Skip to main content

धर्मांतरासाठी मॉडेलवर पतीची बळजबरी

लेखक ओम शतानन्द यांनी शनिवार, 18/11/2017 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
रश्मी शहाबाजकर नामक एकेकाळच्या model ची बातमी - १२ वर्षापूर्वी असिफ नामक इसमाशी तिने प्रेमविवाह केला , सर्व धर्म एकच सत्य सांगतात, सर्व धर्म सारखेच , एखादी व्यक्ती मुस्लीम असो की हिंदू , प्रेमात धर्म बघणे म्हणजे प्रतिगामित्व असल्या मूर्ख , भोंगळ समजुती असलेल्या पुरोगामी समाजवादी गांधीवादी सेकुलर विचारसरणीची असावी. नेहमी प्रमाणे या असिफने तिला प्रेमाच्या जाळ्यात फसविण्यासाठी आपण कट्टर धार्मिक नाही आणि लग्न केल्यावर धर्म बदलणे आवश्यक नाही , तुझा धर्म तुझ्यापाशी ,माझा माझ्या पाशी अशी खोटी आश्वासने दिली . कुठलीही मुलगी प्रेमात पडली की तिला स्वत:चे प्रेम आणि स्वत;चे सुख यापुढे दुसरे काही दिसत नाही, जाणवत नाही, आणि ती स्वत:च्या आई वडील नातेवाईक यांना सोडून जायला एका पायावर तयार असते . आपल्या लग्नाचे काही सामाजिक परिणाम होतील याचा विचार करणे दूरच . महत्वाचे एकच आपला स्वार्थ . स्त्री हे पुनरुत्पादन करणारे यंत्र . हिंदू मधील जेवढ्या स्त्रिया आपल्या धर्मात येतील तेवढे फायदेशीर , तेवढी अधिक मुस्लीम संतती पैदा होईल . संख्याबळ वाढले की आपली शक्ती वाढली आणि मग देशात जगात सर्व ठिकाणी आपलाच धर्म प्रस्थापित होण्याकडे झपाट्याने वाटचाल. अशी विचारसरणी असलेले शांतीप्रिय धार्मिक लोक हिंदू स्त्रियांना प्रेमाच्या जाळ्यात फसविण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात आणि आपल्या मूर्ख हिंदू स्त्रिया त्यास बळी पडतात . लग्न नंतर सर्व आश्वासने गुंडाळून ठेवून या असिफ ने रश्मी ला धर्मांतर करण्यासाठी दबाव छळ सुरु केला , तिच्या मुलालाही तिच्या पासून तोडले , मुलाला असे पढविले की तुझी आई च्या घरात सैतान राहतो कारण ती हिंदू धार्मिक रिती पाळते . या असिफ च्या जाळ्यात अजून एक इशिता नावाची मूर्ख हिंदू मुलगी - त्याच्या अर्ध्या वयाची - सापडली . धर्मांतर करून त्याच्याशी लग्न करून राहू लागली. हा असिफ व त्याचे नातेवाईक रश्मी ला धर्मांतर करण्या साठी धमकावत आहेत . आपले पुरोगामी लोक आतातरी लव जिहाद चे वास्तव स्वीकारतील का आपल्या मूर्ख हिंदू स्त्रियांना कधी अक्कल येणार कोण जाणे

वाचने 87716
प्रतिक्रिया 413

प्रतिक्रिया

In reply to by जेम्स वांड

हिडिसपणा कुठे दिसला ब्वा? मी जातपात पाळत नाही. पण उगाच कोणी मुजोरपणा करायला लागला तर तर त्यावा सोडतही नाही. उगीच पहिल्या धारेची लाइन तर्राटपणा करणार्याला तर अजिबात नाही. गपगुमान आपापलं आयुष्य जग की म्हणो कश्याला उडते बाण पार्श्वभागावर झेलुन मुळव्याध झाल्याची बोंब ठोकायची?

नै पन मी काय म्हणतोय..... एक चांगला मुलगा, केवळ प्रतीपक्षाकडील लीगल अडवाईजरच्या, "चारित्र्य हनन व मीडिया ट्रायल" च्या डावपेचाचा बळी जात असेल, तर एक वाचक म्हणून तुम्ही त्याचा बचाव कसा करणार ? असा अतिशय साधा हायपोथेटिकली विचारलेल्या प्रश्नाला, काही सुसंगत उत्तर नाही मिळालं. एक तेव्हड माहितीगार सरांनी उत्तर दिलंय, पण ते नीट कळलं नाही मला... :(

In reply to by पगला गजोधर

अहो उत्तर मागायचा साळसूदपणा कशासाठी अजून. तुमचा उद्देश तर सफल झाला. विषय पूर्णपणे बदलला. मुस्लिमांकडून ब्राम्हणांकडे..

In reply to by शलभ

साळसूदपणा ?? कृपया वैयक्तिक न होता चर्चा झाली तर उत्तमच. असो माझा उद्देश ?? काय आणि तो सफल झाला की नाही ?? हे सुद्धा तुम्हीच ठरवणार का ? तुमचा उद्देश काय होता, जो आउट ऑफ फोकस झाला ? चर्चा हिंदू मुस्लिमवरच ठेवून, विचहंटिंग करण्याचा ??

कश्याला उडते बाण पार्श्वभागावर झेलुन मुळव्याध झाल्याची बोंब ठोकायची? >> अगदी हेच. हेच. हेच. त्या तिथे वर गापै आणि सुखीमाणूस यांना सांगायचा प्रयत्न होता. पण काय इतकी सुसंस्कृत भाषा आम्हाला जमत नाही ना? स्पेश्यल क्लासेस असतील का याचे? असो. भावना योग्य त्या ठिकाणी पोचलेल्या बघून आनंद झाला.

