नमस्कार !
महाराष्ट्रात भाजप-सेना युतीचे राज्यसरकार बनल्यापासुन अनेक कुरबुरी चालू होत्या. रोज रोज एकमेकांवर आरोप तर करायचे पण एकत्र सत्तेतही राहायचे हे पाहून माझ्यासारख्या सामान्य आणि निष्पक्ष व्यक्तींना नक्कीच उबग आला असेल.
काल २६ जानेवारी २०१७ च्या मुहुर्तावर शिवसेनेने युती तोडण्याची घोषणा केली आणि भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्या कार्यकर्त्यांना जितका आनंद झाला नसेल तितका एक सामान्य माणूस म्हणून मला झाला.
प्रत्येक पक्ष आतापर्यंत बेडीकीने बैलाचे सोंग घेतल्याप्रमाणे आपली ताकद फुगवून दाखवत होता त्यांची खरी ताकद आता कळणार आहे.
मुंबई, ठाणे, पुणे आणि इतर शहरात होणार्या पालिका / जि.प. आता भाजपा, सेना स्वतंत्रपणे लढतील तर काही ठिकाणी राष्ट्रवादी-कॉग्रेस युती करतील. शिवाय या खेचाखेचीत निवडणूकांसाठी १ महिन्यापेक्षाही कमी कालावधी राहिला असल्यामुळे या वेळची निवडणूक वेगळी ठरणार आहे. प्रत्येक पक्ष वेगवेगळे लढत असल्यामुळे पक्षातील तिकिट इच्छूकांना बर्याच प्रमाणात वाव मिळेल त्याचप्रमाणे इंपोर्टेड इच्छूकांना देखील बर्याच प्रमाणात वाव मिळेल. एकंदरीत निवडणूकीच्या तोंडावर पक्ष सोडून जाणार्यांची संख्या घटेल असा अंदाज आहे.
शिवाय एकाच वॉर्डात चार ते पाच मोठे पक्ष, स्थानिक वजनदार नेतेमंडळी निवडणूक लढविणार असल्यामुळे ऐनवेळी 'बशी घेणार्या' उमेदवारांना घसघशीत फायदा होण्याचा संभव आहे. पण नोटबंदी नंतरच्या या काळात हा प्रश्न वेगवेगळे पक्ष कसा सोडविणार हे पाहणे रोचक ठरणार आहे.
मुंबईत मागील वेळी मराठी मतांमधे जो सेना-मनसेच्या मागे एकवटण्याविषयी संभ्रम होता तो आता बर्याच प्रमाणात निवळला असून मराठी मतदाराला या दोघांपैकी नेमके कोणाला मत द्यायचे हे नक्की कळाले असावे असाही एक अंदाज आहे. मात्र काही नेते, सेना-मनसे समर्थक अजुनही सेना-मनसे युती होईल असे मनातल्या मनात मांडे खात आहे. मात्र ठाकरेंचा सध्याचा पवित्रा पाहता ते कोणाशीही युती करतील असे वाटत नाही. मात्र मतदानाचे निकाल आल्यानंतर मात्र सगळ्यांनाच सगळे ऑप्शन ओपन असतील असे वाटत आहे.
गुजराती, मारवाडी मतदार प्रामुख्याने भाजपचा मतदार मानला जातो. मात्र मुंबईतील बहुसंख्य गुजराती / मारवाडी समाज व्यापारक्षेत्रात गुंतला आहे. त्यांच्या प्रत्येकाच्या व्यवसायावर नोटबंदीनंतर काय आणि किती प्रमाणात परिणाम झाला यावर त्यांचे यंदाचे मतदान अवलंबून असेल की ते काहीही झाले तरी भाजपालाच मते देतील काय हे बघणे देखील रोचक ठरेल. त्यातच कालच शरद पवार साहेबांना पद्मविभुषण जाहिर झाला असल्यामुळे निवडणूकीच्या तोंडावर भाजपा राष्ट्रवादी अशी नवी युती होणार काय असादेखील संभ्रम उत्पन्न होण्याचा संभव आहे. मात्र अशी शक्यता निकालांअगोदर तरी दिसत नाही. कदाचित शिवसेनेने मुंबई / पुणे राखले तर ते भविष्यात राज्यसरकारमधून बाहेर पडू शकतात व त्यावेळी राष्ट्रवादी मदतीला येऊ शकेल अशीही एक शक्यता दिसते. (साहेबांना पदक अगोदरच्या कामगिरीबद्द्ल मिळाले आहे पण तो वेगळा मुद्दा आहे.)
