मुंबई महानगर पालिका निवडणूक २०१७
In reply to म्हणजे साताऱ्यात तेवढ्यापुरती by चिनार
In reply to अवांतर आहे.. पण सातार्याचा by मोदक
In reply to अवांतर आहे.. पण सातार्याचा by मोदक
In reply to उदयनराजे भोसलेंचा उदाहरण by विशुमित
In reply to हे उदाहरण अतिशय चुकीचे आहे. by तेजस आठवले
In reply to सामान्य जनतेबद्दल चे मत बरोबर by संदीप डांगे
In reply to तुम्हाला पाहिजे तसा अर्थ by हतोळकरांचा प्रसाद
In reply to तुम्ही तुमच्याच मताला by संदीप डांगे
In reply to हे उदाहरण अतिशय चुकीचे आहे. by तेजस आठवले
In reply to स्पार्टन्स .................. by अभ्या..
In reply to राज ठाकरेंचा व्यक्तिशः विरोधक by संदीप डांगे
In reply to राज ठाकरेंचा व्यक्तिशः विरोधक by संदीप डांगे
In reply to मागेच कुठल्यातरी धाग्यावर बोलो होतो by वरुण मोहिते
In reply to मनसे संपलेला पक्ष आहे. या by श्रीगुरुजी
In reply to राज ठाकरेंचे भाषण by गॅरी ट्रुमन
In reply to मनसेविषयी आपले मत का चांगले by हतोळकरांचा प्रसाद
मनसेविषयी आपले मत का चांगले नाही हे वाचायला आवडेल.याचे कारण मनसेची गुंडगिरी, खळखट्याक धोरण वगैरे वगैरे. तसेच दोन लाख 'भय्ये' मुंबईत आले तर चार लाख हात आणि चार लाख पाय 'युपी-बिहारमध्ये' पाठवू अशा प्रकारचे विचार आणि भाषाही.
In reply to कारण by गॅरी ट्रुमन
In reply to सहमत आहे. खरंतर मनसेची by संदीप डांगे
खरंतर मनसेची स्थापना झाली तेव्हाची मनसे व त्यानंतर दोन-तीन वर्षातली मनसे यात खूप धोरणात्मक फरक झाला.मला असे अजिबात वाटत नाही. रादर झाला असेल तर उलट बदल झाला आहे. मनसे पॉप्युलर झाली तीच मुळी त्यांच्या या खळ्ळ फट्याक धोरणामुळे . सोबत विकासाचा अजेंडा होताच. हल्ली हल्ली मनसे याउलट असे चर्चेत राहणारे मुद्दे व आंदोलन यांपासून दूर गेलेली दिसते. रादर उगाचच फारसे महत्व नसणारी आंदोलने होताना दिसत आहेत. बाकी राज ठाकरे यांनी कालच्या भाषणात हा मुद्दा मांडलाच ना! नाशिकात सत्ता मिळाल्याच्या पहिल्या वर्ष दोन वर्षात नाशिकात काय केले असे सतत उपहासात्मक विचारणारी मंडळी हल्ली त्याबाबतीत विचारात नाहीत. कुठेय तुमची ब्लू प्रिंट विचारणारी मंडळी ब्लू प्रिंट दाखवल्यावर परत कधी त्याबद्दल बोलताना दिसली नाहीत. वास्तविक मला वैयक्तिकरित्या ब्लू प्रिंट हा प्रकार खूप आवडला होता, काही सुधारणांची गरज होती पण अप्रोच सुंदर होता. जनतेनी त्यांना निवडणुकीत आपटून दाखवून दिले कि फक्त त्या अजेंड्यावर चालून तुम्हाला जिंकता येत नाही. परंतु त्यानंतरही बहुतेक सगळ्या निवडणुकांमध्ये राज ठाकरे त्यांनी काय केले किंवा काय करू इच्छितात हे मांडलेच आहे. गेल्या दहा दिवसातील शिवसेना भाजप काँग्रेस राष्ट्रवादीची भाषणे बघितली तर त्यात ते काय केले/काय करणार आहेत याबद्दल जास्ती बोलताना दिसतच नाहीत. राहता राहिला प्रश्न खळ्ळ फट्याक गुंडगिरीचा तर तो सापेक्ष आहे. मला वैयक्तिकरित्या अशा आंदोलनांमध्ये खूप काही जगावेगळं आणि अराजक प्रकारचं वाटत नाही. म्हणजे उगाच काहीच नसताना चित्रपटात दाखवतात तसली गुंडगिरी वगैरे प्रकार आहे का तो?
In reply to खरंतर मनसेची स्थापना झाली by हतोळकरांचा प्रसाद
In reply to मागेच कुठल्यातरी धाग्यावर बोलो होतो by वरुण मोहिते
In reply to वरुण जी -- by विशुमित
In reply to राज ठाकरे by वरुण मोहिते
In reply to परत एकदा राज ठाकरेंची पुण्यात by हतोळकरांचा प्रसाद
In reply to +१११ by अमितदादा
In reply to +१११ by अमितदादा
In reply to राज ठाकरे अत्यंत बिनभरवशाचे by श्रीगुरुजी
In reply to जे भाजप शिवसेना बोलते त्यात by हतोळकरांचा प्रसाद
शिवसेनेला मुंबईत लोकांनी मतं दिली तर मान्य करायला हवं कि त्यांनी कामं केली आहेत.म्हणजे शिवसेनेने कामे केली आहेत याचे पोस्ट फॅक्टो जस्टिफिकेशन शोधायचे तर. मागच्या शनीवारी मी याच चर्चेत प्रश्न विचारला होता की उद्धव ठाकरे आम्ही गेल्या काही वर्षात सत्तेत असताना अमुकअमुक काम केले आणि यापुढे तमुकतमुक करणार आहोत याविषयी चकार शब्द उच्चारत नाहीयेत. उद्या तर प्रचार संपून जाईल त्यामुळे यापुढे तसे काही व्हायची शक्यता बरीच कमी--- अगदी शून्यच. मग शिवसेनेचे हिरीरीने समर्थन करणारे नक्की कोणत्या कारणाने शिवसेनेचे समर्थन करत आहेत? गेल्या आठवड्याभरात शिवसेनेचे समर्थन करणार्या कोणीही याविषयी काहीही लिहिलेले नाही. यावरूनच मला असे म्हणायचे आहे की शिवसेना इतकी वर्षे ज्या पध्दतीने राजकारण करत आहे ते यशस्वी झाले आहे. दाखविण्यासारखे काम केले नसले तरीही मराठी माणसाचा एकमेव तारणहार म्हणून स्वतःला प्रोजेक्ट करायचे आणि काल्पनिक शत्रू उभे करून त्याच मराठी माणसाच्या भावना भडकावायच्या. मग मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणार, मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार व्हावे लागेल इत्यादी इत्यादी भितीचे बागुलबोवे उभे करायचे. अशा परिस्थितीत महापालिकेचे जे काम असते--- पाणीपुरवठा, रस्ते, कचरा व्यवस्थापन इत्यादी इत्यादी व्यवस्थित केले आहे की नाही हा प्रश्न महत्वाचा नाही असे लोकांना वाटायला लागते आणि त्याच काल्पनिक शत्रूविरोधात मते दिली जातात. शिवसेना जर ५-१० वर्षे सत्तेत असती तरी समजता येते. पण तब्बल २८ वर्षे सत्तेत राहूनही आपण काय केले याविषयी काहीही बोलायचे नाही आणि नुसती इतरांना नावे ठेवायची आणि त्या २८ वर्षात सत्ताधारी पक्षाने ज्या कारणासाठी लोकांनी निवडून दिले आहे ते काम व्यवस्थित केले आहे की नाही हा प्रश्नही न विचारता इतके समर्थन शिवसेनेला कसे मिळते हा खरा तर Electoral Psychology मध्ये चांगले संशोधन करता येण्याजोगा विषय आहे. इथे मिपावरही त्याचेच प्रतिबिंब दिसत आहे असे म्हणायला जागा आहे. खरे तर शिवसेना समर्थकांनी स्वतःहून त्यांनी नक्की काय केले हे सांगायला हवे होते. पण ते सोडाच. मागच्या आठवड्यात स्पेसिफिकली तो प्रश्न विचारूनही शिवसेनेच्या गोटात चिडीचूप शांतता आहे. शिवसेनेला मिळणार्या समर्थनात भावनिक सोडून दुसरे कुठचे कारण खरोखरच आहे का?
