Skip to main content

अनुभव

माझं कोकणातलं गांव :- भाग-६ माझा एन्रॉनमध्ये प्रवेश

लेखक प्रमोद देर्देकर यांनी गुरुवार, 20/11/2014 या दिवशी प्रकाशित केले.
या आधीचे भाग भाग-१. भाग-२ . भाग-३. भाग-४. भाग-५ या लेखामालेतील पाचवा भाग प्रसिध्द झाल्यानंतर टंकनाचा कंटाळा आल्याने मध्येच ७ महिने निघुन गेले. त्यामुळे क्षमा असावी. मागिल लेखापर्यंत मी माझ्या कोकणातल्या गावाचे वर्णन केले होते.

एक चुकलेली बस - रेडबस डॉट इन

लेखक लॉरी टांगटूंगकर यांनी मंगळवार, 18/11/2014 या दिवशी प्रकाशित केले.
२००५ दिवाळीचे दिवस बेंगलोर मधली एक संध्याकाळ. इंदीरा नगर एरिया. ऑफिसचं शेड्यूल पक्कं नसल्यानं त्यानं हैद्राबादची रिझर्वेशन्स केलेली नव्हती. बंगळूर ते हैद्राबाद आणि तेथून निजामाबाद. नेहमीचाच मार्ग होता. दिवाळीची चार दिवस असलेली सुट्टी बेंगलोर मध्ये घालवायची त्याची मुळीच ईच्छा नव्हती. ट्रेन मिळायची शक्यता आता शून्याहून कमी. सुट्टीचे दिवस म्हणल्यावर विमान कंपन्या लुटायला बसणार. बसने जाणे हाच एक आणि एकमेव पर्याय होता. खाली नही है- ऑपरेटर. दुसरे एजंटसे पूछके देखो. दुसर्या एजंटने तीन चार फोन केले. त्याचे पण तेच उत्तर आणि तोच सल्ला. सात आठ एजंटना विचारून झाल्यानंतर तो वैतागला.

दैव ,नशीब कि शाप ? भाग २

लेखक स्वीत स्वाति यांनी मंगळवार, 18/11/2014 या दिवशी प्रकाशित केले.
bhag ek हे कुटुंब ज्या गावात राहते ते गाव छोटे च असून पूर्ण गाव एकमेकांच्या सुख दुखा:त सहभागी असते. जेव्हा किरण चा अपघात झाला तेव्हा त्याला दवाखान्यात नेण्यासाठी खूप लोक धावले . लोंकाचा या कुटुंबावर असणारा जिव्हाळा तेव्हा दिसून आला. अर्थात या कुटुंबातील सर्वजन माणुसकी जपणारी आहेत . ग्रामीण भाग असल्यामुळे बर्याच वेळा वीज गायब असते .

दैव ,नशीब कि शाप ?

लेखक स्वीत स्वाति यांनी सोमवार, 17/11/2014 या दिवशी प्रकाशित केले.
दैव ,नशीब कि शाप ? हि एक सत्य गोष्ट आहे.. माझ्या आयुष्यातील कटू घटना ज्या पाहून वाटते कि का असे झाले ? एका कुटुंब प्रमुखाचा मृत्यू होतो आणि त्या घरावर एका मागे एक संकट यायला लागतात. हे कुटुंब ग्रामीण भागातील आहे .

कोवळा हुंकार

लेखक समयांत यांनी सोमवार, 17/11/2014 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमी सकाळी तुला आठवतांना माझ्या घट्ट मिटल्या पापण्यांतून ओघळून जाऊ नयेस तू कोवळा हुंकार देऊन आपलंस करावं अलगद जीव गुंतवत जीवन उलगडावं दोन ठोकर खात मला माझं संपवावं रात्र बेरात्र फुललेल्या जाईजुईत हुंडदावं नकोशी घागर डोक्यावर घेऊन नाचावं प्राणपणाशी रोज पोरकट प्रेम भिजवावं वरच्या तीन ओळी तुटक आहेत तरी माझ्या तुटलेल्या रेषा व्यक्त करू शकत नाहीत. कुठे आणि कुठवर जातो आहोत आपण, हा मानसिक प्रश्न मला सतावतो आहे. जवळ रक्ताच्या माणसांनी यातना खूप दिल्यात.

"e" पुस्तके आणि कागदी पुस्तके

लेखक sanjivanik१ यांनी रविवार, 16/11/2014 या दिवशी प्रकाशित केले.
आजचा काळ इलेक्ट्रोनिक चा आहे. पुस्तक पण त्यातून सुटली नहित. e - books , e -magzines सगळीकडे बघायला मिळतात . त्यामुळे अर्थात कागदाची, पैशाची, झाडाची बचत तर होते आणि पर्यायाने पर्यावरणाचा समतोल राखायला मदत होते. जुने अंक साठवायचा त्रास पण वाचतो आणि जागा पण . मी पण या "e" प्रत चा वापर करते पण मी पूर्णपणे ती प्रत वाचू शकत नाही . काही सदर वाचून मी थांबते मग भले ती कितीही वाचावीशी वाटो . पण त्याचीच जर कागदी प्रत असेल तर मी ती पूर्णपणे आणि लगेच वाचून संपवते .

