Skip to main content

ताज्या घडामोडी । एप्रिल २०२५ । चैत्र १९४७

लेखक वामन देशमुख यांनी मंगळवार, 01/04/2025 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपाखरांना नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! हे वर्ष सर्वांना सुख, समाधान, समृद्धीचे जावो ही श्रीचरणी प्रार्थना. भूकंपाने म्यानमारचे प्रचंड नुकसान झालेलं आहे. ऑपरेशन ब्रह्मा द्वारे भारत शक्य ती मदत करत आहे. महामार्गांवरील टोल हा वाहनचालकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. आजपासून टोल कुठे वाढलाय तर तुरळक कुठे कमी देखील झालाय! ट्रम्प च्या टॅरिफ मुळे जगभरातील बाजार सध्या दोलायमान अवस्थेत आहेत. राजकीय आघाडीवर, या वर्षी बिहारात विधानसभा निवडणुका होत आहेत. दिल्ली जिंकल्यामुळे भाजप जोमात आहे आणि त्यांनी बिहार विधानसभा निवडणुकीकडे लक्ष केंद्रित केले आहे. 'फिर से नितीश' हा एनडीए चा नारा आहे. तर आम्ही इंडीया ब्लॉक म्हणून लढू; मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याचा निर्णय हा "सामूहिक निर्णय" असेल.असे काँग्रेसने म्हटले आहे. --- नवीन वर्षात व्यासंगी, विद्वान, अभ्यासू, प्रामाणिक मिपाखरांना लेखन-चर्चन करण्याचे पोषक वातावरण आणि म्हणून प्रेरणा मिळेल ही अपेक्षा. - द्येस्मुक् राव्

वाचने 37839
प्रतिक्रिया 341

प्रतिक्रिया

In reply to by वामन देशमुख

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी या प्रकरणी गंभीर दखल घेत पोलीस आणि मंदिर प्रशासनाला कारवाईचे आदेश दिल्यानंतर मंदिर संस्थानने त्वरित पावलं उचलली आहेत.
एक गोष्ट समजत नाही. विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे मधूनमधून अशाप्रकारचे आदेश देत असतात. असे आदेश सरकारमधील मंत्री किंवा प्रशासनातील जिल्हाधिकारी किंवा तत्सम कोणा अधिकार्‍याने दिले तर समजू शकतो. पण नीलम गोर्‍हे असे आदेश नक्की कोणत्या अधिकारात देत असतात? असे कारवाई करायचे आदेश द्यायचा अधिकार विधानपरिषदेच्या उपसभापतींना असतो का?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

माहिती नाही. पूर्वी भाजप-सेना युतीचे सरकार असताना विधानसभेत विरोधी पक्षनेता कॉंग्रेसचे राधाकृष्ण विखे पाटील होते. पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता होती. तेव्हा कोणत्याही सरकारी पदावर नसूनही राष्ट्रवादीचे अजित पवार (जे एक साधा आमदार होते) वारंवार पिंपरी चिंचवड महापालेकत जाऊन तेथील अधिकाऱ्यांची बैठक घ्यायचे. यावर अनेकांनी आक्षेप घेऊनही ना त्यांनी ते बंद केले ना मुख्यमंत्री देफने बंद करण्यास सांगितले.

In reply to by श्रीगुरुजी

आमदार खासदार, नगरसेवक लोक अशी बरीच बेकायदा कामं करत असतात. मी तर ऐकलाय की राज ठाकरे तर कधीच टोल भरत नाहीत. कोणी त्यांना विचारातही नाही. प्रकाश आंबेडकर यांच्या कार्यकर्त्यांनी कितीही तोडफोड करू दे कार्यकर्त्यांवर लहान सहान केसेस दाखल करून त्यांना मोकळे सोडले जाते. अशी बरीच उदाहरणे आहेत.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सांभाळून, परतीचे दोर नका कापू, कधी तुम्हाला उबाठा, शप तोंडावर पाडतील सांगता येणार नाही. बाकी राणाला भारतात आणले म्हणे, तुमच्या पक्षांचा दुखवटा किती दिवसांचा? निदर्शनांना कधी जाताय? या वेळी तुमच्या मते अजून एका निरपराध्याला पकडल्याने राजमाता किती वेळ रडत होत्या? पण या वेळी राणाची वकीली करण्यात राऊतांअगोदर कन्हैयाने बाजी मारली ना? या विषयावर सरकारवर टिका करायची संधी त्याने तुम्हाला पण दिली नाही.

In reply to by टीपीके

माझ्या मते राणाला भारतात आणण्याची आवश्यकता नव्हती. त्याला अमेरिकेत जन्मभर तुरूगवास मिळाला होता. तेथे तुरूंगात फाजील लाड होत नाहीत. त्याला येथे आणून काहीही साध्य होणार नाही. तो कोणतीही नवीन माहिती देणार नाही व दिली तरी ते सिद्ध करणे आता अशक्य आहे. कपिल सिब्बल, प्रशांतभूषण त्याला सोडवून आणण्यासाठी तयारीला लागले असतीलच. कॉंग्रेस, शप गट, सप, उबाठा गट, वंबिआ इ. त्याच्यावर कसा अन्याय होतोय यासाठी आंदोलनाची तयारी करीत असणार. कुमार केतकर, राजदीप सरदेसाई, रवीश कुमार, बरखा दत्त इ. माध्यमातून त्याची बाजू जोरदारपणे मांडतील. राऊत, कन्हैय्याकुमार, उमर अब्दुल्ला, अखिलेश यादव इ. रस्त्यावर उतरून धुमाकूळ घालतील. भारताला त्याला तुरूंगात व तुरूगाबाहेरही पोसावे लागेल. मानवतेच्या आधारावर त्याला जामीन मिळेल आणि तो देशद्रोह्यांचा हीरो होईल.

