Skip to main content

लेख

पैलवान-२

लेखक चांदणे संदीप यांनी शुक्रवार, 02/06/2017 या दिवशी प्रकाशित केले.
पैलवान-१ "ह्ये बघा, आत्ता वाजलेत साडेआठ. दत्त्याच्या म्हाताऱ्याची शेतातन गाठ घेऊन दहा वाजेपर्यंत हालूया. दुपारची यस्टी गाटली की संध्याकाळच्याला सोमनाथाच्या वाडीत! रात्रभर खाऊ-पिऊ, उद्या त्यांच्या गावातबी कुस्त्या आसत्यात. त्या बघू, तिकडून दुपारच्याला बसू...

खिडकीतला पाऊस!

लेखक सचिन काळे यांनी गुरुवार, 01/06/2017 या दिवशी प्रकाशित केले.
दोन दिवसांपूर्वीच मुंबईत हळूहळू पावसाला सुरुवात झालीय. घामाची चिकचिक आणि उन्हाने त्रस्त झालेल्यांचा, आता पावसाचे आगमन होणार याची नांदी मिळाल्याने जीव सुखावला आहे. पावसाच्या सरी पडलेल्या पाहून मला तर आनंदाने नाचावासे वाटू लागले, आणि मी फेसबुकवर पोस्टसुद्धा टाकली. "पाऊस आया!!!.....एssss पावसामें नाचोssss!!!!...... ढिंगचॅक्! ढिंगचॅक्!! ढिंगचॅक्!!!......." मोराला आपला पिसारा फुलवून पावसात नाचताना जेवढा आनंद होत असेल तेवढाच मलाही पहिल्या पावसात भिजताना आनंद होतो. पहिल्या पावसाची मजा घेऊन झाल्यानंतरसुद्धा मला कधी पावसाचा कंटाळा येत नाही.

विवाह: परंपरा आणि प्रतिष्ठा

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी गुरुवार, 01/06/2017 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे विवाह कसे छोटेखानी असावेत, लग्न खर्च कसा कमी असावा, हुंडा घेणे बेकायदेशीर आहे अशा चर्चा नेहमी ऐकू येतात. पण प्रत्यक्षात परंपरा टाळण्याची उदाहरणे क्वचितच पहायला मिळतात. हा लेख दुसर्‍याला सांगण्यासाठीचा केवळ उपदेश नाही. आत्मप्रौढीचा दोष पत्करून मी माझ्या मुलीच्या विवाहाबद्दल बोलतो. (आधी केले मग सांगतोय): माझ्या मुलीचा विवाह ठरवताना मुलीच्या संमतीने मी काही अटी घातल्या होत्या.

एका गारुड्याची गोष्ट १४: बिनविषारी साप ! (समाप्त !)

लेखक जॅक डनियल्स यांनी बुधवार, 31/05/2017 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक वर्ष मध्ये निघून गेली, डिग्री झालीं, स्थलांतर झाले, नोकरी लागली आणि मग लिहिण्यासाठी हात सळसळू लागले. इ.स.पू. मध्ये मी बिनविषारी सापांच्या लेखाची सुरवात धामणी वरील लेखाने केली होती, आता या लेखात इतर बिनविषारी सापांबद्दल बोलतो. साधारणतः लोकासाठी कुठला पण साप "विषारीच" असतो आणि तो मारलाच पाहिजे असे विचार असतात. खरे म्हणजे जवळपास ८०% साप बिनविषारी आहेत. अगदी आपल्या आख्या (पुणे) शहरी आयुष्यात सारसबाग गणपतीच्या आरती मध्ये इखादी मुलगी वळून आपल्या कडे बघेल किंवा कुलकर्णी पंपावर पेट्रोलच्या रांगेत पेठीय मुलगी वळून हसेल पण आख्या आयुष्यात एक विषारी साप दिसणार नाही.

शामराव

लेखक ज्ञानदेव पोळ यांनी सोमवार, 29/05/2017 या दिवशी प्रकाशित केले.
बायको बाळंत झाली अन शामराव गायब झाला. कुणी म्हणायचं सोन्या चांदीची दुकानदारी शिकायला परराज्यात गेलाय. कुणी म्हणायचं राजस्थानात दिसला. आता शेठ झालाय. कुणी म्हणायचं त्यानं आता तिकडच बाई ठेवलीय. पण शामराव काय गावाला कधी नजरं पडला नाही. बायकोनं मात्र नुसत्या आठवणीवर पोटाची खळगी भरण्यासाठी गावाचा रोजगार करून पोरगा वाढवला. पुढ कधीतरी त्याच्या पोराचं लग्न पण झालं. शामरावला नातवंडे झाली. एव्हाना काळाच्या ओघात गाव शामरावला विसरून गेला. पण लेकानं न पाहिलेल्या बापाला शोधायसाठी सारी दुनिया पालथी घातली. बाप पाहिलेली भावकीतली लोकं घेऊन मैलोन मैल रल्वेने प्रवास केला.

