Skip to main content

ताज्या घडामोडी । एप्रिल २०२५ । चैत्र १९४७

लेखक वामन देशमुख यांनी मंगळवार, 01/04/2025 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपाखरांना नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! हे वर्ष सर्वांना सुख, समाधान, समृद्धीचे जावो ही श्रीचरणी प्रार्थना. भूकंपाने म्यानमारचे प्रचंड नुकसान झालेलं आहे. ऑपरेशन ब्रह्मा द्वारे भारत शक्य ती मदत करत आहे. महामार्गांवरील टोल हा वाहनचालकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. आजपासून टोल कुठे वाढलाय तर तुरळक कुठे कमी देखील झालाय! ट्रम्प च्या टॅरिफ मुळे जगभरातील बाजार सध्या दोलायमान अवस्थेत आहेत. राजकीय आघाडीवर, या वर्षी बिहारात विधानसभा निवडणुका होत आहेत. दिल्ली जिंकल्यामुळे भाजप जोमात आहे आणि त्यांनी बिहार विधानसभा निवडणुकीकडे लक्ष केंद्रित केले आहे. 'फिर से नितीश' हा एनडीए चा नारा आहे. तर आम्ही इंडीया ब्लॉक म्हणून लढू; मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याचा निर्णय हा "सामूहिक निर्णय" असेल.असे काँग्रेसने म्हटले आहे. --- नवीन वर्षात व्यासंगी, विद्वान, अभ्यासू, प्रामाणिक मिपाखरांना लेखन-चर्चन करण्याचे पोषक वातावरण आणि म्हणून प्रेरणा मिळेल ही अपेक्षा. - द्येस्मुक् राव्

वाचने 37839
प्रतिक्रिया 341

प्रतिक्रिया

In reply to by आंद्रे वडापाव

आपण तर बुवा सरकारचे डोके खातो आणि परकीय चलन वाचवतो. तरीसुद्धा भक्तांना आमचे कौतुक वाटत नाही. उलट अंगावर धावून येतात.

In reply to by आग्या१९९०

मग काय करावं त्यांनी?? एकतर दुर्मिळ गोष्टींचे आपण भक्षण करता... चिडचिड तर होणार नं त्यांची....

आमटी भाकरी खाऊन उन्हात फिरणारा गुराखी आणि व्हेज प्रोटिन खाऊन दांडगा झालेला मनुष्य यांच्यात कुस्ती झाली तर कोण भारी पडेल? मागे एकदा एका महाराजांचे चरित्र वाचले होते. लेले महाराज म्हणून त्यांना लोक पुढे ओळखू लागले. तरुण असतांना ते कुस्ती शिकवत असत. एकदा त्यांच्या आईने उसाचा रस आणून दे सांगितले तर ते उस घेऊन आले. आई म्हणाली "अरे मला आता दात आहेत का ऊस सोलून खायला?" तर हे म्हणाले तुला रस पाहिजे ना म्हणून ऊस आणलाय. मग त्यांनी हातांनीच ऊस पिळून लगेच ताजा रस काढून दिला.

In reply to by श्रीगुरुजी

ती सर्वांना परवडणाऱ्या दरात सहज उपलब्ध असतील असे नाही. त्यामुळे गैरशाकाहारातून ती भागवली जाते. डासाची मादी संधी मिळाल्यास रक्तातून प्रोटीनची गरज भागवते.

In reply to by आग्या१९९०

"ती सर्वांना परवडणाऱ्या दरात सहज उपलब्ध असतील असे नाही. त्यामुळे गैरशाकाहारातून ती भागवली जाते. डासाची मादी संधी मिळाल्यास रक्तातून प्रोटीनची गरज भागवते." मूलभूत गैरसमज. चिकन मध्ये २७ ग्राम प्रथिनेअसतात आणि त्याची किंमत साधारण २०० रुपये किलो आहे. Pulses like lentils, chickpeas, black beans, and peas are excellent plant-based protein sources, typically containing 21-25% protein by dry weight, सोयाबीन मध्ये ३६% प्रथिने असतात. यांची किंमत साधारण ६० ते १०० रुपये किलो आहे. ७४ रुपये लिटर असेलल्या अमूल म्हशी च्या १ लिटर दुधात ५० ग्राम प्रथिने असतात. थोडा फार फेरफार केला तरी शाकाहारी आहारातील प्रथिने जास्त स्वस्त असतात. जगातील सर्वात बलाढ्य तीन प्राणी घेतले तर ते पूर्ण शाकाहारी आहेत. उदा हत्ती गेंडा आणि रानरेडा. मर्कट गटातील सर्वात शक्तीशाली असलेले गोरिला सुद्धा पूर्ण शाकाहारी आहेत. मांसाहार हा जास्त शक्तिदायक असतो हा गैरसमज मुघल आणि नंतर इंग्रज राज्यकर्त्यानी एतद्देशीय लोकांच्या मनात न्यूनगंड निर्माण करण्यासाठी मुद्दाम पसरवलेला आहे आणि त्यांची पिलावळ आजही हा गैरसमज पसरवताना आढळते. कोणी काय खावे हा माझ्या दृष्टीने गौण आणि वैयक्तिक मुद्द्दा आहे आणि गोमांस खाण्यावर बंदी आणावी असेही मला वाटत नाही. परंतु मांसाहार हा जास्त पौष्टिक आणि चांगला असतो हा मुद्दाम पस्रवलेला गैरसमज आहे.

