मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

धर्मांतरासाठी मॉडेलवर पतीची बळजबरी

ओम शतानन्द · · काथ्याकूट
रश्मी शहाबाजकर नामक एकेकाळच्या model ची बातमी - १२ वर्षापूर्वी असिफ नामक इसमाशी तिने प्रेमविवाह केला , सर्व धर्म एकच सत्य सांगतात, सर्व धर्म सारखेच , एखादी व्यक्ती मुस्लीम असो की हिंदू , प्रेमात धर्म बघणे म्हणजे प्रतिगामित्व असल्या मूर्ख , भोंगळ समजुती असलेल्या पुरोगामी समाजवादी गांधीवादी सेकुलर विचारसरणीची असावी. नेहमी प्रमाणे या असिफने तिला प्रेमाच्या जाळ्यात फसविण्यासाठी आपण कट्टर धार्मिक नाही आणि लग्न केल्यावर धर्म बदलणे आवश्यक नाही , तुझा धर्म तुझ्यापाशी ,माझा माझ्या पाशी अशी खोटी आश्वासने दिली . कुठलीही मुलगी प्रेमात पडली की तिला स्वत:चे प्रेम आणि स्वत;चे सुख यापुढे दुसरे काही दिसत नाही, जाणवत नाही, आणि ती स्वत:च्या आई वडील नातेवाईक यांना सोडून जायला एका पायावर तयार असते . आपल्या लग्नाचे काही सामाजिक परिणाम होतील याचा विचार करणे दूरच . महत्वाचे एकच आपला स्वार्थ . स्त्री हे पुनरुत्पादन करणारे यंत्र . हिंदू मधील जेवढ्या स्त्रिया आपल्या धर्मात येतील तेवढे फायदेशीर , तेवढी अधिक मुस्लीम संतती पैदा होईल . संख्याबळ वाढले की आपली शक्ती वाढली आणि मग देशात जगात सर्व ठिकाणी आपलाच धर्म प्रस्थापित होण्याकडे झपाट्याने वाटचाल. अशी विचारसरणी असलेले शांतीप्रिय धार्मिक लोक हिंदू स्त्रियांना प्रेमाच्या जाळ्यात फसविण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात आणि आपल्या मूर्ख हिंदू स्त्रिया त्यास बळी पडतात . लग्न नंतर सर्व आश्वासने गुंडाळून ठेवून या असिफ ने रश्मी ला धर्मांतर करण्यासाठी दबाव छळ सुरु केला , तिच्या मुलालाही तिच्या पासून तोडले , मुलाला असे पढविले की तुझी आई च्या घरात सैतान राहतो कारण ती हिंदू धार्मिक रिती पाळते . या असिफ च्या जाळ्यात अजून एक इशिता नावाची मूर्ख हिंदू मुलगी - त्याच्या अर्ध्या वयाची - सापडली . धर्मांतर करून त्याच्याशी लग्न करून राहू लागली. हा असिफ व त्याचे नातेवाईक रश्मी ला धर्मांतर करण्या साठी धमकावत आहेत . आपले पुरोगामी लोक आतातरी लव जिहाद चे वास्तव स्वीकारतील का आपल्या मूर्ख हिंदू स्त्रियांना कधी अक्कल येणार कोण जाणे

वाचने 87592 वाचनखूण प्रतिक्रिया 413

In reply to by आनन्दा

पगला गजोधर गुरुवार, 12/07/2017 - 17:28
एका माजी ‘कारसेवका’ची डायरी पडघम - बाबरी पतन अभिजित देशपांडे ‘एक होता कारसेवक’ या पुस्तकाचं लेखक, अभिजित देशपांडे http://www.bookganga.com/eBooks/Books/Details/4987523823755161558 ६ डिसेंबर १९९२ या दिवशी मी कारसेवक म्हणून अयोध्येत होतो. मशीद पाडणाऱ्यांतही सहभागी झालो. पण नंतर भारतभर उसळलेल्या हिंदू –मुस्लीम दंगलींनी मला अस्वस्थ केलं. याच अस्वस्थतेतून वाचत, विचार करत पुढे कट्टर हिंदुत्ववादी ते एक मुक्त, धर्मातीत माणूस असा आंतरिक प्रवास केला. आतल्या अस्वस्थतेतूनच ‘एक होता कारसेवक’ हे छोटेखानी पुस्तकही लिहिलं. त्याच्या आजवर चार आवृत्त्या आल्या. माझं हे पुस्तक या पंचवीस वर्षांत खरं तर अप्रस्तुत ठरायला हवं होतं, पण तसे होताना दिसत नाही, याची एक नागरिक म्हणून काळजी वाटते. …………………………………………………………………………………………… १९८९-९० चा तो काळ. अयोध्या प्रश्नही तापायला सुरुवात झाली होती. घरी संघाचं वातावरण होतं. वडील संघाचे सक्रिय कार्यकर्ते होते. आई आणि काका १९९०च्या कारसेवेत सहभागी होऊन अटकेत राहून लाठ्या खाऊन आले होते. मुलायमसिंग सरकारनं कारसेवकांवर केलेल्या लाठीमाराचे व्हिडिओज देशभर गल्लोगल्ली दाखवून संघ परिवारानं त्याचं भांडवल करायला सुरुवात केली होती. मी त्या वेळी जेमतेम १९ वर्षांचा होतो. मराठवाड्यात परभणीत एका संघशाखेचा कार्यवाह होतो. संघ बैठकींना नियमित जात होतो. विश्व हिंदू परिषदेच्या विविध सभांना गर्दी गोळा करण्याची जबाबदारी माझ्यासारख्या अनेक संघ कार्यकर्त्यांवर होती. त्याच वेळी शाखेत एक खेळ नव्यानं सुरू करण्यात आला होता - एका गटाच्या हातात रूमाल बांधलेली काठी, ती त्यानं कसोशीनं वाचवायची नि दुसऱ्या गटानं त्यावर हल्ला करून ती काठी पळवायची. हा मंदिर-मशिदीचाच खेळ होता. आक्रमकपणाची व्यवस्थित पेरणी चालू होती. संघ कार्यर्त्यांचं जाळं पसरत होतं नि त्या प्रमाणात समाजातून हिंदुत्ववादी विचारांना पाठबळ मिळत असल्याचं मी पाहत होतो. अयोध्या प्रश्नाचं भांडवल करून हिंदुत्ववादाचं संभाषित पेरलं जात होतं. तरारून उगवतही होतं. "पाचशे वर्षांपूर्वी बाबर नामक मुस्लीम आक्रमकानं अयोध्येतील रामजन्मभूमी स्थान उद्ध्वस्त करून तिथं मशीद बांधली. हीच ती बाबरी मशीद. ही मशीद म्हणजे हिंदू अस्मितेवरील कलंक आहे. ती बघून तुमचं पित्त खवळत नाही काय? बाबराची औलाद आज समाजातही आहे नि सरकारातही. ती वेळीच ओळखली पाहिजे. ठेचली पाहिजे. हिंदू बहुसंख्य असूनही त्यांचा पदोपदी अपमान करणारं सरकार मुसलमानांचं मात्र लांगुलचालन करत आहे. मुसलमानांच्या एकगठ्ठा वोटबॅंकेवर त्यांचा डोळा आहे. त्यामुळे अयोध्या प्रश्न सरकारी चर्चांच्या गुऱ्हाळानं सुटणार नाही. रामजन्मभूमी हा श्रद्धेचा  विषय आहे. अयोध्या ही रामाची जन्मभूमी आहे, ही कोट्यवधी हिंदूंची  परमश्रद्धा आहे. जगातलं कुठलंही न्यायालय त्यात हस्तक्षेप करू शकत नाही. हा आमच्या भावनांचा विषय आहे. हिंदूंच्या भावनांशी सरकार खेळत आहे. आम्ही जगात सर्वाधिक सहिष्णू  आहोत. पण त्याचाच गैरफायदा घेत मुस्लिमांनी आमच्यावर सातत्यानं आक्रमण केलं. अन्याय केला. स्वातंत्र्यानंतरचं सरकारही मुस्लिमधार्जिणंच राहिलं आहे. हिंदूंवर अजूनही प्रत्येक बाबतीत अन्याय होतो आहे. हिंदूचेतना आता जागी झाली आहे. मागून मिळत नसेल तर संघर्ष करून आम्ही हिंदू न्याय मिळवूच. हे धर्मयुद्ध आहे. इथं आता हार नाही. विजय ही विजय है. अयोध्या तो झांकी  है... काशी-मथुरा  बाकी है... गर्व से कहो हम हिंदू है... कहो... जय श्रीराम...!" आसमंत दणाणून टाकणारा उन्माद पद्धतशीरपणे पसरवला जात होता. कार्यकर्ते घरोघरी जाऊन,  प्रत्यक्ष भेटून लोकांना हे पटवून देत होते. आक्रमकपणे ठसवत होते. या पार्श्वभूमीवर १९९२ च्या कारसेवेची घोषणा केली गेली. संघ परिवारानं आता दुप्पट जोमानं तयारी करून लाखो लोक अयोध्येत जमा केले - त्यात मीही एक होतो. संघाच्या 'हिंदुत्ववाद म्हणजेच ‘राष्ट्रवाद' या विचारांचा पगडाच इतका होता की, माझं अयोध्येला जाणं जणू स्वाभाविकच होतं. माझ्यासारखे संघविचारांमध्ये घोळवलेले लोक होतेच. पण ज्यांचा संघाशी, संघविचारांशी थेट संबंध नाही, असेही कितीतरी लोक होते. किंबहुना तेच बहुसंख्य होते. त्यांच्या दृष्टीने हा श्रद्धेचा प्रश्न होता. धर्मयुद्ध होतं. त्यांत त्यांना खारीचा वाटा उचलायचा होता. तरुण पोरं  होती. म्हातारेकोतारे होते. राज्याराज्यांतले, नानाविध जातीजमातींचे लोक होते. हिंदुत्ववादाच्या छत्राखाली तमाम हिंदू एकवटला  आहे, असं बृहदचित्र उभं राहिलं होतं खरं, पण त्याला ठळकपणे मुस्लीमविद्वेषाची किनार होती. ध्रुवीकरणाचं नेपथ्य तयार झालं होतं.  एक डिसेंबरच्या मध्यरात्रीच एका भल्या मोठ्या गटासह मी अयोध्येला पोहोचलो. देशभरातून असे जत्थेच्या जत्थे अयोध्येत येऊन दाखल होत होते. वेगवेगळ्या घाटांवर तात्पुरत्या छावण्या उभारून त्यांची राहण्याची सोय केली गेली होती. अयोध्येत छोटी मोठी अशी कैक मंदिरं, घाट व कुंड आहेत. ते सारं पाहत शेवटी आम्ही बाबरी मशीदीच्या त्या वादग्रस्त वास्तूत शिरलो. खूप जुनी पण भव्य वास्तू. निव्वळ तीन घुमट. त्यातल्या एका घुमटात रामललाच्या मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या. टप्प्याटप्प्यानं कारसेवकांचे जत्थे आणून त्यांना रामललाचं दर्शन करवलं जात होतं. सगळं काही शिस्तीत चाललं होतं. तिथून फार तर एखाद-दीड किलोमीटर अंतरावर विश्व हिंदू परिषद व रामजन्मभूमी न्यास यांची कार्यालयं होती. तिथं देशभरातून कारसेवेसाठी आणलेल्या विटांचे ढीगच्या ढीग होते. जवळच खांबासाठीचे कोरीव दगड ठेवलेले होते. राममंदिरासाठीची ही पूर्वतयारी आहे, असं कारसेवकांना आवर्जून सांगितलं जात होतं. हजारोंच्या संख्येनं रस्त्यारस्त्यांतून फिरणारे हे कारसेवक परस्परांना ‘जय श्रीराम.. !’च्या घोषणांनी अभिवादन करत होते. वातावरणात मग अधिकच त्वेष चढत होता. तीन, चार, पाच डिसेंबर या तारखांना विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांचे अनेक नेते, तमाम साधू-संत अयोध्येत दाखल होऊ लागले होते. मशीद परिसरातच भव्य मैदानात स्टेज उभारलेलं होतं. तिथं कारसेवकांसाठी भजन कीर्तन, नेत्यांची ज्वलज्जहाल भाषणं होत होती. क्रमाक्रमानं ज्वर वाढत होता. फोफावत होता. सहा डिसेंबर १९९२. सकाळी आठ वाजल्यापासूनच लाखो कारसेवक त्या मैदानात जमले होते. डाव्या बाजूला मशीदीच्या दिशेनं रोख असलेले भलं मोठं स्टेज. तिथं भजन संकीर्तन सुरू झालं होतं. उजव्या बाजूला मशिदीचे तीनही घुमट ठळकपणे दिसत होते. मधला सगळा परिसर लाखो कारसेवकांनी फुलून गेला होता. मग दहाच्या सुमारास विविध नेते मंचावर यायला सुरुवात झाली. त्यात लालकृष्ण अडवाणी, अशोक सिंघल, उमा भारती, प्रमोद महाजन, विनय कटियार, मुरली मनोहर जोशी, साध्वी ऋतुंभरा, आचार्य धर्मेंद्रजी, आचार्य गिरीराज किशोर... आणि कैक. मंचावरून त्यांची ज्वलंत भाषणं सुरू झाली. त्या सर्वांचा साधारण आशय असा - "बाबरी मशीद हा  आपल्या हिंदू अस्मितेवरील एक कलंक आहे... परिंदा भीं पर मार नहीं सकता- असे म्हणणाऱ्या मुल्ला मुलायमला धडा शिकवायलाच हवा... हिंदू आता गप्प बसणार नाहीत... रामजन्मभूमी लेकर ही रहेंगे..."  ही भाषणं चालू असतानाच मधून मधून घोषणा दिल्या जात होत्या. "तेल लगाओ डाबर का, नाम मिटाओ बाबर का... अयोध्या  तो झांकी  है, काशी  मथुरा  बाकी है... गर्व से कहो, हम हिंदू है.. जय श्रीराम...!" या प्रकारच्या घोषणा देण्यात सर्वाधिक पुढे होते आचार्य धर्मेंद्रजी, विनय कटियार, उमा भारती... आणि सर्वाधिक चिथावणीखोर भाषणंही त्यांचीच होती. लाखोंच्या संख्येनं जमलेले कारसेवक आणि परिसर दुमदुमवून टाकणाऱ्या त्यांच्या घोषणा... दुपारी पावणेबाराच्या आसपास काहीतरी गदारोळ सुरू झाला. स्टेजवरची भाषणं जराशी गडबडली. नक्की काय झालं, सुरुवातीला काहीच कळेना. मग कुणीतरी ओरडलं, मशिदीवर कारसेवक चढले आहेत आणि घुमटावर भगवा झेंडा फडकवत आहेत... संपूर्ण वातावरणात उन्मादाची एकच लाट उसळली. मग कारसेवकांतूनच वरीलप्रमाणे घोषणांच्या लाटांवर लाटा उसळत राहिल्या.  "कृपया, शांती बनायें रखे..."  असं व्यासपीठावरून नाममात्र आवाहन एक-दोनदा केलं गेलं. अर्थातच, ते जुमानण्याच्या मन:स्थितीत आता कुणी नव्हतं. मंचावरचे काही नेते आता निघून गेले होते. हा गोंधळ, उन्माद सलग दहा-पंधरा मिनिटं तरी टिकला. उत्स्फूर्त घोषणाबाजी चालूच होती. तोवर लक्षात आलं, आता चार-दोनच नाही, तर अनेक कारसेवक कुंपण भेदून, झाडांवर चढून मशिद परिसरात शिरले होते. त्यांच्या हातातला भगवा झेंडा दुरूनही ठळकपणे जिसत होता. आता तर मंचावरूनही घोषणा सुरू झाल्या, "एक धक्का और दो, बाबरी मसजिद तोड दो.., "कृपया, शांती बनायें रखे..."चं कोरडं आवाहन करून अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी मंचावरून निघून गेले. आणि मंचाचा ताबा विनय कटियार, आचार्य धर्मेंद्रजी व उमा भारती आदींनी घेतला. या घोषणाबाजीनंतर जो तो उन्मादानं भारून त्या प्रचंड गर्दीतही मशिदीच्या दिशेनं सरकू लागला. तिथपर्यंत जाण्यासाठी धडपडू लागला. थोड्या वेळानं मंचावरचे आवाजही विरले. मंच ओस पडला. आणि कारसेवकांचे जत्थे पुढे पुढे सरकत राहिले. या गर्दीतून मार्ग काढत मी व माझ्या तुकडीतले लोक दोन वाजण्याच्या सुमारास मशिदीच्या कुंपणाशी पोहोचलो. त्यावेळेस  "कृपया, यहां भीड न करे... शांतीसे काम करने दे..." असं विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते कुंपणाशी कारसेवकांना ओरडून सांगत होते. सर्वांनाच आत जाऊ देत नव्हते. मी तिथं बराच वेळ रेंगाळलो. दुपारी साडेतीन–चारच्या सुमारास कुंपणाशी परत गेलो. खरं तर, कुंपण असं काही आता शिल्लक राहिलंच नव्हतं. आता मात्र माझ्या तुकडीला आत प्रवेश मिळाला. आत जाईतो, तिथं काय चालू आहे, याचा सपशेल अंदाज येत नव्हता. आत मात्र व्यवस्थित, शिस्तबद्ध रीतीनं काम चालू होतं. कुदळ-फावडे घेऊन एक जत्था मशिदीच्या भिंतींवर घाव घालत होता. दुसरा गट घमेल्यांतून तो मलबा दूर करण्याचं काम करत होता. रांगेत उभं राहून "जय श्रीराम...!"च्या घोषणाबाजीत घमेली पुढे सरकवली जात होती. एखाद्या भव्य इमारतीचं बांधकाम ज्या शिस्तीत व समन्वयानं चालतं, त्याच शिस्तीत हेही सारं चालू होतं. तसा समन्वय राखण्याचं काम बजरंग दलाचे कार्यकर्ते करत होते. फरक इतकाच होता, इथं बांधकाम पाडले जात होते. रात्रीपर्यंत मशीद भुईसपाट झाली. दरम्यान उत्तर प्रदेशचं कल्याणसिंग सरकार बरखास्त करण्यात आलं होतं. अनेक ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली होती. अयोध्येत अर्थातच या संचारबंदीला अर्थ नव्हता. मध्यरात्री अडीच वाजताच उठवून कारसेवकांना पुन्हा मशीद स्थानाकडे नेण्यात आलं. तिथं आता रामजन्मभूमीचे पुरावेच आढळले आहेत, असं सांगितले गेलं. सकाळपासून पुन्हा जत्थ्याजत्थ्यानं या कुंपण परिसरातला मलबा खणून घमेल्यांनी माती दूर करण्याचं काम अर्थात कारसेवा चालूच राहिली. तोवर हळूहळू सैन्यदलाच्या तुकड्यांनी अयोध्येचा ताबा घ्यायला सुरुवात केली आणि कारसेवकांना तिथून पिटाळून लावलं. विशेष रेल्वेगाड्यांनी कारसेवकांना अयोध्येतून बाहेर काढलं जाऊ लागलं. जे घडलं ते अविश्वसनीय होतं. या उन्मादी आनंदातच मीही गावी परतलो. पण तोवर बाहेरच्या बातम्या येऊ लागल्या. देशभर तणावाचं वातावरण होतं. अनेक ठिकाणी संचारबंदी होती. स्टेशनांवर शुकशुकाट होता. दंगली उसळल्याच्या बातम्या येत होत्या. त्या सगळ्यानं क्रमश: पण अस्वस्थ होत गेलो. आणि कारसेवेचा सगळाच माज खाडकन उतरला. माझ्या कारसेवक असण्याच्या उन्मादाची माझी मलाच चीड आली. हिंदू असण्याच्या गर्व पोकळ वाटू लागला. मी एक मोठाच सामाजिक गुन्हा केलाय, या जाणिवेनं मला ग्रासलं. आणि मग मी कारसेवक अथवा हिंदू राहिलो नाही. विचारांनी आणि विचारान्ती बदलत गेलो. बाबरी मशीद पाडली जाणं, हे केवळ एक वास्तूचं उद्ध्वस्त होणं नव्हतं. मुस्लीम धर्मावर केलेला तो प्रतीकात्मक हल्ला तर होताच, पण भारतीय धर्मनिरपेक्षतेवरचाही तो हल्ला होता. हिंदूंनी स्वत:च्याच सहिष्णूतेला उद्ध्वस्त केलं होतं. हिंदू विरुद्ध मुस्लीम, मंदिर विरुद्ध मशीद, एवढ्याच मर्यादित परिघातला हा प्रश्न नाहीच. त्याचा आवाका त्याहून खूपच मोठा आहे. या प्रश्नाला ठळकपणेच चार पक्ष आहेत : रामजन्मभूमीचा मुद्दा हिंदू अस्मितेच्या केंद्रस्थानी आणून धर्माचं राजकारण करणारे कट्टर हिंदुत्ववादी हा त्याचा पहिला पक्ष. बाबरी मशीद ही जणू आपल्या अस्तिवाचीच लढाई असल्याचं भासवून अडाणी-निरक्षर-गरीब मुस्लिमांना मूळ प्रश्नांपासून विचलित करणारे मुस्लीम कट्टरपंथीय हा त्याचा दुसरा पक्ष. हिंदूंनांही गोंजारायचं आणि मुस्लिमांचंही लांगुलचालन करत त्यांना वोटबॅंक म्हणून वापरणारे नि धर्मनिरपेक्षतेकडे केवळ एक राजकीय सोय म्हणून बघणारं सरकार हा त्याचा तिसरा पक्ष. आणि चौथा पक्ष म्हणजे खुद्द तत्कालीन परिस्थितीत गोंधळलेला भारतीय समाज. मंडल आयोगाच्या अंमलबजावणीनंतर समाजाचं जातीय व राजकीय ध्रुवीकरण वेगानं झालं होतं. आर्थिक प्रश्न देशाला भेडसावत होते. मुख्य प्रवाहातील राजकीय पक्षांना जनतेनं नाकारल्यानं प्रादेशिक पक्षांच्या आशा-आकांक्षांना धुमारे फुटत होते. वैचारिक सामजिक चळवळी क्षीण झाल्या होत्या. विचारबळांच्या अभावी असणारा सैरभैरपणा समाजात सार्वत्रिक होता. असा हा गोंधळलेला, भग्न, शतखंडीत, तणावग्रस्त समाज- हा या प्रश्नाचा चौथा पक्ष. याच परिस्थितीतून रामजन्मभूमी बाबरी मशीद अशा नॉन इश्यूला बळ मिळालं होतं. महत्त्वाचे, तातडीचे प्रश्न मागे पडले होते. आज बाबरी मशीद पाडली गेली, या घटनेला तब्बल पंचवीस वर्षं पूर्ण झाली. दरम्यान जागतिकीकरण व राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय राजकीय चित्र पार बदललं आहे. स्वत:ला अभिमानानं हिंदुत्ववादी म्हणवणारी संकुचित आचार-विचारांची सरकारं राज्याराज्यांत व केंद्रात विराजमान आहेत. गुजरात दंगल घडवणारेच आता पंतप्रधान होऊन बसले आहेत. लव्ह-जिहाद, गो-वंशरक्षण, असे कृतक मुद्दे उपस्थित करत तणाव पेरला जात आहेच. ‘मंदिर वही बनायेंगे’च्या घोषणा नव्यानं दिल्या जाताहेत. सर्वोच्च न्यायालयात हा प्रश्न प्रलंबित असला तरी त्याचं राजकीयीकरण सर्वच पक्षांकडून केलं जात आहे. निवडणुका जवळ आल्या की, पुन्हा एकदा या मुद्यावर वातावरण तापवलं जाईल. "साधो, देखो जग बौराना! सांची कहौ तो मारन धावे, झुठे जग पतियाना.. हिंदू कहत है राम हमारा, मुसलमान रहिमाना.. आपस मे दोऊ लडे मरत है, मरम कोई नही जाना..." शेकडो वर्षांपूर्वी, कबीरानं लिहून ठेवलेलं पुन्हापुन्हा प्रस्तुत ठरावं, ही भारतीय समाजकारणाची शोकांतिकाच आहे.