In reply to by टीपीके

"त्याला येथे आणून काहीही साध्य होणार नाही. तो कोणतीही नवीन माहिती देणार नाही" हे तर आधीच माहित होते. डेन्मार्कमधील गुन्यासाठी तो अमेरिकेत तुरुंगात होता. तेथील सुप्रिम कोर्टाने पुराव्याअभावी राणाची २६/११ मधुन मुक्तता केली होती. आता जगाचे लक्ष असणार आहे ह्या केसमध्ये. खोट्या चकमकीत मारणे, जेलमध्ये आत्महत्या दाखवणे .. असले काहीही करता येणार नाही. तिकडे पिझा खात होता.. इकडे जाड भाकर्या खाव्या लागतील. "कसाबला बिर्याणी देत होतो" हे सगळे खोटे होते असे खुद्द विद्वान वकील आणि आता भाजपात सामील झालेले उज्ज्वल निकम ह्यांनीच मान्य केले होते.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

समजा एखादा गुन्हेगार असेल तर तर त्याला भारतीय कायद्यानुसार शिक्षा मिळायला नको का? मुंबई हल्ल्यात 166 लोक मेले होती, त्यांच्या मृत्यू ला कारणीभूत असणाऱ्यांना भारतीय कायद्यानुसार शिक्षा होत असेल तर चांगलेच आहे की. ह्यात फसगत कसली. प्रशांत भूषण गँग काय करणार ह्याचा विचार करून निर्णय घेण्यात अर्थ नाही. कदाचित एखादा मुद्दा मिळेलही त्याचकडून, भारताने असच प्रयत्न केले पाहिजे.

In reply to by रात्रीचे चांदणे

शि़क्षा झालीच पाहिजे. चव्हाण 'त्याला सोडुन द्या' असे थोडीच म्हणत आहेत? पण भाजपावाल्यांची नेहमीची सवय आहे. "आमच्या मताशी सहमत व्हा नाहीतर तुम्ही देशद्रोही आहात"काही निर्बुद्ध पत्रकारांनी तशी री ओढायला सुरुवातही केली आहे. प्रशांतभूषण काय करतील ह्याची चिंता कशाला? वकिलांचे कामच ते आहे. इंदिरा गांधींच्या मारेकर्याची केस घेणार्यांची सून भाजपातच आहे. आसाराम बापू,हर्षद मेह्ता ह्यांची केस लढवणारे, कायदा आणि निर्लज्जपणा कोळून प्यायलेले एक वकील वाजपेयी सरकारमध्ये तर कायदा मंत्री होते.

In reply to by श्रीगुरुजी

साध्य होईल की नाही ही पुढची गोष्ट झाली. पण भारतीय नागरीकांना इतक्या बेदरकारपणे ठार मारायच्या अक्षम्य गुन्ह्यात सामील असलेल्या कोणालाही भारतीय कायद्यापुढे उभे करणे हे भारत सरकारचे कर्तव्य आहे.ते सरकारने केले याचे समाधान आहे. २६/११ नंतर 'भारतीयांची तीच लायकी' असली मुक्ताफळे उधळणार्‍याला किमानपक्षी भारतीय न्यायालयापुढे उभे करायला नको? त्याला फाशीची शिक्षा होईलच असे नाही तसेच होणारच नाही असेही नाही. इंदिरा गांधी हत्याप्रकरणी सतवंतसिंग आणि केहारसिंग या दोघांना फाशीची शिक्षा झाली होती. केहारसिंगने प्रत्यक्षात इंदिरा गांधींवर गोळी चालवली नव्हती (ती चालवली होती बियंतसिंग आणि सतवंतसिंग यांनी- त्यातील बियंतसिंग त्या दिवशीच मेला- की मारला) तरीही त्याला कटात सहभागी होता म्हणून फाशीची शिक्षा दिली होती. संसद हल्ला प्रकरणात अफजल गुरूने प्रत्यक्ष हल्ल्यात भाग घेतला नव्हता (प्रत्यक्ष हल्ल्यात भाग घेतलेले हरामखोर त्या दिवशीच मेले) तरीही त्याला कटात सहभागी असल्याबद्दल फाशीची शिक्षा न्यायालयाने दिली होती. त्याप्रमाणेच जर २६/११ च्या आखणीत राणाने मोठी भूमिका बजावली असेल तर त्याला फाशी होऊ शकेल. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात २००५ मध्ये अबू सालेमला पोर्तुगालमधून भारतात आणले गेले होते. तेव्हा त्याला फाशी देणार नाही असे आश्वासन भारत सरकारने पोर्तुगाल सरकारला दिले होते त्यानंतरच पोर्तुगाल सरकारने त्याचे प्रत्यापर्ण भारतात केले. इतर आरोपींनी दिली होती त्यापेक्षा नवी आणि पूर्वीच्या १२ वर्षात न कळलेली कोणतीही माहिती अबू सालेम द्यायची शक्यता जवळपास नव्हती. तसेच त्याला फाशीही होणार नव्हती. तरीही भारतीय नागरीकांविरोधात गुन्हा करणारा कोणीही कुठेही असेल तरी त्याला भारतात आणणे आणि भारतीय न्यायालयापुढे उभे करणे हे भारत सरकारचे कर्तव्य आहे. ते पार पाडले होते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

अमेरिकेत तो सुटण्याची शक्यता खूप कमी होती. भारतात अकार्यक्षम न्यायव्यवस्थेमुळे तो सुटू शकतो. भारतात त्याच्या पाठीशी अनेकजण उभे राहून त्याला भरपूर मदत करतील. त्याला पोसावे लागेल ते वेगळेच. त्यापेक्षा तो अमेरिकेतल्या तुरूंगातच राहून तेथेच मरायला हवा होता.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दहशतवादी तहव्वुर राणाविरुद्ध निष्पक्ष खटला चालवण्याची मागणी केली आहे. त्याला बचावाची संधी, अपीलची सुविधा देण्याचा प्रस्ताव मांडला आहे. कपिल सिब्बल, प्रशांतभूषण, असीम सरोदे, इंदिरा जयसिंग, अभिषेक मनू सिंघवी इ. तयारीस लागले असतील. दहशतवाद्यांसाठी कॉंग्रेसींना नेहमीच कळवळा असतो.

In reply to by श्रीगुरुजी

काय खोटं बोललो आम्ही, 24 तासात राजमातांनी चक्र फिरवली. आता उठा, राऊत, शप मदतीला धावतील. आणि या वेळी प्रो माई अचानक गप्प बसतील. अबांच इंटरनेट अधून मधून बंद पडेल.

