Skip to main content

अभिनंदन

गुणवत्तेचा गौरव

लेखक भडकमकर मास्तर यांनी सोमवार, 26/01/2009 17:08 या दिवशी प्रकाशित केले.
केदारनाथ भटाचार्य.. हा कलकत्त्यात वाढलेला आणि नंतर मुंबईत स्थायिक उत्तम गायक.... ९० च्या दशकातली त्याची कित्येक गाणी आजही रसिकांच्या ओठावर आहेत.... पाच वेळा फिल्म्फेअर पुरस्कार मिळवून आता इतरांना पुरस्कार देण्यासाठी मला स्पर्धेत धरू नका , असे जाहीर केले. एका दिवशी २८ गाण्यांचे रेकॉर्डिंग करून गिनेज बुकात नाव नोंदवले. आतापर्यंत वेगवेगळ्या भाषांमध्ये सुमारे आठ हजार गाणी गायली. ..... त्याच्या सर्वच गाण्यांवर मन डोलते..थुईथुई नाचते.

प्रतिभेचा सन्मान..!

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 26/01/2009 01:12 या दिवशी प्रकाशित केले.
हृदयनाथ मंगेशकर! मराठी भावसंगीताला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवणारे, एक अत्यंत प्रतिभावान संगीतकार! त्यांना या वर्षी भारत सरकारचा 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर झाला आहे! मिपा परिवारातर्फे या अनवट कलाकाराचे मन:पूर्वक अभिनंदन..! त्यांची उत्तमोत्तम गाणी आम्हाला यापुढेही ऐकायला मिळोत हीच सदिच्छा! (हृदयनाथप्रेमी) तात्या.

धैर्य धुरंधर आणि दहशतवादी पक्षी

लेखक कपिल काळे यांनी रविवार, 18/01/2009 09:11 या दिवशी प्रकाशित केले.
न्यूयॉर्कमधून उड्डाण केलेल्या १५० प्रवाश्यांना घेउन जाणारया यू.एस एअरवेजच्या विमानाला पक्षी धडकल्यामुळे, विमानाची दोन्ही इंजिन बंद पडली. त्यामुळे कप्तान सुलेनबर्गर ह्यांनी विमान हडसन नदीत उतरवले. ह्या त्यांच्या धाडसी निर्णयामुळे मोठी जिवीतहानी वाचली. ११ सप्टेंबरसारखा दुर्दैवी प्रसंग टाळण्यासाठी कप्तानाने लोकवस्तीचा भाग टाळून विमान नदीवर उतरवले. आधुनिक विमाने पाण्यावर बराच काळ तरंगू शकतात. त्यासाठी पाण्यावर विमान उतरवण्याचेही खास कसब लागते. त्यापेक्षाही प्रसंगावधान महत्त्वाचे.

डॉ. आनंद यादव यांचे अभिनंदन !!!

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी शनिवार, 17/01/2009 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
आनंद यादव
डॉ.आनंद यादव
आमच्या औरंगाबाद शहरात काल, महाबळेश्वर येथे होणार्‍या ८२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्याक्षाची निवड होणार होती. आम्ही धावत-पळत मसापच्या (मराठवाडा साहित्य परिषद) कार्यालयात पोहचलो. गर्दी दिसली की डोकावून पाहण्याची सवय, त्यामुळे गर्दी झालेली होती. एकाला विचारले कोण ? तर तो म्हणाला डॉ.आनंद यादव ! डॉ.

माझे सारे जीवन देई मम बाळाला!

लेखक कलंत्री यांनी गुरुवार, 04/12/2008 01:01 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळ वर्तमानपत्रातील २ तारखेची बातमी. आपणासर्वांना अशा घटनेबाबत आनंद आणि अभिमानच वाटेल. मॉ तुझे सलाम. सध्या भयंकर अशा अस्थिर वातावरणात आपल्या जीवाची पर्वा न करणारे भारतीय आहेत. बातमी खाली देत आहे. जेरुसलेम, ता. २ - मुंबईतील "नरिमन हाउस'मध्ये अतिरेकी घुसल्यानंतर भीतीने सॅंड्रा सॅम्युएल या "आजी' एका खोलीत घुसल्या. बाहेर मात्र बेछूट गोळीबार सुरू होता. "नरिमन हाउस' हे ज्यू धर्मीयांसाठी पवित्र असलेल्या "छाबड'चे (धार्मिक आणि शैक्षणिक केंद्र) मुख्यालय.

शारदा साहित्य संमेलन रद्द हा निर्णय कौतुकस्पद..!

