Skip to main content

अनुभव

कथा: निर्णय

Published on 27/03/2020 - 16:19 प्रकाशित मुखपृष्ठ
मी अभिजित. आमच्या कंपनीचा न्यूयॉर्कमधील प्रोग्राम डायरेक्टर! आमची मल्टीनॅशनल कंपनी ट्रीरुट्स सर्व्हीसेस ही बँकिंग सॉफ्टवेअर सेवा क्षेत्रातील मोठी कंपनी! न्यूयॉर्कमधील एका उंच व्यापारी इमारतीतल्या छत्तीसाव्या मजल्यावरच्या आमच्या ऑफिसमध्ये खुर्चीवर मी बसलो होतो आणि समोर लॅपटॉपवर एक ईमेल आलेला होता. त्याकडे बघत विचारांत गढलो होतो. त्यातील सत्तावीस नावे मी पुन्हा पुन्हा वाचत होतो आणि त्यातील नऊ नंबरचे नाव बघून अस्वस्थ होत होतो. खुर्चीवरून उठून मी उभा राहिलो आणि काचेच्या खिडक्यांतून बाहेर पाहू लागलो. आज मला कसलीच कमतरता नव्हती. माझी एक मुलगी विशाखा अमेरिकेतच प्रोफेसर आणि दुसरी अजून शिकत होती!
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 3086

कृतघ्न -5

Published on 22/03/2020 - 13:52 प्रकाशित मुखपृष्ठ
याआधीचे भाग भाग 1 : https://www.misalpav.com/node/46154 भाग 2 : https://www.misalpav.com/node/46159 भाग 3: https://www.misalpav.com/node/46183 भाग 4: https://www.misalpav.com/node/46203 आता पुढे माऊली विचारात पडला कि या बाबतीत स्वतः हस्तक्षेप करावा कि नाही, रामदास ला तुकाराम च्या भरोश्यावर सोडून द्यावे कि आपण मदत करावी. मुलांच्या आणि बायकोच्या कानावर हि गोष्ट कळली तेव्हा त्यांनी या भानगडीत न पडण्याचा सल्ला दिला. त्यांचं तरी काय चुकीचं होत?? ज्यावेळी संधी होती तेव्हा रामदास ने सर्व विसरून चुकीच्या माणसांना निवडले आणि आता वाईट वेळेत आता आपण कश्याला मदत करावी?

याद्या 10890

कृतघ्न -2

Published on 28/02/2020 - 20:35 प्रकाशित मुखपृष्ठ
पहिला भाग - https://www.misalpav.com/node/46154 आता पुढे. - रामदास ने मागे वळून पहिले. साडेपाच फूट उंच, अंगात खाकी वर्दी, खांद्यावर 2 स्टार आणि शिट्टी, हातात एक फाईल घेऊन कोणातरी अधिकारी उभा होता. प्रत्येक खाकी वर्दीतला माणूस म्हणजे पोलीसच अशी त्याची समजूत होती. घाबरलेल्या नजरेने त्याने त्याच्या हाकेला ओ दिली. जनाबाई आणि दोन्ही पोरे देखील घाबरली. एकतर दोन तीन दिवस सर्वजण अर्धपोटी, खिशात पुरेसे पैसे नाहीत आणि आता हे पोलिसांचे लफडे मागे लागले म्हणून त्याला घाम फुटला.
लेखनविषय:

याद्या 5663

मतदार हुशार झालेत का ?

Published on 28/02/2020 - 00:15 प्रकाशित मुखपृष्ठ
मतदार हुशार झालेत ? दिल्ली मध्ये नुकत्याच झालेले राज्याचे ईलेक्शन व त्यानंतर आलेले निकाल पाहता आम आदमी पार्टी ने दणदणीत विजय मिळवला व तोही स्वबळावर. आप पक्षाने हा मिळवलेला विजय नक्कीच कौतुकास्पद आहे. असो, पन काही जन मात्र ह्या निकालाचे वृत्त करताना जणु हा निकाल आता भाजप संपवत आहे किंवा भाजप साठी फार मोठी धोक्याची घंटा आहे असा काही बोलत आहेत किंवा बोवत होते . आता असे वृत्तकथन करणारे लोकांवर हसावे कि त्यांचा बुद्धी वर किव करावी हा मोठा प्रश्न आहे. कारण वृत्त कथन करणारेंना मतदार किती कळाला? ह्याचे फार मोठे रहस्य आहे.

याद्या 16007

भाग १७ - कादंबरीतील व्यक्तींचा, स्थानांचा चित्रमय परिचय

Published on 05/02/2020 - 19:28 प्रकाशित मुखपृष्ठ

• चित्रमय परिचय

 Figure 1माधवनगरचा गुरूवार पेठेतला आमचा त्या वेळचा बंगला व बागेचा भाग. जिथे हे नाट्य घडले. बागेचे कालांतराने रिंग टेनिसचे कोर्ट बनले होते. शशी मोठा झाल्यावर आपल्या मित्रांसह तिथे खेळताना...  Figure 2 त्याच जागेतील नव्या बंगल्याचे रूप  Figure 3 प्रज्ञानानंद सरस्वती - आई व वडिलांचे गुरू.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 3825

भाग १५ अंधारछाया प्रकरण १४ - ‘अहो, या पोरटीला घरातून घालवा बरं! माझ्याने आता सहन नाही होत.