ह्याने ना पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांच्या पक्षाला मुस्लिमांची मते मिळणार नाहीतच पण हिंदूंची कमी मात्र होतील. आणि निकाल लागला की मात्र EVM दोष देत बसतील.

ईव्हीएम हॅक करता येतं, निकालही फिरवता येतो! अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या हाती पुरावे, तुलसी गब्बार्ड यांचा खळबळजनक दावा https://dhunt.in/ZP72v By सामना via Dailyhunt

"दहशतवाद्यांसाठी कॉंग्रेसींना नेहमीच कळवळा असतो." श्रीगुरुजी सगळी बातमी वाचायची नाही. आपल्याला जे आवडते ते घ्यायचे आणि बाकीचे सोडून द्यायचे. हेच विधान मोदी/शहानी केले की म्हणायचे 'ह्यामागे एक वेगळीच कूट्नीती/चाणक्यनीती आहे जी जगाला २५ वर्षांनी समजेल" The Congress leader stated that a "kangaroo court" will not run in the country as the whole world will be watching India .. चव्हाण योग्यच बोलले आहेत. दया नायक/प्रदिप शर्मा छाप अधिकार्याने राणाचे एन्काउंटर केले तर भारताचे नुकसान होईल. 'राणाला भर चौकात फाशी द्या" हे म्हणायला सोपे आहे. हा राणा कोणत्या गुन्ह्यासाठी अमेरिकेत तुरुंगात होता? डेन्मार्कमधील गुन्ह्यासाठी. A US court in 2013 acquitted Rana of conspiracy to provide material support to the Mumbai attacks. But the same court convicted him of backing LeT to provide material support to a plot to commit murder in Denmark. आता चव्हाण ह्यांच्या बोलण्याचा अर्थ कळला असेल? गुडघ्यात मेंदू असणार्या अर्नब गोस्वामी/नाविकाला हे समजणार नाही. Read more at: https://www.theguardian.com/world/2025/apr/10/mumbai-attacks-tahawwur-h… https://www.latestly.com/agency-news/india-news-congress-prithviraj-cha…

अमेरिका सहित जगभरातील अनेक लोक ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते आणि निकालही फिरवता येतो, असं सांगत असताना भारतातील बहुसंख्य जनता व विरोधी पक्ष ईव्हीएमविरोधात आंदोलनं करत आहेत, निवेदने देत आहेत. अशा स्थितीत भाजपा महायुती मात्र ईव्हीएम मशीनवरच निवडणुका घेण्यात इतकी उत्सुक का आहे? भाजपाला ईव्हीएम इतकी प्रिय का आहे? अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीसुद्धा मोदींच्या उपस्थितीत ईव्हीएम संदर्भात प्रश्न उपस्थित केले होते. तरीदेखील भाजपा ना ईव्हीएम सोडते, ना सत्ता. ज्या दिवशी निवडणुका बॅलेट पेपरवर घेतल्या जातील, त्याच दिवशी निवडणूक खर्‍या अर्थाने पारदर्शक झाली असं समजावं लागेल. अन्यथा, तुम्ही मत कुणालाही द्या — सत्ता मात्र भाजपा महायुतीच्याच हातात येते. आता महाराष्ट्रातील आगामी जिल्हा परिषद व महानगरपालिका निवडणुकांमध्येही हेच घडणार, अशी धारणा बुद्धिजीवी आणि सर्वसामान्य जनतेमध्ये तयार होत आहे. https://www.facebook.com/reel/1199818235143886/?mibextid=ZZyLBr

In reply to by अमरेंद्र बाहुबली

evm मध्ये हेराफेरी शक्यच नाही. या शिवाय evm बदलणे ही शक्य नाही. टीनपट डब्बा गल्लीतील कारीगर ही तैयार करू शकत होता. कागदी बॅलेट कोणीही सकाळी सिरिज पाहून दोन तासांत मतपत्र छापू शकत होता. कागदी सील ज्यावर पोलिंग अजेंटचे हस्ताक्षर राहायचे ते एका पिन ने ही सहज हटविणे शक्य होते. सरकार तुमची असेल तर मतपेट्या बदलून त्यात काढलेली कागदी सील सहज लावणे शक्य होते. ( मी 1982 ते 1996 पर्यन्त निवडणूक ड्यूटी प्रत्येक निवडणूकीत केली आहे). अमेरिकेत सरकार कोणाचीही आली तरी त्यांची भूमिका भारत विरोधी राहील कारण अंतराष्ट्रीय राजनीति CIA निर्धारित करते. त्याची दोन कारणे आहेत. पहिला भारत रशियन ब्लॉकचा आहे. दूसरा आधीच चीनच्या उन्नतीमुळे अमेरिका आणि युरोपची वाट लागत आहे. त्यात भारताची भर नको. गेल्या दहा वर्षांत भारताची प्रगति बघता ही भीती खरी ठरत आहे. भारतात अराजकता पसरवून भारताचे तुकडे करणे जे सीआयएचे अनेक दशकांपासूनचे उद्दीष्ट आहे. 2011 नंतर भारतात अराजकता पसरविण्याचे भरपूर प्रयत्न झाले. दुर्भाग्य 2014 मध्ये मोदींच्या हाती पूर्ण बहुमताची सत्ता आली. सीआयएचे शेकडो कोटी पाण्यात गेले. 2024 पर्यन्त भारताला अस्थिर करण्यासाठी किती हजार कोटी बुडाले याची कल्पना करणे कठीण.

In reply to by विवेकपटाईत

हे "बियॉण्ड डाऊट" कुणी सिद्ध केल्याचे माझ्या वाचनात नाही. कोणतेही इलेक्ट्रॉनिक्स तत्वतः पंक्चर करता येते.