In reply to by सुबोध खरे

ती सर्वांना परवडणाऱ्या दरात सहज उपलब्ध असतील असे नाही. दुर्गम भागात महागड्या डाळी आर्थिक परिस्थितीमुळे परवडत नाही, त्यामुळे गाई, शेळीपालन, परसातील कुक्कुटपालन, आणि वराहपालन केले जाते. ह्यात हे पाळीव पक्षीप्राणी आजुबाजूच्या जंगलातून, परिसरातून आपले खाद्य मिळवतात. त्यामुळे रोज मिळणारे दुध आणि अंडी ह्यातून प्रोटीनची गरज भागवली जाते. डुक्कर आणि कोंबड्याच्या मांसातूनही प्रोटीन उपलब्ध होते तेही डाळींच्या तुलनेत कमी खर्चात . बाकी कुठले प्रोटीन शरीराल योग्य हे शरीरच ठरवेल.

In reply to by आग्या१९९०

ती सर्वांना परवडणाऱ्या दरात सहज उपलब्ध असतील असे नाही. शाब्दिक कोलांट्या कितीही मारा दुर्गम भागात महागड्या डाळी आर्थिक परिस्थितीमुळे परवडत नाही. हे आपण कसं ठरवलं? आरामखुर्चीत बसून टंकलेखन केलं कि असा होतंय. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात लोक मोठ्या प्रमाणात शाकाहारी आहेत. आणि तेथे अत्यंत दुर्गम भागात सुद्धा भट (सोयाबीन) गेहट ( कुळीथ ) आणि अनेक तर्हेचे राजमा या डाळी मोठ्या प्रमाणात पिकवल्या आणि खाल्या जातात. ते दुसऱ्या महागड्या डाळी कशाला विकत घ्यायला जातील? तेथे ७५ % लोक मांसाहारी आहेत. परंतु रोजच्या भोजनात डाळींचाच मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. रागी किंवा नाचणी यात १३ टक्के प्रथिने असतात. ती आणि एखादे वरील कडधान्य हे रोजच्या जेवणात असतं आणि मांसाहार मधून मधून प्रसंगानुरूप केला जातो. बाकी कुठले प्रोटीन शरीराला योग्य हे शरीरच ठरवेल. शरीर कसं काय ठरवणार? प्रथिनांचा उत्तम स्रोत म्हणून कीटक सुद्धा खाता येतात. They’re Healthy. They’re Sustainable. So Why Don’t Humans Eat More Bugs? https://time.com/5942290/eat-insects-save-planet/ आपण खातो का? कारण आपल्याला हि कल्पनासुद्धा सहन होत नाही. थायलंड व्हिएतनाम इ आशियाई देशात भाजलेले उंदीर, टोळ नाकतोडे, बीटल्स सारखे कीटक आणि अळ्या , बेडूक सर्प सुद्धा रस्त्यावर विकायला ठेवलेले असतात. त्याच्या कडे पाहून आपल्याला किळस येते. कोण काय खातं हे ज्याच्या त्याच्या सामाजिकआणि वैचारिक स्थिती आणि समजुतीवर अवलंबून असतं.

In reply to by सुबोध खरे

शाब्दिक कोलांट्या कितीही मारा घाईघाईत प्रतिसाद देण्यापूर्वी समोरच्याने काय लिहिले हे नीट वाचत चला. चूक दाखवली की उसळता हे नेहमीचेच आहे. हे आपण कसं ठरवलं? मी आरामखुर्चीत बसून तुमच्यासारखे गुगल करून अर्धवट माहिती मिळवत नाही . माझा प्रत्यक्ष समाजवावराचा आवाका आणि अभ्यास तुमच्यापेक्षा अधिक आहे. त्यामुळे आर्थिक घटकाचा उल्लेख केला. तुम्हाला योग्य प्रतिवाद करता आला नाही म्हणून संतापला. प्रथिनांचा उत्तम स्रोत म्हणून कीटक सुद्धा खाता येतात. आजही ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागात आठवडे बाजारात मुंग्यांच्या ( मोठ्या लाल मुंग्या ) अंड्यांचे वाटे विकायला ठेवलेले असतात. पौष्टिक असतात ही अंडी. ह्याची चटणी मी खाल्ली आहे, खुप चवदार असते. अर्थात हे तुम्हाला माहित नसणारच.

