मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मुंबई महानगर पालिका निवडणूक २०१७

धर्मराजमुटके · · काथ्याकूट
नमस्कार ! महाराष्ट्रात भाजप-सेना युतीचे राज्यसरकार बनल्यापासुन अनेक कुरबुरी चालू होत्या. रोज रोज एकमेकांवर आरोप तर करायचे पण एकत्र सत्तेतही राहायचे हे पाहून माझ्यासारख्या सामान्य आणि निष्पक्ष व्यक्तींना नक्कीच उबग आला असेल. काल २६ जानेवारी २०१७ च्या मुहुर्तावर शिवसेनेने युती तोडण्याची घोषणा केली आणि भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्या कार्यकर्त्यांना जितका आनंद झाला नसेल तितका एक सामान्य माणूस म्हणून मला झाला. प्रत्येक पक्ष आतापर्यंत बेडीकीने बैलाचे सोंग घेतल्याप्रमाणे आपली ताकद फुगवून दाखवत होता त्यांची खरी ताकद आता कळणार आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि इतर शहरात होणार्‍या पालिका / जि.प. आता भाजपा, सेना स्वतंत्रपणे लढतील तर काही ठिकाणी राष्ट्रवादी-कॉग्रेस युती करतील. शिवाय या खेचाखेचीत निवडणूकांसाठी १ महिन्यापेक्षाही कमी कालावधी राहिला असल्यामुळे या वेळची निवडणूक वेगळी ठरणार आहे. प्रत्येक पक्ष वेगवेगळे लढत असल्यामुळे पक्षातील तिकिट इच्छूकांना बर्‍याच प्रमाणात वाव मिळेल त्याचप्रमाणे इंपोर्टेड इच्छूकांना देखील बर्‍याच प्रमाणात वाव मिळेल. एकंदरीत निवडणूकीच्या तोंडावर पक्ष सोडून जाणार्‍यांची संख्या घटेल असा अंदाज आहे. शिवाय एकाच वॉर्डात चार ते पाच मोठे पक्ष, स्थानिक वजनदार नेतेमंडळी निवडणूक लढविणार असल्यामुळे ऐनवेळी 'बशी घेणार्‍या' उमेदवारांना घसघशीत फायदा होण्याचा संभव आहे. पण नोटबंदी नंतरच्या या काळात हा प्रश्न वेगवेगळे पक्ष कसा सोडविणार हे पाहणे रोचक ठरणार आहे. मुंबईत मागील वेळी मराठी मतांमधे जो सेना-मनसेच्या मागे एकवटण्याविषयी संभ्रम होता तो आता बर्‍याच प्रमाणात निवळला असून मराठी मतदाराला या दोघांपैकी नेमके कोणाला मत द्यायचे हे नक्की कळाले असावे असाही एक अंदाज आहे. मात्र काही नेते, सेना-मनसे समर्थक अजुनही सेना-मनसे युती होईल असे मनातल्या मनात मांडे खात आहे. मात्र ठाकरेंचा सध्याचा पवित्रा पाहता ते कोणाशीही युती करतील असे वाटत नाही. मात्र मतदानाचे निकाल आल्यानंतर मात्र सगळ्यांनाच सगळे ऑप्शन ओपन असतील असे वाटत आहे. गुजराती, मारवाडी मतदार प्रामुख्याने भाजपचा मतदार मानला जातो. मात्र मुंबईतील बहुसंख्य गुजराती / मारवाडी समाज व्यापारक्षेत्रात गुंतला आहे. त्यांच्या प्रत्येकाच्या व्यवसायावर नोटबंदीनंतर काय आणि किती प्रमाणात परिणाम झाला यावर त्यांचे यंदाचे मतदान अवलंबून असेल की ते काहीही झाले तरी भाजपालाच मते देतील काय हे बघणे देखील रोचक ठरेल. त्यातच कालच शरद पवार साहेबांना पद्मविभुषण जाहिर झाला असल्यामुळे निवडणूकीच्या तोंडावर भाजपा राष्ट्रवादी अशी नवी युती होणार काय असादेखील संभ्रम उत्पन्न होण्याचा संभव आहे. मात्र अशी शक्यता निकालांअगोदर तरी दिसत नाही. कदाचित शिवसेनेने मुंबई / पुणे राखले तर ते भविष्यात राज्यसरकारमधून बाहेर पडू शकतात व त्यावेळी राष्ट्रवादी मदतीला येऊ शकेल अशीही एक शक्यता दिसते. (साहेबांना पदक अगोदरच्या कामगिरीबद्द्ल मिळाले आहे पण तो वेगळा मुद्दा आहे.) युपी बिहारी मंडळी आपापल्या राज्यात सपा, बसपा, जनता दलाला आणि काही प्रमाणात भाजपाचे पाठीराखे असले तरी एकेकाळी ही मंडळी मुंबईमधे बर्‍याच अंशी काँग्रेस समर्थक होती. मात्र सध्याची काँग्रेसची अवस्था पाहता ही मंडळी कोणामागे उभी राहतात हे पाहणे रोचक ठरेल. कदाचित बर्‍याच ठिकाणी हीच मते निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. मुस्लीमबहूल भागात सपा ची कसोटी लागणार आहे तर ओवेसींची पार्टी काय करते यावर देखील लक्ष ठेवावे लागेल. ओवेसींनी कालच "मोदींना परदेशी दाढीवाले का आवडतात" असा वरवर योग्य वाटणारा सवाल विचारुन टीआरपी खेचून घेतला आहे. सगळ्यात कठीण अवस्था विविध आंबेडकरवादी पक्षांची आहे. आठवलेंचा पक्ष भाजपाबरोबरच राहतो की कसे हे देखील २८ जानेवारीपर्यंत माहित पडेल. मात्र सध्यातरी त्यांच्यासमोर दुसरा पर्याय दिसत नाहिये. अगदी ५०-१०० मतांनी पराभव / विजय होण्याची शक्यता असणारी यावर्षीची निवडणूक अगदी रोचक होणार आहे हे नक्की. कोण कोठे जिंकेल हे आजच सांगणे अवघड असले तरी आपण आपापले अंदाज मांडू शकता. मात्र स्थानिक उमेदवाराचे कर्तुत्व, त्याचा इतिहास पाहूनच त्याला निवडून द्यावे ही माझीतरी अपेक्षा आहे. पक्ष कोणताही असो, काही फरक पडू नये असे मला वाटते. आमच्या ठाण्यात विविध पक्षांनी आपापल्या विभागातील सोसायट्यांना भेटणे सुरु केले आहे. आम्हीही आमच्या समस्या / मागण्या त्यांच्यापुढे मांडून काही अपेक्षा ठेवल्या मात्र सध्या कोणताही उमेदवार कोणतेही वचन देण्यास राजी नाही यावरुन त्यांच्या मनाची अस्थिरता देखील दिसून येते. एकंदरीत उमेदवारांसाठीही ही निवडणूक वेगळी ठरणार आहे हे निश्चित. तुम्हाला काय वाटते ते जाणून घेण्यास इच्छुक आहे. अवांतर : मी लेखाच्या शिर्षकात मुंबईचा उल्लेख केला असला तरी धागा मुंबई, ठाणे, पुणे आणि इतर शहरांतल्या निवडणूकींच्या चर्चांसाठी वापरला जाऊ शकतो. राज्यांच्या निवडणूकांवर इथे अगोदरच एक धागा असल्यामुळे त्याची चर्चा त्याच धाग्यावर केली तर ते संदर्भांसाठी उपयुक्त राहिल.

वाचने 61559 वाचनखूण प्रतिक्रिया 405

In reply to by चिनार

फेदरवेट साहेब 09/02/2017 - 16:10
लैच आवडल्यागेला आहे तुमचा प्रतिसाद चिनार साहेब. @विशुमित जी आणि @मोहिते साहेब, कोणी प्रश्न उभा केला तर 'चष्मा काढून वाचावे' 'पूर्वग्रह बाजूला ठेऊन वाचले तरी चालेल' वगैरे भाजपे प्रकार तुम्ही दोघे तरी करणार नाही अशी अपेक्षा होती. पण कसलं काय, पळसाला पाने तीनच ही म्हण परत एकदा सिद्ध झाली. काही माननीय जनतेला वाटते की भाजपला विरोध म्हणजे धर्माला, राष्ट्रप्रेमाला विरोध , तसेच काहीसे ग्रह तुम्हा दोघांचे पवार ह्यांच्यावर टीका किंवा गेला बाजार त्यांच्या कार्याबद्दल प्रश्न विचारणे ह्या बद्दल झालाय का? असल्यास तो काढून टाकावा ही नम्र विनंती.

In reply to by फेदरवेट साहेब

विशुमित 09/02/2017 - 16:35
काहीसे ग्रह तुम्हा दोघांचे पवार ह्यांच्यावर टीका किंवा गेला बाजार त्यांच्या कार्याबद्दल प्रश्न विचारणे ह्या बद्दल झालाय का?>> -- बिलकूल नाही. प्रश्न विचारले म्हणून मी आदळ आपट केली असे कधी नाही झाले. मागे काही धाग्या वरती पवारांबाबत गुरुजींनी सडेतोड उत्तरे दिली होती ती मी मान्य देखील केली होती. त्यामुळे भाजप समर्थकांसारखं आंधळे समर्थन कधीच नाही दिले. आता योगदान काय असा जर प्रश्न या २ महारथी नेत्यांबद्दल कोणी विचारला तर त्याला आम्ही भाबडे काय उत्तर देणार? जरी तो प्रयत्न केला तरी तो फाट्यावरच मारला जाणार. (((साहेबानी ऑर्डर द्याची असते विनंती नव्हे. मराठीची पदवी मिळवल्या पासून तुमचा कणा वाकला आहे, एक निरीक्षण. (हलके घ्या ) ))))

In reply to by फेदरवेट साहेब

वरुण मोहिते 09/02/2017 - 16:38
कसलेही अंध समर्थन आम्ही करत नाही म्हणूनच लिहिलेय कि कोणीच पूर्ण चूक बरोबर नसतो .पण झालय असं कि काही चांगलं सांगायला गेलं तरी लोक पूर्वग्रह मनात ठेऊन बोलतात . माझी विधाने वाचा. लिहिलं जरूर असत पण ज्या खालच्या पातळीला जाऊन टीका होणारे माहित असत त्यामुळे कशाला उगाच लिहा . प्रत्येकाची चांगली वाईट बाजू असतेच कि .उद्या जे चूक आहे त्याला चूकच म्हणणार ना . ते हि झाकायला किंवा मुद्दा भरकटवायला आम्ही भाजपेयी नाही:)माझं विधान मराठी माणसाचं लॉबिंग आणि मर्यादा टीका करताना पाळावी ह्याबद्दल होत .

In reply to by फेदरवेट साहेब

चिनार 09/02/2017 - 17:07
धन्यवाद फेवे भाऊ... हेच्च म्हणतो. काहीही विचारलं तर लगेच आमचा चष्मा, त्याचा नंबर वगैरे प्रतिसाद सुरु होतात.

In reply to by चिनार

फेदरवेट साहेब 09/02/2017 - 21:52
भादरायला सुरुवात करणारे महनीय मिपावरचेच होते. मोहिते अन विशुमित साहेबांनी ठेवलेच तर 'पुढीलांच्या' पावलावर पाऊल ठेवले आहेत, पण दोघे बोलतात बरे म्हणून फक्त मी विनंती केली. बाकी तुमचं लेखन सुरु ठेवा हा शिमगा सुरूच राहणार.

विशुमित 09/02/2017 - 16:19
परमेश्वराने आम्हाला उरलेल्या बत्तीस जिल्ह्यांपैकी एकात जन्माला घातले ही त्याचीच चूक म्हणावी लागेल.>> -- कोणत्याही क्षेत्राचा विकास हा तेथील फक्त नेता नव्हे तर तेथील जनता करत असते. माझे एक निरीक्षण सांगतो, भले पवारांनी बारामती मध्ये सुविधा आणल्या पण त्याच बरोबर येथील जनतेने देखील त्याला सकारात्मक साथ दिली म्हणून शेती बरोबर, दुग्ध व्यवसाय, कुकुटपालन यामध्ये तेथील जनतेने खूप कष्टाने यश मिळवले आहे. १०-१५ लाख रुपये कर्जे काढून लोकांनी ४-५ किमी पाईपलाईन करून शेती पिकवत आहेत. आणि ती कर्जे देखील यशस्वी रित्या फेडली आहेत. तुमचा कोणता जिल्ला आहे मला माहित नाही पण तुमच्याकडे जर काही विकास झाला नसेल तर तुमच्या भागातील नेत्या बरोबर तेथील जनता ही तेवढीच कारणीभूत असावी. आणि त्यातही हा प्रश्न विचारायला आम्ही जिवंत राहिलो ही महाराष्ट्राच्या ह्या दोन सन्माननीय नेत्यांची कृपा !!>>> -- हे वाक्य नाही समजलं थोडक्यात म्हणजे जे आहे ते गोड मानायचे.>> -- काही लोकांना साखरेच्या पाकात जरी भिजवून ठेवलं तरी कडूच लागणार.

In reply to by विशुमित

कोणत्याही क्षेत्राचा विकास हा तेथील फक्त नेता नव्हे तर तेथील जनता करत असते
याच न्यायाने आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍याच्या मृत्युची सर्वस्वी जबाबदारी त्याच्यावरच ना..?

In reply to by विशुमित

वरुण मोहिते 09/02/2017 - 16:55
यूरोप मधील कित्येक चॉकोलेट कंपन्यांना दुधाची जी भुकटी असते ज्यातून चॉकोलेट बनते ती भुकटी आंतरराष्ट्रीय निकष पाळून बारामतीहून निर्यात होते . (त्यात पण पैसे देऊन काम झालं असं म्हणतील)फेरेरो चॉकोलेट ब्रँड चा क्रमांक २ चा निर्यातदार आहे बारामती . अशी कित्येक गाव शहर कोल्हापूर असो नाशिक असो अकलूज असो वा आणखी काही . प्रगतीचे अनेक निकष असतात लोकांची पण तितकीच साथ लागते .आणि नेतेही ..विशेषकरून कृषी क्षेत्र ,किंवा दुग्धव्यवसाय हा खूप गुंतागुंतीचा आहे त्यामुळे तेथील चांगल्या गोष्टीही बसून समजत नाहीत . प्रत्यक्ष जे त्या व्यवसायात आहेत त्यांच्याकडून कळत.

In reply to by विशुमित

चिनार 09/02/2017 - 16:55
विशुमित भाऊ.. कृपया माझा प्रश्न परत एकदा वाचून उत्तर द्यावे. ऍटलीस्ट पवार साहेबांच्या बाबतीत माझ्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही देऊ शकता असा माझा अन्दाज आहे. पवारांनी बारामतीला किती सुविधा आणल्या हा माझा प्रश्न नाही.पवारांना राष्ट्रीय नेते उगाचच म्हणत नसतील असे मला वाटते. बाकी विकास हा जनता आणि नेते ह्या दोहोंच्या प्रयत्नातून होतो याबद्दल सहमत आहे. माझा प्रश्न,
महाराष्ट्राच्या आर्थीक, सामाजिक, आणि इतर सगळ्या बाबतीतल्या आजच्या स्थानामध्ये बाळासाहेब आणि पवार साहेब ह्यांचे नेमके काय योगदान आहे हे वाचायला आवडेल. इथे महाराष्ट्र म्हणजे त्यातले पूर्ण ३६ जिल्हे असे अभिप्रेत आहे
-- काही लोकांना साखरेच्या पाकात जरी भिजवून ठेवलं तरी कडूच लागणार.
हा प्रतिसाद मला उद्देशून असेल तर, आम्हाला साखरेच्या पाकात बुचकळून मारायचे आणि गुलाबजाम दुसऱ्याला द्यायचे, परत वरतून "तुम्हालाच पोहता येत नाही" अश्या बोंबा मारायच्या हा प्रकार थांबायला हवा

In reply to by चिनार

विशुमित 09/02/2017 - 17:41
महाराष्ट्राच्या आर्थीक, सामाजिक, आणि इतर सगळ्या बाबतीतल्या आजच्या स्थानामध्ये बाळासाहेब आणि पवार साहेब ह्यांचे नेमके काय योगदान आहे हे वाचायला आवडेल>> -- पवार साहेबांच्या बाबतीत खालील योगदान मला महत्वाच वाटतं. ते जिल्ला निहाय कसे द्याचे हे आता तरी मला सुचत नाही. मी फक्त मुद्दे देऊ शकतो डिटेल वार विश्लेषण करण्या इतक्या पात्रतेचा नाही. तरी जिथे शक्य आहे तिथे देण्याचा प्रयत्न करेन. धागा काढणे तूर्तास तरी मला जमेल की नाही याची शाश्वती नाही. आर्थिक - साखर कारखानदारी, जिल्ला बँकांचे जाळे, सहकार, रिअल इस्टेट, IPL , हिंजेवाडी IT पार्क, MIDC विकास. सामाजिक- मराठवाडा युनिव्हर्सिटी नामकरण, पुरोगामी चळवळ, सुसंस्कृतपणा, साहित्यिक- नाट्य - सिनेमा यथोयचीत सम्मान, फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांची जोपासना, नेहमी जुन्या बरोबर प्रागतिक विचारांची कास. शेती- महत्व पूर्ण योगदान. (वर ऍग्रोवन मधील 'तांबे' चे संपादकीय दिले आहे) माझ्या ऐकण्यानुसार कृषी मंत्रांच्या कार्य काळात जवळ पास ५५०० शास्त्रज्ञांशी मीटिंग घेतल्या. आता मीटिंग मध्ये त्यांनी नुसत्या माना नाही डोलावल्या. (लिंक मिळाली कि चिटकवतो). शैक्षणिक- रयत शिक्षण संस्था आणि वेग वेगळ्या जिल्ह्यांमध्ये इतर शैक्षणिक संस्था, वैज्ञानिक शोध कार्याला नेहमी सढळ हाताने मदत. राजकारण- सलग ५० वर्ष कायदेमंडळमध्ये कार्यरत, सद्यस्थितीत ही रोज कमीत कमीत २००-३०० लोक समस्या सोडवण्यासाठी सकाळी सकाळी साहेबांच्या ऑफिस मध्ये उपस्थित असतात. विशेष म्हणजे सामान्य माणसांना पहिली प्रायोरिटी असते, राजकारणातील दुसरी फळी बनवण्यात बऱ्याच अंशी सफल. स्त्रियांचे प्रश्न- हे तर जग जाहीर आहेच. अजून बऱ्याच हुकले असेल पण आठवतील तश्या टाकतो. ह्या ज्या सर्व बाबी मी सांगितल्या त्या सर्व सकारात्मक आहेत, हे मान्य करतो. ज्या नकारात्मक होत्या त्याला शक्यतो मी समर्थन देणार नाही याची काळजी घेतो आणि घेईल. साखरेचे प्रकरण पोटात घाला, ही विनंती.

In reply to by विशुमित

श्रीगुरुजी 09/02/2017 - 20:52
आर्थिक - साखर कारखानदारी, जिल्ला बँकांचे जाळे, सहकार, रिअल इस्टेट, IPL , हिंजेवाडी IT पार्क, MIDC विकास.
त्या त्या जिल्ह्यात तिथल्या स्थानिक नेत्यांनी सहकारी कारखाने, बँका वगैरे निर्माण केल्या. यात पवारांचे काय योगदान होते? आयपीएल हे पवारांचे योगदान समजणे हा गैरसमज आहे. एकतर आयपीएल ही चांगली गोष्ट नसून धनदांडग्यांना क्रिकेटमध्ये घुसवून क्रिकेटचे नुकसान करण्याचा प्रकार आहे. दुसरं म्हणजे आयपीएलची कल्पना ललित मोदीची होती. पवारांचा त्याच्याशी संबंध नाही. तिसरं म्हणजे 'झी' च्या सुभाष चंद्र यांनी बर्कले प्रिमिअर लीगच्या धर्तीवर आयसीएल सुरू केलं होतं. त्यात भाग घेणार्‍या कपिलसारख्या अनेक वरीष्ठ क्रिकेटपटूंना बीसीसीआयने सूडबुद्धीने बहिष्कृत केलं होतं (तेव्हा पवारच बीसीसीआयचे अध्यक्ष होते). आयसीएलच्या कल्पनेतूनच ललित मोदीने आयपीएल जन्माला घातले.
सामाजिक- मराठवाडा युनिव्हर्सिटी नामकरण, पुरोगामी चळवळ, सुसंस्कृतपणा, साहित्यिक- नाट्य - सिनेमा यथोयचीत सम्मान, फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांची जोपासना, नेहमी जुन्या बरोबर प्रागतिक विचारांची कास.
१९७८ मध्ये वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसून पवार मुख्यमंत्रीपदावर आले तेव्हा दलित मतपेढी डोळ्यासमोर ठेवून त्यांनी मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात आंबेडकरांविषयी प्रेम, दलित अस्मितेचा सन्मान, पुरोगामी विचारसरणी असले काहीही नसून फक्त दलित मते डोळ्यांसमोर होती. त्यानंतर प्रत्यक्ष नामांतर व्हायला १६ वर्षे लागली. १९९२-९३ च्या दंगलींमुळे महाराष्ट्रात कॉग्रेसविषयी अत्यंत चीड निर्माण झाली होती. त्यामुळे पुन्हा एकदा १९९५ ची निवडणुक डोळ्यांसमोर ठेवूनच १९९४ मध्ये नामांतर करण्यात आले होते. यावेळीही फक्त निवडणुकच डोळ्यासमोर होती. पुरोगामी विचार वगैरे कधीच नव्हते. "हाताला लकवा", "पेशवे-शाहू महाराज", "राजू शेट्टींवर जातीवरून टीका", "ब्राह्मणांवर जातीयवादी टीका", इशरत जहांसारख्या अतिरेकीचे कौतुक इ. गोष्टींतून यांचा सुसंकृतपणा, प्रागतिक विचारांची कास अनेकवेळा दिसून आलेली आहे.
शेती- महत्व पूर्ण योगदान. (वर ऍग्रोवन मधील 'तांबे' चे संपादकीय दिले आहे) माझ्या ऐकण्यानुसार कृषी मंत्रांच्या कार्य काळात जवळ पास ५५०० शास्त्रज्ञांशी मीटिंग घेतल्या. आता मीटिंग मध्ये त्यांनी नुसत्या माना नाही डोलावल्या. (लिंक मिळाली कि चिटकवतो).
याविषयी जरा सविस्तर माहिती द्यावी.
शैक्षणिक- रयत शिक्षण संस्था आणि वेग वेगळ्या जिल्ह्यांमध्ये इतर शैक्षणिक संस्था, वैज्ञानिक शोध कार्याला नेहमी सढळ हाताने मदत.
कोणत्या वैज्ञानिक कार्याला सढळ हाताने मदत केली?
राजकारण- सलग ५० वर्ष कायदेमंडळमध्ये कार्यरत, सद्यस्थितीत ही रोज कमीत कमीत २००-३०० लोक समस्या सोडवण्यासाठी सकाळी सकाळी साहेबांच्या ऑफिस मध्ये उपस्थित असतात. विशेष म्हणजे सामान्य माणसांना पहिली प्रायोरिटी असते, राजकारणातील दुसरी फळी बनवण्यात बऱ्याच अंशी सफल.
दुसरी फळी म्हणजे अजितदादा आणि सुप्रिया सुळे?
स्त्रियांचे प्रश्न- हे तर जग जाहीर आहेच.
काय जगजाहीर आहे?