In reply to by युयुत्सु

काही काही गोष्टी अशा असतात की ती गोष्ट खरी असल्याचा पुरावा देता येत नाही पण ती गोष्ट खोटी असेल तर त्याचे खंडन करता येते. तुमच्या भाषेत त्याला हायपोथिसिस का असे काहीतरी बोलतात. उदाहरणार्थ- युयुत्सुंचा लष्कर-ए-तोयबाशी संबंध नाही याचा पुरावा देता येणार नाही. मात्र युयुत्सुंचा लष्कर-ए-तोयबाशी संबंध आहे असा एखाद्याचा दावा असेल तर त्या व्यक्तीने अगदी बारीकसाही पुरावा दिला तर युयुत्सु हाफीज सईदच्या टोळीतले एक आहेत असे म्हणता येईल. त्यामुळे युयुत्सुंचा लष्कर-ए-तोयबाशी संबंध नाही ही अशी गोष्ट आहे जी "बियॉन्ड डाऊट" कधीच सिध्द करता येणार नाही. फक्त त्यांचा लष्कर-ए-तोयबाशी संबंध आहे याचा स्पष्ट पुरावा देता येणार नाही. त्याप्रमाणेच ईव्हीएम हॅक करता येत नाही हे "बियॉन्ड डाऊट" कधीच सिध्द करता येणार नाही. जर का एखाद्याचा दावा असेल की ईव्हीएम हॅक करता येते तर ते करून दाखवा असे आव्हान निवडणुक आयोगाने दोन-तीनदा दिले होते तिथे कोणी गेले पण नव्हते. दुसरी गोष्ट म्हणजे मागे इलॉन मस्क किंवा आता तुलसी गॅबार्डने ईव्हीएम विषयी जे काही म्हटले त्यावरून काँग्रेसच्या राजकारण्यांपासून मिपावरील अमरेंद्र बाहुबलींपर्यंत अनेकांना उकळ्या फुटल्या. इलॉन मस्कने प्युर्टो रिकोमध्ये ईव्हीएम मध्ये प्रश्न निर्माण झाले त्यावेळेस पेपर ट्रेल होता म्हणून बरे झाले असे म्हटल्यावर आपल्याकडे जसे यंत्र आणि जशी पेपर ट्रेल असते तसेच तिथे पण असते असे गृहित धरून तिथे प्रश्न आला तसा आपल्याकडे पण येऊ शकेल असे दावे केले गेले. पण तिथे प्रश्न कुठे आला? तर मतदानाची वेळ संपल्यावर मशीनमधील आकडे (कोणाला किती मते मिळाली) हे इंटरनेट लिंक करून आपोआप एका सेंट्रल युनिटकडे पाठवले गेले होते ती मधली लिंक कोणीतरी हॅक केली होती. म्हणजे जो काही प्रश्न आला तो मशीनमध्ये नव्हता तर मधल्या लिंकमध्ये होता. आपल्याकडील यंत्रे इंटरनेटला जोडलेलीच नसतात तर सगळ्या मतदानकेंद्रावरील यंत्रे मतमोजणीच्या ठिकाणी नेली जातात आणि तिथे मतमोजणी केली जाते. तरीही मशीन हॅक करता येऊ शकते असा कोणाचा दावा असेल तर ती करून दाखवावी. मग ते म्हणणे लगेच मान्य करू. ते हॅक करायला आतापर्यंत कोणीही पुढे का आले नाही? जे काही चालू आहे ते नुसते हवेतील गोळीबार. तिसरे म्हणजे कोणत्याही मशीनची अ‍ॅक्युरसी ९९.९९% पेक्षा दरवेळेस देता येईल असे वाटत नाही. दहा हजारातील एखादा मोबाईल फोनचा हॅन्डसेट न चालणारा निघतो त्याप्रमाणेच. भारतात मतदानकेंद्र आहेत १० लाखच्या आसपास. प्रत्येक केंद्रावर एक मशीन धरले तरी पूर्ण निवडणुकीत १० लाख मशीन वापरली जातात. त्यापैकी १% म्हणजे १० हजार आणि त्याच्या १% म्हणजे १०० मशीनमध्ये काहीतरी बिघाड असणार हे गृहित धरायलाच हवे. अशा मशीनमध्ये मते योग्य प्रकारे नोंदली जाणार नाहीत किंवा एक बटन दाबले तर दुसर्‍याला मत जाणार असे काही होणार हे अपेक्षित आहे. असे कुठे होत असेल तर निवडणुक आयोग त्याठिकाणी फेरमतदान घेते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मला नाही वाटत १० पेक्षा जास्त ठिकाणी असे करावे लागले. म्हणजे भारतातील मशीन ९९.९९९% अ‍ॅक्युरेट आहेत असे का म्हणू नये?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

दुसरे म्हणजे कुठेतरी असा मशीनमध्ये प्रश्न आला की तीच बातमी होते आणि वर्तमानपत्रे, चॅनेल्सवर दाखवली जाते. अशा पूर्ण देशात १० केंद्रावरील बातम्या बघून मशीन हॅक झाली आहेत असे नक्कीच म्हणता येणार नाही. कारण ९९.९९९% केंद्रांमध्ये मशीन व्यवस्थित काम करत असतात त्याची बातमी होत नाही. दररोज हजारो विमाने इकडून तिकडे जात असतात- मुंबई (किंवा कोणत्याही) विमानतळावर अमुक एक विमान लँड झाले, तमुक विमानाचे उड्डाण झाले अशा बातम्या येत नाहीत. पण एखादे विमान पडले तरच त्याची बातमी होते. ८-१० ठिकाणी मशीनमध्ये प्रश्न आले म्हणून सगळ्या देशातील मशीन बोगस आहेत असे म्हणणार्‍या लोकांना बघून एक प्रश्न पडतो- एखादे विमान पडल्याची बातमी आल्यावर सगळीकडची विमाने सर्वत्र पडतच असतात आणि कोणतेच विमान योग्य प्रकारे उडून आपल्या गंतव्य स्थानी उतरतच नाही असे या लोकांना वाटत असते का?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

गंम्मत अशी आहे की ईवीएम ला झोडपणारी मंडळी, भारतातले व अमेरिकेतली ईवीएम कशी काम करतात. त्या दोघांमधला मुलभुत फरक काय आहे ह्या गोष्टी कडे जाणुन बुजुन दुर्लक्ष करतात. किंवा बहुतेक ह्या गोष्टी त्यांना माहीतच नसतात. केवळ ईवीएम ह्या नामसाधर्म्यामुळे तिकडची ईवीएम हॅक करता येत असतील तर आपलीही ईवीएम हॅक होतात हा त्यांचा युक्तीवाद असतो. तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी ते हा दुराग्रह सोडणार नाहीत.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

