एखादं धरण बांधून अडवितात नदीला... तेव्हा कसं वाटत असेल तिला ?
अंतिम मिलनाची प्रचंड आस घेऊन लहरत जाता जाता अचानक आडवं आलेले धरण ...
आणि त्याच्या उभ्या आडव्या विस्तारापुढे आपल्या सारया भावना, जाणिवा, आशा आकांक्षा अश्या थिजून राहिलेल्या एका जागी...
उत्कट असोशीची सळसळती शलाका एका ठिकाणी येऊन अशी अबोल झालेली ...
वाहणे हा जगण्याचा आदिम स्वभाव विसरून धरणाच्या दगडी छातीवर धडका देणारी ...
मनात निराश.. हतबल झालेली ???
खरेच का ??? हतबल???
तसाच "ती" चा प्रवास...
"मनस्वी ... "
नुकत्याच उघडलेल्या डोळ्यांनी जग पाहताना...