Skip to main content

१०५( की १०७?) हुतात्मे आणि वेगळा विदर्भ

लेखक स्वामी संकेतानंद यांनी शुक्रवार, 25/03/2016 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वी १०५ आकडा दिला जाई, हल्ली हल्ली १०७ म्हटले जाते.( एक कोल्हापूरकर नाव आहे, दुसरे माहीत नाही). तर आपण सोयीसाठी १०७ हुतात्मे धरू. त्यांची संख्या इथे महत्वाची नाही तर त्यांच्या हौतात्म्याचे कारण महत्वाचे आहे. वेगळ्या विदर्भाचा विषय निघाला की एकदम भावनिक मुद्दा काही हळवे मावळे पुढे आणत असतात. ' संयुक्त महाराष्ट्रासाठी १०७ हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे, त्यांचे बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही' या आशयाचे वाक्य फेकले जातात. मी म्हटलं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा इतिहास पाहू जरा. मराठी विश्वकोश वाचले(विकिपंडित म्हणू नये म्हणून. ;) ) तर कळले की हे बळी मुंबई महाराष्ट्राला मिळावी म्हणून गेले होते! विदर्भ महाराष्ट्रात यावा म्हणून नाही. मुंबई सोन्याचे अंडे देणारी कोंबडी होती जणू, महागुजरात आणि महाराष्ट्र दोघांनाही पाहिजे होती. केंद्र सरकारने मुंबईच्या प्रश्नाचा तिढा सोडविण्यासाठी ‘त्रिराज्य योजना’ जाहीर केली. या योजनेत सौराष्ट्रासह गुजरात, विदर्भ व मराठवाडयासह महाराष्ट्र आणि मुंबई हे शहरराज्य अशा प्रकारची तीन राज्ये स्थापन करण्याचा विचार मांडला. महाराष्ट्रास मुंबई दयावयास केंद्र सरकार तयार नव्हते. या वेळी घडलेल्या हिंसाचारात १५ माणसे ठार झाली. पुढे केंद्राने जेव्हा मुंबई केंद्रशासित करायचा निर्णय घेतला तेव्हा पुन्हा उद्रेक झाला. या खेपेला ७६ लोकांचा बळी गेला. तसेच निवडणुकांचे निकाल पाहिले तर महाराष्ट्र एकीकरण समितीला यश फक्त कोंकण आणि पश्चिम महाराष्ट्र इलाख्यात मिळाले. मराठवाड्यात किंचित आणि विदर्भात अजिबात नाही. म्हणजे लक्षात येईल की, संयुक्त महाराष्ट्र किंवा मुंबईसह महाराष्ट्र हा विदर्भासाठी मुद्दा कधीच नव्हता! तेव्हा हुतात्मे, संयुक्त महाराष्ट्राचा लढा वगैरे भावनिक मुद्दे विदर्भासाठी लागू होऊ शकत नाही. उद्या मुंबई वेगळी करायचे कोणी बोलले तर नक्कीच विरोध व्हावा, बळी मुंबईसाठी गेले आहेत! या लेखाचा मुद्दा विदर्भ वेगळा व्हावा की नाही हा नाही, तर वेगळ्या विदर्भाचा मुद्दा आला की पश्चिम महाराष्ट्रातले लोकच जास्त तावातावात बोलतात हा आहे! मी विदर्भातला आहे त्यामुळे एवढे नक्की सांगू शकतो की आम्हाला मुंबई महाराष्ट्रात असावी की नको याचे सोयरसुतक नाही, आधीही नव्हते, आताही नाही. त्यामुळे मुंबईसाठी झालेल्या आंदोलनाचा संबंध विदर्भाशी जोडून उगाच भावनेला हात घालणाऱ्या पोस्टी टाकण्यात आणि भाषणे करण्यात अर्थ नाही. विदर्भ पूर्वी वेगळा होता, विदर्भाच्या लोकांनी महाराष्ट्रात समावेश व्हावा म्हणून आंदोलन केलेलं नव्हतं तर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा या मागणीस बळ मिळावे म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांनी विदर्भासोबत नागपूर करार करून त्यांना सोबत घेण्यात आले. आणि विदर्भ वगळता द्वैभाषिक राज्य मान्य होत नव्हते म्हणून समितीने नव्या द्वैभाषिक राज्यात विदर्भाला घेतले अन्यथा विदर्भ वगळून पण ते मुंबईसह द्वैभाषिक राज्याला तेव्हा तयार होते हे लक्षात घेतले पाहिजे. सगळे लफडे मुंबईपायी झालेत, विदर्भासाठी कुणी गोळ्या खाल्ल्या नाहीत तेव्हा. अजून एक उदाहरण देता येईल ते आंध्रचे. आंध्र वेगळे व्हावे म्हणून पोट्टी श्रीरामुलु या नेत्याने (खरेखुरे) आमरण उपोषण केले. त्यांच्या बलिदानानंतर जे राज्य अस्तित्वात आले त्यात तेलंगण नव्हते. आताचे रायलासीमा आणि सीमांध्र होते. नंतर तेलंगण आले. आता जेव्हा तेलंगण राज्यासाठी चळवळ सुरु होती तेव्हा कोणीही पोट्टी श्रीरामुलु ह्यांच्या बलिदानाची आठवण करून देत बसले नाहीत. सगळे झगडे हैदराबादसाठी होते. हैदराबाद तेलंगणात नसते तर आंध्रच्या नेत्यांनी परत तेलंगण वेगळे करायला विरोधही केला नसता. आम्ही ना मुंबई मागत आहोत ना पुणे! नागपूरात पण असे काही नाही की पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांनी त्यासाठी गोळ्या खाव्यात! उलट गोंदिया-गडचिरोलीला पोस्टिंग आली की जणू काळ्या पाण्याला पाठवले असे वाटते आणि मंत्रालयात खोके पोचवून ट्रान्सफर करवून घेतात. किती लोक तिकडून इकडे आनंदाने पोस्टींगवर पूर्ण वेळ राहतात? म्हणजे विदर्भावर तुमचे प्रेम उतू चालले आहे असेही नाही! मग वेगळ्या विदर्भाचा मुद्दा आला की एकदम चिडून जाण्यासारखे काय आहे? आपण काहीतरी मोठ्ठे गमावतोय असे का वाटते? विदर्भ हा फक्त तुमच्या इगोला सुखावणारा एक फील गुड फॅक्टर आहे का? की विदर्भ म्हणजे 'प्राइझ्ड पजेशन' आहे तुमचे? आपने खुल के मुहब्बत नहीं की है हमसे आप भाई नहीं कहते हैं मियाँ कहते हैं --मुनव्वर राना
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 28053
प्रतिक्रिया 130

