तर सोनू निगम ने भलं मोठ्ठं पत्र लिहून ट्विटर सोडण्याची घोषणा केली आणि आधीच सुरु असलेल्या गोंधळात अजून नवी भर पडली. पण यातून काही प्रश्न निर्माण झालेले आहेत.
पार्श्वभूमी अशी की, भाजपाच्या काही लोकल नेत्यांचा एका सेक्स रॅकेटमध्ये सहभाग असल्याच्या बातम्या आल्या आहेत. त्या किती खर्या-खोट्या की नेहमीप्रमाणे निवडणुकीच्या तोंडावरचे आरोप ते सिद्ध व्हायचे तेव्हा होइल. पण ही बातमी जेएनयु (हे कायम बातमीत) च्या एका विद्यार्थी संघटनेच्या माजी उपाध्यक्षा असलेल्या 'शेह्ला रशीद' नावाच्या एका मुलीने ट्विटरवर टाकली.
यावर आधी नियमित असा गदारोळ सुरु होता पण अभिजित भट्टाचार्य या गायकाने यावर एक कमेंट टाकली आणि आगीत तेल ओतले गेले.
-
-
हे अर्थातच आक्षेपर्ह असे ट्विट होते आणि यावर दोन्ही बाजूंनी गोंधळ झाला आणि अभिजितरावांचे ट्विटर अकाउंट धारातीर्थी पडले.
यावर शेह्ला रशीदची तिची बाजू मांडणारी ही पोस्ट,
https://www.facebook.com/ShehlaRashidOfficial/posts/129243290974403
यालाच समांतर दुसरी घटना म्हणजे त्यातच परेश रावल यांनी 'दगडफेकीसमोर काश्मिरी तरुणाऐवजी च यांनाच बांधून न्यायला हवे होते' अशा अर्थाचे ट्विट टाकले (याला अरुंधती रॉय यांचे आधीचे विधान कारणीभूत होते).
-
-
या ट्विटवर देखील गदारोळ सुरु होता आणि ते ट्विट डिलिट करावे अशी ट्विटर कडून परेश रावल यांना सूचना आली होती.
या दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर आधीच अजानसंबंधित ट्विटवेळी 'असहिष्णुता' सहन करावी लागलेल्या सोनू निगमने निषेध म्हणून ट्विटर अकाउंट बंद करत असल्याची घोषणा केली पण त्याच वेळी त्याने होत असलेल्या दुजाभावाबद्दल सविस्तर लिहिले.
-
-
एरवी याकडे दुर्लक्ष केले असते पण सोनूने काही रोचक मुद्दे मांडले आहेत जे नक्कीच चर्चा करण्याजोगे, विचार करण्याजोगे आहेत असं वाटलं.
१९ वा मुद्दा नक्कीच पटला, तो म्हणे ' मी डावा अथवा उजवा नाही. इतरांच्या मतांचा नक्कीच आदर करतो पण इथे तुम्ही कोणत्यातरी बाजूचे असलाच पाहिजे (असा एक अट्टाहास दिसतो)'.
आजकाल सगळेच जास्तीत जास्त टोकदार मतांचे होऊ लागले आहेत काय?
नेमस्तपणा, तटस्थपणा हे चर्चांमधले सद्गुण न ठरता नेभळटपणाची ओळख ठरु लागले आहेत काय?
दुराग्रही लोकांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे त्यांचे मत स्वीकारणे असा ग्रह बळावू लागला आहे का की ज्यामुळे सगळेच पोट तिडिकीने भांडू लागलेत.
याच बरोबर अधिक महत्त्वाचे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मर्यादा कुठवर आणि कशाच्या परिमाणावर आखायच्या. तर मग अभिजितची कमेंट ही कितीही घृणास्पद वाटली तरी 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य' म्हणून स्वीकारायची का? नसेल तर 'इंडिया मुर्दाबाद' ही घोषणा अथवा एखाद्या अभिनेत्रीबद्दलची बातमी एखाद्या व्यक्तीस हिडिस/घृणास्पद वाटली त्याचे काय करायचे ?
एक महिला गौतम गंभीरला जीपला बांधण्याची (त्या काश्मीरच्या घटनेच्या रेफरन्सने) कमेंट करु शकतो पण तेच परेश रावल अरुंधती रॉयबद्दल म्हणाला की चूक कसे ठरते?