In reply to by श्रीगुरुजी

विशुमित 10/02/2017 - 12:06
त्या त्या जिल्ह्यात तिथल्या स्थानिक नेत्यांनी सहकारी कारखाने, बँका वगैरे निर्माण केल्या. यात पवारांचे काय योगदान होते?>>> -- मग साखरेचा आणि जिल्हा बँकांचा कोणता प्रश्न निर्माण झाला की पवारांच्या नावाने खडे का फोडतात लोक ? एकतर आयपीएल ही चांगली गोष्ट नसून धनदांडग्यांना क्रिकेटमध्ये घुसवून क्रिकेटचे नुकसान करण्याचा प्रकार आहे.>>> -- पूर्वी संपूर्ण भारतातून फक्त १५ ते १८ खेळाडू कसोटी आणि वन-डे निवडले जायचे. त्यामुळे प्रत्येक राज्याला योग्य प्रतिनिधित्व मिळत नव्हतं. पण IPL मुळेच किती तरी गुणी खेळाडू क्रिकेटला दिले आहेत. क्रिकेटचे नुकसान कसे झाले मला कळले नाही. आताचा आपला संघ प्रत्येक गोष्टीत अवल पदाचा दावेदार आहे. पूर्वी क्रिकेटचे आंतराष्ट्रीय स्टेडियम वर वर्षातून एखाद दोन सामने होत. त्यामुळे हे स्टेडियमरुपी पांढरे हत्ती पोसावे लागत होते. IPL मुळे किमान सामने प्रत्येक स्टेडियम वर होत तरी आहेत. त्यामुळे गाडी पार्किंग करणाऱ्यांपासून ते इव्हेंट मॅनॅजमेण्ट करणाऱ्या कितीतरी जणांना रोजगार उपलब्ध झाला याची आकडेवारी नक्कीच समाधानकारक असेल. वरून कमी वेळामध्ये उत्कंठावर्धक मनोरंजन जनतेला मिळते. पूर्वी धनदांडगे नव्हते का क्रिकेटमध्ये ? बाकी कपिल, ललित मोदी हे फक्त प्यादे होते आणि त्यांची चाल देखील फक्त एक घर पुढे चालणे आणि राजा-वजिराला पाहिजे तेव्हा स्वरंक्षण देणे एवढेच असते. यावर मी बापुडा काय बोलणार. (कृषी मंत्रालयाचे काम सोडून पवारांचे क्रिकेट मध्येच जास्त लक्ष्य असते असे लोक त्यावेळेस का बरं बरळत होते ?) १९७८ मध्ये वसंतदादांच्या पाठीत खंजीर...वगैरे वगैरे >>> -- या धाग्यात कोणीतरी खंजिराचे अंजीर करणार होते. याला आपला पास. "हाताला लकवा">> -- त्या पृथ्वी बाबा ने महाराष्ट्राचे ३ वर्ष वाया घालवले. "पेशवे-शाहू महाराज">> -- इतिहासाचा संदर्भ लावला तर स्टेटमेंट बरोबरच होते, असं मला वाटतं. आता नाही का औरंगझेब, मावळे, महाराजांचे संदर्भ देण्यात पटाईत असणारे दिसतंय टीव्ही वर. "राजू शेट्टींवर जातीवरून टीका">> -- खरंच ती जातीवाचक टीका होती का ? ब्राह्मणांवर जातीयवादी टीका>> -- ब्राह्मणांवर टीका कोठे केली दाखवून द्या. व्यक्ती सासक्षेप टीका केली असेल आणि तो ब्राह्मण जातीचा असेल तर लगेच कळवळला दाखवू नका. इशरत जहां>> -- पोलीस काय म्हणतात, कोर्ट काय म्हणतं, कोण निर्दोष सुटत एकवेळ बाजूला राहू द्या गुजरात मधील दंगे, अल्पसंख्यांकांवर झालेले अत्याचार सत्यच होते. ते किती हि झाकले तरी सत्य हे सत्य च असते. शेती- याविषयी जरा सविस्तर माहिती द्यावी.>> -- त्यांनी महाराष्ट्राला दुष्काळ, अतिवृष्टी या नैसर्गिक संकटसमयी हजारो कोटी रुपये शेतकऱ्यांना मदत म्हणून वाटण्याकरिता उपलब्ध करून दिले. इतकेच नव्हे, तर राष्ट्रीय कृषी विकास योजना, एकात्मिक पाणलोट विकास, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, जलसंधारण, मेगाफूड पार्क, मत्स्योत्पादन, दुग्धविकास यांसारख्या अनेक योजनांमधून शेतकऱ्यांना फळबागा, ग्रीनहाऊस, शेततळी, सूक्ष्मसिंचन, अन्नप्रक्रिया उद्योग, छोटी यंत्रसामग्री, प्री-कूलिंग चेंबर्स, वातानुकूलित वाहने, गोदामे, आधुनिक रायपनिंग चेंबर्स, बाजारांची उभारणी, कांदाचाळीसाठी अनुदान, शेतमालाच्या निर्यातीसाठी सबसिडी, मासेमारी, पशुपालन, दुग्धव्यवसाय यांसारख्या कितीतरी गोष्टी व त्याकरिता लागणारे अनुदान नवनवीन योजना सुरू करून उपलब्ध करून दिले. ४२ वस्तूंच्या आधारभूत किमतीत त्यांनी प्रचंड वाढ करून दिल्यामुळे लाखो कोटी रुपये शेतकऱ्यांच्या हातात पडू शकले. त्यामुळे शेतकरीवर्गात प्रचंड समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते, हे कोणालाही विसरता येणार नाही. देशाच्या अन्नधान्य स्वयंपूर्णतेइतकीच शेतकऱ्यांची आर्थिक उन्नतीही महत्त्वाची आहे, हे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा मा. श्री. शरद पवारसाहेब यांनी कृतीतून सिद्ध केले ऍग्रोवन चे संपादकीय वरती चिटकवले आहेच २०१४ मधील ICAR मधील AGM मधील हे भाषण. त्यांचे मुद्दे बरोबर वाटत नसतील तर खोडून टाका आणि माझे पण ज्ञान वृद्धांगित करा. http://www.icar.org.in/files/AM-Speech-AGM-2014.pdf दुसरी फळी म्हणजे अजितदादा आणि सुप्रिया सुळे?>> -- अजित दादा, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, सुरेश धस, दत्तात्रय भरणे, उदयन राजे, शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे अजून बरेच आहेत. स्त्रियांचे प्रश्न- हे तर जग जाहीर आहेच.>> -- कुल कायद्या मध्ये मुलीचा हिस्सा, पोलीस आणि मिलिटरी मध्ये स्त्रियांची भरती, स्त्री भ्रूण हत्या संदर्भि सुप्रिया सुळेंचे महाराष्ट्रभर व्यापक आंदोलन आणि प्रचार, महिला बचत गट, महिला आरक्षण , स्त्रीशिक्षणावर विशेष भर (पवार साहेब, अजित दादा , सुप्रिया सुळेंकडे कोणी एक मुलगी जाऊ द्या की शैक्षणिक मदतीसाठी, क्षणात मदत करतात)

In reply to by विशुमित

श्रीगुरुजी 10/02/2017 - 14:49
त्या त्या जिल्ह्यात तिथल्या स्थानिक नेत्यांनी सहकारी कारखाने, बँका वगैरे निर्माण केल्या. यात पवारांचे काय योगदान होते?>>> -- मग साखरेचा आणि जिल्हा बँकांचा कोणता प्रश्न निर्माण झाला की पवारांच्या नावाने खडे का फोडतात लोक ?
त्याचे कारण असे की पवारांच्या पित्त्यांनी या संस्थांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार करून वाटोळे केले.
एकतर आयपीएल ही चांगली गोष्ट नसून धनदांडग्यांना क्रिकेटमध्ये घुसवून क्रिकेटचे नुकसान करण्याचा प्रकार आहे.>>> -- पूर्वी संपूर्ण भारतातून फक्त १५ ते १८ खेळाडू कसोटी आणि वन-डे निवडले जायचे. त्यामुळे प्रत्येक राज्याला योग्य प्रतिनिधित्व मिळत नव्हतं. पण IPL मुळेच किती तरी गुणी खेळाडू क्रिकेटला दिले आहेत. क्रिकेटचे नुकसान कसे झाले मला कळले नाही. आताचा आपला संघ प्रत्येक गोष्टीत अवल पदाचा दावेदार आहे.
आयपीएलमुळे क्रिकेटपटूंचे तंत्र म्हणजे पर्यायाने खेळाची कला बिघडलीच. पण त्याबरोबर आयपीएलमुळे चीअर गर्ल्स, फिक्सिंग, बेटिंग, खेळाडूंचे जनावरांप्रमाणे होणारे लिलाव अशा अनेक वाईट गोष्टी घुसल्या. अनेक उद्योगपती यात घुसले व आपला संघ म्हणजे आपला एक नवीन व्यवसाय असून त्यातून येनेकेनप्रकारेण जास्तीत जास्त नफा कमविणे हेच उद्दीष्ट ठेवल्यामुळे काहीही करून सामना जिंकणे, बॅट कशीही वेडीवाकडी आडवीतिडवी फिरवून धावा मिळविणे इ. प्रकार सुरू झाले.
पूर्वी क्रिकेटचे आंतराष्ट्रीय स्टेडियम वर वर्षातून एखाद दोन सामने होत. त्यामुळे हे स्टेडियमरुपी पांढरे हत्ती पोसावे लागत होते. IPL मुळे किमान सामने प्रत्येक स्टेडियम वर होत तरी आहेत. त्यामुळे गाडी पार्किंग करणाऱ्यांपासून ते इव्हेंट मॅनॅजमेण्ट करणाऱ्या कितीतरी जणांना रोजगार उपलब्ध झाला याची आकडेवारी नक्कीच समाधानकारक असेल. वरून कमी वेळामध्ये उत्कंठावर्धक मनोरंजन जनतेला मिळते.
हे खरे नाही. कसोटी व एकदिवसीय सामन्यांप्रमाणे रणजी/दुलीप/इराणी करंडकाचे अनेक सामने या मैदानांवर होत असत. रणजी स्पर्धेत ३ गट असून प्रत्येक गटात ९ संघ आहेत. यांचे प्राथमिक फेरीत आपापसात तब्बल १०८ सामने होतात. नंतरच्या फेरीत ७ सामने होतात. अनेक स्थानिक स्पर्धा या मैदानांवर खेळल्या जातात. मैदानांवर एका वर्षांतून फक्त १-२ सामने न होता अनेक सामने होतात. आयपीएलमुळे प्रत्येक मैदानावर फार तर वर्षाकाठी ३-४ सामन्यांची भर पडली असेल.
पूर्वी धनदांडगे नव्हते का क्रिकेटमध्ये ? बाकी कपिल, ललित मोदी हे फक्त प्यादे होते आणि त्यांची चाल देखील फक्त एक घर पुढे चालणे आणि राजा-वजिराला पाहिजे तेव्हा स्वरंक्षण देणे एवढेच असते. यावर मी बापुडा काय बोलणार. (कृषी मंत्रालयाचे काम सोडून पवारांचे क्रिकेट मध्येच जास्त लक्ष्य असते असे लोक त्यावेळेस का बरं बरळत होते ?)
ते कोणाचे प्यादे होते? पवारांचे? पवार कृषी मंत्रालयाचे काम सोडून क्रिकेटमध्येच जास्त लक्ष का घालतात याची कारणे अगदी उघड आहेत. शून्य जबाबदारी व प्रचंड मलिदा असल्यावर कोण क्रिकेटला कमी वेळ देईल.
"हाताला लकवा">> -- त्या पृथ्वी बाबा ने महाराष्ट्राचे ३ वर्ष वाया घालवले.
महाराष्ट्राची का पवारांची? आय मीन राष्ट्रवादीची? "पेशवे-शाहू महाराज">> -- इतिहासाचा संदर्भ लावला तर स्टेटमेंट बरोबरच होते, असं मला वाटतं. आता नाही का औरंगझेब, मावळे, महाराजांचे संदर्भ देण्यात पटाईत असणारे दिसतंय टीव्ही वर. कसं काय बरोबर होतं? प्रत्येक ठिकाणी सगळ्यात आधी जातच बघायची का? हे स्टेटमेंट म्हणजे मराठ्यांना ब्राह्मणांविरूद्ध भडकावण्याचा प्रयत्न होता.
"राजू शेट्टींवर जातीवरून टीका">> -- खरंच ती जातीवाचक टीका होती का ?
होय. ती टीका जातीयवादीच होती. Sharad Pawar's castiest barb against Maharashtra farmer leader shocks observers हा लेख वाचावा. "Only those sugar mills which are associated with people from Shetty's caste are well but not the others," Pawar had said in Pune on Tuesday. Political observers believe that Pawar, a Maratha, is trying to instigate his community against Shetty. "Pawar can see Shetty as a potential threat to his traditional vote bank because he has launched an agitation for a genuine cause. Pawar is trying to secure his vote bank by referring to Shetty's caste," says a political observer.
ब्राह्मणांवर जातीयवादी टीका>> -- ब्राह्मणांवर टीका कोठे केली दाखवून द्या. व्यक्ती सासक्षेप टीका केली असेल आणि तो ब्राह्मण जातीचा असेल तर लगेच कळवळला दाखवू नका.
याची पूर्वी अनेकांनी अनेक उदाहरणे दिली आहेत.
इशरत जहां>> -- पोलीस काय म्हणतात, कोर्ट काय म्हणतं, कोण निर्दोष सुटत एकवेळ बाजूला राहू द्या गुजरात मधील दंगे, अल्पसंख्यांकांवर झालेले अत्याचार सत्यच होते. ते किती हि झाकले तरी सत्य हे सत्य च असते.
इशरत जहां पा़किस्तानी अतिरेक्यांबरोबर होती. गुजरातमध्ये तिचा त्यांच्याबरोबर एनकाऊंटर झाला. ती मुस्लिम असल्याने मुस्लिम मतांसाठी अशा व्यक्तीला जाहीर निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र देणे हे अत्यंत अयोग्य कृत्य होते.
शेती- याविषयी जरा सविस्तर माहिती द्यावी.>> -- त्यांनी महाराष्ट्राला दुष्काळ, अतिवृष्टी या नैसर्गिक संकटसमयी हजारो कोटी रुपये शेतकऱ्यांना मदत म्हणून वाटण्याकरिता उपलब्ध करून दिले. इतकेच नव्हे, तर राष्ट्रीय कृषी विकास योजना, एकात्मिक पाणलोट विकास, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, जलसंधारण, मेगाफूड पार्क, मत्स्योत्पादन, दुग्धविकास यांसारख्या अनेक योजनांमधून शेतकऱ्यांना फळबागा, ग्रीनहाऊस, शेततळी, सूक्ष्मसिंचन, अन्नप्रक्रिया उद्योग, छोटी यंत्रसामग्री, प्री-कूलिंग चेंबर्स, वातानुकूलित वाहने, गोदामे, आधुनिक रायपनिंग चेंबर्स, बाजारांची उभारणी, कांदाचाळीसाठी अनुदान, शेतमालाच्या निर्यातीसाठी सबसिडी, मासेमारी, पशुपालन, दुग्धव्यवसाय यांसारख्या कितीतरी गोष्टी व त्याकरिता लागणारे अनुदान नवनवीन योजना सुरू करून उपलब्ध करून दिले. ४२ वस्तूंच्या आधारभूत किमतीत त्यांनी प्रचंड वाढ करून दिल्यामुळे लाखो कोटी रुपये शेतकऱ्यांच्या हातात पडू शकले. त्यामुळे शेतकरीवर्गात प्रचंड समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते, हे कोणालाही विसरता येणार नाही. देशाच्या अन्नधान्य स्वयंपूर्णतेइतकीच शेतकऱ्यांची आर्थिक उन्नतीही महत्त्वाची आहे, हे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा मा. श्री. शरद पवारसाहेब यांनी कृतीतून सिद्ध केले ऍग्रोवन चे संपादकीय वरती चिटकवले आहेच
शेतकरी तर कायम म्हणत असतात की आम्हाला काहीच मिळाले नाही. इतक्या असंख्य योजना त्यांनी निर्माण केल्या असतील, इतके हजारो कोटी रूपये मदत म्हणून वाटले असतील, शेतकर्‍यांच्या हातात लाखो कोटी रूपये पडले असतील, शेतकरी प्रचंड समाधानी असतील तर वृत्तपत्रातून येणार्‍या शेतकर्‍यांच्या हलाखीच्या बातम्या, आत्महत्यांच्या बातम्या खोट्या आहेत हेच सिद्ध होतं.
दुसरी फळी म्हणजे अजितदादा आणि सुप्रिया सुळे?>> -- अजित दादा, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, सुरेश धस, दत्तात्रय भरणे, उदयन राजे, शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे अजून बरेच आहेत.
यात त्यांनी काय केलं? त्यांनी फक्त सुळे आणि अजित पवारांना पुढे आणलं. यातले बरेचसे स्वयंभू किंवा घराणेशाहीतून पुढे आलेले आहेत.
स्त्रियांचे प्रश्न- हे तर जग जाहीर आहेच.>> -- कुल कायद्या मध्ये मुलीचा हिस्सा, पोलीस आणि मिलिटरी मध्ये स्त्रियांची भरती, स्त्री भ्रूण हत्या संदर्भि सुप्रिया सुळेंचे महाराष्ट्रभर व्यापक आंदोलन आणि प्रचार, महिला बचत गट, महिला आरक्षण , स्त्रीशिक्षणावर विशेष भर (पवार साहेब, अजित दादा , सुप्रिया सुळेंकडे कोणी एक मुलगी जाऊ द्या की शैक्षणिक मदतीसाठी, क्षणात मदत करतात)
याविषयी हातात पुरेशी आकडेवारी याक्षणी नसल्याने आमचा तात्पुरता पास.

In reply to by श्रीगुरुजी

अनुप ढेरे 10/02/2017 - 15:29
फायदा कमवणं हे इतकं वाईट का समजलं जातं ते समजय नाही. कमवू दे पदाधिकार्‍यांनी/टीम मालकांनी फायदा. काय प्रॉब्लेम आहे? आयपीएल नी खेळाडूंचा प्रचंड फायदा झाला आहे हे उघड आहे. आयपीएल मधलं क्रिकेट मलाही नाही आवडत पण अनेकांना आवडतं, त्यातून खेळाडुंना भरपूर पैसे मिळतात हे सत्य आहे.

In reply to by श्रीगुरुजी

विशुमित 10/02/2017 - 15:43
त्याचे कारण असे की पवारांच्या पित्त्यांनी या संस्थांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार करून वाटोळे केले. -- वरती म्हणताय स्थानिक नेत्यांनी कारखाने चालू केले इथे म्हणताय पवारांच्या पित्त्यांनी वाटोळे केले. नेमके कारखाने चालवत कोण होते. आयपीएलमुळे क्रिकेटपटूंचे तंत्र म्हणजे पर्यायाने खेळाची कला बिघडलीच.>>> -- अहो जगाच्या पाठीवर क्रिकेटचे किती शॉट्स बदलले आहेत. हेलिकॉप्टर शॉट्स काय, प्याडल स्वीप काय, रिव्हर्स स्वीप काय, दिल्शानचा शॉट काय आणि इतर इम्प्रोव्हिसशन्स शॉट्स आले आहेत. चीअर गर्ल्स>>> -- त्याने काय होते? बाल मनांवरती परिणामच ना? पण आजकालचे बालके खूप ऍडव्हान्स आहेत . फ़िक्सिन्ग, बेटिंग >> -- सहमत. (भाजप ने फ़िक्सिन्ग मध्ये अडकलेल्या खेळाडूला तिकीट दिले होते केरळ मध्ये. तुच्छ लेकाचे..!!) कसोटी व एकदिवसीय सामन्यांप्रमाणे रणजी/दुलीप/इराणी करंडकाचे अनेक सामने या मैदानांवर होत असत>> -- रणजी क्रिकेट बाबत मान्य पण आर्थिक उलाढाल किती असते (आकडेवारी असेल तर द्या मला माहित नाही). किती पब्लिक जाते रणजी सामने पाहायला. कोणता चॅनेल रणजीचे सामने दाखवते? लोकांना चार दिवस वेळ आहे का हो रणजीचे सामने पाहायला. शून्य जबाबदारी व प्रचंड मलिदा असल्यावर कोण क्रिकेटला कमी वेळ देईल.>>> -- शून्य जवाबदारी असते, नवीनच ऐकतोय. प्रचंड मलिदा पवारांनी घश्यात घातलेला मला तरी वाचनात नाही आला. का उगाच स्वप्नरंजन??? याची पूर्वी अनेकांनी अनेक उदाहरणे दिली आहेत.>> -- मला माहित नाही म्हणून विचारली. तसे ही पवारांबद्दल असंख्यवेळा लिखाण झालेले असताना सुद्धा मला हा गळका लेखप्रपंच करण्यासाठी प्रोहत्सान देण्यात आले आहे. ती मुस्लिम असल्याने मुस्लिम मतांसाठी अशा व्यक्तीला जाहीर निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र देणे हे अत्यंत अयोग्य कृत्य होते.>> -- पवारांचं काही ही मत असो पण माझ्या मते तरी इशरत जहाँ ही निर्दोषच असावी. शेतकरी तर कायम म्हणत असतात की आम्हाला काहीच मिळाले नाही>>> -- काय राव मग असाच भारत द्राक्ष, डाळिंब, अन्न धान्य, आंबा, मत्स्य, दुग्ध, साखर व्यवसाय मध्ये जगात अव्वल झालाय का? एकच कर्ज माफी झाली त्याने किती तरी शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बदलली. कर्ज माफीचा आम्हाला वयक्तिक फायदा झाला आहे. त्या पासून शेतीमध्ये कधीच मागे वळून नाही पाहिले. शेती उद्योगाला वेळोवेळी टेका द्यावाच लागतो तर तो तर तो व्यवस्थित मार्गक्रमण करू शकतो.