ईव्हीएम हॅक करता येते तर ते करून दाखवा असे आव्हान निवडणुक आयोगाने दोन-तीनदा दिले होते तिथे कोणी गेले पण नव्हते. निवडणूक आयोगाच्या टर्म एंड कंडिशन्स काय असतात ते पहा! भाजपलाजिंकवायला निवडणूक आयोग सज्जच असतो, ईव्हीएम वरील प्रश्नाना भाजप नेते उत्तर देतात तेव्हाच आयोग नी भाजपचे साटेलोटे कळते!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

तुमच्याकडे घरी कॅल्क्युलेटर असेलच. त्याला हात न लावता २ + २ = १७ करुन दाखवा बरे. जगातल्या सगळ्या टेक्नोलोजी (सॅटेलाईट, ५जी, ४ जी, वाय फाय, रेडियो सिग्नल वगेरे वगेरे) वापरा. बघा जमतय का.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

ईव्हीएम वरील प्रश्नाना भाजप नेते उत्तर देतात तेव्हाच आयोग नी भाजपचे साटेलोटे कळते!
सुशांतसिंग रजपूत आणि दिशा सलियान यांच्या संशयास्पद मृत्यूंचा परत तपास करावा अशी याचिका न्यायालयात दाखल केली गेल्यानंतर आदित्य ठाकरेंनी आपल्याला विचारल्याशिवाय कोणताही निकाल न्यायालयाने देऊ नये अशी 'इंटरव्हेन्शन पिटीशन' दाखल केली होती तेव्हाच चोराच्या मनात चांदणे होते हे कळते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

तरीही मशीन हॅक करता येऊ शकते असा कोणाचा दावा असेल तर ती करून दाखवावी. फर्मवेअर ही अशी गोष्ट आहे की इथे सोप्या भाषेत मला समजावता येणार नाही. सर्व इव्हीएम मशिन्स्वर एकच फर्मवेअरची आवृत्ती आहे, हे मला जर कुणी पटवून दिले तर, तसेच फर्मवेअरचे मॅनिप्युलेशन कसे केले जाते हे कॅननसारख्या कंपनीच्या कॅमे-यामध्ये मी बघितले (आणि थोडेफार वापरले असल्याने) वरील युक्तीवादाला माझ्यादृष्टीने वैयक्तिक पातळीवर उतरून गप्प बसविण्याचा प्रयत्न असे मी म्हणेन. इव्हीएम तांत्रिकदृष्ट्या कॅमेर्‍यापेक्षा कमी गुंतागुतीचे आहे, त्यामुळे तार्कीक पातळीवर संशयाला खूप जागा आहे. फर्मवेअर मध्ये गडबड करणे फार अवघड नाही...

In reply to by युयुत्सु

जो काही संशय असेल तो सिद्ध करून दाखवा. निवडणूक आयोगाने संधी दिली होती, परंतु आरोप करणाऱ्या कोणीही ते आव्हान स्वीकारले नाही. मतयंत्राचा वापर थांबवावा यासाठी काही जण सर्वोच्च न्यायालयात गेले होते. परंतु त्यासाठी कोणतेही सबळ कारण, सबळ पुरावे देता आले नव्हते. तुलसी गबार्डसारख्या कोणाचीही विधाने हा कोणत्याही न्यायै पुरावा मानला जात नाही. अगदी तार्किकदृष्ट्या विचार केला तरी मतयंत्रात गडबड खरू शकणाऱ्यांनी २०२४ लोकसभा निवडणुकीत व इतर अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत अशी गडबड न करता स्वतःची अडचण स्वतःच करून घेतली हे तार्किकदृष्ट्या पटत नाही. सर्वोच्च न्यायालयाने सर्व बाजू ऐकून घेऊन मतयंत्रात गडबड.करता येते व गडबड करून भाजप निवडणूक जिंकला हे आरोप नाकारले. ज्यांना मतयंत्रावर संशय आहे त्यांनी अजूनही आपले आरोप सिद्ध करण्यास.प्रयत्न करावे. तसेच DRE Voting Machine म्हणजे काय व ते कोठे उपयोगात आणतात हे समजून घ्यावे.

In reply to by युयुत्सु

त्यामुळे तार्कीक पातळीवर संशयाला खूप जागा आहे. फर्मवेअर मध्ये गडबड करणे फार अवघड नाही... संशय घ्या, पण कधीतरी सिद्ध करून दाखविण्याचा प्रयत्न करा. हे सिद्ध करणे आजवर कोणासही शक्य झाले नाही. गडबड करणे फार अवघड नाही हे बोलणे सोपे आहे. किती वर्षे असा संशय घेऊन बडबड करणार? अशी गडबड करून दाखविण्याचा प्रयत्न करा.

In reply to by विवेकपटाईत

भारतात अराजकता पसरवून भारताचे तुकडे करणे जे सीआयएचे अनेक दशकांपासूनचे उद्दीष्ट आहे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी परकीय शक्तींवर संशय घ्यायच्या ती हीच का?

मी बोललेलो ना? पुढचा आठवडा “माई दी ग्रेट” गाजवणार! भक्तांना उभे सोलून काढतेय माई! कीप इट अप माई!

भारत एवजी पाकिस्तान मध्ये पाठविले असते राणा साहेब आज्ञातांच्या हस्ते केंव्हाच स्वर्गीय झाले असते. आता किमान दहा पंधरा वर्ष फ्रिची बिर्याणी खातील.

EVM हॅक करता येते ह्या वर विश्वास ठेवणे हा विरोधकांसाठी अतिशय सोपा मार्ग आहे. राहुल गांधी हे अतिशय अकार्यक्षम नेते आहेत असा आरोप करणे आणि त्याच्यावर चर्चा करणे हे विरोधक आणि काँग्रेजनांसाठी शक्य नाही. मग EVM वर आरोप केला की थोडावेळ तरी मानसिक समाधान तर मिळत असेल.त्यामुळे जो पर्यंत सत्तेत येत नाही तो पर्यंत EVM विरोध ते करत बसतील. एकदा सत्ता पलटली की सध्या EVM चे समर्थन करणारेही विरोध करू लागतील.

