्म मिळण्याची वाट पाहत स्टेशनच्या ‘आउटर’ ला थांबली आहे. गाडी जरा जास्तच रखडल्याने प्रवासी चुळबूळ करताहेत. मी कंटाळून खिडकीतून बाहेर पाहत असताना अचानक एका दृश्याने माझे लक्ष वेधून घेतले. पलीकडच्या रिकाम्या रुळांदरम्यान ढीगभर अन्न टाकून दिलेले होते अन ते अन्न एक माणूस खाली बसून अधाशीपणे खात होता. दोन-तीन रंगांचे भात त्यामध्ये दिसत होते. कदाचित ते रेल्वेच्या खानपान सेवेतील उरलेले वा लोकांनी टाकून दिलेले पदार्थ असू शकतील.

गटारीगाथा

लेखक सौन्दर्य यांनी सोमवार, 17/07/2017 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
२०११ साली लिहिलेली हा लेख येणाऱ्या गटारीच्या स्वागतासाठी पुन: पोस्ट करीत आहे. गटारीगाथा तसे आपले खास असे महाराष्ट्रीयन सण पुष्कळ आहेत, पण ज्या सणाची महाराष्ट्रीयन पुरुष आतुरतेने वाट पाहतो तो सण म्हणजे 'गटारी अमावस्या'. ज्या प्रमाणे गणेश चतुर्थी, दिवाळी वगैरे सणांची तयारी काही दिवस अगोदरच सुरु केली जाते, त्याच प्रमाणे ह्या दिवसाची तयारी देखील पुष्कळ दिवस आधीपासून सुरु होते. आधी पुरुषवर्ग मनातल्या मनात मांडे खाऊ लागतो, गटारी जवळ आल्यावर हळू हळू गटारीचे सुतोवाच बायकोसमोर केले जाते.

राणी पद्मावती

लेखक कल्पतरू यांनी रविवार, 16/07/2017 23:03 या दिवशी प्रकाशित केले.
येत्या वर्षाच्या अखेरीस एक हिंदी चित्रपट येतोय. राणी पद्मावती नावाचा. दीपिका पदुकोण राणी पद्मावतीची भूमिका साकारतेय. आता हा चित्रपट रिलीज होणार आणि त्यामध्ये आपल्याला निर्मात्यांच्या अगम्य आणि अतर्क्य कल्पनाशक्तीचे(जसे बाजीराव मध्ये सुरवातीलाच मस्तानीची धडाकेबाज एंट्री, पिंगा गाण्यावर काशी आणि मस्तानीचा डान्स वैगरे वगैरे) दर्शन होऊन खरी राणी पद्मावती कुठेतरी हरवून जाणार.

सिक्कीम भारतात सामील झाला कसा ?

लेखक आदित्य कोरडे यांनी रविवार, 16/07/2017 00:43 या दिवशी प्रकाशित केले.
सिक्कीम भारतात सामील झाला कसा ? (संदर्भ:इंदिरा गांधी, आणीबाणी आणि भारतीय लोकशाही – लेखक पी. एन. धर, अनुवाद- अशोक जैन) गेले काही दिवस भारत आणि चीन मधले संबंध परत ताणले गेले आहेत. दोन्ही देशात परत एखाद्या युद्धाला सुरुवात होते कि काय अशी अवस्था निर्माण झाली. आता काय होणार हे तर कालच ठरवेल परंतु ह्यावेळच्या कात्कातीचे कारण ठरला तो सिक्कीम-आपल्या सिक्कीम राज्याच्या सीमेलगत असलेला डोकाला ( ला म्हणजे खिंड)ह्या भागात चीन ने घुसखोरी करत सुरु केलेले रस्त्याचे बांधकाम आणि भारताने घेतलेला आक्षेप.साधारण गेले महिनाभर भारत आणि चीनी सैन्यात ह्यावरून तणाव आहे .

गायीचे आत्मवृत्त

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी शनिवार, 15/07/2017 17:20 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे मी गाय आहे. माझ्यात देव वास्तव्य करत असल्यामुळे मला माणसाचं प्रबोधन करायचा हक्क आहे. म्हणून तर आता बोलायची हिंमत करते: मला माणसापेक्षा जास्त किंमत आहे. राजस्थानात गाय आणि वासरूच्या जोडीला एकशे पाच रूपये अनुदान मिळतं तर दारिद्र्य रेषेखाली असलेल्या माणसांच्या जोडप्याला सत्तर रूपये मिळतात. वि. दा.

रूम-मेट्स

लेखक मिडास यांनी शुक्रवार, 14/07/2017 14:53 या दिवशी प्रकाशित केले.
रूमचं दार उघडून अनघा बाहेर आली तर तिला निनाद सोफ्यावर मेल चेक करताना दिसला. “गुड मोर्निंग.” अनघा त्याच्याकडे हसत बोलली. “वेरी गुड मोर्निंग princess” तीला एक नाटकी सलाम ठोकत निनाद ने प्रत्युत्तर दिले. “कधी आलास?” आपले मोकळे केस बांधत अनघाने विचारलं. “आत्ता just आलो. तू ये फ्रेश होऊन. मी चहा बनवतो तोपर्यंत.” “ओके बॉस” म्हणत अनघा फ्रेश व्हायला गेली.

" तु तेव्हा तसा ...! "

लेखक जेनी... यांनी शुक्रवार, 14/07/2017 00:49 या दिवशी प्रकाशित केले.
तुला मी फार मिस्स करते .. तुझ्या आठवणींनी भरलेली पानं अजुनही जपुन ठेवलियेत मी. रोज एकदा तरी त्यातल्या एकेका पानाची उजळणी करते. मला नाही माहित तु माझी किती आठवण काढतोस, पण तु विसरला नसशील हे मात्र नक्की. आज चार वर्ष होऊन गेली, तुझ्या माझ्यात म्हणावं असं काहीच उरलं नाही, तसं होतं तरी काय ?? पण तरीही काहीतरी होतं हे नक्की. नाहीतर बघना, मला अजुनही तुझी आठवण का यावी ? अजुनही तु कुठेतरी आहेस, असं साऱखं का वाटावं? जास्तं काही नाही पण तुझं ते सतत "कुठेयस??" ते मात्र नाही विसरता आलं मला, तु मला शोधत रहावसं आणि मी फुलपाखरासारखं अवतिभोवती असुनही क्षणात समोर तर क्षणात अद्रुश्य होत रहावं .