अजय-अतुलने एकापेक्षा एक अशी सरस गाणी देउन मराठी चित्रपट संगीतात एक नवे युगच निर्माण केले आहे.
ह्या द्वयीचे सगळ्यात जास्त कौतुक ह्याचे वाटते की, त्यांनीच म्हंटल्याप्रमाणे त्यांनी संगीत शिक्षण घेतलेलेच नाही. तरी सुद्धा त्यांचा संगीत अविष्कार इतका तालबद्ध असतो की, त्यांची कीर्ति आंध्रातही पोहोचली व त्यांनी एका तेलगू चित्रपटालाही संगीत दिले.
त्यांची गीते ऐकतांना मला रेहमानच्या "थिरुडा-थिरुडा" ह्या तामीळ गाण्यांचे संगीत आठवते. रेहमानच्या सुरुवातीच्या काळातील हा एक संगीतातील अप्रतिम नमुना होता.
राजगुरुनगर सारख्या छोट्याश्या गावातील ही जोडी असेच मनपसंत संगीत निर्माण करत राहो.