In reply to by रात्रीचे चांदणे

एकदा सत्ता पलटली की बऱ्याच गोष्टी आपोआप बदलतील हो.... "रात्रीचे चांदणे" हे "दिवसाचे कवडसे" होईल... हिंदू मोकळा श्वास घेऊ शकणार नाही... महागाई खुपच वाढलीय नै, पेट्रोल पहा किती वाढले, जॉब्स नाही, चीन किती आत घुसलाय याची जाणीव होईल... बरंच काही होईल... आता शांत असलेले थेरडे अचानक जागे होतील... बरंच काही होईल....

In reply to by रात्रीचे चांदणे

उबाठा गट रालोआत असता तर . . . - हिंमत असेल तर मतयंत्रात गडबड करून आम्ही जिंकलो हे सिद्ध करा: संरा - मर्दाची औलाद असाल तर आम्ही मतयंत्र हॅक करून दाखवा: उठा - मेल्या आईचे दूध प्यायले नसेल तर आम्ही मतयंत्रातील मते बदलली याचे पुरावे द्या: आठा - मतयंत्रात गडबड केली हा आमच्यावर केलेला आरोप हा महाराष्ट्रद्रोह आहे, हा महाराष्ट्राचा आणि मराठी माणसांचा अपमान आहे.: सुअं

निवड्नुकीच्या काळात एक अमेरिकन मराठी तज्ञ देशपांडे युट्युबवर येत होते. त्यांनीही ईव्हीएम हॅक करता येऊ शकते असे सांगितले. पण मग तसे असेल तर लोकांसमोर हॅक करून दाखवायला काय हरकत आहे? धरुन चालुया की ई.व्ही.एम हॅक करता येते. निवड्णुक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार- There are 10.5 lakh polling stations in all constituencies with 1.5 crore polling officials. Over 55 lakh EVMs will be deployed in the upcoming Lok Sabha elections. आधी ठरवावे लागेल की किती ई.व्ही.एमस हॅक करायची, ती ई.व्ही.एम्स कोणत्या मतदारसंघात पाठवायची.. ह्या सगळ्यांचे व्यवस्थित हॅकिंग करावे लागेल.हे सगळे मॅनेज करण्यासाठी शेकड्यात लोक लागतील. ५/१० लोकांचे हे काम नाही. निवड्णुक आयोगाचे स्वतःचे पूर्णवेळ कर्मचारी नसतात. त्यामुळे हे काम खूपच धोक्याचे आहे. India’s EVM is a standalone device not connected to any network. control unit is key: it stores data and contains the programme that controls the EVM’s functioning. This programme is fused into a micro-chip that can be neither altered nor overwritten. To transfer votes to a particular candidate, it is necessary for the EVM’s programme to identify the favoured candidate’s serial number. Now, the order in which candidates appear on the ballot paper depends upon nominations filed and found valid and this cannot be predicted in advance before the list of contesting candidates is actually drawn up. So, highly improbable. https://www.indiatvnews.com/news/india/lok-sabha-elections-2024-numbers…

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

मी इव्हीएमचे युद्ध चालू असताना रोज लक्ष ठेऊन होतो. तेव्हा असे लक्षात आले की वादीपक्षाने जेव्हा निवडणुक आयोगाशी जेव्हाजेव्हा संपर्क साधला तेव्हा निवडणूक आयोगाने भेटच नाकारली. मुख्य म्हणजे यावर निवडणूक आयोगाने कसलाही खुलासा केला नाही. जेव्हा पारदर्शकता नसते, तेव्हा कुणालाचाही संशय बळावतो.

In reply to by युयुत्सु


In reply to by श्रीगुरुजी

मी बोलतोय २०२४ मधल्या घटनाक्रमाबद्दल आणि तुम्ही दिलेल्या दुव्यावरचे निवेदन २०१७ मधले आहे. बाकी सतत दिशाभूल करत राहणं हा बलाबुद्धी अंध समर्थकांचा फोर्टे आणि मोडस ओपरॅण्डी असल्याने मी आता शक्य तेव्हढा तुम्हाला फाट्यावर मारायचा प्रय्त्न करेन.

In reply to by युयुत्सु

मी २०१७ मध्ये मॅट्रिकच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालो. गुणांच्या पुनर्मोजणीतही माझे गुण तेच राहिले. पुनर्परीक्षेतही मी अनुत्तीर्ण झालो. नंतर पुनर्परीक्षेच्या पुनर्तपासणीतही गुण तेच राहिले. मग मी शिक्षण मंडळाने दिलेल्या निकालाला न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयानेही मंडळाचा निकाल कायम ठेवला. मग मी २०२४ मध्ये मंडळाच्या अधिकाऱ्यांना माझ्या निकालासंदर्भात भेटायचे ठरविले. पण ते भेटत नाहीत. केवढा अन्याय हा माझ्यावर. माझा निकाल खोटा देऊन माझे नुकसान केले. माणसाने किती गाढवपणा करावा याला काहीच मर्यादा नाही का?

In reply to by श्रीगुरुजी

गुरुजी कुठे या द्वेषांध लोकांच्या नादाला लागताय? पादलात तर का पादलात ? आणि नाही पादलात तर का नाही पादलात ? असं विचारणारी काही "अर्धवट" आणि काही "दीड शहाणी" माणसं आहेत हि.

In reply to by सुबोध खरे

"अर्धवट" आणि काही "दीड शहाणी" माणसं माणसे "अर्धवट" आणि काही "दीड शहाणी" एकाच वेळेला असतात हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा "अर्धवट" = "दीड शहाणी" असेल तर म्हणजेच १/२ = ३/२ असेल तर म्हणजेच १ = ३ असेल तर!!!! आता हे गणित्/तर्कशास्त्र ए०एफ०एम्०सी० मध्ये शिकवतात का असा प्रश्न पडला आहे. तसं असेल चिंतेचा विषय आहे.

In reply to by युयुत्सु

काही "अर्धवट" आणि काही "दीड शहाणी" माणसं अ रे रे मूलभूत मराठी सुद्धा येत नाही. "गणित्/तर्कशास्त्र ए०एफ०एम्०सी० मध्ये शिकवतात का असा प्रश्न पडला आहे." मेडिकल कॉलेजात गणित किंवा तर्कशास्त्र विषय अभ्यासक्रमात नसतो इतकीही मूलभूत माहिती आपल्याला नसावी हेही एक आश्चर्य. सर्वज्ञ म्हणवून घेत असताना इतक्या मूलभूत चूका? कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आपला ?