कौटुंबिक वादात धर्म संस्कृती च्या नावाखाली, लुडबुड करणे हे फार पूर्वीपासून चाललेलं दिसतंय धार्मिक कर्मठपणा व स्त्रियांना हीन वागणूक, ही काही एकाच धर्माची मक्तेदारी नाही, त्यात आता स्वतःला लिबरल व सहिष्णु म्हणून स्वतःचीच पाठ स्वतः थोपटणाऱ्यांचे पूर्वज व सद्य स्थितीला त्यांचे वैचारिक वंशज सुद्धा (म्हणजे पाठ थोपटवून घेणारे स्वतः) कमी नाही. आगरकर रानडे यांच्या सारखे पुरोगामी तेव्हाही होते, व तेव्हाही त्यांना शिव्या घालणारे धर्म संस्कृती रक्षक होतेच.... ############### आताच्या पालघर जिल्ह्यातील सफाळेजवळील दातीवऱ्याच्या दादाजी भिकाजी ठाकूर यांच्याशी वयाच्या ९व्या वर्षी रखमाबाईंचं लग्न झालं. मुलीने वयात येईपर्यंत आईवडिलांकडे राहण्याची प्रथा त्याकाळी होती. साहजिकच १८ वर्षांपर्यंत रखमाबाई माहेरीच राहिल्या. त्यानंतर १८३३ मध्ये दादाजीने त्यांना आपल्या घरी बोलावलं. मात्र दरम्यानच्या काळात शिक्षणामुळे रखमाबाईंच्या विचारांची पातळी उंचावली होती. दादाजी श्रीमंत होते, परंतु निरुद्योगी होते. कुठलाच उद्योग, व्यवसाय न करता, ते आपले मामा नारायण धर्माजी यांच्याकडे राहत होते. त्यामुळे अशा निरुद्योगी माणसाच्या घरी राहण्यास रखमाबाईंनी स्पष्ट नकार दिला. विशेष म्हणजे डॉ. सखाराम राऊतांनीही दादाजींना कळवलं की, प्रतिष्ठेने राहता येईल असं वातावरण आपल्याकडे नसल्यामुळे मी माझ्या मुलीला आपल्याकडे पाठवू शकत नाही. आपली डाळ शिजत नाही हे कळल्यावर दादाजीने १८८४ मध्ये तिला वकिलांमार्फत नोटीस पाठविली. न्यायाधीश पिन्हे ह्यांच्यावर या खटल्याची जबाबदारी सोपविण्यात आली. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायमूर्ती पिन्हे ह्यांनी ‘लहानपणी लग्न झालेली मुलगी आता सज्ञान झाली आहे. निर्णय घेण्याची क्षमता तिच्यात आली आहे. चांगले आणि वाईट याची जाणीव झालेल्या स्त्रीला नवऱ्याकडे पाठविण्याची सक्ती करणे रानटीपणाचे ठरेल’, असं सांगून निर्णय रखमाबाईंच्या बाजूने दिला. ह्या निर्णयामुळे बुजुर्ग मंडळी खडबडून जागी झाली. ‘नेटिव्ह ओपिनियन’ ह्या इंग्रजी दैनिकातून कोर्टाच्या निर्णयावर टीका करण्यात आली. लोकमान्य टिळकांनीही आपल्या ‘केसरी’ वर्तमानपत्रातून टीकेची झोड उठविली. मात्र रखमाबाईंचे वडील डॉ. सखाराम राऊत मुलीच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. परंतु ह्या प्रचंड धावपळीमुळे व मानसिक ताणामुळे वयाच्या अवघ्या ४५व्या वर्षी, १८ एप्रिल १८८५ रोजी त्यांचं निधन झालं. त्यानंतर दादाजी ठाकूर यांनी कोर्टाच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात अपील केलं. मुख्य न्यायाधीश फेरेन ह्यांच्यासमोर आलेल्या ह्या खटल्याच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. ह्यावेळी मात्र हायकोर्टाचा निकाल रखमाबाईंच्या विरोधात लागला. न्यायमूर्ती फेरेन यांनी, निकालाच्या दिवसापासून एका महिन्याच्या आत रखमाबाईंनी नवऱ्याच्या घरी राहण्यास जायला हवं, असा निर्णय दिला. परंतु रखमाबाई आपल्या निर्णयापासून ढळल्या नाही. २३ वर्षांच्या रखमाबाई तोपर्यंत सामाजिक बहिष्काराला व टीकेला सरावल्या होत्या. खंबीरपणे सामोरे जात होत्या. अन्यायाला विरोध करणाऱ्या त्या रणरागिनी बनल्या होत्या. परिणामी हा वाद चिघळत गेला. देशभरातील प्रमुख वर्तमानपत्रांतून ह्या विषयासंबंधी बातम्या येऊ लागल्या आणि न्यायमूर्ती रानडे, गोपाळराव आगरकर, डॉ. भांडारकर, रावसाहेब मांडलिक, तसेच पंडिता रमाबाई अशी विद्वान मंडळी रखमाबाईंच्या पाठिशी उभी राहिली. ############### रेफरन्स: आज दि 19 नोव्हेंबर 2017 रोजी मटा लेख https://m.maharashtratimes.com/editorial/samwad/dr-rahamabais-confronta…

In reply to by पगला गजोधर

हो, साहजिक आहे. करण एखाद्या समाजातील स्त्रीच्या स्थितीला त्या समाजातील जनत्व लोक जबाबदार असतात असे माझे मत आहे. आणि किमान शहाबानोसारखे एक मोठे उदाहरण देखील समोर आहे.

In reply to by आनन्दा

टिळकांनी व त्यांच्या सारख्यांची आगपाखड सहन करून, एकप्रकारे मीडिया ट्रायल , सामाजिक बहिष्कार कित्येक वर्षे सहन करूनही.... रखमाबाई या खंबीरपणे उभ्या राहिल्या.. वैद्यकीय व्यवसायात समाजकार्य करत राहिल्या.... ... . आणि म्हणे लिबरल व स्त्रीला मानाचे स्थान देणारा धर्म... कैच्या कै हीही आनंदजी...

In reply to by पगला गजोधर

तुम्हाला माझा प्रतिसाद कळलेला दिसत नाहीये.. तेव्हा आगरकर प्रभृती लोक उभे राहिले म्हणून हिंदू स्त्रियांना इतके चांगले दिवस दिसतायत.. जेव्हा वेळ आली तेव्हा इस्लाममध्ये असे लोक उभे का राहिले नाहीत?

In reply to by आनन्दा

पुरोगामी आगरकरांनी सुद्धा एका वर्तमानपत्रातून झालेला शिव्या खाल्यात,असो आगरकरांचे क्रेडिट घ्यायला आज संस्कृती रक्षक पुढं आलेले पाहून जरा मौज वाटली. जसं सरदार पटेलांच्या क्रेडीटवर, आजकाल, त्यांना एकेकाळी रावणाचे एक मुख म्हणून दाखवणारे व त्या रावणाच्या पुतळ्याचे दहन करताना दाखवणारे व्यंगचित्र प्रसिद्ध करणाऱ्यांची पिलावळ पुढे मिरवताना दिसतात. असो, लोकांना मराठी चा अभ्यास वाढवण्याचे सल्ले देण्यापेक्षा, हुसेन दलवाई वै. बद्दल स्वतः अभ्यास वाढवावा, शिवाय सध्या च्या काळातील ट्रिपल तलाक विरुद्ध लढणाऱ्या शायरा बानो या बद्दल देखील वाचावे...