प्रतिक्रिया

In reply to by चिगो

त्यापेक्षा सरळ विदर्भातल्या पोरा-पोरींनी दिलेली 'काँपिटीशन' झोंबतेय, ते बोला आम्हाला ते कधी स्पर्धक वाटले नाहित पण त्यांना मात्र आम्ही तसे वाटत असू तर दुर्दैव महाराष्ट्राचे. बाकी भाषा दर10 km ला बदलते, रोटी बेटिचे व्यवहार जवळच्या अंतरात होत असतात म्हणून उगा ते एम्पित होतात की कर्नाटकशी हां दुय्यम भाग. बाकी तुमचे नेते नालायक पडले म्हणता आहात तर ते सुधाराना .. भलत्याच भावनिक बाबेला बळि पडून हे प्रिय नाही ते प्रिय नाही चा सुर कशाला ? सगळ्यात जास्त वाईट हे वाटते की एक विदर्भिय मनुक्ष म्हणुन धागा लेखकाला अभिप्रेत धाग्यातिल मुद्दा आपण सपशेल भरकटवला आहे. त्यावर चार शब्द आले असते तर बरे झाले असते पण तुमिबी पच्चिम मराठी लोकावानी येग्लच बोलू रायला ना बे ?

In reply to by भाऊंचे भाऊ

साहेब, 'पम'तल्या लोकांनाच 'एकी'चा उमाळा फुटतो, मग छत्रपती आठवतात नी शहीद आठवतात, वेगळ्या विदर्भाबद्दल बोललं म्हणजे हे ह्या धाग्यातल्या बव्हांश प्रतिक्रीयांवरुन स्पष्ट होतंय.. त्याबद्दल काय बोलू?
त्यावर चार शब्द आले असते तर बरे झाले असते पण तुमिबी पच्चिम मराठी लोकावानी येग्लच बोलू रायला ना बे ?
माझ्या माहितीत विदर्भात कुठंही असं काही बोलत नाही.. कृपा करुन वर्‍हाडीचा आव आणू नका. जमत नाहीये तुम्हाला..

