Skip to main content

लेख

वाढदिवस

लेखक निओ यांनी मंगळवार, 04/12/2018 23:17 या दिवशी प्रकाशित केले.
त्याचा आज वाढदिवस. सकाळी अंथरुणात उठून बसला. काल रात्री बारा पर्यंत जागाच होता. पण शुभेच्छा द्यायला तो सोडून कोणीच जागे नव्हते. whats app वरचे काही फुटकळ मेसेज तपासून हा पण शहाण्या सारखा गपचूप झोपी गेला. तर सकाळी उठून बसला. कोणाची काही चर्चा नाही, भेटवस्तू काय हवी विचारणा नाही, बाहेर कोठे जायचे काही तयारी नाही. आपला वाढदिवस विसरले कि काय हे लोक, असंच त्याला वाटून गेलं. इतक्यात आलीच ...लगबगीने हसत हसतच बायको आली. येऊन सरळ मांडीवरच बसली. आयला हे काय... ! म्हणजे एकीकडे बरे वाटले.

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव): २. केडगांव चौफुला ते इंदापूर

लेखक मार्गी यांनी रविवार, 02/12/2018 22:50 या दिवशी प्रकाशित केले.
जे सत्य सुंदर सर्वथा....: २. केडगांव चौफुला ते इंदापूर १३ नोव्हेंबरची पहाट. आज दुस-या दिवशी केडगांव चौफुल्यावरून निघायचं आहे. चांगला आराम झाल्यामुळे पहाटे फ्रेश वाटतंय. उजाडेपर्यंत तयार होऊन निघालो. इंदापूरपर्यंत आज मस्त हायवे आहे. कालच्या तुलनेत कमी वेळ लागणार. पण सायकल प्रवास अपेक्षेनुसार होत नाहीत! आजही त्याचा अनुभव येणार आहे. निघालो तेव्हा कडक थंडी आहे. ह्या प्रवासात दररोज सुरुवातीला एक- दिड तास मला कडक थंडी लागणार आहे. आणि नंतर दुपारी कडक ऊनही असेल. पहाटेच्या थंडीत हायवेचा आनंद घेत सायकल चालू केली.

नदी आणि गाव

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी शनिवार, 01/12/2018 17:04 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे गाव तिथं नदी होतीच. आजही ज्या गावाला नदी नाही असे फार क्वचित गावं असतील. गाव तिथं नदी नव्हती, तर जिथं नदी होती तिथं गावं वसली. नदीच्या काठांवर लोकवस्ती झाली. पाणी हे जीवन आहे. पाण्याशिवाय जीवन नाही. जिथं जिथं पाणी होतं त्या पाणवठ्यांच्या काठांवर गावं वसली. म्हणून कोणतं गाव कोणत्या नदीच्या काठावर हे अजूनही मुद्दाम विचारलं जातं. अथवा कोणत्या गावाजवळून कोणती नदी वाहते याचीही उत्सुकता असते. जरी अनेक नद्या वाहता वाहता आज आटून गेल्या आहेत. नदी लहान असो की मोठी. आज वाहत असो की नसो. आजची गावंही नदीच्या‍ किनारीच सापडतात. जीवन देणारी नदी ही माणसाची देवता आहे.

भेट

लेखक कविता१९७८ यांनी शुक्रवार, 30/11/2018 16:50 या दिवशी प्रकाशित केले.
खरतर हे लिखाण आधीच लिहुन ठेवलं होतं पण बोका — ए — आझमच्या दुखद बातमीने अचानक स्मशान वैराग्य आल्यासारखं झालंय , सतत हे आठवतंय.... भेट... एक ठरवुन न ठरवलेली.... असेल कदाचित ती मागच्या जन्मी ठरलेली, किंवा त्याहुन आधीची... नाहीतर उगाच का माणसे येतात समोरासमोर काहीही लागेबांधे नसताना? उगाच का पहिल्यांदा पाहिल्यावर जन्मोजन्मीची खुण पटते? चेहरा जरी बदलला असला तरीही आत्मा आत्म्याला बरोबर ओळखतो. कुणाला पाहुन आनंद होतो तर कुणाला पाहुन राग येतो. आधी पाहिलेच नाही तर अशा भावनांचं कारणच काय? कदाचित सर्वच आहोत प्रवासी , अनादि काळापासुन , काळाचा फेरा आला की लागतो प्रवासाला.

ओंकार पत्की - काही आठवणी....

लेखक स्पार्टाकस यांनी गुरुवार, 29/11/2018 21:46 या दिवशी प्रकाशित केले.
ओंकारवर लेख लिहायला घेतला होता, पण काय लिहू आणि काय नाही असं झालं.... या केवळ त्याच्या आठवतात तशा आठवणी.... त्याची आणि माझी मैत्री गेल्या तीस - बत्तीस वर्षांची. मला आठवतं आम्ही सहावीत असताना तो आमच्या शाळेत आला आणि पहिल्या दिवसापासून असा काही रमला होता की जणू माँटेसरीपासूनच आमच्याबरोबर होता! तेव्हापासूनच तो असा बिनधास्त आणि काहीसा विक्षिप्त होता. पुढे सातवी - आठवी दोन वर्ष आम्ही एका बेंचवर शेजारी बसत असल्याने बडबड केल्यामुळे कित्येकदा एकत्रं शिक्षा भोगली असेल याचा हिशेबच नाही! मला आठवतं सातवीत असताना त्याच्या हात फ्रॅक्चर झाला होता.