In reply to by पगला गजोधर

सुबोध खरे गुरुवार, 12/07/2017 - 18:43
मुस्लीम धर्मावर केलेला तो प्रतीकात्मक हल्ला तर होताच, पण भारतीय धर्मनिरपेक्षतेवरचाही तो हल्ला होता. हा मुस्लिम धर्मावर हल्ला नव्हता तर शाहबानो प्रकरणानंतर तुमच्या भूमीचा कायदा बदलला गेला त्या मुस्लिम लांगूलचालनावर प्रतीकात्मक हल्ला होता. राजीव गांधींनी "केवळ मतांसाठी" सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बदलण्यासाठी कायदा आणला तेंव्हा या बुबुडा विपुमाधवी लोकांना हा धर्मनिरपेक्षतेवरचा हल्ला वाटला नाही याचा संताप आहे. माझ्या सारखे असंख्य हिंदू आहेत जे कधी शाखेत गेले नाहीत. आम्ही कधी राम मंदिरात गेलो नाही. ज्यांना अयोध्येत राममंदिर उभे राहते कि नाही त्याच्याशी पण सोयर सुतक नाही. माझ्या सारखे लष्करात राहून सुशिक्षित मुसलमानांच्या खांद्याला खांदा लावून लढलेले अनेक लोक आहेत अशा असंख्य लोकांना या लांगूलचालनाची शिसारी आली. सर्व धर्माना समान नागरी कायदा यावा जशी समान दंडविधान संहिता (क्रिमिनल प्रोसिजर कोड) आहे. अशीच विचार सरणी असणारे लोक जेंव्हा इस्लामिक बँकिंग येते म्हटल्यावर अस्वस्थ होतात अशा लोकांची ती प्रतिक्रिया होती. आम्ही मुसलमानांना तितकेच राष्ट्रभक्त मानतो जितके आम्ही स्वतः राष्ट्रभक्त आहोत. पण मतांसाठी काँग्रेसने जितके मुस्लिम लांगुलचालन केले तितके कुणीही केले नाही याचा नक्कीच संताप आहे. इशरत जहाँ सारख्या स्त्रीच्या नावाने रुग्णवाहिका काढणाऱ्या लोकांचा संताप आहे. ओवैसी अबू आझमी सारखे लोक जे "देश के कितने भी तुकडे हो जाये लेकिन हम किसीको अपने मझहब के साथ खिलवाड करने नही देंगे" असे भर सभेत बोलतात अशांबद्दल हा संताप आहे. शिवाजी महाराजांचा आदर्श बाळगणारे माझ्या सारखे अनेक लोक आहेत जे मुस्लीम "धर्मावर" हल्ला करणार नाहीत पण त्यांची दाढी कुरवाळलेली पण पटणार नाही. बाकी मुसलमान लांगुलचालन करणे म्हणजेच पुरोगामीत्व असेल तर मी स्वतः ला आनंदाने सनातनी म्हणवून घ्यायला तयार आहे

In reply to by सुबोध खरे

पगला गजोधर गुरुवार, 12/07/2017 - 23:30
याला सुद्धा प्रतिकात्मक हल्ला म्हणणार का ? डॉ माया कोडनानी, सारखे लोकं डॉ असल्याचा इमेजचा फायदा घेऊन, समाजात विष पसरवतात, डॉ म्हणायच्या लायकीची तरी आहे अशी पिलावळ.... अशी डॉ व्यक्ती म्हणजे भारताला झालेला कँसरच.... 'Burnt man to death to save girl from love jihad': New video in Rajsamand case goes viral The victim being burnt alive in the viral video, allegedly for 'love jihad', has been identified as Mohammed Bhatta Sheikh. By Dev Ankur Wadhawan |  December 7, 2017 A horrifying video of a man being burnt alive in Rajasthan's Rajsamand district has gone viral on social media. The videos shows a man identified by police as Mohammed Bhatta Sheikh being thrashed and then set on fire by another man, identified Shambunath Raigar. After killing Sheikh, Raigar made another video where he talks to the camera. In the second video, Riagar, who was arrested by police today morning, not only admits to the crime but justifies the horrifying act, saying he killed Sheikh in order to save a girl from "love jihad." 

In reply to by पगला गजोधर

सुबोध खरे Fri, 12/08/2017 - 09:32
एका माथेफिरूने केलेला खून आणि देशाच्या पंतप्रधानाने केवळ मतांसाठी केलेला कायद्यात बदल याची एकाच पातळीवर तुलना केलेली पाहून हसावे कि रडावे कि आपल्या अफाट बुद्धीचा आदर करावा हे कळत नाही __/\__.

In reply to by सुबोध खरे

मोदक Fri, 12/08/2017 - 11:57
सोयीचे असते तेंव्हा राजीव गांधी आणि काँप्युटर युग वगैरे आठवते.. अन्यथा राजीव गांधीं = माथेफिरू हे यांचे पगले रंग. हिंदूद्वेष केला नाही तर पोटावर पाय येतो. मजबूरी असते डॉक.. समजून घ्या.

In reply to by पगला गजोधर

मामाजी गुरुवार, 12/07/2017 - 23:29
प गो साहेब, उत्तम ऊदाहरण. आता या ऊदाहरणावरून बोध घेउन आपण आपला मोदिद्वेषाचा व पर्यायाने हिंदुद्वेषाचा उन्माद जो प्रत्येक प्रतिसादातुन व्यक्त करता त्यातुन केव्हा बाहेर पडणार?

In reply to by पगला गजोधर

पुंबा Mon, 12/11/2017 - 13:10
अभिजीत देशपांडेंचा हा लेख आधी वाचला होता. तेव्हादेखिल पटला आणि आवडला होता. माझे देखिल असेच हिंदूत्ववादी ते धर्मातित/विचारप्रणालीतीत भारतिय नागरिक असे परिवर्तन झाले आहे.(ही प्रक्रिया पूर्ण झाली असे म्हणणार नाही कारण अभ्यास, चिंतन चालूच आहे अजून) २५ वर्षांत भारतीय गणराज्याचे नागरिक अशी ओळख पुसटच होत चालली आहे. धार्मिक किंवा जातीय आयडेंटिटी आपल्याला अधिक महत्वाची वाटत आहे. हे योग्य नाही आणि भारतासारख्या प्लुरलिस्ट देशाला बहुतांश नागरिक असे एकारलेला धार्मिक डॉग्मा असणारे असणे परवडणार नाही.
I should say, "Love is wise; hatred is foolish." In this world, which is getting more and more closely interconnected, we have to learn to tolerate each other. We have to learn to put up with the fact that some people say things that we don't like. We can only live together in that way. And if we are to live together, and not die together, we must learn a kind of charity and a kind of tolerance, which is absolutely vital to the continuation of human life on this planet.
बर्ट्रान्ड रसेलचा वरील सल्ला अशा वेळेस अधिकच रिलेव्हन्ट वाटू लागतो.

In reply to by श्रीगुरुजी

Duishen Sun, 11/19/2017 - 02:58
श्रीगुरुजी, "आपल्या मूर्ख हिंदू स्त्रियांना कधी अक्कल येणार कोण जाणे" या विधानाला आपण "जड अंत:करणाने सहमत" झाला आहात. मूर्ख म्हणजे बुद्धी नसणारे किंवा बुद्धी कुंठीत असल्याचा अर्थ निघतो. अशा सर्व (हिंदू) स्त्रिया आहेत असे सरसकटीकरण असणाऱ्या वाक्याला आपण सहमती दर्शवली आहे. असे विषमतामूलक वाक्य मनुस्मृतीकृत आहे आणि आपण मनुस्मृती वाचली नाही असे आपले म्हणणे आहे. खरेतर तुम्ही मनुस्मृती वाचली नाही या तुमच्या विधानावर माझा विश्वास आहे. हिंदू समाजातील ९९% लोकांनी ती वाचली नाही असेही मला वाटते. पण विषमता समर्थन करण्यासाठी मनुस्मृती वाचलीच पाहिजे असे मला वाटत नाही. गातानुगतिक परंपरा आपल्याला ही विषमता शिकवतात आणि कुणी कुणी तर हे स्वेच्चेने विषमतामूलक जीवन स्वीकारतात कारण त्यात सत्तास्थानाचा फायदा असतो!

In reply to by आनन्दा

Duishen Sun, 11/19/2017 - 14:33
नक्कीच आनंदजी! मुळात माझी मराठी चांगली आहे असा मी कुठेही दावा केल्याचे स्मरत नाही. पण आपल्याला माझ्या मराठीतील उणीवा जाणवत असतील आणि ते खरे असेल तर अभ्यास करेलही. पण मुळ मुद्दा कायम आहे. माझ्या ज्या प्रतिसादाला आपण "मराठीचा अभ्यास वाढवा एव्हढेच सांगेन." असे उत्तर दिले त्या प्रतिसादातील प्रश्न सुटणार आहेत का? गातानुगतिक पद्धतीने रुजलेली मनुस्मृती माझ्या एकट्याच्या मराठीच्या अभ्यासाने मनुस्मृती मानणाऱ्यांच्या कुठल्याही व्यक्तीच्या मनातून निघून जाणार आहे का?

In reply to by Duishen

इतिहासातील किती राजांनी मनुस्मृती लाहू करून त्यानुसार न्यायनिवाडे केलेत, हे सांगू शकल्यास आभारी राहील.

In reply to by Duishen

ओम शतानन्द Sun, 11/19/2017 - 08:43
वरील वाक्यात सर्व हिंदू स्त्रिया असा उल्लेख केलेला नाही ,पण मूर्ख हिंदू स्त्रिया हे मुस्लीम पुरुषाच्या प्रेमात पडून लग्ना नंतर पश्चाताप करणाऱ्या स्त्रियांना उद्देशून आहे टिपिकल पुरोगाम्यान्प्रमाणे ज्यात त्यात मनुस्मृती घुसविण्याची गरज नाही

In reply to by ओम शतानन्द

Duishen Sun, 11/19/2017 - 14:38
ओमजी, टिपिकल पुरोगामी किंवा मी हे मनुस्मृती खरेच मनुस्मृती घुसवू शकत नाही. ज्यांच्या ज्यांच्या मनात आधीच मनुस्मृती रुजली आहे त्यांच्या मनात वेगळे घुसविण्याची गरज काय!

In reply to by Duishen

श्रीगुरुजी Sun, 11/19/2017 - 23:05
तुमच्या अनेक प्रतिसादात बादरायण संबंध नसताना सुद्धा सातत्याने मनुस्मृती येत असते. मनुस्मृती तुमच्या घट्ट रुजलेली दिसते.

In reply to by श्रीगुरुजी

Duishen Tue, 11/21/2017 - 04:15
धन्यवाद श्रीगुरुजी! मनुस्मृतीचे भीषण परिणाम समाजात दिसतात. त्यासाठी संवेदनशील मनाची आणि निरीक्षणाची गरज आहे. परंपरा माणसावर, त्याच्या वागणुकीवर आणि सामाजिक संबंधावर परिणाम करीतच असतात. मी फक्त ते संवेदनशील आणि उघड्या डोळ्याने बघतो आहे. शिवाय जर आपण "पूर्वपुण्याई" असा मागील जन्माचा संदर्भ मतप्रदर्शनासाठी वापरू शकता तर मी दीड-दोन आठवड्यापूर्वी झालेल्या चर्चेचा संदर्भ वापल्यास नाराज होऊ नये.

In reply to by Duishen

श्रीगुरुजी Tue, 11/21/2017 - 09:02
मनुस्मृतीचे भीषण परिणाम समाजात दिसतात. हास्यास्पद विधान. बाकी तुमचं मनुस्मृती बद्दल असलेलं obsession विस्मयकारक आहे. तुमचे प्रतिसाद म्हणजे मायावतीचं भाषण वाटतं.