In reply to by युयुत्सु

भारतीय निवडणूक आयोग ही अतिशयत भ्रष्ट संस्था झालीय, भाजपला जिंकवण्यासाठी ईव्हीएम हॅकिंग, ते निवडणुका न घेणे, मोदीना फिरत येईल अश्या सोयीने निवडणुका घेणे, विरोधकांव्य प्रश्नांना उत्तरे ना देणे असे अनेक गैरप्रकार निवडणूक आयोग करतोय! ही सडकी यंत्रणा आहे तो पर्यंत भाजपच जिंकणार!

सुप्रीम कोर्टाने या केसचा निक्काल लावला तेव्हा "कुठे तरी विश्वास ठेवायला हवा" असा काहीसा असहायतेचा सूर आळवल्याचे स्मरते. असहायता कसली तर परत मतपेटीकडे जाण्यामधली... "कुठे तरी विश्वास ठेवायला हवा" हे शब्द बरेच सांगून जातात.

In reply to by युयुत्सु

सरकारी आकडेवारीनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ९.५४ कोटी आहे तर मतदारांची संख्या ९.७ कोटी आहे. ह्या चमत्कारावर निवडणूक आयोग गप्प का? इथे ओशाळली पारदर्शकता.

In reply to by युयुत्सु

का हो युयुत्सु आय.आय.टी वाले ना तुम्ही? दुसर्‍या कोणी काहीही फेकले तरी कसलीही पडताळणी न करता त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवायचा हे तुमच्या आय.आय.टीत शिकवतात वाटते? एखादा माणूस जितक्या जास्त आणि जितक्या नावाजलेल्या शिक्षणसंस्थेतून शिकलेला असतो तितका तो वायझेड असायची शक्यता जास्त असते हे माझे मत युयुत्सुंसारख्यांना बघून अधिकाधिक पक्के होत जाते :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

श्री ० चंद्रसूर्यकुमार तुम्हाला "आय.आय.टी वाले" समजायची शक्यता सूतराम नाही! तेव्हा निश्चिंत असा... मला "इथे ओशाळली पारदर्शकता" या विधानातली "कल्पकता" आवडली, त्याला मी दाद दिली. पण तुम्हाला ते समजावं ही माझी अपेक्षा नाही.

In reply to by युयुत्सु

तुम्हाला "आय.आय.टी वाले" समजायची शक्यता सूतराम नाही! तेव्हा निश्चिंत असा...
अचं? तुमच्या आय.आय.टी मधल्या अनेकांनाही प्रवेश मिळत नाही अशा संस्थेतील- आय.आय.एम मधील मी आहे तेव्हा मला काय आणि कोण समजायची शक्यता आहे किंवा नाही असल्या भानगडीत तुम्ही नाक न खुपसलेले बरे. निवेदनः असला उगीच अ‍ॅटिट्यूड दाखवायला मला आवडत नाही. पण समोर अर्ध्या हळकुंडाने पिवळा झालेला कोणी वायझेड आला तर त्याला समजेल अशाच शब्दात उत्तर द्यावे लागते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

"आय.आय.टी वाले" वाय-झेड इ० शब्दप्रयोग तुम्ही केलेत. मी फक्त कल्पकता आवडल्याने हसलो. त्यात काही अ‍ॅटीट्यूड असेल तर असो... काही बिघडत नाही. मी आजकाल थयथयाट करणार्‍या लोकांकडे शक्य तेव्हढ्या करूणेने/दयाबुद्धीने बघायचा प्रयत्न करतो.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

एखादा माणूस जितक्या जास्त आणि जितक्या नावाजलेल्या शिक्षणसंस्थेतून शिकलेला असतो तितका तो वायझेड असायची शक्यता जास्त असते हे माझे मत अणि अचं? तुमच्या आय.आय.टी मधल्या अनेकांनाही प्रवेश मिळत नाही अशा संस्थेतील- आय.आय.एम मधील मी आहे तेव्हा मला काय आणि कोण समजायची शक्यता आहे पटलं पटलं.

In reply to by आग्या१९९०

ऑन टोटली अनरिलेटेड सब्जेक्ट ... मला काही लोकं माहिती आहेत .. गट १. जे नावाजलेल्या संस्थेतून जसं कि आय आय एम बंगळुरू मधून पार्ट टाइम , एक्झेक्टिव्ह , दूरस्थ किंवा अश्याच टाईपचा कोर्स करून बाहेर जगात मिरवतात ... गट २. जे अनेक नावाजलेल्या संस्थेतून देशातून परदेशातून अनेक कोर्स करतात आणि भारतात येऊन एखाद्या बँकेत किंवा संस्थेत बिझनेस अनॅलिस्ट वैगेरे छापाच्या सुमार नोकऱ्या करताना आढळतात ...ते बाहेर जगात मिरवतात ... देशाची आर्थिक धोरण ठरवतात ...कँटीन मधील सामोसा खात खात ... गट ३. जे जे नावाजलेल्या संस्थेतून पदवी घेतल्याचा दावा छातीठोक पणे करतात ... विस्मृती पुराणी आणि इंटरनॅश्नल डंकापती मोती ...

In reply to by आंद्रे वडापाव

जे अनेक नावाजलेल्या संस्थेतून देशातून परदेशातून अनेक कोर्स करतात आणि भारतात येऊन एखाद्या बँकेत किंवा संस्थेत बिझनेस अनॅलिस्ट वैगेरे छापाच्या सुमार नोकऱ्या करताना आढळतात ...ते बाहेर जगात मिरवतात ... देशाची आर्थिक धोरण ठरवतात . एकतर बँक म्हणजे सरकारमान्य पॉन्झी प्रकार आहे. आपले पैसे भारतातील एकही बँक १००% सुरक्षीत ठेऊ शकत नाही. पॉन्झी असल्यामुळे १००% ग्राहकांनी एकाच वेळी बँकेतील आपले १००% पैसे मागितले तर देऊ शकत नाही. कितीही हुशार अर्थतज्ज्ञ असले तरी तो काहीही करू शकणार नाही. खरं तर बँकेत फार हुशार लोकांची गरज नाहीये. गरज आहे कर्ज वसूल करणाऱ्या लोकांची. माझा एक मामेभाऊ बीकॉम पदवीधर, सरकारी बँकेची नोकरी लाथाडून मायक्रोफायनान्स कंपनीत कामाला आहे. कर्जवाटप करून ते वसूल करण्याची धमक असल्याने कंपनी त्याला एखाद्या आयटी इंजिनिअरला लाजवेल असा पगार देते. जगभर प्रवास करतो कंपनीच्या खर्चाने. वसुली खात्रीने होत असल्याने कंपनीचा नफाही जबरदस्त आहे. मोठ्या बँका अल्पउत्पन्न गटाला कर्ज देताना खूप त्रास देतात, बिचारा हाच वर्ग कर्ज घाबरून का होईना फेडतात. गर्भश्रीमंत बँकेचे पैसे बुडवून परदेशात पसार होतात, मग सरकार बसते त्या त्या देशाशी वाटाघाटी करत. लठ्ठ पगार घेणारे मठ्ठ बसतात विश्लेषण करत.