In reply to by विशुमित

श्रीगुरुजी 11/02/2017 - 23:15
-- वरती म्हणताय स्थानिक नेत्यांनी कारखाने चालू केले इथे म्हणताय पवारांच्या पित्त्यांनी वाटोळे केले. नेमके कारखाने चालवत कोण होते.
कारखाने इतरांनी चालू केले असले तरी कालांतराने त्यात जी माणसे घुसली/घुसविली त्यांनी संस्थेची वाट लावून स्वत:चे खिसे भरण्यातच धन्यता मानली (उदा. अनेक जिल्हा सहकारी बँका)
आयपीएलमुळे क्रिकेटपटूंचे तंत्र म्हणजे पर्यायाने खेळाची कला बिघडलीच.>>> -- अहो जगाच्या पाठीवर क्रिकेटचे किती शॉट्स बदलले आहेत. हेलिकॉप्टर शॉट्स काय, प्याडल स्वीप काय, रिव्हर्स स्वीप काय, दिल्शानचा शॉट काय आणि इतर इम्प्रोव्हिसशन्स शॉट्स आले आहेत.
मनगटाचा वापर करून मारलेले कलात्मक फटके आता फारसे बघायला मिळत नाहीत. आता फक्त ताकदीच्या जोरावर मारलेले फटके जास्त दिसतात. अगदी अलिकडेपर्यंत लक्ष्मण, जयवर्धने असे कलात्मक फलंदाज सामन्यात दिसायचे. आता ही कला नष्टच होईल की काय अशी भीति आहे. खेळपट्टीवर तासनतास ढाण मांडून बसणे व सामना वाचविणे हे सुद्धा आता अभावानेच दिसते. २०१४ मधील इंग्लंड दौर्‍यात कसोटी सामन्यात भारतीय संघ लागोपाठ ३ डावात ४५ षटके सुद्धा खेळू शकला नाही. तीनही डावात जेमतेम पावणेतीन तीन तासात भारताने सर्व १० गडी गमाविले होते. अर्थात या मुद्द्यावर आपले एकमत होणे शक्य दिसत नाही.
चीअर गर्ल्स>>> -- त्याने काय होते? बाल मनांवरती परिणामच ना? पण आजकालचे बालके खूप ऍडव्हान्स आहेत
. बालमनावर परीणाम हा तितकासा महत्त्वाचा मुद्दा नाही. अशा प्रकारामुळे खेळ सवंग होऊ लागतो.
फ़िक्सिन्ग, बेटिंग >> -- सहमत. (भाजप ने फ़िक्सिन्ग मध्ये अडकलेल्या खेळाडूला तिकीट दिले होते केरळ मध्ये. तुच्छ लेकाचे..!!)
न्यायालयीनदृष्ट्या श्रीशांत फिक्सिंग मध्ये दोषी आढळला नाही कारण सर्वोच्च न्यायालयाने त्याला जुलै २०१५ मध्येच तो निर्दोष आहे असा निकाल दिलेला आहे व भाजपने त्याला त्यानंतर म्हणजे मे २०१६ मध्ये तिकीट दिले होते. तसं पाहिलं तर खांग्रेसनेही फिक्सिंगमध्ये सापडलेल्या अझरूद्दीनला तिकीट दिले होते.
कसोटी व एकदिवसीय सामन्यांप्रमाणे रणजी/दुलीप/इराणी करंडकाचे अनेक सामने या मैदानांवर होत असत>> -- रणजी क्रिकेट बाबत मान्य पण आर्थिक उलाढाल किती असते (आकडेवारी असेल तर द्या मला माहित नाही). किती पब्लिक जाते रणजी सामने पाहायला. कोणता चॅनेल रणजीचे सामने दाखवते? लोकांना चार दिवस वेळ आहे का हो रणजीचे सामने पाहायला.
आयपीएल सुरू न करतासुद्धा बीसीसीआय कडे प्रचंड पैसा होता. जाहिराती, तिकीट विक्री, सामन्यांच्या प्रक्षेपणाचे हक्क इ. त्यांना प्रचंड पैसा मिळत होता. आयपीएल सुरू करून हा तमाशा धनदांडग्यांच्या हातात देण्याचे व त्यायोगे फिक्सिंग, लिलाव, बेटिंग, चीअर गर्ल्स इ. वाईट प्रकार सुरू करण्याचे आणि त्याचबरोबर खेळ बिघडविण्याचे वाईट काम बीसीसीआयने केले.
शून्य जबाबदारी व प्रचंड मलिदा असल्यावर कोण क्रिकेटला कमी वेळ देईल.>>> -- शून्य जवाबदारी असते, नवीनच ऐकतोय. प्रचंड मलिदा पवारांनी घश्यात घातलेला मला तरी वाचनात नाही आला. का उगाच स्वप्नरंजन???
बीसीसीआय पदाधिकार्‍यांनी आजवर कोणती जबाबदारी घेतली? भारताचे २०११ मध्ये इंग्लंड व ऑस्ट्रेलियात अत्यंत दारूण पराभव झाले. त्याबाबत यांनी काय केले? गोव्यात व इतर काही ठिकाणी तिकीटविक्रीत भ्रष्टाचार झाला, त्याबद्दल बीसीसीआयच्या कोणी जबाबदारी घेतली? सामन्यात फिक्सिंग, बेटिंग इ. गुन्हे अनेकवेळा उघडकीस आले? तत्कालीन बीसीसीआय पदाधिकार्‍यांनी (उदा. श्रीनिवासन) कोणती जबाबदारी घेतली? एखादादुसरा अपवाद वगळता सर्वजण श्रीनिवासनच्या बाजूने उभे होते? कपिल, मोहिंदर सारख्या वरीष्ठ खेळाडूंना बहिष्कृत करून सूड उगविल्यानंतर कोणत्या बीसीसीआयच्या सदस्यांनी जबाबदारी घेतली? शाहरूखसारखे क्रिकेटशी संबंध नसलेले वानखेडे स्टेडियमवर जाऊन माज करतात तेव्हा बीसीसीआयसाच्या राजीव शुक्लासारखे त्याचीच पाठराखण करीत होते. मलिद्याच म्हणाल तर सामन्यांच्या प्रक्षेपणाचे हक्क देणे, जाहिराती, आयपीएल इ. मध्ये प्रचंड उलाढाल होते. त्यामुळेच बीसीसीआय मध्ये घुसण्यासाठी अनेकजण धडपड करीत असतात.
शेतकरी तर कायम म्हणत असतात की आम्हाला काहीच मिळाले नाही>>> -- काय राव मग असाच भारत द्राक्ष, डाळिंब, अन्न धान्य, आंबा, मत्स्य, दुग्ध, साखर व्यवसाय मध्ये जगात अव्वल झालाय का? एकच कर्ज माफी झाली त्याने किती तरी शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बदलली. कर्ज माफीचा आम्हाला वयक्तिक फायदा झाला आहे. त्या पासून शेतीमध्ये कधीच मागे वळून नाही पाहिले. शेती उद्योगाला वेळोवेळी टेका द्यावाच लागतो तर तो तर तो व्यवस्थित मार्गक्रमण करू शकतो.
आर्थिक स्थिती बदलल्यानंतरसुद्धा, शेती क्षेत्रात भारत जगात अव्वल झालेला असतानासुद्धा शेतकरी संकटात आहे, शेतकरी आत्महत्या करतात अशा खोट्या बातम्या वृत्तपत्रे का छापतात?

In reply to by श्रीगुरुजी

विशुमित 13/02/2017 - 10:57
स्वत:चे खिसे भरण्यातच धन्यता मानली>> -- किती खिसे भरले डिटेल्स द्या. आणि भरले असले असतील तर अजून सिद्ध का नाही झाले? साखर कारखान्यांची अण्णा हजारेंची आकडेवारी देऊ नका कारण ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. कृपया हवेत गोळीबार करू नका. मनगटाचा वापर करून मारलेले कलात्मक फटके आता फारसे बघायला मिळत नाहीत>> -- काय सांगता राव... आपल्याच संघातील मुरली विजय, चेतेश्वर पुजरा अप्रतिम कलात्मक फाटके मारताना दिसत आहेत. गुरुजी तुम्ही क्रिकेटचे एवढे जाणकार असताना देखील असे प्रतिक्रिया देता याचे आश्चर्य वाटले. खेळपट्टीवर तासनतास ढाण मांडून बसणे व सामना वाचविणे हे सुद्धा आता अभावानेच दिसते.>> -- आता चालू असणारा भारत-बांगलादेश सामना २ दिवस झाले पाहत होतो. बांगलादेशचे ६ गाडी बाद झाले असताना सुद्धा पहिल्या डावात काय चिवट झुंज दिली. आता ही देत आहेत. अर्थात या मुद्द्यावर आपले एकमत होणे शक्य दिसत नाही.>> -- कारण तुम्ही विरोधाला विरोध करायचा चंग बांधला असल्यामुळे असेल कदाचित. न्यायालयीनदृष्ट्या श्रीशांत फिक्सिंग मध्ये दोषी आढळला नाही कारण सर्वोच्च न्यायालयाने त्याला जुलै २०१५ मध्येच तो निर्दोष आहे असा निकाल दिलेला आहे व भाजपने त्याला त्यानंतर म्हणजे मे २०१६ मध्ये तिकीट दिले होते. तसं पाहिलं तर खांग्रेसनेही फिक्सिंगमध्ये सापडलेल्या अझरूद्दीनला तिकीट दिले होते.>>> -- ओक म्हणजे गोमूत्र शिंपडलं वाटतं श्रीशांत वर. काँग्रेस ने केले तेच भाजप पण करणार मग पार्टी विथ डिफरेन्स ची डेफिनिशन युनिव्हर्सल करावी लागेल. बालमनावर परीणाम हा तितकासा महत्त्वाचा मुद्दा नाही. अशा प्रकारामुळे खेळ सवंग होऊ लागतो. त्याचबरोबर खेळ बिघडविण्याचे वाईट काम बीसीसीआयने केले.>>> -- खेळ कोठे बिघडलाय आणि सवंग झालाय ? बीसीसीआय पदाधिकार्‍यांनी आजवर कोणती जबाबदारी घेतली?>> -- प्रत्येक संस्थेमध्ये जवाबदाऱ्या ह्या वाटून दिलेल्या असतात. त्यामुळेच बीसीसीआय मध्ये घुसण्यासाठी अनेकजण धडपड करीत असतात.>> -- पैसे आहेत म्हंटल्यावर मुंगळे चिकटणारच. (तो अनुराग ठाकूर का कोण चिटकून राहण्यासाठी खोटे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले होते. पण लोढा समिती ने मस्त चिमटीत उचलून फेकून दिलं बिचाऱ्याला. तुच्छ लेकाचे..!! ) आर्थिक स्थिती बदलल्यानंतरसुद्धा, शेती क्षेत्रात भारत जगात अव्वल झालेला असतानासुद्धा शेतकरी संकटात आहे, शेतकरी आत्महत्या करतात अशा खोट्या बातम्या वृत्तपत्रे का छापतात?>> -- कारण आताच केंद्र आणि राज्य सरकारच शेतकऱ्यांबाबत ना लायक आहे. शेतीतील ही स्थिती स्थायी नसते. ती वातावरण, बाजार भाव, नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, मागणी आणि पुरवठा यावर अवलंबून असते. शेतकरी आत्महत्या का करतात याची अनेक कारणे आहेत त्या चर्चून त्याचा पार खिस पाडला आहे. फक्त एक उत्तर द्या पश्चिम महाराष्ट्रातला खरा शेतकरी सहसा आत्महत्या का करत नसावा ? वृत्तपत्रातील बातम्या मी १००% खऱ्या मानत नाही इनफॅक्ट २० टक्के पण मानत नाही.

In reply to by विशुमित

श्रीगुरुजी 13/02/2017 - 13:14
स्वत:चे खिसे भरण्यातच धन्यता मानली>> -- किती खिसे भरले डिटेल्स द्या. आणि भरले असले असतील तर अजून सिद्ध का नाही झाले? साखर कारखान्यांची अण्णा हजारेंची आकडेवारी देऊ नका कारण ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. कृपया हवेत गोळीबार करू नका.
अजून सिद्ध झाले नाही कारण तब्बल १५ वर्षे ही प्रकरणे काँग्रेस-राष्ट्रवादीने दडपून ठेवली होती. आता अण्णा हजारेंच्या माध्यमातून ही प्रकरणे बाहेर यायला सुरूवात झाली आहे. पूर्वी २००३ मध्ये सुद्धा पद्मसिंह पाटलाच्या तेरणा साखर कारख्यान्याने कारगिल सैनिकांकरीता मदत म्हणून शेतकर्‍यांकडून गोळा केलेले ५३ लाख रूपये कसे हडप केले हे अण्णा हजार्‍यांनी बाहेर काढल्यानंतर पद्मसिंह पाटलाने तातडीने ५३ लाखांचा भरणा करून प्रकरण मिटविले होते. सांगलीचा शेतकरी सहकारी साखर कारखाना कसा बुडला ते सर्वश्रुत आहे. २०१३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या खालील वृत्तांतात साखर कारखाने कसे गाळात घातले गेले या विषयी माहिती आहे. http://www.slideshare.net/iacmanupillai/sugar-scam
मनगटाचा वापर करून मारलेले कलात्मक फटके आता फारसे बघायला मिळत नाहीत>> -- काय सांगता राव... आपल्याच संघातील मुरली विजय, चेतेश्वर पुजरा अप्रतिम कलात्मक फाटके मारताना दिसत आहेत. गुरुजी तुम्ही क्रिकेटचे एवढे जाणकार असताना देखील असे प्रतिक्रिया देता याचे आश्चर्य वाटले.
मी आधी लिहिल्याप्रमाणे या मुद्द्यावर आपली मते वेगवेगळी आहेत.
खेळपट्टीवर तासनतास ढाण मांडून बसणे व सामना वाचविणे हे सुद्धा आता अभावानेच दिसते.>> -- आता चालू असणारा भारत-बांगलादेश सामना २ दिवस झाले पाहत होतो. बांगलादेशचे ६ गाडी बाद झाले असताना सुद्धा पहिल्या डावात काय चिवट झुंज दिली. आता ही देत आहेत.
न्यायालयीनदृष्ट्या श्रीशांत फिक्सिंग मध्ये दोषी आढळला नाही कारण सर्वोच्च न्यायालयाने त्याला जुलै २०१५ मध्येच तो निर्दोष आहे असा निकाल दिलेला आहे व भाजपने त्याला त्यानंतर म्हणजे मे २०१६ मध्ये तिकीट दिले होते. तसं पाहिलं तर खांग्रेसनेही फिक्सिंगमध्ये सापडलेल्या अझरूद्दीनला तिकीट दिले होते.>>> -- ओक म्हणजे गोमूत्र शिंपडलं वाटतं श्रीशांत वर. काँग्रेस ने केले तेच भाजप पण करणार मग पार्टी विथ डिफरेन्स ची डेफिनिशन युनिव्हर्सल करावी लागेल. इथे गोमूत्र शिंपडून शुद्ध करून घ्यायचा संबंधच नाही. श्रीशांत फिक्सिंगमध्ये सापडला म्हणून त्याच्यावर बंदी घातली व त्याच्यावर न्यायालयात खटला दाखल केला. न्यायालयात त्याने फिक्सिंग केले हे सिद्ध करता न आल्याने सर्वोच्च न्यायालयाने त्याला निर्दोष सोडले. गोमूत्र शिंपडले असलेच तर ते सर्वोच्च न्यायालयाने शिंपडले आहे, भाजपने नाही.
बालमनावर परीणाम हा तितकासा महत्त्वाचा मुद्दा नाही. अशा प्रकारामुळे खेळ सवंग होऊ लागतो. त्याचबरोबर खेळ बिघडविण्याचे वाईट काम बीसीसीआयने केले.>>> -- खेळ कोठे बिघडलाय आणि सवंग झालाय ?
पुन्हा तेच. आता किती वेळा सांगू?
बीसीसीआय पदाधिकार्‍यांनी आजवर कोणती जबाबदारी घेतली?>> -- प्रत्येक संस्थेमध्ये जवाबदाऱ्या ह्या वाटून दिलेल्या असतात.
बरं मग गोव्यात तिकिटविक्रीत भ्रष्टाचार झाल्याची जबाबदारी बीसीसीआयमधील कोणी वाटून घेतली होती? आयपीएलमधील फिक्सिंग व बेटिंगची जबाबदारी त्यांच्यापैकी कोणी वाटून घेतली? मी आधीच्या प्रतिसादात दिलेल्या अनेक गैरप्रकारांची जबाबदारी बीसीसीआयमधील नक्की कोणी घेतली?
त्यामुळेच बीसीसीआय मध्ये घुसण्यासाठी अनेकजण धडपड करीत असतात.>> -- पैसे आहेत म्हंटल्यावर मुंगळे चिकटणारच. (तो अनुराग ठाकूर का कोण चिटकून राहण्यासाठी खोटे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले होते. पण लोढा समिती ने मस्त चिमटीत उचलून फेकून दिलं बिचाऱ्याला. तुच्छ लेकाचे..!! )
मी तेच म्हणतो. बीसीसीआयमध्ये घुसलेले सर्वजण तिथे आडवा हात मारण्यासाठीच घुसले होते (अगदी तुमच्या साहेबांसहीत. ते तर इतके कासावीस झाले होते की आपलं वय न बघता, आपण हातात कधी बॅटबॉल धरलेली नसतानासुद्धा, आपण या क्षेत्रात सर्वोच्च पदावर बसून आलेलो असताना सुद्धा . . . त्यांनी अगदी खालच्या पदावर पुन्हा एकदा डेरा टाकला). बरं झालं न्यायालयाने या सर्वांना हाकलून लावलं ते.
आर्थिक स्थिती बदलल्यानंतरसुद्धा, शेती क्षेत्रात भारत जगात अव्वल झालेला असतानासुद्धा शेतकरी संकटात आहे, शेतकरी आत्महत्या करतात अशा खोट्या बातम्या वृत्तपत्रे का छापतात?>> -- कारण आताच केंद्र आणि राज्य सरकारच शेतकऱ्यांबाबत ना लायक आहे. शेतीतील ही स्थिती स्थायी नसते. ती वातावरण, बाजार भाव, नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, मागणी आणि पुरवठा यावर अवलंबून असते. शेतकरी आत्महत्या का करतात याची अनेक कारणे आहेत त्या चर्चून त्याचा पार खिस पाडला आहे. फक्त एक उत्तर द्या पश्चिम महाराष्ट्रातला खरा शेतकरी सहसा आत्महत्या का करत नसावा ? वृत्तपत्रातील बातम्या मी १००% खऱ्या मानत नाही इनफॅक्ट २० टक्के पण मानत नाही.
अरेच्चा. तुम्हीच म्हणालात ना २००८ च्या कर्जमाफीनंतर शेतीची परिस्थिती एकदम सुधारली म्हणून. तुमच्याच आधीच्या प्रतिसादात लिहिले आहे की "भारत द्राक्ष, डाळिंब, अन्न धान्य, आंबा, मत्स्य, दुग्ध, साखर व्यवसाय मध्ये जगात अव्वल झालाय; एकच कर्ज माफी झाली त्याने किती तरी शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बदलली; महाराष्ट्राला दुष्काळ, अतिवृष्टी या नैसर्गिक संकटसमयी हजारो कोटी रुपये शेतकऱ्यांना मदत म्हणून मिळाले; राष्ट्रीय कृषी विकास योजना, एकात्मिक पाणलोट विकास, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, जलसंधारण, मेगाफूड पार्क, मत्स्योत्पादन, दुग्धविकास यांसारख्या अनेक योजनांमधून शेतकऱ्यांना फळबागा, ग्रीनहाऊस, शेततळी, सूक्ष्मसिंचन, अन्नप्रक्रिया उद्योग, छोटी यंत्रसामग्री, प्री-कूलिंग चेंबर्स, वातानुकूलित वाहने, गोदामे, आधुनिक रायपनिंग चेंबर्स, बाजारांची उभारणी, कांदाचाळीसाठी अनुदान, शेतमालाच्या निर्यातीसाठी सबसिडी, मासेमारी, पशुपालन, दुग्धव्यवसाय यांसारख्या कितीतरी गोष्टी व त्याकरिता लागणारे अनुदान अशा नवनवीन योजना सुरू झाल्या; ४२ वस्तूंच्या आधारभूत किमतीत त्यांनी प्रचंड वाढ करून दिल्यामुळे लाखो कोटी रुपये शेतकऱ्यांच्या हातात पडले; त्यामुळे शेतकरीवर्गात प्रचंड समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते . . .".

In reply to by श्रीगुरुजी

अनुप ढेरे 13/02/2017 - 13:31
शेवटच्या मुद्द्याशी सहमत आहे. हाच मुद्दा वर विचारला होता. एकीकडे महाराष्ट्रात शेतकरी विशाल दु:खात ओरडायचं आणि दुसरीकडे पवारांमुळे कसे शेतकरी सुखात हे गायचं. हे समजत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

विशुमित 13/02/2017 - 14:02
अरेच्चा. तुम्हीच म्हणालात ना २००८ च्या कर्जमाफीनंतर शेतीची परिस्थिती एकदम सुधारली म्हणून.>>> -- माझ्या वरच्या प्रतिसादात मी नमूद केले आहे, ही स्थिती स्थायी नसते. कर्ज माफी नंतर निश्चितच शेतीची परिस्थिती खूप प्रमाणात सुधारली आहे. पण आताच्या सरकारची शेतकरी विरोधी धोरणे आणि जुमल्यांमुळे शेतकऱ्यांची पुन्हा ही गत होयला लागली आहे.

In reply to by विशुमित

श्रीगुरुजी 09/02/2017 - 23:25
अजून ऐक >>> आर्थिक - साखर कारखानदारी, जिल्ला बँकांचे जाळे, सहकार, रिअल इस्टेट, IPL , हिंजेवाडी IT पार्क, MIDC विकास. ते नाव हिंजेवाडी नसून "हिंजवडी"असे आहे. हिंजवडी आयटी पार्क सुरू होण्यामागे पवारांचे योगदान शून्य आहे. साखर कारखान्यासाठी राखून ठेवलेल्या या जागेत आयटी पार्क सुरु करण्याचा निर्णय युती सरकारच्या काळात १९९८ मध्ये होऊन काही कंपन्यांना जागावाटप करण्यात आले. १९९८ मध्येच Infosys ने भूमीपूजन करून बांधकाम सुरू केले व १९९९ मध्येच Infosys येथून काम सुरू केले. हे श्रेय युती सरकारचे आहे. पवारांनी यात काहीही केलेले नाही.

तिमा 09/02/2017 - 20:49
शिवसेनेला मी तिच्या जन्मापासून ओळखत आहे. आता, मारे लोकं, बाळासाहेबांच्या नांवाने गळे काढून उद्धवला नांवे ठेवत आहेत. पण उद्धव हा बोलण्यांत व वागण्यांत खूपच जास्त सुसंस्कृत आहे. सध्या, प्रचारसभेत तो जी भाषा वापरतो आहे, ती त्याची नव्हे. पण ठाकरी भाषेचा फार उदोउदो झाल्यामुळे, तो ती वापरत आहे. तरीही, वर अप्पांनी म्हटल्याप्रमाणे शिवसेना यावेळेस निवडून येता कामा नये. तरच त्यांच्या घराणेशाहीला चाप बसेल. आणि कोणीही निवडून आले तरी महापालिकेचा कारभार पारदर्शी होणे शक्य नाही. - एक मुंबईकर.

In reply to by तिमा

श्रीगुरुजी 09/02/2017 - 20:54
पण उद्धव हा बोलण्यांत व वागण्यांत खूपच जास्त सुसंस्कृत आहे. सध्या, प्रचारसभेत तो जी भाषा वापरतो आहे, ती त्याची नव्हे. पण ठाकरी भाषेचा फार उदोउदो झाल्यामुळे, तो ती वापरत आहे.
बाळासाहेबांच्या तुलनेत उद्धव सुसंस्कृत आहे या मुद्द्यावर सहमत. बाळासाहेब २०१४ मध्ये असते तर त्यांनी मोदी खडसे व शहांच्या बाबतीत काय भाषा वापरली असती याची कल्पना सुद्धा करवणार नाही.

In reply to by श्रीगुरुजी

हतोळकरांचा प्रसाद 09/02/2017 - 21:05
काहो का कल्पना करवत नाही? बाळासाहेबांनी शेवटचं भाषण मला वाटतं २०१२ ला केले होते. तेव्हा काय भाषा वापरत होते ते? उगाच उथळ वक्तव्य करण्यापेक्षा सांगा बरं बाळासाहेब कसे कमी सुसंस्कृत होते?

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

श्रीगुरुजी 09/02/2017 - 21:17
राणे २००५ मध्ये सोडून गेले तेव्हा "सामना"तून बाळासाहेब काय भाषा वापरीत होते ते एकदा अर्काईव्हमधून जुने अंक काढून वाचा. मी आधीच्या एका प्रतिसादात त्यांची काही वाक्ये दिली आहेत. तेव्हा "सामना"तून बाळासाहेबांनी इतकी घाण भाषा वापरली होती की ते वाचताना शरम वाटत होती.

In reply to by श्रीगुरुजी

हतोळकरांचा प्रसाद 09/02/2017 - 21:42
सामनामधून आताही फार काही छान भाषा वापरले जाते असे नाही. ते लेख कोण लिहितं हे वेगळं सांगण्याची गरज नाही. शिवाय भाषेच्या बाबतीत मी वर एक मत मांडले होते, पटते का पहा. त्या त्या काळातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळ लक्षात घ्यायचा प्रयत्न करायला हवा. बाकी आता भाजप शिवसेना समोरासमोर आहेत आणि भाजपला वरचढ दाखवायचं म्हणून बाळासाहेबांना खाली खेचणे हास्यास्पद आहे असे मला वाटते. असो, हा या धाग्याचा विषय नाही, शिवाय बाळासाहेबांचं महाराष्ट्रातलं स्थान हि काही सांगून समजण्याची गोष्ट नाही असे माझे वैयक्तिक मत असल्याने, आपला ह्या बाबतीत पास!