एखाद्या सार्वजनिक क्षेत्रात काम करणार्या व्यक्तीच्या(पब्लिक फिगर) बद्दल जेव्हा कमेंटस येतात तेव्हा त्यांनी त्या 'व्यक्तिगत हल्ला' म्हणत तक्रार करणे कितपत योग्य आहे जेव्हा याच व्यक्ती इतर पब्लिक फिगर्स बद्दल टिका करताना (उ.दा. मोदींचे वैवाहिक जीवन, दिग्विजय सिंह यांचा पुनर्विवाह) याचा किती विचार करतात?
या संदर्भात सोनू निगम काही विचार करण्याजोगे मुद्दे मांडेल असे कधी वाटले नव्हते पण झाले आहे खरे.
-
एरवी याकडे दुर्लक्ष केले असते पण सोनूने काही रोचक मुद्दे मांडले आहेत जे नक्कीच चर्चा करण्याजोगे, विचार करण्याजोगे आहेत असं वाटलं.
१९ वा मुद्दा नक्कीच पटला, तो म्हणे ' मी डावा अथवा उजवा नाही. इतरांच्या मतांचा नक्कीच आदर करतो पण इथे तुम्ही कोणत्यातरी बाजूचे असलाच पाहिजे (असा एक अट्टाहास दिसतो)'.
आजकाल सगळेच जास्तीत जास्त टोकदार मतांचे होऊ लागले आहेत काय?
नेमस्तपणा, तटस्थपणा हे चर्चांमधले सद्गुण न ठरता नेभळटपणाची ओळख ठरु लागले आहेत काय?
दुराग्रही लोकांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे त्यांचे मत स्वीकारणे असा ग्रह बळावू लागला आहे का की ज्यामुळे सगळेच पोट तिडिकीने भांडू लागलेत.
याच बरोबर अधिक महत्त्वाचे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मर्यादा कुठवर आणि कशाच्या परिमाणावर आखायच्या. तर मग अभिजितची कमेंट ही कितीही घृणास्पद वाटली तरी 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य' म्हणून स्वीकारायची का? नसेल तर 'इंडिया मुर्दाबाद' ही घोषणा अथवा एखाद्या अभिनेत्रीबद्दलची बातमी एखाद्या व्यक्तीस हिडिस/घृणास्पद वाटली त्याचे काय करायचे ?
एक महिला गौतम गंभीरला जीपला बांधण्याची (त्या काश्मीरच्या घटनेच्या रेफरन्सने) कमेंट करु शकतो पण तेच परेश रावल अरुंधती रॉयबद्दल म्हणाला की चूक कसे ठरते?
एखाद्या सार्वजनिक क्षेत्रात काम करणार्या व्यक्तीच्या(पब्लिक फिगर) बद्दल जेव्हा कमेंटस येतात तेव्हा त्यांनी त्या 'व्यक्तिगत हल्ला' म्हणत तक्रार करणे कितपत योग्य आहे जेव्हा याच व्यक्ती इतर पब्लिक फिगर्स बद्दल टिका करताना (उ.दा. मोदींचे वैवाहिक जीवन, दिग्विजय सिंह यांचा पुनर्विवाह) याचा किती विचार करतात?
या संदर्भात सोनू निगम काही विचार करण्याजोगे मुद्दे मांडेल असे कधी वाटले नव्हते पण झाले आहे खरे.| लेख वर्गीकरण |
|---|
वाचने
34684
प्रतिक्रिया
135
मिसळपाव
प्रतिक्रिया
ट्विटर अमेरिकेपासून
काही निरीक्षणे
मी टोकदार हिंदूहितैषी भूमिका
In reply to काही निरीक्षणे by गामा पैलवान
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या
मग तुमच्या मते ती घोषणा
In reply to अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या by रामपुरी
जे चूक आहे ते चूक आहे हे
In reply to मग तुमच्या मते ती घोषणा by अद्द्या
जे चूक आहे ते चूक आहे हे मान्य करायला काय जातंय ?+११११मला फक्त एवढंच म्हणायचं होतं
In reply to मग तुमच्या मते ती घोषणा by अद्द्या
एकूणच ट्विटर हा हुच्चभ्रु
बरोबर-चूक काय ते माहित नाही
वरती लिंक चुकली
In reply to बरोबर-चूक काय ते माहित नाही by अत्रे
या सगळ्या प्रकरणात अभिव्यक्ती
In reply to बरोबर-चूक काय ते माहित नाही by अत्रे
रावलचे अकाऊंट (अजून तरी) बॅन
In reply to या सगळ्या प्रकरणात अभिव्यक्ती by सच्चिदानंद
ट्विटर फक्त निमित्त
एकंद प्रतिसाद पटला.
