तुझा फोटो पाहून
व्यवहाराचे गणित समजून घेताना
तुझ्या गोतावळ्याचा हिशोब लिहू लागले तेव्हा...
तेव्हा म्हणालास,
"सासू, दिर, भावजय, आणि नणंद
ह्यांचा हिशोब लावतेयसच कशाला?
लग्न आपल्यासाठी असतं
अन नातीगोती भांडणं करण्याऱ्यांसाठी.
नातलग सगळे सारखेच- इथून-तिथून."
स्वार्थ पाहण्याची जेव्हा वेळ आली
तेव्हा हेच आठवून मी बाजूला सरले
कारण त्या वेगळ्या संसारात भलं आपलंच होतं
डोकं वापरुन निर्माण केलेलं!
***
गेल्या दसरा-दिवाळीत
आपण घर आवरत होतो
आता पुन्हा सण आलाय...
आता पसारा आवरुन घायचा आहे
माळ्यावरची बोचकी-बाचकी फेकण्याचा
मनोसंकल्प तरी तडीस न्यावाच लागेल, कारण
बोहारणीकडून चांगलेसे भांडे मिळवण्याचे रंजन त्यातच!