In reply to by चिगो

पण तरीही ह्या प्रतिसादात हेटाळणीचा सूर जाणवतोय
हो, कारण इथं धागाकर्त्यानं धागा तयार करताना पश्चिम महाराष्ट्रातल्या (खरं तर विदर्भ आणी मराठवाड्यातल्या लोकांना वेगळ्ं राज्य हवं असल्यानं महाराष्ट्रातल्या म्हणायला हवं) लोकांना ते मोठ्या संख्येने विदर्भाबाबतीत प्रतिक्रिया का देतायत असा हेटाळणीचा सूर लावलाय. आणि तुमची प्रतिक्रिया सुद्धा काही फार संतवाणी नाही.
फुकट दिलेत का हो विदर्भवाल्यांना फ्लॅट्स पुण्यातल्या बिल्डरांनी? खडकू नि खडकू मोजून घेतलाय.. लोन्सचे हप्ते फेडताहेत ते.. त्या-त्या पोरा-पोरींनी शिकून आपल्या जिद्दीवर आणि कमाईवर विकत घेतले आहेत ते फ्लॅट्स. उद्या माझी ऐपत असेल तर लुट्येन्स दिल्लीत बंगला घेईल मी, कोणाचा बाप रोखणार आहे? जरा राज्यघटना वाचा भारताची..
पण एवढं जर नागपूर प्रिय आहे, तर तिकडेच का जात नाही? दर पाच मिनिटानी एम एच तीस, एकतीस च्या गाड्या दिसतात. त्या नागपूरला काढा आयटी कंपन्या आणि खडकू(?) मोजून घ्या विकत फ्लॅट्स. कशाला तुमच्यावर इतका अन्याय करणार्‍या परराज्यातल्या लोकांमध्ये रहायचं? मला खरं तर हे लॉजिक कळलेलं नाही. अन्याय सहन करत रहाण्याला काही अर्थच नाही ना!
उद्या माझी ऐपत असेल तर लुट्येन्स दिल्लीत बंगला घेईल मी
तुम्हाला मेन प्रॉब्लेम सांगतो. या विदर्भात जे सरकारी नोकर, सरकारी शिक्षक इत्यादी (थोडक्यात भ्रष्टाचारी) लोकांना पैसा गुंतवायचाय तो पश्चिम महाराष्ट्रात. त्यांना खरं तर इकडं शिफ्टच व्हायचंय. ज्यांना हे शक्य नाही त्यांना वेगळं राज्य हवंय. तेव्हा घ्या तुम्ही दिल्लीत बंगला, माझं काही म्हणणं नाही, पण तुमच्या बंगल्याला वेगळं राज्य करण्याची मागणी करू नका. दिल्लीतले पोलीस फार मारतात म्हणे.
त्यापेक्षा सरळ विदर्भातल्या पोरा-पोरींनी दिलेली 'काँपिटीशन' झोंबतेय, ते बोला की. तसंही आपण कमी पडायला लागल्यावरच सगळ्यांना 'आरक्षणाचे दुष्परिणाम', 'पुण्यावर बाहेरच्यांचे अतिक्रमण' वगैरे सुचतं हो..
खिक! ते यूपी वाले झाले, मग बिहारी झाले (एक बिहारी सौ पे भारी वगैरे). आता तुम्ही आला. 'काँपिटीशन' म्हणे. हे म्हणजे बांग्लादेशानं दिलेली काँपिटीशन भारताला झोंबतंय म्हटल्यासारखं झालं. चड्डी में रहो मियां. वेगळं राज्य झाल्यावर उलट 'काँपिटीशन' कमी होईल माहितीये का? कारण परराज्यातल्या विद्द्यार्थ्यांना सध्या फक्त मॅनेजमेंट सीट वरच प्रवेश मिळतो. आणि मग पुण्या मुंबईत शिकायला येण्याचे तुमच्या लोकांचे मार्ग उलटे बंद होतील. जास्त कॉलेजेस कुठल्या प्रदेशात आहेत हे माहितीये ना?