In reply to ट्विटर फक्त निमित्त by पैसा
मला जर कुणी पिस्तुल दिली तर
परेश रावळ काहीही चुकीचे बोलले नाहीत
असहमत.
In reply to परेश रावळ काहीही चुकीचे बोलले नाहीत by गॅरी ट्रुमन
पण तेच परेश रावल अरुंधती
कारण त्यानं हे विधान केवळ
In reply to पण तेच परेश रावल अरुंधती by दाह
तुम्ही दोन वेळा
In reply to कारण त्यानं हे विधान केवळ by अत्रे
माझ्या मते फतवा म्हणजे
In reply to तुम्ही दोन वेळा by सच्चिदानंद
फतवा हे फक्त मत आहे
In reply to माझ्या मते फतवा म्हणजे by अत्रे
तुम्ही एकाच धाग्यात अनेक
इथे तुम्ही कोणत्यातरी बाजूचे असलाच पाहिजे (असा एक अट्टाहास दिसतो)'.ही सध्याच्या सोशल मिडीयाची चिंताजनक बाजू आहे. याला अनेक कारणे आहेत. माझ्या मते मुख्य कारण म्हणजे विशिष्ट लोकांचे सोयीस्कर मतप्रदर्शन आणि सोयीस्कर विरोध लोकांच्या ध्यानात येऊ लागले आहे. सोशल मिडीया हा मतप्रदर्शनाचा सोयीचा प्लॅटफॉर्म असला तरी मोठमोठे मंत्री, नेते आणि विचारवंतही एका कमेंटच्या अंतरावर आहेत (माझ्या गल्लीतल्या एखाद्या मित्रासारखे) आणि "त्यांच्या विचारांना मी लॉजिकल उत्तर देत असेन तर मला पुन्हा उत्तर देणे ही त्यांची जबाबदारी आहे" ही सोय यापूर्वी नव्हती. दुसरी गोष्ट म्हणजे, विचारातील / भूमीकेतील समानता. आपण सर्वजण सदासर्वकाळ बरोबर असू शकत नाही. सोशल मिडीयावर तर मुळीच नाही कारण "आपले पूर्वानुभव आणि एखाद्या गोष्टीबद्दल असलेला दृष्टीकोन" या गोष्टींचा आपल्या भूमीका ठरण्यात मोठा वाटा असतो. अशा वेळी आपले अनुभव त्यावर व्यक्त होणार्या प्रत्येकाला समजतीलच असे नाही. दुसर्या बाजूने विचार केला तर माझ्या विचारांच्या विरोधी विचारांचा कोणी अस्तित्वात असेल आणि मला "आज आत्ता ताबडतोब" निर्णय हवा असेल किंवा त्याला खोटे पाडायचेच असेल तर मोघम आरोप करून त्याला खोटे पाडणे जास्ती सोपे असते. मग लाँग रन मध्ये तो माणूस बरोबर ठरला तरी नवीन आरोप शोधले जातात आणि पूर्वीचे बरोबर असलेले मुद्दे सोयीस्कररीत्या विसरून नवीन नवीन खोटेपणा केला जातो.आजकाल सगळेच जास्तीत जास्त टोकदार मतांचे होऊ लागले आहेत काय? नेमस्तपणा, तटस्थपणा हे चर्चांमधले सद्गुण न ठरता नेभळटपणाची ओळख ठरु लागले आहेत काय?