मराठी फिल्म इंडस्ट्री मध्ये एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी का आहे ?

बार्नी's picture
बार्नी in काथ्याकूट
20 Nov 2016 - 11:11 am
गाभा: 

माझ्या एका मित्राला तू मराठी फिल्म्स का बघत नाही असे विचारले असता , त्याने ही इंडस्ट्री " of the brahmins , by the brahmins , for the brahmins " आहे असे धक्कादायक उत्तर दिले . त्याच्याशी बराच वाद घातल्यानंतर त्याचे काही मुद्दे खालील होते जे मला मान्य करावे ,
उदा .
१) मराठी फिल्म इंडस्ट्री तील बहुतेक कलाकार ब्राह्मण आहेत .

२) मराठी टीव्ही मालिका मधली characters ची नावेही एकाच विशिष्ट वर्गाची असतात . तसेच बोलली जाणारी भाषाही एका विशिष्ट वर्गाची असते , विदर्भ किंवा मराठवाडा येथील भाषा क्वचित असते .

सैराट सारख्या ग्रामीण सिनेमा ला मिळालेले यश हेच सांगत नाही काय ? की इंडस्ट्री तील लोक आपण संपूर्ण महाराष्ट्राला represent करतो ह्या भ्रमात आहेत ?

प्रतिक्रिया

आदूबाळ's picture

20 Nov 2016 - 11:16 am | आदूबाळ

....तडडडडडड - ढयांव.

(पॉपकॉर्न मिळण्याची कॅशलेस सोय इथे आहे.)

नाखु's picture

21 Nov 2016 - 8:31 am | नाखु

घाऊक नोंदणी आगाऊ करावी लागेल काय? नोंदणी आगाऊ आहे आम्ही किंवा आपण नाही.तसेच अन्य भुईमूग शेंगा,मक्याची कणसे मिळतील काय?

एक्च्च धाग्यात चार पाच धाग्याचा दारूगोळा असल्याने ही चौकशी करीत आहे,लोभ आहेच तो वाढावा ही अपेक्षा.

अखिल मिपा हिकमती,अल्पमती,कुरापती,उचापती,चायपत्ती धागे निवारण आणि मिपा स्वच्छता अभियान याच्या "एक पाऊल (मिपा) स्वच्छतेकडे" या सदस्यांचे संयुक्त निवेदन.

पैसा's picture

20 Nov 2016 - 11:21 am | पैसा

डिसगस्टिंग

बार्नी's picture

20 Nov 2016 - 11:27 am | बार्नी

इंग्रजी विशेषणाऐवजी पटणारे मुद्दे मांडले असते तर आवडले असते. असो.

असल्या जातीयवादी विचाराला मराठीत उत्तर किंवा शिवी देणेसुद्धा मी मराठीचा अपमान समजते. नावावरून जात ओळखण्याची कला तुम्ही पूर्णत्वाला नेलेली दिसते. शक्य झाल्यास त्याचे क्लास काढा. मराठी सिनेमाची १९१३ पासून आतापर्यंत झालेली वाटचाल कशी झाली याचा अभ्यास करा. विकिपांडित्यसुद्धा पुरे. त्यानंतर काय त्या पिंका टाका.

याला तुम्ही काही उत्तर देताय का, काय उत्तर देताय याची मला फिकीर नाही. कारण असले बिग्रेडी धागे मी संपादक नसल्याने पुन्हा उघडून बघायची मला सक्ती नाही.

उपयोजक's picture

20 Nov 2016 - 7:31 pm | उपयोजक

तुमच्या समाजाची मक्तेदारी कशात आहे?

वेल्लाभट's picture

21 Nov 2016 - 12:06 pm | वेल्लाभट

का? इंग्रजीबद्दलही अशी काही मतं आहेत का तुमची? बाय द ह्यांव फॉर द ह्यांव ऑफ द ह्यांव?

ग्रो अप. एवढंच म्हणेन. इंग्रजीत.

थोड्या दिवसांनी तरी काढायचा ना धागा, सद्ध्या नोटांबद्दल ढोल ताशे वाजतायत ना.

हे बहुतांशी खरे असले तरी बाय द टिम्ब टिम्ब फॉर द टिम्ब टिम्ब फ्रॉम द टिम्ब टिम्ब असेही नाही. सरधोपट गल्लाभरू सिनेमा काढणारे फार फार तर म्हणता येतील. अनेक सो कॉल्ड ब्राह्मण वगैरे कलाकारांनीही ग्रामीण महाराष्ट्र आणि अगदी दलित, आदिवासी, किंवा अजून कुठले हवे ते समाजघटक घ्या, त्यांच्या आयुष्यावर किंवा त्यांच्या विषयांवर देखील चित्रपट काढले आहेत. आणि ब्राह्मणेतर कलाकारांचीही संख्या अलीकडे वाढते आहे. नाहीच असे नाहीत. सर्वच कसे छान छान आहे असे मीही म्हणणार नाही. पण मराठी चित्रपटसृष्टी केवळ अमुक एका जातीच्या परिघापुरतीच संकुचित झालेली आहे असे नाही.

गिरीश कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, डॉ. मोहन आगाशे, विक्रम गोखले, अमोल पालेकर, सुलभा देशपांडे, ज्योती सुभाष, इत्यादी आणि असे अनेक इतर कलाकार अगदी सहजपणे ब्राह्मणेतर व्यक्तिरेखा देखील तितक्याच ताकदीने रंगवताना, त्यांना न्याय देताना दिसतात, अशा चित्रपटात, नाटकांत भूमिका करतात, निर्मिती-दिग्दर्शन करतात. तेव्हा किमान समांतर चित्रपट प्रवाहाबद्दलतरी हा आक्षेप मान्य होण्यासारखा नाही. (मला बऱ्याच कलाकारांची जात-बीत माहीत नाहीये, तेव्हा चूभूदेघे.)

आता इतर जातींतूनही चित्रपट-नाटकांत काम करण्याला कुटुंबियांचा पाठिंबा मिळू लागला आहे. हा माझ्या मते सर्वात मोठा फॅक्टर आहे. पुरुषोत्तम करंडकासारख्या नाट्यस्पर्धांची व्याप्ती पुणे-मुंबईच्या बाहेरही वाढायला हवी. असे बरेच उपाय सुचवता येतील.

यशोधरा's picture

20 Nov 2016 - 11:50 am | यशोधरा

आजतागायत कोणताही सिनेमा पाहताना समोरच्या वा पडद्यामागच्या कलाकाराची जात हा विषयही मनात आला नाही/ करावासा वाटला नाही. विषय/ कथा वगैरे हेच महत्वाचे वाटले. टीव्ही मालिका क्वचित पाहिल्यात पण मालगुडी डेज, टिपरे ह्या मालिका पाहताना कधी जात हा विषय डोक्यात आला नाही, हेही खरेच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Nov 2016 - 11:57 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रादेशिक अस्मिता, पैसा, जात, भाषा, रंग, चेहरा, व्यक्तित्व हे आणि असे बरेच फ्याक्टर सर्वच ठिकाणी आपलं अस्तित्व दाखवत आहेत, असे वाटते. म्हणुन आपल्या मित्राच्या मुद्यात अजिबात तथ्यच नाही, असे म्हणायचे आणि समजण्याचे कारण नाही, असे वाटते.

बाकी, चालू द्या.

-दिलीप बिरुटे

हतोळकरांचा प्रसाद's picture

20 Nov 2016 - 12:00 pm | हतोळकरांचा प्रसाद

१) मराठी फिल्म इंडस्ट्री तील बहुतेक कलाकार ब्राह्मण आहेत .

याला आधार?

मराठी टीव्ही मालिका मधली characters ची नावेही एकाच विशिष्ट वर्गाची असतात . तसेच बोलली जाणारी भाषाही एका विशिष्ट वर्गाची असते , विदर्भ किंवा मराठवाडा येथील भाषा क्वचित असते .

याला आधार? आणि तुम्ही किंवा तुमचा तो मित्र म्हणत असलेली भाषा ही काही कोणत्या विशिष्ट वर्गाची भाषा नसून त्याला प्रमाणLमराठी भाषा किंवा त्याअर्थी पुस्तकी मराठी असे म्हणतात. बाकी विशिष्ट वर्गाची विरुद्ध विदर्भ किंवा मराठवाडा (जे भूभाग दर्शवतात) यांची तुलना चुकीची वाटली नाही का? विदर्भ किंवा मराठवाड्यातील तो विशेष वर्ग तिथली बोलीभाषा बोलतो कि त्या विशेष वर्गाची महाराष्ट्रभर एक वेगळी भाषा आहे?

सैराट सारख्या ग्रामीण सिनेमा ला मिळालेले यश हेच सांगत नाही काय ?/blockquote> सैराटचं यश हे मुख्यत्वे हे त्यातील प्रत्येकाला स्वतःची वाटणारी प्रेमकहाणी हे होते असे मला वाटते. बाकी सैराट हा पहिला ग्रामीण सिनेमा आहे असे आपले मत तर नाही ना? मला वाटतं मराठी चित्रपटाचा इतिहास बघितला तर अगदी कुठल्याही कालखंडात ग्रामीण भाषेतले चित्रपट सर्वाधिक आहेत.

बाकी तुम्हाला तुमच्या मित्राबरोबरच्या चर्चेत जातीयवादाचा वास वगैरे आला नाही का?

प्रश्न केवळ जातीचा नसून region चाही आहे , माझे विदर्भातील कित्येक मित्र मराठी ऐवजी हिंदी चित्रपट बघणे पसंत करतात कारण " अबे त्यायची मराठी आपल्याले समजत नाही " असे आहे . मराठी सिनेमाचा चाहता म्हणून मी ही कित्येकदा विचार करतो की ह्यांना पुण्या-मुंबईबाहेरच्या लोकांच्या कथा सांगू वाटत नाही का , आपणास जातीचा प्रश्न पडला नसेल , परंतु कितीतरी लोकांना असे वाटते आणि तसे वाटण्यास तशी कारणेही आहेत.
" Explaining discrimination to an upper caste is like explaining colours to a blind person , they will never understand it " असे कुठेतरी वाचले होते . प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद

महासंग्राम's picture

21 Nov 2016 - 10:51 am | महासंग्राम

माझे विदर्भातील कित्येक मित्र मराठी ऐवजी हिंदी चित्रपट बघणे पसंत करतात कारण " अबे त्यायची मराठी आपल्याले समजत नाही " असे आहे

अबे मंग तुये दोस्त शाळा शिकेल नास्तिन, नैतर दुसऱ्या देशातले घुसखोर आस्तिन. कारन ईदरभातला पोट्टा किती बी कुचीन असू दे, त्याले मराठी समजत नाई असं होतंच नाई. तवा काय बी फेकत जाऊन विदर्भाचा अपमान करू नई.

नन्दादीप's picture

21 Nov 2016 - 11:23 am | नन्दादीप

+११११११११११

अगोचर's picture

22 Nov 2016 - 7:46 am | अगोचर

नागपुरी/ वैदर्भिय / ? मराठिचा लहेजा आवडला म्हणुन "निशाणी डावा अंगठा" अनकदा बघितला. त्याची मराठी तुम्हाला कशी वाटली‌? नेहेमिचेच यशस्वी कलाकार आहेत त्याच्यात.