In reply to by युयुत्सु

सरकारी आकडेवारीनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ९.५४ कोटी आहे तर मतदारांची संख्या ९.७ कोटी आहे. प्रौढ लोकसंख्या म्हणायचे होते. चूक झाली. https://www.google.com/amp/s/timesofindia.indiatimes.com/india/total-el…

In reply to by रात्रीचे चांदणे

मग कोणी दावा करायला हवा होता? भारतीय काँग्रेसने दावा केला म्हणून तो चुकीचा ठरतो का?

In reply to by आग्या१९९०

भारतीय काँग्रेसने दावा केला म्हणून तो चुकीचा ठरतो का?
भारतीय काँग्रेसने दावा केला म्हणून तो बरोबर ठरतो का?

In reply to by आग्या१९९०

काँग्रेसने दावा केला म्हणून तो नक्कीच चुकीचा ठरत नाही पण विश्वासही बसत नाही. Adult लोकसंख्येपेक्षा जास्त मतदान झाले असेल तर काँगेसने कोर्टात गेल पाहिजे, लोकात गेल पाहिजे. लोकांना पटवून द्यायला पाहिजे.

In reply to by रात्रीचे चांदणे

Adult लोकसंख्येपेक्षा जास्त मतदान झाले असेल तर काँगेसने कोर्टात गेल पाहिजे, लोकात गेल पाहिजे. लोकांना पटवून द्यायला पाहिजे.
काँग्रेसवाले असे करायची शक्यता फारच थोडी कारण कोर्टात गेल्यास तिथे थोबाड फोडून घ्यावे लागेल याची त्यांनाही खात्री असावी. काँग्रेसने अशा कामासाठी यशवंत सिन्हा, अरूण शोरी असले बाहेरचे पाळीव नेते ठेवावेत. राफेल प्रकरणी रागा भरपूर बडबड करत होता पण कोर्टात गेला नाही. तिथे बेगानी शादी मे दिवाना व्हायला गेले यशवंत सिन्हा आणि अरूण शोरी. तिथे दोघांचेही थोबाड फुटले होते. २०२४ मध्ये मतदान ९.७० कोटी झालेले नाही तर एकूण मतदार तितके होते त्यापैकी मतदान ६.४१ कोटी इतके झाले. काँग्रेसनेच म्हटल्याप्रमाणे नोव्हेंबर २०१९ मधील National Commission on Population of the health and family welfare च्या अहवालाप्रमाणे महाराष्ट्रातील १८+ वयातील लोकांची (अ‍ॅडल्ट) संख्या ९.५ कोटी होती. https://timesofindia.indiatimes.com/india/total-eligible-voters-in-maha… . तो अहवाल नोव्हेंबर २०१९ मधील आहे. आकडे तेव्हाचेच असतील असे नाही. तरीही सोयीसाठी ते आकडे नोव्हेंबर २०१९ मधील आहेत असे धरले आणि दरवर्षी दीड टक्का वाढ जरी धरली तरी तो आकडा नोव्हेंबर २०१९ मधील ९.५ कोटीवरून नोव्हेंबर २०२४ मध्ये १०.२३ कोटी इतका होईल. दरवर्षी दीड टक्का वाढ २००१ ते २०११ मधील होती. नंतरच्या काळात दरवर्षीची वाढ त्याहून कमी- समजा सव्वा टक्का इतकी धरली तरी तो आकडा ९.५ कोटीवरून ९.९८ कोटी इतका होईल. त्यापैकी ९.७० कोटी लोक मतदारयादीत असणे इतके अशक्य आहे का? दुसरे म्हणजे मतदारयाद्यांमधील मृत मतदारांची, इतर ठिकाणी गेलेल्या मतदारांची वगैरे नावे लगोलग दरवेळेस काढली जातातच असे आहे का? म्हणजे समजा महाराष्ट्राची अ‍ॅडल्ट लोकसंख्या ९.९८ कोटी असेल तरी एकूण मतदारांसाठीचा बेस त्याहून जास्त असेल ही पण शक्यता नाही का? पण कसे असते काँग्रेसवाल्यांनी किंवा उबाठावाल्यांनी कसलेही शेंडाबुडखा नसलेले दावे केले तरी ते प्रत्यक्ष भगवंताच्या मुखकमलातून आलेले सत्यवचन आहे असे सगळ्यांनी समजावे अशी इथल्या काहींची अपेक्षा असते. आता ही आकडेवारी बघून ते लोक पळून जातील ही शक्यता मोठी कारण साध्या पाकिटामागच्या (बॅक ऑफ द एनव्हलोप) आकडेवारीचे उत्तर द्यायला त्यांच्याकडे काही नाही. असले लोक कोर्टात जातील असे वाटते?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

एकवेळ भाजपला होणारा विरोध समजू शकतो पण त्यासाठी काँग्रेस सारख्या पक्षांवर आंधळेपणाने विश्वास ठेवणे तोंडघशी पडू शकते.

In reply to by रात्रीचे चांदणे

काँग्रेसने दावा केला म्हणून तो नक्कीच चुकीचा ठरत नाही पण विश्वासही बसत नाही. Election commission ने काँग्रेसच्या दाव्यातील हवा काढून टाकावी. सुप्रीम कोर्ट ही पुढची पायरी असते.