आयडेंटिटी क्रायसीस म्हणा किंवा आणखी एखादी गोष्ट असेल.. पण मी एखाद्याला निरूत्तर केले म्हणजे माझा विजय किंवा मला कोणी निरूत्तर केले म्हणजे माझा पराजय ही भावना टोकाच्या भूमीका घ्यायला भाग पाडते कारण मी सज्जनपणे नवीन विचार स्वीकारून त्यावर विचार करण्याची तयारी दाखवली तरी अनोळखी प्रश्नकर्ता ती भूमीका समजून घेईलच असे नाही. मग तो मार्ग संपूर्णपणे बंद करून आहे त्या परिस्थितीत टोकाच्या भूमीकांमध्ये राहणे जास्ती सोपे आहे. एखाद्याचा तटस्थपणा किंवा नेमस्तपणा जर एकाच विचारधारेकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून विशिष्ट विचारधारेची भलामण करत असेल तर त्याला सध्याच्या घडीला उघडपणे विरोध होतो आहे. अशावेळी मुद्द्यांच्या आधारे केलेला विरोध म्हणजे "असहिष्णुता" किंवा "हमको चाहिये आजादी" अशा अजेंड्याखाली ढकलला जात असेल तर कोणताही सामान्य माणूस "असहिष्णुता तर असहिष्णुता पण आधी या सोयीस्कर विचारवंतांचे बुरखे टरकावूया" असा विचार करेल हे अत्यंत साहजिक आहे. (मी स्वत: याच विचाराने मिपावर राजकारणी चर्चांमध्ये भाग घ्यायला सुरूवात केली)दुराग्रही लोकांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे त्यांचे मत स्वीकारणे असा ग्रह बळावू लागला आहे का की ज्यामुळे सगळेच पोट तिडिकीने भांडू लागलेत.याला दुराग्रही / सोयीस्कर मानवाधिकारवाले / पुरस्कार वापसी गँग जबाबदार आहेत हे माझे स्पष्ट मत आहे. एखाद्या व्यक्तीचा / विचारधारेचा विरोध करताना तारतम्य पाळले नाही तर तुमचा वागळे किंवा राजदीप सरदेसाई होणारच याला सध्याच्या घडीला इलाज नाही. भूमीका हातोहात बदलणे, खोटे बोलणे, आपण एक लॉजिक देऊन त्याच लॉजिकने आलेले पण स्वत:ला सोयीचे नसलेले निष्कर्ष नाकारणे, मोघम आरोप करणे, नसलेल्या शक्यता ध्वनीत करणे वगैरे प्रकार या लोकांकडून नेहमी केले जातात. मिपावरच्या अशा किमान ३ वेगवेगळ्या लोकांच्या (डुआयडींच्या नव्हे!) मी लिंका देऊ शकतो. मग अशावेळी समोर दिसत असलेला पक्षपातीपणा उघड पाडण्यासाठी मैदानात उतरणे भाग पडते आणि एकदा मैदानात उतरलात की तुम्हाला विरोधकांकडून लेबले लावली जाणारच. तुमच्यावर आरोप करताना कितीही पातळी सोडली तरी प्रतिकार करताना तुम्ही पातळी सोडू नये अशी एक अजब अपेक्षा या लोकांची असते. अशा अनेक दांभीक भूमीकांचा परिणाम म्हणजे सध्या सुरू असलेले समर्थकांचे पोटतिडकीचे भांडण. ..मी समोरच्याला फक्त चिमटा काढला तर त्याने माझ्या कानाखाली आवाज का काढला..? अशी वागळे/सरदेसाई छाप भूमीका असेल तर मर्यादेची रेषा कोण आखणार हा रोचक मुद्दा उरतोच.बराचसा प्रतिसाद आवडला.
In reply to तुम्ही एकाच धाग्यात अनेक by मोदक
मोदक जी..
In reply to तुम्ही एकाच धाग्यात अनेक by मोदक
दुराग्रहीं च्या कप्प्यामध्ये
In reply to मोदक जी.. by विशुमित
मी प्रतिसादामध्ये पुरेसे
In reply to दुराग्रहीं च्या कप्प्यामध्ये by विशुमित
मोदक जी...!!