कैलासवासी सोन्याबापु's picture

22 Nov 2016 - 8:50 am | कैलासवासी सोन्याबापु

बाकी सगळे ठीक आहे पण निशाणी डावा अंगठा मध्ये भारत गणेशपुरे अन थोडीफार मक्या वगळता कोणालाच वऱ्हाडी जमलेली नाहीये, अशोकमामा तर त्या बाबतीत चक्क चाचपडत असलेले जाणवले होते. सगळ्यात जास्त डोक्यात गेलेली पात्रं म्हणजे संजय नार्वेकर न रंगवलेले मुस्लिम पात्र अन भरत जाधव न रंगवलेला तोताराम , वऱ्हाडातले मुसलमान हैद्राबादी लहज्यात हिंदी बोलताना दाखवून हसावे का रडावे कळत नाही. वऱ्हाडी म्हणजे फक्त वाक्याला १० वेळा अबे काबे लावून बोलणे नसते, ही एक पुस्ती जोडतो. धन्यवाद.

नाखु's picture

22 Nov 2016 - 8:56 am | नाखु

पात्र खबरदार मधील वर्हाडीच धाटणीचे होते का आण्णा चिंबोरी ते सांगा बाप्पू.

या सिनेमांनी भाषेची तोडमोड करून एकही प्रादेशीक भाषा मूळ स्वरूपात लहेजासह आणि उच्चारासह दाखवली नाही अपवाद अभ्यासू सिनेमा निवडुंग्,जैत रे जैत.

कैलासवासी सोन्याबापु's picture

22 Nov 2016 - 10:07 am | कैलासवासी सोन्याबापु

नाही, ते पात्रही वऱ्हाडी नीट बोलत नव्हते, पण आपटेंची मेहनत जाणवत होती. बाकी सहमत, अप्रमाणित बोली प्रादेशिक भाषा हेच खरे सौंदर्यस्थान आहे भाषेचे.

(नाखु चाचांना ऐकू जाईल असे स्वगत, वाऱ्यावरची वरात मध्ये अरुण नलावडे ह्यांनी सीताहरण जसे ग्रामीण बाजात मांडले होते, किंवा बॅट्यानें जसे ट्रॉयचे युद्ध बोली टाईप भाषेत लिहिले होते तशी एक पौराणिक कथा इन वऱ्हाडी माला लिहावी काय? दशावतारी अन झाडीबोलीची महान पौराणिक कथा बोलीत मांडायची कला वऱ्हाडीत आणावी काय? बोलो चाचा बोलो)

नाखु's picture

22 Nov 2016 - 10:35 am | नाखु

और पूछ पूछ. बिन्धास लिवा, मिपा आपलाच असा.

खरोखरच्या बाल्यांना बोलताना मागच्या कंपनीत पाहून नाटकातले/सिरियलमधले कोकणी बोलणे "नाटकी/ओढून ताणून" लगेच जाणवत असे.

हतोळकरांचा प्रसाद's picture

22 Nov 2016 - 11:04 am | हतोळकरांचा प्रसाद

लिव्हाच बाप्पु!

बाकी, अरुण नलावडेंनी छानच केलंय पण खुद्द पुलंचा साक्षीचा धंदा आणि रामायण लैच भारी!

खेडूत's picture

22 Nov 2016 - 11:16 am | खेडूत

+१११
लिहाच बाप्पू!

पुंबा's picture

22 Nov 2016 - 11:53 am | पुंबा

बापू, अशोक सराफ वऱ्हाडी बोलीमध्ये गंडलेत पण त्यांनी चित्रपटात जाम धमाल आणलीय. लै शकलीचं गाठोडं असणारा बंडू भावडा राठोड त्यांनी खतरनाक उभा केलाय. हा चित्रपटच अफलातून जमून आलाय. साधे साधे प्रसंग पण इतक्या बारकाईने मांडलेत कि बस्स. भारत गणेशपुरे, निर्मिती सावन्त, मक्या, मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, विनय आपटे, अगदी छोट्या रोल मध्ये असणारे ज्योती सुभाष, विशाखा सुभेदार, मंगेश देसाई सगळेच अक्षरश: सुटलेत. कादंबरीचं माध्यमांतर या प्रकारातील हा उच्च कोटीतील प्रकार आहे. माझ्या मते निशाणी डावा अंगठा हा गेल्या 10 वर्षातल्या सर्वश्रेष्ठ मराठी चित्रपटात नक्कीच येईल. संदीप खरेची गीतं सुद्धा सुंदर जमून आलियेत. अस्सल वऱ्हाडी शब्द असणारी गाणी आहेत ती. सहा मेल सहा फिमेल, आता कामच झालं ना, बे एके बे एक से बढकर एक गाणी.

आदूबाळ's picture

22 Nov 2016 - 11:57 am | आदूबाळ

+1

कादंबरीसुद्धा मस्त आहे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

22 Nov 2016 - 12:03 pm | कैलासवासी सोन्याबापु

प्रश्नच नाही! अशोक मामा आहेत ते, जान आणतात भूमिकेतून, अशोक मामा गंडले आहेत (ह्या चित्रपटात) असे म्हणायचे कारण म्हणजे ते खूप काटेकोरपणे वऱ्हाडी बोलायचा यत्न करत होते पण मधेच हात टेकल्यासारखे फॉर्म सोडून देत असत म्हणून जाणवले मला अन मी नमूद केले, त्यांच्या जावयाच्या अन सहकाऱ्याच्या भूमिकेत ऋषिकेश जोशीने सुद्धा कमाल केली आहे हे ही नमूद करतो, बाकी अबासाहेबांशी सहमत आहे कादंबरी अफलातुन आहे, मुळात ग्रामीण बाजात लिहायला ग्रामीण भाषेची पकड प्रचंड लागते ती उत्रादकरांत आहेच :)

कादंबरी वाचायची आहे पण पिक्चर पाहिला आहे त्यामुळे तीच सगळी पात्र डोक्यात येतील असे वाटते म्हणून वाचली नाही. हॅरी पॉटरचा एकही पिक्चर न बघण्याचं कारण अजून 4 पुस्तकं वाचायची राहिलीयेत हे आहे. :P

शलभ's picture

22 Nov 2016 - 1:43 pm | शलभ

+११११११११११

चिनार's picture

23 Nov 2016 - 12:12 pm | चिनार

सहमत बापू ..
मला विचाराल तर अशी ही बनवाबनवी,गंमत-जम्मत, हम पांच ह्यात दिसलेला उत्स्फूर्त अभिनय आजकाल अशोक सराफांच्या भूमिकेत दिसत नाही. हल्ली ते फार सावधगिरीने अभिनय करतात असं वाटते.

हतोळकरांचा प्रसाद's picture

23 Nov 2016 - 3:08 pm | हतोळकरांचा प्रसाद

अलीकडच्यापैकी एक डाव धोबीपछाड किंवा एक उनाड दिवस मध्ये जुना फॉर्म दिसलाय म्हणा!

त्याच काय आहे.. कि, ब्राह्मण सगळ्याच क्षेत्रात पुढे असतात.. त्याला कोण काय करणार?? असो.. ! कितीही कुणीही बडबड केली तरी जे सत्य आहे, ते ढळढळीत आहे..! पुन्हा असो.

बर्‍याच वर्षानी मिपा वर आले, आणि आल्या आल्या असले धागे समोर पडले.. ! अशा धाग्याना एन्टर्टेन केल जातय याच आश्चर्य वाटतं, आणि दु:खही!

(व्यथित) प्राजु

रेवती's picture

20 Nov 2016 - 6:15 pm | रेवती

हाय प्राजु,
हा धागा अप्रकाशित होण्याआधी तुझ्या येण्याने आनंद झाल्याचे नमूद करून घेते.
मग काय म्हणतेय एंटरटेनमेंट इंडस्ट्री? तू आता रुळलीस बरं का तिथे!
आम्हाला व्हिजिट केल्याबद्दल फार्फार धन्यवाद.

सस्नेह's picture

21 Nov 2016 - 11:21 am | सस्नेह

:)

एन्टर्टेन्मेंट इंडस्ट्री मस्त! रुळते आहे मी.
चतुरंग नी मेसेज पाठवला आणि ती आज्ञा शिरसावंद्य समजुन आले मी. शेवटी मैत्रीला जागायला हवच ना! :)
पण मिपा ब्राह्मण द्वेष्टे झाले आहे हे माहिती नव्ह्ते.
येत राहिनच. कारण उत्तर द्यायलाच लागेल अशा धाग्यांना. मूक मोर्चे काढले म्हणजे आपण अतिशहाणे झालो असा समज कोणीही करुन घेऊ नये.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

21 Nov 2016 - 9:29 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मूक नै ओ. त्यांच्या मते मुक आहे ना ते?

शब्दबम्बाळ's picture

22 Nov 2016 - 9:38 pm | शब्दबम्बाळ

नेहमीप्रमाणे "जात" असलेल्या धाग्यावर प्रतिसादांचे शतक झाले आहे! यावेळी प्रतिसाद देणार नव्हतो पण "इंडस्ट्री " मधल्या व्यक्तीची अशी प्रतिक्रिया पाहून राहावले नाही.
हा धागा आला कि तुम्हाला लगेच मिपा ब्राम्हण द्वेष्टे झाल्याचा साक्षात्कार झालाय! अगदी प्रतिसाद द्यायला परत आलात वाटत! बर काही माहितीपूर्ण प्रतिसाद दिलात का, तर नाही... आम्हाला फक्त राग काढायचा असतो!

"मूक मोर्चे काढले म्हणजे आपण अतिशहाणे झालो असा समज कोणीही करुन घेऊ नये."
या वाक्यावरून आपल्याला काय म्हणायचे आहे आणि आपली देखील विचारसरणी काय आहे हे स्पष्ट दिसून येतंय! दुसऱ्याला बोलायच्या आधी स्वतःकडे देखील पहा...
"इंडस्ट्री " मधल्या लोकांचे विचार पण असेच असतील तर मग, यु जस्ट प्रुव्हड हिज पॉईंट! (हे असे इंग्रजीत लिहिलं कि वजन येत म्हणे वाक्याला!)

आपण बऱ्याच दिवसांनी आलात म्हणताय, या काळात मिपावर मराठा मोर्चा वर डझनभर धागे येऊन गेलेत हजारो प्रतिसाद दिले गेलेत. तेव्हा मिपा मराठा द्वेष्टे होते.
जैन समाजावर धागा येऊन गेला त्यात प्रतिसादामध्ये मिपा जैन द्वेष्टे वाटेल.
मुस्लिम समाजाचं तर काय बोलायचं सध्या एक ताजा धागा आहे तिकडे कळेलच ते!
आरक्षणाचा धागा आला कि मिपा दलित द्वेष्टे वाटेल.