In reply to by आग्या१९९०

मुंग्यांच्या अंड्यांची च टणी खाल्ली का आम्लेट करून खाल्लं हे मी कशाला पाहायला येऊ. मी भारतभर फिरलो आहे लष्करात नोकरी केल्यामुळे. ओरिसात गरिबीमुळे उंदीर खाणारी माणसं हि पहिली आहेत आणि दोन वेळचा लिट्टी चोखा आणि १८०० रुपये वर्षाला मिळणारे शेत मजूर बिहार मध्ये पहिले आहेत. तुमची आरामखुर्चीतील विचारवंत वृत्ती उघडी पडली म्हणून एवढे चिडून जायची गरज नाही

In reply to by सुबोध खरे

ओरिसात गरिबीमुळे उंदीर खाणारी माणसं हि पहिली आहेत शेवटी तुम्ही डोंगर पोखरून उंदीरच बाहेर काढला. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांना मांसाहार हा जवळजवळ फुकटच मिळत असल्याचा मी मांडलेल्या मुद्द्याला तुम्ही दुजोराच देत आहात. समोरचा काय मुद्दे मांडतोय ते नीट समजून घ्या. नसेल माहित तर गप्प बसा की, कशाला स्वतःचे हसे करून घेता? अवांतर ( तुमच्यासाठी नाही नाहीतर बसाल गुगल करत.) : ठाणे जिल्ह्यातील अनेक आदिवासी उंदीर खातात, त्यामुळे शेपटीला गोंडा असलेले उंदीर नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

In reply to by आग्या१९९०

आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांना मांसाहार हा जवळजवळ फुकटच मिळत असल्याचा काय पण शोध लावलाय? मग आपल्या संशोधनाप्रमाणे आर्थिक दृष्ट्या मागासलेले लोक कुपोषित असणारच नाहीत. मेळघाटातील आदिवासींमध्ये लठ्ठपणा ची समस्या हा अग्रलेख लिहाच तुम्ही. बाकी आतापर्यंत फक्त कोंढाणा उंदीर हे कमी झालेले आहेत. पण ते ठाणे जिल्ह्यात नसून सिंहगड पठारावर आहेत आदिवासींनी खाल्ल्यामुळे उंदीर कमी झाल्याचे प्रथमच ऐकतोय. अर्थात याचा काही दुवा मिळाला तर माझे ज्ञान वाढवण्यात मला आनंदच होईल उंदीर आणि झुरळ या प्रजाती अशा आहेत कि मानवाने जंग जंग पछाडले तरी ते नष्ट होणार नाहीत. अगदी अणुयुद्ध झाले तरी या दोन प्रजाती जिवंत राहतील. तेंव्हा ठाणे जिल्ह्यात आदिवासींनी खाल्ल्यामुळे उंदीर कमी झाल्याचा दुवा पाठवाच. मी आतुरतेने वाट पाहतोय.

In reply to by सुबोध खरे

काय पण शोध लावलाय? तुम्ही म्हणतात त्या ओरिसातील गरीब लोकं उंदीर विकत घेऊन खातात की काय? ठाणे जिल्ह्यातील शेतात, जंगलात जाऊन पकडून खातात ते पैसे कोणाला देतात? हेकेखोरपणा सोडा,हसू होतंय तुमचे. बाकी अवांतर तुमच्यासाठी नव्हतेच हे वाचले नाही का? नुसती घाई! एकाच प्रकारचे खाद्य कायम भरपूर खाल्ले तरी कुपोषण होते. त्यासाठी चौरस आहार महत्वाचा असतो. हे सांगण्यासाठी अग्रलेखाची गरज पडावी तुम्हाला? काही खरे नव्हे.