In reply to by पगला गजोधर

कैच्या के वैयक्तिक आहे. सो पास. हिंदूमध्ये अशी दीर्घकाळापासून चालत आलेली परंपरा आहे. किमान 100 नवे तरी सहज घेता येतील. मुसलमानांमध्ये 10 तरी सांगाल? बाकी सुधारणा करायची म्हणजे टीका झेलावीच लागते. पण एखाद्याचे विचार काळाच्या पुढचे असतील तर किमान पुढच्या काळात तरी मान्य होतात. तेव्हा माझ्या पणज्याने टीका केली म्हणून आज मला त्यांची स्तुती करायचा अधिकारच नाही की काय? बहुधा तुम्ही ऐतिहासिक माणसांना त्या काळच्या कसोटीवरच मोजायचे असते हे विसरलात. असो चालायचंच.

In reply to by पगला गजोधर

आमचा मनपरिवर्तनावर विश्वास आहेच. त्यामुळं बदल घडतात ह्यावरही पूर्ण विश्वास आहे. आता हेच बघाना,2014 मध्ये मंदिरात जाणारे इव्ह टिझर्स असतात म्हणणारे राहुल गांधी आज स्वतःला शिवभक्त अन मंदिरात जाणारे म्हणवून घेत आहेत! त्यामुळं काल टीका करणाऱ्यांना आज सुबुद्धी सुचून मत बदलू शकते.

In reply to by पगला गजोधर

हुसेन दलवाई का हमीद दलवाई .. माझ्यामते हुसेन दलवाई हा पक्का हिन्दूविरोधी( ब्राम्हण द्वेषाच्या गोन्डस नावाखाली) .. ABP Majha, IBN Lokmat, Zee 24taas वरच्या चर्चेत येउन लोकान्मधे फूट पाडण्याशिवाय काहीही करत नाही हा माणूस .. प्रत्येक धर्मात आणि जातीत काही वाईट स्वार्थी लोकान्नी शिरकाव केला पण त्यामुळे सगळी जात, धर्म वाईट होत नाही हमीद दलवाई म्हणत असाल तर मान्य ते मोठे विचारवन्त होते आणि त्यान्नी सर्व धर्मातल्या सर्व प्रकारच्या वाईट चालीरितीन्वर कोरडे ओढले होते ..

In reply to by रामदास२९

हुसेन दलवाई पक्का जातीयवादी व हिंदूद्वेष्टा आहे. तो सावरकरांचा अतोनात द्वेष करतो. एका चर्चेत बोलताना म्हणाला होता की सावरकरांनी विशेष काय केले? नुसती उडी तर मारली.

In reply to by पगला गजोधर

टिळकान्चा राग आगरकर आणि प्रभ्रुतिन्नी सुचवलेल्या समाज सुधारणेला नसून , इन्ग्रज सरकार हिन्दू धर्मातल्या अनिष्ट रुढी आणि चालीरिती बन्द करण्याच्या नावाखाली लोकान्मधे फूट पाडण्याचा काम करत होत त्याला होता. मवाळ नेते समाज सुधारणान्साठी इन्ग्रजान्ची मदत घ्यायला तयार होते आणि टिळक प्रभ्रुती विरोधात .. पण त्यान्चा विरोध इन्ग्रजान्च्या हस्तक्षेपाला होता.. लोकान्ना नाही .. आगरकर आणि टिळकान्ना एकमेकान्च्या विषयी मतभेद असले तरी आदर होता.. वरील प्रकरण मला माहित नाही तरी टिळक समाजसुधारणान्च्या विरोधात होते असा गैरसमज होऊ नये म्हणून एवढा सगळा .. बाकी आपण 'धर्मांतरासाठी मॉडेलवर पतीची बळजबरी' या मूळ विषयापासून भरकटलो आहोत ..

In reply to by रामदास२९

ओह आय सी, इंग्रज यायच्या आधी, हिंदु धर्मात एकोपा होता... सगळे गुण्यागोविंदाने नांदायचे. केसरीतून आगरकरांना काय काय लाखोली वाहिली गेलीय वेळोवेळी, ते एकदा तपासा... घटस्फोटित स्त्रीला वर्तमान पत्रातून मीडिया ट्रायल करणे, म्हणजे इंग्रजांवर राग व्यक्त करणे का ? आणि इंग्रजांच्याच हायकोर्टने स्त्री विरुद्ध निर्णय देऊन, आधीचा खालच्या कोर्टाचा निर्णय फिरवला.. त्यावेळेस इंग्रजांवर लेख नाही बरं आलेत ते..

In reply to by रामदास२९

उदा. टिळकांनी आगरकर ह्यांना 'माळावरचा महारोगी' म्हंटले, ह्यात त्यांचे आगरकरांवरील प्रेम व आदर दिसून येतो आणि इंग्रजांविषयी तीव्र नाराजी व्यक्त होतेय.

In reply to by आनन्दा

जसे एकीकडे आगरकर, रानडे, र.धो. कर्वे होते (आणि विरोधात टिळक होते) तसे इस्लाम धर्मात ब्रिटीश काळात मुस्लीम महिला शिक्षण आणि सुधारणेसाठी सर सय्यद अहमद मौलवी मुमताज आली खान, जस्टीस अमीर अली, मौलवी चिराग अली ही वानगी दाखल यादी. आताच्या काळात हमीद दलवाई यांचे नाव घेता येईल. मुस्लीम महिलांच्या काही संघटना जसे की भारतीय मुस्लीम महिला आंदोलन, आवाज-ए--निस्वान, मुस्लीम वूमनस् राइटस् नेटवर्क इ.

In reply to by Duishen

पण त्यांना यश किती मिळालय यावरून सुधारणांचा रेटा किती आहे ते समजून घ्या. तीन तलाक बँड व्हायला 2017 यावे लागले..

In reply to by आनन्दा

प. गो.जी तुम्हाला खरेतर मुस्लीम सुधारकबाबत नक्कीच माहिती देऊ शकले असते पण त्यांना खात्री होती की तुम्ही पुढचा प्रश्न विचारणार. तशी ती मलाही खात्री होतीच. तुमचा मुस्लीम सुधारणांवर अभ्यास असावा असे माझे मत आहे. तसे कदाचित आपण हिंदू कोड बिल वाचले का? १९५२ साली ते का फेटाळण्यात आले? त्यातील किती तरतुदी नंतर मान्य झाल्या; अजूनही किती तरतुदी मान्य होण्याचे बाकी आहे.यावरून यश किती मिळवले हे निश्चित करता येईल. मला एक आवडले की असा तुलनात्मक अभ्यास व्हावा पेक्षा तो अनेक जणांनी केलाही आहे. पण प्रत्येक गोष्ट विनासायास मिळावी किंवा विनासायास उत्तरे मिळावी अशी तुमची अपेक्षा जाणवते आहे. माझी एक विनंती आहे, कृपया आपण हिंदू कोड बिलाचा अभ्यास जरूर करावा.

