Skip to main content

अनुभव

आत्मानंदी शिष्य, आत्मज्ञानी गुरु! ;))

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 16/04/2008 14:48 या दिवशी प्रकाशित केले.
हा लेख संत तात्याबा महाराजांच्या आश्रमातर्फे आजच प्रकाशित करत आहोत! ;) राम राम मंडळी, नुकताच मिपाचे एक सन्माननीय सभासद ठणठणपाळ यांची नचिकेत्याचे आख्यान ही ष्टोरी वाचनात आली. नचिकेता नांवाचा एक इसम यमाकडे जातो आणि कथेशेवटी यम नचिकेत्याच्या वैराग्याचे कौतुक करतो आणि त्याला आत्म्याच्या अमरत्वाचे तत्वज्ञान सांगतो, अशी ही कथा आहे. या कथेवरून आमचेही दोन शिष्य मध्यंतरी आत्मानंदाच्या शोधात आम्हाला शोधत शोधत ठाण्याला आले होते आणि आम्हीही त्यांच्यावर अनुग्रह केला होता व आत्मानंदाची अनुभूती दिली होती ती ष्टोरी आठवली!

मी पाहिलेला मृत्यू

लेखक आंबोळी यांनी मंगळवार, 15/04/2008 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
अगदी थोडक्यात मरता मरता वाचलो.... काळ आला होता पण वेळ आली नव्हती... असले वाक्प्रचार आपण बर्‍याच वेळा वापरतो / ऐकतो. पण खरेच कधी कधी अगदी जिवावरचा प्रसंग ओढवलेला आसतो. माझ्या आयुष्यातले असे 2 प्रसंग येथे सांगतो. आपल्यालाही असे अनुभव आले असतील तर जरूर सांगा. तसा जन्माला येताना मी गुदमरलो होतो, काळानिळा पडलो होतो, थोडक्यात वाचलो, अशी आख्यायिका माझी आजी, आई आमच्याविषयी सांगतात पण तो प्रसंग नीट आठवत नसल्याने येथे तपशीलवार देत नाही. पण थोडक्यात मरता मरता मी जन्माला आलो असे म्हणता येईल. मी साधारण 6-7 वर्षाचा आसताना आम्ही एका वाड्यात माडीवर राहात होतो.

थोडे असे, थोडे तसे

लेखक देवदत्त यांनी शुक्रवार, 11/04/2008 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या वर्षी एक चांगला विचार कुठल्याशा विपत्रातून (अर्थात ढकलपत्रातून) आला. एक माणूस आपल्या मुलीसोबत बाजारात गेलेला असतो. गर्दीत तो मुलीला म्हणतो, "तू माझे बोट किंवा हात पकडून ठेव, म्हणजे गर्दीत तू हरवणार नाहीस. माझ्या सोबतच राहशील." ह्यावर मुलगी म्हणते, "नको बाबा, त्यापेक्षा तुम्ही माझा हात पकडून ठेवा. गर्दीत माझा हात सुटू शकतो. तुम्ही पकडलेला हात नाही सुटणार." खरोखरच चांगला विचार. तेव्हाच हात धरण्यावरून मला हा विनोद आठवला, एकदा एक माणूस रस्त्यावरून चालता चालता एका खड्ड्यात पडतो.(कसा? माहीत नाही बुवा ;)) त्याला वर काढण्याकरीता लोक म्हणतात,"तुमचा हात द्या.

मद्य काव्य... मदिरेचे हाणतो पेले, धुंद तळीराम

लेखक तळीराम यांनी गुरुवार, 10/04/2008 21:40 या दिवशी प्रकाशित केले.
मदिरेचे हाणतो पेले, धुंद तळीराम बेवड्या या भक्तासाठी, रोज असे शाम* (संध्याकाळ) एक एक प्याला हाती, भक्त जाई पीत एक एक पेगा जोडी, अखेरीस चीत रोजचेच काम दास `रम'नामी रंगे, मुखा येई वास एक एक धाबा धुंडे, होऊनिया लास हाती ना छदाम पिऊन रिक्त झाला पेला, सरे सर्व `जाम' ठायि ठायि वाटेवरती, ट्रॅफीक ही जाम जागीच आराम हळु हळु उघडी डोळे, पाहि दिवा-खांब नाकावरी नाही चष्मा, जोडे तिथे लांब खांबातळी राम! *(संध्याकाळ)