In reply to by आग्या१९९०

बाकी कुठले प्रोटीन शरीराल योग्य हे शरीरच ठरवेल. हे कसं ते तुम्ही सांगत नाही मी आरामखुर्चीत बसून तुमच्यासारखे गुगल करून अर्धवट माहिती मिळवत नाही . हे आपण कसं ठरवलं? माझा प्रत्यक्ष समाजवावराचा आवाका आणि अभ्यास तुमच्यापेक्षा अधिक आहे. हे नक्कीच असू शकतं पण म्हणून सत्य बदलत नाही. ठाणे जिल्ह्यातील अनेक आदिवासी उंदीर खातात, त्यामुळे शेपटीला गोंडा असलेले उंदीर नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. याबद्दल पुरावा विचारला तो तुम्ही देत नाही. एकाच प्रकारचे खाद्य कायम भरपूर खाल्ले तरी कुपोषण होते. त्यासाठी चौरस आहार महत्वाचा असतो. हे सांगण्यासाठी अग्रलेखाची गरज पडावी तुम्हाला? काही खरे नव्हे. अग्रलेख तुम्ही लिहिणार का? बाकी चौरस आहार म्हणजे काय हे आम्हाला वैद्यकीय शिक्षणात कायमच शिकवलं जातं पण तुम्ही अग्रलेख लिहून अधिक शिकवणारा असलात तर ते शिकण्याची माझी नक्कीच तयारी आहे. लिहाच अग्रलेख. त्याने माझ्यासारखे अनेक विद्यार्थी उपकृत होतील.

In reply to by सुबोध खरे

खाली १०० ग्रॅममधील प्रथिनाचे प्रमाण सर्वाधिक ते सर्वात कमी अशा क्रमाने मराठीत दिले आहे: ⸻ प्रथिन प्रमाण – सर्वाधिक ते कमी (प्रत्येकी १०० ग्रॅममध्ये) क्रमांक अन्नपदार्थ प्रथिन (ग्रॅममध्ये) १ सोयाबीन (कच्चं) ३६ ग्रॅम २ व्हे प्रोटीन पावडर (आइसोलेट) ३०–९० ग्रॅम (ब्रँडनुसार बदलते) ३ चिकन ब्रेस्ट (शिजवलेले) ३१ ग्रॅम ४ गोमांस (लीन, शिजवलेले) २६–३१ ग्रॅम ५ मासे (ट्यूना / साल्मन) २५ ग्रॅम ६ कोळंबी २४ ग्रॅम ७ शेंगदाणे (भाजलेले) २५ ग्रॅम ८ चेडर चीज २५ ग्रॅम ९ टेम्पेह १९ ग्रॅम १० बोकडाचं मांस (लीन) २६ ग्रॅम ११ पनीर (घरगुती) १८ ग्रॅम १२ टोफू (फर्म) १० ग्रॅम १३ ग्रीक दही (लो फॅट) १० ग्रॅम १४ मसूर डाळ (शिजवलेली) ९ ग्रॅम १५ राजमा (शिजवलेले) ८.५ ग्रॅम १६ मुग / उडीद डाळ (शिजवलेली) ७–८ ग्रॅम १७ बदाम २१ ग्रॅम १८ काजू १८ ग्रॅम १९ दूध (गाईचं) ३.२ ग्रॅम २० अंडं (१ मोठं) ६ ग्रॅम सोयाबीन मध्ये जास्त प्रोटीन असले तरी ते जात प्रमाणत घेतले तर पुरुषांची छाती (mens boob) वाढतात.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

आता या प्रत्येक पदार्थाच्या १ किलोचा दर सुद्धा द्या बरं म्हणजे कोणती प्रथिने स्वस्त आहेत ते लक्षात येईल

In reply to by सुबोध खरे

1. सोयाबीन – ₹100/kg 2. शेंगदाणे – ₹120/kg 3. अंडी – ₹90 (15-16 अंडी, ~1kg) 4. राजमा / मसूर – ₹100/kg 5. चिकन ब्रेस्ट – ₹280/kg 6. टेम्पेह – ₹280/kg 7. पनीर – ₹320/kg 8. व्हे प्रोटीन (isolate) – ₹1200/kg 9. चेडर चीज – ₹550/kg 10. बदाम – ₹950/kg

In reply to by अमरेंद्र बाहुबली

राजम्यात २४ % प्रथिने असतात म्हणजेच १०० रुपयात २४० ग्राम प्रथिने येतील. सोयाबीन मध्ये ३६ % म्हणजेच १०० रुपयात ३६० ग्राम चिकन ब्रेस्ट मध्ये ३१ % प्रथिने म्हणजे २८० रुपयात ३१० ग्राम प्रथिने अंडी ९० रुपये किलो यात १०० ग्राम प्रथिने येतात. ( एका अंड्यात ६ ग्राम प्रथिने) यात गहू ज्वारी बाजरी रागी यातील प्रथिने आणि त्यांचा दर सुद्धा घ्या आणि हिशेब करून पहा.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

तुम्ही म्हणतात त्या ओरिसातील गरीब लोकं उंदीर विकत घेऊन खातात की काय? ह्याचे उत्तर कधी देणार?

