Skip to main content

अनुभव

आठवणी

लेखक मनीषा यांनी रविवार, 31/08/2008 01:00 या दिवशी प्रकाशित केले.
(हे पद्य नाही... तरीही मी ते असे लिहिले आहे कारण , ते असे वाचले असता जास्तं परिणामकारक वाटेल असे मला वाटते )
ओथंबलेलं आकाश बरसतच नाही कधीचं मनात दाटलेलं मळभ पसरत राहतं आभाळावर संध्याकाळच्या कृष्णछाया पसरतात घरावर घराच्या या भिंती माझ्या एकांताच्या साक्षी सारे भोग ..... सा-या वेदना जपल्या आहेत त्यांनीच हळुवार होणारं मन सावरलं आहे त्यांनीच कसं सांगु?

निर्धार

लेखक सर्वसाक्षी यांनी शनिवार, 30/08/2008 20:51 या दिवशी प्रकाशित केले.
चीनचा दौरा संपत आलाय. उद्या घरी परतणार. या दौर्‍यात नेहेमीप्रमाणे चावज्झौ होतेच. चावज्झाउ गेस्ट हॉटेल म्हणजेच ईंग बिंगवान ला उतरलो होतो. दुसर्‍या दिवशी सकाळी साडे आठ ला नाश्त्याला मी आणि हुंग यान भेटणार होतो. सकाळी लवकतच जाग आली. आवरले आणि आवारात फिरायला निघालो. अचानक चार वर्षांपूर्वीच्या प्रसंगाची आठवण झाली. मी असाच कामानिमित्त आलो होतो. बरोबर माझा एक दाक्षिणात्य सहकारी होता, आपण त्याला रामू म्हणुया. दिवसभराचे काम संपले. साडेसातच्या सुमारास हॉटेलवर परत आलो. सोडायला आलेल्या मंडळींनी विचारणा केली की आता इथेच जेवुन झोपणार की जरा फिरायला जाउया? वा! आणखी काये हवे?

भीती वाटे कुणाला?

लेखक देवदत्त यांनी बुधवार, 27/08/2008 20:42 या दिवशी प्रकाशित केले.
'फूंक' चित्रपट थियेटर मध्ये एकट्याने बघणार्‍याला रामगोपाल वर्माने ५ लाख रूपये देण्याचे आव्हान दिले होते असे वाचण्यात आले. अशीच एक पैज एका इंग्रजी सिनेमाकरीता ठेवली होती असे लहानपणी ऐकले होते. तो कोणता सिनेमा त्याचे नाव आठवत नाही. त्यावेळीही सिनेमागृहाच्या बाहेर एक ऍम्बुलन्स ठेवली होती असेही सांगण्यात आले होते. आणखी एक चित्रपट, बहुधा 'The Exorcist'. ह्या सिनेमाबद्दलही असे ऐकले होते की हा सिनेमा बनवून झाल्यानंतर पाहताना ९ जण भीतीने मेलेत, त्यात स्वत: त्या सिनेमाच्या दिग्दर्शकाचाही समावेश आहे.

पहिल्या मराठी विश्व साहित्य संमेलनाध्यक्षांची 'मिसळपावसाठी' एक धावती मुलाखत

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी मंगळवार, 26/08/2008 21:09 या दिवशी प्रकाशित केले.

डॊ.गंगाधर पानतावणे          डॊ.गंगाधर पानतावणे आणि प्राचार्य ठाले पाटील डॉ.गंगाधर पानतावणे    सोबत प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील अमेरिकेत होणार्‍या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रख्यात साहित्यिक, विचारवंत व समीक्षक डॉ. गंगाधर पानतावणे यांची आम्ही दि.

माझा निबंध ते अनुदिनीपर्यंतचा प्रवास

लेखक देवदत्त यांनी सोमवार, 25/08/2008 23:39 या दिवशी प्रकाशित केले.
निबंध लिहा: माझा आवडता प्राणी, शाळेचे आत्मचरित्र, वाचनाचे महत्व. शाळेत असा प्रश्न असायचा सहामाही व वार्षिक परिक्षेला. किंवा मग पत्रलेखन. गुण १० ते १५. त्यावेळेला नेमके काय लिहावे ते माहित नसायचेच. मित्रांसोबत जास्त वेळ शाळेतील अभ्यासाचेच जास्त बोलणे व्हायचे किंवा मग खेळ , दूरदर्शनवरील कार्यक्रम, सिनेमे ह्यांच्यावर चर्चा व्हायची. पण त्यावर लिहायला कधी कोणी नाही सांगितले. त्यामुळे निबंध लिहायला मदत व्हायची निबंधावरील पुस्तकाची किंवा मार्गदर्शकाची(हो, तेव्हा मार्गदर्शक वापरणे म्हणजे थोडेफार कमीपणाचे मानले जायचे) तेही वापरावयास सुरुवात केली होती.