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 02/12/2008 23:26 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच मुंबईत घडलेल्या अतिरेकी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर, त्या घटनेमागचे गांभिर्य जाणून रत्नांग्रीत होऊ घातलेले शारदा साहित्य संमेलन रद्द करण्यात आले असून त्या पैशांतून जखमींची आणि शहिदांची मदत केली जाणार आहे असे कळले.. मंगेश पाडगावकर हे या संमेलनाचे संकल्पित अध्यक्ष होते.. माझ्या मते ही घटना खरंच कौतुकास पात्र आहे! महाराष्ट शासनाच्या २५ लाखांवर अमेरीकावारीची फुक्कटची पोळी भाजण्याचे स्वप्न रंगवीत असलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संकल्पित अध्यक्ष पानतवणे आणि इतर पदाधिकारी यावरून काही धडा घेतील अशी अपेक्षा आहे, अर्थात ती व्यर्थ आहे! तात्या.

जाणिजे यज्ञकर्म..!

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 09/11/2008 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, आपले एक मिपाकर मित्र प्रभाकर पेठकर यांचे आजपासून पुण्यात 'यज्ञकर्म' हे हॉटेल नव्यानेच सुरू झाले आहे.. आपल्या सर्व मिपा परिवारातर्फे मी पेठकरशेठना आणि त्यान्च्या 'यज्ञकर्म' ला मनापासून शुभेच्छा देतो. यज्ञकर्मची खूप भरभराट व्हावी हीच शुभेच्छा... एक मराठी माणूस या नात्याने मिपा या मराठी संकेतस्थळाला पेठकरांचा खूप अभिमान वाटतो..! पेठकरशेठ, आपल्या यज्ञकर्मकरता हे एक लहानसं शुभेच्छापत्र - :) तात्या.

सजणा...दूर व्हा ना....दूर व्हा ना.... जाऊ द्या... सोडा... जाऊ द्या

लेखक धोंडोपंत यांनी मंगळवार, 04/11/2008 23:44 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच झी मराठी चॅनलवरील "सारेगमप लिटिल चॅम्प्स" हा लहान शाळकरी मुलांच्या संगीत स्पर्घेचा कार्यक्रम पाहिला. त्यात कुमारी आर्या आंबेकर या चिमुरड्या शाळकरी मुलीने ग. दि. माडगूळकरांची सजणा‌‌‍ऽऽऽऽ दूर व्हा ना‌‍ऽऽऽऽ दूर व्हा नाऽऽऽ जाऊ द्याऽऽऽ सोडा‌ऽऽऽ, जाऊ द्याऽऽऽऽऽ ही लावणी सादर केली आणि तिच्या गाण्याने तमाम प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. प्रेक्षकच नव्हे तर परीक्षकसुद्धा तिचे गाणे ऐकून "हैराण" झाले. तिचा आवाज, नज़ाकत, सादरीकरण सारे काही केवळ अप्रतिम होते. तिने या लावणीने तमाम मराठी रसिकांच्या "कानाचे पारणे" फेडले.

पं. भीमसेन जोशी यांना भारत रत्न, मिपावर अजून एकदा दिवाळी साजरी होणार... श्री. तात्या अभ्यंकर

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी मंगळवार, 04/11/2008 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव सुरू झाले बाबूजी, पुलं, कुसुमाग्रज आणि भारतिय अभिजात संगीताच्या क्षेत्रातले महापुरूष आदरणिय पं. भीमसेन जोशी यांच्या आशिर्वादाने. आत्ताच टीव्हीवर आलेल्या बातमीनुसार, पं. भीमसेन जोशी यांना भारत रत्न हा भारत सरकार तर्फे देण्यात येणारा सर्वोच्च पुरस्कार जाहिर झाला आहे. मिसळपावचे मालक श्री. तात्या अभ्यंकर यांच्याशी आत्ताच झालेल्या बोलण्याप्रमाणे, मिपावर परत एकदा दिवाळी साजरी करण्यात येईल. व्यक्तिशः माझ्या तर्फे पंडितजींना शतशः नमन. आज खरंच 'भारतरत्न' पदवीला किंमत आली आहे असे वाटते.

संयमी जगज्जेता!!

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 31/10/2008 19:30 या दिवशी प्रकाशित केले.
२९ ऑक्टोबर २००८, जर्मनीमधल्या बॉन शहरातल्या 'आर्ट अँड एक्झिबिशन हॉल'ला जत्रेचं स्वरुप आलं होतं! सहाजिक आहे, दोन तुल्यबळ प्रतिस्पर्धी मधे पट मांडून एकमेकांसमोर बसलेले होते. बुद्धीबळाच्या जगज्जेतेपदाचा सामना सुरु होता. १२ डावांच्या ह्या मालिकेत जो कोणी ६.५ गुण मिळवेल त्याच्या गळ्यात विजेतेपदाची माळ पडणार हे नक्की होतं. आनंद विश्वनाथन (भारत) २००७ चा जगज्जेता वि. व्लादिमीर क्रामनिक (रशिया) २००८ सालासाठी त्याला आव्हान देणारा असा हा सामना होता. आनंद ६ गुणांसह आघाडीवर होता, त्याच्या आणि विजेतेपदाच्या मधे फक्त अर्ध्या गुणाचं अंतर होतं. उत्सुकता शिगेला पोचली होती.