In reply to by आग्या१९९०

तुम्ही म्हणतात त्या ओरिसातील गरीब लोकं उंदीर विकत घेऊन खातात की काय? माझं विधान "ओरिसात गरिबीमुळे उंदीर खाणारी माणसं हि पहिली आहेत." तुम्हाला साधं मराठीही येईनासं झालंय का ? किती ती जळजळ आणि चिडचिड?

In reply to by सुबोध खरे

अहो किती परस्परविरोधी विधाने करत आहात. स्वतःच्या मताशी प्रामाणिक रहावे माणसाने. मागचे प्रतिसाद नीट वाचा तेही न चिडता.

In reply to by श्रीगुरुजी

"व्हेज प्रोटिन" नव्हे, व्हे (whey) प्रोटिन म्हणायचे होते. जिल्हा जाणारे वापरतात तसले. शाकाहारातील प्रथिने जरी अधिक असली तरी ती मनुष्यांस पचत नाहीत, प्राण्यांनाच पचतात. त्यामुळे डाळी किंवा उसळींचे पातळ पाणी ( रसम किंवा सारं )घेणे उचित.

In reply to by कंजूस

शाकाहारातील प्रथिने जरी अधिक असली तरी ती मनुष्यांस पचत नाहीत असत्य आणि गैरसमजावर आधारित विधान. मग सर्वच शाकाहारी मानव कुपोषित राहायला पाहिजे. शाकाहारी प्रथिने यात सर्वच्या सर्व अत्यावश्यक अमायनो आम्ले नसतात त्यामुळे ती प्रथिने परिपूर्ण नसतात. प्राणिजन्य प्रथिने यात सर्वच अत्यावश्यक अमायनो आम्ले असतात. म्हणूनच सहा महिने पर्यंत बालक केवळ आईच्या दुधावरच वाढू शकते. यासाठी तुम्हाला एक डाळ/ कडधान्य आणि एक तृणधान्य असा आहार घ्यावा लागतो म्हणजेच पोळी आणि उसळ किंवा ज्वारी/ बाजरीची भाकरी आणि डाळ/उसळ असे घेतल्यास कुपोषण होत नाही. आपले सर्वच राज्यातील पारंपरिक आहार हे शतकानुशतके असे दोन्ही पदार्थ असलेले आहेत.

प्रथिने अनेक शाकाहारी पदार्थात मोठ्या प्रमाणात असतात.> कृपया अशी सैल विधाने करू नयेत. साधारण पणे प्रत्येक माणसाची प्रथिनांची गरज शाकाहारातून भागविण्यासाठी किती डाळी खाव्या लागतील याचे आकडे पण द्यावेत.

In reply to by युयुत्सु

प्रथिनांचा प्रति ग्राम दर च्या आमच्या गेल्या वर्षभरातील लेखाची तुमच्या घरचा डाळ/कडधान्य/मांस/मासे/प्रोटीन मासिक खर्च किती? ह्यो जाहीरात. कोणतर येक्सेल स्प्रेडशीट बनवून आमच्या लेखापेक्षा अधिक सरस कायम अद्ययावत करता येणानारी चर्चा धागा टाकणाराय का कुणी ?

ट्रंम्प यांचे अनाकलनीय टॅरिफ धोरण अंमलबजावणी नंतर , अमेरिकेत हडकंप शेअर बाजारात ... आता ट्रम्प यांचे भक्त पण ट्रम्प वर तुटून पडलेत टीकेचा भडीमार करत आहेत ... मला तर वाटतंय ट्रम्प म्हणू पाहत आहे कि "सब चंगा सी" ... मला ५० दिवस द्या ... हे तात्पुरतं आहे ... अच्छे दिन अभी आयेंगे ... आठवतंय काही ? मला तर देजावु होतोय ... अनाकलनीय टॅरिफ धोरण = अनाकलनीय टॅरिफ नोटबंदी ??

In reply to by आंद्रे वडापाव

मोठा फरक आहे. ट्रम्पनी अचानक घोषणा केली नाही, विचार करण्यास मुदत दिली आणि कोणाला किती टॅरीफ लावणार हेही सांगितले होते. जो देश शून्य टॅरीफ लावेल त्याला ट्रम्प शून्य टॅरीफ लावणार . म्हणजे टॅरीफची घोषणा विचारपूर्वक घोषणा केली आहे. नोटाबंदीबाबत तसे म्हणता येणार नाही. सगळा सावळा गोंधळ.

