मृत्युपूर्वीच्या शेवटल्या दिवसातील गूढ संभाषणः काही अनुभव
.........मृत्यूपूर्वीचे शेवटले काही दिवस ती व्यक्ती अन्य मृतांच्या संपर्कात येऊन त्यांचेशी संभाषण करते की काय, असे वाटण्याजोग्या या तीन घटना माझ्या प्रत्यक्ष अनुभवतील आहेत......
प्रश्नः हे नेमके काय असावे, मनस्विदांनी यावर कोणते संशोधन केलेले आहे, जगभरातील प्राचीन साहित्यात असे उल्लेख आहेत का, आणि तुमच्या अनुभवात वा ऐकीवात असे काही प्रसंग आले आहेत का?
घटना १:
माझ्या आईचे (वय ८६) मृत्यू पावण्यापूर्वीच्या शेवटल्या तीन-चार दिवसात वर्तमान ( तथाकथित "प्रत्यक्ष" वा "वास्तविक") स्थळ-काळाचे भान नष्ट होउन ती तिच्या बालपणीच्या काळात वावरत होती. अन्न-पाणी घेणे थांबले होते. आम्ही कोणी जवळ गेलो, की ती ओळखत नसे, मात्र "दादा आले" असे म्हणून तिच्या बालपणीच दिवंगत झालेल्या तिच्या वडिलांना उद्देशून बोलत असे.
घटना २:
माझ्या एका मित्राचे वडील अंतकाळी त्यांच्या खोलीत सतत कुणाशीतरी बोलत असायचे. मात्र त्यांचे वर्तमानाचे भान शाबूत होते. ते त्यांच्या मुलाला वा सुनेला दहा-बारा कप चहा करून आणायला सांगायचे. एवढा कुणासाठी? असे विचारले, की "अरे हे बघ सर्व जण बसले आहेत... असे म्हणून जमिनीकडे बोट दाखवायचे. कोण कोण आहेत? असे विचारले की ते ज्यांची नावे घेत, ते सर्व त्यांचे मृत नातेवाईक व मित्र असायचे.
घटना३: आम्ही पूर्वी रहायचो, तिथे जवळच राहणारे चार तरूण अपघातात सापडून त्यापैकी तिघांचा जागच्या जागी अंत झाला, एकजण मात्र बचावला. नंतर तो नेहमी " वो मुझे बुला रहे है" किंवा "तू भी इधर आजा" कह रहे है" असे म्हणू लागला. काही दिवसांनी काहीही कारण नसता तो पण दगावला.
"वातात बरळणे" असे ज्याला म्हणतात, तसा माझा स्वतःचा अनुभव असा, की मी सतरा वर्षाचा असताना टायफॉइड च्या तापात तासनतास उर्दू शेरो-शायरी बरळत असे. मला उर्दू भाषा येत नाही, किंवा शेर वगैरे काहीही माहीत नाहीत.... याचे काय स्पष्टीकरण असावे?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
कर्मसिद्धांताचं विवेचन
कळसजी,
अध्यात्मावर इथे लिहून फुकट वेळ घालवला या निष्कर्शाला मी आलो आहे " याविषयी मात्र तीव्र असहमती ..आता इथेच पाहा : मृत्यू शरीराला आहे आणि आपण जसेच्या तसे आहोत हा अनुभव मृत्यूसमयी येऊ शकतो. अशा माझ्या सर्वोपयोगी प्रतिसादाला ..... तुमचा हा उपप्रतिसाद !प्रश्न थेट आहे,आध्यात्मिक उत्तर नकोतो प्रतिसाद
पण एकूण अध्यात्माविषयी अनास्था आहे
द फोरम हॅज लॉस्ट द
अहं गळून पडला नाही
अहं गळून पडला नाही
तुम्ही स्वत:ला काय समजता (तिरकसपणा अनभिप्रेत)?
मी स्वतःला काही समजत नाही तर
कर्मलेपन होत नसतांना ....
अध्यात्म म्हणजे बेधडकपणे मतं मांडणं नाही
टाईमपास
या धाग्यावरील संजय उवाच तुफान
छान धागा आहे हा , चित्रगुप्त साहेब .. मला इथे काही अनुभव सांगायल
समाधीच्या पाऊलखुणा
माझी आई रात्री झोपेत गेली