In reply to by ओम शतानन्द

Duishen Sun, 11/19/2017 - 14:50
पण मूर्ख हिंदू स्त्रिया हे मुस्लीम पुरुषाच्या प्रेमात पडून.... केवळ इतर धर्मियांच्या प्रेमात पडल्या तर मूर्ख कशा ठरतात? अनेक जण मग ते स्त्री असो वा पुरुष केवळ लग्न करूनच काही कारणास्तव पश्चाताप करतात मग त्या बाबतीत काय करायचे? त्यांना काय म्हणायचे?

In reply to by Duishen

श्रीगुरुजी Sun, 11/19/2017 - 15:20
ज्या अघोरी पंथात विवाह, घटस्फोट, पोटगी, अपत्यांचा ताबा, पत्नीशी शरीरसंबंध, कपडे इ. विषयीचे कायदे व पद्धती स्त्रियांसाठी अत्यंत अन्यायकारक आहेत, जो अघोरी पंथ अत्यंत कर्मठ असून ज्यात स्त्रियांना काडीचीही किंमत नाही, अशा अघोरी पंथाची माहिती असूनसुद्धा त्या पंथियाच्या नादी लागून स्वधर्म त्यागून विवाह करून नंतर पश्चाताप करणे हा महामूर्खपणा आहे़.

In reply to by श्रीगुरुजी

babu b Sun, 11/19/2017 - 20:11
!!! ( हिंदू विवाहात हेच कायदे पुरुषाना खड्ड्यात घालणारे आहेत . मग पुरुषहिताचा विचार केला तर हिंदू कायदाही अघोरीच का ? )

In reply to by श्रीगुरुजी

babu b Sun, 11/19/2017 - 20:11
!!! ( हिंदू विवाहात हेच कायदे पुरुषाना खड्ड्यात घालणारे आहेत . मग पुरुषहिताचा विचार केला तर हिंदू कायदाही अघोरीच का ? )

In reply to by babu b

सुबोध खरे Mon, 11/20/2017 - 12:00
चंपाबाई पिचक्या टाकण्याच्या अगोदर विचार करत जा. हिंदूंचा कोणताही कायदा हा धर्मशास्त्रातील वाचन म्हणून जसाच्या तसा लागू नाही आणि जो कायदा केला आहे तो अनेक विचारवंतांनी आणि कायदे पंडितांनी केलेला आहे. पाचव्या शतकात कुणाच्यातरी स्वप्नात देवाने येऊन सांगितलेला आणि तसाच्या तसा "देवाची इच्छा" म्हणून लादलेला नाही.

In reply to by सुबोध खरे

babu b Mon, 11/20/2017 - 12:53
ॲप्लिकेबल असलेला कायदा ( देवाचा / माणसाचा ) शेवटी कुणालातरी खड्ड्यात घालू शकतोच की .

In reply to by babu b

सुबोध खरे Tue, 11/21/2017 - 13:09
माणसाचा कायदा बदलता येतो "म्हणजेच" खड्डा बुजवता येतो. पण देवाने "स्वप्नात येऊन सांगितलेल्या" गोष्टी १४०० वर्षे जशाच्या तशा स्वीकाराव्या लागतात कालबाह्य झाल्या तरी कारण ती "देवाची इच्छा" असते. म्हणजेच काय "त्याच खड्ड्यात" कायम पडत रहा. पुढे वाटचाल शक्यच नाही. अर्थात हे तुम्हाला समजावून घ्यायचंच नाहीये फक्त कुजकट पिचक्याच टाकायच्या आहेत त्यामुळे प्रश्नच मिटला.

In reply to by श्रीगुरुजी

babu b Sun, 11/19/2017 - 20:12
!!! ( हिंदू विवाहात हेच कायदे पुरुषाना खड्ड्यात घालणारे आहेत . मग पुरुषहिताचा विचार केला तर हिंदू कायदाही अघोरीच का ? )

In reply to by श्रीगुरुजी

एमी Sun, 11/19/2017 - 21:09
पत्नीशी शरीरसंबंध >> याबद्दल अधिक सांगू शकाल का? 'लग्नांतर्गत बलात्कार हा गुन्हा नसणं (सर्व धर्मांमधे समान कायदा)' हा विषय मी गेली ४+ वर्ष मराठीआंजावर काढतेय. आत्तापर्यंत फक्त २ पुरुष आणि १ स्त्री भेटलेत ज्यानी 'हा गुन्हा असावा' असे उघड मत मांडले आहे.

In reply to by एमी

श्रीगुरुजी Sun, 11/19/2017 - 22:26
पतीने शरीरसंबंधाची मागणी केल्यास पत्नीने त्याची इच्छा पूर्ण केलीच पाहिजे (तिची इच्छा नसली तरी) असा कुराणाचा आदेश आहे.

In reply to by श्रीगुरुजी

एमी Mon, 11/20/2017 - 04:05
ठीक! === • इतर धार्मिक ग्रंथांमधे याबद्दल काय आदेश आहेत? • पतीला? • पत्नीला? === सध्याचा भारतीय कायदा '"१५+ वयाच्या पत्नीसोबत पतीने ठेवलेला शरीरसंबंध हा 'कधीच' बलात्कार नसतो" असे सांगतो. "लग्न करतानाच पत्नीने 'आयुष्यभर पतीच्या शारीरिक गरजा पूर्ण करेन' असा कन्सेन्ट दिलेला असतो" असे कायदा समजतो. ते बरोबर आहे कि चूक याबद्दल तुमच वैयक्तिक मत काय?

In reply to by babu b

एमी Mon, 11/20/2017 - 10:00
म्हणजे याबाबत कुराण व हिंदू कायदा यांचे एकमत आहे ! >> कायद्याचे एकमत तर आहेच!! पण स्वतःला १००% हिंदूंचे प्रवक्ते समजणाऱ्या स्वघोषित उच्चवर्णातील पुरूषांचेदेखील त्याला समर्थन आहे आणि त्यांच्या बायका दालआटासाठी ४००००रुपयात सौदा (डील)करणाऱ्या आहेत (मराठी आंजावर हेच दिसतात म्हणून यांच्याबद्दल बोलतेय. बाकीच्यांचे सर्वेक्षण केले नाही). मग इस्लामला कशाला नाव ठेवायची उगीच!! किती ती दांभिकता!!!

In reply to by एमी

श्रीगुरुजी Mon, 11/20/2017 - 10:28
एका मूर्खाच्या सांगण्यावर विसंबून थेट चुकीचे निष्कर्ष काढण्याआधी माझा प्रतिसाद नीट वाचून समजून घ्या.

In reply to by श्रीगुरुजी

गंम्बा Tue, 11/21/2017 - 11:50
पत्नीसोबत पतीने ठेवलेला शरीरसंबंध हा नक्की कधी बलात्कार असतो व बलात्कार असल्यास ते कसे सिद्ध करणार?
गुरुजी, सिद्ध कसा करणार हा मुद्दा नाहीये तर तो गुन्हा आहे कि नाही हा मुद्दा आहे. कमीतकमी गुन्हा आहे हे तरी मान्य करा. सिद्ध कसे करायचे वगैरे ते नंतर बघता येइल.

In reply to by गंम्बा

श्रीगुरुजी Tue, 11/21/2017 - 15:31
सिद्ध करणे ही नंतर येणारी पायरी आहे. त्याआधी हा गुन्हा आहे किंवा गुन्हा घडला आहे हे ठरविणार कसे? म्हणजे या गुन्ह्याची नक्की कायदेशीर व्याख्या कशी करणार? हा शरीरसंबंध नक्की कधी गुन्हा समजला जाईल आणि नक्की कधी गुन्हा समजला जाणार नाही हे कोण व कसे ठरविणार? एखादे कृत्य गुन्हा या व्याख्येत येत असेल तरच त्यावर पुढील कारवाई होऊ शकते (म्हणजे गुन्हा दाखल करून खटल्याची सुनावणी करणे, गुन्हा घडला आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करणे इ.). मुळात हे कृत्य गुन्हा समजले जाईल हे कसे ठरविता येईल?

In reply to by श्रीगुरुजी

गंम्बा Tue, 11/21/2017 - 16:09
गुरुजी माझे म्हणणे इतके साधे आहे की, तात्विक पातळीवर तर आधी हा गुन्हा आहे हे तुम्ही मान्य करायला तयार आहात का ते स्पष्ट सांगा. जर तात्विक पातळीवर गुन्हा आहे हेच मान्य नसेल तर बाकीच्या डिटेल्स मधे काहीच अर्थ नाही. पण तात्विक पातळीवर अश्या प्रकारचा गुन्हा असु शकतो आणि मानला पाहिजे असे तुम्हाला वाटत असेल तर मग नक्की व्याख्या काय आहे, ते सिद्ध कसे करायचे किंवा पळवाटा कश्या असु शकतील हे चर्चेस घेता येइल.

In reply to by गंम्बा

श्रीगुरुजी Wed, 11/22/2017 - 15:33
मी पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारतोय. पतिपत्नीतील शरीरसंबंध नक्की कधी गुन्हा आहे हे ठरविता येईल किंवा गुन्हा नसून नैसर्गिक घटना आहे हे ठरविता येईल? हे ठरविल्यानंतरच मत देता येईल. हा गुन्हा आहे असे ठरवायचे असेल तर त्या गुन्ह्याची कायदेशीर व्याख्या करावी लागेल. अशी व्याख्या कोणी केली असेल तर ती द्यावी म्हणजे त्यावर मत देता येईल. नुसत्या अभिनिवेशाच्या आहारी न जाता या मुद्द्यावर कायदेशीर अंगाने चर्चा केली तरच त्यावर मत देता येईल.

In reply to by श्रीगुरुजी

गंम्बा Wed, 11/22/2017 - 16:34
साधी व्याख्या आहे गुरुजी - पत्नी ला नको असताना पतीने जबरदस्तीने लादलेला शरिरसंबंध. असा संबंध माझ्या मते गुन्हा आहे ( कायद्याच्या मते काय आहे हे आत्ता बोलायला नको ). तर पुन्हा माझा साधा सरळ प्रश्न "पत्नी ला नको असताना पतीने जबरदस्तीने लादलेला शरिरसंबंध तुम्हाला गुन्हा ( कमीतकमी मॉरली, तात्विक दृष्ट्या तरी ) वाटतो का? मला खरंच वाटत नाही कि तुम्हाला कळत नाहीये, पण तुम्हाला स्टँड घ्यायचा नाहीये.

In reply to by गंम्बा

एमी Wed, 11/22/2017 - 17:38
मला खरंच वाटत नाही कि तुम्हाला कळत नाहीये, पण तुम्हाला स्टँड घ्यायचा नाहीये. >> स्टँड घ्यायचा नाहीय त्यांना. नका वेळ घालवू. एवढे वादविवाद करणार्यांना consent म्हणजे काय माहित नसेल हे शक्य आहे का?

In reply to by एमी

तर्राट जोकर Wed, 11/22/2017 - 18:54
स्टॅण्ड घेतला तर तोंडावर पडतील ना ते.. इस्लाम असो वा हिंदू, पत्नीला संभोगास नकार देण्याचा अधिकारच नाही हे ते कसे कबूल करतील, कोणत्या तोंडाने?

In reply to by तर्राट जोकर

पगला गजोधर गुरुवार, 11/23/2017 - 00:32
स्टँड ते घेत नसतील, कारण ते स्वतः कनफ्युज असतील, त्यांच्या विचारांबद्दल ... कारण ते आधी लिहितात
केवळ कायदा केल्याने प्रश्न सुटेल हे म्हणणे म्हणजे आराम खुर्चीतील विचारवंतासारखा विचार करणे आहे.
आणि ४-५ ओळी नंतर म्हणतात.... बाल विवाह विषयक कायदा सक्तीने राबवला गेला पाहिजे. म्हणजे नवे कायदे फायद्याचे नाहीत, व जुन्या मध्ये खूप पळवाटा आहेत, म्हणून जे चाललंय (विवाह अंतर्गत बलात्कार) ते चालू राहू द्यावे , असा त्यांचा स्टँड असावा, हा अंदाज बरका...

In reply to by तर्राट जोकर

arunjoshi123 Sat, 12/09/2017 - 12:31
इस्लाम असो वा हिंदू, पत्नीला संभोगास नकार देण्याचा अधिकारच नाही हे ते कसे कबूल करतील, कोणत्या तोंडाने?
हिंदू धर्माचे सर्व नियम एक्त्रित कुठे आहेत? च्यायला एवढे उपयुक्त नियम आम्हाला हिंदू असून माहित पण नव्हते.

In reply to by गंम्बा

श्रीगुरुजी गुरुवार, 11/23/2017 - 14:45
"पत्नीला नको असताना पतीने जबरदस्तीने लादलेला शरिरसंबंध" इतकी सोपी, साधी पतीने पत्नीवर केलेल्या बलात्काराची व्याख्या करता येणार नाही. पतीचं सोडा, भारतीय फौजदारी कायद्यात असलेली बलात्काराची व्याख्यासुद्धा खूप सविस्तर आहे. इथे तर पतीपत्नीचा संबंध असल्याने पतीपत्नीतील शरीरसंबंध नक्की कधी बलात्कार या व्याख्येत बसविता येतील याविषयी केवळ काही शब्दात व्याख्या होऊ शकत नाही. या धाग्यावर दिलेले डॉ. सुबोध खरे यांचे सविस्तर प्रतिसाद पुन्हा एकदा नीट शांतपणे वाचा. पतीपत्नीचे संबंध अत्यंत नाजूक व गुंतागुंतीचे असतात. या नात्यात ते फक्त दोघे नसून दोघांच्या कुटुंबाचाही समावेश असतो. अशा गुंतागुंतीच्या संबंधात केवळ एका लहानशा गंभीर चुकीमुळे अनेकांची आयुष्ये कायमची उद्ध्वस्त होऊ शकतात. त्यामुळे जेव्हा पतीपत्नीतील शरीरसंबंध या विषयी एखादा कायदा करायचा असेल किंवा त्यांच्यातील संबंध काही विशिष्ट प्रसंगात गुन्हा ठरवायचा असेल त्यावेळी अतिशय काळजीपूर्वक व सविस्तर गुन्ह्याची व्याख्या केली पाहिजे. तुम्ही वर लिहिलेल्या काही शब्दांचे एक वाक्य हे त्यासाठी अत्यंत अपूर्ण आहे. माझ्यावर विश्वास नसेल तर एखाद्या वकीलाशी याविषयावर बोला व असे संबंध गुन्हा ठरवायचा असेल तर त्यासाठी नक्की काय करावे लागेल, या गुन्ह्याची व्याख्या कशी करता येईल हे त्याला विचारा. पत्नी ला नको असताना पतीने जबरदस्तीने लादलेला शरिरसंबंध हा गुन्हा ठरवावा असे अभिनिवेशात म्हणणे व यावर इतरांना भूमिका घ्यावयास सांगणे खूप सोपे आहे. अशा एखाद्या फेकलेल्या वाक्यावर भूमिका घेणे शक्य नाही. आधी हे संबंध नक्की कधी गुन्हा म्हणून ठरविता येऊ शकतील याविषयी सविस्तर व्याख्या करा, ती मांडा आणि नंतरच त्यावर मी भूमिका घेईन. समजा एखाद्या मुलाने वडीलांना सांगितले की मला बिझनेस करायचा आहे व त्यासाठी तुमची परवानगी आहे का नाही. यावर कोणताही बाप आधी विचारेल की तुला नक्की कोणता बिझनेस करायचा आहे, तुझ्याबरोबर कोण भागीदार आहेत, त्यासाठी भांडवल, जागा इ. ची तयारी आहे का . . . अशी सविस्तर माहिती बाप विचारेल. मुलगा एका वाक्यात सांगतो की मला बिझनेस करायचा आहे आणि बाप कोणतीही माहिती न विचारता मान डोलावतो असे होऊ शकत नाही. इथेही तसेच आहे. पत्नी ला नको असताना पतीने जबरदस्तीने लादलेला शरिरसंबंध याला गुन्हा समजावा यावर तुमची भूमिका काय असे विचारल्यानंतर त्यावरील सविस्तर माहिती मिळाल्यानंतरच भूमिका घेता येईल. असा कायदा इतर काही देशात आहे असे अ‍ॅमीताई म्हणतात. तसे असेल तर तिथल्या कायद्यात कोणकोणत्या तरतुदी आहेत हे इथे मांडले तर भूमिका घेण्याच्या दृष्टीने मदत होईल. असो. तेच तेच पुन्हा सांगण्याचा कंटाळा आला आहे. पटत असेल तर घ्या नाहीतर सोडून द्या. मला यावर भूमिका घ्यायची नाही किंवा मला याविरोधी भूमिका घ्यायची आहे असा समज करून घेतलात तरी माझी हरकत नाही.