आर्थिक मंदी यायची चिन्हे दिसत आहेत असे तज्ञ म्हणत आहेत. अच्युत गोडबोले ह्यांच्या मते ट्रम्प ह्यांच्या निर्णयाचा अनेक देशांवर परिणाम होणार आहे. आपले व्यापार विश्व जरी "काही विशेष फरक पडणार नाही. उलट् ही तर भारताला संधीच आहे"असे म्हणत असले तरी जे.पी.मॉर्गनच्या सी.ई.ओंचे मतही मंदीची शक्यतेचे आहे. US Tariffs Could Slow Growth, Spark Recession: JPMorgan CEO https://www.thehansindia.com/news/international/us-tariffs-could-slow-g… गोडबोले https://www.youtube.com/watch?v=A5FA0m5NyXI&t=2s

In reply to by श्रीगुरुजी

जरा चक्कर आली होती. कारण पियुष गोयल चक्क बोलायला लागले. Blame China, not Trump’: Piyush Goyal says 3 decades of malpractices helped Beijing to grow at the cost of nations like India https://m.economictimes.com/news/india/blame-china-not-trump-piyush-goy… धक्क्यातून सावरले की विचारुन सांगते.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

बापरे, काळजी घे. 'ह्यां'च्या नाकाला कांदा लाव किंवा कोल्हापुरी पायताण लाव किंवा न धुतलेले पायमोजे लाव किंवा मिरच्यांची धुरी दे. खाडकन शुद्धीवर येतील.

In reply to by श्रीगुरुजी

भारताला ह्या आयात शुल्क युद्धातून फायदा होईल असे त्यांचे म्हणणे पण नीट पावले उचलली तर. ते नोटाबंदी अर्थतज्ञ बोकील परत येणार नाहीत म्हणजे झाले.! असो. चीनने अमेरिकेवर ५०% अधिक आयात शुल्क लावले आहे. Beijing’s tariff hike brings the accumulative tariff total to 84% on goods from US, as trade war rapidly intensifies https://www.scmp.com/economy/china-economy/article/3305873/china-fires-… अमेरिकेचे वाणिज्य प्रतिनिधी:- भारताने अनेक वस्तुंवरील आयात शुल्क कमी करण्याचे मान्य केले आहे. https://www.youtube.com/watch?v=74YdtIQQsxM

In reply to by आंद्रे वडापाव

'उद्योगस्नेही' पवारांनी बाँबे क्लबच्या उद्योगपतींवर एके काळी टीका केली होती ह्यावर विश्वास बसत नाही.पवार राजकारणात आले(१९६७ पासुन धरुया..आमदार झाले तेव्हा) तेव्हा काँंग्रेसची सत्ता होती. १९७२ मध्ये पवार मंत्री झाले. त्यानंतर त्त्यांनी टीका करण्याचा प्रश्नच येत नाही. मग पवारांनी टीका केली कधी? कॉलेजच्या निवडणुकीच्या वेळी? कदाचित १९८० पासुन ते १९८६ पर्यंत ,पवार अज्ञातवासात होते, तेव्हा असेल तर माहित नाही. pawar

In reply to by श्रीगुरुजी

असंही ते बिल पांचट होते, मुस्लिमांचे नुकसान न करणारे हिंदूंचा फायदा न करणारे! योग्य तेच केले! ( सौगात इ मोदी कीट वाटणारे असताना खरेच ओवेसीची गरज काय?)

गेल्या काही वर्षातील सर्वात उचापतीखोर राज्यपाल कोण असे विचारले तर अग्रक्रमाने तामिळनाडूचे राज्यपाल रवी ह्यांचे नाव घ्यावे लागेल. ह्याना राज्यपाल म्हणायचे की भाज्य(प)पाल ते कळायला मार्ग नाही. मुळचे बिहारचे, आय पी एस अधिकारी. २०१२ मध्ये निवृत्ती. २०१४ मध्ये मोदी सरकारने सोय केली त्यामागे बिगर-भाजपा शासित राज्यांमध्ये काड्या करणे हाच उद्देश होता. २०१९ मध्ये नागालॅन्डचे राज्यपाल म्हणून नियुक्ती. तिथे निवडून आलेल्या सरकारवर टीका, हस्तक्षेप हे छ्न्द जोपासले. तिकडून तक्रारी आल्या आणि २०२१ मध्ये तामिळनाडूचे राज्यपाल म्हणून मोदी सरकारने नियुक्ती केली. सप्टेंबर २०२१ ते एप्रिल २०२२ ह्या काळात राज्य सरकारने संमत केलेली तब्बल १९ विधेयके/बिले त्यांनी फेटाळून लावली. स्टॅलिन हे रवी ह्यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात गेले आणि सुदैवाने सर्वोच्च न्यायालयाने रवी ह्यांचे तोंड फोडले. सेक्युलॅरिझमची भारताला गरज नाही पासून तामिळनाडूचे नाव तामीळगम असायला हवे.. असली विधाने केल्यावर खरेतर राष्ट्रपतींनी ह्यांचा राजीनामा घायला हवा होता. ""Illegal": Supreme Court slams TN Governor RN Ravi for inaction; deems 10 bills to have been passed Reserving 10 Bills illegal and erroneous: Supreme Court slams governor RN Ravi आता तरी हे रवी राजीनामा देतात की राज्यपाल पदाची खुर्ची गरम करत बसतात ते बघुया. Read more at: https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/reserving… https://en.wikipedia.org/wiki/R._N._Ravi https://www.thehindu.com/news/national/supreme-court-finds-tamil-nadu-g…