In reply to ?? by गॅरी ट्रुमन
शिवसेनेला मिळणार्या समर्थनात भावनिक सोडून दुसरे कुठचे कारण खरोखरच आहे का?अगदी अचूक विश्लेषण!!!!!!!
In reply to ?? by गॅरी ट्रुमन
In reply to मला वाटत अनेक मुद्दे बोले हि आहेत by वरुण मोहिते
मुंबईबाबतीत म्हणाल तर भाजप ची कामाची पाटी पूर्ण कोरी आहेकमाल आहे. मागे एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे इतक्या वर्षाचा वेटेड अॅव्हरेज म्हणून जे काही झाले त्याचे श्रेय/दोष ८०% शिवसेनेला आणि २०% भाजपला द्यायला हवा. जर शिवसेनेनी इतका विकास केला असेल तर त्याच्या १/४ श्रेय भाजपचेही झालेच. कामाची पाटी कोरी कशी काय? आणि ती पाटी कोरी असेल तर मग शिवसेनेचीही पाटी कोरीच झाली. शून्याला कशानेही गुणा शेवटी शून्यच उत्तर येते. आणि भ्रष्टाचाराचे म्हणाल तर जसा महापालिकेतील भ्रष्टाचारात भाजपचा वाटा २०% तसाच झालेल्या कामातही. या शिवसेनावाल्यांनी आपल्या डोळ्याला झापडे लाऊन घेतली आहेत त्यामुळे त्यांना एकच बाजू दिसत आहे-- आणि ती बाजू पण खरोखरच अस्तित्वात आहे की नाही याविषयीही शंकाच आहे. कारण त्याविषयी त्यांचे नेते सुध्दा काही बोलत नाहीत आणि मिपावरील समर्थकही. प्रत्येक पावसाळ्यात मुंबई एकदातरी बंद पडतेच ते का?
काय म्हणून त्या पक्षाला मत द्यावे . नुसत्या बाता ऐकून का ?जर का दुसरे सगळे पर्याय खुजे असतील तर ज्या पक्षाकडे बॅगेज नाही त्या पक्षाला फायदा होतो-- हे अगदी दिल्लीतील केजरीवाल किंवा गेलाबाजार ट्रम्प यांच्या उदाहरणावरून समजते. शिवसेनेने गेल्या कित्येक वर्षात खरोखरच काहीही केलेले नाही म्हणून उगीच भावना भडकावायच्या--- इतक्या की आपण शिवसेनेचे समर्थन करत आहोत ते नक्की कोणत्या कारणामुळे याचे पण उत्तर कट्टरातल्या कट्टर समर्थकांनाही देता येत नाही या खेळात शिवसेनेचा हात कोणीही धरू शकणार नाही हेच खरे.
In reply to :) by गॅरी ट्रुमन
In reply to :) by गॅरी ट्रुमन
In reply to मला वाटत अनेक मुद्दे बोले हि आहेत by वरुण मोहिते
आपण सत्तेत सहभागी होतो तरीही युती तुटल्यावर भाजप ने सारा प्रचाराचा रोख बदलला . जर युती असती तर भाजप ने असा प्रचार केला असता का??या एका कारणामुळे भाजपवर इतका राग असेल तर त्याच न्यायाने शिवसेना मात्र २०१४ पासून मंत्रीमंडळात सामील असूनही सतत विरोधकांप्रमाणे वागत होती ( मधूनमधून सामनामधून टोले द्यायचे, गोव्यात भाजपमधून फुटलेल्या गटाशी हातमिळवणी करायची इत्यादी इत्यादी) म्हणून भाजपसमर्थकांमध्ये शिवसेनेवर किती प्रमाणात राग असेल याची कल्पना येऊ शकेल. ज्या दिवशी शिवसेनेचा पराभव होईल तो दिवस मी स्वतः साजरा करणार आहे. तो दिवस २०१७ मध्ये येईल किंवा २०१९ मध्ये येईल किंवा त्यानंतर कधी येईल हे माहित नाही पण एकनाएक दिवस शिवसेना कशी लोकांच्या डोळ्यात धूळ फेकत आली आहे हे लोकांना समजेल.
In reply to राग by गॅरी ट्रुमन
In reply to ?? by गॅरी ट्रुमन
पक्षाने नाशिकमध्ये खरोखरच चांगले काम केले असेल तर लोकं नक्कीच मते देतील. काळजी नसावी.या श्रीगुर्जींच्या वाक्याच्या संदर्भाने माझे वरील वाक्य होते. निकाल शिवसेनेच्या बाजुने लागले (पुण्यात राष्ट्रवादीच्या बाजूने म्हणा) तर हाच नियम लावावा असे मला सुचवायचे होते. माझे मत तसेच आहे असे नाही.
