Skip to main content

अनुभव

कमिटी (शतशब्द्कथा )

लेखक खेडूत यांनी गुरुवार, 25/09/2014 19:23 या दिवशी प्रकाशित केले.
'कमिटी येनार' म्हटल्यावर सगळी संस्था कामाला लागली. बऱ्याच फाईली हालल्या. कमिटीचा दिवस सणासारखा सजला होता. मिटिंग हॉलमधे लंबगोल टेबल- त्यावर सफेद बेडशिटं टाकालीवती. पाटील सर फाईली ठीक करत होते. काजू बदामाच्या बाउल्समधून थोडे तोंडात टाकून लेव्हल बरोबर करत होते. इतक्यात ''कमिटी आली..'' असा गलका झाला. सदस्यांनी जागा घेतली. फाईली चाचपल्या. पाकीट ओक्के असल्याचं सराईतपणे हेरलं. चेरमनसायाबाकडं बघून कसनुसं हसले. चष्म्याच्या वरून बघत महाजनसाहेब म्हटले "यावेळी संस्थेने प्रगती चांगली केलीय. पण... तेव्हढा टीचिंग स्टाफ आणा जरा '' ''तुमचं मार्गदर्शन असल्यावर काय सर?

टी.सी.

लेखक कविता१९७८ यांनी सोमवार, 22/09/2014 11:42 या दिवशी प्रकाशित केले.
काल ट्रेनच्या परतीच्या प्रवासात एक किस्सा घडला, वेस्टर्न लाईनला आता लोकल्स डहाणु पर्यंत झाल्या आहेत आणि तेव्हापासुन इथे लोकल मध्ये लेडीज डब्यात लेडीज टी.सी. दिसते. पालघर या स्टेशनापासुन डहाणु हे तिसरे आणी शेवटचे स्टेशन असल्याने लोकल तशी रीकामीच होती त्यामुळे बर्‍याच बायका सीटवर पहुडल्या होत्या. ती टी.सी पालघरहुन चढली व एकेक करुन तिकीटे चेक करु लागली. माझ्या मागच्या सीटवर एक काकु झोपल्या होत्या त्यांना तीने उठवले व तिकिट मागितले.

......आणि आमची पितरं जेवली.

लेखक भिंगरी यांनी शुक्रवार, 19/09/2014 10:52 या दिवशी प्रकाशित केले.
. पितृपक्षात पितरांना जेवायला घालतात. एक पिढी गेली कि पुढच्या पिढीचा नंबर...... माझे सासूसासरे असताना आमच्याकडे द्वादशीला पितरं असत. ते दोघेही गेल्यानंतर (सासरे चतुर्दशीला व सासूबाई पितृपक्षात नवमीला गेल्या.)श्राध्द कोणत्या दिवशी घालावे हा प्रश्न पडला. कारण प्रत्येकवेळी वेगवेगळे करणे सगळ्यांच्या दृष्टीने सोपे नव्हते.म्हणुन ब्राह्मणाने अष्टमीला दोघांचे एकत्र करायला सांगितले .त्याप्रमाणे १९९८ च्या पितृपक्षात अष्टमीला केले. आम्ही वेगळे राहत असलो तरी सासू-सासरे आमच्याकडे राहत असल्याने सगळी कार्ये आमच्याकडेच होतात.त्याप्रमाणे हेही कार्य झाले.

< थेट्रातली मज्जा >

लेखक यसवायजी यांनी बुधवार, 17/09/2014 19:47 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे प्रेर्नास्तान ------------------ बारका हुतो तवा आज्जाबरबर चंद्रमा थेट्रात जायला मला कद्दीच आवडलं न्हाई, पण त्यो वडत मला घेऊन जायचा. दर शुक्करवारी बच्च्चनचा पिच्चर हमखास लागायचा. दोन-तीन तास तर बसायचं हाय तिथं, पर आज्जाला आधी एवढा वेळ का लागायचा मला त्या टायमाला कद्दीच समजलं न्हाई. त्यो आधी आसपासची जागा बघायचा, कुठं थुकलंय का? *गून्, *तून ठेवलंय का बघायचा. मग रुप्पयाचा एक बंदा घेऊन लाकडी शीटच्या पट्ट्यामधनं फिरवायचा. भौतेक ढेकनं मारत हुता. मग तरुनभारत पेपर शीटवर हातरायचा तवा कुठं तेच्याच शीटवर मला जर्रा जागा मिळायची टेकवायला.

पाकीट हरवते तेव्हा ......

लेखक विटेकर यांनी बुधवार, 17/09/2014 14:34 या दिवशी प्रकाशित केले.
दि. १४ सप्टे. ला टि.म.वि. गुलटेकडी येथे काही कामानिमित्त गेलो होतो . दुपारी २ वाजता घरी आलो तर आपले पाकीट पडले आहे असा साक्षात्कार झाला ! पाकीटात ४-५०० रुपये , २ क्रेडिट कार्डे , २ डेबीट कार्डे आणि ड्रायविंग लायसेन्स असा ऐवज होता. भूक लागली होती म्हणून पहिल्यांदा जेवायला बसलो , जेवत असताना विटुकाकूने जे काही ऐकवले तेही निमूटपणाने गिळले. तिच्या मते मी ताबडतोब कार्डे रद्द करायला हवीत. मी शांतच होतो आणि पाकीट ज्याला सापडले ती व्यक्ती नक्की फोन करेल हा विश्वास होता. ( अशावेळी मी शांत असलो की विटुकाकू भयानक चिडते असा अनुभव असल्याने फक्त अस्वस्थ असल्याचे नाटक केले ) ..

