गुणवत्तेचा गौरव
केदारनाथ भटाचार्य..
हा कलकत्त्यात वाढलेला आणि नंतर मुंबईत स्थायिक उत्तम गायक....
९० च्या दशकातली त्याची कित्येक गाणी आजही रसिकांच्या ओठावर आहेत....
पाच वेळा फिल्म्फेअर पुरस्कार मिळवून आता इतरांना पुरस्कार देण्यासाठी मला स्पर्धेत धरू नका , असे जाहीर केले.
एका दिवशी २८ गाण्यांचे रेकॉर्डिंग करून गिनेज बुकात नाव नोंदवले.
आतापर्यंत वेगवेगळ्या भाषांमध्ये सुमारे आठ हजार गाणी गायली.
..... त्याच्या सर्वच गाण्यांवर मन डोलते..थुईथुई नाचते. आशिकी, साजन, दीवाना,बाझीगर, १९४२- अ लव्ह स्टोरी ...काय ती नितांतसुंदर हृदयाला घरं पाडणारी गाणी...पुन्हा तरूण झाल्यासारखं वाटलं...
एकदा त्याचा कार्यक्रम ऐकायला मी महाविद्यालयात असताना २० किलोमीटर सायकल चालवत गेलो होतो त्याचे स्मरण झाले यानिमित्ताने.....
.... एक तेव्हाचा मित्र भेटला परत तेव्हा त्याने माझ्या आय्पॉडवर फक्त केदारनाथाची गाणी पाहून टच्कन पाणी काढले डोळ्यातून...
आज त्याच मित्राला फोन करून केदारला पद्मश्री मिळाली असे कळवले... पुन्हा टच्कन पाणी आले की नाही ते फोनवर कळाले नाही..." फक्त किती उशीरा मिळाली रे पद्मश्री... आणि या पुरस्काराने पद्मश्रीचाच सन्मान झाला आहे आणि अमुक अमुकपेक्षा केदार किती महान होता आहे आणि राहील.."यावरही आम्ही पुष्कळ बोललो...
इतक्या गुणवत्तेचा गौरव आज सरकारने केला आहे त्याबद्दल केदारनाथाचे आणि सरकारचे दोघांचे अभिनंदन...
आणि भविष्यात अनेक उत्तमोत्तम गाणी आम्हाला ऐकायला मिळोत अशी त्या प्रभूचरणी प्रार्थना....
हा कलकत्त्यात वाढलेला आणि नंतर मुंबईत स्थायिक उत्तम गायक....
९० च्या दशकातली त्याची कित्येक गाणी आजही रसिकांच्या ओठावर आहेत....
पाच वेळा फिल्म्फेअर पुरस्कार मिळवून आता इतरांना पुरस्कार देण्यासाठी मला स्पर्धेत धरू नका , असे जाहीर केले.
एका दिवशी २८ गाण्यांचे रेकॉर्डिंग करून गिनेज बुकात नाव नोंदवले.
आतापर्यंत वेगवेगळ्या भाषांमध्ये सुमारे आठ हजार गाणी गायली.
..... त्याच्या सर्वच गाण्यांवर मन डोलते..थुईथुई नाचते. आशिकी, साजन, दीवाना,बाझीगर, १९४२- अ लव्ह स्टोरी ...काय ती नितांतसुंदर हृदयाला घरं पाडणारी गाणी...पुन्हा तरूण झाल्यासारखं वाटलं...
एकदा त्याचा कार्यक्रम ऐकायला मी महाविद्यालयात असताना २० किलोमीटर सायकल चालवत गेलो होतो त्याचे स्मरण झाले यानिमित्ताने.....
.... एक तेव्हाचा मित्र भेटला परत तेव्हा त्याने माझ्या आय्पॉडवर फक्त केदारनाथाची गाणी पाहून टच्कन पाणी काढले डोळ्यातून...
आज त्याच मित्राला फोन करून केदारला पद्मश्री मिळाली असे कळवले... पुन्हा टच्कन पाणी आले की नाही ते फोनवर कळाले नाही..." फक्त किती उशीरा मिळाली रे पद्मश्री... आणि या पुरस्काराने पद्मश्रीचाच सन्मान झाला आहे आणि अमुक अमुकपेक्षा केदार किती महान होता आहे आणि राहील.."यावरही आम्ही पुष्कळ बोललो...
इतक्या गुणवत्तेचा गौरव आज सरकारने केला आहे त्याबद्दल केदारनाथाचे आणि सरकारचे दोघांचे अभिनंदन...
आणि भविष्यात अनेक उत्तमोत्तम गाणी आम्हाला ऐकायला मिळोत अशी त्या प्रभूचरणी प्रार्थना....
वाचने
13153
वाचनखूण
प्रतिक्रिया
25
इतक्या
In reply to इतक्या by विसोबा खेचर
चाली
In reply to चाली by हेरंब
नाकाने
In reply to चाली by हेरंब
>>प्रत्येक
कुमार
अभिनंदन....
In reply to अभिनंदन.... by ब्रिटिश टिंग्या
बाप्रे!!!
झकास!
झकास विडंबन
काही गाणी खरंच चांगली आहेत..
In reply to काही गाणी खरंच चांगली आहेत.. by प्राजु
दो दिल मिल
In reply to दो दिल मिल by llपुण्याचे पेशवेll
नाही ..
In reply to नाही .. by प्राजु
मगर
In reply to मगर by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
हाहाहा...
In reply to मगर by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
एकाच प्लेट्मधे २-३ कलेजी पीस मिळाले तर
आधी मला
+१
सूर्यास्त
In reply to सूर्यास्त by हेरंब
अत्यंत कमी
In reply to अत्यंत कमी by मराठी_माणूस
जेव्हा
In reply to जेव्हा by भडकमकर मास्तर
सुर्योदय
In reply to सूर्यास्त by हेरंब
लय भारी .
विडंबन असेल तर मनापासून निषेध
जेव्हा
In reply to जेव्हा by महेंद्र (verified= न पडताळणी केलेला)
तो