युपी बिहारी मंडळी आपापल्या राज्यात सपा, बसपा, जनता दलाला आणि काही प्रमाणात भाजपाचे पाठीराखे असले तरी एकेकाळी ही मंडळी मुंबईमधे बर्याच अंशी काँग्रेस समर्थक होती. मात्र सध्याची काँग्रेसची अवस्था पाहता ही मंडळी कोणामागे उभी राहतात हे पाहणे रोचक ठरेल. कदाचित बर्याच ठिकाणी हीच मते निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
मुस्लीमबहूल भागात सपा ची कसोटी लागणार आहे तर ओवेसींची पार्टी काय करते यावर देखील लक्ष ठेवावे लागेल. ओवेसींनी कालच "मोदींना परदेशी दाढीवाले का आवडतात" असा वरवर योग्य वाटणारा सवाल विचारुन टीआरपी खेचून घेतला आहे.
सगळ्यात कठीण अवस्था विविध आंबेडकरवादी पक्षांची आहे. आठवलेंचा पक्ष भाजपाबरोबरच राहतो की कसे हे देखील २८ जानेवारीपर्यंत माहित पडेल. मात्र सध्यातरी त्यांच्यासमोर दुसरा पर्याय दिसत नाहिये.
अगदी ५०-१०० मतांनी पराभव / विजय होण्याची शक्यता असणारी यावर्षीची निवडणूक अगदी रोचक होणार आहे हे नक्की. कोण कोठे जिंकेल हे आजच सांगणे अवघड असले तरी आपण आपापले अंदाज मांडू शकता. मात्र स्थानिक उमेदवाराचे कर्तुत्व, त्याचा इतिहास पाहूनच त्याला निवडून द्यावे ही माझीतरी अपेक्षा आहे. पक्ष कोणताही असो, काही फरक पडू नये असे मला वाटते.
आमच्या ठाण्यात विविध पक्षांनी आपापल्या विभागातील सोसायट्यांना भेटणे सुरु केले आहे. आम्हीही आमच्या समस्या / मागण्या त्यांच्यापुढे मांडून काही अपेक्षा ठेवल्या मात्र सध्या कोणताही उमेदवार कोणतेही वचन देण्यास राजी नाही यावरुन त्यांच्या मनाची अस्थिरता देखील दिसून येते. एकंदरीत उमेदवारांसाठीही ही निवडणूक वेगळी ठरणार आहे हे निश्चित.
तुम्हाला काय वाटते ते जाणून घेण्यास इच्छुक आहे.
अवांतर : मी लेखाच्या शिर्षकात मुंबईचा उल्लेख केला असला तरी धागा मुंबई, ठाणे, पुणे आणि इतर शहरांतल्या निवडणूकींच्या चर्चांसाठी वापरला जाऊ शकतो. राज्यांच्या निवडणूकांवर इथे अगोदरच एक धागा असल्यामुळे त्याची चर्चा त्याच धाग्यावर केली तर ते संदर्भांसाठी उपयुक्त राहिल.
वर्गीकरण
वाचने
61707
प्रतिक्रिया
405
मिसळपाव
प्रतिक्रिया
हे छान आहे की! चांगलं वाटलं
In reply to २०१४ मध्ये गुजरातला भेट देऊन by हतोळकरांचा प्रसाद
काय बोलणार? परत एकदा प्रतिसाद
In reply to हे छान आहे की! चांगलं वाटलं by श्रीगुरुजी
शिवसेनेच्या जाहिराती
बाळासाहेब असते तरी त्यांना दु
In reply to शिवसेनेच्या जाहिराती by गॅरी ट्रुमन
भारतात असा एकही
In reply to शिवसेनेच्या जाहिराती by गॅरी ट्रुमन
प्रश्न
In reply to भारतात असा एकही by वरुण मोहिते
आता बाळासाहेब नाहीत
In reply to प्रश्न by गॅरी ट्रुमन
:)
In reply to आता बाळासाहेब नाहीत by वरुण मोहिते
हे म्हणण्यात तेच नाहीत
In reply to :) by गॅरी ट्रुमन
फक्त मनसे
सहमत आहे
In reply to फक्त मनसे by जेसीना
एकूणच राज ठाकरे त्यांंच्या
In reply to सहमत आहे by गॅरी ट्रुमन
शिवसेनेची ढोंगं
अशुत्या शिवाजी आणि
In reply to शिवसेनेची ढोंगं by गामा पैलवान
राज्यसभेच्या प्रत्येक
In reply to अशुत्या शिवाजी आणि by श्रीगुरुजी
http://www.mplads.gov.in