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

हतोळकरांचा प्रसाद 10/02/2017 - 12:37
आजचा सामनाचाअग्रलेखही पहा! उगाच लिहायचे म्हणून काहींच्या काही. शेज गरम करणे वगैरे फालतुपणा. म्हणे अटलजींनी इंदिराजींना दुर्गा म्हणून गौरवले होते. काहीही.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

श्रीगुरुजी 10/02/2017 - 13:02
मी "सामना" वाचत नाही. "सामना" हे अत्यंत टुकार प्रकाशन आहे. "सामना"चे अग्रलेख वाचण्यासाठी "सामना" वाचण्याची गरज नाही. मटा व लोकसत्ता ही दोन्ही वृत्तपत्रे व काही मराठी वृत्तवाहिन्या "सामना"च्या अग्रलेखात काय लिहिलंय, उद्धव ठाकरेंनी मोदींना कसा सणसणीत टोला हाणला, मोदींचे कसे वाभाडे काढले इ. मोठ्या मथळ्यात छापत असतात. "सामना"चे अग्रलेख म्हणजे जणू काही बळवंतरावांनी लिहिलेले किंवा आचार्य अत्र्यांनी लिहिलेले अग्रलेख आहेत अशा आविर्भावात मटा व लोकसत्तावाले "सामना"चे अग्रलेख छापत असतात.

In reply to by विशुमित

अप्पा जोगळेकर 10/02/2017 - 13:22
ते विकल जात म्हणून. संजय राऊत कसेही असले तरी त्यांच्यावर बाळासाहेबांच्या भाषेचा मोठा संस्कार आहे. संजय राऊत जितक शिवराळ लिहितात तितकच बाळासाहेबसुद्धा लिहित असत. पण त्यांचे विनोद किंवा त्यांनी काढलेले वाभाडे खरोखरच मर्मभेदक असायचे हे मान्य करावेच लागेल. मात्र उतार वयात त्यांचा भाषेतील शिवराळ पणा अधिकाधिक वाढत गेला. विशेषतः राणे किंवा निखिल वागळे यांचा 'पादरे पावटे' असा उल्लेख, वटवागळे फडफडली असे लिहिणे, राज ठाकरेला वेडझवा म्हणणे असे अनेक दाखले आहेत. बाळासाहेबांच्या भाषेवर अत्रे आणि टिळक यांच्या भाषेचा संस्कार असावा. सामना चे सगळे अग्रलेख टुकार असतात हे मान्य नाही. त्यांचे काही अग्रलेख टुकार असतात तसे लोकसत्ताचे पण असतात. म्रूत्युलेख लिहिण्याच्या बाबतीत सामनाचे काही अग्रलेख खरोखर नमुनेदार आहेत. इतके की हे पुंडांच्या नेत्याने केलेले लिखाण आहे हे खरे वाटत नाही.

In reply to by अप्पा जोगळेकर

म्रूत्युलेख लिहिण्याच्या बाबतीत सामनाचे काही अग्रलेख खरोखर नमुनेदार आहेत. इतके की हे पुंडांच्या नेत्याने केलेले लिखाण आहे हे खरे वाटत नाही.
अर्थातच मी सामना वाचत नाही. पण समाजवादी नेते ना.ग.गोरे यांचे निधन झाल्यानंतरचा सामनामधला लेख वाचला होता. त्या लेखात नक्की काय लिहिले होते याचे तपशील लक्षात नाहीत पण त्यांचे निधन झाल्यानंतर त्याच दिवशी त्यांच्याविषयी असे काही छापून आणणे खटकले होते हे चांगलेच आठवते . भले विचार पटत नसले तरी इतर सर्व समाजवादी नेत्यांप्रमाणे ना.ग.गोरे हे त्यांच्या तत्वांशी आणि विचारांशी प्रामाणिक होते. निदान एवढा तरी विचार करायला हवा होता हे नक्कीच.

In reply to by गॅरी ट्रुमन

वरुण मोहिते 10/02/2017 - 13:52
ह्याच धाग्यावर आधी पण बोलोय.आज चर्चा चालू होती म्हणून सहज पाहिलं तर "जगातील सर्वाधिक चर्चिले एकमेव वृत्तपत्र " असं शीर्षकस्थानीच लिहिलं होत हसून हसून ते पाहून विंडो क्लोज करून टाकली .

In reply to by गॅरी ट्रुमन

श्रीगुरुजी 10/02/2017 - 14:12
त्या अग्रेलेखाचे शीर्षक "ढोंगाला श्रद्धांजली नाही"असे होते. ना ग गोरे यांना त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल किंवा त्यांच्या समाजवादी विचारांबद्दल मी श्रद्धांजली वाहत नसून एक लेखक मी म्हणून मी त्यांना श्रद्धांजली वाहतो असे त्यात म्हटले होते.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

मराठी_माणूस 10/02/2017 - 14:35
म्हणे अटलजींनी इंदिराजींना दुर्गा म्हणून गौरवले होते. काहीही.
हे काहीही नाही, बांगला देशाच्या निर्मीतीच्या वेळी केलेले ते भाषण खुप गाजले होते.

In reply to by मराठी_माणूस

हतोळकरांचा प्रसाद 10/02/2017 - 15:24
अटलजींनी स्वतः हि गोष्ट स्पष्ट केली आहे कि ते असे काहीही बोलले नाहीत. आता त्याउपर जर तुमहाला माध्यमांवर विश्वास ठेवायचा असेल तर त्याला पर्याय नाही.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

फेदरवेट साहेब 10/02/2017 - 15:52
अटलजींनी ही गोष्ट कुठे म्हणाली आहे? की बुआ मी काही दुर्गा वगैरे म्हणालो नव्हतो. असा एखादा व्हिडिओ किंवा काही उपलब्ध आहे का? असल्यास इथे द्या, तुमचा वैयक्तिक अनुभव म्हणजे अटलजींसोबत भेट वगैरे झाली आहे का , जेव्हा त्यांनी तुम्हाला हे सांगितले असावे? का तुम्हीपण माध्यमांवर (तुमच्या लेखी विश्वासार्ह असणाऱ्यावर) विश्वास ठेवता आहात साहेब?

In reply to by फेदरवेट साहेब

हतोळकरांचा प्रसाद 10/02/2017 - 19:21
फेदरवेटसाहेब, आय होप धिस बिलो विडिओ क्लिअर्स द एअर! https://m.youtube.com/watch?v=I0Y41ZPGSBM. खूप वर्षांपूर्वी वाजपेयीजींचा आपकी अदालत चा हा एपिसोड पाहिल्याचं आठवत होतं. आय वॉज लकी, अटल + दुर्गा एवढंच सर्च केलं युट्युबवर आणि पहिलाच विडिओ सापडला. अवांतर : माझी वाजपेयीजींबरोबर भेट नाही झाली, मी एवढा सुदैवी नाही. त्यामुळे तुमच्या उपरोधाला आपला पास! मी वरील वक्तव्याच्या बाबतीत माध्यमांवर विश्वास ठेवण्याबाबत म्हणालो, तुम्ही बहुतेक सरसकट अर्थ काढला. मी माध्यमांवर विश्वास ठेवतो, पटते तिथे. जिथे पटत नाही तिथे, सुदैवाने इंटरनेट हे माहिती गोळा करण्याचं खूप चांगलं साधन उपलब्ध आहे.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

फेदरवेट साहेब 10/02/2017 - 20:17
व्हिडीओ पाहून, एक राजकीय मिथक असलेली गोष्ट स्पष्ट झाली. त्याबद्दल आपले आभार मानतो. दुसरे म्हणजे क्लियर्स द एअर नंतर व्हिडीओ ठीक आहे, बाकी त्या अवंताराचे प्रयोजन मला समजले नाही. अटलजींना तुम्ही भेटला आहात काय? ह्या प्रश्नात तुम्हाला उपरोध का दिसावा हे कोडे आता मला पडले आहे. अटलजी मुळात एक प्रसिद्ध कवी होते, हे तुम्हाला माहिती असेलच, त्यामुळे त्यांना भेटणाऱ्या लोकांत फक्त राजकीय कार्यकर्त्यांचीच उठबस नसून इतर अनेक सामान्य नागरिक काव्य/साहित्यरसिक मंडळी सुद्धा असत हे वेगळे सांगणे नलगे. मी स्वतः अटलजींना भेटलेलो आहे, हाती वेळ असता अटलजी बऱ्याच विषयांवर व्यासंगपूर्ण बोलतात हे तुम्हाला कदाचित लोकसभेतली भाषणे ऐकून तरी माहिती असावेच. माझ्या सारख्या संघ/भाजप सोबत दूरवर संबंध नसलेल्या मुलाला सुद्धा जर अटलजीं 5 मिनिटे देऊ शकतात, हे बॅकग्राऊंड असल्यामुळे मी तुम्हाला अतिशय सुलभतेने तो प्रश्न विचारला होता. अर्थात आता त्यामुळे प्रश्नचिन्ह तुमच्यावर लागते आहे. माझ्या प्रश्नात उपरोध शोधायचाच असे काही तुम्ही ठरवले आहे का? असल्यास का? माझ्या प्रश्नात उपरोध आहे का हे तुम्ही मला विचारू शकला असता, पण तुम्ही थेट ठरवूनच टाकले तसे, ते ही माझ्याबद्दल काडीची माहिती नसताना, असे का बुआ? मिपावरच मी एक म्हण ऐकली आहे खाई त्याला खवखवे - ह्या उक्तीनुसार एकतर तुम्ही कायम औपरोधीक बोलत असाल म्हणून तुम्हाला सतत उपरोधच दिसतोय.

In reply to by फेदरवेट साहेब

हतोळकरांचा प्रसाद 10/02/2017 - 20:43
तुम्ही उपरोधिक म्हणाला नाहीत असे स्पष्ट केल्याबद्दल धन्यवाद! मी अत्यंत सामान्य मनुष्य असल्यामुळे, वाजपेयीजी जरी कवी असले तरी भारताचे पंतप्रधान (माजी) आणि खूप मोठे राजकीय व्यक्तिमत्व असल्याकारणाने ते मला भेटू शकतील हे मला कल्पनेतही कधी वाटले नाही. तुम्ही संदर्भ देता का असा थेट प्रश्न न विचारता अटलजींनी मला असं प्रत्यक्ष भेटीत सांगितलं का असं विचारलंत त्यामुळे गैरसमज झाला असावा. शिवाय अटलजी मला भेटू शकले असते याची जाणीव करून दिल्याबद्दल धन्यवाद!

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

गॅरी ट्रुमन 10/02/2017 - 13:37
सांगा बरं बाळासाहेब कसे कमी सुसंस्कृत होते?
बाळासाहेबांची काहीकाही वक्तव्ये अशी होती की ती मी सुसंस्कृत लोकांच्या मिपासारख्या सार्वजनिक संकेतस्थळावर लिहूही शकत नाही. आणि अशी वक्तव्ये ते बिनदिक्कतपणे जाहिरपणे करत असत. अशी वक्तव्ये तुम्ही एकदाही वाचली/ऐकली नसतील तर खरोखरच आश्चर्य आहे. तुमची इच्छा असल्यास त्यातले काही मोती व्य.नि मधून कळवू शकेन. बाळासाहेबांची ती शैली होती. तेवढ्यामुळे बाळासाहेब असंस्कृत होते असे मी तरी म्हणणार नाही. मो.ग.रांगणेकर या नाट्यक्षेत्रातल्या मोठ्या दिग्गजाचे ते चाहते आणि स्नेहीही होते. रसिकपणाचा, सुसंकृतपणाचा भाग बाळासाहेबांमध्ये होताच. कदाचित शिवसेनेत गुंडपुंड एकत्र झाल्यामुळे त्यांना भावेल अशी भाषा ते वापरत असावेत.

In reply to by गॅरी ट्रुमन

हतोळकरांचा प्रसाद 10/02/2017 - 16:00
तेवढ्यामुळे बाळासाहेब असंस्कृत होते असे मी तरी म्हणणार नाही.
बास, एवढेच म्हणणे होते. शिवराळ भाषा हेच एकमेव सुसंस्कृतपणाचे लक्षण मानायचे का हा प्रश्न आहे. बाकी बाळासाहेबांची भाषणे हि शिवसेनेनंतल्या गुंडापुंडांसाठीच असायची आणि त्यामुळेच प्रसिद्ध व्हायची का? त्यांचे कुठलेही भाषण अजून काढून बघावे, "लोकांना चांगले वाटावे म्हणून" थाटाचे कधीच नसायचे आणि बहुतकरून सर्वसामान्य जनतेला रुचणारेच मुद्दे असायचे असे माझे वैयक्तिक मत आहे. अवांतर : बाकी शिवसेनेत गुंडपुंड जमा झाले आहेत हे सरसकट विधान पटले नाही. शिवसैनिक हा काय नेहमी भांडणेच करत असतो का? तो एक सामान्य माणूस असतोच की!

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

विशुमित 10/02/2017 - 16:06
बाकी शिवसेनेत गुंडपुंड जमा झाले आहेत हे सरसकट विधान पटले नाही.>>> -- राष्ट्रवादीला पण म्हणतात राव गुंडांचा पक्ष. एकच पक्ष महाराष्ट्रात उरला आहे त्याच्यात गुंड नाहीत. ओळखा पाहू..!!

In reply to by विशुमित

विशुमित 10/02/2017 - 16:09
म्हणून त्यांनी पूर्ण महाराष्ट्रात 'गुंड विशेष भर्ती' कार्यक्रम राबवायला सुरवात केली आहे. पहिला नंबर पिंपरी चिंचवडचा.

In reply to by गॅरी ट्रुमन

अभ्या.. 10/02/2017 - 16:07
स्व. बाळासाहेबांची भाषा जहाल होती, रंगेल होती, मार्मिक होती तशीच अगदी आचार्य अत्र्यांचीही होती. मराठातले अग्रलेख म्हणा की मथळे म्हणा ह्याची साक्ष आहेत. प्रत्यक्ष भाषणातही अत्र्यांनी बरेच कमरेखालचे, द्वैअर्थी विनोद आणि जहाल भाषेचा प्रयोग केला आहे. अत्र्यांची लेखणी त्यांच्या श्रध्दास्थानाविषयी बोलताना ज्या मनस्वीपणे फुले वाहायची तितकाच खरपूस समाचार त्यांनी विरोधकांचा घेतला होता. गांधेजी, नेहरु, कॉम्ग्रेसी, प्रजासमाजवादी, समाजवादी, जनसंघी, अगदी आंतरराष्ट्रीय नेतेही त्यातून सुटले नाही. पण तेवढेच त्यांनी लिहिलेले मृत्युलेखही गाजले. मग अत्रे काय पुण्यातल्या गुंडपुंडासाठी लिहायचे की काय? तेव्हाही पुण्यात मराठाचा खप अत्र्यांच्या अग्रलेखासाठीच होता. अत्रे म्हणा की बाळासाहेब हे जनसामान्यांच्या भावनांना वाट फोडून देणारे व्यक्तीमत्त्वे होती. जनसामान्य काही अगदीच प्रमाणभाषेत बोलत नसतात. राग आला की ते चिडतात, कधी शिवराळ भाषा वापरली जाते कधी मुक्तपणे अपशब्दांची बरसात होते. शिवसेनेला बांगला क्रिकेटची उपमा देता मग अफ्रिदीच्या आईचा गौरव तमाम भारतीयांनी केला त्यात शिवसैनिकच होते का सगळे? राग असला की तो असा बाहेर पडतोच. अगदीच सोवळेपणाची भाषा वापरुन मनातले जहर काढायला आतएक बाहेर एक असे भाजपीय नसतात सगळे. साधे काउच शो घ्या सध्याचे. चांगले चांगले म्हणवणारे कलाकार रोजच्या आयुष्यात काय भाषा वापरतात ते कळते. तेंव्हा भाषेवरुन तोलायचे प्रकार कधी अन कसे काढायचे ते भाजप्यांनी शिकवायची गरज नाही.

In reply to by अभ्या..

विशुमित 10/02/2017 - 16:16
अगदीच सोवळेपणाची भाषा वापरुन मनातले जहर काढायला आतएक बाहेर एक असे भाजपीय नसतात सगळे.>>> -- भाषणांमधील एखादे वाक्य किंवा शब्द शोधून त्यावर पराचा कावळा करणे याच पक्षाचे यच्छेदवेक लक्षण आहे. राजू शेट्टी जात म्हणा किंवा धरणातील मूत हे पण त्यातच येते.

In reply to by विशुमित

मोदक 10/02/2017 - 16:57
अच्छा.. म्हणजे एका पक्षाने आक्षेप घेतला म्हणून जाहीर माफी मागून कृष्णाकाठावर आत्मक्लेश केला का..? भाजपला इतका आदर तर कट्टर संघवाले पण देत नसतील.. पण राष्ट्रवादीवाले देतात हे ऐकून आनंद झाला.

In reply to by विशुमित

अप्पा जोगळेकर 10/02/2017 - 17:22
अजित पवार आणि बाळासाहेब यांची तुलना म्हणजे अगदीच 'काहीही हं विशुमित'. यानिमित्ताने बाळासाहेब एकदा अजित पादा पवार असे काहीतरी म्हणाले होते ते आठवले.

In reply to by विशुमित

हतोळकरांचा प्रसाद 10/02/2017 - 17:23
मला वाटतं विशुमतीसाहेब, त्यांच्या वाक्यातील वाईट शब्दांपेक्षा त्यातील बेजबाबदारपणा लोकांना जास्त बोचला होता. ५५ दिवस उपोषणाला बसणाऱ्याची अशी खिल्ली उडवणे हे टीकेचे मुख्य कारण होते. लोकांनी त्याचा अर्थ उर्मटपणा असा घेतला असावा. त्यामुळे वरील तुलना अयोग्य आहे असे मला वाटते.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

तुम्ही अजित दादाचे ते संपूर्ण भाषण ऐकलं आहे का ? ते कोणत्या ओघामध्ये बोलले होते समजून घ्या. "धरणातच पाणी नाही तर आम्ही त्यात काय मुतायचं का?" त्या गोष्टीसाठी अजून ही ते खेद व्यक्त करत असतात. आता यापेक्षा अजून काय करायला पाहिजे म्हणजे लोकांचे समाधान होईल.

In reply to by विशुमित

लोकांचे समाधान होईल यासाठी इथे उपाय सुचवले तर नक्की त्यांच्यापर्यंत पोहोचवणार का..?

In reply to by अभ्या..

अप्पा जोगळेकर 10/02/2017 - 17:19
खुद्द अत्र्यांनाच बाळासाहेबांनी वरळीचे डुक्कर म्हटले होते असे व्यंगचित्र बाळासाहेबांची जुनी व्यंगचित्रे छापून आली होती त्यात पाहिल्याचे आठवते. ते जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे वगैरे नेहमीचीच मखलाशी आहे साहेब. बाळासाहेब जे बोलतात तो उभ्या महाराष्ट्राचा आवाज असा प्रोपागंडा केल्यामुळे असे गैरसमज शिवसैनिकांमधे सुद्धा पहिल्यापासूनच आहे. बाकी बाळासाहेब प्रमाण भाषेत बोलणार नाहीत, पण त्यांच्याबद्दल बोलताना अगदी प्रमाण भाषेतच बोलायचे हा शिवसैनिकांचा आग्रह थोडा अजबच नाही का ? अत्रे सुद्धा काही धुतल्या तांदलाचे नव्हतेच. ते जितके थोर साहित्यिक होते तितकेच भंपक राजकारणी होते. जसे बाळासाहेब थोर व्यंगचित्रकार आणि भंपक..... असो.

In reply to by अभ्या..

वरुण मोहिते 10/02/2017 - 18:28
सगळ्या भाजपेयी ना कळत असतं पण कळून न कळल्यासारखं दाखवतात . शिवराळ भाषा आणि सुसंस्कृत पणाचा कोणताही संबंध नाही . नंतर मुद्दा पटवण्यासाठी वागळेंना असे बोले ,नारायण राणेंना असे बोले ,अशी हास्यास्पद उदाहरण देतात . काहीही स्टेटमेंट करतात . पार अत्र्यांना नावे ठेवण्यापासून ते ठाकर्यांपर्यंत . बाकी पवार वैग्रे ऐकलं कि तळपायाची आग मस्तकात जाते भाजपेयीच्या . पण सध्या काय बोलू नाय शकत . तरी ग्रास रूट ना बघता सोयीस्कर अर्थ लावून सगळ्यावर तोंडसुख घेतले जाते . फक्त आणि फक्त संघ आणि भाजप हेच प्रात:स्मरणीय असतं त्यांच्यासाठी . तो विषय आला कि सोयीचे निकष बदलतात .

संदीप डांगे 10/02/2017 - 09:53
श्रीगुरुजी भाषेच्या सुसंस्कृतपणाबद्दल बोलतात तेव्हा मौज वाटते, शय्यासोबत, चुंबाचुंबी, इ इ शब्दप्रयोग सढळ हस्ते वापरणारे दुसर्‍यांच्या भाषेबद्दल किळस व्यक्त करतात तेव्हा विसंगती शंभरदा मरत असेल....

In reply to by संदीप डांगे

श्रीगुरुजी 10/02/2017 - 10:34
मलाही मौज वाटते. बरं, "हरामखोर" शब्द वापरणाऱ्यांनी दुसऱ्यांवर आक्षेप घेणे योग्य वाटते का? तेव्हा विसंगती कितव्यांदा मरत असेल?

In reply to by श्रीगुरुजी

संदीप डांगे 10/02/2017 - 12:51
मी, घटनात्मक पदावर बसून लोकशाहीचा सौदा करणारांना, तद्नुषंगिक रागातून हरामखोर म्हटले होते, ते तेवढ्यापुरते होते व तिथेच संपले. पण तुम्ही तुमची ही इतर पक्षांबद्दलची सततची शब्दांची उधळण कोणत्या रागामुळे करता तेही कळू देत की...

In reply to by संदीप डांगे

श्रीगुरुजी 10/02/2017 - 14:10
हे मी कधी मान्य केलं बुवा? स्वतःच्या मनाप्रमाणे स्वतःला सोयिस्कर निष्कर्ष काढण्यात इतकी मास्टरी कशी काय मिळविली बुवा तुम्ही?

साधा मुलगा 10/02/2017 - 13:05
या वर्षी विभाग मोठे करून एका वार्डात ४ लोकांना निवडून द्यायचे आहे. हे panel मतदान पद्धत्ती २००२ साली होती तशी आहे का? एका वार्डातून एक पक्ष येणार कि ज्या जागेसाठी जास्त जागा तो त्या जागेवर निवडून येणार? कोणी स्पष्ट करेल का?

In reply to by साधा मुलगा

खेडूत 10/02/2017 - 13:34
माझा समज असा आहे: प्रत्येक मतदाराने चार मते द्यायची, (ज्यात नोटा पर्यायही आलाच) ज्याला जास्त तो निवडून येईल. एका प्रभागात चार वेगळ्या पक्षाचे उमेदवारही जिंकू शकतात. कुणी हे बरोबर आहे का? स्पष्ट करेल काय?