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

गेल्या काही वर्षातील सर्वात उचापतीखोर राज्यपाल कोण असे विचारले तर> गेल्या काही वर्षातील म्हणजे २६ मे २०१४ नंतरचे बरं का. त्यापूर्वीचे एकाही राज्यपालाने कधीही राज्यघटनेचे उल्लंघन केले नाही. मोदी मुख्यमंत्री असताना राज्यपाल कमला बेनिवालांनी गकोका विधेयक अनेक वर्षे स्वाक्षरी न करता मंचकाखाली दडपून ठेवले होते ते राज्यघटनेनुसारच होते बरं का. सुशीलकुमार शिंदेंनी आंध्रप्रदेशचा राज्यपाल असताना बॉम्बस्फोट करून माणसे मारलेल्या एका कॉंग्रेस कार्यकर्त्याची शिक्षा माफ केली होती ती राज्यघटनेला धरूनच होती बरं का. बुटासिंग, नारायण दत्त तिवारी, रामलाल, रोमेश भंडारी अश्या अनेक नामवंत राज्यपालांनी कधीही राज्यघटनेचे उल्लंघन केले नव्हते बरं का. २६ मे २०१४ नंतर सर्व राज्यपालांनी मनमानी कारभार सुरू केला. त्यापूर्वी कधीही असं होत नव्हतं बरं का..

In reply to by श्रीगुरुजी

अपेक्षित प्रतिसाद. कोर्टाने 'राज्यपालांचा निर्णय घटनाबाह्य' असे स्वच्छ शब्दात निकाल कधी दिले आहेत? भाजपाला जे आवड्त नाही ते घटनाबाह्य ही मांडणी अयोग्य आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

कोर्टाने 'राज्यपालांचा निर्णय घटनाबाह्य' असे स्वच्छ शब्दात निकाल कधी दिले आहेत? इतिहास चाळलास का गं माईडे?

In reply to by श्रीगुरुजी

लिंक द्या. भाजपाच्या कुजबुज आघाडीच्या बातम्या नकोत. 'ते निर्लज्ज म्हणून आम्हीही निर्लज्ज' हा युक्तीवाद असेल तर "ना खाउंगा ना खाने दूंगा.. असल्या बाता कशाला मारायच्या?

D मराठी माय - चंद्रिका केनिया, प्रियंका चतुर्वेदी मराठी बाप - राम जेठमलानी, प्रीतिश नंदी, संजय निरूपम, मुकेश पटेल, रामकुमार धूत, राहुल बजाज, घनश्याम दुबे, विप्लव बजोरिया

In reply to by श्रीगुरुजी

एखादा आडनावाने मराठी आहे पण महाराष्ट्रद्रोही राहून गुजरात्यांपुढे जी हुजूरी करतोय तर तो महाराष्ट्राचा शत्रूच! ह्याउलट मराठी आडनाव नसूनही महाराष्ट्रप्रेमी आहे महाराष्ट्रासाठी लढणाऱ्यांसोबत आहे तो मित्रच!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

हे सर्टीफीकीट कुठे मिळते? कोण देते (तुम्ही, उबाठा की राऊत)? सध्याचा रेट काय आहे? सध्या किती कोटींवर मांडवली करताय?

In reply to by टीपीके

हे सर्टीफीकीट कुठे मिळते? कोण देते आम्ही देतो! सध्याचा रेट काय आहे? सतरा हजार पाचशे बासष्ठ रुपये एकूणीस पैसे! सध्या किती कोटींवर मांडवली करताय? कोटीचा जमना गेला आता अब्जोमध्ये होते! जरा मोठा विचार करा! :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चला एकूण हा तुमचा स्वार्थी हलकटपणा आहे हे तुम्हीच सिद्ध केलेत हे बरे. उगाच तुमच्या विकृतीमुळे इतरांची बदनामी होते हे तरी जगजाहीर झाले.

