Skip to main content

अनुभव

१२७ अवर्स

लेखक सेरेपी यांनी मंगळवार, 11/01/2011 या दिवशी प्रकाशित केले.
एका मित्राने काही दिवसांपूर्वी अचानक विचारलं, '१२७ अवर्स' च्या प्रायवेट स्क्रीनिंगचे पासेस आहेत. मला जायला जमणार नाही, तुला जायचं असेल तर सांग'. त्या क्षणापर्यंत मला हि काय भानगड आहे पत्ता नव्हता. तशी मी काही फार 'मूव्ही बफ' वगैरे म्हणण्यासारखी नाही, पण एका कंटाळवाण्या संध्याकाळी कोणी फुकट पास देत असेल तर नाही का म्हणा? म्हटलं दे. तर संध्याकाळी घाईघाईने थेटरात. कसला चित्रपट, कोणाचा काही माहित नव्हतं. शेवटी २-३ मिनिटं उशिराने पळत पळत जाऊन बसलो.

भावड्याची खुषखबर तसेच बुलककार्ट देखील

लेखक भीडस्त यांनी रविवार, 09/01/2011 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेत असताना आमच्या वर्गात भावड्या नावाचा वर्गमित्र होता. भावड्या पायर्‍या पार करत करत आमच्या वर्गात पोहोचता झाला नव्हता तर एकाच पायरीवर अंमळ जास्तच रेंगाळल्याने स्वारी आमच्या बरोबर वर्गात दाखल झाली होती. त्यामुळे भावड्या इतर वर्ग सोबत्यांपेक्षा थोराडच दिसे. वर्ण देखील महाराष्ट्र देशीच्या उन्हातान्हात तापल्याने चांगलाच रापलेला. भरीत भर म्हणून त्या अनगढ वयातल्या आम्हा सगळ्या १२-१३ वर्षीय मित्रांसाठी भावड्या म्हणजे सर्वज्ञ असे. त्याच्या पोतडीतले किस्से म्हणजे अलिबाबाची गुहाच जणू. तर असा हा आमचा भावड्या आमच्या वर्गात असताना, त्या एका वर्षात त्याने उडवलेली ही काही धमाल.

नाटकवाला

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी शनिवार, 08/01/2011 या दिवशी प्रकाशित केले.
तसं म्हणाल तर बालपणापासूनच नाटक अंगात मुरलेलं. हवी ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी रडण्याचं नाटक करायचं किंवा एखाद्या किर्तनकाराची हुबेहूब नक्कल करीत वाहवा मिळवायची. शालेय जीवनात अनेक सोंगे करुन उपस्थितांना हसवलं. 'चोरीचा मामला' मधील सदाशिवरावांची व्यक्तिरेखा साकारली. 'वेड्यांच्या इस्पितळा'त पोस्टमन म्हणून वावरलो. कॉलेजच्या पहिल्या वर्षी पु.लं. च्या 'सारं कसं शांत शांत' मधील भटजीची भूमिका करून अनेकांची शाबासकी सुद्धा मिळवली.

वन लाइनर्स

लेखक गणेशा यांनी शुक्रवार, 07/01/2011 या दिवशी प्रकाशित केले.
पार्श्वभुमी : हा थ्रेड माझा मिसळपाव वरील पहिलाच थ्रेड होता, आता नविन ओळखी नविन मित्र त्यांच्या साठी पुन्हा येथे देत आहे. (कोणी आधी वाचला असेल तर पुन्हा येथे दिल्यामुळे शमस्व) व.पु. काळे हे माझे आवडते लेखक, त्यांच्या मुळे वाचनाचे वेड आनखिन वाढले होते .. त्यांच्या कथा कादंबरी आणि त्यातील वाक्य म्हणजे ग्रेटच त्यातल्ता त्यात पार्टनर .. आपण सारे अर्जुन.. तु भ्रमत आहासी वाया .. हय कादंबर्या म्हणजे कळसच . त्यांच्याच प्रेरणेतुन काही तरी लिखान हाती घेतले आणि त्यात आलेली माझी वाक्य मलाच आवडुन गेली.. कविता ह्या आत्मकेंद्रीत असल्याने सार्वभौमत्व लवकर मिळत नाहि त्यांना.

भाकरी निर्मिती एक कला..

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी गुरुवार, 06/01/2011 या दिवशी प्रकाशित केले.
लष्कराच्या भाकरी थापणे जितके सोपे तितके भाकरीचे निर्माण नाही. ज्वारी, बाजरी, नाचणी ही एकदल धान्ये आता औषधापुरतीच जगतमान्य झाली आहेत. अन् अशांची भाकरी भाजणे ही एक चैन समजावी अशी परिस्थिती दिसते. मुळात भाकरी थापणे, भाजणे या फार मोठ्या कौशल्याच्या गोष्टी आहेत. गावाकडची एखादी जुनी जाणती कौशल्याबाईच ते करु जाणे. तर 'भाकरी निर्माण' ही बऱ्‍यापैकी अवघड कला. त्यासाठी धान्य निवडण्यापासून सुरुवात करावी लागेल. दळण्या अगोदर धान्यातली कच, खडे, तुसे बाहेर टाकली नाहीत तर भाकरी खमंग होऊनही चावतांना वादंग उठण्याचीच शक्यता जास्त. तेव्हा डोळ्यांत तेल घालून धान्याची निवडणूक झाली की चांगलं पीठ दळून घ्यावं लागतं.

[नीळकंठेश्वर] - नव वर्ष, नवी जागा

लेखक पारा यांनी सोमवार, 03/01/2011 या दिवशी प्रकाशित केले.
आमचा रायगडला जाण्याचा बेत रद्द झाला, आणि मी नववर्षाच्या पहिल्या शनिवारी आणि रविवारी एकटा पडलो. सगळे मित्र कुठे कुठे गेलेले होते. त्यामुळे शनिवार फारच कंटाळवाणा गेला. तेंव्हा मी असा विचार केला की किमान रविवार तरी असा काहीच न करता वाया घालवायला नको. मग मी माझ्या पुण्यातल्या मित्रांना SMS केले की सिंहगडावर जायचं का हे विचारायला, कोणीच मला फारशी उत्साहपूर्ण उत्तर दिली नाहीत. मग मी एकट्यानेच कुठेतरी जायचं ठरवलं. बरेच दिवसांपासून हे शंकराचे मंदिर मनात घोळत होते, तर मग विचार केला, की आज तिकडेच जाण्याचा बेत करावा, आणि अस्मादिकांची स्वारी एकटीच निघाली, नीळकंठेश्वराला.

शाळा

लेखक मृत्युन्जय यांनी सोमवार, 03/01/2011 या दिवशी प्रकाशित केले.
शाळा हा विषयच असा आहे की कितीही लिहा कमीच पडेल. पेनातली शाई संपेल (किंवा कळफलक दाबु दाबुन बोटे दुखतील) पण शाळेच्या आठवणी संपणार नाहीत. प्रत्येकाच्या हृदयात शाळेच्या आठवणींसाठी एक वेगळ कप्पा राखुन ठेवलेला असतो. त्या १०-१२ वर्षांच्या आठवणी नेहेमीच सोनेरी रुपेरी असतात असे नाही पण अटळ, अचल, अविनाशी नक्की असतात. माझ्या आठवणीत एक नाही अनेक शाळा आहेत. पण शाळेशी खर्‍या अर्थाने बंध जुळण्याच्या काळात म्हणजे ५ वी नंतर मी ठाण्याच्या सरस्वती मध्ये होतो.