मुंबईहून रात्री निघालेले विमान कोलालंपूरला सकाळी सात वाजता उतरले आणि माझ्या भारतीय मनाला पहिली आठवण झाली ती शरीर आणि मन तरतरीत करणाऱ्या फर्मास चहाची! विमानतळावरील उपाहारगृहात बीओएच टी अशी पाटी दिसल्यावर प्रत्येकी ५रिंगेट (अंदाजे ६२रु, )खर्च करून मोठ्ठा ग्लासभर चहा घेतला. एकघोट घेतल्यावरच मळमळते की काय असे वाटू लागले. कितीही साखर घातली तरी पचकट चव जाईना! शेवटी तो चहा तसाच टाकला. पैसे गेल्याचे दुःख वेगळेच! त्यामुळे कनेक्टींग फ्लाईटमध्ये ग्वावा ज्यूस घेण्यास मन धजावेना. परिणाम दुपारी तीन वाजेपर्यंत उपाशी. ओळखपाळख होऊन विद्यापीठाच्या कॅंटिनमध्ये पाऊल टाकले ते मन प्रसन्न होऊनच.
प्रसंग पहिला
औरंगाबादमध्ये ऑफिसच्या कामासाठी गेलो होतो. तिथल्या टिव्ही सेंटर नावाच्या भागात होतो. हा भाग मुख्य गावापासून तसा बराच दूर आहे. पुन्हा गावात यायचं होतं. डॉ. आंबेडकर कॉलेजमध्ये काम होतं. जवळच्याच रिक्षा स्टॅंडवर गेलो. तीन-चार जणांच्या कोंडाळ्यातून पन्नाशीच्या वयाचा एक बापुडवाणा चेहरा पुढे आला आणि 'चला साहेब' मी घेऊन जातो म्हणाला. रिक्षात बसलो. रिक्षा आंबेडकर कॉलेजच्या दिशेने निघाली.
वाटेत थोडं फार बोलणं झालं, त्यात रिक्षाचालक मुसलमान असल्याचे जाणवले. आंबेडकर कॉलेज म्हणून सुरवातीला या रिक्षावाल्याने चुकून मराठवाडा विद्यापीठात रिक्षा घुसवली. मला आत शिरतानाच जाणवलं काही तरी चुकतंय.
एक क्षण निसटू गेला..
.
हिरव्यागार पानाच्या टोकाशी..
थांबून राहिलेला थेंब,
पांढर्या शुभ्र स्पार्टेक्सवर..
साचलेल्या पसाभर पाण्यात,
टप्पकन पडला...
एक लाट उंच उसळली..
पाण्यात आणि मनात!
एकाच वेळी!!
क्लिक!!!
अल्बम मध्ये लावण्याजोगी,
अजून एक आठवण..
लगोलग आत गेले..
वाट बघत बसलेले रंग गोंजारले..
हळूच कुंचले मोकळे केले..
आणि गेले..
रंग ओले करण्यापुरतं पाणी आणायला..
तो थेंब तो क्षण!!!
तेव्हड्यात वाहून गेला..
छ्या!!!
जाऊदे!
मूड नाही आज!
म्हणताच कागद कोरा राहिला...
एक क्षण निसटू गेला..
======================
स्वाती फडणीस.............. २९-०७-२००८
श्रावणमास! निसर्ग सौंदर्याचा मास. व्रत-वैकल्यांचा मास. त्याच बरोबर मद्य-मांस विरहित मास. रोज `मद्यमासा'वाचून अजिबात न चालणारे अनेक मद्य-मांस प्रेमी, कुत्रा-मांजर पाळायचे ठरवावे इतक्या सहजतेने श्रावण पाळायचे ठरवतात. पण ते इतके सोपे नाही याची जाणीव एक दोन दिवसात होते. (काहीना एक दोन तासातच. असो.) न पेलणारी व्रते करायला गेले की हे असेच हाल हाल होतात. बालकवींचा श्रावणमास या `श्रावणपाळ' मंडळींच्या दृष्टीकोनातून पाहण्याचा हा एक प्रयत्न.
ज्येष्ठ कलाशिक्षक दि. दा. जोशी यांचे निधन
पुणे, ता. २२ - न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोडचे माजी कलाशिक्षक दि. दा. जोशी (वय ७४) यांचे आज निधन झाले. ........
शिवसेनेचे माजी आमदार (कै.) मो. दा. जोशी यांचे ते बंधू होत.
दि. दा. जोशी प्रारंभी रसायनी (जि. रायगड) येथे शिक्षक होते. नंतर टिळक रोड येथील शाळेत त्यांनी चित्रकला व इतिहासाचे अध्यापन केले. पुणे माध्यमिक शिक्षक संघ आणि भारतीय शिक्षण मंडळ यांच्या उभारणीत त्यांचा मोठा सहभाग होता.
आज लॉस एंजेलिस परिसरात सकाळी ११.४० च्या सुमाराला धरणीकंप झाला....
आम्ही आपले रोजच्याप्रमाणे ८.३० ला ऑफिसात आलो होतो.....
पुढ्यातल्या कामाचा आढावा घेतला......
त्यातील किती हाताखालच्या लोकांवर सोपवता येतील ती सोपवली.....
अगदी स्वतःलाच करावी लागणारी कामं उरकून मिसळ्पाव उघडला.......
जरा कुठे इस्ट्-कोस्ट वाल्यांचा मिपा कट्टा वाचून त्यावर एक खट्याळ प्रतिक्रिया लिहून एन्टर करतोय न करतोय तोच.......
सगळी केबिन थरथरायला लागली......
प्रथम वाटलं की बिल्डींगमध्ये काहीतरी ड्रिलींगचं काम वगैरे चालू असेल.........
पण मग माझी चाकं असलेली खुर्ची कंप्यूटरपासून लांब-लांब जाऊ लागली......
आम्ही नेहमी बूट का
"ओ काका, काही काम देता का?"
बुटाची लेस बांधता बांधता माझं लक्ष एका आवाजाकडे गेलं. आठ दहा वर्षाचा एक मुलगा त्या चप्पल स्टँडच्या मालकाकडे पहात होता. जेजूरी गडावर आलेल्या भक्तांच्या गर्दी कल्लोळात माझी नजर या छोट्या मुलाकडे गेली. अंगात मळालेले कपडे, पायात तुटकी स्लीपर अन् भावनाशुन्य नजर. नक्कीच तो रुपया-दोन रुपयांसाठी हात पसरणा-या मुलांमधला नव्हता.
"स्मथिंग इज राँग...टेरिबली राँग..." माझं मन मला सांगत होतं. कारण ज्या वयात खेळायचं, मित्रांबरोबर मनसोक्त बागडायचं त्या वयात तो काम मागत होता.
"नाव काय रे तुझं?" त्या चप्पल स्टँडच्या मालकाने त्याला विचारले.