स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांना भारताचा सर्वोच्च नागरी भारतरत्न सन्मान आज (मंगळवारी) प्रदान करण्यात आला आहे. स्वरांची भक्ती आणि गुरूची कृपा कोणत्याही पुरस्कारहून श्रेष्ठ आहे. त्यामुळे या पुरस्काराबाबत भीमसेनजींना काय वाटत असेल, हे सांगणे कठीण आहे. परंतु या सन्मानामुळे अवघ्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा सन्मान झाल्याची संगीत रसिकांची भावना आहे. राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनीच भारतरत्न सन्मान त्यांना प्रदान करायला हवा होता. पण त्यांच्या सचिवामार्फत भीमसेनजींचा गौरव करण्यात आला, ही बाब खटकणारी आहे. असो.
भीमसेनजींनी हा सन्मान स्वीकारला असेल, त्यावेळी श्रृतींनाही धन्य झाल्याचे परमोच्च समाधान मिळाले असेल!
वाचने
1505
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
हरकत नाही.
भीमसेनजीं