In reply to by खेडूत

हतोळकरांचा प्रसाद 10/02/2017 - 15:35
हो हे बरोबर आहे. तुम्हाला मतदान केंद्रात चार वोटिंग मशीन दिसतील त्यातील प्रत्यक मशीनवर एकेक वॉर्डातील उमेदवार असतील. तुम्हाला प्रत्यके वॉर्डसाठी एक उमेदवार निवडायचा आहे. चार वेळा (चारही मशीनचा) बटन दाबल्यावर तुमचं मतदान पूर्ण होईल. आधी तुम्ही फक्त तुमच्या वार्डाचा उमेदवार निवडत होतात पण आता(आता म्हणजे हा प्रकार बऱ्याच आधीपासून आहे, मी पहिल्यांदा २००९ ला नगरपालिकेसाठी ५ वॉर्डाच्या आमच्या प्रभागाला मतदान केले होते) तुम्हाला चारही वॉर्डाचे उमेदवार निवडायचे आहेत. हा प्रकार सगळे वॉर्ड (नगरसेवक) मिळून एका (प्र)भागाचा विकास करतील आणि मतदारांना पण एका प्रभागासाठी आपल्या आवडत्या पक्षाचे उमेदवार निवडता येतील यासाठी आणण्यात आला होता. आधी बहुतेक वेळेस एकाच पक्षाचे उमेदवार एका प्रभागातून निवडून येतील आणि मिळून मिसळून प्रभागाचा विकास करतील असा कयास असायचा पण प्रत्यक्षात मात्र क्रॉस वोटिंग होताना दिसून येते (वेगवेगळ्या पक्षाचे नगरसेवक निवडून येतात आणि त्यामुळे मिळून मिसळून विकासाऐवजी कुरघोड्या सुरु होतात)

In reply to by विशुमित

हतोळकरांचा प्रसाद 10/02/2017 - 16:11
तशी फारशी अवघड नाहीये प्रोसेस त्यामुळे फार वेळी नाही लागत. आणि जर तुमचे चार उमेदवार आधीच मनात ठरलेले असतील तिथे पोहोचताना तर मग काही फार विशेष नाही. बाजूबाजूला ठेवलेल्या चार मशीनवर बटन दाबले कि एक लाऊड बीप येतो आणि मतदान झाल्याचे निश्चित होते. साधारणपणे १ मिन लागतो.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

साधा मुलगा 10/02/2017 - 17:33
हि लिंक पहा , त्यात तुम्ही म्हणता प्रमाणे प्रत्येक जागेसाठी एक याप्रमणे एका वार्डात चार वेगवेगळे उमेदवारही येऊ शकतात. पण अशी शक्यता कमी वाटते, एखादा वॉर्ड संपूर्णपणे एखाद्या पक्षाच्या खिशात जाईल असे वाटते.

In reply to by साधा मुलगा

हतोळकरांचा प्रसाद 10/02/2017 - 22:05
पुण्यात मागच्या निवडणुकीत (२०१२ च्या) ७६ प्रभागांपैकी तब्बल ३५ प्रभागांमध्ये क्रॉस वोटिंग झालं होतं (प्रभागातल्या वॉर्डांमध्ये वेगळ्या पक्षाचे नगरसेवक). अर्थात मागच्या निवडणुकीत द्विसदस्य प्रभागपद्धती होती (एका प्रभागात दोन वॉर्ड). यावेळी चार सदस्यीय प्रभाग आहेत त्यामुळे काय होते ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

तेजस आठवले 14/02/2017 - 19:47
म्हणजे ह्या वेळेस प्रत्येकाने एकूण चार वेळा मत द्यायचे आहे ? एका वार्डाचे चार प्रभाग असतील (का एका प्रभागाचे चार वार्ड ?) समजा चार वेगळ्या पक्षाचे चार उमेदवार निवडून आले तर ते कारभार कसा करणार ? गोंधळ होतोय, कृपया समजावून सांगू शकलात तर बरे होईल.

In reply to by तेजस आठवले

हतोळकरांचा प्रसाद 14/02/2017 - 21:43
हो, प्रत्येकाला एकूण चार मत द्यावे लागतील. मी २०१२ ला नगरपरिषदेला ४ सदस्यीय प्रभागासाठी मतदान केले होते तेव्हा ४ मशीन होत्या, एका प्रभागातील ४ वॉर्डांसाठी प्रत्येकी एक. पण आज आमच्या इथल्या एका उमेदवाराने त्याचा नं. कितवा वगैरेच्या मशीनच्या इमेजेस पाठवल्या आहेत. त्यात एका मशीन वर दोन वार्डातील उमेदवार आहेत, कलर कोडेड. हे बहुतेक एका वॉर्डात किती उमेदवार आहेत त्यावर अवलंबून असेल. म्हणजे एका वॉर्डांसाठी एक असे चार बटन दाबले कि मतदान झाले. चार वेगवेगळ्या पक्षाचे मतदार निवडून येण्याची शक्यता पण खूप जास्त आहे आणि त्यांच्यात जर समन्वय राहिला नाही तर त्याचा फटका नक्कीच प्रभागाच्या एकत्रित विकासाला बसणार आहे. तो या पद्धतीचा सगळ्यात मोठा दुष्परिणाम आहे. शिवाय प्रत्येक नगरसेवकाचं कार्यक्षेत्र हे तो पूर्ण प्रभाग आहे परंतु कोणत्या समस्येसाठी कुणाकडे जायचे याबाबत अजिबात क्लॅरिटी नाही. हा प्रकार मागच्या वेळच्या द्विसदस्यीय पद्धतीतच डोकेदुखी ठरत होता, आता तर चार सदस्यीय पद्धती आहे. त्यामुळे एका पक्षाचे पॅनल एका प्रभागात निवडून आले नाही तर विस्कळीत विकास होईल असे माझे वैयक्तिक मत आहे.

In reply to by साधा मुलगा

फेदरवेट साहेब 10/02/2017 - 13:39
काहीतरी प्रचारकी लिहा, कोणालातरी वैयक्तिक पातळीवर नथीतुन तीर मारा, शेलकी विशेषणे वापरा. कशी मजा मजा करता यायला हवी बुआ माणसाला. =))

जेपी 10/02/2017 - 13:47
बाकी राहुद्या,, कुठे काय रेट मिळतोय ते सांगा. पुण्यात एका मताचा रेट ५०००/- चालु आहे अस कळतय

In reply to by जेपी

विशुमित 10/02/2017 - 14:19
आजकाल मतदार पण स्मार्ट झाले आहेत. जो पैसे देईल त्याच्याकडून घेतात आणि त्यांना ज्याला मत द्यायचं त्यालाच देतात. एकदा निवडणूक झाल्यावर कोण कोणाचे वाकडे करणार हा अप्रोच पहिला मिळतो आहे.

In reply to by विशुमित

तेव्हा एखादी वस्ती किंवा झोपडपट्टी असेल तर तिथून कुठल्या पक्षाला किती मत मिळाली हे समजत . त्यामुळे कोणी सगळ्यांच्या नावे वाटायला पैसे घेतले असतील प्रत्येकी एखाद्या वस्तीत आणि तिथे मतांची टक्केवारी कमी आली तर संबंधित अडचणीत सापडतो ,तो अडचणीत म्हणून तो वस्तीतल्याना धारेवर धरतो . २०-३०% कमी मत पैसे वाटले तरी हे गणित असत .त्या खाली टक्केवारी गेली कि उत्तरे द्यावी लागतात संबंधित व्यक्तीला मग मुद्दाम काम अडवून ठेवा त्या वस्तीतल किंवा तेथील लोकांचं असले प्रकार चालू होतात .

In reply to by वरुण मोहिते

विशुमित 10/02/2017 - 15:56
हो हो बरोबर आहे. आता कोणत्या भागात किती मते मिळाली याच्या डिटेल्स मिळतात. असे असायला नको आहे. मतदान हे पूर्णपणे गोपनीय असले पाहिजे. संशयाला कसली ही जागा नसावी.

In reply to by विशुमित

संदीप डांगे 10/02/2017 - 17:53
मागे पुण्यात पिंचित काही झोपडी-वस्त्यांवर राष्ट्रवादीच्या गुंडांनी पैसे देऊनही मते मिळाली नाहीत म्हणून मारहाण-नासधूस केली होती....

In reply to by संदीप डांगे

विशुमित 10/02/2017 - 18:08
चाकण भागात झाले होते असे पुसटशे आठवते आहे. पण राष्ट्रवादीचेच गुंड होते यासाठी काही दुवा देता का ?

गॅरी ट्रुमन 10/02/2017 - 19:21
एकूणच या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होत आहे. काही आय.डी शिवसेनेचे समर्थन करत आहेत. पण मुंबई महापालिकेत गेल्या ३२ पैकी २८ वर्षे या पक्षाचा महापौर होता, सर्वात महत्वाच्या स्थायी समितीचे अध्यक्षपद शिवसेनेकडेच होते तरीही गेल्या ३ दशकात आम्ही अमुक अमुक एवढे काम केले आणि यापुढे पाच वर्षात अजून अपूर्ण राहिलेले तमुक तमुक काम आम्ही करणार आहोत म्हणून आमच्या पक्षाला मत द्या असा पॉझिटिव्ह अजेंडा कोणाही शिवसेना समर्थक आय.डी ने मांडलेला नाही. यांचे पालुपद काय तर भाजपेयी वाईट, मोदी वाईट, शहा वाईट, आम्ही हरलो तर मुंबईतून मराठी माणूस हद्दपार होईल, त्यांना महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करायची आहे इत्यादी इत्यादी म्हणून शिवसेनेला मते द्या. म्हणजे इतकी वर्षे सत्तेत असूनही स्वत:चा पॉझिटिव्ह अजेंडा न मांडता इतर पक्षांना नावे ठेवत आम्हाला मते द्या असा काहीसा दृष्टीकोन दिसत आहे. शिवाजी महाराज म्हणजे आपली पर्सनल प्रॉपर्टी असल्याप्रमाणे शिवसेनेची वर्तणूक अगदी पहिल्यापासून होती आणि आहे. पण अर्थातच त्यात अजिबात सत्य परिस्थिती नाही. तेव्हा शिवसेनेचा विरोध करत तुमच्या नाकावर टिच्चून, जरी तुम्हाला आवडले नाही तरी त्याची पर्वा न करता शिवाजी महाराजांच्याच आयुष्यातील अखेरच्या पर्वावरील वसंत कानेटकरांच्या 'रायगडाला जेव्हा जाग येते' या नाटकातील एका दृश्याचा संदर्भ देत आहे. मान्य आहे की हे नाटक आहे आणि प्रत्यक्षात तसे काही झाले असेलच असे नाही. पण माझा मुद्दा स्पष्ट करायला या क्षणी तेच सर्वात योग्य उदाहरण वाटत आहे. शंभूराजे मोंगलांकडून परत आल्यावर पन्हाळ्यावर शिवाजी महाराजांना भेटले. त्यावेळी मला गादी नको, मी दूधभात खाऊन आपल्या पायांशी आनंदाने राहिन असे शंभूराजे म्हणतात. त्यावर शिवाजी महाराज शंभूराजांना म्हणतात-- दिलदिमाग ताळ्यावर ठेऊन विचार करा. दूधभात खाऊन आनंदाने राहायचे तुमचे बाळपण कधीच सरले. आता मागूनही ते तुम्हाला मिळायचे नाही. त्याच धर्तीवर म्हणतो की इतरांना नावे ठेवत आम्हाला मते द्या हे म्हणायचे तुमचे दिवस कधीच सरले. तुमचा पॉझिटिव्ह अजेंडा काय? अर्थातच शिवसेनेचे नेतृत्व आणि मुख्य म्हणजे उधोजीराव स्वतःच असा पॉझिटिव्ह अजेंडा पुढे आणत नसतील आणि इतकी वर्षे सत्तेत राहूनही नुसती इतरांवर टिका करण्यात धन्यता मानत असतील तर त्या पक्षाच्या समर्थकांकडून ती अपेक्षा तरी कशी ठेवायची?

In reply to by गॅरी ट्रुमन

हतोळकरांचा प्रसाद 10/02/2017 - 19:44
(तुम्ही आयडींची नवे घेतली नसल्याने, माझी बाजू स्पष्ट करतो) गॅरीजी, खेदाने नमूद करतो की आयडी स्पेसिफिक चर्चा व्हायला नको. मी मुंबईचा मतदार नसल्याने मी अगदी माझ्या प्रभागाच्या समस्या आणि विकास ह्या लेव्हलला जाऊन या निवडणुकीच्या बाबतीत माझा कल व्यक्त करू शकत नाही. त्यामुळे मी माझा राजकारणातला एकंदर रस आणि अपेक्षा यावरून मुंबईबाबत मत व्यक्त केले आहे. शिवाय तुम्ही हे विसरत आहात का कि तुम्ही देखील शिवसेना हारायला हवी याचे कारण तुम्ही भाजप चांगला विकास करू शकतो असे न सांगता शिवसेनाचा माज उतरायला हवा (द्वेष?) असे संगीतले आहे? बाकी अजून निवडणूक प्रचाराचे बरेच दिवस बाकी आहेत, त्यामुळे पुढे कोणकोण काय मुद्दे घेतो याची वाट पाहायला हवी असे मला वाटते. याशिवाय, उद्धवजींचे भाषण हाच एकमेव प्रचार असे काही नसून मुंबईत सर्वच पक्ष आपापल्या विकासाच्या अजेंडाचा प्रचार करतच असतील असे मला वाटते (मुंबईकर यावर जास्त माहिती देऊ शकतील, डिड यू नो वगैरे).

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

गॅरी ट्रुमन 10/02/2017 - 20:12
आयडी स्पेसिफिक चर्चा व्हायला नको.
सहमत आहे. पण काही आय.डी काय करत आहेत अशा स्वरूपाचा यापूर्वी एक प्रतिसाद आला होता हे पण विसरून चालायचे नाही.
शिवसेना हारायला हवी याचे कारण तुम्ही भाजप चांगला विकास करू शकतो असे न सांगता....
शिवसेना हरायला हवी हे का वाटते हे आतापर्यंत अनेकदा स्पष्ट केले आहेच तरीही दोन गोष्टी: १. विरोधी पक्षातील लोक इतर पक्षांना नावे ठेऊन मते मागू शकतात पण सत्ताधारी पक्षावर मात्र इतरांवर टिका करतानाच त्यांनी नक्की काय केले हे सांगायचेही उत्तरदायित्व असते त्यातूनही इतकी वर्षे सत्तेत असलेल्या पक्षावर ती जबाबदारी सर्वात जास्त--किंबहुना इतकी वर्षे सत्तेत असल्यानंतर इतर पक्ष वाईट हा मुद्दाच येता कामा नये. गेली २० वर्षे भाजप मुंबई महापालिकेत १/३ सत्ताधारी आहे म्हणून गेल्या २० वर्षात झालेल्या चांगल्यावाईट कामाचे श्रेय-दोष तितक्या प्रमाणात भाजपचाही. थोडे गणित केले तर २० वर्षात भाजप सत्तेत प्रतिवर्षी १ युनिट असेल तर शिवसेना २८ वर्षे ३ युनिट होती. म्हणजे जो काही कारभार झाला त्याचे श्रेय-दोष सर्वाधिक शिवसेनेचाच (१०४ पैकी ८४ म्हणजे ८०% पेक्षा थोडे जास्त) . जर शिवसेनेने पॉझिटिव्ह अजेंडा पुढे आणला असता आणि इतक्या वर्षात नक्की काय काम केले हे मुद्दे मांडले असते तर त्याच्या ८०% श्रेय नक्कीच शिवसेनेला दिलेच असते. प्रश्न का उभा राहिला? कारण शिवसेनावाले त्याविषयी काही बोलायलाच तयार नाहीत. २. भाजप चांगला विकास करू शकतो हे मी सांगावे ही अपेक्षा माझ्याकडून असेल तर महापालिका निवडणुकांमध्ये भाजप जिंकावा असे मला वाटते हे एक गृहितक झाले. मी असे कधी म्हटले आहे? खरे सांगायचे तर मी महापालिका निवडणुकांमध्ये फार इंटरेस्ट कधीच घेत नाही पण लोकसभा-विधानसभा निवडणुकांमध्ये मात्र अगदी जोरदार इंटरेस्ट घेतो हे मिपाकरांना तरी वेगळे सांगायची गरजच नाही. मी इतका इंटरेस्ट घेतलेली ही पहिलीच महापालिका निवडणुक असावी. नगरसेवक पातळीवर बरेचसे लोक चोर असतात हे काही वेगळे सांगायला नको. केंद्रीय पातळीवर वाजपेयी, मोदी किंवा विविध राज्यांमध्ये वेगवेगळे नेते काहीतरी करू शकतील हा विश्वास वाटतो तसा विश्वास नगरसेवक पातळीवरच्या कोणापासूनही वाटत नाही. तेव्हा केंद्र आणि राज्य पातळीवर भाजपचे समर्थन केले म्हणजे शहर पातळीवरही समर्थन केलेच पाहिजे हे तुमचे गृहितक दिसते. मला तसे करायची गरज वाटत नाही. तेव्हा मी शहर पातळीवर मुळातच भाजप समर्थक नसेन तर परत भाजप चांगला विकास कसा करू शकतो हे सांगायची माझी जबाबदारी नाही. पण जर शिवसेना समर्थक मात्र त्यांच्या पक्षासाठी मते मागत असतील आणि त्यांचा पक्ष इतकी वर्षे सत्तेत असेल तर ती जबाबदारी नक्कीच त्या पक्षाच्या समर्थकांची आहे. अन्यथा या निवडणुकांमध्येही फार इंटरेस्ट वाटला नसता पण उधोजीरावांच्या प्रकारांचा राज्य आणि केंद्र पातळीवर भाजपला त्रास होतो आहे असे मला वाटते म्हणून शिवसेनेचा पराभव व्हावा असे जरूर वाटते. आणि त्यातूनही शिवसेना जाऊन त्या जागी राष्ट्रवादीचा पाठिंबा फडणवीसांनी घेतला तर राज्यपातळीवरही भाजपचे समर्थन करणे मला शक्य होणार नाही.
बाकी अजून निवडणूक प्रचाराचे बरेच दिवस बाकी आहेत, त्यामुळे पुढे कोणकोण काय मुद्दे घेतो याची वाट पाहायला हवी असे मला वाटते.
ठिक आहे पण शिवसेनेचा ट्रॅक रेकॉर्ड बघता तुम्ही ही अपेक्षा ठेवत असाल तर तुमच्या आशावादाचे कौतुक वाटते.

In reply to by गॅरी ट्रुमन

हतोळकरांचा प्रसाद 10/02/2017 - 21:38
उप्स.. भाजपच यावा असे तुमचे मत असल्याचे गृहीतक ठेवल्याबद्दल क्षमस्व! (एकूण प्रतिसादांमुळे तसे वाटले होते खरे). मुंबईत शिवसेना नकोच मग काँग्रेस किंवा/आणि राष्ट्रवादी आली तरी चालेल का? तुम्हाला त्याबाबतीत काय वाटते? मी फक्त शिवसेनेबद्दल तशा प्रचाराची आशा आहे असे नाही म्हणालो तर सगळेच पक्ष ग्राउंड लेव्हलला तसा प्रचार करत असतात असे म्हणालो. माझ्या घरात येऊन पडणाऱ्या सर्वच पक्षाच्या इन्सरशन्समध्ये विकास काय केला आणि काय करणार याचे उल्लेख जास्त वाचतो. मुंबईत काय होतंय हे मला माहिती नाहीये, कोणी जाणकार सांगू शकतील. मला अजून एक प्रश्न पडतो कि, फक्त सत्ताधारी पक्षाने/त्यांच्या नगरसेवकांनी विकासाचा लेखाजोखा मांडून मते मागावीत असे आपण म्हणतो. मग जे विरोधी पक्षाचे नगरसेवक असतात त्यांनी कसली विकासकामे केली हे कसे पुढे येणार? म्हणजे त्यांचा लेखाजोखा कोण मांडणार?

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

संदीप डांगे 10/02/2017 - 21:42
उत्तम प्रश्न आहे! आमच्या भागात जो उमेदवार मनसेच्या तिकिटावर निवडून आला, भरपूर कामे केलीत तो आता भाजपच्या तिकिटावर मनसेची कामे दाखवत मते मागत आहे! :-) त्याचा लेखाजोखा कसा मांडायचा ह्या दुविधेत मी अडकलोय =))

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

गॅरी ट्रुमन 11/02/2017 - 09:43
मुंबईत शिवसेना नकोच मग काँग्रेस किंवा/आणि राष्ट्रवादी आली तरी चालेल का? तुम्हाला त्याबाबतीत काय वाटते?
व्यक्तिशः मला त्यामुळे फार फरक पडणार नाही. कारण महापालिकेत कोणीही आले तरी पैसे खाणे, बिल्डरांबरोबर संगनमत करून अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष करणे, कंत्राटदारांकडून टक्केवारी वसूल करणे इत्यादी प्रकार बंद होतील असे मला तरी वाटत नाही. तसे झाल्यास मला माझे मत बदलायला आवडेलच. पण आतापर्यंतचा अनुभव लक्षात घेता तसे काही होईल ही शक्यता फारच कमी. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आले तर या परिस्थितीसाठी जबाबदार असलेल्यांची नावे बदलतील पण परिस्थिती बदलायची शक्यता फारच थोडी. अर्थातच एम.आय.एम जिंकायला नको कारण तसे झाल्यास त्या जातीयवादी पक्षाला इतरत्र फोफावायला मुंंबई महापालिकेतील यश हा एक लॉन्चपॅड मिळेल.
मला अजून एक प्रश्न पडतो कि, फक्त सत्ताधारी पक्षाने/त्यांच्या नगरसेवकांनी विकासाचा लेखाजोखा मांडून मते मागावीत असे आपण म्हणतो. मग जे विरोधी पक्षाचे नगरसेवक असतात त्यांनी कसली विकासकामे केली हे कसे पुढे येणार? म्हणजे त्यांचा लेखाजोखा कोण मांडणार?
स्थानिक नगरसेवकांनी त्यांच्या वॉर्डात गटारे, कचरा इत्यादी कामे केली तरी ती लोकांना दिसतात. कोणत्याही सत्ताधारी पक्षाची एक पक्ष म्हणून महापालिका निवडणुकीत शहरपातळीवर काय काम करणार ही सांगायची जबाबदारी त्याचप्रमाणे स्थानिक नगरसेवकांची (सत्ताधारी/विरोधी कोणीही) त्यांच्या वॉर्डात काय काम केले ही सांगायची जबाबदारी. अनेकदा हे नगरसेवक त्यांच्या स्थानिक पातळीवरील कामाच्या/लोकसंग्रहाच्या जोरावर निवडून येतात. मुंबईत अगदी १९९७ पर्यंत कम्युनिस्ट पक्षाचे एखाद-दोन नगरसेवक निवडून येत असत. १९६०-७० च्या दशकांमध्ये कम्युनिस्टांचा मुंबईत काही प्रमाणावर जोर होता आणि त्या काळात मुंबई महापालिकेवर निवडून गेलेले नगरसेवक स्वतःच्या स्थानिक पातळीवरील कामाच्या/लोकसंग्रहाच्या जोरावर अगदी १९९० च्या दशकापर्यंत निवडून येत असत. मणीशंकर कवठे हे एक नाव माझ्या लक्षात आहे. विधानसभा/लोकसभा निवडणुकांमध्ये शहरात कम्युनिस्ट पक्षाला १९९० च्या दशकात ५% मते मिळाली असती तरी ती त्यांच्यासाठी मोठी आनंदाची गोष्ट झाली असती.पण असे नगरसेवक विरोधी पक्षात असूनही त्यांच्या पक्षाचा जोर शहरात नसूनही निवडून येत असत. त्यामुळे विरोधी पक्षांमधील नगरसेवकांनाही तसे करायचा मार्ग उपलब्ध आहेच.