त्याहीपेक्षा महत्त्वाचं.. विदर्भाला येणार्‍या योजना, मग त्या सरकारी असो वा निजी, ह्या प. महाराष्ट्रानी आपल्या राजकीय मातब्बरीवर ओढून नेल्यात.
तसंही आपण कमी पडायला लागल्यावरच सगळ्यांना 'आरक्षणाचे दुष्परिणाम', 'पुण्यावर बाहेरच्यांचे अतिक्रमण' वगैरे सुचतं हो..
तसंही आपण कमी पडायला लागल्यावरच सगळ्यांना 'राजकीय मातब्बरीवर ओढून नेल्या' वगैरे सुचतं हो..
तुमच्या प्रमाण भाषेचा बाज आणि माज आम्ही बोलतांना का जोपासावा
जोपासू नका. तुमचं वेगळं राज्य झालं की हिंदीचा प्रभाव असलेली भाषा प्रमाण करा. महाराष्ट्राची प्रमाण भाषा मराठी आहे, वैदर्भी नाही. तस्मात, ते हिंदी बरोबरचं म्यूटंट मराठी 'तिकडे'.
आम्ही कधीच शिवाजीमहाराजांच्या 'हिंदवी स्वराज्याचे' भाग नव्हतो.
बरोबर आहे. विदर्भ इज इक्वल टू नो शिवाजी महाराज, गॉट इट.
देवदेवस्कीचा विचार केला तरी हेच. पंढपुरच्या विठोबाच्या वारीला जाणारे वैदर्भीय मोजकेच असतील. त्यापेक्षा आजच्या मध्यप्रदेश-छ्त्तीसगड मधले देव जवळचे आणि पुर्वापार आहेत. रोटीबेटीचे व्यवहारपण मध्यप्रदेश-छत्तीसगडशी जास्त. (माझी स्वतःची आजी मध्यप्रदेशमध्ये माहेर असलेली) ही बाब माझ्या माहितीप्रमाणे मराठवाड्याला लागू नाही..
आमची ना नाही. तुमच्या वेगळ्या विदर्भाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. वेगळ्या मराठवाड्याला सुद्धा.
३. कर्जाच्या बाबतीत तेच बोलतो, जे आधी बोललो होतो.. जे कर्ज विदर्भापायी, त्याच्या विकासासाठी झालंय, त्याचा बोजा विदर्भाला उचलावाच लागेल.
सी? या बाबतीत सुद्धा माझे विचार सेम.
४. वेगळा विदर्भ व्हावा किंवा न व्हावा, हे आर्थिक/सामाजिक मुद्द्यांवर ठरावं, भावनिक बाबींवर नाही..
बिलकुल. वेगळा विदर्भ झालाच पाहिजे. तात्पर्य, माझा वेगळ्या विदर्भाला पाठिंबा आहे, वेगळ्या मराठवाड्याला सुद्धा. फक्त तुमचे नेते आणि 'काँपिटीशन' देणारे पोरं पोरी यांना बहुधा पुण्या मुंबईत स्थायिक व्हायचंय. तेव्हा एकदा मिटींग करा, काय ते नक्की ठरवा आणि मग सांगा. तुकडा पाडून टाकू. हाय काय नाय काय.