थोडक्यात काय, सर्व जाती/धर्माना समानच वागणूक मिळतिये कि इथे!
त्यामुळे फक्त, ब्राम्हण किती भारी (हे तुम्हीच लिहिलेल्या वाक्यातील लिहितोय, मला उपरोध वगैरे काही करायचा नाही) हे लिहिण्यासाठी येऊन काय फायदा आधीच्या कित्येक धाग्यांवर ते बऱ्याच लोकांनी सांगितलंय! :)

संदीप डांगे's picture

22 Nov 2016 - 10:30 pm | संदीप डांगे

कचकून समर्थन! ज्यांचा ब्राह्मणांवर घसरल्याने तिळपापड होतो, त्यांना असं काही मोरच्यांबद्दल बोलून आपणही तेच करतोय ह्याची जाण नाही...

बाकी मिपावर सर्वांची भादरली तर चालते पण काहींना सूट हवीय? 'आम्ही जातीयवादी नाही पण आमच्या जातीबद्दल बोलाल ता खबरदार: असं म्हणणाऱ्यांची किव येते...

-

बाळ सप्रे's picture

23 Nov 2016 - 10:59 am | बाळ सप्रे

+१००००००

विशुमित's picture

24 Nov 2016 - 10:42 am | विशुमित

करकचून समर्थन..!!

टवाळ कार्टा's picture

24 Nov 2016 - 2:01 pm | टवाळ कार्टा

आम्ही जातीयवादी नाही पण आमच्या जातीबद्दल बोलाल ता खबरदार

या वाक्याची एक गंमत आहे...समजा अ आणि ब असे दोघे आहेत त्यातला अ हा ब ला "आम्ही जातीयवादी नाही पण आमच्या जातीबद्दल बोलाल ता खबरदार" असे म्हणाला तर त्यावरुन खालील शक्यता निघतात

१ - ब हा अ ला काहीतरी जातीवरून म्हणाला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून अ ने हे वाक्य वापरले...

२ - अ कधीही ब ला जातीवरून वेगळी वागणूक देत नाही पण ब ने भविष्यात अ ला जातीवरून काही बोलू नये यासाठी अ ने हे वाक्य वापरले...(थोडेफार भारताच्या अणुबाँब धोरणासारखे)...इथे ब भविष्यात कधी असे वागू शकतो अशी शक्यता आहे

३ - अ कधीही ब ला जातीवरून वेगळी वागणूक देत नाही पण ब ने भविष्यात अ ला जातीवरून काही बोलू नये यासाठी अ ने हे वाक्य वापरले...(थोडेफार भारताच्या अणुबाँब धोरणासारखे)...इथे ब भविष्यात कधीही असे वागणार नाही अशी शक्यता आहे

४ - अ कधीही ब ला जातीवरून वेगळी वागणूक देत नाही पण ब ने भविष्यात अ ला जातीवरून काही बोलू नये यासाठी अ ने हे वाक्य वापरले...(थोडेफार भारताच्या अणुबाँब धोरणासारखे)...इथे ब भविष्यात कधी असे वागेल की नाही ते आत्ताच सांगू शकत नाही

यातल्या नेमक्या कोणत्या शक्यतांसाठी किव करावी?

संदीप डांगे's picture

24 Nov 2016 - 2:30 pm | संदीप डांगे

'मी अमूक एका जातीचा नाही' हे मनात पक्कं ठरवून घेतलं की अशा कोणत्या शक्यता उद्भवतात..?

हतोळकरांचा प्रसाद's picture

24 Nov 2016 - 2:51 pm | हतोळकरांचा प्रसाद

एक शंका : मी माझी संस्कृती म्हणून वैयक्तिकरित्या जात जपत असेल तर मी जातीयवादी ठरतो का?

संदीप डांगे's picture

24 Nov 2016 - 2:59 pm | संदीप डांगे

हो.

जातीयवादाची तुमची व्याख्या काय आहे?

संदीप डांगे's picture

24 Nov 2016 - 3:17 pm | संदीप डांगे

जो जात मानतो तो जातीयवादी ही माझी व्याख्या.

बाळ सप्रे's picture

25 Nov 2016 - 11:49 am | बाळ सप्रे

+१०००

हतोळकरांचा प्रसाद's picture

24 Nov 2016 - 3:44 pm | हतोळकरांचा प्रसाद

ओके. ऑक्सफोर्डनुसार जातीयवाद (पक्षी: कास्टिजम) याचा अर्थ - १. जात व्यवस्थेशी संलग्न असणे २. दुसऱ्या जातीतील कोणा बद्दलही पूर्वग्रहदूषित किंवा द्वेषयुक्त मत ठेवणे. अर्थात हे झालं अर्थाअर्थी किंवा अक्षरशः. आपण सर्वच जाणतो आणि गृहीत धरतो कि "जातीयवाद" म्हणजे वरीलपैकी दुसरं. तुमच्या म्हणण्यानुसार मी वरीलपैकी नं. १ मुळे जातीयवादी असेनहि पण त्यामुळे कोणाला काय त्रास व्हायला हवा? किंबहुना त्यावर कुणाचा काय आक्षेप असायला हवा?

संदीप डांगे's picture

24 Nov 2016 - 3:49 pm | संदीप डांगे

पहिल्यामुळे दुसर्‍या शक्यता उद्भवतात. त्यामुळे पहिलेछूट पहिलाच मुद्दा ठेवला नाही तर नंतरच काही होणार नाही.

अवांतरः जात व्यवस्थेशी संलग्न असल्याने काय फायदा होतो?

टवाळ कार्टा's picture

24 Nov 2016 - 7:17 pm | टवाळ कार्टा

अगदी सहमत

हतोळकरांचा प्रसाद's picture

24 Nov 2016 - 11:09 pm | हतोळकरांचा प्रसाद

असहमत! मूळ प्रश्नाला बाजूला ठेवून काढलेली उत्तरे टिकत नाहीत. बासरी आवडत नाही म्हणून बांबूचं झाडंच लावायचं नाही हे पटत नाही. चांगली-वाईट बासरी वाजवणारे असायचेच. मी चांगली बासरी ऐकणं पसंद करेन. पण तुमच्या मताचा आदर करतो, आजूबाजूला दिसणाऱ्या परिस्थितीवरून जातीबद्द्ल हे मत बनवलं जातं हे उघड आहे.

संदीप डांगे's picture

25 Nov 2016 - 8:47 am | संदीप डांगे

बासरीचे उदाहरण गंडलय..

बरं, जातीव्यवस्थेशी संलग्न असण्याचे फायदे???

हतोळकरांचा प्रसाद's picture

25 Nov 2016 - 11:43 am | हतोळकरांचा प्रसाद

तुम्ही माझी जातीबद्दलची अपेक्षा आणि त्याचा परीघ याबद्दलचा खालचा प्रतिसाद वाचावा! त्यानंतर त्यात फार काही फायदे तोटे शोधण्याचं शिल्लक रहात नाही आणि ती एक नैसर्गिक प्रवृत्ती उरते.

बाकी बासरीचं म्हणाल तर ज्याचं त्याचं मत! समाजातून जातपात संपूर्ण संपावी हा दुर्दम्य आशावाद मीहि बाळगून आहे, पण फरक एवढाच आहे कि तुम्ही ऑक्सफर्डमधलं नं. १ (जात) काढून टाका म्हणजे नं. २ (जातीयवाद) रहाणार नाही असे म्हणत आहात आणि मी नं. २ (भारतात सर्वसाधारणपणे अभिप्रेत असलेला जातीयवाद) काढून टाका म्हणजे नं. १ हा अत्यंत कमी महत्वाचं किंवा वैयक्तिक मुद्दा उरेल असं म्हणत आहे. आता यापैकी काय लवकर साध्य होऊ शकतं यावर चर्चा संभवू शकते. स्वातंत्रोत्तर आलेख बघितला तर (आणि मुख्यत्वे आरक्षण) तर समाज नं. १ पासून दूर जाताना दिसत नाही परंतु तेच आंतर्जातीय विवाहांचं प्रमाण बघितलं तर नं. २ कमी होण्याची किमान आशा वाटते.

तुमच्या वैयक्तिक आयुष्यात जात पाळणे, तिच्याशी संलग्न असणे, जातबांधवांशी निष्ठा बाळगणे या गोष्टी दिसायला जरी harmlesss असल्या तरी, त्या तुमचा attitude ठरवतात. आपण आणि ते हा भेद नकळत होतोच. सामाजिक, राजकीय, आर्थिक सर्व विचारांच्या बाबतीत हा attitude मोठा फॅक्टर ठरतो. त्यामुळे व्यक्तीश: मला जातीशी सम्पूर्ण फारकत घ्यावी असे वाटते कारण जात स्वातंत्र्यावर बंधने आणते. परंपरा जसे पाककला, हस्तकला वगैरे जपाव्या ते पण जातीची लेबले न लावता. त्यामुळे, वैयक्तिक आयुष्यात जात पाळावी कि नाही हे जरी व्यक्तीवर अवलंबुन असले तरी त्याला जात हि अजिबातच महत्वाची गोष्ट वाटू नये इथवर जाणे हे आपले समाज म्हणून ध्येय हवे.

संदीप डांगे's picture

24 Nov 2016 - 4:04 pm | संदीप डांगे

सहमत. परंपरा, संस्कृतींना जातीची लेबले लावण्याची गरज नाही. काही जाती अगदी पोटजातीही सेम असल्या तरी त्यांच्यातल्या रितिभाती, खानपान बर्‍याच प्रमानात वेगळं असतं. एकाच जातीत कट्टर मांसाहारी ते कट्टर शाकाहारी असेही पाहायला मिलतात. एकाच जातीच्या दोनप्रकारच्या भौगोलिक व आजूबाजूच्या सामाजिक फरकानेही सांस्कृतिक बदल घडून येतात.

जात कशाला सांभाळायची याचे कारण कोणी देईल काय? पटण्यासारखे असेल तर मीही (हार्मलेस पद्धतीने) जात पाळायला लागेन मग..

जात कशाला सांभाळायची याचे कारण कोणी देईल काय? पटण्यासारखे असेल तर मीही (हार्मलेस पद्धतीने) जात पाळायला लागेन मग..

"जात पाळणे = जातीयवाद" असे असताना हार्मलेस पद्धतीने का होईना पण जात पाळण्याचा मार्ग पत्करणे म्हणजे तुम्हाला मान्य असलेल्या विचारसरणीशी प्रतारणा आहे.

जात न पाळण्याचा वैयक्तीक पातळीवर प्रयत्न करणे जास्ती सोपे आहे.

अर्थात हा प्रयत्न वैयक्तीक पातळीवरच राहणार. आणखी लोकं जमवून असा प्रयत्न केला की "अजात" चळवळीसारखी अवस्था होईल. :(

संदीप डांगे's picture

24 Nov 2016 - 4:41 pm | संदीप डांगे

सरळ प्रश्न होता, जात कशाला सांभाळायची याचे कारण देता येईल काय,

मी काय करेन न करेन ते मुद्दा नंतर घेऊ. आधी जात चळवळ करुन नक्की काय फायदा होतो ते बघूयात. :)

जात कशाला सांभाळायची याचे कारण देता येईल काय

कल्पना नाही.