In reply to by पगला गजोधर

म्हणजे बालविवाह झालेला मुलगा जास्त शिकला व त्याने पत्नी खेडवळ म्हणत तिला नान्दवण्यास नकार दिला तर तुमचे काय मत असेल?

In reply to by सुखीमाणूस

लहानपणी लग्न झालेला/ली मुलगा/मुलगी, जेव्हा सज्ञान होतात. निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात येते, चांगले आणि वाईट याची जाणीव झालेल्या, आशा मुलाला/ मुलीला, दुसऱ्या मुली/मुला बरोबर, नांदण्याची सक्ती करणे रानटीपणाचे ठरेल’.

In reply to by पगला गजोधर

मग मोदींना लोक पळपुटा वगैरे का म्हणाले होते तेव्हा? बाकी रामदास वगैरे सोडा. ती खूप जुनी उदाहरणे आहेत.

In reply to by आनन्दा

बाकीच्यांचे सोडा, आतापर्यंत लढलेल्या सर्व विधानसभा व लोकसभा उमेदवारीच्या वेळेस, निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्रात बेस्ट ऑफ माय नॉलेज अशी स्वतः विषयक माहिती द्यायची असते... मोदींना प्रत्येक वेळेस फॉर्म भरताना विस्मृतीचा अटॅक आला होता का, याचाच तपशील तुम्ही आधी द्या.

In reply to by पगला गजोधर

२०१४ पूर्वी उमेदवारी अर्जात पती/पत्नी विषयीची माहिती विचार जात नसे. मोदींना अडचणीत आणण्यासाठी खांग्रेसने २०१४ मध्ये ती माहिती भरणे सक्तीचे केले.

In reply to by श्रीगुरुजी

मोदींना अडचणीत आणण्यासाठी खांग्रेसने २०१४ मध्ये ती माहिती भरणे सक्तीचे केले. 'त्यांना ' अडचणीत यायचे कारण काय होते?

In reply to by मार्मिक गोडसे

ते अडचणीत येणारच नव्हते. खांग्रेसचा असा गैरसमज होता की ते अडचणीत येतील. परंतु कसे काहीच न झाल्याने त्याची निराशा झाली.

In reply to by मार्मिक गोडसे

'त्यांना ' अडचणीत यायचे कारण काय होते?
In June 2014 it was revealed that Narendra Modi was married and had not disclosed that he have a wife while contesting Assembly polls in 2012 and only mentioned of having a wife for the first time in 2014 election affidavit. DISCLOSURE BY THE CANDIDATES STANDING IN THE ELECTIONS The Supreme Court states that the voters have the fundamental rights to know about the candidates who are standing for election as it is very significant in the democracy in India. One point is very important for the politician for standing for an election i.e. transparency. He should disclose all information that is required to be disclosed to the public. The public has to know the candidate for whom they are going to vote for. They need to trust the person so that they know they are not electing someone who is fraud. Section 125A of Representative Act – “[125A. Penalty for filing false affidavit, etc.—A candidate who himself or through his proposer, with intent to be elected in an Election ,— (i) fails to furnish information relating information ; or (ii) give false or misleading information which he knows or has reason to believe to be false; or (iii) conceals any information, in his nomination paper delivered or in his affidavit which is required to be delivered under, as the case may be, shall, notwithstanding anything contained in any other law for the time being in force, be punishable with imprisonment for a term which may extend to six months, or with fine, or with both.].” Nishant Verma, a member of the Aam Aadmi Party based in Ahmedabad, has asked the Election Commission of India to declare Modi’s victory in the 2012 Gujarat Assembly elections null and void and also cancel his nomination from the Vadodara Lok Sabha seat for providing misleading information and making it look “as if he got married only in 2014.”

In reply to by पगला गजोधर

यात त्या स्त्रीवर अन्याय होतो आहे. म्हणजे कोणीतरी सुखी होण्यासाठी कोणावर तरी अन्याय होणारच... Secularलोकांची व्यव्स्था पण अशा तर्‍हेने अन्याय करू शकते तर..

>>> साहजिकच १८ वर्षांपर्यंत रखमाबाई माहेरीच राहिल्या. त्यानंतर १८३३ मध्ये दादाजीने त्यांना आपल्या घरी बोलावलं. आणि हे वाक्य >>> १८८४ मध्ये तिला वकिलांमार्फत नोटीस पाठविली.

प्रतिसाद वेगळ्याच दिशेला भरकटलेले दिसले,थोडं वाईट वाटलं असो, ईस्लाम चा एक तटस्थ अभ्यासक म्हणून काही मतं मांडतो,सगळ्यांना मान्य व्हावीच असे बंधन नाही +सर्व धर्म समभाव नावाची कोणतीही गोष्ट ईस्लाम मध्ये नाही +स्त्री मुखत्वे प्रजोत्पादन उपभोगाचे साधन आहे +हे जग दोन भागात विभागल्या आहे दारुल-ए-ईस्लाम आणी दारुल-ए-हारब(दारुल हरब म्हणजे काफिर भूमी),प्रत्येक श्रद्धावंत मुसलमानांचे,समस्त जगास दारुल -ए-इस्लाम बनवणे हे प्रथम कर्तवय आहे +भारतावर जगातल्या सत्तावन इस्लामिक देशांचे लक्ष आहे इंडिया इज दारुल-ए-हरब कंट्री. जिहाद साठी हे एकमेव कारण पुरेसे आहे + लक्षप्राप्ती साठी श्रद्धावंत सुयोग्य प्रकारचा जिहाद वापरू शकतो १-सहअस्तित्ववादी जिहाद,२-शान्तिपूर्ण जिहाद,३-आक्रामक जिहाद,४-शरियाही जिहाद +कृपाळू अल्लाह ने प्रत्येक श्रद्धावंतास त्या जिहाद मध्ये सहभागी होण्याचे भाग्य दिले आहे.मुजाहिद, मुजा-ही-दिन.अल्लाह च्या मार्गासाठी संघर्ष करणारा सेवक

In reply to by वडगावकर

मुळात धाग्याचा विषय राहिलाय बाजुलाच. प्रत्येकजण ईथे स्कोर सेटलिंगच्या मागे लागलाय. मुळ विषयावर करण्याजोग्या पोस्ट असूनही ईथे धुळवड होणार, अशी अपेक्षा होती आणि खेद वाटतोय कि अजिबात निराशा झाली नाही.