In reply to by गॅरी ट्रुमन

श्रीगुरुजी 11/02/2017 - 22:39
पण मुंबई महापालिकेत गेल्या ३२ पैकी २८ वर्षे या पक्षाचा महापौर होता, सर्वात महत्वाच्या स्थायी समितीचे अध्यक्षपद शिवसेनेकडेच होते तरीही गेल्या ३ दशकात आम्ही अमुक अमुक एवढे काम केले आणि यापुढे पाच वर्षात अजून अपूर्ण राहिलेले तमुक तमुक काम आम्ही करणार आहोत म्हणून आमच्या पक्षाला मत द्या असा पॉझिटिव्ह अजेंडा कोणाही शिवसेना समर्थक आय.डी ने मांडलेला नाही. यांचे पालुपद काय तर भाजपेयी वाईट, मोदी वाईट, शहा वाईट, आम्ही हरलो तर मुंबईतून मराठी माणूस हद्दपार होईल, त्यांना महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करायची आहे इत्यादी इत्यादी म्हणून शिवसेनेला मते द्या. म्हणजे इतकी वर्षे सत्तेत असूनही स्वत:चा पॉझिटिव्ह अजेंडा न मांडता इतर पक्षांना नावे ठेवत आम्हाला मते द्या असा काहीसा दृष्टीकोन दिसत आहे.
निव्वळ महापालिका निवडणुकीतचे नव्हे तर उ.प्र., उत्तराखंड इ. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सुद्धा विरोधी पक्षांचे लक्ष्य फक्त मोदी एवढेच आहे. "मोदी वाईट आहेत" एवढेच सगळ्यांच्या प्रचारात असते. आपण ज्या राज्यात/महापालिकेसाठी निवडणुक प्रचात करीत आहोत, त्या संस्थेविषयी फारसे न बोलता "मोदी वाईट" हाच प्रचाराचा केंद्रबिंदू आहे. बाकी "मुंबई वेगळी करणे" हा शिवसेनेचा प्रत्येक निवडणुकीतील प्रचार म्हणजे मुस्लिमांचा "इस्लाम खतरेमें है" या कांगाव्यासारखा आहे.
शिवाजी महाराज म्हणजे आपली पर्सनल प्रॉपर्टी असल्याप्रमाणे शिवसेनेची वर्तणूक अगदी पहिल्यापासून होती आणि आहे. पण अर्थातच त्यात अजिबात सत्य परिस्थिती नाही.
आता तर मुंबई ही आपली वडीलोपार्जित खाजगी मालमत्ता आहे असा उधोजीरावांचा समज झालेला दिसतो. "बाहेर प्रचार करून शेवटी मुंबईत आमचेच पाणी पिता" असे ते २-३ दिवसांपूर्वी बरळले होते. म्हणजे मुंबई आणि मुंबईतील पाणी ही यांची वंशपरंपरागत मालमत्ता.

In reply to by श्रीगुरुजी

गॅरी ट्रुमन 12/02/2017 - 10:27
बाकी "मुंबई वेगळी करणे" हा शिवसेनेचा प्रत्येक निवडणुकीतील प्रचार म्हणजे मुस्लिमांचा "इस्लाम खतरेमें है" या कांगाव्यासारखा आहे.
सहमत आहे. विधायक कामे न करता नुसत्या भावना भडकावायच्या आणि त्या जोरावर मतांची झोळी भरायची असले प्रकार शिवसेनेने गेल्या कित्येक वर्षांपासून चालवलेले आहेत. त्यामुळेच मुंबई महाराष्ट्रातच हवी वगैरे कोणी बोलायला लागले तर त्यामागे प्रशासकीय, सामाजिक, आर्थिक इत्यादी सगळे विचार केलेले आहेत की शिवसेनेप्रमाणेच उथळपणा चालू आहे ही शंका येतेच म्हणूनच मुंबई वेगळी केली तर काय बिघडले असेही माझ्यासारख्यांना वाटायला लागते. मुंबईत मोठ्या प्रमाणावर फ्लाय-ओव्हर बांधले गेले ते युती सरकारमध्ये नितीन गडकरी सार्वजनिक बांधकाममंत्री असताना. किंबहुना १९९९ मध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्या त्यावेळी १९९९ चे कारगील युद्ध आणि वाजपेयींची लोकप्रियता या गोष्टी आपल्याला तारून नेतील असे युतीला वाटत होते. नितीन गडकरींचे काम सोडून युती सरकारच्या काळात तसा आनंदीआनंदच होता आणि ते सोडून युती सरकारकडे सांगण्यासारखे फारसे काही नव्हते.
आता तर मुंबई ही आपली वडीलोपार्जित खाजगी मालमत्ता आहे असा उधोजीरावांचा समज झालेला दिसतो. "बाहेर प्रचार करून शेवटी मुंबईत आमचेच पाणी पिता" असे ते २-३ दिवसांपूर्वी बरळले होते.
हो यातून उधोजी आणि शिवसेनेचा उद्दामपणा दिसून येत आहे.

धर्मराजमुटके 10/02/2017 - 20:11
एवढे सगळे प्रतिसाद वाचल्यावर एक नक्की कळले की कोणत्याही पक्षाचे सरकार आले तरी परिस्थिती बदलणार नाहीये. मग 'नोटा' चाच पर्याय वापरावा की काय या निर्णयापर्यंत आलो आहे.

In reply to by धर्मराजमुटके

संदीप डांगे 10/02/2017 - 20:58
नोटा वापरणे उपयोगाचे नाही, ते बाद मतांसारखेच आहे. 'तुम्ही मतदानाला आला त्याबद्दल धन्यवाद' ही इतकी नोंद करण्याचे माध्यम आहे ते! जेवढी नोटा मते आलीत ती बाजूला सारून जितकी मते उमेदवारांना मिळाली ती मोजली जाऊन विजयी उमेदवार घोषित होतो... मला माहित असलेली हीच पद्धत आहे. बाकी काही वेगळे असल्यास जाणकारांनी नक्की सांगावे...

In reply to by संदीप डांगे

नोटा च्या पर्यायाचा अर्थ 'तुम्ही मतदानाला आला त्याबद्दल धन्यवाद' इतकाच नसून 'मी माझे अमुल्य मत तुमच्यापैकी कोणालाही देण्याइतकी तुमची लायकी नाही' असा निरोप उमेदवारांपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात पोहोचावा असा असावा असे मला वाटते. अर्थात निबर कातडीचे राजकारणी हा संदेश किती गंभीरतेने घेतील याची खात्री नाही मात्र संख्या दिवसेंदिवस वाढली तर मात्र काही परिणाम होऊ शकतो. राजकारणावर नाराज असणार्‍यांनी केवळ घरात बसून न राहता हा पर्याय जास्तीत जास्त वापरला पाहिजे असे वाटते. बाकी विजयी उमेदवाराच्या निवडीबद्द्ल तुम्ही सांगीतलेली पद्धत बरोबरच आहे. प्रश्न हरण्याच्या / जिंकण्याचा नाही तर उपलब्ध व्यवस्थेत निषेध नोंदविण्याचा आहे. नाहीतर आपण सर्वांनी इथे केलेली मेगाबायटी चर्चा व्यर्थ आहे.

In reply to by धर्मराजमुटके

हतोळकरांचा प्रसाद 10/02/2017 - 22:20
राजकारणावर नाराज असणार्‍यांनी केवळ घरात बसून न राहता हा पर्याय जास्तीत जास्त वापरला पाहिजे असे वाटते.
हाच मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेऊन नोटा बनवले गेले होते बहुतेक. लोक नाराज होऊन घरी बसण्यापेक्षा नोटाला वोट करतील आणि त्यामुळे बोगस मतदान कमी होईल. पण पद्धत मात्र तद्दन फालतू आहे असे वाटते. १००० पैकी ९०० नोटा असतील तरीही उरलेल्या १०० पैकी ज्याला जास्त तोच जिंकणार हे अजिबात पटत नाही.

In reply to by धर्मराजमुटके

संदीप डांगे 10/02/2017 - 22:34
निबर कातडीचे राजकारणी हा संदेश किती गंभीरतेने घेतील याची खात्री नाही
ह्याच मुळे मी 'तो' प्रॅक्टिकल अर्थ सांगितला, नोटा मधे फार अर्थ नाही. अगदी १०० पैकी ९० मते नोटा असली तरी... मतदान पुन्हा घेण्यात येईल बहुदा.. तुम्ही म्हणताय तसा संदेश वगैरे नोटांमधून देण्याइतकी आपल्या 'सर्वच' लोकांची प्रगल्भता वाढलेली नाही, तुमच्या-आमच्यासारखे विचार करुन मतदान करणारे फार थोडे आहेत. खरेतर नोटा वापरायची अक्कल जर समाजात असेल तर त्याला नोटा वापरायची वेळच येणार नाही असे काहीसे आहे ते...
राजकारणावर नाराज असणार्‍यांनी केवळ घरात बसून न राहता हा पर्याय जास्तीत जास्त वापरला पाहिजे असे वाटते.
राजकारणावर नाराज असलेल्यांनी केवळ घरात बसून न राहता, थेट समाजात उतरुन कामं केली पाहिजेत, जी लोकं ही कामं करायची धमक ठेवतात तीच राजकारणात उतरतात व जिंकून येतात, राजकारण करणे सोपं नसतंच, लोकांची कामे करणेही... आपला नगरसेवक नेमका काय करतो, त्याची नक्की कामे काय असतात, अधिकार काय असतात हेही ९० टक्के लोकांना माहित नसेल तर फक्त नोटा वापरुन बदल घडेल असे समजणे दिवास्वप्न म्हणावे लागेल.

In reply to by संदीप डांगे

सुबोध खरे 13/02/2017 - 19:57
The Election Commission of India told the Supreme Court in 2009 that it wished to offer the voter a "none of the above" option on ballots, which the government had generally opposed.[17] The People's Union for Civil Liberties, a non-governmental organisation, filed a public-interest litigation statement in support of this.[18] On 27 September 2013, the Supreme Court of India ruled that the right to register a "none of the above" vote in elections should apply, and ordered the Election Commission to provide such a button in the electronic voting machines, noting that it would increase participation.[19][20][21][22][23] The Election Commission also clarified that even though votes cast as NOTA are counted, they are considered as invalid votes so they will not change the outcome of the election process. They are not taken into account for calculating the total valid votes and will not be considered for determining the forfeiture of security deposit.[24][25][26][27] In the 2014 general election, NOTA polled 1.1% of the votes,[28] counting to over 6,000,000.[29] The specific symbol for NOTA, a ballot paper with a black cross across it, was introduced on 18 September 2015. The symbol is designed by National Institute of Design, Ahmedabad.[30][31][32] स्रोत --विकी दुर्दैवाने NOTA ला जर इतर उमेदवारांपेक्षा जास्त मते पडली तर तेथे फेर निवडणूका घेतल्या जाव्यात अशी शिफारस सर्व पक्षीय राजकारण्यांनी हाणून पाडली आहे. निवडणूक सुधारणांमध्ये जर अशी एक महत्त्वाची सुधारणा झाली तर गुंड पुंड आणि धन दांडग्यांना थोडा तरी आळा बसेल अशी शक्यता आहे. म्हणजे जर सगळेच दिग्गज उमेदवार संशयित गुहेगार असले तरीही तुम्हाला त्यातलाच एक निवडून द्यावा लागतो याला थोडा तरी चाप बसेल( अशी माझी भाबडी अपेक्षा होती). पण निवडणुकीत केलेला "खर्च" संपूर्णपणे पाण्यात जाईल या भीतीने कोणताच पक्ष याला पाठिंबा देत नाही.

In reply to by सुबोध खरे

संदीप डांगे 13/02/2017 - 20:53
बरोबर! खरेतर नोटाला काहीही किंमत नाही. जरी नोटा मान्य करुन निवडणुका परत घेतल्या गेल्या तरी फक्त पक्षांचा नव्हे तर सरकार, निवडणुक आयोगाचाही खर्च वाढेल, सर्व सर्कस परत होईल त्यामुळे त्यालाही फार काही अर्थ नाही. त्यापेक्षा उभे राहणारे उमेदवार आधीच सगळ्यांना माहित असतात, ते नावडते असतील तर आपल्यातूनच एखादा चांगला माणूस उभा करुन निवडून आणणे, त्याचा प्रचार करणे हे सूज्ञ नागरिक करु शकतात. मला वाटते असा प्रयोग जुहु भागात झाला आहे. पण एकूणच त्या भागातल्या नागरिकांनी बरीच मेहनत घेऊन प्रस्थापितांना झोपवले आणि अ‍ॅडोल्फ डिसोझा यांना निवडून आणले होते. असे प्रयोग सगळीकडे व्हायला हवेत. जनसामान्यांच्या अ‍ॅक्टीव पॉलिटिक्सशिवाय हे होऊ शकणार नाही. फक्त मतदान करणे एवढेच राजकारणातले आपले कर्तव्य नाही, तो केवळ हत्तीचे शेपूट आहे. हत्ती हातात नसेल तर नुस्त्या शेपटाला काही अर्थ राहत नाही.

In reply to by संदीप डांगे

चिनार 14/02/2017 - 09:53
एक विचार, नोटा चा उपयोग खालीलप्रमाणे होऊ शकतो का ? अर्थात त्यासाठी कायद्यामध्ये बदल करावाच लागेल. समजा एकूण १०० मते नोंदवल्या गेली. त्यापैकी २० मते नोटा आहेत. तर १०० च्या २० टक्के मत सर्व उमेदवारांच्या मतांमधून कमी केले जावे. हा एक रँडम विचार आहे. याने कदाचित निकाल बदलणार नाही पण "तुमच्यापैकी कोणीच मत द्यायच्या लायकीचे नाही" हा संदेश परिणामकारक रित्या पोहोचवल्या जाईल का ?

In reply to by चिनार

संदीप डांगे 14/02/2017 - 10:40
उपयोग नाही, मुटके साहेबांनी म्हटले तसे निबर कातडीच्या नेत्याना काही फरक पडणार नाही, निवडणुकीवर ही नाही. पॉइंटलेस activity आहे NOTA म्हणजे. कितीही सुधारून, जबरदस्ती ने राबवली तरी शेवटी जनतेचेच नुकसान आहे, फायदा काही नाही. परत परत निवडणुका शक्य नाही, सर्व उमेदवार दुसरे उभे केले तरी आपल्याकडे स्त्रियांच्या राखीव जागेवर ज्या निवडून येतात बहुतेक ठिकाणी त्यांच्या नवऱ्यांकडे कारभार असतो, ह्या फक्त पपेट, असे पपेट उभे केले तरी नुकसान आहेच. तूर्तास जुहू चे उदाहरणच आदर्श वाटते मला.

तिमा 11/02/2017 - 10:45
कुठल्याही पक्षाचा विकासाचा गाडा हा, पाणी भरलेल्या पण असंख्य भोके पडलेल्या टँकर सारखा असतो. तो इच्छित स्थळी पोचेपर्यंत, त्यांत फक्त चुल्लुभर पाणी उरलेले असते. ते पाहून, मतदाराला कितीही वाटले तरी, त्यांतच उडी मारुन आत्महत्या करण्याचेही स्वातंत्र्य रहात नाही.

श्रीगुरुजी 12/02/2017 - 15:36
सकाळी एका ठिकाणी कामासाठी गेलो होतो. तिथे जरा थांबावे लागणार होते. काम होईपर्यंत वेळ काढावा म्हणून तिथेच पडलेला "सामना" उचलला. पुरवणीत पहिल्याच पानावर पूर्ण पान भरून "उद्धव ठाकरें"च्या दणदणीत, परखड मुलाखतीच्या तिसरा भाग या शीर्षकाखाली त्यांची मुलाखत छापलेली होती. उधोजींनी स्वत:च स्वतःची घेतलेली मुलाखत स्वत:च्याच मुखपत्रात छापून स्वत:च स्वतःचे कोडकौतुक केले होते. "मुलाखतीच्या पहिल्या दोन भागांमुळे विरोधी पक्ष कोमात गेले आहेत", "शिवसेना इतर सर्व प्रादेशिक पक्षांचा बाप आहे" असली मुक्ताफळे वाचून हसू आवरेना. स्वत:बद्दल, स्वतःच्या पक्षाबद्दल आत्मविश्वासाने बोलणे, विजयाचा दावा करणे ठीक आहे, परंतु इतकी हास्यास्पद अतिशयोक्ती, वल्गना दुसरा एखादा पक्ष करीत असल्याचे वाचनात नाही. अर्थात मटासारख्या वृत्तपत्रांनी व काही वाहिन्यांनी लगेच मुलाखतीचा सारांश आपापल्या प्रकाशनातून प्रसिद्ध केला. एकंदरीत मराठी वृत्तपत्रे, मराठी वृत्तवाहिन्या यांना शिवसेनेविषयी बराचसा सॉफ्ट कॉर्नर आहे व तो अजिबात लपून राहत नाही.

In reply to by संदीप डांगे

अस्वस्थामा 13/02/2017 - 19:33
बरं मग? नक्की काय समस्या आहे ते कळलं नाही.
असं कसं ? अत्ता पर्यंत युती होती ना म्हणून समस्या नव्हती. युती तुटी, समस्या उठी.! बादवे, युती असती तर गुर्जी इतके शिवसेनेवर पेटले असते का असा प्रश्न पडतो बुवा. ट्रुमन जितके त्यांच्या भुमिकेबद्दल सुस्पष्ट आहेत (मग तुम्ही सहमत असा/नसा) तितके गुरुजी नाहीत हे नक्की. अर्थात म्हणूनच ट्रुमनसाहेबांबद्दल आदर आहे.. :)

In reply to by अस्वस्थामा

श्रीगुरुजी 13/02/2017 - 20:42
बादवे, युती असती तर गुर्जी इतके शिवसेनेवर पेटले असते का असा प्रश्न पडतो बुवा.
भाजपने शिवसेनेबरोबर केलेली युती मला पहिल्यापासूनच आवडलेली नव्हती (अर्थात माझ्या मताला कोणी हिंग लावून विचारत नाही ती गोष्ट वेगळी). युती असती तर सेनावाले भाजपविरोधात इतक्या खालच्या पातळीवर गेलेच नसते. युती असताना सुद्धा जर सेनेने असा मूर्खपणा केला असता तरी मी सेनेवर इतकाच पेटलो असतो.

गॅरी ट्रुमन 13/02/2017 - 10:39
रायगड, परभणी आणि उस्मानाबादच्या जिल्हा परिषद निवडणुकांसाठी शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात हातमिळवणी झाली आहे अशी बातमी मटामध्ये आली आहे. या निवडणुका नेहमी स्थानिक पातळीवर लढविल्या जातात आणि स्थानिक पातळीवर स्थानिक गरजांप्रमाणे पक्ष अशी हातमिळवणी करत असतात. हा प्रकार पहिल्यांदा झाला आहे असे नक्कीच नाही. पण समजा भाजपने अशी कुठची युती केली असती तर सामनामध्ये त्यावर पानभरून टिका केली गेली असती. आणि दुसरे म्हणजे रायगडचे समजू शकतो. पण मराठवाड्यात मुंबई पुण्याप्रमाणे परप्रांतिय वगैरे विषय नसताना कट्टर हिंदुत्व आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील निष्ठेने भारलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांची फौजच्या फौज असेल तर परभणी आणि उस्मानाबादमध्ये अशी हातमिळवणी करायची प्रेरणा समजत नाही.

In reply to by गॅरी ट्रुमन

हतोळकरांचा प्रसाद 13/02/2017 - 12:12
या युतीची दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी अजून पुष्टी केली नसली तरी उस्मानाबाद युती काही नवीन नाही. सध्याही तिथे काँग्रेस-शिवसेनाच सत्तेत आहे. पद्मसिंह पाटील/राष्ट्रवादीला बाजूला ठेवण्यासाठी हि हातमिळवणी मागेच झालेली आहे. २ जागांचं अस्तित्व असलेला भाजपही या हातमिळवणीत सामील आहेच. शिवाय गोंदियामध्ये जि.प.मध्ये मागच्या वर्षी भाजप काँग्रेसने युती केल्याचं आठवतंय. सगळे पक्ष ह्या बाबतीत एकाच माळेचे मणी झाले असून भविष्यात काँग्रेस शिवसेना आणि भाजप राष्ट्रवादी युती झाली तर आश्चर्य वाटायला नको.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

श्रीगुरुजी 13/02/2017 - 12:41
भविष्यात शिवसेना व राष्ट्रवादीची युती होईल. दोन्ही प्रादेशिक पक्ष आहे, दोन्ही पक्ष एकखांबी आहेत, दोन्ही पक्षांना त्यांचे थोरले भाऊ फारशी किंमत देत नाहीत आणि दोन्ही पक्षांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. काँग्रेस व भाजप राष्ट्रीय पक्ष असल्याने त्यांनी महाराष्ट्रात केलेल्या युतीचा देशातील इतर राज्यात नकारात्मक परीणाम होऊ शकतो. त्यामुळे काँग्रेस शिवसेनेशी किंवा भाजप राष्ट्रवादीशी हातमिळवणी करणे अवघड आहे. शिवसेना व राष्ट्रवादीला महाराष्ट्रात केलेल्या युतीच्या परीणामांची चिंता महाराष्ट्राबाहेर करण्याची गरज नाही.

In reply to by श्रीगुरुजी

गॅरी ट्रुमन 13/02/2017 - 12:53
तशीही २००९ च्या लोकसभा निवडणुकांच्या आधी शिवसेना-राष्ट्रवादी युती होणार अशी हवा होतीच. त्यावेळी मीच मिपावर लिहिलेल्या लेखांमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी युती झाली तर आणि नाही झाली तर या दोन्ही शक्यतांमध्ये काय होईल याविषयी लिहिले होते असे आठवते. २००९ मध्ये बर्‍यापैकी त्रिशंकू लोकसभा आल्यास पंतप्रधानपदासाठी शरद पवारांचे नाव पुढे येऊ शकेल अशी हवा निर्माण केली गेली होती. त्या हवेत फारसे तथ्य नव्हते पण अशी हवा निर्माण झाली होती हे खरेच. अशावेळी शिवसेनेने पवारांना मराठी असल्याच्या मुद्द्यावरून नक्कीच पाठिंबा दिला असता (जसा २००७ मध्ये प्रतिभा पाटील यांना दिला होता) . प्रत्यक्षात काँग्रेसने स्वतः आणि मित्रपक्षांबरोबर उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात बर्‍याच जास्त जागा अनपेक्षितपणे मिळविल्या आणि असले काही करायची गरज पडली नाही. तरीही शरद पवार पंतप्रधान व्हायची शक्यता आणि शिवसेना-राष्ट्रवादी युती या दोन्ही गोष्टींची चर्चा त्यावेळी होतीच. कसे असते यांनी भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीशी युती केली असती तर ते मराठी बाणा जपायला. पण भाजपने यांची साथ सोडली की मग तो दळभद्रीपणा, गद्दारी, पाठीत खंजीर खुपसणे इत्यादी इत्यादी.

In reply to by गॅरी ट्रुमन

श्रीगुरुजी 13/02/2017 - 13:19
२००९ च्या राष्ट्रवादी-शिवसेनेच्या संभाव्य युतीमागे कारण होते ते त्यांच्यात २००७ अध्ये पुण्यात झालेली युती. २००७ च्या महापालिका निवडणुकीनंतर राष्ट्रवादी व शिवसेनेने निकालोत्तर युती करून राष्ट्रवादीला महापौरपद व सेनेला उपमहापौरपद मिळविले होते. भाजपपेक्षा राष्ट्रवादीशी युती करण्यात फायदा आहे हे त्यावेळी बाळासाहेबांच्या लक्षात आले होते. २००९ मध्ये त्यांच्यातल्या युतीची चर्चा एवढी जोरात होती की शेवटी "राष्ट्रवादीबरोबर युतीचा जो निर्णय घेणार तो लवकर घ्या, म्हणजे भाजपला आपली वाटचाल ठरविता येईल" असे गडकरींनी बाळासाहेबांना जाहीररित्या सांगितले होते. शिवसेना युतीसाठी उत्सुक होती, परंतु पवारांनी आयत्यावेळी कच खाल्य्याने ही युती झाली नाही. शिवसेनेशी युती केल्यास आपण पक्ष सोडू अशी धमकी सदाशिवराव मंडलिक व इतर काही जणांनी दिली होती.

In reply to by श्रीगुरुजी

हतोळकरांचा प्रसाद 13/02/2017 - 13:38
आणि १६ पैकी ३ सदस्य असताना स्थायी समिती अध्यक्षपद भाजपला कसं मिळालं होतं म्हणे पुण्यात? भाजपनेही राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली होतीच की!