In reply to by गंम्बा

श्रीगुरुजी गुरुवार, 11/23/2017 - 14:53
"पत्नीला नको असताना पतीने जबरदस्तीने लादलेला शरिरसंबंध" इतकी सोपी, साधी पतीने पत्नीवर केलेल्या बलात्काराची व्याख्या करता येणार नाही. पतीचं सोडा, भारतीय फौजदारी कायद्यात असलेली बलात्काराची व्याख्यासुद्धा खूप सविस्तर आहे. इथे तर पतीपत्नीचा संबंध असल्याने पतीपत्नीतील शरीरसंबंध नक्की कधी बलात्कार या व्याख्येत बसविता येतील याविषयी केवळ काही शब्दात व्याख्या होऊ शकत नाही. या धाग्यावर दिलेले डॉ. सुबोध खरे यांचे सविस्तर प्रतिसाद पुन्हा एकदा नीट शांतपणे वाचा. पतीपत्नीचे संबंध अत्यंत नाजूक व गुंतागुंतीचे असतात. या नात्यात ते फक्त दोघे नसून दोघांच्या कुटुंबाचाही समावेश असतो. अशा गुंतागुंतीच्या संबंधात केवळ एका लहानशा गंभीर चुकीमुळे अनेकांची आयुष्ये कायमची उद्ध्वस्त होऊ शकतात. त्यामुळे जेव्हा पतीपत्नीतील शरीरसंबंध या विषयी एखादा कायदा करायचा असेल किंवा त्यांच्यातील संबंध काही विशिष्ट प्रसंगात गुन्हा ठरवायचा असेल त्यावेळी अतिशय काळजीपूर्वक व सविस्तर गुन्ह्याची व्याख्या केली पाहिजे. तुम्ही वर लिहिलेल्या काही शब्दांचे एक वाक्य हे त्यासाठी अत्यंत अपूर्ण आहे. माझ्यावर विश्वास नसेल तर एखाद्या वकीलाशी याविषयावर बोला व असे संबंध गुन्हा ठरवायचा असेल तर त्यासाठी नक्की काय करावे लागेल, या गुन्ह्याची व्याख्या कशी करता येईल हे त्याला विचारा. पत्नी ला नको असताना पतीने जबरदस्तीने लादलेला शरिरसंबंध हा गुन्हा ठरवावा असे अभिनिवेशात म्हणणे व यावर इतरांना भूमिका घ्यावयास सांगणे खूप सोपे आहे. अशा एखाद्या फेकलेल्या वाक्यावर भूमिका घेणे शक्य नाही. आधी हे संबंध नक्की कधी गुन्हा म्हणून ठरविता येऊ शकतील याविषयी सविस्तर व्याख्या करा, ती मांडा आणि नंतरच त्यावर मी भूमिका घेईन. समजा एखाद्या मुलाने वडीलांना सांगितले की मला बिझनेस करायचा आहे व त्यासाठी तुमची परवानगी आहे का नाही. यावर कोणताही बाप आधी विचारेल की तुला नक्की कोणता बिझनेस करायचा आहे, तुझ्याबरोबर कोण भागीदार आहेत, त्यासाठी भांडवल, जागा इ. ची तयारी आहे का . . . अशी सविस्तर माहिती बाप विचारेल. मुलगा एका वाक्यात सांगतो की मला बिझनेस करायचा आहे आणि बाप कोणतीही माहिती न विचारता मान डोलावतो असे होऊ शकत नाही. इथेही तसेच आहे. पत्नी ला नको असताना पतीने जबरदस्तीने लादलेला शरिरसंबंध याला गुन्हा समजावा यावर तुमची भूमिका काय असे विचारल्यानंतर त्यावरील सविस्तर माहिती मिळाल्यानंतरच भूमिका घेता येईल. असा कायदा इतर काही देशात आहे असे अ‍ॅमीताई म्हणतात. तसे असेल तर तिथल्या कायद्यात कोणकोणत्या तरतुदी आहेत हे इथे मांडले तर भूमिका घेण्याच्या दृष्टीने मदत होईल. असो. तेच तेच पुन्हा सांगण्याचा कंटाळा आला आहे. पटत असेल तर घ्या नाहीतर सोडून द्या. मला यावर भूमिका घ्यायची नाही किंवा मला याविरोधी भूमिका घ्यायची आहे असा समज करून घेतलात तरी माझी हरकत नाही.

In reply to by गंम्बा

arunjoshi123 Sat, 12/09/2017 - 12:27
तर पुन्हा माझा साधा सरळ प्रश्न "पत्नी ला नको असताना पतीने जबरदस्तीने लादलेला शरिरसंबंध तुम्हाला गुन्हा ( कमीतकमी मॉरली, तात्विक दृष्ट्या तरी ) वाटतो का?
तर पुन्हा माझा साधा सरळ प्रश्न "पत्नी ला नको असताना पतीने जबरदस्तीने स्वयंपाक करायला लावणे तुम्हाला गुन्हा ( कमीतकमी मॉरली, तात्विक दृष्ट्या तरी ) वाटतो का?" तर पुन्हा माझा साधा सरळ प्रश्न "पत्नी ला नको असताना पतीने जबरदस्तीने नोकरी करायला लावणे तुम्हाला गुन्हा ( कमीतकमी मॉरली, तात्विक दृष्ट्या तरी ) वाटतो का?" तर पुन्हा माझा साधा सरळ प्रश्न "पत्नी ला नको असताना पतीने जबरदस्तीने घरातले आवश्यक करायला लावणे तुम्हाला गुन्हा ( कमीतकमी मॉरली, तात्विक दृष्ट्या तरी ) वाटतो का?" तर पुन्हा माझा साधा सरळ प्रश्न "पत्नी ला नको असताना पतीने जबरदस्तीने बाळाची शी काढायला लावणे तुम्हाला गुन्हा ( कमीतकमी मॉरली, तात्विक दृष्ट्या तरी ) वाटतो का?"

In reply to by गंम्बा

arunjoshi123 Sat, 12/09/2017 - 12:38
तर पुन्हा माझा साधा सरळ प्रश्न "पत्नी ला नको असताना पतीने जबरदस्तीने लादलेला शरिरसंबंध तुम्हाला गुन्हा ( कमीतकमी मॉरली, तात्विक दृष्ट्या तरी ) वाटतो का?
जबरदस्ती आणि गोडीगुलाबी पैकी फक्त जबरदस्ती गुन्हा असते का? का असते? बाईने पुरुषाला गोडीगुलाबीने शरीरसंबंध लादला तर तो मॉरली एटसेटरा गुन्हा असतो का? आणि विवाहीत बाईने .. नवर्‍याला ... असतो का? का असतो/नसतो?

In reply to by गंम्बा

arunjoshi123 Sat, 12/09/2017 - 12:24
कमीतकमी गुन्हा आहे हे तरी मान्य करा.
गुन्हा आहेच. ते अमान्य करायचा प्रश्न येत नाही. --------------- पुढे बोला.

In reply to by एमी

सुखीमाणूस Tue, 11/21/2017 - 19:40
लग्न करताना पति पत्निचा सम्भाळ करीन असे वचन देतो. मग सध्याच्या भारतिय कयद्याने पत्निची ही गरज पुर्ण न करणार्या नवर्याला पण बडगा दाखवता आला पाहिजे जर लग्नामुळे येणारी कोणतीही बन्धन ठेवायची नसतील तर कमावत्या जोडीदाराची स्वताचे उत्पन्न स्वताच्या मर्जीने खर्च करण्याची सोय कयद्याने केली पाहिजे. म्हणजे फुकट पोसले जाणारे आयतोबा लोक्स मापात रहतील .विशेषता दारुडी आयतोबां मन्डळी तुम्ही जो कायदा होण्यासाठी सर्वे करताय तो स्त्री पुरुष व समलिन्गी विवाह या सर्वाना लागु झाला पाहिजे. तरच खरी सामाजिक समता येइल.

In reply to by एमी

सुबोध खरे Mon, 11/20/2017 - 12:16
अमी ताई नवरा बायकोने शरीर संबंध ठेवले आणि दुसऱ्या दिवशी बायकोने भावनावेगाच्या भरात (impulsively) आपल्यावर बलात्कार केला अशी तक्रार केली तर आजच्या कायद्याप्रमाणे नवऱ्याला कोठडीत (पोलीस किंवा न्यायालयीन) टाकले जाईल आणि हा गुन्हा अजामीनपात्र असल्याने नवरा काही दिवस पासून काही महिने कोठडीत राहील. एकदा एफ आय आर दाखल झाला कि न्यायालयात खटला चालवून निकाल येईपर्यंत नवरा तुरुंगात राहील आणि मग ते नाते कधीही सांधले जाणार नाही असे एका प्रख्यात कायदेतज्ज्ञाने ( मला वाटते सोली सोराबजी) सांगितल्याचे आठवते आहे. या स्थितीत लैंगिक संबंध तर "ठेवलेला" असल्यामुळे तो पत्नीच्या मर्जीनेच झाला कि नाही एवढाच प्रश्न उरतो यासाठी दोन्ही बाजूनी कायद्याचा किस पाडला जाईल आणि जे हातात लागेल त्यात नवऱ्याचा सूड घेतल्याचे समाधान सोडून त्या स्त्रीच्या हातात काहीही लागणार नाही. लग्नसंबंध तर नक्कीच संपतील. त्यातून जर १५ वर्षांची (किंवा कमी) मुलगी असेल आणि तिने दुसऱ्या कुणाच्याही सांगण्यावरून अशी तक्रार केली तर ती ग्राह्य धरणार का? त्या मुलीची संपूर्ण वैद्यकीय तपासणी केली जाईल आणि त्या मुलीला उलट तपासणीसाठी न्यायालयात उभे केले तर (वकील जशा तर्हेने प्रश्न विचारतात ते पहिले तर) तिथे तिची होणारी अक्षम्य अशी बदनामी आणि त्यानंतर तिच्या कोवळ्या मनावर होणारे आघात याचा विचार करून सध्या अल्पवयीन किंवा अन्य पत्नीशी केलेला संबंध हा बलात्कार नाही या कायद्यात बदल करण्याची कायदे तज्ज्ञांची इच्छा नाही. याचा अर्थ असा नाही कि असे कायदेतज्ञ पत्नीवर हणाऱ्या अत्याचाराचे समर्थन करतात( हा आरोप बहुतेक अति उदारमतवादी किंवा अतिस्त्रीस्वातंत्र्य वादी करताना आढळतात). पण रोगापेक्षा इलाज भयंकर असे होऊ नये अशी बऱ्याच कायदेतज्ञांची इच्छा आहे. असो हा या धाग्याचा विषय नाही. लव्ह जिहाद च्या धाग्यात आपण हा विषय का आणलाय त्याचे कारण समजले नाही

In reply to by सुबोध खरे

श्रीगुरुजी Mon, 11/20/2017 - 14:22
मी अ‍ॅमीताईंना वर हेच सांगत होतो. समागमासाठी उत्सुक नसलेल्या विवाहीत स्त्रीबरोबर नवर्‍याने तिच्याशी बळजबरीने समागम केला हे कसे व कोण सिद्ध करणार? याच्या उलट सुद्धा होऊ शकते. नवर्‍याची समागमाची इच्छा नसताना पत्नीने त्याला समागम करायला लावला तर तो नवर्‍यावरील बलात्कार ठरू शकेल का? मुळात कोणत्या हिंदू ग्रंथात असे लिहिले आहे की नवर्‍याची समागमाची इच्छा असेल तर बायकोने इच्छा नसताना त्याची इच्छा पूर्ण केलीच पाहिजे, नाहीतर ती नरकात जाईल? इस्लाम या अघोरी पंथात मात्र याला धर्माचा आधार आहे. नवर्‍याने समागमाची इच्छा व्यक्त केल्यास बायकोने तिची इच्छा नसली तरी त्याची इच्छा पूर्ण केलीच पाहिजे असा कुराण या पुस्तकाचा आदेश आहे. स्त्रीने बुरख्यात राहिले पाहिजे, स्त्रियांची सुंता, पुरूषांचे बहुपत्नीत्व, तोंडी तलाक, पोटगी फक्त ३ चांद्रमास, मुलांचा ताबा नवर्‍याला अशा अनेक अन्यायकारक गोष्टी ज्या पंथात आहेत त्या पंथियाशी जाणूनबुजून विवाह करून कालांतराने पश्चाताप करणे हा मूर्खपणा आहे.

In reply to by श्रीगुरुजी

पगला गजोधर Mon, 11/20/2017 - 14:43
नवर्‍याची समागमाची इच्छा नसताना पत्नीने त्याला समागम करायला लावला तर तो नवर्‍यावरील बलात्कार ठरू शकेल का?
बेसिक डाऊत ..... पुरुष समागमाची इच्छा नसताना, समागमात पार्टीसिपेट करू शकतो का ??? पुरुष समागमाची इच्छा नसताना, इंद्रिय ताठ करू व ठेवू शकतो का ?

In reply to by पगला गजोधर

arunjoshi123 Sat, 12/09/2017 - 13:14
का नाही? ------------ जबरदस्ती करणार्‍या स्त्रीयांपुढे डायरेक्ट इंद्रिय ताठ करण्याचे पर्याय आहेतच. पण नसलेल्या इच्चेला उत्पन्न करून इंद्रिय ताठ करण्याचा पर्याय देखील आहे. ---------- एरवी ज्या पुरुषाला क्ष स्त्रीशी समागमाचा विरोध आहे वा विचारही नाही त्याला ती क्ष स्त्री आपले अवयव एक्स्पोज करून, इ परिवर्तीत करू शकते. हा देखील बलात्कारच आहे.

In reply to by पगला गजोधर

arunjoshi123 Sat, 12/09/2017 - 13:17
Female-on-male rape[edit] Female-on-male rape is under-researched compared to other forms of sexual violence.[13] Statistics on the prevalence of female-on-male sexual violence vary. One study (Hannon et al.) found 23.4% of women and 10.5% of men reported they were raped while 6.6% of women and 10.5% of men reported they were victims of attempted rape.[14] A 2010–2012 study by the Centers for Disease Control and Prevention (CDC) found that 86.5% of male rape victims reported only male perpetrators,[8] (down from 93.3% in the previous study published in 2010).[9] One in 17 men (5.9%) reported being "made to penetrate" at some point in their lives[8] (up from 4.8% in 2010).[9] The surveys also found that male victims often reported only female perpetrators in instances of being made to penetrate (2012: 78.5%, 2010: 79.2%), sexual coercion (2012: 81.6%, 2010: 83.6%), and unwanted sexual contact (2012: 53.0%, 2010: 53.1%).[8][9] A 2008 study of 98 men interviewed on the United States National Crime Victimization Survey found that nearly half of the men (46%) who reported some form of sexual victimization were victimized by women.[15] Regarding female-on-male sexual misconduct, the US Dept. of Justice reports in its opening statement (page 5): "An estimated 4.4% of prison inmates and 3.1% of jail inmates reported experiencing one or more incidents of sexual victimization by another inmate or facility staff in the past 12 months or since admission to the facility, if less than 12 months." Regarding female-on-male sexual misconduct (page 25) it states: "Among the 39,121 male prison inmates who had been victims of staff sexual misconduct, 69% reported sexual activity with female staff; an additional 16% reported sexual activity with both female and male staff (table 18)." and "Nearly two-thirds of the male jail inmates who had been victimized said the staff perpetrator was female (64%)."[16] Male victims of sexual abuse by females[17] often face social, political, and legal double standards.[18] The case of Cierra Ross'[19] sexual assault of a man in Chicago gained national headlines and Ross was convicted of aggravated criminal sexual abuse and armed robbery with a bail set at $75,000. A similar case includes James Landrith, who was made to penetrate a female acquaintance in a hotel room while incapacitated from drinking, while his rapist cited the fact that she was pregnant to advise him not to struggle, as this might hurt the baby.[20][21] Several widely publicized cases of female-on-male statutory rape in the United States involved school teachers having illegal sex with their underage students (see Mary Kay Letourneau and Debra Lafave). Male victims, including underage minors, have been forced to pay child support to their rapist when the rapist conceives a baby as a result of the rape (see, for example, Hermesmann v. Seyer).[22][23][24]

In reply to by श्रीगुरुजी

babu b Mon, 11/20/2017 - 15:54
गुरुजी , हिंदू काय्दाही बायकोवर बलात्कार ही कल्पना मान्य करत नाही. जेंव्हा नवरा मागेल तेंव्हा देणे , दोन्ही धर्मांसाठी हीच गाइडलाइन आहे. हिंदू धर्माबाबतच जरा पुराणकथा आठवा ... अर्जुनाने उर्वशीला समागमाला नकार दिला होता . त्यामुळे उर्वशीने शाप दिला होता की तू नपुंसक होशील ! ( त्यामुळे तो एक वर्ष बृहन्नडा झाला. ) समागम न केल्यास पर पु रुषालाही शाप देणारे लोक आहेत. !! आणि उगाचच दुसर्या धर्मातल्या नवराबायकोत काही लोक नाके खुपसत बसतात !!

In reply to by babu b

सुबोध खरे Mon, 11/20/2017 - 19:54
चंपा बाई / बाबू भि तुमच्या मूळ समजुतीत घोळ आहे. BMR शाप उ:शाप याचा कायद्याशी काहीही संबंध नाही. पुराण कथे बाबत कोणताही कायदा काहीच म्हणत नाही पण मुस्लिम वैयक्तिक कायदा हा संपूर्णपणे कुराणावर अवलंबून आहे. यातील फरक तुम्हाला समजून घ्यायचाच नाहीये म्हणून केवळ पिचक्या टाकणे चालू असते

In reply to by babu b

arunjoshi123 Sat, 12/09/2017 - 13:35
रावण हिंदू होता नं? मंजे जंगलातल्या कोंच्याही रँडम बाईला पळवून नेता येते हा हिंदूचा कायदा आहे? --------------- पुरानातल्या गपाट्या मंजे कायदे?

In reply to by श्रीगुरुजी

एमी Mon, 11/20/2017 - 17:02
समागमासाठी उत्सुक नसलेल्या विवाहीत स्त्रीबरोबर नवर्याने तिच्याशी बळजबरीने समागम केला हे कसे व कोण सिद्ध करणार? >> विकसीत देशांत हे कायदे नुकतेच बनवले गेले आहेत; २००० च्या आसपास. त्यांना गाइडलाईन म्हणून वापरता येईल. === नवर्याची समागमाची इच्छा नसताना पत्नीने त्याला समागम करायला लावला तर तो नवर्यावरील बलात्कार ठरू शकेल का? >> हो. कन्सेन्ट आणि बलात्काराचा कायदा लिंगनिरपेक्ष असावा. पण मलादेखील पगला गजोधर यांच्यासारखीच शंका आहे. कोणी डॉक उत्तर देऊ शकतील.