शिवसेनेला कसे मिळते हा खरा तर Electoral Psychology मध्ये चांगले संशोधन करता येण्याजोगा विषय आहे.याच्याशी सहमत. फक्त शिवसेनेच्या जागी वेगवेगळ्या ठिकाणी इतर पक्ष ठेवले तरी हे वाक्य खरे ठरावे.
In reply to गॅरीजी, by हतोळकरांचा प्रसाद
या श्रीगुर्जींच्या वाक्याच्या संदर्भाने माझे वरील वाक्य होते. निकाल शिवसेनेच्या बाजुने लागले (पुण्यात राष्ट्रवादीच्या बाजूने म्हणा) तर हाच नियम लावावा असे मला सुचवायचे होते. माझे मत तसेच आहे असे नाही.यात मोठा फरक हा की राज ठाकरे स्वत: नाशिकमध्ये आम्ही काय काम केले हे परतपरत सांगत आहेत. तसे उधोजीरावांनी या प्रचारादरम्यान एकदाही केल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे शिवसेनेला जी मते मिळतील ती त्यांनी केलेल्या कामामुळे नाही तर भावनिक कारणांमुळे मिळतील हे म्हणायला नक्कीच जागा आहे.
In reply to मोठा फरक by गॅरी ट्रुमन
In reply to तेच तर म्हणतोय मी! लोकांनी मत by हतोळकरांचा प्रसाद
In reply to अजून एक फरक by गॅरी ट्रुमन
In reply to मुंबईत काहीच केले नाही म्हणणे by हतोळकरांचा प्रसाद
मुंबईत काहीच केले नाही म्हणणे टोकाचे होईल.एकीकडे इतर पक्ष स्वतः फार काही केले नसले तरी आपण खूप काही केले अशाप्रकारचे चित्र उभे करतात. तेच त्रैराशिक मांडले तर शिवसेनावाले त्यांचे काम सोडून इतर सगळ्या गोष्टींविषयी बोलत आहेत मग त्यांनी खरोखर केलेले काम किती? एका कोंबडीस तीन तास मग इथे तर अखंड म्हैस आहे. करा हिशेब :) आणि अगदी कट्टर शिवसेना समर्थकही इतकी वर्षे सत्तेत असूनही आज मतदान करायची वेळ आल्यावर 'आपल्या बाजूकडे अमुकअमुक आहे' पेक्षा 'दुसर्या बाजूकडे काही नाही' या मुद्द्यावर समर्थन करताना दिसत आहेत यातच सगळे काही आले. शिवसेनेने नक्की काय केले हे सांगायची जबाबदारी त्या पक्षाच्या नेत्यांची. त्यांनी केले नाही तर निदान त्या पक्षाचे समर्थन करणार्यांची. शिवसेनेने नक्की काय केले हे तपासून बघायला जायचे ही अपेक्षा विरोधकांकडून कोणी करत असेल तर ते कसे काय चालेल?
बाकी काही लोकांना सर्वकाळ मूर्ख बनवता येते, सर्व लोकांना काहीकाळ मूर्ख बनवता येते पण सर्व लोकांना सर्वकाळ मूर्ख बनवता येत नाही. त्यामुळे मुंबईतील जनता करते त्यामागे काहीतरी कारण नक्कीच असेल असे मला वाटते.हो ना. मी पण कधी मुंबईतले लोक शिवसेनेला घरी बसविणार याचीच वाट बघत आहे.
भाजपवर चेक म्हणून शिवसेना हवी असं मत वर मी मांडलंच आहे.चेक ठेवायला मतदान करणारा जनता जनार्दन असताना चेक ठेवायला असे मध्यस्थ कशाकरता हेच मला समजत नाही. भारतीय मतदारांनी एकाहून एकेक उन्मत्त सत्ताधीश खाली खेचले आहेत. दुसरे म्हणजे भाजपवर चेक ठेवायला असे कोणी हवेच असेल तर मग काँग्रेस का नको? काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे भाजपवर देशव्यापी चेक राहू शकेल, काय म्हणता? तिसरे म्हणजे चेक ठेवायला कोणीतरी क्षयज्ञ हवा असे कोणी म्हटले तर तो मनुष्य (तुम्ही व्यक्तिशः नव्हे हे एक जनरल वाक्य लिहित आहे) असा चेक ठेवायला कोणाकोणाला पाठिंबा द्यायला जाईल या कल्पनेनेच अंगावर शहारा येतो. याच कारणामुळे दिल्लीमध्ये केजरीवालला पाठिंबा देणारे लोक होते. बरं ते थोडेच झाले की काय त्याच कारणामुळे बिहारमध्ये लालूलाही पाठिंबा देणारे लोक होते. आणि असा पाठिंबा देणारे कोणी अंगठाछाप लोक नव्हते तर मोठे अभ्यासू लोकही होते. कधीकधी वाटते की २०१९ मध्ये सगळ्या विरोधी पक्षांनी दाऊद इब्राहिमला पंतप्रधानपदाचे उमेदवार केले तर त्यालाही असे लोक भाजप नको म्हणून पाठिंबा द्यायला मागेपुढे बघायचे नाहीत.
In reply to काम by गॅरी ट्रुमन
In reply to १. मुंबईत काय केले हे मुंबईकर by हतोळकरांचा प्रसाद
जर चेक जनता जनार्दन आहे तर मग त्यांच्या २५ वर्षांच्या निर्णयावर अविश्वास का?प्रश्न २५ वर्षांमधील निर्णयावर नाही तर यापुढील ५ वर्षांमधील परिस्थितीवर आहे. एकूणच असे दिसते की निवडणुक महापालिकेची असली तरी महापालिकेच्या कार्यक्षेत्रात येणार्या गोष्टींमध्ये संबंधित उमेदवार/पक्ष कसे आहेत ही सगळ्यात महत्वाची गोष्ट सोडून इतर सगळ्या गोष्टी विचारात घेऊन मतदान करायचा लोकांचा विचार चालू दिसत आहे-- कोणी म्हणत आहे मराठी बाणा, कोणी म्हणत आहे 'ते' सत्तेत आले तर मराठी माणसाला हद्दपार व्हावे लागेल, कोणी म्हणत आहे 'त्यांना' मतदान केल्यास मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार वगैरे वगैरे. पण गेली अनेक वर्षे सत्तेत असूनही शिवसेनेने महापालिकेच्या कार्यकक्षेत जी कामे येतात ती कशी हाताळली आहेत हा विचार तरी कोणाला शिवतो आहे की नाही कोणाला माहित? शिवसेनेच्या धूळफेकीच्या राजकारणाचे यापेक्षा मोठे यश कोणते असेल?