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

वरुण मोहिते 13/02/2017 - 13:48
भाजप सोडून बाकीच्या पक्षांचं विचारा. भाजप असं काही करू शकत नाही .विषयांतर करा आता नवीन प्रतिसाद देऊन तुम्ही .

In reply to by वरुण मोहिते

हतोळकरांचा प्रसाद 13/02/2017 - 14:54
तर मुद्दा असा आहे कि काही बाबतीत सर्वच्या सर्व राजकीय पक्ष हे एकाच माळेचे मणी आहेत. त्यामुळे असे जेनेरिक मुद्दे घेऊन एखाद्या पक्षाची प्रतिमा कशी ठरवायची असा मला प्रश्न पडतो. भाजप गुंड लोकांना पक्षात घेतो म्हणजे काहीतरी वेगळे करतो अशी ओरड करणे म्हणजे एकूण दांभिक राजकारणाचे लक्षण आहे. कारण या अशा आरोपांचे दोन अर्थ होतात. १. भाजप हा आता गुंड घेतोय (आता कसे चालतात या चालीवर) म्हणजे आधी तो गुंड घेत नव्हता असा होतो ना! मग त्यावेळी ते उघडपणाने मान्य केल्याचं आठवत नाही. शिवाय २. आता या तथाकथित गुंडाना समजा भाजप ने जनभावनेच्या रेट्याने हाकलले तर परत भाजप हा स्वच्छ पक्ष आहे म्हणून मान्य करणार का? बाहेरून येणाऱ्या गुंडांचा वावडं आहे पण आत असलेले (सगळ्या पक्षांचे) राजकारणी सरसकट गुंड नाहीयेत असं मानायचं का? जोपर्यंत आपण जनता म्हणून असलं राजकारण (सरसकट सगळ्या पक्षांचं) नाकारत नाही तोपर्यंत हे चालत राहणार. त्यामुळे तूर्तास तरी असल्या जेनेरिक गोष्टी आपला कल ठरवण्यासाठी वापराव्यात का हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

संदीप डांगे 13/02/2017 - 16:42
मग 'पार्टी विथ डिफरंस' ह्या टॅगलाइनचा अर्थ काय असावा? ज्या मुद्द्यांवर इतर पक्षांवर टिका करतो तेच मुद्दे तोच पक्ष स्वतःच्या बाबतीत चालवून घेत असेल तर दांभिक राजकारण कोण करतं हे दिसतंच. कोणी काही अधिकृतरित्या म्हटले काय आणि नाही म्हटले काय याने नक्की काय फरक पडतो? कोण काय म्हणतो व प्रत्यक्षात करतो ह्याची तुलना आवश्यक. पण भाजपकडे बोट दाखवलं की इथले भाजपप्रचारक दुसर्‍या पक्षांबद्दल मेगाबायटी लिहित सुटतात, नेमकी उदाहरणं दिलीत की ह्यांना ऐनवेळेला भाषा समजत नाहीत. आत्ताच एका भाजप नेत्याचे वक्तव्य गाजतंय, म्हणे आधी गुंडांना निवडून आणू मग सुधारू... इथले भाजपप्रचारक तर त्यात काय चुकीचं आहे असंही विचारतील... =)) गुंडांना सुधारण्यासाठी त्यांना निवडून आणावे लागते हे नविन शिक्षण भाजपमधे मिळत असावे.

In reply to by संदीप डांगे

हतोळकरांचा प्रसाद 13/02/2017 - 17:24
ज्या मुद्द्यांवर इतर पक्षांवर टिका करतो तेच मुद्दे तोच पक्ष स्वतःच्या बाबतीत चालवून घेत असेल तर दांभिक राजकारण कोण करतं हे दिसतंच.
हे केस बाय केस बघुयात का? कोणत्या मुद्द्यांवर भाजपने टीका केली होती आणि आता स्वतः तेच करत आहेत? भाजपने अवलंबलेले धोरण हे अत्यंत चुकीचे आहेच आणि त्यातून होणारे प्रतिमा हनन त्यांना महागात पडेलच. मी मागे एका प्रतिसादात म्हटले होते कि भाजपाला या टॅगलाईनचा अर्थ स्पष्ट करायला हवा. प्रत्येकजण त्यांना हवा तसा अर्थ घेऊन त्यांचे "दात घशात घालायला" त्याचा उपयोग करणारच. बाकी मुद्दा हा आहे कि भाजपने म्हटले म्हणून तुम्ही मानले का? मानले तर मग समजा गुंडाना हाकलले तर तुम्ही परत त्यांना डिफरेन्ट मानणार कि अजून काही वेगळं कारण सांगून हा पक्ष वेगळा नाहीये म्हणणार? शिवाय भाजप गुंडाना घेत नाही हाच एक फरक अपेक्षित आहे का टॅगलाईनमधून? तो एक राजकीय पक्ष आहे आणि वेळोवेळी त्यांना त्यांच्या प्रतिमेशी तडजोड करावी लागली आहे आणि पुढेही करावीच लागेल. जितकी घोंगडी पांघरायाचा प्रयत्न करतील तेवढे उघडे पडतील. अवांतर : जसे भाजपप्रचारक मेगाबायटी लिहितात तसेच भाजपविरोधप्रचारकहि लिहितात. त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करावे.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

संदीप डांगे 13/02/2017 - 18:06
हे केस बाय केस बघुयात का? कोणत्या मुद्द्यांवर भाजपने टीका केली होती आणि आता स्वतः तेच करत आहेत?
मी काय म्हणतो, आजवरची भाजप नेत्यांची राजकिय सभांमधली भाषणे ऐका... भाजपचे प्रचारसाहित्य चाळा... आपल्या आपण सगळं स्वच्छ होईल की.. प्रत्येकदा स्पूनफीडींग ची गरज असतेच असे नाही. उदा. उत्तरप्रदेशात घराणेशाहीबद्दल भाजप करत असलेली टिका आणि भाजपचे त्याबाबतीत स्वतःचे वर्तन बघावे. भाजपने अवलंबलेले धोरण हे अत्यंत चुकीचे आहेच आणि त्यातून होणारे प्रतिमा हनन त्यांना महागात पडेलच. >> मग, समस्या काय आहे? मी मागे एका प्रतिसादात म्हटले होते कि भाजपाला या टॅगलाईनचा अर्थ स्पष्ट करायला हवा. >> नक्कीच. पण प्रस्तुत अर्थ असा आहे की इतर पक्ष (मुख्यत्वेकरुन काँग्रेस) जे करतं उदा. घराणेशाही, मुस्लिमांचे लांगूलचालन, भ्रष्टाचार इ. आम्ही करत नाही. असा नसेल तर नक्कीच अर्थ स्पष्ट करावा. तो एक राष्ट्रिय मान्यताप्राप्त पक्ष आहे, त्यांची ही नागरिकांप्रति जबाबदारी आहेच. प्रत्येकजण त्यांना हवा तसा अर्थ घेऊन त्यांचे "दात घशात घालायला" त्याचा उपयोग करणारच. >> मग, समस्या काय आहे? बाकी मुद्दा हा आहे कि भाजपने म्हटले म्हणून तुम्ही मानले का? >> मी मानतो न मानतो हा प्रश्न कुठून आला? प्रश्न आहे की जे भाजप बोलतो ते पाळतो का स्वतःसाठी? एवढाच मुद्दा आहे. त्यात इतर कोणी मानणे-न मानणे हा दूरचा आणि असंबंधित विषय आहे. मानले तर मग समजा गुंडाना हाकलले तर तुम्ही परत त्यांना डिफरेन्ट मानणार कि अजून काही वेगळं कारण सांगून हा पक्ष वेगळा नाहीये म्हणणार? >> ज्या ज्या कारणांसाठी हे स्वतःला डिफरंट म्हणवणार त्या त्या कारणांना स्वत: फॉलो करावे लागेल, नैतर त्याला बनचुकेपणा, खोटेपणा म्हणावा लागेल. आता ती कारणे त्यांनी स्वतः ठरवायची आहेत. ते जर तसं पाळणार नसतील तर वेगळं म्हणायचं कारणच काय उरतं...? शिवाय भाजप गुंडाना घेत नाही हाच एक फरक अपेक्षित आहे का टॅगलाईनमधून? >> हा लोडेड प्रश्न आहे. तो एक राजकीय पक्ष आहे आणि वेळोवेळी त्यांना त्यांच्या प्रतिमेशी तडजोड करावी लागली आहे आणि पुढेही करावीच लागेल >> 'तो एक राजकिय पक्ष आहे' ही काय पळवाट झाली काय आपल्या उद्दिष्टे आणि धोरणांपासून लपण्याची? एका पार्टीची धोरणे+उद्दिष्टे+संकल्प दुसर्‍या पार्टीपेक्षा वेगळे असतात, त्यासाठीच तर वेगळी पार्टी बनत असते, तसे नसते तर सर्व भारतात एकच पक्ष राहिला असता की. आता ज्या धोरण+उद्दिष्टांना जो पक्ष स्वतःच हरताळ फासेल तो इतरांपेक्षा वेगळा आहे असं म्हणत असेल तर हास्यास्पद आणि केविलवाणाच दिसेल. आपल्या लिखित, अधिकृत धोरणांना हरताळ फासणारे वर्तन भारतातले बहुतेक सर्वच पक्ष करत असतात. कोणीही धुतल्या तांदळाचा नाही. अवांतरः इथला पक्षप्रचार बंद होईल तर विरोध आपोआप बंद होईल. काळजी नसावी.

In reply to by संदीप डांगे

हतोळकरांचा प्रसाद 13/02/2017 - 20:34
कसं आहे डांगेसाहेब, तुम्ही कुणाच्या प्रश्नावर फेरप्रश्न उभे करता, डेटा मागता तेव्हा ते बरोबर असते आणि दुसऱ्याने विचारलं तर स्पूनफीडिंग? म्हणजे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते...असो. बहुतेक तुम्हाला मुद्दा कळलेलं नाही. "सगळे पक्ष या नैतिक मुद्द्यांच्या बाबतीत एका माळेचे मणी आहेत" हे पटतंय का बघा! मुद्दा साधा आहे. भाजपला धुतळ्या तांदळासारखा समजायला सांगितलं कोणी आहे(भाजपचं सांगत आहे हे उत्तर असू शकत नाही, असे दावे तर एमआयएम आणि आआप वगैरेपण करतात)? ते दावे करतात, खोटे असतील आणि त्यांचे हे तुम्ही म्हणता तसे वरील पद्धतीचे दावे पटत नसतील तर तर त्या पक्षाला किंवा त्यांच्या उमेदवारांना जनतेने नाकारावे. जोपर्यंत हा नकारात्मक विरोध निवडणुकीत दिसत नाही तोपर्यंत राजकीय पक्षांकडून "राजकारण" होतच राहणार. माझी काहीही समस्या नाहीये, माझे मत आहे. याउलट मी विचारतो, तुमची काय समस्या आहे? याघडीला, निवडून यायच्या निकषावर(हे चुकीचंच आहे, त्याबाबतीत स्पष्ट मत आहे माझं) भाजप ने दहा-पाच गुंड लोक घेतले, तर भाजप गुंडांचा पक्ष हे लॉजिक पटत नाही. एकतर स्पष्ट मान्य करावं कि हे दहा पाच जण घेण्याच्या आधी भाजपमध्ये गुंड नव्हते किंवा मग मान्य करावं कि आधीपासूनच गुंड होते पण या दहा पाच जणांच्या येण्याचा इश्यू करायचा आहे आणि विरोधाचा प्रचार करायचा आहे. आता केस बाय केस म्हणजे काय? तर, बाबा गुंडांना घेतलं म्हणजे नेमकं कुणाला घेतलं? त्यांच्यावर नेमके काय गुन्हे आहेत? गुन्हे आहेत की आरोप आहेत? असे आरोप असणारे किती लोक दुसऱ्या पक्षात आहेत किंवा प्रवेश घेतला आहे? या सगळ्याची माहिती मिळेपर्यंत सरसकट आरोप करणे मला योग्य वाटत नाही. काही स्पष्ट उदहाराणांमुळे (पुणे, ठाणे) त्यांचे प्रतिमा हनन होते आहे हे मान्यच आहे.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

संदीप डांगे 13/02/2017 - 21:20
कसं आहे डांगेसाहेब, तुम्ही कुणाच्या प्रश्नावर फेरप्रश्न उभे करता, डेटा मागता तेव्हा ते बरोबर असते आणि दुसऱ्याने विचारलं तर स्पूनफीडिंग? म्हणजे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते...असो.
>> तुम्ही स्पेसिफिक गोष्टी आणि जनरल गोष्टींचा बादरायण संबंध लावून 'संदीप डांगे कसे चुकीचे मांडत आहेत बघा' हा जो प्रकार करत आहात तो बरोबर नव्हे. केस बाय केस बघुया हे तुमचे म्हणणं तुम्हाला तरी पटतंय काय? मी वर उदाहरण दिलंय, भाजपच्या घराणेशाहीवरिल टिकेचं आणि त्यांच्या उमेदवारांमधेच असलेल्या घराणेशाहीचं, तुम्हाला खोटं वाटत असेल तर खोडून काढा की केस बाय केस. कुणी अडवलंय? भाजपच्या नेत्यांनी, मोदींनी घराणेशाहीवर टिका केली हे चुकीचे असेल तर खोडून काढा, त्यांच्या उमेदवारांमध्ये अजिबात घराणेशाही नाही हेही सिद्ध करा. केसबायकेस तर मी इथेच दिलंय तुम्हाला... तरी वरचे विधान माझ्याबाबतीत आपण करत आहात म्हणजे कमाल आहे!
बहुतेक तुम्हाला मुद्दा कळलेलं नाही. "सगळे पक्ष या नैतिक मुद्द्यांच्या बाबतीत एका माळेचे मणी आहेत" हे पटतंय का बघा!
म्हणजे हे मला समजत नाही, पटलं नाही असं वाटतंय काय? कशावरुन असे वाटले ते सांगता काय? मुद्दा साधा आहे. भाजपला धुतळ्या तांदळासारखा समजायला सांगितलं कोणी आहे >> ह्यँ?!?! हा काय प्रश्न आहे? ह्याला काय शेंडाबुडूख आहे की नाही? उगाच लोडेड प्रश्न विचारु नका बॉ! (भाजपचं सांगत आहे हे उत्तर असू शकत नाही, असे दावे तर एमआयएम आणि आआप वगैरेपण करतात) >> बरं मग? करु देत ना... दावे आणि वर्तन म्याच नाही झालं तर टिका तर होणारच, आणि होतेच की... तेव्हा आपण विचारता का कोणी सांगितलं तुम्हाला आप-एमआयएम धुतल्या तांदळासारखी आहे ते? अशा सगळ्या पक्षांवर होणार्‍या सगळ्या टिकांचं मी स्वागतच करतो, तुम्ही नाही करत काय?
ते दावे करतात, खोटे असतील आणि त्यांचे हे तुम्ही म्हणता तसे वरील पद्धतीचे दावे पटत नसतील तर तर त्या पक्षाला किंवा त्यांच्या उमेदवारांना जनतेने नाकारावे. जोपर्यंत हा नकारात्मक विरोध निवडणुकीत दिसत नाही तोपर्यंत राजकीय पक्षांकडून "राजकारण" होतच राहणार.
>> तर आपण 'पक्षात गुंड, भ्रष्टाचारी असणे हे जनमान्यताप्राप्त असल्यानेच बिच्चारे राजकिय पक्ष तरी काय करणार' असे गृहितक मांडून राजकिय पक्षांचा एका अर्थाने बचावच करत आहात की... कोणत्या जनतेने आम्हाला गुंड, आणि भ्रष्टाचारीच हवेत असा हट्ट धरलेला आहे जरा सांगाल काय? दहा बदमाषांपैकी एक निवडा अशी आपली निवडणूक पद्धत आहे, कितीही पटले नाही तरी नाकारायला चान्स कुठे आहे? तुम्ही खुबीने चेंडू जनतेच्या कोर्टात टोलवला आहे पण जनतेकडे रॅकेट नाही हे बघितलं नाही.

In reply to by संदीप डांगे

हतोळकरांचा प्रसाद 14/02/2017 - 12:47
जरा बैजवार होऊद्या डांगेसाहेब. तुम्ही शब्दांचे इमले बांधण्याआधी जरा बेसमेंट पक्कं करू, कसे? आता आधी खालील प्रश्नांची उत्तरे शोधू मग आणि मग पुढे चर्चा करू. हे भाजपचे गुंडाना घेणे मागच्या एक दिड वर्षातले आहे असे गृहीत धरू. म्हणजे भाजप त्याआधी गुंड असणारा पक्ष नव्हता असे आपल्याला म्हणायचे आहे का? भाजप मध्ये किती गुंडानी प्रवेश केला आणि त्यांच्यावर काय काय गुन्हे आहेत हे कळण्याआधी सरसकट आरोप करणे तुम्हाला बरोबर वाटते का? घराणेशाहीचं म्हणाल तर भाजप याबतीत दुटप्पीपणा करतोय हे उघडच आहे की! माझं मत याबतीत थोडा वेगळं आहे. मला घराणेशाही लादण्यावर काहीच प्रॉब्लेम वाटत नाही. जर जनतेला पसंत नाहीये तर त्यांनी नाकारावे. शिवाय फक्त घराणेशाहीतून आला म्हणून एखाद्याचे कर्तृत्व कमी होत नाही. घराणेशाहीतूनच आलेले पण अगदी मुरब्बी असे कितीतरी नेते महाराष्ट्रात आहेत. हो त्यांना घराणेशाहीपुळे ब्रेक लवकर मिळेल इतकेच पण मग ते सगळ्याच क्षेत्रात लागू होते. (काही नैतिक गोष्टींच्या बाबतीत)"सगळे पक्ष या नैतिक मुद्द्यांच्या बाबतीत एका माळेचे मणी आहेत" हे जर पटत असेल तर मग भाजप कडून वेगळी अपेक्षा ठेवायचीच का? या असल्या नैतिक गोष्टींची अपेक्षा कोणत्याही राजकीय पक्षांकडून केली जाऊ शकत नाही हा माझा मुद्दा आहे. अर्थातच टिका कराच की त्यात काय वाद असू शकतो. पण फक्त विरोधी प्रचारासाठी टिका होते तेव्हा ती मला अयोग्य वाटते. जनप्रतिनिधी म्हणजे नेमके काय? ते भ्रष्टाचारी किंवा गुंड असतानांही सर्वाधिक मते घेऊन निवडून येत असतील तर त्यांना जनमान्यताप्राप्त म्हणणार नाही की काय? यात गृहीतक ते काय? यात बचावाचा प्रश्न येतो कुठे (तुम्हाला हवा तसा अर्थ कसा घेता येतो याचे उदाहरण)? एका बाजूला तुम्ही ५-१० गुंड घेतले तर हे कसे चालते म्हणता तर दुसऱ्या बाजूला निवडणुकीत उभे असलेले सगळे बदमाष आहेत असे म्हणता. सगळ्याच पक्षांचे सगळेच बदमाष आहेत तर त्यात अजून ५-१० बदमाष आल्याने अजून काय फरक पडतो? थोडक्यात राजकारणात उतरलेले सगळे गुंड, बदमाष आणि भ्रष्टाचारी आहेत आणि त्यातलाच एक निवडायची सक्ती आपल्यावर होते असे आपल्याला म्हणायचे आहे तर! याच्याशी मी सहमत नाही. दहापैकी जे काही चांगले (किंवा तुमच्यामते कमी वाईट) आहेत त्यांना निवडावे असे मला वाटते. जर जनता कमी वाईट ला निवडत असेल तर सर्व पक्ष कमीत कमी वाईट उमेदवार द्यायचा प्रयत्न करणार नाहीत का? जनतेकडे रॅकेट असायची गरज नाही, जनता रेफ्री आहे इथे! अवांतर : तुम्ही तुम्हाला एखादा प्रश्न विचारला की तो बाळबोध प्रश्न गृहीत धरून त्याला स्पूनफीडिंग असे उत्तर देत आहात आणि आधीहि दोन तीन वेळा हे स्पूनफीडिंग वाचण्यात आलं आहे म्हणून माझं वरच वाक्य होतं. कदाचित अवांतर असेल विषयापासून, पण बादरायण नाही.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

संदीप डांगे 14/02/2017 - 13:39
भाजप मध्ये किती गुंडानी प्रवेश केला आणि त्यांच्यावर काय काय गुन्हे आहेत हे कळण्याआधी सरसकट आरोप करणे तुम्हाला बरोबर वाटते का?
>> काही बेन्चमार्क आहे काय? की अमुक इतके गुंड व अमुक इतके गुन्हे असले तरच टिका करावी.. असे असले तर नक्की कळवा. आणि सरसकट आरोप हा काय प्रकार असतो? एखाद्या पक्षात गुंड भरती केले जात आहेत हे म्हणण्याला सरसकट आरोप कसे म्हणता तुम्ही?
मला घराणेशाही लादण्यावर काहीच प्रॉब्लेम वाटत नाही. जर जनतेला पसंत नाहीये तर त्यांनी नाकारावे. शिवाय फक्त घराणेशाहीतून आला म्हणून एखाद्याचे कर्तृत्व कमी होत नाही. घराणेशाहीतूनच आलेले पण अगदी मुरब्बी असे कितीतरी नेते महाराष्ट्रात आहेत. हो त्यांना घराणेशाहीपुळे ब्रेक लवकर मिळेल इतकेच पण मग ते सगळ्याच क्षेत्रात लागू होते.
>> विषय संपला... राहूल गांधी संसदेत जनतेद्वारे निवडून आले आहेत, त्यांच्याविषयीही आपले हेच (कर्तृत्ववान, मुरब्बी) मत आहे काय? प्रस्थापितांनी घराणेशाही चालवत देशाला परत राजेशाहीकडे घेऊन जावे असे आपले मत दिसते. गांधी घराण्याच्या घराणेशाहीवर टिका करणे हा भाजपचा व्यवच्छेदक गुण होता, आता आपली पाळी आली तर कर्तृत्व वगैरे सुचायला लागलंय.. अमित शहांना.
पण फक्त विरोधी प्रचारासाठी टिका होते तेव्हा ती मला अयोग्य वाटते.
>> 'फक्त विरोधी प्रचारासाठी टिका होते' हे तुम्हाला जे वाटते ते तुमचे वैयक्तिक मत आहे. राजकिय पक्षांनी काहीही केले तर योग्य, मात्र टिकाकारांनी त्यावर टिका केली तर ते अयोग्य असा काहीसा आपला पवित्रा दिसतोय. नाकाने कांदे सोलणार्‍यांवर टिका तर होणारच. त्याबद्दल रडारड करु नये असे मला वाटते.
ते भ्रष्टाचारी किंवा गुंड असतानांही सर्वाधिक मते घेऊन निवडून येत असतील तर त्यांना जनमान्यताप्राप्त म्हणणार नाही की काय?
>> जनतेलाच भ्रष्टाचारी, गुंड असे जनप्रतिनिधी हवे आहेत असा याचा अर्थ होतो आहे. हाच अर्थ अभिप्रेत आहे काय? काही लिंक देतो. वाचून घ्या. बेसिक पक्के करा. http://indiatoday.intoday.in/story/uttarakhand-assembly-election-14-per-cent-with-criminal-cases-adr-report/1/876153.html http://www.news18.com/news/politics/up-elections-2017-107-candidates-with-declared-criminal-cases-in-fray-1347107.html http://adrindia.org/media/adr-in-news/every-third-mp-16th-lok-sabha-has-criminal-charges-adr BJP is leading the chart with as many as 98 winning candidates (35 per cent) out of total 282, are facing criminal charges. While, 8 out of total 44 candidates of Congress are facing criminal charges. In AIADMK 6 out of 37 winners have been booked by police in some cases or other. The percentage of candidates facing criminal charges is highest in Shiv Sena as its 15 candidates out of the total 18 are booked in some cases or other. Trinamool Congress' 7 out of 34 winners are facing criminal charges.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