In reply to by एमी

पगला गजोधर Tue, 11/21/2017 - 10:41
अँमिजी, इथला कंपू, तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे टाळताना दिसेल... ते फक्त यंव त्यांव करत राहतील.... बेसिक डाऊट ..... पुरुष समागमाची इच्छा नसताना, समागमात पार्टीसिपेट करू शकतो का ??? पुरुष समागमाची इच्छा नसताना, इंद्रिय ताठ करू व ठेवू शकतो का ? लग्न झाल्यावर फक्त नवऱ्याकडूनच बलात्काराची शक्यता असते का ? इथे उदाहरण देतो.... सक्तीचे वैधव्य वाट्याला आलेल्या ब्राम्हण स्त्रियांवर, त्यांचे कुटुंबीय बलात्कार करून त्यांच्यावर अपघाती मातृत्वाचा प्रसंग आला, की तिला आत्महत्येस प्रवृत्त करत. त्यावेळेस धर्म मानणाऱ्या सद्गुणी धर्म मार्तंड लोकांनी, हा किळसवाण्या प्रकाराविरोधात पुढाकार किंवा भाग घेतल्याचेही आढळत नाही. दुसऱ्या बाजुला मात्र जोतीराव फुले यांचे आणि नुसते लक्ष गेले असे नव्हे, तर त्यांनी त्या संदर्भात ठोस पावले उचलून क्रांतिकारक कृतीही केली. त्यांच्या प्रसूतीची सोय करून त्यांची आत्महत्या थांबवण्याची! त्याच्याही नंतर, अशा संबंधातून झालेल्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी संस्थात्मक कार्य केले. त्यामुळे लग्नानंतर्गत बलात्कार फक्त नावऱ्याकडूनच होतो हे म्हणजे हिमनगाचे टोक आहे, त्याविरुद्ध आवाज उभारला तर एक तर शिव्याशापाचे धनी व्हावे लागते वा गोळ्या झेलाव्या लागतात...

In reply to by पगला गजोधर

सुबोध खरे Tue, 11/21/2017 - 13:13
पगले बुवा उगाच कंपू बाजी वगैरे आरोप करू नका पुरुष समागमाची इच्छा नसताना, समागमात पार्टीसिपेट करू शकतो का ??? पुरुष समागमाची इच्छा नसताना, इंद्रिय ताठ करू व ठेवू शकतो का ? तुम्ही दुसरा धागा काढा त्यावर वरील प्रश्नांची पण सविस्तर उत्तर देऊ. उगाच हा धागा भरकटवण्याचा काय हेतू आहे?

In reply to by सुबोध खरे

पगला गजोधर Tue, 11/21/2017 - 14:09
भावे बुवा, कंपूतील एकाने आधी असा प्रश्न विचारलाय
नवर्‍याची समागमाची इच्छा नसताना पत्नीने त्याला समागम करायला लावला तर तो नवर्‍यावरील बलात्कार ठरू शकेल का?
त्यावर मी माझे डाउट ' 'त्यांना '' विचारतोय .... पुरुष समागमाची इच्छा नसताना, समागमात पार्टीसिपेट करू शकतो का ??? पुरुष समागमाची इच्छा नसताना, इंद्रिय ताठ करू व ठेवू शकतो का ? वेगळा धागा काढायचा की नाही, हे मी ठरवेल हो...

In reply to by सुबोध खरे

पगला गजोधर Tue, 11/21/2017 - 14:13
आणि हो, महान हिंदूधर्मरक्षक व त्यांचा हिंदूमुजाहिद संघ यांच्या कंपूलाच, हा पुढचा प्रश्न आहे ...
लग्न झाल्यावर फक्त नवऱ्याकडूनच बलात्काराची शक्यता असते का ? इथे उदाहरण देतो.... सक्तीचे वैधव्य वाट्याला आलेल्या ब्राम्हण स्त्रियांवर, त्यांचे कुटुंबीय बलात्कार करून त्यांच्यावर अपघाती मातृत्वाचा प्रसंग आला, की तिला आत्महत्येस प्रवृत्त करत. त्यावेळेस धर्म मानणाऱ्या सद्गुणी धर्म मार्तंड लोकांनी, हा किळसवाण्या प्रकाराविरोधात पुढाकार किंवा भाग घेतल्याचेही आढळत नाही. दुसऱ्या बाजुला मात्र जोतीराव फुले यांचे आणि नुसते लक्ष गेले असे नव्हे, तर त्यांनी त्या संदर्भात ठोस पावले उचलून क्रांतिकारक कृतीही केली. त्यांच्या प्रसूतीची सोय करून त्यांची आत्महत्या थांबवण्याची! त्याच्याही नंतर, अशा संबंधातून झालेल्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी संस्थात्मक कार्य केले. त्यामुळे लग्नानंतर्गत बलात्कार फक्त नावऱ्याकडूनच होतो हे म्हणजे हिमनगाचे टोक आहे, त्याविरुद्ध आवाज उभारला तर एक तर शिव्याशापाचे धनी व्हावे लागते वा गोळ्या झेलाव्या लागतात...

In reply to by पगला गजोधर

सुखीमाणूस Tue, 11/21/2017 - 19:50
हे मात्र एकदम खरे आहे. आणि त्यामुळे आज सर्वात सुखी ब्राम्हण समाजतील स्त्रिया आहेत. म्हणजे निर्णय स्वातन्त्र्य, सन्सारात बरोबरीचे स्थान, शिक्शणाची समान सन्धी हे मिळत आहे. शिवाय दारु पिउन मारहाण, हुन्डाबळी इत्यादी देखिल फारसे दिसत नाही.

In reply to by सुखीमाणूस

पगला गजोधर Wed, 11/22/2017 - 10:12
अहो काका, असा संपूर्ण समाजाबद्दल दावा तुम्ही कुठली माहिती/ सर्व्हे च्या आधारे करताय ? जरा संदर्भ द्या, अभ्यासता येतील... हा आता हा निष्कर्ष, तुम्ही, तुमच्याच एका ओळखीच्या 2 बी एच के मधील सर्व्हे डेटा वर इथं उधृत केला असेल तर.. मगकाय आय रेस्ट माय केस...

In reply to by पगला गजोधर

arunjoshi123 Sat, 12/09/2017 - 13:40
असा संपूर्ण समाजाबद्दल दावा तुम्ही कुठली माहिती/ सर्व्हे च्या आधारे करताय ?
फुल्यांच्या कामाचा असा अनादर?

In reply to by सुबोध खरे

एमी Mon, 11/20/2017 - 16:54
हा या धाग्याचा विषय नाही. लव्ह जिहाद च्या धाग्यात आपण हा विषय का आणलाय त्याचे कारण समजले नाही >> विषय मी आणलेला नाही. सगळे प्रतिसाद नीट सुरुवातीपासून वाचा सुबोधभाऊ. === गैरवापर केला जाईल म्हणून कायदा बनवता येत नसेल तर आतापर्यंत कोणताच कायदा बनला नसता.

In reply to by एमी

सुबोध खरे Mon, 11/20/2017 - 19:50
ऍमी ताई "गैरवापर" हा जाणून बुजून होतो. भावनेच्या भरात एखाद्या स्त्रीने जर तक्रार दाखल केली तरी ती परत घेणे न्यायालयाच्या पूर्ण प्रक्रियेशिवाय शक्य नाही. तक्रार दाखल केली आणि दुसऱ्या दिवशी त्या स्त्रीला वाटले कि आपली चुक झाली तरी या चुकीची शिक्षा तिला आयुष्यभर भोगावी लागेल. तुम्ही जर कौटुंबिक न्यायालयात गेलात तर असे दिसेल कि ४९८ (अ) घरगुती हिंसा या कलमाखाली एकदा तक्रार दाखल केली आणि नवऱ्याला आणि सासरच्या माणसांना एकदा तुरुंगात जावे लागले तर त्या स्त्रीचा संसार सहसा परत कधीही सांधला जात नाही. गैरवापर करणारे याचा फायदा घेतात पण अशा अनेक स्त्रिया आहेत ज्यांना पश्चात्ताप होतो पण त्याचा नंतर उपयोग होत नाही. एकदा सासरची माणसं तुरुंगात गेली कि नटे परत जोडणे महा कठीण होऊन जाते. येथे हिंसा हे कोणत्याही कायद्यात क्षम्य नाहीच अन नवरा बायको यातील शरीर संबंध हे कायद्याने संमत असलेली गोष्ट आहे. यात "नंतर" स्त्रीची संमती आहे कि नाही हे सिद्ध करणे सोपे नाही. बलात्काराच्या गुन्ह्याबाबत कायदा असे म्हणतो कि हा गुन्हा सिद्ध करणे कठीण आहे पण तो झाला नाही असे सिद्ध करणे अजूनच कठीण आहे. अमेरिकेसारखी आपली स्थिती नाही-- अमेरिकेत बायको घोरते किंवा मानसिक दृष्ट्या आजारी आहे म्हणून तिच्यापासून घटस्फोट मिळू शकतो ती स्त्री किती परावलंबी आहे किंवा मुलांची काळजी घेऊ शकते कि नाही हा विचार तेथे नाही. फक्त नवर्याच्या संपत्तीतील अर्धा वाटा तिला द्यावा लागतो(म्हणूनच संपत्ती च्या वाटपासाठी लग्न पूर्व करार --prenuptial agreement केला जातो) आणि जितकि वर्षे लग्नाला झाली आहेत त्याचा अर्धी वर्षे पोटगी द्यावी लागते. आपल्याकडे ८५ टक्के जनता गरीब आहे. आणि नवऱ्याची स्वतःची मालमत्ता अर्धी मिळाली तरी बहुसंख्य स्त्रियांना त्यावर आयुष्यभर गुजराण करणे अशक्य आहे. सरकारकडून मिळणारा बेकार भत्ता हा उद्या जरी मिळाला तरी ती एक केवळ कागदोपत्री असणारी सोय असेल. म्हणजे काय सद्य स्थिती अशी आहे कि नवऱ्याने जबरदस्तीने ठेवलेला संबंध हा बलात्कार मानणे हा कायदा काही उच्चभ्रू शहरी बायकांसाठी असणारी एक फॅशन ठरेल.

In reply to by तर्राट जोकर

एमी Tue, 11/21/2017 - 01:48
+१ . सगळा प्रतिवाद ' गैरवापर' या एका मुद्यावरच दिला आहे. === श्रीगुरुजी: पतीने शरीरसंबंधाची मागणी केल्यास पत्नीने त्याची इच्छा पूर्ण केलीच पाहिजे (तिची इच्छा नसली तरी) असा कुराणाचा आदेश आहे. अॅमी: • इतर धार्मिक ग्रंथांमधे याबद्दल काय आदेश आहेत? सध्याचा भारतीय कायदा '"१५+ वयाच्या पत्नीसोबत पतीने ठेवलेला शरीरसंबंध हा 'कधीच' बलात्कार नसतो" असे सांगतो. "लग्न करतानाच पत्नीने 'आयुष्यभर पतीच्या शारीरिक गरजा पूर्ण करेन' असा कन्सेन्ट दिलेला असतो" असे कायदा समजतो.ते बरोबर आहे कि चूक याबद्दल तुमच वैयक्तिक मत काय? हा मूळ प्रश्न आहे. हे कसं सिद्ध करणार, गैरवापर झाला तर काय वगैरे सगळे पुढचे मुद्दे झाले. === 'पत्नीशी शरीरसंबंध' या मुद्यावरून इस्लामला झोडपता येत नाही. जर झोडपायच असेलचतर सगळेच धर्म आणि सध्याचा कायदा सगळ्यांनाच झोडपाव लागेल!!

In reply to by तर्राट जोकर

सुबोध खरे Tue, 11/21/2017 - 09:52
जोकर बुवा नायतर काय? दोघांचेही गोल गोल शब्दांचे मनोरे बांधणे चालू आहे. तुम्ही ऍमी ताईंचे स्टेनोग्राफर आहात का? नसेल तर कशाला पच पच करताय? स्वतःच मत मांडा नाही तर गप्प बसा

In reply to by तर्राट जोकर

सुबोध खरे Tue, 11/21/2017 - 13:16
मी दिलेले खालचे प्रतिसाद वाचले तरी का? उगाच जिथे तिथे "पच पच" करून कशाला ठेवताय? तुमच्यात आणि त्या मोगा/ चंपाबाई/ जामोप्यात फरक राहिलेला नाही असे वाटते.

In reply to by एमी

सुबोध खरे Tue, 11/21/2017 - 09:50
ऍमी ताई "लग्न करतानाच पत्नीने 'आयुष्यभर पतीच्या शारीरिक गरजा पूर्ण करेन' असा कन्सेन्ट दिलेला असतो" असे कायदा समजतो.ते बरोबर आहे कि चूक याबद्दल तुमच वैयक्तिक मत काय? when married wife's consent is granted असे कायदा समजतो ते चूक आहे असेच माझे मत आहे. स्त्रीला स्वतःच्या शरीरावर संपूर्ण हक्क आहे असेच माझे मत आहे. परंतु याला बलात्कार समजले तर त्याला अतिशय कडक कायदे लागू होतात म्हणून या कायद्याची अंमलबजावणी कशी करायची याबद्दल कायदे तज्ज्ञांना दुविधा आहे. तसेही आज १८ वर्षांपूर्वी केलेले लग्न हे बेकायदेशीर आहे असे असताना ते थांबवणे सरकारला जमलेले नाही यामुळेच सरकार आजही असा कायदा करण्यास धजावत नाही. मी माझे मत सांगत नव्हतो तर कायदे तज्ज्ञांची दुविधा सांगत होतो. गैरवापराबद्दल मत मांडण्याचे कारण एकच-- कायद्याचे मूळ तत्व कि "एकही निष्पाप माणसाला शिक्षा होता कामा नये"

In reply to by सुबोध खरे

एमी Tue, 11/21/2017 - 13:33
"लग्न करतानाच पत्नीने 'आयुष्यभर पतीच्या शारीरिक गरजा पूर्ण करेन' असा कन्सेन्ट दिलेला असतो" असे कायदा समजतो.ते बरोबर आहे कि चूक याबद्दल तुमच वैयक्तिक मत काय? >> ते चूक आहे असेच माझेदेखील वैयक्तिक मत आहे. + तो कायद्याने गुन्हा असावा असेदेखील मला वाटते. कायद्यात बदल व्हायचे तेव्हा होतील पण तोपर्यंत सजग स्रीपुरुषांनी वैयक्तिक पातळीवर pre/post nup agreement करून हा कायदा आम्हाला अमान्य आहे असे सांगावे. याखेरीज स्वतःच्या+इतर धर्मातले विवाहाबद्दलचे कायदेदेखील माहित करून घेऊन स्वतःपुरता customized करार करावा. शॉपिंग विधी वगैरें वर वेळ पैसा श्रम घालवायचेच असतील तर तेदेखील करा पण हे कायदा समजून घेणे आणि customize करून करार करणे हे आधी करा.

In reply to by एमी

arunjoshi123 Sat, 12/09/2017 - 14:21
ते चूक आहे असेच माझेदेखील वैयक्तिक मत आहे. + तो कायद्याने गुन्हा असावा असेदेखील मला वाटते.
लग्नात सामान्यपणे अभिप्रेत असलेल्या अशा कोणकोणत्या मुद्द्यांवर बाई (वा बाबा) असा रँडमली आपल्या मर्जीने, आपल्या प्रायवसीसाठी, स्वातंत्र्यासाठी इ इ पार्टनरला नकार देतो ते योग्य आहे म्हणे? समजा उद्या एका बाब्याने म्हटले, मला या महिन्यात घरी कवडिचा पैसा द्यायचा नाही - माझे पैसे, माझे स्वातंत्र्य, माझा अधिकार, माझी प्रायवसी, माझी संपत्ती, इ इ. एक महीना मी एकटाच वापरणार. जर बाईला सेक्सला हो वा नाही म्हणायचा अबसॉल्यूट अधिकार (मंजे अकारण, नवर्‍याच्या ईच्चेचा अनादर करत) हवा तसेच अनंत अधिकार पुरुषांनाही घेता येतील ना? ============================= बाईने नको म्हणलेल्या काळात नवर्‍याला दुसर्‍या बाईकडे जाण्याचा अधिकार / किंवा तिला घरी घेऊन येण्याचा अधिकार मला रास्त वाटतो. =========================== अशा प्रकारे अधिकार अधिकार ज्यांना खेळायचा आहे त्यांनी लग्न करूच नये. ====================== व्यवस्था आमच्यासाठी इतकी बदला कि शेवटी ती व्यवस्था व्यवस्थाच उरू यापेक्षा तुम्हाला आपली आपली दुसरी व्यवस्था करा ना.

In reply to by एमी

दुश्यन्त Tue, 11/21/2017 - 19:32
बलात्कार / बळजबरी केव्हाही केला तरी गुन्हाच असावा. विवाहांतर्गत बलात्कार गुन्हाच असायला पाहिजे. गैरवापर टाळण्यासाठी काही कायदे असावेत पण कुठेतरी गैरवापर होईल म्हणून (हायपोथेटिकली) गुन्हाच नाही असे म्हणणे ठीक नाही.४९८, ऍट्रॉसिटी विरोधी कायदे आणि बाकी अनेक कायदे अन्याय होतात /झाले आहेत म्हणूनच आहेत. गैरवापर व्हायला नकोच पण म्हणून धाक बसतील असे कायदे नको म्हणणे चूक आहे. बाकी लग्न म्हणजे आयुष्यभर शारीरिक गरज पूर्ण करेनच याला काही आधार आहे का? कायद्या मध्ये प्रत्येक व्यक्तीला मूलभूत अधिकार आहेत त्याच्या हे विरोधी नाही काय . मनस्थिती नाही, तब्येत , तणाव इ कुठल्याही कारणामुळे पत्नीने पत्नी नकार देत असेल तरी बळजबरी करणे म्हणजे बलात्कारच आहे.