In reply to यश by गॅरी ट्रुमन
In reply to जे भाजप शिवसेना बोलते त्यात by हतोळकरांचा प्रसाद
In reply to धरसोड - by श्रीगुरुजी
२०१४ मध्ये गुजरातला भेट देऊन मोदींची तोंड फाटेस्तोवर स्तुती. काही महिन्यातच मोदींना नावे ठेवणे सुरू.हे छान आहे की! चांगलं वाटलं चांगलं म्हणाले, नाही वाटलं टीका केली, याला धरसोड म्हणायचं? म्हणजे मोदींच्या अडीच वर्षांच्या सरकारवर टीका करणारे लोकही धरसोड करतात? मोदींची एकदा स्तुती केली की कायमच स्तुती करायला हवी असा काही नियम आहे का?
- २००६ मध्ये मनसेची स्थापना करताना आपला पक्ष सर्व महाराष्ट्रासाठी असल्याचा दावा......काहींच्या काही! यात धरसोड काय?
- नंतर टोलचा मुद्दा उचलून काही काळातच सोडून दिला.हो का? म्हणजे, हा टोलचा झोल आणणारे, याविरुद्ध आंदोलन न करणारे चांगले आणि त्यांच्या परीने आंदोलन करून काही प्रमाणात का होईना टोलविरोधी वातावरण करणारे वाईट (ज्याची फलश्रुती काही टोलनाके बंद होण्यात झाली)! काहीतरी चुकतंय असं नाही वाटंत?
प्रत्येक सभेत भाजप, काँग्रेस, राष्टवादी व शिवसेनेवर टीका. प्रत्यक्षात २००७ मध्ये मुंबई, ठाणे इ....हा विरोधाला विरोध आहे. एकूण एक पक्ष असलं राजकारण करतात. याला धरसोड म्हणतात? राज्यात सत्तेत एकत्र बसून एकमेकांचे कपडे फाडणारेपण धारसोडच करत आहेत की मग? निवडणुकीनंतर मनसे कोणाबरोबरही जाऊ देत तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. याला धरसोड कसं काय म्हणणार? भाजप सांगतंय का कि एवढे कपडेफाड केल्यानंतर काहीही झालं तरी शिवसेनेला पाठिंबा देणार नाही? शिवाय सत्तेतून त्यांनी बाहेर पडायची गरज काय, तुम्हीही घरोबा तोडूच शकता की! तर म्हणणे एवढेच आहे की माध्यमांनी आणि इतर पक्षांनी केलेल्या अप्रचाराचा मनसे हा बळी आहे. अर्थात यामध्ये मनसेचीही चूक आहेच की त्यांनी त्या त्या वेळी त्या गोष्टींना सडेतोड उत्तर देण्यापेक्षा दुर्लक्ष करण्याचा मार्ग करण्याचा मार्ग पत्करला.
In reply to २०१४ मध्ये गुजरातला भेट देऊन by हतोळकरांचा प्रसाद
हे छान आहे की! चांगलं वाटलं चांगलं म्हणाले, नाही वाटलं टीका केली, याला धरसोड म्हणायचं? म्हणजे मोदींच्या अडीच वर्षांच्या सरकारवर टीका करणारे लोकही धरसोड करतात? मोदींची एकदा स्तुती केली की कायमच स्तुती करायला हवी असा काही नियम आहे का?आधी चांगले वाटतात आणि अल्पकाळातच वाईट वाटायला लागतात, यालाच म्हणतात धरसोड वृत्ती. आधी तोंड फाटेस्तोवर स्तुती आणि नंतर एकदम थापाडे अशी संभावना. म्हणजे मोदी जर थापाडे असतील तर ते एकदम २०१४ नंतर झाले का? आणि त्याआधी ते राजा हरिश्चंद्राचे अवतार होते का? अशी टोपी वारंवार फिरविल्यामुळेच राज ठाकरेंनी विश्वासार्हता गमावली आहे. एकीकडे म्हणतात की शिवसेनेने मुंबईत २५ वर्षे भ्रष्टाचार केला. या २५ वर्षांपैकी १४ वर्षे राज ठाकरे शिवसेनेत होते. म्हणजे यांनी २००६ मध्ये पक्ष सोडल्यानंतरच सेनेने भ्रष्टाचार केला का? दुसरीकडे म्हणतात बाळासाहेबांनी २५ वर्षे चांगले काम केले. मग नक्की भ्रष्टाचार कोणी केला?
काहींच्या काही! यात धरसोड काय?यात धरसोडपणा असा आहे की पक्षस्थापना करताना माझा पक्ष सर्व महाराष्ट्रासाठी हा दावा आणि नंतर १-२ वर्षांनी एकदम मराठी बाणा स्वीकारून परप्रांतियांना मारहाण. एक काहीतरी ठरवा की तुमचा पक्ष सर्व महाराष्ट्रीयनांसाठी आहे का फक्त मराठी माणसांसाठी.
हो का? म्हणजे, हा टोलचा झोल आणणारे, याविरुद्ध आंदोलन न करणारे चांगले आणि त्यांच्या परीने आंदोलन करून काही प्रमाणात का होईना टोलविरोधी वातावरण करणारे वाईट (ज्याची फलश्रुती काही टोलनाके बंद होण्यात झाली)! काहीतरी चुकतंय असं नाही वाटंत?यातली चुकीची गोष्ट म्हणजे टोलचा मुद्दा अगदी तात्पुरत्या काळासाठी उचलला, टोलनाक्यांवर जाऊन तोडफोड केली आणि नंतर अल्पकाळातच हा मुद्दा सोडूनही दिला. सवंग लोकप्रियतेसाठी असे भावनिक मुद्दे उचलून वातावरण बिघडविले जाते आणि अल्पकाळातच हे मुद्दे सोडून नवीन मुद्दा पकडला जातो.