श्रीगुरुजी 14/02/2017 - 15:00
घराणेशाहीचं म्हणाल तर भाजप याबतीत दुटप्पीपणा करतोय हे उघडच आहे की! माझं मत याबतीत थोडा वेगळं आहे. मला घराणेशाही लादण्यावर काहीच प्रॉब्लेम वाटत नाही. जर जनतेला पसंत नाहीये तर त्यांनी नाकारावे. शिवाय फक्त घराणेशाहीतून आला म्हणून एखाद्याचे कर्तृत्व कमी होत नाही. घराणेशाहीतूनच आलेले पण अगदी मुरब्बी असे कितीतरी नेते महाराष्ट्रात आहेत. हो त्यांना घराणेशाहीपुळे ब्रेक लवकर मिळेल इतकेच पण मग ते सगळ्याच क्षेत्रात लागू होते.
इतर पक्षांप्रमाणे भाजपमध्येची घराणेशाही आहे, परंतु ती खूप खालच्या पातळीवर आहे. डाव्या पक्षांमध्येही घराणेशाही भाजपसारखीच अल्प प्रमाणात खालच्या थरावर आहे. भाजपच्या पक्षाच्या सर्वोच्च स्थानांवर, कार्यकारीणीमध्ये, निर्णय घेण्याच्या समितीमध्ये, पक्षाची ध्येयधोरणे ठरविण्याच्या समितीत. . . अशा ठिकाणी घराणेशाही नाही. भाजपचे आजवर किमान १० अध्यक्ष झाले (वाजपेयी, अडवाणी, मुरली मनोहर जोशी, कुशाभाऊ ठाकरे, जाना कृष्णमूर्ती, बंगारू लक्ष्मण, वेंकय्या नायडू, राजनाथ सिंह, नितीन गडकरी आणि अमित शाह). त्यापैकी एकाचाही वारसदार अध्यक्षपदावर आलेला नाही. भाजपमधील कोणाचाही मुलगा/मुलगी पक्ष नियंत्रण करणार्‍या सर्वोच्च समितीत नाही. जी घराणेशाही आहे ती खूप खालच्या थरावर आहे (पंकजा मुंडे, पूनम महाजन इ.). याउलट इतर पक्षातील घराणेशाही पक्षाच्या सर्वोच्च स्थानांवर आहे. त्यामुळे इतर पक्षातील ध्येयधोरणे, निर्णय इ. वर घराणेशाहीचा मोठा प्रभाव असतो. किंबहुना एक विशिष्ट घराणेच सर्व पक्ष नियंत्रित करीत असतो. तसा प्रकार भाजपमध्ये नाही. भाजपमधील घराणेशाही आणि इतर पक्षांमधील घराणेशाही यात मूलभूत फरक आहे तो हाच.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

श्रीगुरुजी 13/02/2017 - 20:44
भाजपविरोधकांना कमी लेखू नका. ते मेगाबायटी इतके लहान प्रतिसाद लिहीत नाहीत, टेराबायटी प्रतिसाद लिहितात.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

श्रीगुरुजी 13/02/2017 - 17:33
नक्की कोणत्या वर्षी स्थायी समिती अध्यक्षपद भाजपला मिळाले होते? २००७ च्या निकालानंतर बर्‍याच घङामोडी झाल्या होत्या. त्यापूर्वी सलग अनेक वर्षे महापालिकेत काँग्रेसचे वर्चस्व होते. कलमाडी पुणे महापालिकेचा अनभिषिक्त सम्राट होता. कोण महापौर होणार, कोण उपमहापौर होणार, स्थायी समिती अध्यक्षपद कोणाला मिळणार, तिकिट कोणाला देणार हे सर्व निर्णय कलमाडी घ्यायचा. २००७ मध्ये परिस्थितीत थोडा बदल झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे ४२ नगरसेवक निवडून आले व पुणे महापालिकेत तो सर्वात मोठा पक्ष ठरला. त्याखालोखाल काँग्रेस ३६, भाजप २५, शिवसेना २० अशी स्थिती होती. सुमारे २४ जागा मनसे, रिपब्लिकन व अपक्षांमध्ये वाटल्या गेल्या होत्या. बहुमतासाठी ७४ जागा हव्या होत्या. कोणत्याही परिस्थितीत पुणे महापालिकेतील कलमाडीची एकाधिकारशाही मोडीत काढायची या एकमेव उद्देशाने अजितदादांनी शिवसेनेशी हातमिळवणी केली. कलमाडीसुद्धा स्वस्थ बसला नव्हता. त्याने गुपचूप भाजपशी संधान बांधले व आपण उघड युती न करता तुम्ही मुक्ता टिळक यांना महापौरपदाची उमेदवारी द्या असे सुचविले. आपला भाजपला विरोध आहे, परंतु लोकमान्य टिळकांच्या घराण्यातील व्यक्ती या नात्याने आम्ही भाजप पक्षाला पाठिंबा देत नसून मुक्ता टिळक यांना व्यक्तिगत पाठिंबा देत आहोत असे जाहीर करू असे त्यांनी सुचविले. असे झाले असते तर अजितदादांना शह देता आला असता. उघडउघड युती करणे भाजप व काँग्रेस या दोघांनाही अडचणीचे होते. परंतु भाजपला शिवसेना-राष्ट्रवादी ही युती पसंत नव्हती, त्याचप्रमाणे काँग्रेसची मदत घेणे हे सुद्धा पसंत नव्हते. त्यामुळे भाजपने कलमाडीच्या प्रस्तावाला मान्यता दिली नव्हती. त्यानंतरची पुढील ५ वर्षे म्हणजे अजितदादा व कलमाडी यांच्यात एकमेकांवर कुरघोडी करण्यात गेली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराविरूद्ध जो असेल त्या उमेदवाराला मत देऊन काँग्रेसचा उमेदवार पाडण्याचा प्रयत्न करायचे तर काँग्रेस अगदी तेच राजकारण करीत होते.

In reply to by गॅरी ट्रुमन

पिजा 13/02/2017 - 17:55
खरतर ही युती पक्षांची नसून नेत्यांची आहे आणि तीही तात्पुरतीच आहे . हि युती राष्ट्रवादीच्याच दोन गटामधल्या राजकारणातून झालेली आहे. फरक इतकाच कि जे नेते काल राष्ट्रवादीत होते ते आज काँग्रेसमध्ये आहेत आणि सेना स्वबळावर सत्ता स्थापू शकत नाही म्हणून हा टेकू घ्यावा लागतो. साधं सूत्र आहे, ज्या गटाचे जास्त मेंबर त्याचा अध्यक्ष मग बाकीचे मग घोडेबाजारात. पक्षाचं काहीही बंधन नाही. भाजपचेही चांगले चान्सेस आहेत यावेळी(सारे काँग्रेस-राष्ट्रवादीतुन आयात ), त्यामुळे निकालानंतर राष्ट्रवादी-भाजप अशीही युती होऊ शकते. अवांतर: सत्तेत असलेल्या भाजपने ह्या नगरपालिका/जि. प. निवडणुका जिकंण्यासाठी जे प्रकार चालवले आहेत ते पाहता राष्ट्रवादीची xerox कॉपी सत्तेत असल्यासारखी वाटते. आदरणीय अजित दादा ज्या गावाने ओवाळून टाकलेल्या टग्यांच्या जोरावर निवडणूक जिंकायची भाषा करत, ते सगळं भाजप करताना दिसतोय. संयमाने राजकारण करण्याची ह्यासुद्धा पक्षाची तयारी नाही हे आपलं दुर्दैव. त्यामुळं राज्यातलं भाजप सरकार फारफार तर पुढची आणखी एक टर्म निवडून येईल त्यापुढं अवघड आहे.

In reply to by पिजा

संदीप डांगे 13/02/2017 - 18:31
लिन्क देण्याआधी संबंधितांना भाषा विचारुन घेत चला... नैतो आपण दिलेल्या लिन्कची भाषा अचानक त्यांना समजेनाशी होऊ लागते. =))

In reply to by संदीप डांगे

सुबोध खरे 13/02/2017 - 20:05
According to NCP leader Nilesh Nikam, "Last year, the NCP had supported the Congress candidate in the elections for the standing committee chairman. According to a pact, it was now the NCP's turn. However, the Congress did not keep its word and contested the election. We had no option but to support the BJP and teach the Congress a lesson."

In reply to by सुबोध खरे

श्रीगुरुजी 13/02/2017 - 20:35
गणेश बिडकरला स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने पाठिंबा द्यायचे हे एक कारण होते. त्याचबरोबरीने अजितदादा पवार व कलमाडी यांच्यातील पुणे शहरावरील वर्चस्वासाठी सुरू असलेला संघर्षही कारणीभूत होता. काँग्रेसच्या उमेदवाराला पाडण्यासाठी राष्ट्रवादीने स्वतःहून आपला उमेदवार मागे घेऊन भाजप उमेदवाराला पाठिंबा देऊन काँग्रेस उमेदवाराला पाडले होते.

In reply to by संदीप डांगे

श्रीगुरुजी 13/02/2017 - 20:38
लिन्क देण्याआधी संबंधितांना भाषा विचारुन घेत चला... नैतो आपण दिलेल्या लिन्कची भाषा अचानक त्यांना समजेनाशी होऊ लागते. =))
말도 안되는 얘기하지 마세요

In reply to by श्रीगुरुजी

संदीप डांगे 13/02/2017 - 22:11
काय गुरुजी... तुम्हाला तर स्थानिक भारतीय भाषा समजत नाहीत पण थेट कोरियन वगैरे बर्‍या समजतात हो? आणि त्यात थेट अपशब्द उच्चाराल ते मला समजणार नाही असे वाटले की काय तुम्हाला? कोरियन हांगुल लिपी मध्ये 'मूर्खासारखा काहीही बरळू नकोस' असं एकेरी बोलत आहात तुम्ही इथे.

In reply to by संदीप डांगे

श्रीगुरुजी 13/02/2017 - 22:50
तुम्हाला बरोबर समजलं. गंमत म्हणून टाकलं. सिरियसली घेऊ नका. हीच वाक्ये वाचण्याऐवजी कानावर पडली असती तर अर्थ समजला असता का? मलाही कोकणीत बोललेलं समजत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

संदीप डांगे 13/02/2017 - 23:55
किती खोटं बोलाल गुरुजी.. बस करा आता. इंग्रजीतले रिपोर्टीम्ग तुम्हाला समजत नाही, विधानसभेतलं इंग्रजीतले भाषण तुम्हाला समजत नाही, पर्रिकर इंग्रजीत बोलत आहेत ते तुम्हाला समजत नाही, चक्क देवनागरीतली हिंदी भाषा समजत नाही.. मी लिहिलेलं शुद्ध मराठीही समजत नाही... पण कोरियन मात्र अचूक समजते आणि लिहिता येते हो! असो. तुमचा बुरखा पुरता फाडला गेला आहे. अजून हास्यास्पद बनायचे बाकी असेल तर ते तुम्हालाच माहित. तुम्ही स्वतःसाठी आता खड्डा खोदून घेतला आहे हे तुम्हाला लक्षात आलं नसावं बहुधा. आपला भाषा न समजण्याचा स्टॅन्ड कायम राखणे हे तुमच्यासाठी आव्हान असेल यापुढे.

In reply to by संदीप डांगे

श्रीगुरुजी 14/02/2017 - 14:49
परत तेच पालुपद. कितीही वेळा सांगितले तरी समजत नाही का न समजल्याचं नाटक सुरू आहे. तुम्ही दिलेल्या प्रतिसादात तीन चित्रफिती होत्या. त्यातील एक अर्धी इंग्लिश व अर्धी कोकणीत होती. उर्वरीत दोन चित्रफिती पूर्णपणे कोकणीत होत्या. मला कोकणी समजत नाही. ज्याला मराठी समजते त्याला कोकणी समजायलाच हवे हा तुमचा अट्टाहास का? तुम्हाला तुमच्या प्रतिसादावर माझ्याकडून प्रतिसादाची अपेक्षा होती. माझ्या प्रतिसादासाठी इतका आसुसलेला विरळाच. असो. मी प्रतिसाद देण्यासाठी तीनची चित्रफिती आधी बघणे व समजणे आवश्यक आहे. तीनपैकी दोन चित्रफिती समजत नसल्याने अजूनपर्यंत प्रतिसाद दिलेला नाही. आता याबाबतीत इतका त्रागा आणि मेलोड्रामा कशासाठी? जसा मी त्या चित्रफितींवर प्रतिसाद दिलेला नाही तसाच इतरांनीही दिलेला नाही. इतरांनाही त्यात गम्य किंवा तथ्य वाटत नसावे असे दिसते. आणि बुरखा, खड्डे इ. विषयी बोलायचं तर सांस्कृतिकदृष्ट्या किंवा धार्मिकदृष्ट्या माझा बुरख्याशी अथवा खड्डे खणण्याशी अजिबात संबंध नाही. त्यामुळे बुरखा फाटला जाण्याचा किंवा खड्ड्यात पडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अवांतर - भारताने १९९८ मध्ये अणुचाचणी केल्यानंतर काही महिन्यांनी तत्कालीन परराष्ट्रमंत्री जसवंतसिंह अमेरिकेत आले होते. तेव्हा पत्रकारांशी बोलताना एका पत्रकाराने त्यांना विचारले की "भारताने अणुचाचणी करून स्वतःसाठी खड्डा खोदला आहे असे तुम्हाला वाटत नाही का?". त्यावर जसवंतसिंहांनी असे उत्तर दिले होते की "सांस्कृतिकदृष्ट्या अथवा धार्मिकदृष्ट्या आम्ही खड्डे खणत नसतो.". त्यांचे उत्तर राजकीयदृष्ट्या अयोग्य परंतु अत्यंत चपखल होते. माझे वरील विधान हे त्यांच्याच उत्तरावरून घेतले आहे.

हतोळकरांचा प्रसाद 14/02/2017 - 16:07
संदीप डांगेंजी, बघा किती सरळ आहे. मी सगळ्या पक्षांबद्दल मत मांडतोय आणि तुम्ही त्यातही बघा भाजपच कशी सगळ्यात जास्त गुंडाना पाळते वगैरे सिद्ध करण्याच्या मागे आहात.
सरसकट आरोप हा काय प्रकार असतो?
"भाजप हा गुंडांचा पक्ष आहे" हा सरसकट आरोप आहे. तो तुम्ही केला नसेल पण त्याबद्दलच चर्चा सुरु आहे ना? तुम्हाला याबद्दल काय वाटते ते सांगा.
राहूल गांधी संसदेत जनतेद्वारे निवडून आले आहेत, त्यांच्याविषयीही आपले हेच.....
बघा काढलात ना तुम्हाला हवा तसा आणि प्रतिसाद देता येईल असा अर्थ :):). घराणेशाहीतून निघालेले सगळेच नेते रागांसारखे असतात का? आणि रागां एवढ्या जास्त मताने निवडून का येतात हो? म्हणजे तिथल्या लोकांचा त्यांना पाठिंबा नाहीये पण घराणेशाहीमुळे निवडून देतात असं म्हणायचं आहे का तुम्हाला? "राजेशाही" लोक निवडून देतात का हो? आणि हो, गांधी घराण्यावर घराणेशाहीची टीका हेच एक घराणेशाहीबद्दलच दुःख आहे का? घराणेशाहीतूनच आलेले अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, अशोक चव्हाण, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, मनोहर नाईक, फडणवीस आणि गेला बाजार अखिलेश वगैरे इतर अनेक यांना तुम्ही रागांच्याच रांगेत बसवणार का?
'फक्त विरोधी प्रचारासाठी टिका होते' हे तुम्हाला जे वाटते ते तुमचे वैयक्तिक मत आहे. राजकिय पक्षांनी काहीही केले तर योग्य, मात्र टिकाकारांनी त्यावर टिका केली तर ते अयोग्य असा काहीसा आपला पवित्रा दिसतोय.
अर्थातच हे माझे वैयक्तिक मत आहे, नवीन काय सांगताय? राजकीय पक्षांनी काहीही केले तरी योग्य हा जावईशोध कुठला? स्वतःला हवा तसा अर्थ काढून माझ्या तोंडी वाक्ये चिकटवू नका हि विनंती. ते सगळेच बदमाष तरीही भाजपने १०-५ जणांना घेणे गैर व त्यातल्या त्यात कमी बदमाश निवडला तर राजकीय पक्षांचं धोरण पण बदलेल या मुद्द्यांवर मत व्यक्त केलात तर चर्चा योग्य ट्रॅकवर जाऊ शकेल (म्हणजे मूळ मुद्द्यापासून तशीही दूरच गेलीय चर्चा पण तरीही).

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

विशुमित 14/02/2017 - 16:36
घराणेशाहीतूनच आलेले अजित पवार>>> -- अजित पवार प्रारंभी पक्षाची आणि जनतेची कामे करून स्वकर्तुत्वाने इथं पर्यंत पोहचले आहेत. कारखान्याचे संचालक पदापासून ते जिल्हा बँकच चेयरमन असा राजकीय प्रवास त्यांनी केला आहे. पवार साहेब राष्ट्रीय राजकारण सांभाळत असताना त्यांनी बारामतीची पकड ढिली होऊन नाही दिली.

In reply to by विशुमित

विशुमित 14/02/2017 - 16:55
घराणेशाहीच्या जोरावर पहिली निवडणूक सोपी जाऊ शकते पण नंतरच्या सर्व निवडणुका स्वकष्टावरच लढवय्या लागतात... इति- सुप्रिया सुळे..!! (मिसेस सुळे हे घराणेशाहीचे उत्तम उदाहरण आहे)

In reply to by विशुमित

हतोळकरांचा प्रसाद 14/02/2017 - 17:03
मला तेच म्हणायचे आहे कि समाज एखादा नेता घराणेशाही करून आला असेल पण त्याने स्वतःचे वलय उभे केले तर ते नाकारणार कसे?

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

विशुमित 14/02/2017 - 17:16
हो बरोबर आहे... राहुल गांधी, आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे, प्रणिती शिंदे, पूनम महाजन, अमित देशमुख याना म्हणावं तसं स्वतःच वलय प्रस्थापित करता आलं नाही अजून. या उलट अखिलेश यादव, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, ज्योतिरादित्य शिंदे, धनंजय मुंडे, विश्वजित कदम अशी काही उदाहरणे आहेत त्यांनी स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करण्यात यशस्वी झालेले दिसत आहेत.

In reply to by विशुमित

हतोळकरांचा प्रसाद 14/02/2017 - 17:30
पंकजा मुंडेना त्या लिस्ट मध्ये नाही टाकता येणार असे मला वाटते. मराठवाड्यातल्या तरुणाईवर त्यांनी बऱ्यापैकी वलय निर्माण केला आहे. वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकून काढलेल्या "पुन्हा संघर्ष यात्रा" पाहता त्यांना वलय निर्माण करता आले नाही म्हणणे त्यांना अंडर इस्टिमेट करण्यासारखे आहे. त्याच जोरावर त्या त्यांच्या बाजूचे असे आमदार बाळगून आहेत. शिवाय २०१४ च्या निवडणुकांमधील त्यांच्या संघर्ष यात्रांना मिळालेला प्रतिसाद बघून निकालानंतर त्यांचे नाव अगदी मुख्यमंत्रीपदासाठी देखील चर्चिले गेले होते.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

विशुमित 14/02/2017 - 17:43
मराठवाड्यातील जनतेला काय वाटतं ह्या बद्दल मी नाही बोलत. इन जेनेरल निपक्ष मत म्हणून मी त्यांना त्या यादीत टाकले आहे. पंकजांकडे वक्तृत्व, दूरदृष्टी, सुसंस्कृतपणा, राजकारणातील साधन सुचिता, समय सूचकता आणि हाजीर जवाबीपणाचा अभाव दिसतो. संघर्ष यात्रेमध्ये त्यांचे स्वतःचे असे कर्तृत्व दिसले नाही.

In reply to by विशुमित

हतोळकरांचा प्रसाद 14/02/2017 - 20:15
पूर्णपणे असहमत! वेळ मिळेल तेव्हा त्यांच्या संघर्ष यात्रेचे विडिओ युट्यूबवरून वगैरे जरूर बघा. शिवाय वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखती वगैरे पण पहा, कदाचित तुमचं मत बदलेल.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

संदीप डांगे 14/02/2017 - 20:22
विशुमित यांनी जी एक ओळ लिहून पंकजाताईंबद्दल विशेषणे जोडली आहेत ती बहुधा सेल्फी-प्रकरणाकडे बघून जोडली आहेत असं वाटतं...

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

अभ्या.. 14/02/2017 - 21:13
पंकजा डॅशिंग आहे. बीड परभणी उस्मानाबाद भागातील मोठ्या समुदायावर तिचा होल्ड आहे. भगवानगडावरील सभा प्रकरणात ते प्रुव्ह केलेले आहे. वंजारी समाजावर असलेला मुंडेसाहेबांचा प्रभाव तिने कंटीन्यु केला आहे.

In reply to by विशुमित

विशुमित 14/02/2017 - 17:37
उदयनराजे भोसलेंचा उदाहरण द्याच राहून गेलं. भले हे शिवाजी महाराजांचे वंशज बऱ्याच लिबरल/ संघीय/ सुशिक्षित लोकांना रुचत नाहीत (मला पण नाही रुचत काही वेळा) पण सातारा सारख्या शहराला तेच सांभाळू शकतात. तेथील गुंडगिरी आटोक्यात ठेवायची असेल तर उदयनराजांच्या कार्यपद्धतीचाच उपयोग होताना दिसत आहे. इतर कोणी तेथील नेतृत्व करण्याचा प्रयत्न केला तर तेथील जनता त्याला टिकून देणार नाहीत. (सातारा चे कोणी मिपाकर असतील तर ते योग्य सांगू शकतील ) बारामती बाबत पण तेच आहे. बारामती मध्ये इतके गटतट असून देखील आणि बराच वेळा उमेदवार पटत नसून देखील जनता शेवटी पवार घराण्यावरच विश्वास टाकते. इतरांकडे सत्तेचे सोपान देऊन वाटोळे करून घेण्यात कोणाला हौस आहे ?

In reply to by मोदक

विशुमित 15/02/2017 - 10:18
माझ्या बद्दल फुकाचा आदर ठेवण्यापेक्षा माझे म्हणणे कसे चुकीचे आहे ते इथे लिहा, ही विनंती. माझे ज्ञानार्जन होईल आणि माझे विचार सुधारण्यात मदत ही होईल. व्यक्तिगत टिपण्याकरण्या पेक्षा हे कधीही चांगलेच नाही का?

In reply to by विशुमित

म्हणजे साताऱ्यात तेवढ्यापुरती हुकूमशाही आहे असं म्हणायचं का ? साताऱ्यात गुंडगिरी आहे म्हणून त्यांना सांभाळायला उदयनराजे सारखे माणसं लागतात, असं असेल तर भारतात साताऱ्यापेक्षाही जास्त गुंडगिरी असलेले कितीतरी शहरं आहेत. अश्याने सगळीकडे गुंडेच दिसतील ना विशुमित साहेब. हे म्हणजे असं झालं, "जब शहर के सबसे बडे गुंडे हम हैं और अगले पाच साल दिखनेवाले नही है, तो तुमको छेडेगा कौन?" उदयन राजे प्रवूत्ती हा फक्त माज आहे.आता ह्या अश्या माजाने साताऱ्याचा विकास झाला असे कोणी म्हणत असेल तर धन्य आहे. दोन दिवस साताऱ्यात आर्मि पाठवा सगळे गुंडे थंडे होतील. गुंड्यांना सांभाळायला गुंडे ठेवा हा संतापजनक प्रकार आहे.