In reply to राज्यसभेच्या प्रत्येक by संदीप डांगे
वरच्या विधानात केलेल्या
In reply to http://www.mplads.gov.in by श्रीगुरुजी
राज्याबाहेरील होते म्हणून निधी
गुर्जि
मला कम्युनिस्ट पक्ष त्यांचे
घराणेशाही कितीतरी परवडली
In reply to मला कम्युनिस्ट पक्ष त्यांचे by सचु कुळकर्णी
५ वाजण्याची आतुरतेने वाट पहात
राष्ट्रवादी काँग्रेस च्या
त्याचा उपयोग होणार नाही. २००९
In reply to राष्ट्रवादी काँग्रेस च्या by संदीप डांगे
राजाभाऊ गोरडे
In reply to राष्ट्रवादी काँग्रेस च्या by संदीप डांगे
कमालच केली म्हणायची
In reply to राष्ट्रवादी काँग्रेस च्या by संदीप डांगे
ते 'भारत देशावर उपकार' फेम
In reply to कमालच केली म्हणायची by विशुमित
मुंबई महानगरपालिका
बाळासाहेब आणि अन्याय
चहापेक्षा
In reply to बाळासाहेब आणि अन्याय by गामा पैलवान
अजिबात नाही
In reply to बाळासाहेब आणि अन्याय by गामा पैलवान
स्थानिकांना डावलून खोगीरभरती
In reply to बाळासाहेब आणि अन्याय by गामा पैलवान
शिवसेनेचा पराभव हे उद्दिष्ट नव्हे
:)
In reply to शिवसेनेचा पराभव हे उद्दिष्ट नव्हे by गामा पैलवान
पुण्यात आमच्या हपिसात अजून
२ भाबडे प्रश्न होते
या ठिकाणी आणि त्या ठिकाणी
In reply to २ भाबडे प्रश्न होते by विशुमित
फडणवीस अतिशय एकसुरी व खूप
In reply to या ठिकाणी आणि त्या ठिकाणी by गॅरी ट्रुमन
एकसुरी नाही वो... वेगळाच ठेका
In reply to फडणवीस अतिशय एकसुरी व खूप by श्रीगुरुजी
ते विधानसभेत असे नाही बोलत .
In reply to एकसुरी नाही वो... वेगळाच ठेका by विशुमित
तेच म्हणतोय मी. जाम वैताग आला
In reply to ते विधानसभेत असे नाही बोलत . by वरुण मोहिते
पत्रकारांनीही संयम बाळगणे
In reply to तेच म्हणतोय मी. जाम वैताग आला by विशुमित
प्रचाराच्या तोफा थंडावल्यात
राज ठाकरे
सगळ्या पक्षांमध्ये फक्त राज ठाकरे सेन्सिबल प्रचार करत आहेत.
In reply to राज ठाकरे by कपिलमुनी
आणखि एक ईंट्रेस्टिंग कॅरेक्टर
In reply to सगळ्या पक्षांमध्ये फक्त राज ठाकरे सेन्सिबल प्रचार करत आहेत. by सचु कुळकर्णी
सगळ्या पक्षांमध्ये फक्त राज
In reply to राज ठाकरे by कपिलमुनी
सगळ्या पक्षांमध्ये फक्त राज ठाकरे सेन्सिबल प्रचार करत आहेत. केलेली कामे दाखवून मते मागत आहेत .राष्ट्रवादी पण केलेली कामे दाखवत आहे. बाकी, गेल्या २-४ महिन्यात नाशिक, औरंगाबादला भेटी देऊन झाल्या, माफक २-४ दिवस राहणे सुद्धा झाले. शेवटी पिंचि मनपा या बाकीच्या मनपांपेक्षा रस्ते,पाणी इ. बाबतीत कित्येक पुढे आहे असे जाणवले. इथे राष्ट्रवादीने केलेली कामे पाहता परत राष्ट्रवादी आल्यास आश्चर्य वाटणार नाही.मास्तर... यु मस्ट बी जोकिंग..
In reply to सगळ्या पक्षांमध्ये फक्त राज by गणामास्तर
नाशिक आणि औरंगाबाद मध्ये फरक
In reply to मास्तर... यु मस्ट बी जोकिंग.. by संदीप डांगे
फरक जाणवला नाही? आश्चर्य आहे.
In reply to नाशिक आणि औरंगाबाद मध्ये फरक by गणामास्तर
श्रीगुरुजी,
अडवाणी ज्पेयी तर तोंडदेखली
In reply to श्रीगुरुजी, by गामा पैलवान
चर्चा संपली. आता
एक्झिट पोल
मुंबई, ठाणे, उल्हासनगर, नाशिक
In reply to एक्झिट पोल by गॅरी ट्रुमन