माहेरचं 'माणूस'

लेखक भारी समर्थ यांनी रविवार, 28/05/2017 या दिवशी प्रकाशित केले.
"आगं आक्का, खूप कामं आहेत गं ऑफिसात. दोघंजण सुट्टीवर आहेत." जनक काकुळतीला येऊन आक्काची मनधरणी करत होता. "जनु, कुणी नको सोबत. पण तेवढं सुरमंडीच्या गाडीत बसवून दे बाबा." "तिकडं तुझं कोण करणारे का काही? तो शशी स्वतःच्या संसारात नरडीपर्यंत बुडालाय. कधी साधा फोन नाय का हालहवाल विचारायची सवड नाय." "हं" "काल त्याचा फोन काय आला अन् लगीच तुला घाई झाली त्याला भेटायची. मला तर कधी तोंडदेखलंबी बोलत नाय की गावाकडं ये म्हणून." "काय होतय मग. मी काय झाकपाक घिऊन निघाले काय माझा? म्हातारी राहील घराच्या सांदीत दोन दिवस. परत येईन माघारी माझी मीच. काय भार नाय व्हायचा शशीला माझा." "बर ठीकाय.

साधूने केला वर्षाव 'अमृतधारां'चा!!!

लेखक सचिन काळे यांनी रविवार, 28/05/2017 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाच्या वर्षावात न्हायला आपल्या सगळ्यांनाच आवडतं. पण मी तुम्हाला आता एक असा खरा घडलेला प्रसंग सांगणार आहे, ज्यात अशा एका गोष्टीच्या वर्षावात काही जणांना न्हायचा योग आला होता, ज्याची कोणी स्वप्नातसुद्धा कल्पना करू शकणार नाही. त्याचे असे झाले, की मी एकदा लोकलट्रेनने सकाळी साधारण सात साडेसात वाजता गर्दीच्या उलट दिशेने प्रवास करीत होतो. अशावेळी गाडीत अगदी तुरळक माणसे असतात. त्यातले बरेचसे रात्रपाळी करून, डुलक्या काढत घरी जाणारे असतात. आणि जे जागे असतात तेही पेंगूळलेल्या डोळ्यांनी खिडकीबाहेर बघत शांत बसलेले असतात. गाडी सुसाट पळत असते. नुकताच सूर्योदय होत आलेला असतो.

मन से बाता अर्थात मनोगत...

लेखक उपेक्षित यांनी शुक्रवार, 26/05/2017 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या बराच उकाडा आहे सगळीकडे त्यामुळे सगळीकडे कुलर/एसी नाहीतर निदान फॅन ची तरी प्रचंड मागणी आहे. थोडा वेळ जरी वीज गेली तरी आपला जीव कासावीस होतो. परवा रात्री दिवसभर दमून मस्त झोप लागली होती पण नेमकी पहाटे २/२.३० ला वीज गेली आणि घामाच्या धारांनी जीव पार कासावीस झाला. कुठे पेपर ने वारे घे कुठे पाणीच मार चेहऱ्यावर असे उद्योग चालू होते. अचानक पेपरने वारे घेता घेता मन भूतकाळात गेले. तेव्हा मी साधारण ७/८ वीत असेल आम्ही पुण्यात कर्वेनगरला हिंगणे होम कॉलोनीत एका बैठ्या चाळीत राहायला होतो. काही कारणास्तव चाळीचे वीजेचे कनेक्शन तोडले होते आमच्या.

सुखाची सावली ( लघुकथा ) ( काल्पनीक )

लेखक सिरुसेरि यांनी सोमवार, 22/05/2017 या दिवशी प्रकाशित केले.
सुखाची सावली ( लघुकथा ) ( काल्पनीक ) संध्याकाळचे सहा वाजत आले होते . राधाबाई आपल्या घराच्या दारापाशी उभ्या राहुन मोठ्या आतुरतेने शामरावांची वाट पाहात होत्या . थोड्याच वेळात समोरुन संथपणे चालत येणारी कोट , धोतर आणी डोक्यावर टोपी घातलेली शामरावांची मुर्ती त्यांना दिसली तेव्हा कुठे त्यांचा जीव भांड्यात पडला . त्या लगबगीने आत जाउन पाण्याचा तांब्या आणी भांडे घेउन आल्या . आता त्यांच्या मनातल्या उत्सुकतेची जागा एका काळजीने घेतली . शामरावांनी घरात येताच हातातला टिफीनचा डबा राधाबाईंकडे दिला . खुर्चीवर बसुन ते घोटभर पाणी प्यायले .

परग्रहावरील प्रेम ( रहस्यकथा)

लेखक दिनु गवळी यांनी रविवार, 21/05/2017 या दिवशी प्रकाशित केले.
सुसाट वेगाने अभी आणि मयुर त्या यांत्रिक तबकडी (ufo)यानातुन जात होते.अंतराळात सगळीकडे निरव शांतता होती. दोघेही जपान मधे एका युफोलॉजी च्या केंद्रात शास्रज्ञ म्हणून कामाला होते. आज सकाळीच अभी ला त्याच्या सुपर कंम्प्युटरवर एक संदेश आला होता. तो संदेश अंतराळातुन आला होता. मयुर ने खुप प्रयत्न करुन अखेर तो संदेश आला होता. त्या दिशेचा शोध लावला होता.अभी आणि मयुर ने ३ वर्ष खुप मेहनत करुन एक तबकडी यान बनविले होते.ईतर यानापेक्षा ते एक सुपर यान होते.