In reply to by दुश्यन्त

एमी Tue, 11/21/2017 - 21:45
तुम्हालापण यादीत टाकत आहे ओ पाचव्या नंबरवर :) धन्यवाद. बाकी लग्न म्हणजे आयुष्यभर शारीरिक गरज पूर्ण करेनच याला काही आधार आहे का? >> हो आहे आधार. नक्की कलम आणि शब्द सांगता येणार नाहीत कारण मी वकील नाही. पण साधारण हिंदू लग्नाचा बेसच हा आहे की पत्नी पतीच्या शारीरिक गरज पूर्ण करेल आणि त्याबदल्यात पती तिला आयुष्यभर पोसेल. === फ्रॅंकली सांगायचतर ' लग्नातर्गत बलात्कार गुन्हा असावा' असे म्हणणारे दोनेक दिवसांत तिघेजण मिपावर भेटतील असे वाटले नव्हते. कारण गेल्या ४+ वर्षात दोनचजण भेटलेले तेपण माबोवर. भविष्य आशादायी आहे असे म्हणायला हरकत नसावी :-)

In reply to by एमी

दुश्यन्त Wed, 11/22/2017 - 12:22
...साधारण हिंदू लग्नाचा बेसच हा आहे .. हे पटत नाही . १. म्हणजे धर्म, रूढी वगैरे मध्ये एकवेळ ठीक पण घटना प्रत्येक व्यक्तीला 'व्यक्ती' म्हणून मुलभूत अधिकार देते (लिंग , धर्म ,जात ,वंश काहीही असो). मग एखादयला व्यक्तीला भले ते पती पत्नी असोत, शरीरसंबंधाला होकार /नकार देणे हा व्यक्तिगत अधिकार आहे. केवळ पती -पत्नी आहे म्हणून केव्हाव्ही हवे ते करणे बळजबरीच आहे. २. दुसरे असे कि आजकाल नवरा बायको दोघेही कमावतात मग पोसणे वगैरे त्यांना लागू होत नाही मग त्यांनी काय करावे. आणि शारीरिक गरजा तर दोघांना असतात केवळ नवर्याच्या गरजा भागवेन बदल्यात पोसले जाईल हा तर वन वे मामला झाला! ३. बाकी हिंदू धर्मात तर सहजीवन, परस्पर संमती वगैरे भरपूर तात्त्विक गोष्टी असतात मग लग्न केले म्हणून आयुष्यभर गरजा भागवणे हा तर करार झाला. आपण हिंदू लोक तर विवाह हा संस्कार आहे वगैरे गप्पा मारत असतो. त्यानुसार पण बळजबरी अयोग्यच आहे.

In reply to by दुश्यन्त

एमी Wed, 11/22/2017 - 17:35
१. फार जुने कायदे आहेत हे.1600s मधे कधीतरी इंग्रजांनी बनवले. आणि भारतात 1860 मधे आले. घटनेत तसेच्यातसे ठेवले गेले. खुद्द विकसित देशात आता 2000 नंतर ते बदलेले. २. पूर्वी बायकाना कुठे काय पर्याय होते शिक्षण, आर्थिक स्वावलंबनाचे. आतदेखील बऱ्याच बायका dependent असतात. ज्या स्वतंत्र आहेत त्यानी आग्रह धरावा नकाराधिकारचा. ३. ते सहजीवन, संस्कार वगैरे गफ्फा ऐकल्या आहेत. एका अनुबंध, कृतज्ञता वगैरे प्रवचन देणारयांना म्हणलं " काय हो जर सेक्स हा लग्नाचा पाया नसेल तर marital rape ला कायद्याने गुन्हा करायला तुमची हरकत नसेल ना?" तर ते म्हणाले "नको नको सकाळी चहात साखर कमी पडली म्हणून बायकोला ओरडल तर ती तडक पोलिसकडे जाऊन बलात्कारच गुन्हा दाखल करेल" ऑ किती तो विश्वास अनुबंधनावर =))

In reply to by दुश्यन्त

arunjoshi123 Sat, 12/09/2017 - 14:45
मग पोसणे वगैरे त्यांना लागू होत नाही मग त्यांनी काय करावे.
ते एरवीही लागू होत नाही. बाई काही फक्त पलंगावर लोळून सेक्स करते आणि हादडत राहते असं नसतं. स्त्रीच्या कामाचं आर्थिक मूल्यमापन केलं तर प्रत्येक (९५%) घरात स्त्रीच्च पुरुषाला कमावते नि पोसते असं निघेल. बाईच्या कामाला बाजारभाव नाही म्हणून ती फुक्कट खाते म्हणणं हा एक मोठा जावईशोध आहे. --------------------------- प्रयोग म्हणून कधी सेक्स आणि पलंगावर बसून खाणे वजा जाता सर्व कामे करण्यासाठी सरकारी नियमांप्रमाणे नोकर हायर करून बघा. नाय दिवाळं वाजलं तर ....

In reply to by एमी

पुंबा Wed, 11/22/2017 - 12:28
नक्की कलम आणि शब्द सांगता येणार नाहीत कारण मी वकील नाही. पण साधारण हिंदू लग्नाचा बेसच हा आहे की पत्नी पतीच्या शारीरिक गरज पूर्ण करेल आणि त्याबदल्यात पती तिला आयुष्यभर पोसेल.
हेच किती भयानक आहे मुळात. ह्यामूळेच कुटुंबसंस्था शोषणाची पहिली प्रयोगशाळा आहे आपल्याकडे. बायको आणि नवरा दोघेही आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असले पाहिजेत ते यासाठीच. 'लग्नातर्गत बलात्कार गुन्हा असावा' असे माझे देखिल मत आहे(अर्थात तो व्य्वस्थित डिफाईन केला जावा जेणेकरून गैरवापर रोखता येईल.). पण, याजोडीला सेक्स करू देत नाही/करण्यास साह्य करत नाही या करणान्वये तात्काळ घटस्फोट मिळण्याची सोय असली पाहिजे. मुळात घटस्फोटाला जो एक कलंक चिकटला आहे तो अवश्यमेव आणि लवकरात लवकर नष्ट व्हावा.

In reply to by पुंबा

एमी Wed, 11/22/2017 - 17:16
बायको आणि नवरा दोघेही आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असले पाहिजेत ते यासाठीच. >> +1 'लग्नातर्गत बलात्कार गुन्हा असावा' असे माझे देखिल मत आहे >> धन्यवाद :) पण, याजोडीला सेक्स करू देत नाही/करण्यास साह्य करत नाही या करणान्वये तात्काळ घटस्फोट मिळण्याची सोय असली पाहिजे. >> आहे की ते कलम आधीच. आणि आता mutual consent ने होनारा घटस्फोट तात्कालदेखील होतो. आधीच मुळात घटस्फोटाला जो एक कलंक चिकटला आहे तो अवश्यमेव आणि लवकरात लवकर नष्ट व्हावा. >> +1. === याखेरीज मला इस्लाममधली मेहेरची रक्कम आधीच ठरवणे, ठरावीक काळासाठीच पोटगी, मुलांची कस्टडी खर्च उचलणाऱ्याकडे वगैरे कलम योग्य वाटतात.

In reply to by एमी

पुंबा Wed, 11/22/2017 - 18:16
https://timesofindia.indiatimes.com/india/Denial-of-sex-by-spouse-is-cruelty-Supreme-Court/articleshow/43470243.cms
तुमचे खरे आहे. या लिंकमध्ये सेक्स डिनाय करणे म्हणजे क्रौर्य म्हटले गेले आहे.
याखेरीज मला इस्लाममधली मेहेरची रक्कम आधीच ठरवणे, ठरावीक काळासाठीच पोटगी, मुलांची कस्टडी खर्च उचलणाऱ्याकडे वगैरे कलम योग्य वाटतात.
मला मेहेर, पोटगी हेच मुळी पटत नाही.
मुलांची कस्टडी खर्च उचलणाऱ्याकडे
हे तर आजिबातच नाही. मुलाने ठराविक वय ओलांडेपर्यंत दोघांनी समान खर्च उचलायचा. कस्टडी दोघांकडे मिळून. मुलाची कस्टडी ही पैशाने विकत घेऊ शकणारी कमॉडिटी बनणे योग्य नाही, मला मॉरली चुकीचे वाटते.

In reply to by पुंबा

एमी गुरुवार, 11/23/2017 - 02:35
मला मेहेर, पोटगी हेच मुळी पटत नाही. >> हिंदू कायद्या'पेक्षा' इस्लाम कायदे चांगले आहेत याबाबतीत. === हे तर आजिबातच नाही. मुलाने ठराविक वय ओलांडेपर्यंत दोघांनी समान खर्च उचलायचा. कस्टडी दोघांकडे मिळून. मुलाची कस्टडी ही पैशाने विकत घेऊ शकणारी कमॉडिटी बनणे योग्य नाही, मला मॉरली चुकीचे वाटते. >> हे पण ठीकच आहे. जे काही विचार असतील ते आधीच बोलून, negotiate करुन करार करणे हेच योग्य ठरेल.

In reply to by एमी

arunjoshi123 Sat, 12/09/2017 - 14:37
पण साधारण हिंदू लग्नाचा बेसच हा आहे की पत्नी पतीच्या शारीरिक गरज पूर्ण करेल आणि त्याबदल्यात पती तिला आयुष्यभर पोसेल.
अगायो. हिंदू ठेवलेल्या बाईचा पण हा बेस नसतो असं माझं निरिक्षण आहे. बायकोचं जाऊच द्या. ------------------ हिंदू धर्मात स्त्री पुरुषाचं नातं अध्यात्मिक, धार्मिक, ईश्वरिय, इ इ असतं असं आम्ही पाहिलेल्या हिंदू धर्माचं सत्य आहे. हिंदूच्या शेजारी राहून मुस्लिमही भारतात अशाच प्रकारचं वैवाहिक नातं पाळतात. (याला अंद्राबी सारख्या बाई प्रजनन मशिन आहे म्हणणारी देशद्रोही इ इ अपवाद, सोडा.)

In reply to by एमी

arunjoshi123 Sat, 12/09/2017 - 14:38
फ्रॅंकली सांगायचतर ' लग्नातर्गत बलात्कार गुन्हा असावा' असे म्हणणारे दोनेक दिवसांत तिघेजण मिपावर भेटतील असे वाटले नव्हते. कारण गेल्या ४+ वर्षात दोनचजण भेटलेले तेपण माबोवर. भविष्य आशादायी आहे असे म्हणायला हरकत नसावी :-)
अगदी कंचाही बलात्कार गुन्हाच आहे ही साधी गोष्ट चार वर्षे कळली नाही मंजे कमाल आहे.

In reply to by दुश्यन्त

arunjoshi123 Sat, 12/09/2017 - 14:25
विवाहांतर्गत बलात्कार गुन्हाच असायला पाहिजे.
विवाहांतर्गत बलात्कार गुन्हा आहेच. कायद्याने देखील आहे. बलात्काराच्या कायद्यात नवरा अपवाद नाही. ---------------------------- लग्नानंतर शरीरसंबंधाबद्दल तक्रार करू शकत नाही. बलात्काराबद्दल करू शकतात. आणि प्रत्येक शरीरसंबंधाला बलात्कार म्हटलं तर न्यायालय ते मान्य करत नाही.

In reply to by दुश्यन्त

arunjoshi123 Sat, 12/09/2017 - 15:14
विवाहांतर्गत बलात्कार गुन्हाच असायला पाहिजे. गैरवापर टाळण्यासाठी काही कायदे असावेत
कायदे आहेत. कोर्टाला तो विशीष्ट शरीरसंबंध बलात्कार कसा आहे हे पटवता आलं तर शिक्षा आहे.

In reply to by एमी

arunjoshi123 Sat, 12/09/2017 - 14:04
'"१५+ वयाच्या पत्नीसोबत पतीने ठेवलेला शरीरसंबंध हा 'कधीच' बलात्कार नसतो" असे सांगतो.
शरीरसंबंध हा बलात्कार नसतो असं आपला कायदा म्हणतो. बलात्कार हा बलात्कार नसतो असं म्हणत नाही.

In reply to by एमी

arunjoshi123 Sat, 12/09/2017 - 14:07
"लग्न करतानाच पत्नीने 'आयुष्यभर पतीच्या शारीरिक गरजा पूर्ण करेन' असा कन्सेन्ट दिलेला असतो" असे कायदा समजतो.ते बरोबर आहे कि चूक याबद्दल तुमच वैयक्तिक मत काय?
हे बरोबर आहे. आणि हे म्यूच्युअल आहे. तुम्ही वाचलेल्या खटल्यात ते आलं नसलं तरी.

In reply to by एमी

arunjoshi123 Sat, 12/09/2017 - 14:10
'पत्नीशी शरीरसंबंध' या मुद्यावरून इस्लामला झोडपता येत नाही. जर झोडपायच असेलचतर सगळेच धर्म आणि सध्याचा कायदा सगळ्यांनाच झोडपाव लागेल!
तुम्ही काढलेला दिव्य अनर्थ १००% मान्य केला तरी इस्लाम आणि शध्याचा कायदा या दोघांनाच झोडपता येते. हिंदू धर्माला नाही.

In reply to by एमी

arunjoshi123 Sat, 12/09/2017 - 13:53
गैरवापर केला जाईल म्हणून कायदा बनवता येत नसेल तर आतापर्यंत कोणताच कायदा बनला नसता.
चला मग आपण खोटे बोलायला ६ महिने सक्तमजुरिचा कायदा बनवू.

In reply to by एमी

arunjoshi123 Sat, 12/09/2017 - 13:55
गैरवापर केला जाईल म्हणून कायदा बनवता येत नसेल तर आतापर्यंत कोणताच कायदा बनला नसता.
सर्व कायदे गैरवापर केला जाणार नाही असेच बनलेले असतात.

In reply to by सुबोध खरे

arunjoshi123 Sat, 12/09/2017 - 12:57
बायकोने भावनावेगाच्या भरात
स्त्रीयांना भावनावेगाचा भर वैगेरे काही नसतो, सर्वच स्त्रीया अत्यंत संतुलित सुविचारी असतात, तेव्हा हे व्यक्तव्यच चुकीचे आहे.

In reply to by सुबोध खरे

arunjoshi123 Sat, 12/09/2017 - 13:05
याचा अर्थ असा नाही कि असे कायदेतज्ञ पत्नीवर हणाऱ्या अत्याचाराचे समर्थन करतात( हा आरोप बहुतेक अति उदारमतवादी किंवा अतिस्त्रीस्वातंत्र्य वादी करताना आढळतात).
कायदेतज्ञ हे हिंदू धार्मिक पुरुष आहेत. त्यांनी मनुस्मृती वाचलेली असणार. इतकेच काय काही काही जज (ते ही चक्क सुप्रिम कोर्टाचे) निवाड्यात मनुस्मृतीचा दाखला देतात!!! बायका वेगळ्या ग्रहावरच्या आहेत. ----------------------------- आणि रोगापेक्षा इलाज खराब असला म्हणून काय झालं. वाईट परीणाम फक्त पुरुषांवर होनार आहे. इतकी हजार वर्षे स्त्रीञांनी इतके करोडो अन्याय सहन केले. आता पुरुषांना करू द्यात. हाच खरा न्याय!

In reply to by एमी

Duishen Tue, 11/21/2017 - 04:02
विवाहांतर्गत बलात्कार गुन्हा असायला पाहिजे. हे कायद्यात सिद्ध करणे त्रासदायक असेल पण कठीण नाही. या कायद्यामुळे जोडीदार किमान एकमेकांच्या इच्छा विचारात घेण्याची प्रक्रिया अधिक सकसपणे करतील अशी आशा आहे.

In reply to by Duishen

एमी Tue, 11/21/2017 - 06:08
धन्यवाद Duishen :) माबोवरचे भरत., माबो-मिपावरचे आदित्यकोरडे आणि आता तुम्ही! आकडा वाढत आहे... I am happy. या कायद्यामुळे जोडीदार किमान एकमेकांच्या इच्छा विचारात घेण्याची प्रक्रिया अधिक सकसपणे करतील अशी आशा आहे. >> Exactly हेच अपेक्षित आहे! कायद्यातल्या खाचाखोचा, त्याचा गैर/वापर, न्यायालयात खेटे घालणे वगैरें खरंतर sideproduct झाले. "समाजमनाची, व्यक्तीची विचारप्रक्रिया बदलणे; लग्न केले असलेतरी जोडीदाराला कधीच गृहीत धरता येत नाही हे प्रत्येकाला कळणे आणि मान्य असणे" या गोष्टी प्रबोधन करून लोकांमधे मुरवायला जेवढा वेळ लागेल त्यापेक्षा कमी वेळ कायदा बनवल्यास लागेल. तोच धार्मिक नियमांचा मूळ उद्देश होता आणि आता कायद्याचा आहे.

In reply to by एमी

सुबोध खरे Tue, 11/21/2017 - 09:58
ऍमी ताई सध्या पत्नीच्या संमती शिवाय केलेला संभोग हा बलात्कार (३७६ )या कायद्यात येत नसून घरगुती हिंसा (४९८ अ) या कायद्यात गणला जातो याचे कारण बलात्कार हा गुन्हा अजामीनपात्र आहे पण घरगुती हिंसा हा कायदा जामीनपात्र आहे. "४९८ अ" मध्ये असूनही प्रत्यक्ष किती केसेस मध्ये पोलिसात तक्रार दाखल केली जाते हे पाहिलेत तर मी काय म्हणतो ते लक्षात येईल. बलात्कार कायद्याखाली जर "पत्नीशी संभोग" आणायचा असेल तर त्याला हा कायदा आमूलाग्र बदलावा लागेल आणि ती गोष्ट एवढी सोपी नाही.

In reply to by Duishen

श्रीगुरुजी Tue, 11/21/2017 - 15:35
हे कायद्यात सिद्ध करणे त्रासदायक असेल पण कठीण नाही. हे कसे सिद्ध करणार याचविषयी मी अनेकदा विचारले आहे. त्यावर अजून एकानेही उत्तर दिले नाही. मुळात या गुन्ह्याची व्याख्या काय असेल, तो कसा सिद्ध करणार याविषयी माहिती द्यावी.