हा विरोधाला विरोध आहे. एकूण एक पक्ष असलं राजकारण करतात. याला धरसोड म्हणतात? राज्यात सत्तेत एकत्र बसून एकमेकांचे कपडे फाडणारेपण धारसोडच करत आहेत की मग? निवडणुकीनंतर मनसे कोणाबरोबरही जाऊ देत तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. याला धरसोड कसं काय म्हणणार? भाजप सांगतंय का कि एवढे कपडेफाड केल्यानंतर काहीही झालं तरी शिवसेनेला पाठिंबा देणार नाही? शिवाय सत्तेतून त्यांनी बाहेर पडायची गरज काय, तुम्हीही घरोबा तोडूच शकता की! तर म्हणणे एवढेच आहे की माध्यमांनी आणि इतर पक्षांनी केलेल्या अप्रचाराचा मनसे हा बळी आहे. अर्थात यामध्ये मनसेचीही चूक आहेच की त्यांनी त्या त्या वेळी त्या गोष्टींना सडेतोड उत्तर देण्यापेक्षा दुर्लक्ष करण्याचा मार्ग करण्याचा मार्ग पत्करला.राष्ट्रवादीला, शरद पवारांना, अजित पवारांना, भुजबळांना कडाडून विरोध करून नंतर त्याच पक्षाला पाठिंबा देणे व त्याच पक्षाचा पाठिंबा घेणे या काही विरोधाभास वाटत नाही का? एकीकडे शिवसेनेने प्रचंड भ्रष्टाचार केला, मुंबईची वाट लावली इ. बोलून जहरी टीका करायची आणि त्याचवेळी मातोश्रीवर फोन करून व आपले प्रतिनिधी पाठवून युतीसाठी टाळी मागायची यात काही विरोधाभास वाटत नाही का? नाशिकमध्ये महापौरपदासाठी भाजपची मदत घ्यायची, मुंबई महापालिकेत काँग्रेसच्या उमेदवाराला महापौरपदासाठी पाठिंबा द्यायचा आणि दुसरीकडे प्रत्येक सभेत सर्व पक्षांवर टीका करून ह्यांनी या शहराची वाट लावली, त्यांनी त्या शहराची वाट लावली, हे थापाडे, ते भ्रष्टाचारी अशी टीका करायची आणि दुसरीकडे त्याच पक्षांना पाठिंबा द्यायचा व त्यांचाच पाठिंबा ध्यायचा या अत्यंत बेभरवशाच्या व विश्वासघातकी राजकारणामुळेच आज मनसेची दुरावस्था झालेली आहे. यासाठी मनसे स्वतःच कारणीभूत आहे. माध्यमे व इतर पक्षांनी अपप्रचार केला असे त्यांच्यावर खापर फोडण्यात अर्थ नाही.
In reply to हे छान आहे की! चांगलं वाटलं by श्रीगुरुजी
In reply to शिवसेनेच्या जाहिराती by गॅरी ट्रुमन
In reply to शिवसेनेच्या जाहिराती by गॅरी ट्रुमन
In reply to भारतात असा एकही by वरुण मोहिते
In reply to प्रश्न by गॅरी ट्रुमन
In reply to आता बाळासाहेब नाहीत by वरुण मोहिते
In reply to :) by गॅरी ट्रुमन
In reply to फक्त मनसे by जेसीना
मला वाटते या सर्व प्रचाराच्या रणधुमाळीत फक्त राज ठाकरे हे एकटे असे आहेत जे त्यांनी केलेली काम तुमच्या आमच्या समोर ठेवत आहेत, बाकी सगळे मागे सत्तेत असताना काय केले आणि पुढे निवडून आल्यावर काय करणार ह्या बद्दल एक शब्द सुद्धा काढत नाहीत.माझ्यासारख्या मनसे विरोधकालाही याबद्दल सहमत व्हावेच लागेल इतकी स्वच्छ गोष्ट आहे ही. एकूणच राज ठाकरे त्यांंच्या त्या मातोश्रीमधल्या चुलतभावापेक्षा बरेच जास्त उजवे वाटतात.
In reply to सहमत आहे by गॅरी ट्रुमन
शिवसेनाने तशीही पूर्वी मुस्लिम लीग व काँग्रेसशी अधिकृत युती केलेलीच होती.अशुत्या शिवाजी आणि शहाजीमहराजांनीही केल्या होत्या. २.
मराठीवादी असती तर तब्बल ७ अमराठी व्यक्तींना शिवसेनेने राज्यसभेवर खासदार केले नसतेशिवसेनेस महाराष्ट्रात राज्य करण्यात अधिक रस आहे. त्यातूनही मराठीवादी असणं म्हणजे अमराठींचा द्वेष करणं हे कोणी सांगितलं तुम्हाला? आ.न., -गा.पै.
In reply to शिवसेनेची ढोंगं by गामा पैलवान
अशुत्या शिवाजी आणि शहाजीमहराजांनीही केल्या होत्या.म्हणजे शिवसेनेला मुस्लिम लीग, काँगेस, राष्ट्रवादी कॉंगेस असे कोणीही वर्ज्य नाही. मी तेच म्हणत होतो. शिवसेनेचे हिंदुत्व व मराठी बाणा म्हणजे भोंदूगिरी आहे.
शिवसेनेस महाराष्ट्रात राज्य करण्यात अधिक रस आहे. त्यातूनही मराठीवादी असणं म्हणजे अमराठींचा द्वेष करणं हे कोणी सांगितलं तुम्हाला?'बजाव पुंगी, हटाव लुंगी' ही घोषणा माहिती आहे का? परप्रांतियांना मारहाणे केल्याची प्रकरणे माहिती आहेत का? राज्यसभेच्या प्रत्येक खासदाराला वार्षिक कोट्यावधी रूपयांचा निधी मिळतो. खासदाराने तो निधी त्या राज्यात खर्च करणे अपेक्षित असते. शिवसेनेने जे अमराठी खासदार निवडून दिले ते राज्याबाहेरील होते व त्यांनी आपल्या वाट्याचा निधी महाराष्ट्रात न वापरता आपल्या मूळ राज्यात वापरला. म्हणजे महाराष्ट्राच्या वाट्याचे पैसे शिवसेनेने दुसर्या राज्यांच्या घशात घालून महाराष्ट्रद्रोह केला.