In reply to मी प्रतिसादामध्ये पुरेसे by मोदक
ओके.. हा लेखनप्रपंच
In reply to मोदक जी...!! by विशुमित
<<<हा लेखनप्रपंच करण्यापूर्वी
In reply to ओके.. हा लेखनप्रपंच by मोदक
दुराग्रहीपणा आणि तुम्ही
In reply to <<<हा लेखनप्रपंच करण्यापूर्वी by विशुमित
दुराग्रहीं च्या कप्प्यामध्ये महाजन बसतील का ? कारण ते श्री श्री दाऊद च्या नातेवाईकाच्या लग्नात बिर्याणी हादडत होते.१) त्याच मुद्द्यातील बाकी भाग
In reply to मोदक जी.. by विशुमित
तिन्हीही शंका निरसन
In reply to १) त्याच मुद्द्यातील बाकी भाग by मोदक
मोदक, प्रतिसाद आवडला..
In reply to तुम्ही एकाच धाग्यात अनेक by मोदक
या संदर्भात इतकेच म्हणेन की
In reply to मोदक, प्रतिसाद आवडला.. by सच्चिदानंद
या संदर्भात इतकेच म्हणेन की हे बहुतेक पक्ष अथवा विचारधारेच्या समर्थकांकडून होतेच होते. यात पुरस्कार वापसी गँग इ. आणून इतर स्वतःला 'बाईज्जत बरी' करु शकत नाहीत.सर्वच जण असे करत असतील असे तुमचे मत असेल तर "सुरूवात कोण करत आहे आणि प्रत्युत्तर कोण देत आहे" हे बघावे लागेल. सुरूवात = चिमटा काढणे आणि प्रत्युत्तर = कानाखाली आवाज काढणे असे असेल तर "मोठी हिंसा" म्हणून प्रत्युत्तर देणार्याला संपूर्ण दोष देता येणार नाही.इथे तुम्ही अभिजितच्या कमेंटची भलामण करताय का?अभिजीतच्या कमेंटची भलामण नाही. सर्वसाधारण विधान आहे.यात महत्त्वाचा एक बेसिक मुद्दा म्हणजे आपली पातळी आपण का सोडावी ? आपला तटस्थपणा स्वयंभू असावा, इतरांच्या ढोंगीपणामुळे, कोलांटउड्यांमुळे त्यात बदल होऊ नये. एखाद्याचे एखादे मत पटले तर ते स्वीकारायला इतर संदर्भ (तो कोणत्या पक्षाचा समर्थक/विरोधक इ.इ.) मध्ये येऊ नयेत.समजा एखादा बेवडा मुद्दामहून माझ्या रस्त्यात येत असेल तर मी कितीवेळा रस्ता बदलणार..? स्वयंभू तटस्थपणा आजच्या काळात आणि अंतर्जालावरच्या फॉरमॅटमध्ये कितपत लागू ठरेल हे शंकास्पद आहे. (हे फक्त पातळी सोडण्यासंदर्भात आहे, मत स्वीकारण्यासंदर्भात नाही.)काही मुद्दे पटले नाहीत. उ.दा.
In reply to या संदर्भात इतकेच म्हणेन की by मोदक
मी डॉक्टरसाहेबांइतका अनुभव,
In reply to काही मुद्दे पटले नाहीत. उ.दा. by सच्चिदानंद
अर्थात, मग कोणाचा आदर्श
In reply to मी डॉक्टरसाहेबांइतका अनुभव, by मोदक
अरे व्वा.. या निमित्ताने
In reply to अर्थात, मग कोणाचा आदर्श by सच्चिदानंद
आजकाल सगळेच जास्तीत जास्त
गॅरी ट्रुमन यांचा तीव्र निषेध
एकदम सहमत.
In reply to गॅरी ट्रुमन यांचा तीव्र निषेध by गामा पैलवान
अरुंधती यांच्या वैचारीक मांडणीचा विरोध वैचारीक पातळीवरुन
ब्रॅन्ड अॅम्बॅसॅडर्स
In reply to अरुंधती यांच्या वैचारीक मांडणीचा विरोध वैचारीक पातळीवरुन by मारवा
विक्रम गोखले, तेंडूलकर आणि
रावल यांनी याही पेक्षा भयावह
In reply to विक्रम गोखले, तेंडूलकर आणि by पुंबा
अरुंधती च्या नेमक्या
In reply to रावल यांनी याही पेक्षा भयावह by arunjoshi123
ट्विटांत..
अरुंधती चे कोट्स फारच एकतर्फी प्रचारावर
अरुंधती चे कोट्स फारच एकतर्फी प्रचारावर
पण मी काय म्हणतो ?
