Skip to main content

आस्वाद

CID ची गोष्ट !

लेखक पामर यांनी रविवार, 13/07/2014 12:52 या दिवशी प्रकाशित केले.
गेले किती तरी दिवस(सॉरी, वर्ष आणि दररोज दुपारी) मुंबई पोलिसांकडे प्रचंड म्हणजे प्रचंड काम असल्याने अनेक महत्वाच्या cases सोनी चॅनलनी ह्या CID कडे सोपवल्या आहेत हे सर्वांना माहीत आहेच.(हेच हो आपले खुन, अपहरण वगैरे..)आपले सर्वांचे लाडके A.C.P. प्रद्युम्न (काय त्यांचे डोळे,काय त्यांचे टक्कल,काय त्यांचा ३ piece suit ...वा जवाब नाही!

चित्रवीणा

लेखक मितान यांनी गुरुवार, 10/07/2014 09:29 या दिवशी प्रकाशित केले.
बोरकरांच्या कविता नेमक्या कधीपासून वाचायला लागले ते आठवत नाही. त्या वाचलेल्या कविता कधीपासून उमगायला लागल्या ते ही सांगता येत नाही. परवा अचानक बोरकरांची कविता पुन्हा भेटली. ८ जुलै हा बोरकरांचा स्मृतीदिन. त्यानिमित्ताने काही बोरकरप्रेमी मित्रांनी त्यांच्या कवितांच्या अभिवाचनाचा कार्यक्रम ठरवला. त्यात मलाही बोरकरांच्या कविता वाचायला बोलावलं आणि हेच निमित्त झालं पुन्हा कविता शोधायला. कवितांचे २ खंड, समीक्षेची पुस्तकं, नक्षत्रांचे देणे आणि मुख्य म्हणजे पु लं आणि सुनिताबाईनी बोरकरांच्या कविता वाचनाचे कार्यक्रम केले त्याचे भाग एवढं सगळं जमा झालं. एकेक कविता वाचायला घेतली.

मज सांग बंधो, कथा एका लाल मिरचीची...

लेखक शशिकांत ओक यांनी बुधवार, 09/07/2014 22:36 या दिवशी प्रकाशित केले.

मज सांग बंधो, कथा एका लाल मिरचीची... असे ऐकली कथा अकलेच्या कांद्याची अन् चाळीतल्या बटाट्यांची मज सांग बंधो, कथा एका लाल मिरचीची... लवंगी मिर्चीने रंगवली लावणी अन् मामाच्या घरच्या केळ्याच्या शिक्रणी मज सांग बंधो, कथा एका लाल मिरचीची...

तर मग ऐक परि, कथन करीन गद्यातूनि, ...

कथा ही एका लाल मिरचीची...

चार एक वर्षापुर्वीची गोष्ट... असाच एकदा एका किराणा मालाच्या दुकानात सामान आणायला गेलो होतो. गर्दी होती म्हणून बाहेर उभा असता नजर पडली एका सुक्या मिर्चांच्या पोत्याकडे.

बुक स्टाँल

लेखक mohite jeevan यांनी रविवार, 06/07/2014 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
समोर खिडकीतुन त्या पुस्तकवाल्या बाबुकडे पाहत होतो,काय करावे काय नको वाटत होते?हे त्याचे पुस्तक दहा रुपयाचे आसले तरी ते त्याची रोजी रोटी होती. दोन दिवसानी आम्ही ते घर सोडले,बाबाची जेथे बदली झाली तेथे आम्ही गेलो.खुपच आठवणी घेऊन गेलो,शिला जीला मी नेहमी पुस्तक वाचायला देत होतो,तेच पुस्तक ज्याच्यावर तीने मी लिहलेल्या 'आय लव्ह यु' च्या पुढे 'टु' लिहले होते.त्यामुळे ते पुस्तक आज ही माझ्याजवळ ठेवले. आज त्या शहरात मी बर्याच वर्षानी आलो,काही कामानिमित्त. त्या शहरात व परिसरात खुप बदल दिसला, पण त्या पुस्तकवाल्या बाबुच्या चेहर्यात काहीच बदल दिसत नव्हता,तो मला ओळखत नसेल पण मी त्याला चांगला ओळखतो.त्यच्या केस

कहां गये वो लोग?--मंग्या

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी शुक्रवार, 04/07/2014 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
हां गये वो लोग?--बाबूकाका कहां गये वो लोग?--आजीबाई कहां गये वो लोग?--नाथा दहावीची परीक्षा नुकतीच संपली होती.डोक्यावरचे अभ्यासाचे ओझे उतरले होते.आणि वर्षभर पुस्तकात घातलेल्या माना वर झाल्या होत्या.सुट्टीत कोण कोण कुठे कुठे जाणार ह्याचे बेत ठरत होते.एकीकडे उन्हाळा वाढत चालला होता आणि अंगातुन घामाच्या धारा वाहात होत्या. एकदा असाच दुपारचा चहा पीत गॅलरीत