In reply to अशुत्या शिवाजी आणि by श्रीगुरुजी
In reply to राज्यसभेच्या प्रत्येक by संदीप डांगे
In reply to http://www.mplads.gov.in by श्रीगुरुजी
In reply to मला कम्युनिस्ट पक्ष त्यांचे by सचु कुळकर्णी
वास्तवात मला तरी तो एकच पक्ष दिसतो जिथे पोलिट ब्यरो निर्णय घेते, घराणेशाहि नाही.एकवेळ घराणेशाही परवडली असे प्रकार कम्युनिस्टांमध्ये असतात त्याचे काय? तसेही घराणेशाहीला इतर लोक नावे ठेवतात तितकी वाईट आहे असे मला वाटत नाही. समजा इंदिरांनंतर राजीव, राजीवनंतर सोनिया आणि आता राहुल यांनाच नेते करायचे असे काँग्रेसवाल्यांनी ठरविले असेल तर तो त्यांचा प्रश्न झाला. काँग्रेसवाल्यांनी कोणाला नेता म्हणून नेमावे हा त्यांचा प्रश्न झाला. त्यांनी कोणाला नेता नेमावे हे इतरांनी सांगायचे काम नाही. असो. कम्युनिस्टांमध्ये घराणेशाही नसली तरी इतर देशांच्या तालावर नाचणे असते-- ते कितीतरी जास्त घातक आहे. सीपीआयवाले रशियाच्या तर सीपीआय(एम) वाले चीनच्या तालावर नाचत आले आहेत. दिल्लीच्या हिताचे काय आहे यापेक्षा मॉस्को किंवा बिजिंगच्या हिताचे काय आहे याला प्राधान्य देणारी ही औलाद आहे. त्यापेक्षा घराणेशाही कितीतरी परवडली.
In reply to राष्ट्रवादी काँग्रेस च्या by संदीप डांगे
In reply to राष्ट्रवादी काँग्रेस च्या by संदीप डांगे
In reply to राष्ट्रवादी काँग्रेस च्या by संदीप डांगे
In reply to कमालच केली म्हणायची by विशुमित
'बजाव पुंगी, हटाव लुंगी' ही घोषणा माहिती आहे का? परप्रांतियांना मारहाणे केल्याची प्रकरणे माहिती आहेत का?स्थानिकांना डावलून खोगीरभरती करण्याविरुद्ध घोषणा दिली तर काय बिघडलं? ही मारहाण अन्यायाविरुद्ध आहे. जेव्हा श्रीलंकी तामिळींवर अन्याय होत होता तेव्हा देशभरातल्या फक्त बाळासाहेबांनीच जाहीर रीत्या लिट्टेस पाठींबा व्यक्त केला होता. अयोध्येतली वादग्रस्त वास्तू पडली तेव्हा त्यांनीच स्वत:हून जबाबदारी स्वीकारली होती. शेपूटघाल्या नव्हता तो माणूस. तसंच मोदींना जेव्हा गुजरात दंगलींच्या खोट्या आरोपांखाली बेजार करून सोडलं होतं तेव्हा आले होते मातोश्रीवर. त्यावेळेस बाळासाहेबांनीच मोदींना धीर दिला होता आणि अडवाणींना स्पष्ट शब्दांत मोदीविस्थापनाचे परिणाम सुनावले होते. हे सगळं विसरलात वाटतं? मोदींप्रमाणे जरा कृतज्ञ राहावं माणसानं. आ.न., -गा.पै.
In reply to बाळासाहेब आणि अन्याय by गामा पैलवान
In reply to बाळासाहेब आणि अन्याय by गामा पैलवान
तसंच मोदींना जेव्हा गुजरात दंगलींच्या खोट्या आरोपांखाली बेजार करून सोडलं होतं तेव्हा आले होते मातोश्रीवर. त्यावेळेस बाळासाहेबांनीच मोदींना धीर दिला होता आणि अडवाणींना स्पष्ट शब्दांत मोदीविस्थापनाचे परिणाम सुनावले होते. हे सगळं विसरलात वाटतं?अजिबात नाही. त्याबद्दल मोदींपासून सगळेच बाळासाहेबांविषयी कृतज्ञताच बाळगून आहेत. पण बाळासाहेबांविषयीची ती सद्भावना आपोआप उधोजीरावांविषयी जाईल अशी अपेक्षा करता येणार नाही. तशीही शिवसेना घराणेशाही मानतच नाही तेव्हा घराणेशाहीतून अशी सद्भावना उधोजीरावांना मिळणार नाही :)
In reply to बाळासाहेब आणि अन्याय by गामा पैलवान
स्थानिकांना डावलून खोगीरभरती करण्याविरुद्ध घोषणा दिली तर काय बिघडलं? ही मारहाण अन्यायाविरुद्ध आहे. जेव्हा श्रीलंकी तामिळींवर अन्याय होत होता तेव्हा देशभरातल्या फक्त बाळासाहेबांनीच जाहीर रीत्या लिट्टेस पाठींबा व्यक्त केला होता. अयोध्येतली वादग्रस्त वास्तू पडली तेव्हा त्यांनीच स्वत:हून जबाबदारी स्वीकारली होती. शेपूटघाल्या नव्हता तो माणूस.जर त्या काळात स्थानिकांना डावलून खोगीरभरती होत होती तर १९९५ ते १९९९ या काळात मुंबईत, राज्यात व केंद्रात युतीचे सरकार असताना स्थानिक कंपन्यात ८०% नोकरभरती स्थानिकांमधून व्हावी असे विधेयक आणून कायदा केला होता क? निदान तसा कायदा करण्याचा प्रयत्न तरी केला होता का? सरकारी जागेवर बेकायदेशीररित्या बसविलेल्या किती झोपडपट्ट्या त्या काळात नष्ट केल्या गेल्या? मुंबईत येणार्या परप्रांतियांना बनावट शिधापत्रिका, बनावट अधिवास दाखला देऊन १५ वर्षे वास्तव्याचे प्रमाणपत्रे देण्यामध्ये मुंबई महापालिकेचे अधिकारी व मुंबईतील सर्वपक्षीय नगरसेवक जबाबदार होते. त्यात अर्थातच शिवसेनेचे नगरसेवक सर्वाधिक होते. महाराष्ट्रातून अनेक अमराठी व्यक्तींना राज्यसभेच्या खासदारकीची तिकिटे देताना यांना खासदारपदासाठी योग्य एकही स्थानिक मराठी व्यक्ती सापडली नाही? विधानसभा व लोकसभेची निवडणुक असली की बेगडी हिंदुत्वाचा झेंडा नाचवायचा आणि महापालिका निवडणुकीच्या वेळी 'इस्लाम खतरेमें है' या हाळीप्रमाणे 'मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा केंद्राचा डाव आहे' असा कांगावा करून मराठी कार्ड खेळायचे हाच यांचा आजवरचा प्रवास. अयोध्येतील वादग्रस्त वास्तूचं म्हणाल तर बाळासाहेबांनी स्वतःहून त्याची जबाबदारी स्वीकारली ही 'मोदींनी प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रूपये भरण्याचे आश्वासन दिले' या विरोधी पक्षांच्या थापेसारखीच एक लोणकढी थाप आहे. "जर हे काम शिवसैनिकांनी केले असेल, तर मला त्यांचा अभिमान वाटेल" असे जरतरच्या भाषेतले ते दिशाभूल करणारे फसवे वाक्य होते. शिवसैनिकांनी ही वास्तू पाडली याची ही कबुली नव्हतीच, उलट ही वास्तू पाडण्याचा व शिवसेनेचा अजिबात संबंध नाही असाच अर्थ त्यातून निघत होता. आपण त्याची जबाबदारी घेत आहोत असा तर त्यातून अजिबात अर्थ निघत नाही. "मी भ्रष्टाचार केला असेल तर भर चौकात मला फासावर चढवा" असे अनेक भ्रष्टाचारी पुढारी जाहीर सभेत सांगतात. त्याच धर्तीवरचे हे वाक्य होते.