In reply to by मदनबाण

मदनबाणजी, सहा सोनेरी पाने लहानपणी वाचले होते. यामुळे अनेक बाबींवर प्रकाश पडला. पण शिवाजी महाराजांचा या पानात समावेश केला नाही असे स्मरते. का बरे शिवाजी महाराजांचा समावेश सोनेरी पान म्हणून झाला नसावा? हा प्रश्न अजूनही मनात घर करून आहे. जर उल्लेख असेल तर कृपया निदर्शनास आणून द्यावे. आपले यावर काही विवेचन सांगू शकाल काय?

In reply to by Duishen

नीट व्यवस्थित वाचावं असं मी सजेस्ट करेल. दुसरं मत - सहा सोनेरी पाने वाचण्यापेक्षा सरकार किंवा सरदेसाई आदी प्रभूतींनी लिहिलेली इतिहासाची बाडे वाचा असे सजेस्ट करेन.

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

सोनेरी पाने वाचून खूप वर्ष उलटली आहेत. त्यामुळे एकदा वाचणे गरजेचे आहे. सरकार म्हणजे जदुनाथ सरकार ना!

Ng एके काळी गांधीजी, पटेल, आंबेडकर, नेहरू यांना रावणाची वेगवेगळी डोकी दाखवून, त्यांची हत्या करण्याचे आधीच दाखवून देणाऱ्या मनोवृत्तीची पिलावळ, आज गांधी आंबेडकर पटेलांचे खरे वैचारिक वारसदार आपणच असे दर्शवून... स्वतःच विकृत चेहरा लपवू पाहत आहे... ज्याने हे व्यंगचित्र स्वतःच्या पेपरात छापून आणले त्यानेच पुढे गांधीजीची प्रत्यक्ष हत्या केली...ह्यांच्याकडे त्यावेळेस सत्ता असती तर पुढचा नंबर कदाचित आंबेडकर व पटेलांचा लावला असता या पिलावळीने...

In reply to by पगला गजोधर

लोकांना उपरति होत नसेल काय? बदल होतात. मला ईतके दिवस उजवे लोक हट्टी स्वभाव असलेले वाटायचे. पण आज कळले कोण जास्त कडवे आहे ते.

In reply to by सुखीमाणूस

मला ईतके दिवस उजवे लोक हट्टी स्वभाव असलेले वाटायचे.
तुमच्यामते उजवे लोक म्हणजे कोण ? उजव्या विचारसरणीचे टॉप 3 नियम सांगता येईल का ? हट्टी म्हणजे काय, त्याकडे आपण नंतर पाहू... आधी उजवे म्हणजे नक्की कोण ते सांगा.

In reply to by पगला गजोधर

भांडवलदार, हिन्दु धर्म मानणारे, डावे म्हणजे सर्व धर्म सारखे पण त्यातल्या त्यात हिन्दु धर्म अन्याय करणारा अस मानणारे बरोबर आहे ना?

In reply to by सुखीमाणूस

उजवा म्हणजे 20 Nov 2017 - 10:35 pm | सुखीमाणूस भांडवलदार, हिन्दु धर्म मानणारे
तुमच्या माहितीतील उजवेपणाची व्याख्या पाहिल्यावर एकंदरीतच आनंदीआनंद दिसतोय तुमच्याकडे... असो, सौदी अरेबिया, हा सध्या जगातला टॉपचा "उजवा" देश आहे, हे तुमच्या माहितीसाठी इथे नमूद करतो... बाकी तुमचं चालू द्यात...

In reply to by सुखीमाणूस

ओह, "उजवी" चळवळ भारतीय आहे का ? ब्वर, मग तुमच्याच व्याख्येप्रमाणे, "हिंदू धर्म मानणारे + भांडवलदार" = उजवे, बरोबर... म्हणजेच शेटजी+भटजी= उजवे बरोबर ??? भारतीय लोखंसंख्येच्या किती टक्के लोक शेटजी किंवा भटजी आहेत ??? तुमच्यामते....

भाई मतिदासांचा अमानुष वध ! आज मार्गशिर्ष शु.१ शके १५९७ मध्ये या दिवशी तेगबहादुरांचे अनुयायी भाई मतिदास यांचा करवतिने कापून हत्या करण्यात आली. या वेळी दिल्लीत मोगलांचा शेवटचा राजा पराक्रमी आणि क्रुर बादशाहा औरंगजेब राज्य करीत होता. हा मोठा धर्मांध आणि जुलमी म्हणून प्रसिद्ध आहे. विश्वासघात,कपटपणा व ह्दयहीनता वगैरे दुर्गुनांचा तो धनी होता. यांच्या राक्षसी धर्म प्रेमात अनेक अपराधी,निरपराधी लोकांची आहुती पडे. शीखांचे गुरु तेगबहादुर यांनी मुसलमानी धर्मास मान्यता दिली नाही म्हणून त्यांना कैदेत टाकले होते. अनेक अनुयायी त्यांच्या मार्गावर चालत असत. मार्गशिर्ष शु.१ ला घटलेली घटना अत्यंत ह्दयद्रावक अशीच आहे. तेगबहादुरां बरोबर त्यांचे शिष्य भाई मतिदास ही दिल्लीला कैदेत होते. त्यांच्या वधाचा फर्मान बादशाहने काढला. ऎन मध्यातून करवितीने इंच इंच या प्रमाणे डोक्या पासुन त्यांना चराचरा कापण्यात आले. असे कापले जात असताना त्यांना प्रत्येक क्षणी आता तरी मुसलमान होतो काय? असे विचारले जाई पण प्रत्येक वेळेस ते नाही असे म्हणत. या अनन्वित वेदनांत मतिदासांनी सुस्कारा देखिल सोडला नाही. दिल्लीच्या चांदणी चौकात मतिदासांच्या रक्ताचा सडा पडला. पण त्यांचा आत्मा मात्र हिंदू म्हणूनच गेला. या हत्येच्या तिन चार दिवसांनी गुरु तेगबहादूर यांचीही अमानुष पणे हत्या करण्यात आली त्यांनीही मतिदासां प्रमाणे अलौकिक धैर्य दाखवले.

