Skip to main content

आस्वाद

जिंगल्स ते सिनेमा

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी शुक्रवार, 07/05/2010 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
चला म्हणल आज डीएसके गप्पांना जाउ यात. डीएसकेंना मराठी मध्यमवर्ग-उच्चमध्यमवर्गाची नाडी अचुक सापडलीय म्हणुनच ते गेली १०-११ वर्ष सांस्कृतिक गप्पांचा महोत्सव करतात. चकटफु असल्याने आम्ही अर्थातच गेलो होतो. या वेळी सगीतकार अशोक पत्की यांच्याशी गप्पांनी पहिले पुष्प गुंफले."जिंगल्स ते सिनेमा' या गप्पांच्या कार्यक्रमात पत्की यांच्याशी राजेश दामले आणि मिलिंद कुलकर्णी यांनी संवाद साधला. वयाच्या पाच वर्षापासुन बॆंडवाल्यांचे आकर्षण असलेल्या अशोक पत्कींना आपल्यातील सुप्त गुणांची चाहुल लागली.

मनातले थोडेसे..

लेखक प्राजु यांनी बुधवार, 05/05/2010 20:46 या दिवशी प्रकाशित केले.
९ मे २०१०. खूप मोठा दिवस. का?? नेमके काय आणि कोणत्या शब्दांत सांगावे समजत नाही. स्वप्नं असतात म्हणून जगण्याला दिशा असते असं म्हंटलं चुकीचं ठरू नये. कधी स्वप्नं खरी होतात, तर कधी घडून गेलेलं काहीतरी, हे आपलं स्वप्नं होतं का असा विचार आपण करू लागतो. आज मागे वळून पाहताना असा विचार येतो की, ४ वर्षापूर्वी मी कोण होते? पुणे आकाशवाणीच्या मराठी चॅनेल ची निवेदिका होते. कार्यक्रमाची संहिता लिहिताना खरडलेल्या चार ओळी, कधी एखादी कविता, आणि त्या अनुषंगाने येणारं निवेदन.. साहित्यिक लेखानाचा इतकाच काय तो संबंध! आणि आज माझ्या नावावर एक कविता संग्रह प्रकाशित होतो आहे.

मिल्क: एक चळवळ

लेखक ऋषिकेश यांनी सोमवार, 03/05/2010 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
माणसाने माणसांवर इतक्या प्रकारे अन्याय केला असेल की त्यापुढे कोणतीही गोष्ट फिकी पडावी.. माणसाला गोष्टि इतर कोणत्याही प्राण्यापेक्षा अधिक वर्गीकृत करता येतात हे मनुष्यप्राण्याचे वैशिष्ट्य समजले जाते. मात्र या गुणामुळे माणसाने माणसाला केवळ वर्गीकृतच केले नाहि तर आपल्या भोवती ही वर्गीकरणाची कुंपणे घालून घेत स्वतःला संकूचिततेच्या सीमेपार ढकलले.. काळा, गोरा, तपकीरी असे रंगांवरून वर्गीकरण करून तो थांबला नाहि तर गोरा श्रेष्ठ, काळा कनिष्ट हे ही त्यानेच ठरविले.. स्त्री-पुरूष हे वर्गीकरण तर निसर्गाने केलेले.. म्हटल्यास तुल्यबळ.. पण त्यातही माणसाने पुरुषाला श्रेष्ठ ठरविले..

तू माने या ना माने दिलदारा

लेखक अरुंधती यांनी मंगळवार, 27/04/2010 02:18 या दिवशी प्रकाशित केले.
गेले दोन दिवस मला सूफी गाण्यांनी घेरलंय! असाच कधी अवचित येतो मूड आणि सुरू होते एक अद्भुत स्वरमयी भक्तीयात्रा! ही गाणी अवीट गोडीची, गूढ अर्थांची, आत्मा - परमात्म्याशी संवाद साधणारी तर आहेतच; शिवाय कधी मनुष्याच्या मूर्खतेला शाब्दिक चपराक देणारी तर कधी लडिवाळपणे प्रियतमाचे आर्जव करणारी आहेत. सशक्त, समर्पक शब्दरचना आणि अपार भक्तिभावाने कृतकृत्य करणारे मधुर, हृदयाला हात घालणारे संगीत.... ...