ज्या दिवशी शिवसेनेचा पराभव होईल तो दिवस मी स्वतः साजरा करणार आहे.शिवसेनेचा पराभव हे उद्दिष्ट असू शकंत नाही. हवं असल्यास भाजपचा विजय म्हणा. आत्यंतिक नकारात्मक विधानांचा शिवसेनेस फायदा होत आला आहे. मागे २०१२ सालच्या मुंबई महापालिका निवडणुकांच्या वेळेस पृथ्वीराज चव्हाणांनी शिवसेनेस संपवायची भाषा केली होती. अशी कोणी करंत नाही. त्यामुळे उलट शिवसेनेस हट्टाने निवडून द्यायच्या इराद्याने मतदान झालं होतं. तुमचा शिवसेनेवर कितीही राग असला तरी तो व्यक्त होतांना सकारात्मक पद्धतीनेच व्यक्त करावा म्हणून सुचवेन. आ.न., -गा.पै.
In reply to शिवसेनेचा पराभव हे उद्दिष्ट नव्हे by गामा पैलवान
शिवसेनेचा पराभव हे उद्दिष्ट असू शकंत नाही.तुमचे नसेल. पण माझे ते अणि तेच उद्दिष्ट आहे. शिवसेनेला पहिल्या क्रमांकाच्या पक्षापेक्षा एक जागा जरी कमी मिळाली तरी त्यामुळे मला समाधान वाटेल. ते समाधान मिळते का हे अजून ३ दिवसांनी समजेल.
मागे २०१२ सालच्या मुंबई महापालिका निवडणुकांच्या वेळेस पृथ्वीराज चव्हाणांनी शिवसेनेस संपवायची भाषा केली होती. अशी कोणी करंत नाही. त्यामुळे उलट शिवसेनेस हट्टाने निवडून द्यायच्या इराद्याने मतदान झालं होतं.ही भाऊ तोरसेकरांनी पसरवलेली लोणकढी आहे. भाऊंची शिवसेना सोडून इतर सगळ्या विषयांवरील मते मला पटतात. भाऊ शिवसेनेवर लिहितात ते बर्याचदा बायस्ड असते. शिवसेना-भाजप युती होण्यापूर्वी महाराष्ट्रात शिवसेनेपेक्षा भाजपची ताकद जास्त होती हे या आणि अन्य एका चर्चेत अनेकदा आकडेवारीनिशी स्पष्ट झाले आहे. भाऊंनी याविषयी काही लिहिल्याचे ऐकिवात नाही. बहुदा भाऊंनी स्वतः बाळासाहेबांबरोबर काम केले होते त्यामुळे तेव्हाचे ऋणानुबंध भाऊंना इतर विषयांवर ते जसा स्वतंत्र स्टॅन्ड घेतात तसा घेऊ देत नसावेत असा माझा तर्क. एकतर पृथ्वीराज चव्हाण बोलले तसे निवडणुकीच्या धुराळ्यात सगळेच काहीना काही बोलतच असतात. आणि ते एक 'वन-ऑफ' वक्तव्य होते. मोदींविरूध्द सतत १२ वर्षे जसा विखारी प्रचार चालला होता आणि त्यामुळे मोदींना त्याचा फायदा झाला तसे हे वक्तव्य नव्हते. दुसरे म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांनी काहीतरी बोलले म्हणून त्यांना धडा शिकविण्यासाठी लोकांनी मते दिली असे म्हणावे तर याचा अर्थ पृथ्वीराज चव्हाणांना लोक खूपच सिरियसली घेत होते. प्रत्यक्षात तशी परिस्थिती होती असे वाटत नाही. तिसरे म्हणजे शिवसेनेला हट्टाने निवडून द्यायच्या इराद्याने मतदान झाले असेल तर शिवसेनेच्या जागा २००७ पेक्षा कमी का झाल्या? २००७ मध्ये ८३ तर २०१२ मध्ये ७५ जागा शिवसेनेला मिळाल्या होत्या त्याचे काय? किंबहुना १९९७ पासून प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेच्या जागा १०-१२ ने कमीच होत गेल्या आहेत तो क्रम २०१२ मध्येही कायम राहिला.
तुमचा शिवसेनेवर कितीही राग असला तरी तो व्यक्त होतांना सकारात्मक पद्धतीनेच व्यक्त करावा म्हणून सुचवेन.अनाहूत सल्ल्याबद्दल आभारी आहे.
In reply to २ भाबडे प्रश्न होते by विशुमित
पूर्वीची त्यांची शैली खरंच उत्कृष्ट होती आता जागरण गोंधळांतला भोप्या बोलतो तशी वाटलीफडणवीसांची फार भाषणे मी बघितलेली नाहीत पण जी काही भाषणे बघितली आहेत त्यातून त्यांची शैली उत्कृष्ट वगैरे काही कधी वाटली नाही. कदाचित मोदींबरोबर तुलना होत असल्यामुळे असेल. परवा त्यांचे नाशिकमधले भाषण बघितले. ते भाषण अत्यंत रटाळ आणि कंटाळवाणे वाटले. ते अगदी एकाच सुरात बोलत होते. आवाजात चढउतार नाहीत की पॉजचा कालावधी कमीजास्त केला आहे असेही नव्हते. त्यांच्या चेहर्यावरचा थकवा अगदी स्पष्टपणे दिसत होता. फडणवीसांच्या भाषणातील एक गोष्ट जाणवली आणि ती म्हणजे "या ठिकाणी" आणि "त्या ठिकाणी" चा वारेमाप वापर. सुरवातीला ते किती वेळा "या ठिकाणी" आणि "त्या ठिकाणी" बोलत आहेत ते मोजायला सुरवात केली होती. पण नंतर ते इतक्या वेळा झाले की ते मोजायचा प्रयत्न सोडून द्यावा लागला :)
In reply to या ठिकाणी आणि त्या ठिकाणी by गॅरी ट्रुमन
In reply to फडणवीस अतिशय एकसुरी व खूप by श्रीगुरुजी
In reply to एकसुरी नाही वो... वेगळाच ठेका by विशुमित
In reply to ते विधानसभेत असे नाही बोलत . by वरुण मोहिते
In reply to तेच म्हणतोय मी. जाम वैताग आला by विशुमित
In reply to राज ठाकरे by कपिलमुनी
In reply to सगळ्या पक्षांमध्ये फक्त राज ठाकरे सेन्सिबल प्रचार करत आहेत. by सचु कुळकर्णी
In reply to राज ठाकरे by कपिलमुनी
सगळ्या पक्षांमध्ये फक्त राज ठाकरे सेन्सिबल प्रचार करत आहेत. केलेली कामे दाखवून मते मागत आहेत .
