हा 'बिनतोड' युक्तिवाद वाचून माझंही मनोरंजन झालं आहे.
रामायण हे तत्कालीन समाजसंकेतांना धरून चालणारं एक काव्य आहे हे गृहित धरून आणि तितपतच महत्त्व त्याला देऊन त्याकडे पाहायचं हे ठाऊक आहे. पण आजच्या बदललेल्या नीतीमूल्यांमध्येही त्या वागण्याचं कुणी हिरिरीनं समर्थन करत असेल, तर त्याबद्दल दुमत नोंदवण्याचा हक्क बजावला पाहिजे, कारण रामायणाचे दाखले आजही दिले जातात. म्हणून लिहिते आहे.
रामाचा - आणि त्याच्या कुलाचा - आजूबाजूच्या परिसरावरचा हक्क हा स्वघोषित होता. तत्कालीन साम्राज्यविस्ताराच्या तंत्राचा तो एक भाग होता. वाली वानर असला, तरी तो त्याच्या प्रदेशाचा शासक होता. तो प्राणी असल्यामुळे त्याला मारण्याचा हक्क रामाला मिळत नाही. हा हिसकावलेला हक्क आहे. होता.
वाली, शंबुक, सीता अशा अनेक बाबतींत रामाची भूमिका वादग्रस्त ठरत आली आहे. आजच्या बदलत्या मूल्यांच्या संदर्भात तसं कुणी रोखठोकपणे म्हणत असेल, तर त्यात चुकीचं काय आहे? कुठलंही महाकाव्य हे काळाच्या कसोटीवर अशा प्रकारे घासून घेतलं जात असतंच.
हा तथाकथित संवाद आपणास कुठुन प्राप्त झाला हे कळाले तर बरे होईल.
बाकी, आपले रामायणाविषयीचे ज्ञान किती आहे हे आपण सांगितले असल्याने त्यावर काहीही बोलत नाही.
राम आदर्श मानला जातो आहे हजारो पिढ्यांपासुन.. काहीतरी असेलच ना त्यात.. का आजची पिढी फार हुशार आणि मागील आपले सर्व पुर्वज केवळ गतानुगतिक. नाही, काहीतरी आपलेच चुकते आहे, आपल्या पहाण्यात दोष आहे. असो.
रामायण हे ना कल्पनाविलास ना काव्य !
रामायण ही कहाणी आहे अयोध्येच्या राजपुत्राची!!
एका हाडामासांच्या मानवाची!!!!
जो तुमच्या आमच्या सारखाच होता,
फक्त फरक असेल तर येवढाच की संकटे आल्यावर तो गांगरुन जात नसे...
तोंड देत असे.. विजय प्राप्त करत असे...बास ..हाच तो मुलभुत फरक!!!
इंग्रजांनी फोडा झोडा केले असे म्हटले जाते... रामाने दहाहजार वर्षापुर्वी केले... सुग्रीव, बिभीषण!!
अमेरिका दुस-या देशाच्या धनसहाय्याने तिस-या जगावर हल्ला करते असे म्हटले जाते... रामाने दहाहजार वर्षापुर्वी केले.. सु्ग्रीवाच्या सहाय्याने लंकेवर हल्ला !!
बाकी, चमत्कार, जमिनीतील पेटी, अहिल्येची मुक्ती वगैरे वगैरे माणसाचा देव होतांना जो शेंदुर अपरिहार्यपणे चढतो त्याची पुटे. असल्याने फरक पडत नाही, नसल्याने माहात्म्य कमी होत नाही.
ज्याला रामाला मानायचे त्याने मानावे, कुणी नसेल मानत त्यामुळे मला तरी फरक पडत नाही.
बोला सियावर रामचंद्र की जय !!!
श्रीराम जय राम जय जय राम !!!
-- अवलिया
>>आंतरजालावर बागडत असताना एका ठिकाणी प्रभु रामचंद्रानी वालीची हत्या करुन कसे अधर्म चरण वगैरे केले आहे ह्याची मनोरंजक कहाणी वाचायला मिळाली.
:)
१) हे उमद्या राजकुमारा मी दुसर्या कोणाशी लढत असताना तु मला बाण का मारलास ?
ह्या असल्या निष्फळ आणी पुराव्याशिवाय बडबडीने तु माझ्यावर आरोप करु पाहत आहेस, किती निर्बुद्ध असशील तु.
तात्या म्हणायचे तो व्यास महाडांबीस. इथे तर मला वाल्मिकीही डांबीस असल्याचे कळले. ;)
तात्या म्हणायचे तो व्यास महाडांबीस. इथे तर मला वाल्मिकीही डांबीस असल्याचे कळले.
तात्या म्हणायचे?? अगं प्रियाली तू माझ्या जिवावर का उठली आहेस? तात्या आहेत अजून! :)
बाकी वाल्मिकींना तंबाखूचे बेसुमार व्यसन असल्यामुळे त्यांना भ्रम झाला होता असे ऐकून आहे! :)
आपला,
(द्वाड प्रियालीचा मित्र) तात्या.
>>>हे उमद्या राजकुमारा मी दुसर्या कोणाशी लढत असताना तु मला बाण का मारलास ?...
ह्या आणि ह्याला जोडून पुढचे सर्व प्रश्न रामाने शांतपणे ऐकले आणि एका वाक्यात रामबाणासारखे उत्तर दिले: "मी तुला का मारले म्हणून विचारतोयस? उत्तर शिंपल आहे, मी खराखुरा राजकुमार आहे, परीकथेतील नाही..." :-)
(खालील काही "शोध" प.वि. वर्तकांचे - पण मला ते बर्यापैकी लॉजिकल वाटले काही बाबतीत अर्थातच सोडून देयचे...)
वाली हा महान राज्यकर्ता होता. त्याची मदत घेतली असती तर तो भूराजकीय राजकारणात रामाला म्हणजे अयोध्येच्या (त्यावेळेस भावी) राजाला डोईजड झाला असता.ह्याचा विचार करून रामाने वालीपेक्षा कमी श्रेष्ठ पण तरीदेखील मदत होऊ शकेल अशा सुग्रीवाची मदत घेतली. अर्थात त्या आधी सीतेला शोधण्याचे वचन त्याने सुग्रीवाकडून मिळवले होते आणि हनुमानाने दोघांना आधीच मैत्रीत आणि रामाला शब्दात बांधले होते हे आहेच.
वाली हा त्याच्या प्रजाजनांमधे एक कुशल राजा म्हणून प्रसिद्ध होता. त्यामुळेच त्याला मारल्यावरून, "कोणी वाली उरला नाही" अशी म्हण तयार झाली. (यातील मला त्यांचे लॉजिक आवडले पण मग मराठी किती जुनी होईल वगैरे विचार मनात येतात ;) )
प्रतिक्रिया
हा 'बिनतोड'
?
मागच्या
हरकत नाही
:-)
म्हणजे कोणीतरी डांबीस असणं हे फार पूर्वीपासूनचं आहे तर!
खुद के साथ
तात्या
साधे उत्तर
वाली