निर्णय आणि नकारात्मकता....

लेखक वारा यांनी बुधवार, 17/09/2014 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
दैनंदीन जिवनात आपण छोटेमोठे अनेक निर्णय घेत असतो. जसे टुथपेस्ट पासुन ड्रेस वापरण्या पर्यंत. ऑफीसला निघायच्या वेळे पासुन परत घरी परत येई पर्यंत. रोजच्या गोष्टींसाठी सहसा निर्णय घ्यावे पण लागत नाहीत , ते सगळ आपसुखच होत. पण असा कधी विचार केलाय का की नेमकी तिच गोष्ट का केली जाते? अस काय कारण असत की आपण एक ठरावीकच टूथपेस्ट का वापरतो, दुसरी का नाही? किंवा आपण एक ठरावीकच रस्ता का वापरतो? दुसरा का वापरत नाही? किंवा एक ठरावीक टाईपचे ड्रेसिंग का वापरतो? हाच क्रायटेरीया मोठ्या गोष्टींसाठी सुद्धा लागु होतो का? उदाहरणार्थ , आपण एका ठरावीक कंपनीत काम का करतो? किंवा एका ठरावीक शहरात का राहतो?

कर्फ्यू

लेखक चिनार यांनी मंगळवार, 16/09/2014 17:57 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी एकदा आमच्या गावात कर्फ्यू लागला होता. त्यावेळी त्याचा अर्थ काळात नव्हता पण घराबाहेर पडायचे नाही असे वडिलांनी बजावले होते. मग घरात बसुन बसुन कंटाळ आल्यामुळे मोठ्यांची नजर चुकवुन आम्ही गच्चीवर गेलो. रस्त्यावर शुकशुकाट होता. गच्चीवर आमचं क्रिकेट सुरु झालं. त्याच वेळी आकाशातुन एक विमान चाललं होतं. मला प्रश्न पडला ,गावात कर्फ्यू असतांना गावावरून विमान कसं काय जाऊ शकतं ? मग वाटलं की कदाचित पायलटला कर्फ्यूविषयी माहिती नसेल. आणि अशावेळी त्या पायलटला ही माहिती पुरवणं हे आमचं कर्तव्यचं नाही का ?

मामाचे गाव - तात्या (२)

लेखक दशानन यांनी सोमवार, 15/09/2014 22:34 या दिवशी प्रकाशित केले.
पण आजोबांना सोडून ते कोणाला देखील घाबरत नसावेत. कारण कित्येकवेळा ते रात्र रात्रभर शेतात काम करायचे व पहाटे पहाटे घरी यायचे. गावी लाईट नसायची. जेव्हा लाईट येईल तेव्हा धावत पळत शेतात येऊन पाण्याचा पंप चालू करावा लागत असे, नाहीतर मग दुसरा दिवस विहिरीतून मोटाने पाणी उपसत बसावे लागे. ते म्हणत विहिरीतील पाणी काढून काढून त्यांचे दंड असे बलदंड झाले आहेत. मागील भाग मग दुपारची उन्हं कलू लागली की, तात्या हातात मोठं घमेलं घ्यायचा, व झोपडीत असलेल्या पोत्यातून घमेल्यात काहीतरी भरायचा.

आठवणी : गुळमट तिखट कडू

लेखक मन यांनी रविवार, 14/09/2014 17:18 या दिवशी प्रकाशित केले.
आताच लोकसत्ता वाचत होतो. खूप मज्जा येते ते तसले भारी शब्द वाचायला. व्यामिश्र, जनरेटा, उद्बोधक.... एकदम जुन्या गोष्टी आठवायला लागल्या. शाळेत असताना असे शब्द वाचले , की मी कुठेही ते शब्द ठोकून देत असे. उदा:- "मी आज व्यामिश्र खेळलो." "मला आज खूपच उद्बोधक वाटतय." किंवा "भाजीची चव उद्बोधक आहे." आज "शाळेत जनरेटा पोचला." . . "शी "ला विष्ठा म्हणतात समजेपर्यंत दुसरी तिसरीत कानावर पडलेला " शिष्टाचार " हा शब्द "विष्ठाचार ", "व्यभिचार " असा कसाही वापरायचो.

मोझाम्बिकची निवडणूकः १

लेखक आतिवास यांनी शनिवार, 13/09/2014 19:51 या दिवशी प्रकाशित केले.
१५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात होणारी निवडणूक मला अनुभवता येणार नाही. पण त्यामुळे फारसं बिघडणार नाही असं आज तरी वाटतंय. कारण सध्या मी जिथं राहतेय त्या ठिकाणीही निवडणुकीची जोरदार हवा आहे. आणि काय योगायोग असेल तो असो, इथलं मतदानही १५ ऑक्टोबर रोजीच आहे. मी लिहिते आहे ‘मोझाम्बिक’ बद्दल. मोझाम्बिकला यायची माझी तयारी ‘हा देश नेमका आहे कुठं’ हे शोधण्यापासून झाली.