Published on 31/01/2020 - 19:23 प्रकाशित मुखपृष्ठ

अंधारछाया

चौदा मंगला अशी बोलली ही गधडी तडा तडा. मला सुचेना काय करावं! एरव्ही एक थप्पडच ठेऊन दिली असती. असं अद्वा तद्वा बोलली असती ती तर. पण शारीरिक त्रासानं आधीच बेजार त्यात अमावास्याची रात्र! मी ही आवरलं मनाला. बराच वेळ पुटपुटत होती काही काही. मग आम्ही गाद्या टाकल्या. पडलो. तरी मनातून काही केल्या जाईना तिचे बोलणं. काकांनी पाठवली तिला अभ्यास करायला. तब्बेत सुधारायला. पण हिचं हे लचांड निस्तरता निस्तरता आलेत नाकी नऊ. बरं काकांना कळल तर म्हणतील तुला कोणी सांगितलं होते हे नसते धंदे. त्यांचा आधीच भुता-खेतांवर विश्वास कमी.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 1630

श्री अमृतानुभव अध्याय तिसरा - वाचाऋणपरिहार

Published on 30/01/2020 - 03:20 प्रकाशित मुखपृष्ठ
|| श्रीराम समर्थ || बाहेर एकदम जोरदार पाऊस कोसळतोय . नदीच्या दुथडी भरुन वाहणार्‍या पाण्याचा खळखळाट अगदी इथवर ऐकु येतोय , नदी धुसरशीच दिसत आहे पण तिचं अस्तित्व अगदी सुस्पष्ट जाणवत आहे. अधुन मधुन जोरदार विजा कडाडत आहेत अन त्याच्या प्रकाशात निमिषार्धच नदी चा प्रवाह उजळुन निघतोय. आणि आपण हे सारं अनुभवतोय ह्या जुनाट शिवालयाच्या आसर्‍याला बसुन ! जुनेच पण प्रशस्त आणि आत्ता ह्या वेळेला तर अगदीच निर्जन. अगदीच नाही म्हणायला मंदिराच्या दुसर्‍या कोपर्‍यात बसलेले ते २ ४ सन्यासी आहेत , पण त्यांचीही काही बडबड नाही , ते त्यांच्या गांजासेवनात सुखाने तल्लीन झाले आहेत.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 4492

भाग १४ अंधारछाया प्रकरण १३ - ‘रक्ताची उलटी होतेय...मिरजेच्या मिशन हॉस्पिटलात न्या...कुठला कोण तो कुडबुड्या गुरूजी...‘मला तर फसवून तुम्हा त्या गुरूजीकडे नेलत!

Published on 30/01/2020 - 00:56 प्रकाशित मुखपृष्ठ

अंधारछाया

तेरा मंगला बेबीला कॉफी दिली. पुन्हा झोपवली कॉटवर. अंगावरची लाली कमी झाली. पण तिच्या हाताला हात लाववेनात! हातपाय सणकून तापले होते. कपाळावर हात ठेवून पाहिला. तर कपाळ थंड होते! ताप पाहिला तर साडे अठ्ठ्याण्णव काय करावे कळेना. झोपल्या झोपल्या कॉफी पिते म्हणाली, म्हणून दिली कढत कढत. डोळा लागला असे वाटून मी गेले स्वैंपाकघरात. आज जपाच्या माळा झाल्या नाहीत हिच्या. रात्री मग जागावे लागते, एकशेआठ माळा पुऱ्या करायला! दुपारी हे आले. जेवले. तरी ही झोपलेलीच होती. मुले दुपारच्या सुट्टीत खायला आली. तेंव्हा म्हटले, ‘चार घास खाऊन घेतेस का बेबी? तर म्हणाली, ‘नको पडू दे’.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 2563

मला भेटलेले रुग्ण - २१

Published on 29/01/2020 - 14:35 प्रकाशित मुखपृष्ठ
https://misalpav.com/node/45617 निदान झालं , त्यानंतर ॲलर्जीबद्दल सविस्तर समजावूनही पेशंटच्या सासऱ्यानी एकच प्रश्न ७ वेळा विचारला तेव्हा मी त्यांना रागवलो !!....कारण एकच प्रश्न ७ वेळा उत्तरून कंटाळलो होतो आणि परत ह्यांना आणू नका हे देखील म्हटलो होतो... काल त्या पेशंटच्या सासऱ्यांना साॅरी म्हटलो तर त्यांना काहीच आठवत नव्हतं पण पेशंट विसरली नव्हती आणि म्हणाली की ह्यांना शक्यतो मी आणत नव्हते व आलेच तर काहीही बोलायचं नाही हे बजावूनच सोबत आणायचे ... पण कालपर्यंत असलेलं हे ओझं मनावरून उतरून गेलं ....

याद्या 16818

भाग १३ अंधारछाया प्रकरण १२ - मग खाज सुटते सगळीकडे! कुठे कुठे, कशी कशी खाजवू? ...पाणी ओतू अंगावर, का मोरीचा ब्रश फिरवू कमरे खालून?

Published on 28/01/2020 - 15:29 प्रकाशित मुखपृष्ठ

अंधारछाया

बारा मंगला संक्रांतीचे तिळगूळ, गुळाच्या पोळ्या, सगळं यथास्थित झाले. आपले दहा पंधरा दिवस बरे गेले म्हणायचे असे मनात आले. त्या दिवशी ती विहिरीकडे गेली. यानंतर दरवाजाकरून घेतला रहाटाच्या खालच्या जागी. त्याला कुलुपाची व्यवस्था केली. तेंव्हा हायसे वाटले. पण तेंव्हा पासून बराच फरक पडलाय तिच्यात. एक प्रकारचा अल्लडपणा आलाय असे वाटले. गुरूजींना भेटून सांगितले. तसे ते म्हणाले, ‘आता महत्वाची पायरी आली आहे. हीच तिची मानसिक स्थिती तिला सोडवणार आहे आपल्या जंजाळातून. पण चुकून पुन्हा निराशा वाटली तर मात्र खंड पडेल बरे व्हायला’.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 1948