आधी जात चळवळ करुन नक्की काय फायदा होतो ते बघूयात. :)

जात चळवळ करून फायदा होईल अशी अजुन अपेक्षा आहे..?

मोदक's picture

24 Nov 2016 - 3:00 pm | मोदक

"हातोळकर" हम्म्म

जातीयवादीच की, गांधीजींना तुमीच मारले की राव.

*******

असे लॉजिक असते, काय बोलणार यावर?

हतोळकरांचा प्रसाद's picture

24 Nov 2016 - 3:52 pm | हतोळकरांचा प्रसाद

सहमत! खरंच लॉजिक कळत नाही. शिवाय काही मुद्देसूद चर्चा करावी म्हटली कि लगेच 'खबरदार'वतोय असं मत! खरंच काय बोलणार?

संदीप डांगे's picture

24 Nov 2016 - 3:58 pm | संदीप डांगे

तुम्ही काय बोलताय, कशाबद्दल बोलताय? कोण खबरदारवतोय इथे तुम्हाला??

हतोळकरांचा प्रसाद's picture

24 Nov 2016 - 11:17 pm | हतोळकरांचा प्रसाद

तुमचा वरचा प्रतिसाद आणि माझा वरचा प्रतिसाद परत एकदा वाचाल का? मी मला कोणी खबरदारवतंय असं नाही म्हणालो. गांधीवधाला अमुक अमुक जात कारणीभूत होती हे मी अगदी अलीकडे सुद्धा काही चांगल्या सुशिक्षित लोकांकडून ऐकलं आहे. हा माझा काही लोकांबाबत अनुभव असल्याने मोदक यांच्या वरचं वाक्य "असे लॉजिक असते" याला सहमती दर्शवली. गांधीवधाशी लावलं जाणारा जातीय लॉजिक कळंत नाही असा माझा मुद्दा आहे.

संदीप डांगे's picture

25 Nov 2016 - 8:54 am | संदीप डांगे

ते गांधीहत्येला तुम्ही 'गांधीवध' जे सारखं म्हणत आहात त्यामुळे असेल कदाचित... :)

हतोळकरांचा प्रसाद's picture

25 Nov 2016 - 10:22 am | हतोळकरांचा प्रसाद

अच्छा हे लॉजिक आहे तर! बराय! लॉजिक गंडलंय राव पण! पण असो ज्याचं त्याचं वैयक्तिक मत!

बाकी तुम्ही हे लॉजिक मानताय काय? नाही म्हणजे स्पष्ट असलेलं बरं!

संदीप डांगे's picture

25 Nov 2016 - 10:26 am | संदीप डांगे

मला विचाराल तर कोण्या जातीने कोणाची हत्या (तुमच्या भाषेत वध) केली असे मी मानत नाही,

हत्या ह्या मनोवृत्तीतून होतात व मनोवृत्ती कोणा जातीची मक्तेदारी नाही, तसे असते तर महात्मा गांधी हत्येनंतर किंवा इंदिरा गांधी हत्येनंतर जे झालं ते झालं नसतं.

हतोळकरांचा प्रसाद's picture

25 Nov 2016 - 11:26 am | हतोळकरांचा प्रसाद

सहमत! झालं तर मग! हेच न मानणाऱ्या लोकांचं लॉजिक कळत नाही असा वरचा प्रतिसाद होता! ती हत्या होती का वध होता हा अगदी वेगळा विषय होऊ शकतो. तसं याबाबतीत मी अजूनही निष्कर्षाला आलो नाही आणि हे नक्की मानतो कि कायद्याच्या दृष्टिकोनातून ती हत्या होती. तसाही मी जहालमतवाद (पक्षी : एक्स्ट्रिमिजम) फारसा मानत नाही त्यामुळे यावर आपल्यात वेगळी चर्चा संभवू शकते.

संदीप डांगे's picture

25 Nov 2016 - 11:56 am | संदीप डांगे

जहाल, मवाळ, हत्या, वध ह्याचा प्रश्न नाही आहे हो. मनोवृत्तीचा प्रश्न आहे.

एका उदाहरणातून आपण जातव्यवस्थेशी संलग्न असल्यावर काय भूमिका घेतो हे लक्षात येईल.

- मी ब्राह्मण आहे. चार नातेवाईकांमधे बसलो असतांना एकाने आपला रिवर्स-अ‍ॅट्रोसिटी चा अनुभव सांगितला की अमुक एकाने त्याला "बामन्या, गांधींचा हत्यारा, आमच्यावर लै अत्याचार केले" असे काहीतरी अपमानास्पद बोलले आहे. आता तुम्ही त्याला 'हा त्याच्या स्वतःच्या घाणेरड्या मनोवृत्तीचा प्रश्न आहे, ह्यात तो कोणत्या जातीच्या आहे त्याचा काही संबंध नाही' हे सांगू शकाल काय? असे सांगितले तर इतर चार 'संस्कृती म्हणून जात जपणारी' मंडळी तुमच्या मताला दुजोरा देतात की असहमती व्यक्त करतात? -

वरिल उदाहरण कोणत्याही जातीच्या संदर्भात घेतले तरी चालेल.

हतोळकरांचा प्रसाद's picture

25 Nov 2016 - 6:28 pm | हतोळकरांचा प्रसाद

उदाहरण व्यवस्थित समजलं नाही (पण तरीही गंडलंय असं म्हणणार नाही) पण तरीही - १. होय मी त्याच्या वैयक्तिक मनोवृत्तीचा प्रश्न आहे असं सांगेन (आणि समजा मी तसं नाही सांगू शकलो तर भविष्यात तसं सांगण्याचं धाडस जमवण्याच्या दृष्टीने विचार करेन, पण मी तसं सांगू नाही शकलो तर याचा अर्थ मी ती जातच तसली आहे असं सांगेन असं नाही. ) २. इतर चार खरंच "संस्कृती म्हणून जात जपणारी" मंडळी असतील तर दुजोरा देतील, नाहीतर असहमती दर्शवतील.

या "अमुक एकांची" आणि इतर चार मधल्या "नाहीतर" वाल्यांची संख्या कमी होत जाणे म्हणजे जातीयवाद संपणे असे मी मानतो.

संदीप डांगे's picture

26 Nov 2016 - 10:54 am | संदीप डांगे

उदाहरण गंडलेलं असू शकतं, माझं काय म्हणणं नाही त्याबद्दल!

पण स्वजातीय लोकांच्या बैठकीत असा विरुद्ध पवित्रा सहज शक्य होत नाही हे सर्वांना अनुभवाने ठाऊक असेल, (तुमच्याच प्रतिसादात तुम्ही जर तर ची भाषा वापरली आहे की! पण तुम्ही प्रामाणिक आहात हेही त्यावरून दिसतंय)

स्वजातीय लोकांना गोळा करून जातीयवादाबद्दल प्रबोधन करणे विरोधाभास आहे. सर्वच जातींच्या संघटना असतात त्या जेव्हा भेटतात, तेव्हा एकमेकां साह्य करू हा एक उद्देश असतो, दुसरा, एकी कायम ठेवायला इतर जाती त्यांच्यावर कशा अन्याय करतात, आपल्यावर जातीमुळे कसा अन्याय होतो, याची उजळणी करतात. आपली जात इतरांपेक्षा कशी वेगळी आहे (श्रेष्ठ वा कनिष्ठ चा संबंध नाही), आपल्याच जातीचे महापुरुष कसे ग्रेट होते ह्याच्या चर्चा व्याख्याने होतात, जातीतल्या पुढारलेल्या व्यक्तींकडून इतरांना प्रगती करण्यासाठी मार्गदर्शन होते (हे सरसकट नाही,असे मार्गदर्शन जातिनिरपेक्षही होते पण तो विषय वेगळा), लग्नसंबंधासाठी वधुवरसंमेलने होतात, (काही लोक म्हणतात की आपल्याच जातीत कोणाची इच्छा असेल लग्न करायचं तर त्यात काय समस्या? याबद्दल आधी एका धाग्यावर चर्चा झालीये),

जात हा एक वैशिष्ट्य दर्शवणारा समूह आहे त्याला जपणे म्हणजे भेदाभेद जपणेच होय. खाद्यसंस्कृती, पोशाख, इत्यादीसाठी जात जपतो म्हणणे जन्माधारित विशेषत्व जपणे होय. अनेक परंपरा आज शुद्ध स्वरूपात नाहीत, अनेक घरात तीन पिढ्यांत काहींना काही बदलतं. आज एकाच जातीच्या चार विरुद्ध ठिकाणच्या लोकांमध्ये चार वेगवेगळ्या संस्कृती दिसून येतात, अशावेळेस आपलं 'अमुक तमुक' म्हणून विशेष लेबल सांभाळण्याशिवाय जातीचा उपयोग तो काय? मनुष्याला इतरांपेक्षा वेगळं असावं वाटतं, आपला एक खास कंपू असावा असं वाटतं हे नैसर्गिक आहे. ती भूक भागवायला जातीसारखं नैसर्गिक काही नाही. (काही लोकांनी इथे आपण भेदाभेद पाळत नाही, श्रेष्ठ कनिष्ठ मानत नाही असे म्हटले आहे, असे लोकही आहेतच, नाहीच असे सरसकट म्हणत नाहीये.)

आपल्या जातीसंबंधी कोणी काही बोललं कि ते वैयक्तिक नसलं तरी अंगावर घेऊन लोक प्रतिकाराला उभे राहतात तेव्हा कोणती संकृती, पोशाख, चालीरीती इत्यादींचे रक्षण करायला ते उभे असतात? ते फक्त 'जातीय अस्मिता' नावाच्या पोकळ भावनेचे समर्थन करत असतात.

(प्रत्येक नियमाला अपवाद असतात, वरील विधाने ते लक्षात घेऊनच केलेली आहेत)

विशुमित's picture

26 Nov 2016 - 11:18 am | विशुमित

<<<<<आपल्या जातीसंबंधी कोणी काही बोललं कि ते वैयक्तिक नसलं तरी अंगावर घेऊन लोक प्रतिकाराला उभे राहतात तेव्हा कोणती संकृती, पोशाख, चालीरीती इत्यादींचे रक्षण करायला ते उभे असतात? ते फक्त 'जातीय अस्मिता' नावाच्या पोकळ भावनेचे समर्थन करत असतात.>>>>

-- अगदी असंच घडतंय आणि यात कोणतेच जात समूह अपवाद नाहीत.

अवांतर: मी जरी मुक मोर्चा समर्थक असलो तरी हे समर्थन फक्त एका लोकसंख्येने मोठ्या समूहाला शैक्षणिक आणि नोकरी मध्ये आरक्षण मिळावे यासाठी आहे. हेतू थोडा स्वार्थी असला तरी इतर ज्यांना आरक्षण नाही ते यातून निभावून पुढे जातील हा विश्वास आहे. त्यामुळे सकल समाजाचे कल्याण होईल. आरक्षणातून मराठा समाजाचा किती फायदा होईल, हे अगदी नोटबंदी मुळे किती फायदा होईल या सारखे आहे, असे मला वाटते.

