मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अनुभव

शिळा सप्तमी

सृष्टीलावण्या ·
आमच्याकडे एकत्र मोठ्या कुटुंबामुळे सुरुवातीला शिळं उरणे हा प्रश्न नव्हता तसेच अ-तिथी (तिथी न ठरवून अचानक येणार्‍या पाहुण्यांची) कमी नव्हती पण कालौघात कुटुंबाचे विघटन झाले आणि शिळ्याचा प्रश्न उभा राहिला. शिळ्या भाताचा शक्यतो लसणाच्या फोडणीचा किंवा कांद्याच्या फोडणीचा भात व्हायचा पण सर्वांत जास्त वेळा व्हायचा तेल, तिखट, मीठ भात. कृति - भातात सढळ हाताने तेल घालावे. त्यात लाल तिखट भुकटी / उसळी मिरची (ताजी, ठसका लावणारी असेल तर प्राधान्य), मीठ, पावभाजीसाठी करतो तसा बारीक चिरलेला कांदा आणि दाण्याचे कुट आवडीनुसार घालून भात नीट मिसळून घ्यावा आणि वेळ न घालवता खावा.

शीर्षक सुचत नाही - २

बेसनलाडू ·
'पाडणे' जरी मी तुझे चुकवले होते तोंडावर अमुचे काव्य अपटले होते 'त्या' विडंबनाचे दुःख कराया हलके का उगीच नवखे शब्द प्रसवले होते? लक्षात ठेव ते शेर दोन फसलेले (तू मुळात नुसते शब्द बदलले होते) राहिल्यात मागे नकोनकोशा ओळी ते घाव मी जरी सर्व विसरले होते थेंबातलि कवने किती टपकली होती! पाऊस 'पाडणे' कुणा न जमले होते!! नको तुला रे शंकाच तुझ्या कवनाची! बघ खुळे पुन्हा ते लोक हासले होते!!

आठवणीतली कविता

सृष्टीलावण्या ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
घाटातील वाट, काय तिचा थाट, मुरकते गिरकते, लवते पाठोपाठ ।। निळी निळी परडी, कोणी केली पालथी, पान फुलं सांडली, वर आणि खालती ।। खाली खोल दरी, वर उंच कडा, भला मोठा नाग, जणू वर काढून फणा ।। भिऊ नका कोणी, पाखरांची गाणी, सोबतीला गात गात, खळाळतं पाणी ।। - बालभारती इ. ३ री (१९८४)

मला आलेले एक स्वारस्यपूर्ण अग्रप्रेषित (Forward)

सृष्टीलावण्या ·
लेखनविषय:
दादरला चित्रा सिनेमाच्या समोरच्या गल्लीत शिरले की एक पोलीस चौकी लागते. तिला खेटूनच एक सायकल दुरुस्तीचे बिननावाचे एक छोटे दुकान आहे. हे दुकान श्री. भूमकर यांचे आहे ज्यांना लोक भाऊ म्हणून ओळखतात. ह्यांचे शिक्षण बेतास बात आहे मात्र वाचन सर्वांगीण आहे. दुकानात प्रवेश केला की समोरच हाताने लिहिलेले विविध फलक दिसतात ज्यावर अनेक संतवचने, सुवचने, मनोगते दिसतात त्या पैकी मला भावलेले काही विचार पुढे देत आहे - १) माणसाला तीन गोष्टी आल्याच पाहिजेत -पोहणे, सायकल चालवणे, झाडावर चढणे. २) कृपया आम्हाला अंकल म्हणू नका. अंकल बेवड्याला आणि आंटी गुत्ता चालवणार्‍या बाईला म्हणतात.

लहान मुलांनी विचारलेले प्रश्न

चतुरंग ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
लहान मुले प्रश्न विचारून भंडावून सोडतात हे आपल्यापैकी बहुतेकांना माहीत असेलच. आपण चकित होतो की हा विचार ते कसा करतात - जो साधा, सोपा, थेट आणि जिज्ञासेने भरलेला असतो - आपली असा विचार करायची शक्ती कुठे आणि केव्हां बरं हरवली?

आग लागो, `तसल्या' नजरेला!

आपला अभिजित ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
तसल्या नजरेनं तुला कधी पाहिलंच नाही रे (राजा!) ज्या वाक्‍यांची अस्मादिकांना सर्वाधिक तिडीक आहे, (आणि तरीही "कोवळ्या' वयात जे किमान दहा-बारा वेळा तरी ऐकावं लागतं,) अशापैकी एक वाक्‍य. परवा "असंभव'मधला एक लाडिक, मधाळ सीन पाहताना हे वाक्‍य डोळ्यासमोर नाचत होतं.

शेजारचे जातियवाद व राजकारण

सतीश वळीव ·
लेखनविषय:
सध्याच्या युगात जातियवाद व राजकारण आजुनही ज्वलंत समस्या आहे. मी ऐक मध्यम वर्गीय नोकरधार असुन प्रामाणिक व सरळ साधा व दुसर्‍यास उपयोगी पडनारी व्यक्ती आहे. मी मागासवर्गीय असुन शेजारच्या स्त्रीया आमच्या स्त्रीयांच्या बरोबर अंतकरनापासुन व्यवस्तीत वागत नाहीत. हे जहाले स्त्रीयांचे. पुरषांचे कही कमी नाही. इतर कोनत्याही गोष्टीत आडकाठी घालुन आम्हाला खाली खेचतात. अश्या वेळी मला ह्या सर्व गोष्टी मुळे प्रामाणिकपना व सरळ साधेपना व दुसर्‍यास उपयोगी पडने हे सर्व थांबउका असे वाटते. पन आजुन सहनशक्ती मजबुत आहे. देव हे सर्व पाहत आहे. मला एकमात्र माहीत आहे की जो कोनी चांगले वागतो त्याचे त्याला चांगलेच फळ मीळनार.