Skip to main content

अनुभव

एक संवाद

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 28/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
पती पत्नींच्या तक्रारीचे धागे वाचून एक संवाद आठवला पति-आज काय करणार आहेस जेवणात? पत्नी- तुम्ही सांगा फर्माइश. काय खायचा मुड आहे ते "फारशी काही भूक नाही. आमटी अन भात बनव फक्कडसा . आई करायची तशी चिंच गुळाची" ' काल तर केला होती तसली आमटी अन भात' ' मग पोळी अन बटाट्याची भाजी बनव काचर्‍यांची ' ' अहो मुलाना नाही आवडत नुसती पोळी भाजी ' ' मग वांगे भात बनव सोबत?' ' वांगी भात ? वातूळ होते ' ' भाकरी अन पिठले?' ' पिठले रात्री खात नाहीत' ' ठीक आहे मग बाहेरच जाउयात ?' ' रोज रोज काय खायचे बाहेर. शिवाय मुलाना सकाळची शाळा आहे..

पूर्णब्रह्म!

लेखक असुर यांनी सोमवार, 27/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
खाण्याचा विषय निघाला आणि पुणेकरांनी तिथे आपले मत व्यक्त केले नाही असं आजपर्यंत झालं नाहीये. आणि मीही अस्सल पुणेकर आहे, त्यामुळे जाईन तिथे, आणि जमेल तिथे मतप्रदर्शन करणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आणि आद्यकर्तव्य आहे. असो, पुणेकरांचे हक्क आणि त्यांचे कर्तव्यपालन हा एक चर्चेचा वेगळा विषय होऊ शकतो, तूर्तास आपण खाण्याकडे वळूयात. मुळात आपण भारतीय लोक चवीच्या बाबतीत अतिशय लकी आणि सुखी आहोत हा शोध मला भारतात होतो तेव्हा लागला नव्हता हे करंटेपण मान्य करूनही मी हे सांगू इच्छितो की आपली खाद्यसंस्कृती ही आंग्लभूमीला खरोखर भयभीत करून सोडणारी आहे. एखादा इंग्रज खाण्याचे असे किती प्रकार सांगू शकेल?

फ्रोह वाईनाख्टन!!!

लेखक स्वाती दिनेश यांनी मंगळवार, 21/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ता सगळीकडे ख्रिसमसचे वातावरण आहे,ते वातावरण सगळ्यांमध्ये वाटावेसे वाटले म्हणून हा इतरत्र पूर्वप्रकाशित लेख - या आधी- नाताळची चाहूल! पहिला आडव्हेंट झाला की नाताळच्या मेजवान्यांची आमंत्रणं सुरू होतात.

मसल्स दिखाऊ संस्कृती

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी मंगळवार, 21/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या बालपणी आम्ही एकमेकांना दंडाच्या बेडक्या दाखवित शक्तिप्रदर्शन करीत फिरायचो. ज्याची दंडुकळी उंटाच्या पाठीसारखी टम्म फुगणार तोच खरा शक्तिमान! आमच्या वरल्या आळीची पोरं 'तालिमगीर' होती. छाती पुढे काढून, बाह्या दुमडून किँवा बनियनवर फिरायची. त्यांचा तो दणकट देह पाहून आम्हांलाही व्यायामाची खुमखुमी यायची. मग पहाटे उठून नदीकाठच्या गवतात डबडं लपवायचं, अन् रस्त्याने धावत सुटायचं. ही आमची पद्धत. हिवाळ्याची चाहूल लागली की आम्हांला व्यायामाचा किडा चावायचाच. व्हायचं काय की पहिल्याच दिवशी दोन चार मैल पळून आल्याने दुसरा दिवस अंथरुणातच उगवायचा. पोटऱ्‍या सुजून यायच्या, फटपट बोलू लागायच्या.

ए.सी.....ते शी.शी....शाळेला चाललो आम्ही

लेखक सुनिल पाटकर यांनी सोमवार, 20/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
शिक्षणापासून कोणीही वंचीत राहू नये यासाठी सरकारने वाडीवाडीवर शाळा सुरु केल्या.सक्तिच्या शिक्षणाचा कायदाही केला आहे.ज्या देशात श्रीमंतांची मुले ए.सी.शाळेमध्ये शिकतात, त्याच देशात ग्रामीण भागात मात्र शिक्षणासाठी मुलांची फरफट होत आहे प्राथमिक शाळा .वापरात नसलेली बक-यांची गलिच्छ शेड ..त्यामध्ये भरणारी प्राथमिक शाळा..शिक्षण व्यवस्थेत भरडणारी मुलं ..आणि त्यांचं भवितव्य घडविणारा तुटलेला फळा ..हि विदारक स्थिती महासत्ताक बनू पाहणा-या भारतात आजही आहे

अनुभव !!

लेखक प्रकाश१११ यांनी सोमवार, 20/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
हाताच्या तळव्याएवढ्या टक्कल असलेल्या गृहस्ताच्या तोंडून शब्दाने तिरकी उडी घेतली , "काग्र्याच्युलेशंस !" बंडोजी धिल्लम मिणमिण हसत म्हणाला , "अभिनंदन !!" गालाला मुठभर खड्डा असलेला गृहस्त नुसताच हसला लक्षच नव्हते त्याचे .कणाकणाने गहाळ होत जाणारे भान .म्हणजे आपण आपल्या ह्या प्रचंड धान्य गोदामात एकटेच आहोत .आपल्या एका सहकार्याने दांडी मारली आहे .आणि काम नसल्यामुळे एकजण पसार झाला आहे.

|| दक्षिणायण ||

लेखक सुहास.. यांनी सोमवार, 20/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
डिसक्लेमर : लेखकास कुठल्याही प्रांताबद्दल तिटकारा नाही पण रस्सम-भाता ऐवजी 'चटणी-भाकरी' खावुन वाढल्याने महाराष्ट्रावर निस्सीम प्रेम आहे. भारतात आर्य होते की द्रवीड ? (नुकताच आयपीएल मधून बाद झालेला,राहुल नव्हे बरे का) हे इतिहासाचा अभ्यास केल्यावरही मला समजणार नाही, अशी खात्री मला माझ्या अतुलनीय, अफाट आणि आडमाप बुद्धीमत्ते विषयी असल्याने मी त्या भानगडीत पडत नाही, पण काही समाजमान्य थोर इतिहास अभ्यासक विचारवंत व्यक्तींशी (म्हणजे काय हो ?) चर्चा केल्यावर दाक्षिणात्य मंडळी म्हणजे द्रवीड आणि इतर भाग म्हणजे आर्य असा एक समज आहे.

नायकिणीचा नाच

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी रविवार, 19/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या गावच्या जत्रेच्या आदल्या रात्री ग्रामदैवताच्या अश्वाची सवाद्य मिरवणूक असते. रात्रभर ती गावाच्या चौकाचौकात रेंगाळून पहाटेच्या सुमारास देवाच्या डोंगरावर न्यायची असा प्रघात पडलेला किँवा पाडलेला आहे. या मिरवणूकीचे पूर्वीचे वैशिष्ट्य म्हणजे सोंगाच्या गाड्या असत. सुतारनेटावरची पुरुषमंडळी व पोरं विविध पौराणिक देखावे प्रत्यक्ष संवादातून, हुबेहूब वेशभुषेसह सादर करीत. ते पाहण्यासाठी अबालवृद्धांची रस्त्याकडेला गर्दी उसळायची. परंतु आता जमाना बदललाय... सोंगाच्या गाड्या कालबाह्य झाल्यात. त्यांच्या जागी नाचणाऱ्‍या नायकिणी आल्यात.