Duishen, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. माझी मतं सांगतो. १.
मुद्दा क्र. ४ वरील आपले मत - यांत आक्षेपार्ह काहीच नाही. स्त्री व पुरुष समान नाहीत.
जोडीदाराच्या मृत्यूपश्चात आचरायच्या आयुष्याच्या संदर्भात हे विधान केलं होतं. स्त्री व पुरुष वेगवेगळ्या कारणांसाठी विवाह करतात. म्हणून ते समान धरले जात नाहीत. २.
मुद्दा क्र. ५ वरील आपले मत - निसर्गाने असंच बनवलं असेल तर कोण काय करणार. बायका चंचल असतात त्यात नवीन काहीच नाही.
बायका चंचल असतात यावर माझ्यापेक्षा एखादा मानसतत्ज्ञ (=सायकियाट्रिस्ट) वा आधुनिक वैद्य (=मेडिकल डॉक्टर) अधिक सांगू शकेल. ३.
मनुस्मृती भाग १ मधे आपण असे धाडसी विधान केले होते की "१०० कोटी" हिंदूनाही रुचेल.. पण स्त्रिया समान असत नाही असेही विधान केले. म्हणजे ५०% लोकसंख्येला (स्त्रियांना) तुम्ही सामाजिक सन्मान देत नाही. शिवाय "बायका चंचल असतात त्यात नवीन काहीच नाही." असे सरसकटीकरण करणारे विधान केले
स्त्री व पुरुष एकमेकांशी वेगवेगळ्या कारणांसाठी विवाह करीत असल्याने पुरुषांन मनुस्मृती गौरवलेली आवडेल आणि स्त्रियांना आवडणार नाही .....?! याला म्हणतात बादरायण संबंध जोडणे !! शिवाय स्त्रियांना सामाजिक सन्मान देणारा मी कोण? प्रत्येक जण आपापल्या वर्तनाने सामाजिक सन्मान प्राप्त करतो किंवा करते, अशी माझी समजूत आहे. ४.
आपण त.जोजीना प्रतिसाद देतांना दलित, शोषित आणि वंचितांबाबत पूर्वग्रहदुषित मत व्यक्त केले. आणि विधानात सरसकटीकरण जाणवते.
आजिबात नाही. माझा पूर्वग्रह दलित, शोषित व वंचितांच्या नावाने दुकानदारी करणाऱ्यांविषयी आहे. सरसकटीकरण जाणवलं असल्यास ते दलित, शोषित व वंचितांसंबंधी नसून त्यांच्या नावाने दुकानं चालवण्याविषयी आहे, हे कृपया लक्षात घ्यावे ही विनंती. ५.
शेवटी तर म्हणत आहात की "आहेच मुळी आमची आम्हाला काळजी."
अगदी बरोबर. बदलत्या कळशी ब्राह्मण हुशारीने जुळवून घेतात असं निरीक्षण तर बाबासाहेब आंबेडकरांनीच नोंदवलेलं आहे. ६.
जर केवळ ब्राह्मण जात आणि त्यातही पुरुष एव्हडेच जर मर्यादित आपण विचार करीत असणार तर १०० कोटी हिंदू एकत्र तरी कसे राहणार?
इथेच तर खरी गंमत आहे. एकदा का ब्राह्मण सुधारला की उरलेला भारत आपोआप सुधरेल. हे कसं होतं ते माहीत नाही. पण होतं खरं. यालाच मी ब्राह्मणजातीयवाद म्हणतो. ७.
या संकुचित विचारसरांनीमुळेच एक-एक जात धर्मांतरित होऊन जात आहे धर्मांतर करून सरळ दुर्लक्षच करत आहे..
अशा धर्मांतरित होणाऱ्या जातींसमोर मला ब्राह्मणांचा आदर्श ठेवायचा आहे. जेणेकरून हिंदू धर्माबद्दल आदरभाव वाढेल. ८.
मनुस्मृतीप्रणीत विचार करणारे हिंदूच हिंदू धर्माला अवघड परिस्थितीत आणून ठेवणार...
स्वातंत्र्यानंतर मनुस्मृती अंमलात आणली गेली नव्हती. पण तरीही काश्मीर, बंगाल व दोन्ही पाकिस्तान इथले हिंदू धोक्यात आलेच. त्यामुळे हिंदूंचं धोक्यात येणं मनुस्मृतीशी संबंधित नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

गामाजी, आपला इथला प्रतिसाद वाचला. १. स्त्री व पुरुष वेगवेगळ्या कारणांसाठी विवाह करतात. म्हणून ते समान धरले जात नाहीत. असहमत २. बायका चंचल असतात यावर माझ्यापेक्षा एखादा मानसतत्ज्ञ (=सायकियाट्रिस्ट) वा आधुनिक वैद्य (=मेडिकल डॉक्टर) अधिक सांगू शकेल. मनुस्मृतीच्या धाग्यात आपण "बायका चंचल असतात त्यात नवीन काहीच नाही. बायकांच्या मनात काय असतं ते ब्रह्मदेवाचा बापही सांगू शकंत नाही. " असे विधान केले आणि आता म्हणताय की 'एखादा मानसतत्ज्ञ (=सायकियाट्रिस्ट) वा आधुनिक वैद्य (=मेडिकल डॉक्टर) अधिक सांगू शकेल.' मला तर हे काही उमगत नाही. ३. स्त्री व पुरुष एकमेकांशी वेगवेगळ्या कारणांसाठी विवाह करीत असल्याने पुरुषांन मनुस्मृती गौरवलेली आवडेल आणि स्त्रियांना आवडणार नाही .....?! एकदा सर्वेक्षण व्हायला पाहिजे. ४. दलित, शोषित व वंचितांसंबंधी नसून त्यांच्या नावाने दुकानं चालवण्याविषयी आहे, हे कृपया लक्षात घ्यावे ही विनंती. अशी दुकाने सगळीकडेच आहेत आणि सगळीकडेच बंद व्हावीत. ५. अगदी बरोबर. बदलत्या कळशी ब्राह्मण हुशारीने जुळवून घेतात असं निरीक्षण तर बाबासाहेब आंबेडकरांनीच नोंदवलेलं आहे. काळजी करीत असताना इतरांना सोबत घेऊन जाणे महत्त्वाचे! एकएकट्याने जाऊन केवळ एकच पुढे जाईन आणि मागे राहिलेले पुन्हा कधीही सोबत येणार नाही हा सद्हेतू लक्षात घ्यावा. तसे तर बाबासाहेबांनी हिंदूकोड बिल पण सांगितले आहे. जातीसंस्थेचे निर्मूलनही सांगितले आहे. ६. इथेच तर खरी गंमत आहे. एकदा का ब्राह्मण सुधारला की उरलेला भारत आपोआप सुधरेल. हे कसं होतं ते माहीत नाही. पण होतं खरं. यालाच मी ब्राह्मणजातीयवाद म्हणतो. मला असे वाटते की मुळात चांगला माणूस बनणे ही प्राथमिक पायरी आहे. आणि हे सर्व जातीधर्माला लागू आहे. ७. अशा धर्मांतरित होणाऱ्या जातींसमोर मला ब्राह्मणांचा आदर्श ठेवायचा आहे. जेणेकरून हिंदू धर्माबद्दल आदरभाव वाढेल. माणूस म्हणून चांगले बनले की कुणीही सोबत येईल आणि आदरभाव वाढेल. शिवाजी महाराजांकडे १९ महत्त्वाचे सरदार मुस्लीम होते; ते यासाठी नाही की शिवाजी राजे विशिष्ट जाती-धर्माचे होते; ते यासाठी की शिवाजी राजांचे माणूस म्हणून मोठेपण आहे. धर्म आणि जातीपलीकडे जाऊन माणसाला माणूस बघण्याची दृष्टी होती त्यांच्याकडे! ८. स्वातंत्र्यानंतर मनुस्मृती अंमलात आणली गेली नव्हती. पण तरीही काश्मीर, बंगाल व दोन्ही पाकिस्तान इथले हिंदू धोक्यात आलेच. त्यामुळे हिंदूंचं धोक्यात येणं मनुस्मृतीशी संबंधित नाही. स्वातंत्र्यानंतर हिंदू कोड बिल तरी कुठे येऊ दिले? तरी हुंडाबळी प्रतिबंधाचा कायदा असूनही हिंदू महिलांचा बळी घेतला जातो ना! बळी घेतला जातो तो परंपरेच्या नावाने! त्यासाठी मनुस्मृती पठणाची गरज असत नाही. कुठल्याही समाज व्यवस्थेचा कुटुंब हा पाया असे म्हटल्या जाते (खरेतर माझ्या मते शिक्षण हा पाया आहे)... जर पायाच ठिसूळ झाला तर काश्मीर काय किंवा बंगाल काय किंवा भारत काय... परिस्थिती अवघडच होईल....

