Skip to main content

अनुभव

ब्रह्मोत्सव

लेखक आर्य यांनी मंगळवार, 29/04/2008 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
ब्रह्मोत्सव रात्र पुर्ण चंद्रामुळे, पाणी कमळांच्या फुलां मुळे तर मंदिरे सदैव उत्सवाने शोभून दिसतात. या संस्कृत सुभाषिताचा प्रत्यय नुकताच बेंगलोरमधे ईस्कॉन मंदिरात सुरु असलेल्या ब्रह्मोत्सवाने आला. तसेही दक्षिण भारतात या-ना त्या कारणाने सदैव सण समारंभ आणी उत्सव चालू असतात अगदी नित्य सुमंगल-नित्य महोत्सव. ऊदा : दोलोत्सव, कल्याणोत्सव, योगोत्सव, ब्रह्मोत्सव, वसंतोत्सव, तपोत्सव, आणि पवित्रोत्सव. तसे भारतीय लोक उत्सव प्रिय आहेतच, पण दक्षिण भारतात ते साजरे करण्याची वेगळी पद्धत आणि प्रकारही, विशेष म्हणजे या उत्सवांचे प्रमाणही फार मोठे असते.

प्रतिमा सृष्टी

लेखक मन यांनी मंगळवार, 29/04/2008 06:31 या दिवशी प्रकाशित केले.
काल घरी गेलो. दाराने रोजच्यासारखे स्वागत केलेच नाही. काय झालयं तेच कळेना.म्हटलं जाउन त्या आरशाच्या काचेला विचारावं झालय तरी काय? तर तीही जागची गायब. काहिच कळेना.अजब शांतता.माझे रूम मेट्स ते दार, ती आरशाची काच धड कोणीच दिसेना. जे दिसताहेत् ते बोलेनात.वैतागुन खिडकीवर ओरडलो:- "अरे, झालय तरी काय् ईथे?काल् पर्यंत तर हे दार आणि आरसा प्रेम गीत म्हणायचे.मला जरा बर वाटायचं आनंदी जोडप्याकडे पाहुन.ह्यांना प्रायव्हसी हवी म्हणुन मी नाइट शिफ्ट सुद्धा घेतली होती ना मागे(आणि म्हणुनच लेका तुझा जन्म झाला) काय,चाललयं तरी काय ईथे?" खिडकीने एक स्माइल दिली.(गूढ, गमतीशीर स्माइल.खिडकी खुश आहे का उदास तेही कळेना.) मल

माणुसकीचा झरा

लेखक शितल यांनी शनिवार, 26/04/2008 11:49 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्याला एकदा तरी माणसातच देवाचे रुप दिसते, आणि त्या क्षणा करिता तीच व्यक्ती आपल्यासाठी देव असते. त्या व्यक्तीला आपण कधीच विसरत नाही त्याच्यातील माणुसकीला आपला सलाम असतो. मी येथे माझे दोन अनुभव सा॑गणार आहे.

एका माणसाची कथा....

लेखक वाटाड्या... यांनी शनिवार, 26/04/2008 03:18 या दिवशी प्रकाशित केले.
एका माणसाची कथा.... मिपावरचा पहीलाच प्रयत्न...प्रचंड धाकधुक चालू आहे. आपण तज्ञ मंडळींना हा लेख कसा वाटला ते जरूर सांगा. आज मी तुम्हाला एका माणसाची कथा सांगणार आहे. विलक्षण स्वाभिमानी, करारी, निर्मळ, प्रामाणिक आणि प्रसंगी रागीट सुद्धा. मी असा एक माणुस पाहिलाय जो अतिशय तत्त्वशील, बुद्धीमान पण तरीही प्रसिद्धी पासून प्रयत्नपुर्वक दूर. ========================================================================================== स्वातंत्र्यापुर्वीचा काळ. कोल्हापुर पासून जवळ जवळ ३०/४० कि.मी. आत चिकोडी जिल्ह्यात संकेश्वर नावाचं एक गाव आहे. तिथे पुर्वी एक अण्णा सरंजारदार होते.

सारे प्रवासी गाडीचे

लेखक भोचक यांनी सोमवार, 21/04/2008 19:21 या दिवशी प्रकाशित केले.
परशुरामची झोप मोडू नये म्हणून भुंग्याने पार मांडी फोडली तरी कर्णाने हु की चू केले नव्हते, असे म्हणतात. तद्वतच मध्य प्रदेश नामे राज्यात सार्वजनिक प्रवास करण्यासाठी कमीतकमी एवढी तरी सहनशीलता हवीच. सहनशीलतेची परीक्षा वा कसोटी पाहणारे प्रसंग आपल्या आयुष्यात अधून मधून येत असतील, पण या बाबतीत आपल्या लोकांना अधिक मजबूत करणेसाठी मध्य प्रदेश सरकारने कायमस्वरूपी सोय केली आहे, ती वाहतुकीच्या खासगीकरणाच्या रूपाने. आपल्याकडे 'यष्टी'च्या खासगीकरणाची आरोळी आली की सगळे कर्मचारी एकत्र येऊन शड्डू ठोकून उभे रहातात.