अरूंधतीचा खरा चेहरा
टोकदार हिंदूहितैषी भूमिका
हे शेला रशिदचे ट्विट किंवा
जेएनयूला अजून किती प्रसिद्धी
फरक
In reply to जेएनयूला अजून किती प्रसिद्धी by पिशी अबोली
शंभर टक्के सहमत.
In reply to फरक by गॅरी ट्रुमन
विचारांचा मुकाबला :)
In reply to शंभर टक्के सहमत. by गामा पैलवान
ट्रुमनसाहेब,
In reply to फरक by गॅरी ट्रुमन
काय बोलता राव?
In reply to ट्रुमनसाहेब, by अत्रे
तुम्हाला मी हायपोथेटिकल
In reply to काय बोलता राव? by गॅरी ट्रुमन
संसदेवर बॉम्ब टाकणे वगैरे
In reply to तुम्हाला मी हायपोथेटिकल by अत्रे
:)
In reply to तुम्हाला मी हायपोथेटिकल by अत्रे
तुम्ही वरती म्हटले होते कि
In reply to :) by गॅरी ट्रुमन
बाकी चालू द्या. फक्त
In reply to ट्रुमनसाहेब, by अत्रे
जेएनयूला एकूणच अवास्तव महत्व
In reply to फरक by गॅरी ट्रुमन
अबोली ताई
In reply to जेएनयूला एकूणच अवास्तव महत्व by पिशी अबोली
हे पटलं.
In reply to अबोली ताई by सुबोध खरे
लाख वेळा सहमत पिशी ताई
In reply to जेएनयूला अजून किती प्रसिद्धी by पिशी अबोली
वा वा. तुम्हाला हळूहळू
In reply to लाख वेळा सहमत पिशी ताई by उपेक्षित
आनंदा माझ्या नोकरीची उठाठेव
In reply to वा वा. तुम्हाला हळूहळू by आनन्दा
ही बाई भारताच्या वाईटावर तपोन
भारताच्या वाईटावर टपून बसणे
In reply to ही बाई भारताच्या वाईटावर तपोन by मराठी_माणूस
फोटो वरुन काही समजले नाही.
In reply to भारताच्या वाईटावर टपून बसणे by गामा पैलवान
खुलासा
In reply to फोटो वरुन काही समजले नाही. by मराठी_माणूस
बरेचसे मिपाकर रॉयविरुद्ध
In reply to खुलासा by गामा पैलवान
नेमका
In reply to बरेचसे मिपाकर रॉयविरुद्ध by सतिश गावडे
बरेच
In reply to नेमका by आनंदयात्री
ते लहान मुलांसाठी नव्हतं
In reply to बरेच by मारवा
कसं सुचतं हे असं ?!
In reply to ते लहान मुलांसाठी नव्हतं by सतिश गावडे
कणखरपणा कमी पडत आहे
In reply to बरेचसे मिपाकर रॉयविरुद्ध by सतिश गावडे
श्री मोदींना माहित आहे कि
In reply to कणखरपणा कमी पडत आहे by गॅरी ट्रुमन
उत्तर काहीसं असंच असेल असे
In reply to श्री मोदींना माहित आहे कि by सुबोध खरे
याच, अगदी याच कारणांमुळे
प्रभावी ब्रॅन्ड अॅम्बॅसॅडर्स :)
In reply to याच, अगदी याच कारणांमुळे by सचिन७३८
बांगलादेश बलुचिस्तान -- पाकीस्तान चा भुभाग
अरुंधती यांची सडेतोड कोट्स
नका हो असे अवघड विचार मांडू
In reply to अरुंधती यांची सडेतोड कोट्स by मारवा
हे काव्यात्म
अरुंधती यांचा हा लेख बघावा
बापरे
In reply to अरुंधती यांचा हा लेख बघावा by मारवा
Who knows...