विशुमित भाई, तुमचा उद्देश गरीब मराठा तरुणांना संधी नाकारली जाऊ नये असा आहे हे खरंय, मात्र खूप चांगले गुण असूनपण चांगल्या कॉलेजला प्रवेश मिळत नाही या पेक्षा फी भरायला पैसा नसल्याने शिक्षण घेऊ न शकणाऱ्यांची संख्या जास्त आहे. आता आरक्षण मिळणं कायद्याने तर दुरापास्तच आहे, तर समाजातीलच धनिकांकडून, धुरिणांकडून आपल्या समाजातील गरीब मुलांना मदत होते का? असे ट्रस्ट वगैरे मोठ्या प्रमाणात का उभे राहत नाहीत. अर्थात असतील देखील पण मला माहित नसतील. कारण सरकारकडे मागून जेवढं मिळू शकेल त्याच्यापेक्षा किती तरी पटीने मोठे काम समाज एकत्र येऊन करू शकेल.

समाजातील धनिक आणि धुरिणांकडून स्वतःच्याच समाजातील गरीब मुलांना मदत करायची म्हंटलं की पुन्हा त्यांच्या वर जातीवादाची टीका होणार.

श्रीगुरुजी's picture

26 Nov 2016 - 2:47 pm | श्रीगुरुजी

अवांतर: मी जरी मुक मोर्चा समर्थक असलो तरी हे समर्थन फक्त एका लोकसंख्येने मोठ्या समूहाला शैक्षणिक आणि नोकरी मध्ये आरक्षण मिळावे यासाठी आहे.

सर्व सत्तास्थाने, सहकार क्षेत्र, पोलिस खाते, शेती इ. क्षेत्रे अनेक शतके या समूहाच्याच हातात असताना त्यांना जातीवर आधारीत राखीव जागा देणे अजिबात समर्थनीय नाही.

हेतू थोडा स्वार्थी असला तरी इतर ज्यांना आरक्षण नाही ते यातून निभावून पुढे जातील हा विश्वास आहे. त्यामुळे सकल समाजाचे कल्याण होईल.

ते कसे निभावून जातील? त्यांचे कसे कल्याण होईल? १०० पानांच्या पंगतीतील ५२ पानांवर बसायला यांना परवानगी नाही. उरलेल्या ४८ पानांवर सर्व जातीजमातींचे लोक बसू शकतात. आता या ४८ पानातील २१ पाने काढून एका प्रस्थापित समाजासाठी राखीव ठेवल्यावर उर्वरीत २७ पानांमधून यांचे कसे कल्याण होईल?

आरक्षणातून मराठा समाजाचा किती फायदा होईल, हे अगदी नोटबंदी मुळे किती फायदा होईल या सारखे आहे, असे मला वाटते.

नोटबंदीचे फायदे व तोटे सर्वांसाठीच समान आहेत. राखीव जागातून फक्त मराठ्यांचाच फायदा होईल. इतरांचा, विशेषतः ज्यांना कोठेच राखीव जागा नाहीत, त्यांचा तोटा होणार हे नक्की.

विशुमित's picture

26 Nov 2016 - 3:07 pm | विशुमित

<<<<सर्व सत्तास्थाने, सहकार क्षेत्र, पोलिस खाते, शेती इ. क्षेत्रे अनेक शतके या समूहाच्याच हातात असताना त्यांना जातीवर आधारीत राखीव जागा देणे अजिबात समर्थनीय नाही.>>>>

-पोलिस खाते?? अनेक शतके???

<<<<ते कसे निभावून जातील? त्यांचे कसे कल्याण होईल? १०० पानांच्या पंगतीतील ५२ पानांवर बसायला यांना परवानगी नाही. उरलेल्या ४८ पानांवर सर्व जातीजमातींचे लोक बसू शकतात. आता या ४८ पानातील २१ पाने काढून एका प्रस्थापित समाजासाठी राखीव ठेवल्यावर उर्वरीत २७ पानांमधून यांचे कसे कल्याण होईल?>>>
-- मराठ्यांना जर आरक्षण मिळालंच तर फक्त ब्राह्मण समाज आरक्षणावाचून राहील आणि हे तुमचेच विधान आहे या समाजाविषयी-
http://www.misalpav.com/comment/887772#comment-887772

<<<नोटबंदीचे फायदे व तोटे सर्वांसाठीच समान आहेत. राखीव जागातून फक्त मराठ्यांचाच फायदा होईल. इतरांचा, विशेषतः ज्यांना कोठेच राखीव जागा नाहीत, त्यांचा तोटा होणार हे नक्की.
-- मी फक्त मराठा आरक्षणाचा फायदा मराठा समाजाला होईल का नाही या बद्दल बोलत होतो.

श्रीगुरुजी's picture

26 Nov 2016 - 3:23 pm | श्रीगुरुजी

-पोलिस खाते?? अनेक शतके???

ब्रिटिशांच्या आगमनापासून पोलिस खाते आहेच (किमान १५०+ वर्षे). त्यापूर्वी राजेराजवाड्यांच्या काळात तत्कालीन पोलिस म्हणजे सैन्य ज्यात मराठेच बहुसंख्येने होते.

-- मराठ्यांना जर आरक्षण मिळालंच तर फक्त ब्राह्मण समाज आरक्षणावाचून राहील आणि हे तुमचेच विधान आहे या समाजाविषयी-

बरोबर ना. त्यांना ज्या थोड्याश्या संधी उपलब्ध आहेत त्यावर सुद्धा घाला घालण्याची तयारी सुरू आहे आणि त्यातून त्यांचे कसे कल्याण होईल हाच माझा प्रश्न आहे.

-- मी फक्त मराठा आरक्षणाचा फायदा मराठा समाजाला होईल का नाही या बद्दल बोलत होतो.

मराठ्यांना राखीव जागा दिल्यावर "सकल समाजाचे" कल्याण होईल असा तुमचा दावा होता.

<<<<ब्रिटिशांच्या आगमनापासून पोलिस खाते आहेच (किमान १५०+ वर्षे). त्यापूर्वी राजेराजवाड्यांच्या काळात तत्कालीन पोलिस म्हणजे सैन्य ज्यात मराठेच बहुसंख्येने होते.>>>
-- हवेत तिर मारताय असे वाटते. विदा असेल तर द्या.

<<<बरोबर ना. त्यांना ज्या थोड्याश्या संधी उपलब्ध आहेत त्यावर सुद्धा घाला घालण्याची तयारी सुरू आहे आणि त्यातून त्यांचे कसे कल्याण होईल हाच माझा प्रश्न आहे.>>>
-- त्यातून ही ब्राह्मण समाज फिनिक्स पक्ष्या प्रमाणे झेप घेईल हा विश्वास.

<<<< मराठ्यांना राखीव जागा दिल्यावर "सकल समाजाचे" कल्याण होईल असा तुमचा दावा होता.>>>

--कृपया "सकल मराठा सामाज्याचे" असे वाचावे.

अशा लोकांशी मुद्देसूद चर्चा होवू शकत नाही. ते पढवलेल्या विचारसरणीनुसार विचार करतात आणि आपल्या खांद्यावर डोके नावाचा अवयव देवाने दिला आहे हे नेमक्या क्षणी विसरतात.

(प्रतिसादातील भावना मला हवी तशी पोहोचेल की नाही असे वाटले होते. समजुन घेतल्याबद्दल धन्यवाद.)

कैलासवासी सोन्याबापु's picture

24 Nov 2016 - 4:31 pm | कैलासवासी सोन्याबापु

बरोबर अन काही लोक देवाने खांद्यावरच्या अवयवाला ठराविक वजन दिले आहे हे विसरून सगळा ताण त्या एका मुंडक्याला अन मगजालाच देतात नाही का मोदकभाऊ.

बाकी वैयक्तिक आयुष्यात 'हातोळकर ह्म्म्म' पेक्षा 'कंबळेंच्या पोरासोबत हिंडतो का तुमचा मुलगा हंम्मममम्म' हे वडलांना ऐकवलेलेच जास्त ऐकले आहे. मुद्दा काय व्यक्ती तितक्या प्रकृती! जातीवाद वाईटच, प्रॉब्लेम हा आहे की जात सोडली तर आपले कसे होईल ह्या भीतीतून तथाकथित मुंडके वापरणारे अन तथाकथित मुंडके न वापरणारे सगळेच पिढ्यांपिढ्या तोच गु चिवडत बसतात!असो

प्रॉब्लेम हा आहे की जात सोडली तर आपले कसे होईल ह्या भीतीतून

मला वाटते भितीपेक्षाही "पर्याय नाही म्हणून" लोकं जातीला जास्त चिकटून बसतात. अर्थात गावांत सरंजामशाही व्यवस्था असेल तर भिती शिवाय कोणताही पर्यायच राहणार नाही पण जर जातीव्यवस्थेला सक्षम पर्याय मिळाला तर पहिल्या फटक्यात ३०% ते ४०% लोकं तो पर्याय निवडतील.

शब्दबम्बाळ's picture

24 Nov 2016 - 4:52 pm | शब्दबम्बाळ

गम्मतच आहे कि राव!
इथे होणारी चर्चा " कारण उत्तर द्यायलाच लागेल अशा धाग्यांना. मूक मोर्चे काढले म्हणजे आपण अतिशहाणे झालो असा समज कोणीही करुन घेऊ नये." या वाक्यावर झालीये!
कोण कोणाला कसे बोलतंय बघा जरा! पट्टी काढलीत डोळ्यावरून तर दिसू शकेल कदाचित, यात मुद्देसूद चर्चा करण्याचा कुठला मुद्दा दिसतोय??

मोदक यांनी वरच्या प्रतिसादात जे केलं ते व्हिक्टीमयझेशन चे उत्तम उदाहरण आहे! इथे कुठेही काहीही उल्लेख नसताना स्वतःच गांधीहत्येच्या मुद्दा काढायचा, स्वतःच सहानुभूती घ्यायची वा रे वा!! आणि परत तुम्ही त्यालाच सहमती दर्शवून बोलणार कि "खरंच लॉजिक कळत नाही" या सगळ्या गोष्टीच तरी काही लॉजिक लागतंय का तुम्हाला?

हीच गोष्ट एका मुस्लिम व्यक्तीने केली तर तो मात्र टीकेस पात्र होतो.. काय बोलणार...

हतोळकरांवर आरोप करून मी सहानुभूती कशी घेतली ते सांगा जरा.

त्यांना उदाहरण देताना फक्त सध्या जे काही चालले आहे त्या पद्धतीने उदाहरण दिले बस्स.

शब्दबम्बाळ's picture

24 Nov 2016 - 6:41 pm | शब्दबम्बाळ

अहो सहानुभूती "तुम्ही" घेतली असे नाही!
चर्चेत रेफरन्स नसताना स्वतःच व्हिक्टीमयझेशन करायचे आणि स्वतःच सहानुभूती 'निर्माण' करून द्यायची. असे काहीसे म्हणायचे आहे. नक्की कसे लिहू कळेना पण कदाचित आता समजले असेल तुम्हाला..