मिपा - अभिरूची कट्टा....

लेखक प्रभाकर पेठकर यांनी रविवार, 24/08/2008 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी ११ वाजता सिंहगड रस्त्यावर (नरवीर तानाजी मार्ग) 'अभिरुची बागेत' भेटायचे ठरले होते. धमाल्याचा तसा ऑफिशियल फोनच आला होता. मी तर जाम उत्सुक होतो. ठीक ११ वाजता 'अभिरूची'ला धडकलो. सामसूम. ठार शांतता. ठरल्यावेळी ठरल्या ठिकाणी जाणं आणि इतर सदस्य न आल्याने अर्धा-एक तास लटकणे हे नेहमीचेच. माझे आणि बायकोचे ह्यावरून अनेकदा 'सुखसंवाद' झाले आहेत. (म्हणजे 'सुख' तीला मिळते, मी नुसता वादाचा धनी). तर तिथे कोणीही (मिपाकर) न आल्याने वातावरण तापू लागले होतेच. तेवढ्यात एक जण कोणाशी तरी फोनवर बोलताना दिसला/ऐकला. 'हॅलो! अरे मी मनोबा बोलतोय्... हो मी पोहोचलोय्....बरं! बरं...' फोन बंद.

आता दोषारोपाना जागा नाही आता फक्त प्रेम.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 23/08/2008 23:48 या दिवशी प्रकाशित केले.
जाता जाता मी शिलाला म्हणालो, "म्हणूनच मी प्रार्थाना करीत असतो,की मला रोज एक नवी चूक करू दे.त्या चुकेतूनच मी काही तरी नवीन शिकेन.आणि म्हणूनच मी मला माणूस समजेन.मात्र तिच चूक परत परत करणारा माणूस होऊच शकत नाही." हा पण एक योगायोगच होता.मी माझ्या पुतणीच्या मुलीच्या लग्नाला जातो काय आणि जवळ जवळ चाळीस वर्षानी मला त्या समारंभात शिलाची भेट होते काय.शिला अमेरिका सोडून कायमची इकडे राहयाला आली होती,हे तेव्हाच मला तिच्याशी बोलताना कळलं.प्रथम मी तिला ओळखलंच नाही.सहाजीकच आहे इतक्या वर्षानी पाहिल्यावर माणसाच्या चेहर्‍यात राहणीत जो बदल होतो तो पटकन लक्षात येत नाही.पण बोलण्याची ढब,हंसतानाची स्टाईल,चेहर्‍या

७.२७ ची लोकल

लेखक पद्मश्री चित्रे यांनी गुरुवार, 21/08/2008 16:58 या दिवशी प्रकाशित केले.
मी तिला प्रथम कधी पाहिले आठवत नाही, पन त्या लोकल ला ती नेहेमीच असायची, त्याच मधल्या लेडीज फर्स्ट क्लास मधे. एकटीच. होती साधीच. तिच्या कानाला लावलेल्या यंत्रावरुन समजत होत की की ती मूक-बधीर होती. ती खुप उदास आणि एकटी वाटायची.. आम्ही रोज समोरासमोर उभ्या असायचो पण हसण्यापलिकडे आम्ची ओळख नव्हती. वेळ लवकर ची असल्याने आणि ट्रेन डबल फास्ट असल्याने गर्दी जरा कमीच असायची.. काही दिवस असेच गेले आणि एकदा ती धावत पळत लोकल मधे चढली डोंबिवली ला आणि लेडीज्-जेंट्स डब्याच्या पार्टीशन जवळ उभी राहिली. २/३ मिनिटातच तिथुन एक मुलगा आला.. तिच्यासराखाच- मूक बधीर आणि तिच्या चेहेर्‍यावर हसु आलं..

एक सुवर्णयोग !!!

लेखक वैशाली हसमनीस यांनी मंगळवार, 19/08/2008 18:12 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येक माणसाच्या आयुष्यात थोडेफार तरी सुवर्णयोग येत असतात.... कधी कळत तर कधी नकळत. असे हे योग अपार समाधान देऊन जातात. माझ्याही आयुष्यात १७ ऑगस्टला असाच एक सुवर्णयोग अवतरला. प्रसंग होता आमच्या 'ए. आय. एम. एस. टी(एम्स्ट)'विद्यापीठाच्या औपचारिक उद्घाटनसमारंभाचा. उद्घाटन होणार होते मलेशियाचे पंतप्रधान दातो(माननीय)स्री अब्दुल हजी अहमद बडावी यांच्या शुभहस्ते! आम्हाला सकाळी साडेनऊलाच ग्रेट हॉलमध्ये बोलाविले होते.