In reply to बापरे by पैसा
अहो ताई
In reply to बापरे by पैसा
वाचलं म्हणूनच लिहिलंय
In reply to अहो ताई by मारवा
बास बास.. थोडक्यात विरोधाभास
In reply to वाचलं म्हणूनच लिहिलंय by पैसा
ऐशी की तैशी
In reply to अरुंधती यांचा हा लेख बघावा by मारवा
ट्रुमन साहेब
In reply to ऐशी की तैशी by गॅरी ट्रुमन
कळते पण वळत नाही :(
In reply to ट्रुमन साहेब by सुबोध खरे
राॅय यांच्या काही लेखांचे दुवे
राॅय यांच्या काही लेखांचे दुवे
यायला इथे लिंक चिकटवण्याची
पूर्वीचे मिपा राहिले नाही हेच
In reply to यायला इथे लिंक चिकटवण्याची by अद्द्या
सुझान अरुंधती रॉयविरुद्ध सरकारी कारवाई का होत नाही.
सुझानबाईंचे खंडन
काही मुलभुत मुद्दे
विरोध खाल्ल्या ताटात भोक
In reply to काही मुलभुत मुद्दे by मारवा
मोदी इंदिरा गांधी यांची
In reply to काही मुलभुत मुद्दे by मारवा
मोदी इंदिरा गांधी यांची बलुचिस्तान बांगलादेश संदर्भातील किंवा तिबेट संदर्भातील भारताची भुमिका आणि अरुंधती रॉय यांची काश्मीर विषयक भुमिका यात वेगळेपण नेमके कशात आहे ?वरचा इतका तत्ववादी प्रतिसाद लिहिणारा "बलुचिस्तान, बांगलादेश, तिबेट" आणि "काश्मीर" यांच्यामधला फरक काय असे विचरतो (पक्षी : त्यांच्यात फरक नाही असे म्हणतो), तेव्हा खरे तर, कितीही फरक दिसत असले तरीही (कोणत्याही गुप्त कारणांनी का होईना पण) आपल्या भूमीकेला सोडायचे नाही, हे त्याने नक्की केलेले असते. :) तरीही, काही गोष्टींकडे लक्ष वेधतो... १.अ. काश्मीर मधला असंतोष खालील सिद्ध झालेल्या गोष्टींनी "बनवलेली" परिस्थिती आहे : * प्रत्यक्ष पाकिस्तानी हस्तक्षेपाने (पक्षी : सीमेपार अतिरेकी पाठवून) होणार्या कारवाया. * काश्मीरमध्ये असलेल्या व पाकिस्तानी पैश्याने खरेदी केलेल्या फुटीरतावादी हस्तकांकरवी केल्या जाण्यार्या कारवाया. * केवळ काश्मीरबरोबरचीच नव्हे तर अफगाणिस्तान व काही प्रमाणात इराण बरोबरचीही सरहद्द पेटत ठेवून, त्यामुळे निर्माण होणार्या अस्थिर परिस्थितीचा बागुलबुवा कायम ठेवून पाश्चिमात्य (विशेषतः अमेरिका) आणि खाडी देशांसाठी महत्वाचे (स्ट्रॅटेजिक) स्थान कायम ठेवून राजकारणी आणि आर्थिक फायदा लुटत राहण्याची पाकिस्तान लष्कराची रणनीति. १.आ. काश्मीरमधल्या बहुसंख्य जनतेने तिचे मत खालील गोष्टींनी वारंवार स्पष्टपणे व्यक्त केले आहे : (अ) अनेक स्थानिक, राज्य व राष्ट्रीय निवडणूकांत, अतिरेक्यांच्या धमक्यांना भीक न घालता, मोठ्या संखेने होणारे मतदान. (आ) अनेकदा झालेल्या पोलिस व सैन्य भरतीच्या वेळेस, अतिरेक्यांच्या धमक्यांना भीक न घालता, हजारोंच्या संखेने असलेली काश्मीरी युवकांची हजेरी. अर्थातच, काश्मीरमधिल (आणि बर्याच अंशी अफगाणिस्तानातली) परिस्थिती शेजारी राष्ट्राने (पक्षी : पाकिस्तानने) चालवलेल्या अतिरेकी कारवायांवर आधारीत आहे, त्यात स्थानिक बहुसंख्य लोकांच्या आशा-आकांक्षांचा फारसा सहभाग नाही; किंबहुना, या पाकिस्तान-निर्मित दुष्टचक्रात सर्वसामान्य जनता भरडून काढली जात आहे. २. तिबेट चीनने सरळ सरळ आक्रमण करून ताब्यात