तर्राट जोकर, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. माझी मतं सांगतो. १.
गापै, गळपाटलेला प्रतिसाद. कशाला हरलेली लढाई लढताय?
माझ्या प्रतिसादातलं नेमकं काय गळपटलेलं आहे ते स्पष्ट करावं ही विनंती. २.
तुमच्याकडे काहीच मुद्दे नाहीत, पण उसनं अवसान आणून षड्डू ठोकताय आपले.
वरील प्रतिसादात तीन मुद्दे आहेत. जमल्यास त्यावर चर्चा करावी ही विनंती. ३.
राणीच्या कुशीत गप झोपा बघू....
तुम्ही दाखवलेल्या आस्थेबद्दल आभार. कुठे झोपायचं ते माझं मी ठरवेन. बाकी, संघसदस्याच्या बगलेत झोप ठीकठाक लागते ना? की रात्रभर दु:स्वप्ने पडतात? ४.
उगा म्यांव म्यांव करायचं आणि डरकाळ्या फोडल्याचा आव आणायचा.
मी फोडलेल्या डरकाळ्यांकडे दुर्लक्ष करणे जमत नाही का? का तुमची सुद्धा हालत खराब झालीये? नाय म्हणजे त्याचं काये की माझी म्यावम्याव किंवा डरकाळी जे काही असेल ते ऐकून काहीजणांच्या पांढऱ्याशुभ्र पंचाचा रंग बदलून पिवळा होतो. एव्हढंच नाही तर काही लोकांच्या चष्म्याचा रंगही बदलून पिवळा होतो आणि त्यांना सगळं जग कावीळमय दिसू लागतं. तुम्ही नाही ना त्यातले? ५.
अरे हां, इकडे भारतात आरक्षण असल्याने अन्याय होतो म्हणून तुम्ही रानीच्या राज्यात गेले म्हणे.... टिळकांच्या सूनबाई सांगत होत्या परवा.
अहो मी तर हिंदू धर्माची पताका फडकावण्यासाठी इथे इंग्लंडमध्ये आलो आहे. तुम्हाला माहीत नाही की काय? आ.न., -गा.पै.

श्रीगुरुजी यांना प्रश्न १. हिंदूंमध्ये घटस्फोट घेण्याची प्रोसेस कोणत्या धर्मग्रंथात आहे? २. भारतीय राज्यघटना व भारतीय कायदे सोडले तर कोणत्या हिंदू स्त्रीला कोणते अधिकार आहेत हे कोणत्या हिंदू धर्मग्रंथांत नोंदवलेले आहे? ३. राज्यघटना व नागरिकांचे अधिकार स्वातंत्र्यानंतर मिळालेले आहेत. त्याआधी हिंदू स्त्रीयांना कोणते अधिकार होते? ...मग पुढे बोलू.. हिंदु-मुस्लिम स्त्रियांच्या हक्कांतल्या फरकांबद्दल

शाहरुख खान- गौरी खान, ( हिंदू बायको ) सैफ आली खान- अमृता सिंग, करीना कपूर ( २ लग्न दोन्ही हिंदू बायका ) आमिर खान- रिना दत्ता, किरण राव ( २ लग्न दोन्ही हिंदू बायका ) अरबाज़ खान- मलायका अरोरा ( हिंदू बायको ) सोहेल खान - सीमा सचदेव ( हिंदू बायको ) इम्रान खान ( अमिरचा पुतण्या )- अवंतिका ( हिंदू बायको ) जायेद खान ( मै हूँ ना ) - मलायका पारेख ( हिंदू बायको ) फ़िरोज़ खान - सुंदरी खान ( हिंदू बायको ) फरदीन खान- नताशा माधवानी इरफ़ान खान - सुतापा सिकदर ( हिंदू बायको ) अनु मालिक ( अनवर मालिक हे त्याचे खरे नाव )- अंजू ( हिंदू बायको ) दबू मालिक- ज्योती ( हिंदू बायको ) कबीर खान ( दिग्दर्शक बजरंगी भाईजान )- मिनी माथुर ( हिंदू बायको ) फारुख शेख- रूपा ( हिंदू बायको ) मीरा नायर- महमूद मामदानी इम्तियाज़ आली - प्रीती ( हिंदू बायको ) फरहान अख्तर- रिया जैन आणि अधुना भाभानी ( २ लग्न दोन्ही हिंदू बायका ) ३री श्रद्धा कपूर त्याच मार्गावर सलमानचा बाप सलीम खान- सुशीला ( मराठी ) ( हिंदू बायको ) मुख़्तार अब्बास नकवी ( भाजप राजकारणी ) - सीमा ( हिंदू बायको ) नसरुद्दीन शाह- रत्ना पाठक ( हिंदू बायको ) अमिन सायानी ( रेडिओ वाला )- रमा ( हिंदू बायको ) इस्माइल दरबार - प्रीटी सिन्हा ( हिंदू बायको ) तलत अजीज- बिना अडवानी ( हिंदू बायको ) मोहम्मद कैफ- पूजा ( हिंदू बायको ) आपण ज्यांना ओळखतो ते हे.. अजुन यादी खुप मोठी आहे....