रेफरन्स नसताना स्वतःच व्हिक्टीमयझेशन करायचे आणि स्वतःच सहानुभूती 'निर्माण' करून द्यायची असे काहीसे म्हणायचे आहे. नक्की कसे लिहू कळेना

मुक मोर्चा सारखे..?

शब्दबम्बाळ's picture

24 Nov 2016 - 6:53 pm | शब्दबम्बाळ

हाहा! पेडगावलाच जायचंय तर ठीक आहे. चालायचंच...

हा हा.. हिंट दिली फक्त. :))

निरीक्षण चुकीचे असले तर सांगा.

हतोळकरांचा प्रसाद's picture

24 Nov 2016 - 11:36 pm | हतोळकरांचा प्रसाद

णि परत तुम्ही त्यालाच सहमती दर्शवून बोलणार कि "खरंच लॉजिक कळत नाही" या सगळ्या गोष्टीच तरी काही लॉजिक लागतंय का तुम्हाला?

माझा वरचा प्रतिसाद वाचावा.

यात मुद्देसूद चर्चा करण्याचा कुठला मुद्दा दिसतोय??

सगळे प्रतिसाद सरमिसळ करून हा निष्कर्ष नको. मी प्रत्येकाने आपापली संस्कृती/परंपरा म्हणून जात जोपासली तर का आक्षेप असावा असा मुद्दा मांडलाय. यात काही गृहीतके स्पष्ट नाहीयेत म्हणून सांगतो - १. मी जातीयवादाच्या (ऑक्सफोर्डवरील नं. २) पूर्णपणे विरोधात आहे आणि मी स्वतःही तो भेद मानत नाही. २. मी जात हि माझ्यासारख्याच चालीरीती/प्रथा/परंपरा/संस्कृती/पद्धती लोकांचा गट एवढ्याच आणि एवढ्याचकरीता मानतो. ३. याव्यतिरिक्त मी जात हि आरक्षण/लग्न/शाळा/व्यवसाय/मदत करताना यापैकीही कुठेही वापरण्याच्या विरोधात आहे.

यात गैर काय ते सांगावे!

साहेब..'s picture

23 Nov 2016 - 11:47 am | साहेब..

+१

किसन शिंदे's picture

23 Nov 2016 - 9:43 am | किसन शिंदे

कारण उत्तर द्यायलाच लागेल अशा धाग्यांना. मूक मोर्चे काढले म्हणजे आपण अतिशहाणे झालो असा समज कोणीही करुन घेऊ नये.

दाताखाली काचकन खडा यावा तसं वाटलं प्राजुतैचा प्रतिसाद वाचताना.

लालगरूड's picture

23 Nov 2016 - 11:45 am | लालगरूड

नीट जरा

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

20 Nov 2016 - 12:33 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

काय रे हे बार्न्या? पूर्वी हिंदी चित्रपटसृष्टीत बहुताण्शी नायक पंजाबी हिंदू वा पंजाबी मुस्लिम का असतात असा ह्यांना प्रश्न पडायचा.नायकांमध्ये एकही कर्हाडे वा देशस्थ ब्राम्हण का नाही असेही हे विचारायचे. हिंदी चित्रपटांमध्येही कथानकांत शर्मा,मल्होत्रा,भाटियाच का? वेलणकर्,पाटील्,राणे का नाही असे वाटायचे. काहीना हा पंजाबी लोकांनी केलेला कट वाटायचा तर काहींना हा मुस्लिमांनी हिंदूंविरुद्ध केलेला कट(कारण बहुसंख्य लोक लाहोर व तिकडचे) वाटायचा.

संदीप डांगे's picture

20 Nov 2016 - 12:43 pm | संदीप डांगे

१. मराठी चित्रपट सृष्टीला ब्राह्मणांनी वेठीस धरले आहे, मक्तेदारी आहे असे म्हणणे विपर्यास व अनावश्यक भलतीकडे ताणणे आहे.
२. कोणतीही इन्डस्ट्री ही तिच्या ग्राहकांवर अवलंबून असते. जैसा देस वैसा भेस...

पूर्वी पासून म्हणजे नाटकं फॉर्मात असल्याच्या काळापासून प्रेक्षक कोणत्या वर्गाचे जास्त होते, गरिब असले तरी घरी पुस्तकं विकत आणून वाचणारी, अनेक गोष्टींचे व्यासंग करणारी माणसं कोणत्या वर्गाची जास्त होती हे पाहिले पाहिजे. प्रेक्षक ज्या वर्गाचे जास्त त्या वर्गाला आवडेल असेच सादरिकरण होणार. मराठी इन्डस्ट्री पैसा कमावण्यात मागे राहण्याचे कारण मर्यादित प्रेक्षक वर्ग होता. रवी जाधव यांच्या चित्रपटांपासून हे चित्र बदलण्यास सुरुवात झाली. टाइमपास, बालकपालक हे रुढार्थाने ब्राह्मण कॅरेक्टर दाखवणारे चित्रपट असले तरी त्यातल्या भावना-समस्या-प्रसंग युनिवर्सल होते, दुनियादारी सारखे चित्रपट, त्यांची हाताळणी मास ला अपील होणारी होती, सैराटने जे जग दाखवले ते पुस्तकी ग्रामीण जगापेक्षा वेगळे व सत्याचे स्पष्ट दर्शन होते,

इथे हॉलिवुडी चित्रपटांच उदाहरण देतो. साधारणपणे, (सरसकट नाही) 'जगात अमेरिकनच कसे भारी, हुशार, जिनियस, मॅनकाइन्ड ला वाचवणारे' हे दाखवतात, कारण प्रेक्षक ९९ टक्के अमेरिकन आहेत. अमेरिकन लोकसंख्येत ७७% व्हाईट आहेत त्यामुळे अमेरिकन चित्रपटांमधे त्यांच्या अस्मिता अहंकार, रुतून बसलेले श्रेष्ठतेचे संस्कार कुरवाळणे जास्त होते हे माझे वैयक्तिक निरिक्षण आहे. (12 Years a Slave ह्या चित्रपटात व्हाईट व्यक्तिरेखा मेन प्रोटगनिस्टची मदत करतांना दाखवून व्हाईट गिल्ट घालवण्याचा केलेला प्रयत्न) मग हॉलिवुड हे ऑफ द व्हाईट, बाय द व्हाईट, फॉर द व्हाईट. असेच आहे असे म्हटले जाते का? नाही.

पापी पेटका सवाल है. धंद्यापुढे कुठल्याही अस्मिता, जातीपाती, धर्म, देश नसतात. धंद्याचा एकच धर्म, ग्राहक.

ब्राह्मण जास्त दिसत असले तरी त्यामागे योग्य अशी नैसर्गिक, सामाजिक कारणे आहेत. कोणी हे जाणून बूजून केले असे म्हणणे व त्यावर विश्वास ठेवणे द्वेषमूलक आहे. भलते सलते गैरसमज बाळगण्यापेक्षा स्वतः हे चित्र बदलण्यास सकारात्मकतेने काय होऊ शकते हे बघावे. आजकाल पूर्वीसारखे कठीण काहीही राहिले नाही. ज्याच्यात कर्तृत्व असेल ते गाजवायला युट्यूब आहे. ज्यांना आपल्यावर अन्याय होतोय असं वाटत असेल त्यांनी रडत राहण्यापेक्षा काम करावे.

या उपरही आपल्याला घुसायलाच मिळत नाही असं वाटणार्‍यांनी रॉबर्ट रॉडरिग्ज या येडपटाबद्दल व त्याच्या पहिल्या चित्रपटाबद्दल वाचून प्रेरणा घ्यावी.

https://en.wikipedia.org/wiki/Robert_Rodriguez

कोणाला समजावताय? ही गीता का वाचताय?

संदीप डांगे's picture

20 Nov 2016 - 7:25 pm | संदीप डांगे

=)) चान्स मिळाला की कुंपणावरच्या डोलकर्‍यांना कुंपणावर ठेवू शकलो तरी खूप झाले....

मार्मिक गोडसे's picture

20 Nov 2016 - 12:44 pm | मार्मिक गोडसे

दादा कोंडकेंनी सांगितलेला किस्सा, ते एकदा त्यांच्या गावी गेले असता चावडीवरील एका वयस्कर व्यक्तीने त्यांना विचारले, तुझे सगळे सिनेमे जोरात चालतात हे ठिक आहे , परंतू इतकी वर्ष मुंबईत जातोस अजून नोकरीपाण्याची सोय होउन स्थिरस्थावर झालास की नाही? सिनेसृष्टीकडे असा दृष्टीकोन बाळगणार्‍या वर्गाकडून काय अपेक्षा बाळगावी?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

20 Nov 2016 - 12:56 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ओह असा सगळा प्रकार आहे तर.

बास ठरलं. एका चित्रपटात अमुक टक्के ओपन, अमुक टक्के ओ.बी.सी. आणि अमुक टक्के एस.सी./एस.टी. भुमिका असायलाचं हव्यात असा कायदा घ्यायचा का पास करुन?

संदीप डांगे's picture

20 Nov 2016 - 1:01 pm | संदीप डांगे

चला कॅप्टन, तुमच्या नेतरुत्वात मोर्च्या काडू...

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

20 Nov 2016 - 1:06 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

नको. तुमच्यासारखे अनुभवी लोकचं ठिक नेतरुत्व करायला. हम किस झाड के गिरे हुए पत्ते की देठ पे बैठी मुंगी?

संदीप डांगे's picture

20 Nov 2016 - 1:09 pm | संदीप डांगे

मुंग्यांवर अन्याव झाला तर मुंग्यांनीच मोर्च्या काडायला न्हवं...?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

20 Nov 2016 - 1:12 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

जेंन्ना अन्यावं झाला तेन्नी मोर्चा काडावा. आपण म्हराठी पिच्चरला लैचं वर्षांसुन फाट्यावर मारल्येलं असल्याने आपल्यावर काय अन्याव झाला ते काय कळ्ळबी न्हाय बगा. बाकी आपन ३.५% चं असल्याने अन्यावं झाला तरी गपगुमा सहन क्रायचा अस्तो. नायतर ५५ कोटीचे बळी जात्यात बगा.

संदीप डांगे's picture

20 Nov 2016 - 1:26 pm | संदीप डांगे

=))

भाते's picture

20 Nov 2016 - 2:01 pm | भाते

या क्षेत्रात काम केलेल्या सगळया लोकांची (फक्त पडद्यावरचे कलाकार नाही) आत्मचरित्र वाचले किंवा मुलाखती पाहिल्या तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे त्यांना सुरुवातीच्या काळात करावा लागलेला संघर्ष आणि घरच्यांची भक्कम साथ. संघर्ष कोणालाही चुकलेला नाही. मनोरंजन क्षेत्रात अजुनतरी सुदैवाने आरक्षण लागू झालेले नाही. मराठी किंवा इतर भाषिक प्रेक्षक इतक्या कोत्या मनाचा नक्कीच नाही आहे कि तो एका ठराविक जातीधर्माच्या माणसाला उचलुन धरेल. कोणीही इथे येऊन काम करू शकतो. ज्याचे पारडे जड (सर्वच बाबतीत) तोच इथे टिकतो आणि बाकीचे बाहेर फेकले जातात. जे लोक इथे टिकुन आहेत त्यांनी स्वतःला सिध्द केले आहे. या क्षेत्रात ब्राह्मण जास्त आहेत हे सत्य आहे. बाकीचे इथे टिकत नाहीत आणि त्यामुळे फक्त ब्राह्मण उरतात त्यात त्यांचा काय दोष?