घेतलेला भूभाग आहे, हे चीनही अमान्य करणार नाही. या प्रकरणात, दलाई लामांना आश्रय देणे यापलिकडे, भारताचा कोणताही सहभाग नाही. ३. बांगलादेश प्रकरणाबद्दल "अधिक काही विचारण्याची आणि सांगायची" गरज फक्त झोपेचे सोंग घेणार्यासाठी आवश्यक ठरेल. तरीही... बांगलादेश युद्धात शरण आलेल्या पाकिस्तानच्या सैनिकांना आपल्या बंदुकांना स्वतःजवळ बाळगण्याची, न भूतो (आणि बहुदा) न भविष्यती, परवानगी कोणत्या कारणासाठी दिली गेली, याच एका अतीप्रसिद्ध गोष्टीची कारणपरंपरा माहित करून घेतल्यास, बांगलादेश प्रकरणाच्या फरकाबद्दलचे सगळे गैरसमज मूळातून दूर होतील. तेव्हा... या वरच्या गोष्टींचा विचार करून काश्मीर समस्येकडे परत प्रामाणिक दृष्टीक्षेप टाकायची इच्छा असलेल्या माणसाचे अधिक अभ्यासाने स्वतःहूनच मतपरिवर्तन होईल असे वाटते... अन्यथा इतरांनी अजून जास्त प्रयत्न करणे म्हणजे, झोपलेल्या माणसाला उठविण्याचा प्रयत्न होईल, व असे करण्याचे फलित काय असते हे तुमच्यासारख्या बुद्धिमान व विचारी माणसाला सांगण्याची गरज नाहीच. :)मारवा दुर्लक्ष करत असलेला अजून एक फरक आहे
In reply to मोदी इंदिरा गांधी यांची by डॉ सुहास म्हात्रे
सहमत!
In reply to मारवा दुर्लक्ष करत असलेला अजून एक फरक आहे by पैसा
मिपावर हिंसक क्रांतीला
In reply to मारवा दुर्लक्ष करत असलेला अजून एक फरक आहे by पैसा
काहीही हं
In reply to मिपावर हिंसक क्रांतीला by अत्रे
यासंबंधी डोळे उघडणारी,
In reply to मोदी इंदिरा गांधी यांची by डॉ सुहास म्हात्रे
बातमी : Defying shutdown call
In reply to यासंबंधी डोळे उघडणारी, by डॉ सुहास म्हात्रे
म्हात्रे सर
In reply to मोदी इंदिरा गांधी यांची by डॉ सुहास म्हात्रे
तुम्ही कुठल्या बाजूला आहात?
In reply to म्हात्रे सर by मारवा
हैद्राबाद संस्थानात, मूठभर
In reply to म्हात्रे सर by मारवा
म्हात्रेजी अजुन स्पेसीफीक तुलना देतो.
In reply to हैद्राबाद संस्थानात, मूठभर by डॉ सुहास म्हात्रे
अजून एक वडाची साल पिंपळाला...
In reply to म्हात्रेजी अजुन स्पेसीफीक तुलना देतो. by मारवा
काय योगायोग पहा !
In reply to अजून एक वडाची साल पिंपळाला... by डॉ सुहास म्हात्रे
काही फळ व्यापार्यांवर छापे
In reply to काय योगायोग पहा ! by डॉ सुहास म्हात्रे
फुटीरतावाद्यांशी ज्यांचा तडक
In reply to काही फळ व्यापार्यांवर छापे by गॅरी ट्रुमन
सुबोधजी
येथे गवतास फाटे ( भाले ऐवजी)
In reply to सुबोधजी by मारवा
Sign The Petition To Remove Raheel Khursheed as Head of Twitter
Sign The Petition To Remove Raheel Khursheed
अजुन स्पष्ट मांडणी चा एक प्रयत
अजुन स्पष्ट मांडणी चा एक प्रयत
४
मारवा,
डाव्यांना कडाडून विरोधाचे कारण
+१
In reply to डाव्यांना कडाडून विरोधाचे कारण by गॅरी ट्रुमन
गॅरी जी डाव्यंचा विरोध करण्यासाठी अजुन काही लिंका व संदर्भ
In reply to डाव्यांना कडाडून विरोधाचे कारण by गॅरी ट्रुमन
अभिजित इज बॅक
http://www.ndtv.com/india
In reply to अभिजित इज बॅक by धर्मराजमुटके
सीमाविस्तार