In reply to by श्रीगुरुजी

ह्या लोकांनी 'व्हाय' कधी विचारले का? मराठीचा अपमान केला का? एवढे मागे जाउन काय करणार आता ? आणखी मागे जायचे तर पूजनिय शामाप्रसाद मुखर्जीनी १९४२ च्या 'चले जाव'ला विरोध केला होता. मुस्लिम लीग आणि हिंदू महासभा ह्यांचे एकत्र सरकार बंगालात होते. पण त्यांचे तैलचित्र लोकसभेत लावलेय.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

ह्या लोकांनी 'व्हाय' कधी विचारले का? मराठीचा अपमान केला का? एवढे मागे जाउन काय करणार आता ? ज्यांनी हे म्हटलं त्यांनाच माहिती. हे जाऊन तर जेमतेम १२ वर्षे होताहेत. ल़ोकं पार १७ व्या शतकात जातात, मग हे तर अगदी अलिकडचे.

In reply to by श्रीगुरुजी

घ्या अजून भाजपची बाजू! अहो तो नीतिमत्तामान भाजप पक्ष कधीच संपलाय! आणी ज्या मोदी नावाच्या माणसाच्या नावावर तुम्ही दणादण कमळाचे बटण दाबत सुटताय त्याच्या डोळ्यांदेखत हे चाललय!

(भारतिय) राजकारणात नीतीमत्ता वगैरे काही नसते. भाजपा असो,कॉंग्रेस असो वा आणखी कुणी.. निवड्णूक आणि सत्तेचे राजकारण सुरु झाले की नितीमत्ता वगैरे गुंडाळून ठेवावी लागते. व्यक्तिगत जीवनात त्यामानाने डावे/समाज्वादी नेते स्वच्छ असायचे पण गेल्या ३० वर्षातले ह्यांचे राजकारण काँग्रेस पक्षाला लोंबकळून होते. म्हणून मतदारांनी त्यांना राजकारणातूनच बाद केले.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

+१

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

मुळात वडेट्टीवार यांनी कोणतीही माहिती ना घेता बेफाट विधान केलेलं आहे. श्रीमती लता मंगेशकर यांनी भारतीय लष्करात हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या कुटुंबासाठी किंवा अन्य पीडित दु:खी लोकांसाठी अनेक वेळेस कार्यक्रम करून मिळालेले पैसे दिलेले आहेत त्यामुळे अशा गोष्टी "देणगी दिली" या सदराखाली लोकांच्या दृष्टीस येत नाही. मुळात एखाद्या कलाकाराने सामाजिक कार्यासाठी देणगी दिलीच पाहिजे का? आपण त्यांच्या स्वर्गीय गळ्यातून निघालेल्या स्वरातून मिळणार आनंद पैशातच मोजला पाहिजे का? माझ्या सारखया असंख्य सैनिकांना किंवा दूरस्थ ठिकाणी काम करणाऱ्या एकाकी माणसांना लता दीदी यांच्या स्वराने जो मानसिक आधार दिलेला आहे त्याची किंमत पैशात कशी करणार? त्यातून फडतूस राजकारण्यांच्या असल्या मताला कशाला किंमत द्यायची

In reply to by सुबोध खरे

लता मंगेशकरांनी अनेक विद्यार्थ्यांना मदत केली होती. लातूरमधील एका महाविद्यालयाला कार्यक्रम करून बरीच मदत केली होती. कोविड काळात मुख्यमंत्री निधीत देणगी दिली होती. नृत्य, गायन, कला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली होती.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

बरोबर आहे. पण काडीचीही अक्कल नसलेल्या माठ्याने कोणतीही माहिती न घेता मुर्खासारखे बरळणे झोडपलेच पाहिजे.

महात्मा फुले जयंतीच्या सर्वाना शुभेच्छा! ते नसते तर आज मुली शिकल्या असत्या का हा मोठा प्रश्नच आहे. जय फुले शाहू आंबेडकर!

तुळजापूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून ड्रग्ज तस्करीच्या चर्चा ऐकू येत होत्या. यामध्ये पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये थेट पुजारीच सापडले होते. त्यानंतर आता तुळजाभवानी मंदिर संस्थानने ड्रग्ज तस्करीच्या प्रकरणात आरोपी असलेल्या पुजाऱ्यांवर कठोर कारवाईचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणातील दोषी पुजाऱ्यांना कायमस्वरूपी मंदिर प्रवेशबंदी करण्यात येणार असून, ही कारवाई तातडीने अंमलात आणली जाणार आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी या प्रकरणी गंभीर दखल घेत पोलीस आणि मंदिर प्रशासनाला कारवाईचे आदेश दिल्यानंतर मंदिर संस्थानने त्वरित पावलं उचलली आहेत.