राष्ट्रवादी पण केलेली कामे दाखवत आहे.
बाकी, गेल्या २-४ महिन्यात नाशिक, औरंगाबादला भेटी देऊन झाल्या, माफक २-४ दिवस राहणे सुद्धा झाले.
शेवटी पिंचि मनपा या बाकीच्या मनपांपेक्षा रस्ते,पाणी इ. बाबतीत कित्येक पुढे आहे असे जाणवले. इथे राष्ट्रवादीने केलेली कामे पाहता परत राष्ट्रवादी आल्यास आश्चर्य वाटणार नाही. In reply to सगळ्या पक्षांमध्ये फक्त राज by गणामास्तर
In reply to मास्तर... यु मस्ट बी जोकिंग.. by संदीप डांगे
In reply to नाशिक आणि औरंगाबाद मध्ये फरक by गणामास्तर
"मी भ्रष्टाचार केला असेल तर भर चौकात मला फासावर चढवा" असे अनेक भ्रष्टाचारी पुढारी जाहीर सभेत सांगतात. त्याच धर्तीवरचे हे वाक्य होते.अडवाणी ज्पेयी तर तोंडदेखली जबाबदारीही घ्यायला तयार नव्हते. मुखी सेक्युलर जप सुरू झाला होता. २.
विधानसभा व लोकसभेची निवडणुक असली की बेगडी हिंदुत्वाचा झेंडा नाचवायचा आणि महापालिका निवडणुकीच्या वेळी 'इस्लाम खतरेमें है' या हाळीप्रमाणे 'मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा केंद्राचा डाव आहे' असा कांगावा करून मराठी कार्ड खेळायचे हाच यांचा आजवरचा प्रवास.तरीपण मराठी माणू अ का निवडून देतो? तो मूर्ख आहे म्हणूनंच ना? मग हे मूर्खपण संपवायचं कार्य मनावर घ्याच. ३.
मुंबईत येणार्या परप्रांतियांना बनावट शिधापत्रिका, बनावट अधिवास दाखला देऊन १५ वर्षे वास्तव्याचे प्रमाणपत्रे देण्यामध्ये मुंबई महापालिकेचे अधिकारी व मुंबईतील सर्वपक्षीय नगरसेवक जबाबदार होते.माझ्या माहितीप्रमाणे हे काम राज्य शासनाच्या अखत्यरीत येतं. शिवसेनेच्या नगरसेवकांना धुतल्या तांदळाची उपमा देता येत नाही. पण तुमचे आरोप इतरत्रही तितकेच लागू पडतात. आ.न., -गा.पै.
In reply to श्रीगुरुजी, by गामा पैलवान
अडवाणी ज्पेयी तर तोंडदेखली जबाबदारीही घ्यायला तयार नव्हते. मुखी सेक्युलर जप सुरू झाला होता.जबाबदारी कोणीच घेतली नव्हती (अगदी बाळासाहेबांनी देखील).
तरीपण मराठी माणू अ का निवडून देतो? तो मूर्ख आहे म्हणूनंच ना? मग हे मूर्खपण संपवायचं कार्य मनावर घ्याच.सेनेची स्वतःची मते फार थोडी होती. युतीमुळे सेनेला मते मिळायची. युतीत ७०% हून अधिक जागा सेना लढवित असल्याने जास्त नगरसेवक सेनेचे असायचे. हा मूर्खपणा संपायला सप्टेंबर २०१४ मध्येच सुरूवात झाली आहे. २०१७ ची निवडणुक हा मध्य आहे आणि २०१९ मध्ये मूर्खपणा कायमचा संपेल. बादवे, शिवसेनेवर खालील लेख रोचक आहे. http://www.rediff.com/news/column/is-shiv-sena-changing-the-goalposts-again/20170221.htm त्यातील काही परिच्छेद - The Shiv Sena became popular in Mumbai, but never went beyond the city and neighbouring Thane, as Maharashtrians in the rest of the state did not see outsiders as a threat.
By the early 1980s the Sena had become a marginal political player even in Mumbai, though its fire power was intact.So it needed to reinvent itself. By this time, Thackeray, who had started nursing pan-Maharashtra ambitions, sensed popular Hindu polarisation in the country in the wake of the Ramjanmabhoomi agitation and the Shah Bano case and decided to champion the cause of Hindutva.
So the Shiv Sena abandoned the Maharashtra for Maharashtrians slogan and adopted Hindutva.But in Gujarat, backing Patel means another rupture with the BJP.
It means conclusively replacing the Marathi Manoos idea by a pro-Patidar, pro-Maratha appeal.
माझ्या माहितीप्रमाणे हे काम राज्य शासनाच्या अखत्यरीत येतं. शिवसेनेच्या नगरसेवकांना धुतल्या तांदळाची उपमा देता येत नाही. पण तुमचे आरोप इतरत्रही तितकेच लागू पडतात.ही कामे करून देणारे, त्यासाठी शिफारस करणारे नगरसेवकच असतात. महापालिकेकडे अतिक्रमण हटविण्याचे अधिकार आहेत. परप्रांतियांच्या अनधिकृत बांधकामांवर मुंबई महापालिकेने फारशी कारवाई केल्याचे ऐकिवात नाही. जिथे जिथे स्थानिक आयुक्त हे काम करू पाहतात तिथे तिथे इतर पक्षांबरोबर शिवसेनेचे नगरसेवक सुद्धा आडवे येतात (उदा. अरूण भाटिय, तुकाराम मुंडे, चंद्रशेखर इ.)
In reply to एक्झिट पोल by गॅरी ट्रुमन
अवांतर आहे.. पण सातार्याचा