In reply to by Duishen

arunjoshi123 Sat, 12/09/2017 - 15:16
या कायद्यामुळे जोडीदार किमान एकमेकांच्या इच्छा विचारात घेण्याची प्रक्रिया अधिक सकसपणे करतील अशी आशा आहे.
मग आपण संपूर्ण मानवजात एकमेकाच्या कल्याणाचा विचार करेल असा कायदा करू.

In reply to by श्रीगुरुजी

Duishen Tue, 11/21/2017 - 04:25
१. पंथ आणि धर्म हे सारख्याच संकल्पना आहेत का? २. पश्चाताप हे चूक उमगल्याचे लक्षण आहे महामूर्खपणाचे कसे? इतिहासात किंवा मिथकात पश्चातापाची अनेक उदाहरणे आहेत. महाकवी वाल्मिकी यांना देखील पश्चाताप झाल होता. स्वत:च्याच बंधूभावांना मारले असा पश्चाताप अर्जुनालाही झाला होता. ३. विवाह, घटस्फोट, पोटगी, अपत्यांचा ताबा, पत्नीशी शरीरसंबंध, कपडे इ. विषयीचे कायदे व पद्धती स्त्रियांसाठी अत्यंत अन्यायकारक आहेत, हे तर सगळीकडेच आढळते. पण अंगुलीनिर्देश एकीकडेच का असावा?

In reply to by Duishen

आनन्दा Tue, 11/21/2017 - 08:22
#3 . कायद्यात बदल झाल्यावर हिंदू धर्म बुडाला म्हणून आरडाओरडा करत नाहीत. बाकी बलात्काराच्या मुद्द्यावरून सगळ्यांचेच एक महत्वाचा गोष्टीकडे क्सउर्लक्ष होतेय.. सर्वसामान्यपणे आपण बलात्कार एकदाच होतो असे मानतो. एकदा बलात्कार केला म्हणून बायको काय किंवा नवरा काय दोघेही न्यायालयात जाण्याची शंका नाही. पण विवाहांतर्गत बलात्कार म्हटले तर तो आठवड्याला एकदा किंवा दोनदा तीनदा होत असणार. त्या दृष्टीने विचार केला तर हिंदू स्त्रिया नक्कीच न्यायालयात दाद मागू शकतात. मुसलमानांचे माहीत नाही

In reply to by आनन्दा

Duishen Tue, 11/21/2017 - 09:10
#3 . कायद्यात बदल झाल्यावर हिंदू धर्म बुडाला म्हणून आरडाओरडा करत नाहीत. म्हणूनच म्हणतोय आनंदाजी, हिंदूकोड बिल, तो का फेटाळण्यात आला आणि त्यावेळेसच्या धर्मपंडितांनी काय काय बोलले याचा अभ्यास करावा. त्या दृष्टीने विचार केला तर हिंदू स्त्रिया नक्कीच न्यायालयात दाद मागू शकतात. हे वाचून चांगले वाटले आणि असा सशक्त कायदा पाहिजे.

In reply to by Duishen

सुबोध खरे Tue, 11/21/2017 - 13:25
Duishen आजही स्त्रिया घरगुती हिंसा या कलमाखाली (४९८ अ) लग्ना अंतर्गत बलात्कार यासाठी दाद मागू शकतात हे आपल्याला माहित आहे का? माहित असेल तर केवळ वादासाठी तो बलात्काराच्या गुन्ह्यात सामील करा असे आपले म्हणणे आहे का? किती महिलांनी अशी तक्रार केली आहे याचा आपल्याकडे काही विदा आहे का? वर स्पष्ट पणे म्हटले आहे कि बलात्काराच्या गुन्हा अजामीनपात्र आहे. बायकोने बलात्काराचा गुन्हा दाखल केला तर संभोग झाला हे सहज सिद्ध होईलंच पण स्त्रीने संमती दिली होती हे न्यायालयात सिद्ध होईपर्यंत नवरा तुरुंगातच राहील. काही वर्षे नवरा तुरुंगात राह्ल्यावर नवरा बायकोचे संबंध सुरळीत राहतील असे म्हणणे भाबडेपणाचे आहे असे नमूद करू इच्छितो. तरीही सामाजिक स्थिती न बदलता कायद्यात आमूलाग्र बदल करा असेच आपले म्हणणे आहे का?

In reply to by सुबोध खरे

Duishen Wed, 11/22/2017 - 00:43
सुबोध जी, आजही स्त्रिया घरगुती हिंसा या कलमाखाली (४९८ अ) लग्ना अंतर्गत बलात्कार यासाठी दाद मागू शकतात हे आपल्याला माहित आहे का? आय. पी.सी. ४९८ ए अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही. आपल्या माहितीसाठी खालील लिंक देत आहे - https://indiankanoon.org/doc/538436/ माहित असेल तर केवळ वादासाठी तो बलात्काराच्या गुन्ह्यात सामील करा असे आपले म्हणणे आहे का? मला वाटत या नात्याच्या समजुतीला कायद्याचे अधिष्ठान गरजेचे आहे. पत्नीची संमती 'गृहीत' धरल्या जाते. किमान असा काही कायदा अस्तित्वात आला आणि यथायोग्य जनजागृती झाली तर समागम या विषयाने पती-पत्नींच्या नात्यात चर्चा आणि सुसंवाद वाढेल. किती महिलांनी अशी तक्रार केली आहे याचा आपल्याकडे काही विदा आहे का? माफ करा. 'विदा' हा शब्द मिपावर वाचला आहे पण तो नेमका कशाचे संक्षिप्त रूप आहे याची माहिती नाही. पण आपल्या वाक्यावरून विदा म्हणजे पुरावा असा अर्थ घेऊन प्रतिसाद देत आहे. विविध कारणास्तव माझा संबंध अनेक महिला संघटनाशी आणि समुपदेशक म्हणून कार्यरत असणाऱ्या व्यक्तींशी दीर्घकाळ आला. त्यांच्या झालेल्या परिचयातून महिलांच्या विविध प्रश्नांविषयी चर्चा झाली. त्यांच्याशी झालेल्या चर्चेत महिलांचे विवाहांतर्गत बलात्काराच्या केसेस वर देखील चर्चा झाली आहे. हे पण अतिशय त्रासलेल्या महिलांच्या बोलण्यातून येत असे. एकतर आपण पतीला 'समर्पित' असावे / घर सांभाळले पाहिजे / घर तुटू नये अशी शिकवण असल्यामुळे अनैच्छिक आणि जबरदस्तीने केलेला समागम नाईलाजाने स्वीकारल्या जातो आणि हा पण बलात्कार असतो याची त्यातील बहुतेक जणींना जाणीव नसते. मुळात त्याला कायद्यात अधिष्ठान नसल्यामुळे 'नवरा त्रास देतो, मारहाण करतो' म्हणून नोंद असे. अनेक केसेस असे जरी म्हटले तरीही त्याला संख्यात्मक पुरावा नाही. वर स्पष्ट पणे म्हटले आहे कि बलात्काराच्या गुन्हा अजामीनपात्र आहे. मला थोडा संदर्भ द्याल? माझे स्वत:चे मत आहे की १८ वर्षाखालील संबंध हे 'बलात्कार' या कक्षेत यावेत. हे थोडे धाडसाचे आहे कारण आपल्या देशात बालविवाहाचे अजूनही प्रमाण बऱ्यापैकी आहे. लग्नाचे संमती वय १० वरून बदलत जाऊन १८ वर्षे होण्याला आपल्याकडे साधारणत: १०० -१२५ वर्षाचा कालावधी लागला आहे. भवंरीदेवीची केस तर आपल्याला माहिती असणारच आहे. जर बालविवाहाचा (प्रतिबंधक) कायदा नसता तर भवंरीदेवीची केस कधीच समोर आली नसती. पण किमान कायद्याचा आधार म्हणून पुढे चालून 'विशाखा मार्गदर्शिका' आणि कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ (प्रतिबंध) कायदा आला. किमान दाद मागण्यासाठी महिलांना जागा तर मिळाली. ३७६ बी सोडला तर सर्व बलात्काराचे गुन्हे हे अजामीनपात्र आहेत. ३७६ बी मधे पत्नी सेपरेट राहत असेल आणि अश्या पत्नीशी बळजोरी केल्यास तो बलात्कार मानल्या जाईल पण तो जामीनपात्र आहे. तरीही सामाजिक स्थिती न बदलता कायद्यात आमूलाग्र बदल करा असेच आपले म्हणणे आहे का? लिंगभेदभाव आणि लिंग विषमता असणाऱ्या आपल्या समाजात स्त्रीभृण हत्या ही कायद्याच्या कक्षेत आली नसती तर याचे प्रमाण प्रचंड वाढले असते. बृहन्मुंबई सारख्या ८९% साक्षरता असणाऱ्या पॉष शहरात सेक्स रेशो केवळ ८३२ आहे (संदर्भ सेन्सस २०११). महाराष्ट्रातील सगळ्यात कमी!. बृहन्मुंबई मधे कोलाबा, सैंडहर्स्ट रोड, मरीन लाइन्स, ग्रांट रोड, भायखळा, परेल, माटुंगा, दादर / प्लाजा, एल्फीन्सस्टन यांचा समावेश आहे. स्थलांतरितांचे प्रमाण गृहीत धरूनही स्त्रीभृण हत्या होत नाही असे कसे नाकारता येईल? किंवा बीडचे उदाहरण तर कुप्रसिद्ध आहे. शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यात केवळ ९१५ सेक्स रेशो आहे. तेंव्हा पारंपारिक समजुतीत अडकलेल्या समाजाच्या मतपरिवर्तनावर केवळ भर देऊन चालणार नाही त्यापेक्षा कायद्याचे अधिष्ठान निर्माण होऊन त्रासाला वाचा फोडण्यासाठी जागा आवश्यक आहे असे वाटते.

In reply to by Duishen

सुबोध खरे Wed, 11/22/2017 - 10:39
वादात न शिरता मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो. स्त्रीच्या संमतीशिवाय नवऱ्याने तिच्याशी जबरदस्तीने संभोग करणे हा गुन्हाच आहे आणि त्याला कोणतेंही समर्थन होऊशकत नाही असे मी वर स्पष्टपणे म्हटले आहे. परंतु वस्तुस्थिती काय आहे हे नीट समजावून न घेता केवळ कायदा केल्याने प्रश्न सुटेल हे म्हणणे म्हणजे आराम खुर्चीतील विचारवंतासारखा विचार करणे आहे. आज बहुसंख्य स्त्रिया तक्रार करत नाहीत याचे कारण काय तर त्या आर्थिक दृष्ट्या सक्षम नाहीत. लहान वयात लग्न झाल्याने त्यांची शैक्षणिक पात्रता फारच कमी असते. त्यातून बाल विवाहाचे मुख कारण गरिबी आहे. उत्तरप्रदेश बिहार सारख्याच नव्हे तरी महाराष्ट्रासारख्य कल्याणकारी राज्यातहि खायचे एक तोंड कमी होते इतका साधा विचार असतो. अशा परिस्थितीत मुलीने नवऱ्याविरुद्ध तक्रार केली तर तिला आईबापांचा आधार मिळतच नाही कारण लग्न झालेली मुलगी परत अली तर खायचे एक तोंड वाढते. मग त्या मुलीने जायचे कुठे? नवऱ्याने हाकलल्यावर तिने जायचे कुठे? नवऱ्याची स्वतःची मालमत्ता नसेल तर हक्क कुठल्या मालमत्तेवर मागायचा? पोटगीसाठी न्यायालयात जाणे इ गोष्टी हातावर पोट असलेल्या माणसांना परवडत नाही. वैयक्तिक हक्क इ. हे भरल्या पोटाचे चोचले आहेत असे दुर्दैवाने मला म्हणावे लागते. बहुसंख्य स्त्रिया "चरितार्थासाठी" लग्न करतात असे र धों कर्वे १९३१ साली म्हणून गेले आहेत ती वस्तुस्थिती आज ८६ वर्षांनी फारशी बदललेली नाही असे खेदाने म्हणावेसे वाटते. सर्वात महत्त्वाची गोष्ट हि आहे कि बालविवाह विरोधी कायदा निर्दयपणे राबविला गेला पाहिजे आणि माध्यमिक शिक्षणसुद्धा मोफत आणि सक्तीचे केले पाहिजे . कमीत कमी १० वि आणि व्यवसाय शिक्षण दिले तरच स्त्रिया आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होऊ शकतील. याशिवाय संमतीशिवाय संभोग करणे हा गुन्हा आहे अशा तर्हेचे लैंगिक शिक्षण मुलांचे शाळेत सातवी आठवी पासूनच होणे आवश्यक आहे. केवळ संमतीविरुद्ध संभोग हा "बलात्कार" म्हणून कायदा केला तर चार मध्यम/ उच्च वर्गीय सुशिक्षित पांढरपेशा स्वावलंबी स्त्रियांना न्याय मिळेल. हा न्यायाचा विजय नसून न्यायाचे विडंबनच(travesty of justice) म्हणावे लागेल. स्त्रीचे "आर्थिक सक्षमीकरण" झाले तरच तिची खरी प्रगती होईल. बाकी कायदे कितीही करा. जाता जाता --लग्नातील जबरदस्ती संभोग हा "बलात्कार" म्हणून कायदा झाला आणि एखाद्या स्त्रीच्या नवऱ्याला तो सिद्ध झाला म्हणून जन्मठेपेची ( मरेपर्यंत सश्रम कारावास) शिक्षा द्यायची का? आणि अशी शिक्षा झाल्यावर न्याय नक्की कुणाला मिळेल? बाकी शब्दाचा किस पाडण्यात मला अजिबात रस नाही इति लेखन सीमा

In reply to by सुबोध खरे

एमी Wed, 11/22/2017 - 12:17
माझं नेमकं उलट निरीक्षण आहे. निम्न वर्गातल्या स्त्रिया आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असतात. रादर त्यांची कुटुंब त्याच चालवत असतात. लवकर लग्न करून देणे, नवऱ्याने टाकली तर माहेरी सहारा ना मिळणे यामागे आर्थिकपेक्षा सामाजिक कारणं जास्त आहेत. "चरितार्थासाठी" लग्न करणाऱ्या स्त्रिया इथे मराठी आंजावर दिसतात. मध्यम/उच्चमध्यम वर्ग. त्यांच आणि नवऱ्याचं deal झालेलं असतं. म्हणूनच इथे लग्नातर्गत बलात्कार हा इश्यू होताना दिसत नाही. प्रॉब्लेम हा आहे की default कायदा सगळ्यांना लागू होतो. उच्च/ मध्यम वर्गातले पुरुष prenup करून आपले interest सांभाळू शकतात पण निम्न वर्गातल्या स्त्रीकडे तो पर्याय नसतो. त्यामुळे default कायदा तिला सुरक्षा देईल असा हवा. जाताजाता: जन्मठेप 14 वर्षांची असते. बलात्कारासाठी 7 वर्षांची शिक्षा आहे. लग्नांतर्गत बलात्कारासाठी त्यापेक्षा थोडी कमी ठेवता येईल. पण शिक्षा हवीच. फक्त यापुढे असे करू नको असले सोल्युशन नको; जे सध्या 498a करतेय.

In reply to by एमी

सुबोध खरे Wed, 11/22/2017 - 13:01
Criminal Law (Amendment) Act, 2013 376. 1. Whoever, except in the cases provided for in sub-section (2), commits rape, shall be punished with rigorous imprisonment of either description for a term which shall not he less than seven years, but which may extend to imprisonment for life, and shall also be liable to fine.

In reply to by सुबोध खरे

एमी Wed, 11/22/2017 - 13:49
तिथेच खाली हे देखील आहे: Sexual intercourse by husband upon his wife during separation 376B. Whoever has sexual intercourse with his own wife, who is living separately, whether under a decree of separation or otherwise, without her consent, shall be punished with imprisonment of either description for a term which shall not be less than "two" years but which may extend to "seven" years, and shall also be liable to fine. आता जर विभक्त नवर्याला 2 ते 7 वर्ष शिक्षा होत असेल तर विभक्त नसलेल्या नवर्याला 7 ते 14 ते 20 किंवा मरेपर्यत शिक्षा करायला त्या गुन्ह्याची तीव्रता किती लागेल! अन असेल तेवढी तीव्रता तर होउदे तेवढी शिक्षा...

In reply to by एमी

सुबोध खरे Wed, 11/22/2017 - 14:53
जाताजाता: जन्मठेप 14 वर्षांची असते. बलात्कारासाठी 7 वर्षांची शिक्षा आहे. लग्नांतर्गत बलात्कारासाठी त्यापेक्षा थोडी कमी ठेवता येईल. पण शिक्षा हवीच. हे वर लिहिलंय आणि आता वस्तुस्थिती वेगळी आहे याचा पुरावा दिल्यावर "घूमजाव" आपल्याला दंडवत!!!

In reply to by सुबोध खरे

एमी Wed, 11/22/2017 - 17:07
कसलं घूमजाव आणि कितीदा दंडवत? तुम्ही ज्या लिंक देता त्या स्वतःतरी पूर्ण वाचता का? विभक्त नवर्याला बलात्कारसाठी जास्तीत जास्त 7 वर्षांची शिक्षा करता येते असंच लिहलं आहे ना तिथे? मग विभक्त नसलेल्या नवर्याला त्यापेक्षा जास्त शिक्षा कधी आणि का होईल? अन तुमचं काय म्हणणय आयुष्यभर जन्मठेप होण्याइतका हिंसक बलात्कार करणाऱ्याला सोडून द्यावं आणि त्याच्या बायकोला परत त्याच्याकडे रहायला लावावं?