श्रीगुरुजी's picture

20 Nov 2016 - 2:09 pm | श्रीगुरुजी

१) मराठी फिल्म इंडस्ट्री तील बहुतेक कलाकार ब्राह्मण आहेत .

चुकीचे निष्कर्ष आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलाकार (लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, भरत जाधव, महेश कोठारे, सिद्धार्थ जाधव, विजय कदम, विजय चव्हाण, संगीतकार अजय-अतुल, पद्मा चव्हाण, रंजना, उषा चव्हाण, उषा नाईक, निळू फुले, दादा कोंडके ... ही यादी फार मोठी आहे) ब्राह्मण नाहीत.

२) मराठी टीव्ही मालिका मधली characters ची नावेही एकाच विशिष्ट वर्गाची असतात . तसेच बोलली जाणारी भाषाही एका विशिष्ट वर्गाची असते , विदर्भ किंवा मराठवाडा येथील भाषा क्वचित असते .

ब्राह्मणांना सरकारी नोकरी, पोलिस खाते, राजकारण, शैक्षणिक क्षेत्र, प्रशासन इ. क्षेत्रात राखीव जागांमुळे मर्यादीत संधी आहे. शेतीतून व खेड्यातून बरेचसे ब्राह्मण हद्दपार झाले आहेत. ज्या क्षेत्रात जातीमुळे संधीला मर्यादा नाहीत तिथे ब्राह्मण जायचा प्रयत्न करतात. त्यामुळेच खाजगी कंपन्या, दूरदर्शन मालिका, वृत्तसंस्था इ. क्षेत्रात ब्राह्मण जायचा प्रयत्न करतात. त्यामुळे या क्षेत्रात त्यांची संख्या जास्त दिसत असावी.

विशुमित's picture

21 Nov 2016 - 12:03 pm | विशुमित

प्रचंड सहमत...!!

ब्राह्मण असतील जास्त(तसा विदा नाही) पण, ब्राह्मण आहेत म्हणून लोक पिक्चर बघायला जात नाहीत, किंवा बहुजन लोक ब्राम्हण आहेत म्हणून जात नाहीत असं आजिबात होत नाही. शिवाय बहुजन समाजातील कलाकारांना संधी नाकारली जाते असं तर खचितच होत नाही. सैराट धुमधडाक्यात चालला आणि त्या स्वप्नील जोशी नावाच्या उकडलेल्या बटाट्याला लोकांनी प्रत्येक पिक्चर पाडून स्मॅश केलंय यावरूनच बघा. भारतीय चित्रपटसृष्टी बाकी काही असो, सेक्युलर आहे. उगाच धर्म, जात बघितली जात नाही इथे.

स्वप्नील जोशी नावाचा उकडलेला बटाटा - ह. ह. पु. वा. :)

शब्दबम्बाळ's picture

22 Nov 2016 - 9:53 pm | शब्दबम्बाळ

समजा जर चित्रपट क्षेत्रात एखाद्या समाजाचे जास्त लोक आहेत असे मान्य जरी केले तरी लोक ते चित्रपट स्वीकारत आहेत याचा अर्थ लोकांना काहीच प्रॉब्लेम नाहीये! मराठी चित्रपट अधिकाधिक व्यवसाय करत आहे पण त्याचा गाभा "कथानक" आहे.
म्हणूनच कदाचित आपल्याकडे "सुपरस्टार" वगैरे पद्धत नाहीये. (मराठी शारुख आहे म्हणा! :P )

च्यामारी हौसेने हॉलिवूड चित्रपट पाहतील, तेव्हा त्यांची जात/धर्म काय हे बघून मग बघायला जातील काय?!

आताच्या इंटरनेटच्या युगात मार्केट खुले आहे. जर इच्छा आहे आणि कला पण आहे तर हल्ली शेकड्याने माध्यम उपलब्ध आहेत ती दाखवायला!
उगीच काहीतरी विचार करायचा...

आदूबाळ's picture

22 Nov 2016 - 9:56 pm | आदूबाळ

मराठी शारुख

लोल! ह्यो कोने?

परवाच खफवर "मराठी बच्चन परिवार" असल्याची बहुमूल्य माहिती मिळाली. असंच काहीतरी आहे का?

शब्दबम्बाळ's picture

22 Nov 2016 - 10:08 pm | शब्दबम्बाळ

तोच कि! गरिबांचा टोनी स्टार्क, चॉकलेट हिरो, लव्हर बॉय, म्हागुरुंचा मानसपुत्र आणि नुकत्याच कळालेल्या नावानुसार उकडलेला बटाटा!!
वळखा बगु!!

बाकी, हे "मराठी बच्चन परिवार" काय असतंय?!!

आदूबाळ's picture

22 Nov 2016 - 10:52 pm | आदूबाळ

ओह! सोपनील होय.

मराठी बच्चन परिवार = डॅमिट, डॅमिटभार्या, डॅमिटसुत* आणि डॅमिटस्नुषा.

---
शब्दश्रेयः कप्तान चिमण

कैलासवासी सोन्याबापु's picture

22 Nov 2016 - 10:26 pm | कैलासवासी सोन्याबापु

अन मग म्हाग्रु कोण ? मराठीतले पृथ्वीराज कपूर! ??? कधी कधी म्हाग्रु ह्यांचा तोरा असह्य झाला की मी मनात ते तरुण असताना जबलपुरला मामाकडे जाऊन बिडीच्या फॅक्टरीत काम करायला सुरुवात करायच्या अगोदरच आतच त्यांना गब्बर अन कंपनी कसे ठार करून घोड्यावर उलटे निजवते तो सीन आठवून मनातल्या मनात आपल्या असुरी आनंदाची हौस पुरवून घेतो

संदीप डांगे's picture

22 Nov 2016 - 10:31 pm | संदीप डांगे

म्हागृ म्हणजे साक्षात....... म्हागृच! यासम हाच!

हाहाहा.. बापू आता म्हाग्रु दिसले तरी तेच आठवेल

शब्दबम्बाळ's picture

22 Nov 2016 - 10:27 pm | शब्दबम्बाळ

_/\_

प्रिन्स्दानं आर्चीला काहून मारलं?

माझीही शॅम्पेन's picture

20 Nov 2016 - 6:11 pm | माझीही शॅम्पेन

अरे नशीब समाज प्रिन्स ने मारले जर त्या ठिकाणी कोणी ब्राह्मण पात्र असत तर महाराष्ट्रात दंगली सुद्धा झाल्या असत्या

स्वतः काही करायचं नाही आणि येता जाता ब्राह्मणानं झोडपायच हे नित्याचा झालं आहे

असे सरळ सरळ जातीयवादी धागा जर दलितांवर आला असता तर ?

असे सरळ सरळ जातीयवादी धागा जर दलितांवर आला असता तर ?
तर?? मिपा ब्यान झालं असतं.!

जॉनी's picture

22 Nov 2016 - 10:02 pm | जॉनी

खरंय राव.. थैमान झालं असतं..
ब्लेम करायला कोणतरी हवं असतं. मग इतिहासाचा आधार घेतला जातो. असं करताना वर्तमानात पायावर धोंडा पडतोय हे कळत नाही.. :(

गामा पैलवान's picture

20 Nov 2016 - 2:46 pm | गामा पैलवान

बार्नी,

मला कलाक्षेत्र काय किंवा क्रिकेट काय दोन्हींतलं फारसं कळंत नाही. पण तुमचा लेख वाचून एक साम्य जाणवलं.

क्रिकेट या खेळात दलितांवर घोर अन्याय झला आहे. क्रिकेटमध्ये कोणी हिंदू दलित दिसून येत नाही. हा ब्राह्मणांनी केलेला कट समजायचा का? भारताच्या (=बीसीसीआयच्या) संघात प्रतिनिधित्व मिळालेले मागासवर्गीय बाळू पालवणकर, विनोद कांबळी आणि दोड्डा गणेश इतुकेच आहेत. तर विजय हजारे आणि चंदू बोरडे हे ख्रिश्चन आहेत.

तुमचा तर्क लावू जाता क्रिकेट जगताने मागासवर्गीयांवर (दलित + सवर्ण दोन्ही) भरमसाट अन्याय केलेला आहे.

आ.न.,
-गा.पै.

अधिक माहितीसाठी वाचा : https://acrazymindseye.wordpress.com/2011/11/23/the-ekalavya-of-indian-c...

याच कारणांमुळे आमाला वेगळा विदर्भ पायजे.;)

टवाळ कार्टा's picture

20 Nov 2016 - 3:12 pm | टवाळ कार्टा

तुम्ही बबन आहात का?

बोका-ए-आझम's picture

20 Nov 2016 - 5:06 pm | बोका-ए-आझम

वेगळा नाही. शोभत नाही बरं भासंना!

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Nov 2016 - 3:05 pm | डॉ सुहास म्हात्रे

नायतर काय ! हॉलिवूडवाल्यांनी पण भारतिय लोकांना त्यांच्या जगातल्या संखेपेक्षा फार कमी पिच्चरमधे घेतलंय. आता आपला डोनाल्डदादा निवडून आलाय, त्याला घेऊन हॉलिवूडवर एक मोर्चाच काढूया, नै का ? ;) :)

जात नाही ती जात असे म्हणतात ते उगीच नाही ! शतकमहोत्सवासाठी शुभेच्छा !!

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

20 Nov 2016 - 3:09 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

डिमांड् आणि क्वालीटी सप्लाय हे प्रत्येक क्षेत्राचे बेसिक आहे.ब्राह्मण अभिनय ,नृत्य यात निपुण आहेत हे नाकारता येणार नाही.ब्राह्मणेत्तर शुड प्रुव देअर मेटल.
रिंकु राजगुरुने सैराटमध्ये स्वतःला प्रुव केले व नॅशनल ॲवॉर्ड मिळवले,सई ताम्हणकरने एका चित्रपटात किसिंग सीन ,दुसर्या चित्रपटात कपडे उतरुन बिकीनी घातलि तरीही तिला अजूनही नॅशनल ॲवॉर्ड मिळालेले नाही.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

20 Nov 2016 - 3:21 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

सई ताम्हणकर बद्दल सहमत. बाकी रिंकु राजगुरु आणि सैरात= ओव्हररेटेड!!

दुसर्या चित्रपटात कपडे उतरुन बिकीनी घातलि तरीही तिला अजूनही नॅशनल ॲवॉर्ड मिळालेले नाही.

