काटेकोरांटीची फुलं - रामदास काकांचा कथासंग्रह

रामदासकाकांच्या कथांची ओळख ’मिसळपाव’च्या वाचकांना नव्यानं करून देण्याची काही गरज नाही!

रामदासकाकांच्या कथांची ओळख ’मिसळपाव’च्या वाचकांना नव्यानं करून देण्याची काही गरज नाही!
पाभे की बात १
मितरों,
कालच मी जवळपास एक किलो च्या आसपास सोने घेण्यास भाजीच्या पिशवीसहीत निघालो होतो. आपण बाबा पर्यावरण, देश, प्रदूषण इत्यादी बाबतीत फार जागरूक असतो. बिअरच्या बाटल्याही हॉटेलातून घरी घेऊन सकाळी भंगारात देतो. एकदम पर्टीक्यूलर बाबा आपण.
तर तेवढयात पंतप्रधानांनी पेट्रोल वाचवा, सोने घेऊ नका असा उपदेश केला. मग काय, आपण तर पंप्रनांचे एकदम भक्त. सोने घेणे कॅन्सल केले.
तेवढयाच किंमतीची चांदी घेतली अन घरी आलो. भाजी देखील त्याच पिशवीतून आणली.
आपण तर एकदम पर्टीक्यूलर रे बाबा.
भेटूया पुढल्या पाभे की बातेत.
आर्यावर्तातील चार सम्राटांच्या युद्धाचा अंत आता जवळ आला होता. हिमालयाच्या पायथ्याशी, गंगा नदीच्या तीरावर, इंद्रप्रस्थाचे सम्राट वज्रकेतू आणि वैशाली राज्याचे बावीस वर्षीय सेनापती कुमारध्वज यांची सैन्ये आमनेसामने उभी होती. या भीषण युद्धाने संपूर्ण आर्यावर्तात जो संहार घडवून आणला होता, तो अभूतपूर्व होता.
गणपत वाणी आयुष्यभर दहा बाय आठ खोपटातल्या काउंटरमागे बसून उदबत्तीच्या काड्यांनी दात कोरत राहिला. ‘आयुष्यभर’ असे तो नुसता म्हणायचा. कारण पुर्वी याशिवाय आपले दुसरे एखादे आयुष्य होते हे त्याला दात कोरतांना एकदाही आठवले नव्हते. यापुढच्या काळात आपले दुसरे एखादे आयुष्य असेल हेदेखील त्याला दात कोरतांना पटले नसते. म्हणजेच उदबत्तीच्या काड्यांनी दात कोरणे एवढेच त्याचे एकमेव माफक आयुष्य होते. या माफक आयुष्यात त्याला एकाच कठीण परीक्षेला सतत सामोरे जावे लागत होते. त्याची काही तक्रारदेखील नव्हती. दातात अडकून बसलेला खाद्याचा एखादा हट्टी कण उदबत्तीच्या काड्यांनी उचकटवून काढणे हीच ती परीक्षा.
डॉक्टर झाले असते तर निदान नवीन काही शिकले असते. तेवढाच फरक पडतो. आर्थीक आणि मानसीक स्थितीत. आपल्याला कितीही सिनीयर व्हा. तीच आणि तीच कामे करायची. बदल तो कसला म्हणूण नाहीच. हे हल्ली असं खूप व्हायला लागलंय ना? पण कशामुळे? हा प्रश्न आला. इतका वेळ मनात स्वतःशीच संवाद करत असलेली नर्स करुणा स्वतःशीच चमकते. का बरे असे वाटावे?जाऊ दे. नकोच हा विचार करायला. एखादी माशी हाताने हाकलून लावावी तसा तो प्रश्न करुणा उडवून लावते. पण तो प्रश्न तीचा पिच्छा सोडत नाही. (क्रमशः)
मागील दुवा:
https://www.misalpav.com/story/53579
नवटाक टाकून रावल्याचा रडंवा बाप मुडद्यागत पडायचा. कधीमधी मोकाट सुटलेल्या सांडागत माळरानी तोंड मारायचा पण तरणाबांड रावल्या मात्र तापल्या तव्यावर उताणा पाताणा..
चुलीवर आगीची आन बाजेवर शेजेची वाण होती.
तालुक्याला एष्टी सुरू झाली अन बैलांच नशीब फळफळलं, बाजारी हेलपाटे बंद झाले.
रावल्याच घोडं कुठ पेंड खात होतं कुणास ठाऊक?