भगवद गीतेतील ११४ वा श्लोक; श्रद्धा आणि अंधश्रद्धेचे महात्म्य

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 14/11/2014 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या पाल्याच्या शाळेत अलिकडे परि़क्षेचे का कशाचे फॉर्म भरून घेताना विद्यार्थ्यांनी आपले वय वर्षे बरोबर काऊंट करावेत म्हणून एक छान शक्कल लढवली, भगवद गीतेचा श्लोकांमधील ११४ वा श्लोक कसा जादुई आहे पहा, ११४ मधून तुम्ही तुमच्या जन्मवर्षाची शेवटचे दोन आकडे मायनस केले की तुमचे वय वर्षे अचूक कॅल्क्यूलेट करता येतात. हा भगवद गीतेचा प्रसार केलेल्या वर्गातील विद्यार्थी, इ.स. २००० पुर्वीच जन्मलेले असणार होते. बर्‍याच विद्यार्थी विद्यार्थीनींनी आपली आपल्या आई वडलांची मित्र मैत्रिणींची वय वर्षे मोजून पाहिली आणि चकीत झाली.

दहा रूपयांची सत्ता

लेखक आतिवास यांनी गुरुवार, 13/11/2014 या दिवशी प्रकाशित केले.
पैशांना किती किंमत असते? हा प्रश्न तसं पाहायला गेल तर चमत्कारिक वाटतो. त्या त्या नाण्यावर किंवा नोटेवर जी काही किंमत लिहिली असेल ती - हे तर चिमुरडी मुलं- मुलीसुद्धा हसत हसत सांगतील. आपल्याच शहरात आपण वावरत असतो तेव्हा हे बरोबर असतं, पण जरा वेगळ्या जगात भटकायला गेल की सगळ चित्र बदलून जात. मी अर्थातच अमेरिका किंवा युरोपच्या सहलीविषयी बोलत नाही. विनिमयाच माध्यम बदललं म्हणून केवळ तिथे आपल्या पैशांची किंमत कमी होते अशातला भाग नाही. तो एक वरवरचा व्यावहारिक मुद्दा झाला. पण त्याच्या खोलात आत्ता नको जायला.

ती.... भाग २

लेखक सविता००१ यांनी गुरुवार, 13/11/2014 या दिवशी प्रकाशित केले.
ती...भाग १ आता मी पण मोठी होत होते. आमचे बोलायचे विषय बदलले. आता सतत तिच्या बोलण्यात येऊ लागलं... ‘ मलाही माझा आयुष्य जगण्याचा हक्क आहे हो ना सवी?’ मी ठासून हो म्हणायची. तिसरीत काय कळतंय? पण जेव्हा हे मी आईला सांगितला तेव्हा ती गंभीर झाली. बाबा-आजी-आजोबांशी बोलून तिने मावशीच्या आईला बोलावून घेतलं. मालू मावशीच दुसरं लग्न करून देण्याबद्दल विषय काढला आणि तिच्या आईचं बोलणं ऐकून आमच्या घरातल्या सगळ्यांच्या डोक्यात धोंडा पडला. काय म्हणावं तिच्या आईने? ‘हे बघ पद्मजा,’ – म्हणजे माझी आई, ‘तिच्या नशिबात नाही हे सुख. पाहिलं ना आपण?

जडण-घडण १३

लेखक माधुरी विनायक यांनी सोमवार, 10/11/2014 या दिवशी प्रकाशित केले.
माझी रोजची कामं सुरू होतीच. फ्री लान्सींग बरं चाललं होतं. कंपन्यांना आवश्यकतेनुसार मजकूर द्यावा लागायचा. पण कधी तरी एखाद्या शुभेच्छापत्रांच्या दुकानात शब्द ओळखीचे दिसावेत, उत्सुकतेने कार्ड हातात घ्यावं आणि आपणच लिहिलेला तो मजकूर फार सुसंगत नसलेल्या चित्रासह दिसावा, अशी स्थिती झाली की मन खट्टू व्हायचं. कधी कधी तर मजकूर छापल्यानंतर तो तपासलाही गेलेला नसे. चुकीच्या ठिकाणी तोडलेली वाक्यं, व्याकरणाच्या चुका बघून वाईट वाटायचं. या कामासाठी मी वेगळे पैसे नाही घेणार, असं सांगूनही प्रत्येक वेळी ही तसदी घेतली जायचीच, असंही नव्हतं.