In reply to by babu b

बाबू भि ती यादी तुम्ही द्या की।

In reply to by तर्राट जोकर

@जोकर जोकर बुवा आज हसवून हसवून मारायचंच ठरवलंय का? यादी मी कशाला लपवून ठेवेन आणि कोंबडं झाकलं म्हणून उगवायचं थांबतंय का ?

In reply to by सुबोध खरे

हिंदू जीजाओं की लिस्ट सुनील दत्त - नर्गिस संजय दत्त - दिलनवाज शैख़ (मान्यता) ऋतिक रोशन - सुजेन खान अतुल अग्निहोत्री - अलविरा खान रोहित राजपाल - लैला खान किशन चंदर - सलमा सिद्दीकी नाना चुडास्मा - मुनिरा जसदानवाला अजय अरोरा - सिमोन खान आदित्य पंचोली - ज़रीना वहाब अजीत आगरकर - फातिमा घन्दिल्ली सुनील शेट्टी - माना कादरी सचिन पायलेट - उमर अब्दुलल्ला की बहन अरुण आहूजा (गोविंदा के पिताजी ) - नजीम शिरीष कुंदर - फरहा खान सुंदर c - खुशबू अरुण गवली - आयशा मनोज वाजपेयी - शबाना रजा पंकज कपूर - नीलिमा अज़ीम गुंडू दिनेश राव - तबस्सुम अनिल धारकर - इम्तिआज़ गुल शशि रेखी - वहीदा रहमान राज बब्बर - नादिरा ज़हीर कर्नल सोढ़ी - नफीसा अली मयूर वाधवानी - मुमताज़ रंधावा - मलिका खान विष्णु भागवत - निलोफर किशोर कुमार - मधुबाला (मुमताज़ बेगम) v s नाइपाल - नादिया कबीर सुमन - सबीना यास्मिन राजीव राय - सोनम (बख्तावर) बी आर इशारा - रेहाना सुल्तान समीर नेरुकर - तसनीम शैख़ अनुराग मोदी - शमीम कमलेश्वर नाथ सहगल - जोहरा खान विक्रम मेहता - तसनीम सौमिल पटेल - अनीता अय्यूब भारत चन्द्र नारा - जहा आरा चौधरी टीनू आनंद - शहनाज एम एस सथ्यु - शमा जैदी रवि शंकर - रोशन आरा प्रदीप चेरियन - फौजिया फातिमा पंकज उधास - फरीदा के एन सहाय - जाहिदा हुसैन ब्रिज सदाना - सईदा खानम निर्मल पांडे - कौसर मुनीर विजय गोविल - तबस्सुम अमित मोइत्रा - नाहिद करीमभॉय रूप के शोरी - खुर्शीद जहाँ हंसलाल मेहता - सफीना हुसैन कुमुद मिश्रा - आयशा रजा रणजीत बेदी - नाजनीन मनोज प्रभाकर - फरहीन रोहित रामकृष्णनन - शबनम मिलवाला गनपत लाल भट्टी - शमशाद बेगम आर के पूरी - शहनाज़ हुसैन टी के सप्रू - ताजोर सुल्ताना रमेश भगवे - जैनब महेश कौल - चाँद उस्मानी किशोर शर्मा - मलिका बानो चमन लाल गुप्ता - असगरी बाई राजा बहाद्दुर शिवेंद्र सिंह - यमन खान हेमंत भोंसले - साजिदा विवेक नारायण - सोनिया जहाँ सारनाथ बेनर्जी - बेनी आबिदी अशोक काक - जबीं जलील सुमेध राजेंद्रन - मासूमाँ सय्यद धीरज सिंह - सहर जहाँ गौरव करण - फातिमा मेहंदी मनीष तिवारी - नाजनीन शिफा शिरीष गोडबोले - ज़रीना मोइदु इन्द्रजीत गुप्ता - सुरैया सीताराम येचुरी - सीमा चिश्ती नरसिंह ज्ञान बहाद्दुर - जुबैदा बेगम सुमित सहगल - शाहीन अर्जुन प्रसाद - परनिया कुरैशी बालगन्धर्व - गोहर जान कर्नाटकी रणजीत मल्होत्रा - रुबीना बक्षी गजेन्द्र चौहान - हबीबा रहमान राजीव राव - सोनिया फतह संजय भौमिक - सबा नकवी पी जी सतीश - शकीला मलिन गज्जर - उमैमा बंदूकवाला सचिन उपाध्याय - नाजिया युसूफ राजिव सिंह - सनोबर कबीर रितेश पंड्या - रोही मिर्ज़ा विन्दु - फरहा नाज़ अनिल विश्वास - मेहरुन्निसा

In reply to by babu b

सौन्दर्यवती आदिती गोवित्रीकर खान, भक्ती बर्वे इनामदार. सुब्रह्मण्यम स्वामी बाबत माहिती आहे का कोणाला ?

In reply to by पगला गजोधर

सुब्रमण्यम अगर पद्मावती की बजाय खुद की बेटी की चिंता करता तो उसका दामाद हैदर ना होता ! असं फेबु , व्हाट्सपावर वाचले.

In reply to by babu b

सध्याच्या स्मृती इराणी या पूर्वश्रमीच्या स्मृती मिश्रा बरे ..... पण हा जिहाद नव्हे, कारण त्या एका देशभक्त पक्षात आहे साध्याला....

In reply to by पगला गजोधर

मग ती लव्ह जिहाद ची केस कशी होइल? धागा लेखक तर मुस्लिम मुलान्शी लग्न न करण्याबद्दल सान्गतो आहे.

In reply to by पगला गजोधर

गंमतच ... स्मृती इराणीनी पारशी माणसाशी लग्न केले. मुले झाली , त्यांचीही नावे पारशीच वाटतात . मुसलमान नवरा करून मुलांची नावे मुस्लिम ठेवली , तर मात्र हिंदुंच्या पोटात दुखतं !