'चर्निंग ऑफ द सिटी' (पुस्तक परिचय)

लेखक आतिवास यांनी बुधवार, 02/07/2014 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
तो लेखक आहे. आणि चित्रकारही. त्याचं नाव भारत. (की भरत? इंग्रजी अनुवाद वाचताना नावांची ही अशी पंचाईत होते! पण बहुधा ‘भारत’ असावं!) ब-याच दिवसांनी तो घराबाहेर पडतो तर त्याला शहर बदललेलं दिसतं. काय आहे भवताली? आता शहराच्या हद्दीत हसायला बंदी आहे. ‘कुणालाही मदत करू नका, कारण एकदा मदत केली की लोक तुमच्या मदतीवर अवलंबून राहतात’ असं सांगणा-या मुलांसारख्या दिसणा-या मुली आहेत; मुलीच्या वेशात नोकरीचा शोध घेणारा मुलगा आहे.

उमड घुमड ...

लेखक मैत्र यांनी शनिवार, 28/06/2014 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
दुपारपासून उकाडा जास्तच जाणवत होता. कुठे जावं तर रस्त्यावरची गर्दी नकोशी वाटत होती. गाडी चालवण्यासाठी किंवा वाट काढण्यासाठी होणारी चिडचिड लक्षात घेता तो बेत रहित केला. उगाच काहीतरी किरकोळ उद्योग करत घरीच बसून राहिलो. घरात कोंदट वाटत होतं म्हणून अनेक दिवसांनी बाल्कनीत जाऊन बसलो थोडी मोकळी हवा मिळावी अशा विचाराने. फोनचा चाळा होताच वेळ घालवण्यासाठी. थोड्या वेळाने काहीतरी फरक जाणवला की हवा बदलते आहे. वारा सुटला आहे. आजूबाजूची मोठी झाडं सळसळत होती. छोटी झुड्पं वार्‍याच्या वेगाने थडथडत होती... आभाळ भरून आलं होतं.. एखाद्या उत्तम जलरंग चित्रासारखे ग्रे ढग पसरले होते.

दुनिया किसीके प्यारमे जन्नतसे कम नही

लेखक संजय क्षीरसागर यांनी शुक्रवार, 27/06/2014 02:21 या दिवशी प्रकाशित केले.
तुमच्या हृदयात फक्त एक दिलरुबा हवी, मग स्वर्ग आकाशाच्या पलिकडे नाही. तुमचं रोजचं आयुष्यच जन्नत आहे. तुमची दिलरुबाच तुमची परी आहे. फक्त नज़रिया बदलायचा अवकाश, एखादीनं तुम्हाला मोहवण्याचा अवकाश आहे. सम्राट अकबर, युवराज सलीमला विचारतो, ‘या नाचिज़ अनारकलीत तू असं काय पाहिलंस’? अकबराला वाटतं, युवराजाच्या मेहेर नज़रेची आस असणार्‍या, सल्तनतेत इतक्या लावण्यवती आहेत की त्याचं मन बदलणं अवघड नाही. आणि सलीम अकबराला कमालीचं दिलकष उत्तर देतो, ‘जहांपनाह, अनारकलीको देखनेके लिए तो सलीमकी नज़र चाहीए’. तुमची दिलरुबा दुनियेसाठी काय आहे यानं काही फरक पडत नाही.

शतशब्द कथा -विषकन्या

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 22/06/2014 18:28 या दिवशी प्रकाशित केले.
पुणे मुंबई महामार्गावर लाल टॅाप घातलेली ती गाडीला टेकून पुस्तक वाचीत उभी होती. च्यायला काय माल आहे, कदाचित कुणी नटी असावी! त्याने बाईकची स्पीड वाढवली आणि डोळ्यांना डोळे भिडताच एक हवाई चुंबन तिच्या दिशेने फेकले. तिने ही हाताने चुंबन हवेत उडवित प्रत्युत्तर दिले. च्यायला पोरगी पटली. अररे... समोर वळण आहे तो विसरला होता. बाईक रोड डिवाईडर वर आपटली आणि तो दुसर्याबाजूला फेकल्या गेला. किर्रर्र.... माझ्याच गाडी खाली यायचं होत का? आता बोंबला -ट्रक ड्राईवर. आईग! तिने डोळे मिटले. क्षणभरा करता तिला वाटले आपला चेहरा घामा एवजी रक्ताने डबडबलेला आहे.