In reply to by सुबोध खरे

चिगो Mon, 11/27/2017 - 17:14
जाताजाता: जन्मठेप 14 वर्षांची असते.
चुकीची माहिती.. जन्मठेपीची मुदत १४ वर्षांची असते, ही चुकीची समजुत आहे.. हे वाचा.

In reply to by एमी

सुबोध खरे Wed, 11/22/2017 - 13:06
माझं नेमकं उलट निरीक्षण आहे. हे बरोबर "चरितार्थासाठी" लग्न करणाऱ्या स्त्रिया इथे मराठी आंजावर दिसतात. मध्यम/उच्चमध्यम वर्ग. त्यांच आणि नवऱ्याचं deal झालेलं असतं. म्हणूनच इथे लग्नातर्गत बलात्कार हा इश्यू होताना दिसत नाही. वॊव ,मग पुढे बोलणंच नाही. अनाहितांना अगदी गहिवरून आलं असेल साक्षात दंडवत

In reply to by सुबोध खरे

एमी Wed, 11/22/2017 - 13:55
दंडवतासाठी आभार _/\_ गहिवरलेल्या अनाहितांनी आपापल्या नवर्याना विचारावं "तुझं काय मत आहे लग्नांतर्गत बलात्काराबद्दल? postnup करशील का?" केलं तर चांगलंच आहे! मीपण विश्वास ठेवेन मग कि खरच दालआटाच्या चाकोल्या बनवायच्या बदल्यात त्यांना 40k ची लाईफस्टाईल मिळतेय!

In reply to by एमी

arunjoshi123 Sat, 12/09/2017 - 15:30
"चरितार्थासाठी" लग्न करणाऱ्या स्त्रिया इथे मराठी आंजावर दिसतात.
अगायो, इथे स्त्रीयांनी कधीच का लग्न केले ते सांगीतलेले नाही आणि सांगीतले तर असे उत्तर दिले नाही.

In reply to by सुबोध खरे

दिमित गुरुवार, 03/01/2018 - 08:38
>>>>>वादात न शिरता मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो. स्त्रीच्या संमतीशिवाय नवऱ्याने तिच्याशी जबरदस्तीने संभोग करणे हा गुन्हाच आहे आणि त्याला कोणतेंही समर्थन होऊशकत नाही + Infinity माणुस म्हणुन प्रत्येकालाच भावभावना असतातच, आणि त्या विचारात न घेता त्या विरोधात कुठलीहि गोष्ट केलि ( तो माणुस कुठ्ल्याही जातीधर्माचा, लि॓गाचा असला तरी) तर तो मानवतेच्या भावनेतून (कि॓वा द्रुष्टिकोनातुन म्हणा हवे तर.) गुन्हाच आहे. माणुस म्हणुन आपली वागणुक जेव्हा समोरच्या माणसाशि माणसासारखी असेल, ( जातपात, धर्म, लि॓ग ह्या गोष्टी विचारात न घेता) तेव्हाच ह्या असल्या गोष्टी कमी होतील.

In reply to by Duishen

arunjoshi123 Sat, 12/09/2017 - 15:23
आय. पी.सी. ४९८ ए अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही. आपल्या माहितीसाठी खालील लिंक देत आहे - https://indiankanoon.org/doc/538436/
लिंकेचा आणि वाक्याचा काय संबंध?

In reply to by Duishen

arunjoshi123 Sat, 12/09/2017 - 15:26
आपल्या समाजात स्त्रीभृण हत्या ही कायद्याच्या कक्षेत आली नसती तर याचे प्रमाण प्रचंड वाढले असते.
जिथे संपत्ती बायकांकडे असते तिथे - केरळ, मेघालय, बोडोलँड - हा रेशो उलटा अनैसर्गिक आहे आणि त्यासाठी आजही काही कायदा नाही. उलट काही मूर्ख पुरोगामी हे आकडे भूषण म्हणून मिरवतात.

In reply to by Duishen

आनन्दा Tue, 11/21/2017 - 16:20
इतिहासातून बाहेर या हो. मी सध्याच्या स्थितीबद्दल सांगतोय. अंधश्रद्धा निरमूलन कायदा झालाच की नाही विरोधकांच्या नाकावर टिचचून? म्हणजे हिंदू वैयक्तिक कायद्यात सुधारणा करणे तुलनेने सोपे आहे. त्याला जर विरोध झालाच तर कायदेशीर पातळीवर न्यायालयातच होईल. रस्त्यावर गाड्या जाळून आणि स्मृतिचिन्हे मोडून नाही असे मी म्हणतो. तुमचं काय मत?

In reply to by आनन्दा

Duishen Wed, 11/22/2017 - 00:55
हिंदू कोड बिल हा अजूनही वर्तमानाचा प्रश्न आहे. ठीक आहे. सध्या आपण चर्चित असणारा विषयच घेऊ - 'विवाहांतर्गत बलात्कार'... खरेच का पारंपरिक समजुतीत बदल करणे सोपे आहे किंवा कायदा आणणे सोपे आहे? अंधश्रद्धा निरमूलन कायदा झालाच की नाही विरोधकांच्या नाकावर टिचचून? ......रस्त्यावर गाड्या जाळून आणि स्मृतिचिन्हे मोडून नाही असे मी म्हणतो. नरेंद्र दाभोळकर सरांबाबत जितके माहिती आहे त्यावरून त्यांची हत्या त्यांच्या प्रगतीशील विचार न पटल्यामुळे झाली. का केली कुणी केली हे उलगडेल. शेवटी विचारांची ही पण किंमत द्यावी लागली.

In reply to by Duishen

श्रीगुरुजी Wed, 11/22/2017 - 15:34
नरेंद्र दाभोळकर सरांबाबत जितके माहिती आहे त्यावरून त्यांची हत्या त्यांच्या प्रगतीशील विचार न पटल्यामुळे झाली. हा निष्कर्ष कशावरून काढला?

In reply to by आनन्दा

एमी Tue, 11/21/2017 - 13:37
त्या दृष्टीने विचार केला तर हिंदू स्त्रिया नक्कीच न्यायालयात दाद मागू शकतात. >> नाही मागू शकत. मारहाण करून बलात्कार केला असेल तरी त्यातल्या फक्त मारहाणीसाठी दाद मागता येते.

In reply to by एमी

सुबोध खरे Tue, 11/21/2017 - 15:27
असं कोण म्हणतं? तीन तलाक बेकायदेशीर ठरल्यावर तो सुद्धा घरगुती हिंसा मध्ये येतो. मग बलात्कार येत नाही याला काय आधार आहे? उगाच काहीही.

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे Tue, 11/21/2017 - 15:32
http://www.livemint.com/Politics/oin3GVsX0EJkR8uccpniIJ/Ten-years-on-where-does-the-Domestic-Violence-Act-stand.html या कायद्यातील कलम 3 वाचून घ्या आपल्या म्हणण्याच्या समर्थनासाठी काहीही लिहायचे का?

In reply to by सुबोध खरे

एमी Tue, 11/21/2017 - 17:21
Not so fast sir! तुम्ही दिलेली लिंक वाचली. The definition includes not just physical abuse, which is more identifiable and is easier to prove (for example, using medical records), but also aspects like emotional and sexual abuse. >> ओके Significantly, PWDVA recognizes sexual violence within the confines of marriage. >> कसा? Marital rape, or sexual intercourse by a husband without the wife’s express consent, is an exception to rape under IPC. >> याबद्दलच मी वर बोलतेय. But PWDVA can come to the rescue of these women through protection orders or orders to stop violence. >> protection orders or orders to stop violence == "आजही स्त्रिया घरगुती हिंसा या कलमाखाली (४९८ अ) लग्ना अंतर्गत बलात्कार यासाठी दाद मागू शकतात" ??? protection order म्हणजे दाद मागणे? === आता हे पण वाचा: The impact of the law, however, hasn’t been remarkable. “If one looks at orders under the PWDVA, it will be noted that most orders do not specifically mention the category of sexual abuse even when alleged; when it is mentioned, the same is usually viewed through a patriarchal lens—from a moral viewpoint and less as violence or abuse,” said Sen. In fact, 10 years on, not much has changed in terms of awareness within the law enforcement agencies and the lower judiciary, say activists. “The law in spirit has not been implemented. The law is very useful but states have failed in enforcement. If you look at districts courts, cases don’t come as socially they are not still acceptable. Even when they come, they (the courts) are not sensitive at all,” said Ranjana Kumari, director at non-profit Centre for Social Research.

In reply to by एमी

एमी Tue, 11/21/2017 - 17:31
आता हि लिंक वाचा http://www.indialawjournal.org/archives/volume2/issue_2/article_by_priyanka.html काही महत्वाचे मुद्दे: • The UN Population Fund states that more than 2/3rds of married women in India, aged between 15 to 49 have been beaten, raped or forced to provide sex. • The marital rape exemption can be traced to statements by Sir Mathew Hale, Chief Justice in England, during the 1600s. He wrote, “The husband cannot be guilty of a rape committed by himself upon his lawful wife, for by their mutual matrimonial consent and contract, the wife hath given herself in kind unto the husband, whom she cannot retract.” Not surprisingly, thus, married women were never the subject of rape laws. Laws bestowed an absolute immunity on the husband in respect of his wife, solely on the basis of the marital relation. • In the present day, studies indicate that between 10 and 14% of married women are raped by their husbands: the incidents of marital rape soars to 1/3rd to ½ among clinical samples of battered women. Sexual assault by one’s spouse accounts for approximately 25% of rapes committed. • This section in dealing with sexual assault, in a very narrow purview lays down that, an offence of rape within marital bonds stands only if the wife be less than 12 years of age, if she be between 12 to 16 years, an offence is committed, however, less serious, attracting milder punishment. Once, the age crosses 16, there is no legal protection accorded to the wife, in direct contravention of human rights regulations.

In reply to by एमी

एमी Tue, 11/21/2017 - 17:42
The much awaited Domestic Violence Act, 2005 (DVA) has also been a disappointment. It has provided civil remedies to what the provision of cruelty already gave criminal remedies, while keeping the status of the matter of marital rape in continuing disregard. Section 3 of the Domestic Violence Act, amongst other things in the definition of domestic violence, has included any act causing harm, injury, anything endangering health, life, etc., … mental, physical, or sexual. It condones sexual abuse in a domestic relationship of marriage or a live-in, only if it is life threatening or grievously hurtful. It is not about the freedom of decision of a woman’s wants. It is about the fundamental design of the marital institution that despite being married, she retains and individual status, where she doesn’t need to concede to every physical overture even though it is only be her husband. Honour and dignity remains with an individual, irrespective of marital status. Section 122 of the Indian Evidence Act prevents communication during marriage from being disclosed in court except when one married partner is being persecuted for n offence against the other. Since, marital rape is not an offence, the evidence is inadmissible, although relevant, unless it is a prosecution for battery, or some related physical or mental abuse under the provision of cruelty. Setting out to prove the offence of marital rape in court, combining the provisions of the DVA and IPC will be a nearly impossible task.

In reply to by एमी

arunjoshi123 Sat, 12/09/2017 - 15:41
Marital rape
कोणत्या कायद्यात हा शब्द अशाच असा वापरून गुन्हा नाही असं लिहिलं आहे?

In reply to by एमी

Duishen Wed, 11/22/2017 - 04:55
नाही मागू शकत. मारहाण करून बलात्कार केला असेल तरी त्यातल्या फक्त मारहाणीसाठी दाद मागता येते. आपले मत खरे आहे. माफ करा! माझे प्रतिसादातील वाक्य थोडे चुकीचे लिहिल्या गेले आहे. महिला बलात्काराची नव्हे तर मारहाणीची दाद मागू शकतात. न्यायालीन संदर्भात माझ्या मनात कायदा सशक्त होऊन मग दाद मागता येईल असे म्हणावयाचे होते.

In reply to by Duishen

सुबोध खरे Wed, 11/22/2017 - 09:43
sexual assault ला काय म्हणणार? शब्दांचा किस पाडायचा तो सुद्धा मूळ विषय नसलेल्या धाग्यावर? भारतीय कायदेशीर व्याख्येप्रमाणे पत्नीशी केलेल्या संबंधांना बलात्कार म्हणता येणार नाही पण त्याला मारहाण सुद्धा म्हणता येणार नाही. आपले म्हणणे काय आहे? नवऱ्याने जबरदस्तीने केलेल्या लैंगिक संबंधासाठी दादच मागता येणार नाही? त्याला बलात्कारच म्हटले पाहिजे आणि बलात्कार "म्हणूनच" त्यावर कायदा झाला पाहिजे? असे असेल तर मी येथेच चर्चा थांबवतो इति लेखन सीमा

In reply to by सुबोध खरे

एमी Wed, 11/22/2017 - 10:59
कसला शब्दांचा कीस? (बादवे त्या लेखात sexual abuse शब्द वापरलाय ;)) आणि मूळ विषय वगैरे काय लावलय? मिपाचे काही धोरण वगैरे आहे का अवांतर करू नका ऐसी आणि माबोसारखे? असेल तर खाली आरक्षणाबद्दल बोलणार्यांना का सुनावत नाहीय तुम्ही? नवऱ्याने जबरदस्तीने केलेल्या लैंगिक संबंधासाठी दादच मागता येणार नाही? >> मागता येत नाहीय! That is the fact! त्याला बलात्कारच म्हटले पाहिजे आणि बलात्कार "म्हणूनच" त्यावर कायदा झाला पाहिजे? >> येस्सर. बलात्कार हा बलात्कारच असतो (आणि तो मारहाण न करता फक्त physically overpower करूनदेखील करता येतो) आणि त्यावर बलात्कार "म्हणूनच" कायदा, कारवाई झाली पाहिजे. असे असेल तर मी येथेच चर्चा थांबवतो. >> धन्यवाद _/\_

In reply to by एमी

सुबोध खरे Wed, 11/22/2017 - 11:11
आपलंच खरं म्हणायचं असेल तर म्हणा. पण ते वस्तुस्थिती पासून दूरच आहे. कायदे विषयक सल्ला देणाऱ्या संस्था आणि मूळ कायदा पण जे म्हणतो "ते नाहीच" असे म्हणायचे आहे तर जाऊ द्या A wife cannot file a rape case against her husband directly. However, alternative remedies are available to the wife under Protection of Wife under Domestic Violence Act,2005. Marital rape is one of the acts of sexual intercourse with one’s spouse without consent. It is a form of intercourse with one’s spouse without consent. It is a form of domestic violence and sexual abuse. https://blog.ipleaders.in/rape-wife-against-husband/ What constitutes domestic violence Section 3 of the Domestic Violence Act, 2005 states that what constitutes domestic violence according to which domestic violence shall include: - (a) Threats to health, safety, life etc, whether mental or physical, including physical abuse, sexual abuse, verbal and emotional abuse and economic abuse; or https://www.lawfarm.in/blogs/domestic-violence-laws-in-india

In reply to by एमी

arunjoshi123 Sat, 12/09/2017 - 15:49
बलात्कार हा बलात्कारच असतो (आणि तो मारहाण न करता फक्त physically overpower करूनदेखील करता येतो) आणि त्यावर बलात्कार "म्हणूनच" कायदा, कारवाई झाली पाहिजे.
बलात्कार हा बलात्कारच असतो. आम्ही म्हणेल तेव्हा तो बलात्कार असतो. आम्ही म्हणू तेव्हा संमतीदत्त संभोग असतो. त्याचं स्वतःचं असं भौतिक वर्णन नसतं, आमचं म्हणणं हाच न्याय असतो. बाईशाहीचा विजय असो.

In reply to by सुबोध खरे

arunjoshi123 Sat, 12/09/2017 - 15:46
त्याला बलात्कारच म्हटले पाहिजे आणि बलात्कार "म्हणूनच" त्यावर कायदा झाला पाहिजे?
होय. आम्हाला सिग्नल तोडल्यावर फाईन करायचा कायदा नको. दुधाळ्या मारुति चौकावर सिग्नल तोडायचा शेपरेट कायदा फायजेल.

babu b Sat, 11/18/2017 - 14:41
त्यानी तुमची स्त्री वापरून त्यांची संख्या वाढवायचा प्रयत्न केला. तुम्ही त्यांचा पुरुष वापरुन तेच का नाही करत ? त्या मुलाचे नाव नारायण असिफ शहाबाजकर असे ठेवून त्याला तुमच्यात घ्या !

In reply to by टवाळ कार्टा

जेम्स वांड Sat, 11/18/2017 - 20:16
ज्यू (यहुदी ) सोडून उर्वरित दोन्ही सेमिटीक धर्मात, 'डीसबिलीव्हर्स' ना कन्व्हर्ट करणे हे धर्मातील एक प्रमुख कर्तव्य असतं, हिंदुत्वात तसलं काहीही नाही, अर्थात तशी प्रचलित पद्धत पण नाही अन लेखी पण नाही (मला माहिती नाही) , त्यामुळे इस्लाम किंवा ख्रिस्ती धर्मात धर्मांतर करून इतर धर्मातून आलेल्या माणसाला 'कन्व्हर्ट' नाही तर 'रिव्हर्ट' असं म्हणलं जातं, कारण मनुष्य जन्माला येतानाच इस्लाम मध्ये असतो, इतर धार्मिक शिकवण म्हणजे मुनफिकत मुळे ते जाहिलीयत म्हणजे अज्ञानात खितपत पडलेले असतात, त्यांना परत आपल्यात आणणे म्हणजे रिव्हर्ट करणे होय, म्हणून रिव्हर्ट, घरवापसी धार्मिक बाबीत अध्याहृत असणारे हे धर्म होत. हिंदूधर्मात हे नवीन आलेलं फिचर आहे असं वाटतं, रुळायला वेळ लागेल.

In reply to by जेम्स वांड

टवाळ कार्टा Sat, 11/18/2017 - 21:11
मग रुळवायला पुढाकार कोणी घेतला पाहिजे? सामान्य लोकांनी कि तथाकथीत हिंदू धर्माच्या ठेकेदारांनी?