>>>>>>
आत्ता गोव्यात बसलोय त्यावरून डोक्यात व्हिचार आला की बिकिनी घातली म्हणून नॅशनल अवॉर्ड द्यायाचं हा ठराव ठरत असेल तर इकडे एक 400 500 पद्मश्री , 100 200 पद्मभूषण , 13 14 पद्मविभूषण आणि 2 भारत रत्न पाठवून द्या , लागलीच डिस्ट्रिब्युट करून टाकतो , कसें :D

टवाळ कार्टा's picture

20 Nov 2016 - 9:29 pm | टवाळ कार्टा

भारतरत्न द्यायला निकष काय आहे?

कंजूस's picture

20 Nov 2016 - 3:25 pm | कंजूस

अभ्यास कमी पडतोय आमचा.

श्रीगुरुजी's picture

20 Nov 2016 - 3:30 pm | श्रीगुरुजी

माझ्या एका मित्राला तू मराठी फिल्म्स का बघत नाही असे विचारले असता , त्याने ही इंडस्ट्री " of the brahmins , by the brahmins , for the brahmins " आहे असे धक्कादायक उत्तर दिले .

हा मित्र संभाजी ब्रिगेड या सामाजिक कार्य व समाजसेवा करणार्‍या संस्थेशी निगडीत असावा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या देशभक्त, नि:स्वार्थी, स्वच्छ, चारित्र्यवान पक्षाचा कार्यकर्ता असावा.

विशुमित's picture

21 Nov 2016 - 11:25 am | विशुमित

<<<<<<<<राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या देशभक्त, नि:स्वार्थी, स्वच्छ, चारित्र्यवान पक्षाचा कार्यकर्ता असावा.>>>>>

--- जीभ जरा जास्तच सैल सुटत चालली आहे, असे नाही वाटत का?

बा द वे देशभक्त, नि:स्वार्थी, स्वच्छ, चारित्र्यवान चे निकष काय आहेत कळू शकेल का? आणि कोणत्या पक्षाचा त्यावर मालकी हक्क आहे?

विशुमित's picture

21 Nov 2016 - 11:58 am | विशुमित

काही देश भक्तांची लेटेस्ट यादी मिळाली....

http://www.firstpost.com/india/demonetisation-if-this-is-a-moral-crusade...

(या लेखाच्या आशयाशी मी पूर्णपणे असहमत आहे, पण या मध्ये पक्षीय गोम सोडणे हे रुचला नाही म्हणून हा प्रतिसाद. या पुढे इग्नोर मारेल पण मुद्दाम खोड काढली तर वाकडेच उत्तरे मिळतील विनाकारण दगड मारणाऱ्यांना)

तो भ्रष्ट पक्ष आहे हे मत मांडायला तुमची परवानगी लागणार आहे का यापुढे? पौड, आळे, शिरवळ, शीळ वगैरे महाराष्ट्रात जेवढे फाटे आहेत त्या सगळ्या फाट्यांवर मारण्यात येत आहे. काय करायचं ते करा.

मुद्दाम खोड काढली तर वाकडेच उत्तरे मिळतील विनाकारण दगड मारणाऱ्यांना.

हहपुवा.तुम्हाला कुणी प्रश्न विचारलेलाच नाही तर उत्तर कुणाला देणार?

विशुमित's picture

21 Nov 2016 - 1:56 pm | विशुमित

ब्वॉर्र....

प्रसाद गोडबोले's picture

23 Nov 2016 - 10:48 am | प्रसाद गोडबोले

जीभ जरा जास्तच सैल सुटत चालली आहे, असे नाही वाटत का?

बाकी काहीही असो, पण ही भाषा लैच आवडलीय बरकां विशुमती !!

आता आपल्या मिपा कारकिर्दीला नीट फॉल्लो केलं पाहिजे

:)

श्रीगुरुजी's picture

21 Nov 2016 - 2:05 pm | श्रीगुरुजी

<<<<<<<<राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या देशभक्त, नि:स्वार्थी, स्वच्छ, चारित्र्यवान पक्षाचा कार्यकर्ता असावा.>>>>>

--- जीभ जरा जास्तच सैल सुटत चालली आहे, असे नाही वाटत का?

नाही बुवा. साहेबांवर टीका केलेली तुम्हाला खपत नाही. आता साहेबांच्या पक्षाची स्तुती केलेली देखील तुम्हाला चालत नाही. साहेबांच्या पक्षाला देशभक्त, नि:स्वार्थी, स्वच्छ, चारित्र्यवान इ. गुणविशेष लावलेले चालत नसतील तर वरील वाक्य सुधारून खालील प्रमाणे लिहितो.

राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या अत्यंत माजोरड्या, जातीयवादी, ब्राह्मणद्वेषी, महाभ्रष्टाचारी, ढोंगी, गुन्हेगारी, देशद्रोही, अतिरेकी समर्थक पक्षाचा कार्यकर्ता असावा.

आता खुष?

बा द वे देशभक्त, नि:स्वार्थी, स्वच्छ, चारित्र्यवान चे निकष काय आहेत कळू शकेल का? आणि कोणत्या पक्षाचा त्यावर मालकी हक्क आहे?

चांगल्या गुणांवर कोणाचाही मालकी हक्क नसतो. परंतु वाईट गोष्टींवर तो नक्कीच असतो.

देशभक्ती, चारित्र्य, स्वच्छतेचे निकष - अतिरेक्यांची पाठराखण न करणे, फक्त आपल्या जातीचा उदोउदो करून इतर जातींचा द्वेष न करणे, गुन्हेगारांना पक्षात मानाचे स्थान न देणे, जनतेच्या पैशाने स्वतःच्या तुंबड्या न भरणे, माजोरडेपणा न करणे, जातीजातीत भांडणे न लावणे, इतिहास स्वतःला हवा तसा न बदलणे, ज्या क्षेत्रात आपल्याला ओ की ठो कळ्त नाही तिथे घुसुन मुक्काम न ठोकणे इ. इ.

विशुमित's picture

21 Nov 2016 - 2:28 pm | विशुमित

पवारसाहेब आणि राष्ट्रवादी वरचे विनाकारण, बिनबुडाचे, निरर्थक आणि रडके प्रतिसाद साताराच्या वाढे फाट्यावर मारण्यात येत आहे....!!

श्रीगुरुजी's picture

21 Nov 2016 - 3:07 pm | श्रीगुरुजी

पवारसाहेब आणि राष्ट्रवादी वरचे विनाकारण, बिनबुडाचे, निरर्थक आणि रडके प्रतिसाद

हे वाचल्यावर साहेब सुद्धा खो खो हसतील!

बादवे, नोटा रद्द करण्याच्या निर्णयाला काही दिवसांपूर्वी उघड पाठिंबा देणारे साहेब आता नोटा रद्द करण्याच्या विरोधात बोलताहेत. काय कारण असावे? जवळच्या सगळ्या नोटा बदलून झालेल्या दिसतात.

संदीप डांगे's picture

21 Nov 2016 - 3:11 pm | संदीप डांगे

जवळच्या सगळ्या नोटा बदलून झालेल्या दिसतात.

म्हणजे?

विशुमित's picture

21 Nov 2016 - 4:05 pm | विशुमित

म्हणजे ?
"सुभाष देशमुखांच्या" च्या...

साहेबांनीच ठेवायला दिल्या होत्या त्याच्या कडे.

श्रीगुरुजी's picture

21 Nov 2016 - 5:28 pm | श्रीगुरुजी

साहेबांची लीला अगाध आहे. ते काहीही करू शकतात. ज्यांची पालखी नाचवली, तेच परदेशी असल्याचा साक्षात्कार साहेबांना होतो आणि परत त्यांच्यापुढेच पुन्हा साहेब लोटांगण घालतात.

सुभाष देशमुखावरून डायरेक्ट ९० दि मध्ये...

असो वर्तमानातील उत्तर द्याच टाळायचं म्हंटलं की मागची ६० वर्ष आठवतात.
असो क्लीन मास्टर ने क्लीन चिट पण देऊन टाकली..(यात पण साहेबांचा च हात असू शकतो, शंकेला वाव आहे)

श्रीगुरुजी's picture

21 Nov 2016 - 6:00 pm | श्रीगुरुजी

९० दि मध्ये ..?

भूतकाळावरूनच वर्तमानाचा अंदाज येतो ना?

विशुमित's picture

21 Nov 2016 - 6:02 pm | विशुमित

<<<भूतकाळावरूनच वर्तमानाचा अंदाज येतो ना?>>>

कसा काय ?

श्रीगुरुजी's picture

21 Nov 2016 - 6:06 pm | श्रीगुरुजी

साहेबांचा आजपर्यंतचा विश्वासघाताचा इतिहास बघूनच त्यांच्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही.

विशुमित's picture

22 Nov 2016 - 5:35 pm | विशुमित

पार्टी विद डिफरेन्स च्या देशभक्त आणि चरित्रसंपन्न आमदार पुत्राचे कारनामे...ते पण गृहमंत्राच्या घरा शेजारी...

http://www.loksatta.com/nagpur-news/bjp-mla-son-bang-bang-in-nagpur-bar-...

तरी पण असल्या जुमला पार्टीवर लोक कसे विश्वास ठेवतात देव जाणे??

श्रीगुरुजी's picture

25 Nov 2016 - 3:46 pm | श्रीगुरुजी

उदयन भोसले (शरद आप्पा लेवे), पद्मसिंह पाटिल (पवनराजे निंबाळकर), आव्हाड (बांधकाम व्यावसायिक परमार) इ. नग ज्या पक्षात होते त्या पक्षाला सुद्धा एकेकाळी थोडीफार मते मिळत होती. मग भाजपला का नाही मिळणार?

चला बरं झालं माझा मुद्दा पटला म्हणायचा.

सगळी कडे आनंदी आनंदच आहे. खाली अंधार देखील.

श्रीगुरुजी's picture

25 Nov 2016 - 3:59 pm | श्रीगुरुजी

मग भाजपला का नाही मिळणार?

हे वाक्य समजलेले दिसत नाही.

विशुमित's picture

25 Nov 2016 - 4:32 pm | विशुमित

ओह आता समजलं.

म्हणजे पुढच्या टर्मला ते आमदार, पुत्र कारनाम्यामुळे पक्षातून आऊट. आऊट तर करावंच लागेल मते पाहिजेत ना..!!

श्रीगुरुजी's picture

25 Nov 2016 - 8:52 pm | श्रीगुरुजी

अजून नाही समजलेलं दिसत.

मृत्युन्जय's picture

23 Nov 2016 - 12:28 pm | मृत्युन्जय

सातारा म्हटले की उदयनराजे आठवतात ते तर साहेबांबरोबर आख्ख्या राष्ट्रावादीला फाट्ञावर मारतात. असो. असोच :)

विशुमित's picture

24 Nov 2016 - 10:52 am | विशुमित

(दिसत तसं नसतं, आणि म्हणून फसणाऱ्यांच्या प्रतिसादाला आम्ही पुन्हा एकदा वाढे फाट्यावर मारतो..असो...)

विशुमित's picture

26 Nov 2016 - 5:18 pm | विशुमित

इथे तर खुद्द मोदींना च फाट्यावर मारलं-

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/kolhapur-western-maha...

(टीप: पंतप्रधानासाठी राजेंनी वापरलेल्या भाषेविषयी माझा आक्षेप आहे)