माझी पहिली मराठी साहस कथा : मिशन वारी

लेखक अमोल पोतनीस यांनी गुरुवार, 29/11/2018 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार! मी मिसळपाव वर पहिल्यांदाचं लिहीत आहे. जर चुकीच्या विभागात ही माहिती लिहिली असेल तर कृपया सांभाळून घ्यावे ही नम्र विनंती. नुकतेच मी माझे पहिले मराठी पुस्तक प्रकाशित केले आहे. पुस्तकाचे नाव आहे "मिशन वारी". कव्हर पेज पंढरीच्या वारीच्या पुणे ते सासवड या टप्प्याला अतिरेकी आपले लक्ष्य करतात आणि बॉम्बस्फोट घडवून आणायची योजना आखतात. मिल्ट्री इंटीलिजन्सला याचा सुगावा लागतो आणि हे आव्हान पेलण्याची जबाबदारी टाकण्यात येते कॅप्टन आकाश आणि त्याच्या टीमवर.

बाप्पा

लेखक Prajakta Yogiraj Nikure यांनी बुधवार, 28/11/2018 17:00 या दिवशी प्रकाशित केले.
बाप्पा धीन ता धीन धीन ता धीन ता धीन धीन ता धीनधीनधीनाक धीनधीनधीनाक बाहेर ढोल ताशांचा आवाज घुमत होता . ढोल ताशा पथक मोठ्या जल्लोषात बाप्पाचं स्वागत करत होते . बाप्पा पण मस्त आपली बॅग वैगेरे भरून आपल्या लाडक्यांकडे १० दिवसांसाठी रहायला आला होता आपल्या आईला सोडून. त्यांच्या आईने पण मस्त खाऊ वैगेरे देऊ का विचारलं बाप्पाला पण बाप्पा कसला खाऊ घेतोय आपल्या आईकडून उलट त्यानेच सांगितलं की , “ मी मस्त खाऊ खाणार आहे माझ्या भक्त्यांकडे जाऊन . काय ते उकडीचे मोदक , खोबऱ्याचे मोदक, वेगवेगळे पदार्थ , विचार करूनच तोंडाला पाणी सुटतंय .

पर्याय

लेखक अनाहूत यांनी शनिवार, 24/11/2018 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
" अशी जवळ ये ना " नाही म्हणायचं होत तिला पण तिच्या तोंडातून शब्दच बाहेर नाही पडले . तो जवळ येतच गेला .... " आई " ती कळवळली . एक जोरदार फटका पडला होता . हि बसायची जागा आहे कि फटाके मारायची आईला तर काही कळत नाही . " अग कार्टे किती वेळ लोळत पडली आहेस उठ आणि आवर तुझं " छे किती भारी स्वप्न होत आणि आईनं काय वाट लावली त्याची . परत असं पालथं झोपायचं नाही किती जोरात मारलय सगळी बोट उठली असतील . लाल झालं असेल . बघावं म्हटलं तर तेही सोपं नाही असू दे . ती पार्श्वभाग चोळत मनात म्हणाली . ============================================================= " अग काय कशी लाली आली आहे ?

पुलं "दैवत"

लेखक MipaPremiYogesh यांनी शुक्रवार, 23/11/2018 23:04 या दिवशी प्रकाशित केले.
आमचं कुलदैवत ~ पुलदैवत पुलंची जन्मशताब्दी असं वाचल्यावर जरा आश्चर्यचकित झालो. पुलं आज असते तर 100 वर्षाचे झाले असते. पण झाले असते? पुलं गेलेच कुठे आहेत..ते अजूनही त्यांच्या पुस्तकातून, वेगवेगळ्या व्यक्तीरेखांतून आजूबाजूलाच आहेत. परवा कोकणात फिरतांना अंतू बरवा दिसले..हेदवी ला शिवराम गोविंद दिसले, बेळगाव- कारवार ला रावसाहेब दिसले. पुलं त्यांच्या पुस्तकांमधून, नाटकांमधून अजूनही आपल्याला भेटतातच की.

क्राईम डायरीज : एक शापित नातं: भाग ८

लेखक कलम यांनी सोमवार, 19/11/2018 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
अत्यंत सफाईदार वळणे घेत इन्स्पेक्टर पाटलांची पोलीस व्हॅन 'ग्रीन वाइल्ड रेसोर्ट' मध्ये शिरली तेव्हा इन्स्पेक्टर पाटील सकाळपासून घडलेल्या घटना आठवत होते. आज सकाळी सहा वाजता जेव्हा इन्स्पेक्टरांना फोन आला तेव्हा ते मॉर्निंग वॉक करून नुकतेच घरी पोचलेले होते. रिसॉर्ट मध्ये खुनाची केस हि फार गंभीर बाब होती. एक तर ग्रीन वाईल्ड हे फार मोठं आणि नावाजलेलं रिसॉर्ट होतं आणि दुसरं म्हणजे खुनाच्या बातमीनं रिसॉर्ट मध्ये वास्तव्यास असलेल्या इतर लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होण्याची दाट शक्यता होती. सकाळच्या नाश्त्यासाठी पण न थांबता पाटील सगळ्यात आधी खून झालेल्या स्थळी पोहोचले.