In reply to by काळा पहाड

हे म्हणजे बांग्लादेशानं दिलेली काँपिटीशन भारताला झोंबतंय म्हटल्यासारखं झालं.
झोंबलीय ते दिसतंय.. असोच..
चड्डी में रहो मियां.
अरेच्च्या.. चड्डीत आहोत तरी 'रिअल इस्टेट'चे भाव वाढलेत की.. बाहेर आलो तर काय होणार?
जास्त कॉलेजेस कुठल्या प्रदेशात आहेत हे माहितीये ना?
अर्थात.. आणि सीट्सचा जोगवा मागत पार इथं मेघालयातल्या माझ्या ऑफीससमोर बसतात हो दोन-दोन तास ही लोकं.. यादी हवीय का?
तुमचं वेगळं राज्य झालं की हिंदीचा प्रभाव असलेली भाषा प्रमाण करा. महाराष्ट्राची प्रमाण भाषा मराठी आहे, वैदर्भी नाही. तस्मात, ते हिंदी बरोबरचं म्यूटंट मराठी 'तिकडे'.
ते आमचं आम्ही बघू.. आम्ही आमच्याच पद्धतीची मराठी बोलणार. तुमचा माज तुमच्याजवळ ठेवा. आणि शक्य असल्यास ते 'मराठीच्या सक्ती' विरोधात निरुपम वगैरे बोंबलत असतात, ते जमतंय का सांभाळायला ते बघा. नाही, 'तुमच्या' मुंबईत होतंय हो हे सगळं..
तेव्हा घ्या तुम्ही दिल्लीत बंगला, माझं काही म्हणणं नाही, पण तुमच्या बंगल्याला वेगळं राज्य करण्याची मागणी करू नका. दिल्लीतले पोलीस फार मारतात म्हणे.
सदिच्छांसाठी धन्यवाद.. ऐपत असेल तर घेऊही. बाकी पोलिसांची चिंता सोडा. त्याची आम्हाला पर्वा नाही. उद्या 'महागड्या' वैदर्भियांविरुद्ध आंदोलन-बिंदोलन करायचा विचार असेल तर तुम्हालाच ती चिंता.. एकंदरीत, वेगळा विदर्भ व्हावा ह्यावर आपलं एकमत आहे.. त्याकरीता धन्यवाद..

In reply to by काळा पहाड

त्या नागपूरला काढा आयटी कंपन्या आणि खडकू(?) मोजून घ्या विकत फ्लॅट्स. हा तुमचा निव्वळ माज आहे साहेब. पुण्यात २००५ पर्यंत काय दशा होती रियल एस्टेट ची ते आठवा जरा.. चार कंपन्या आल्या म्हणून तुमच्या जागेला सोन्याचा भाव तरी आलाय..या परराज्यातून आलेल्या लोकांच्या भरवश्यावरच कमवताहेत इथले , नाही तर बसले होते पेन्श्नर सिटी चा वांझोटा बोर्ड घेऊन... एव्हढा माज करू नका.. एकदा बजाज गेल्यावर औरंगाबादची व कंपन्या गेल्यावर मिशिगनची झालेली वाताहत बघा.. आयटी को आते और जाते देर नाही लागती दोस्त.. और शायद शुरुवात का शंखनाद हो चुका है :) http://www.mh-31.com/nagpur/about-nagpur/nagpur-mihan-real-estate-land/…

In reply to by टवाळ कार्टा

मला ते "फ्लो" मधे सुचले तसे लिहित गेलो !, मला काय माहीती इथे व्याकरणाची परीक्षा होते आहे, तसे आपणांस जे गोड वाटेल ते वाचा, बाकी जमल्यास थोड़े सौजन्य शिकुन घ्या तोंडी लावण्यापुरते, बरे असते ते अनोळखी माणसाशी बोलताना, असो!. रच्याकने, पश्चिम महाराष्ट्रियन नसेल चालत किंवा चुक असेल तर काय लिहावे? "पश्चिम महाराष्ट्रातील मराठी"?????

In reply to by नाना स्कॉच

=))

In reply to by तर्राट जोकर

भरा हो एक लाइट लाइट पेग जोकर बुआ!

डोके उठल्यावर ही निमुट मुग गिळून बसणे अन सौजन्य पाळणे हेच बहुदा गृहस्थाश्रमाचे वैश्विक सार असावे असे वाटते आहे आम्हांस आजकाल!

त्या बबल्याला सांगा बॉयल सिंग आण म्हणा एक कंप्लीमेंट्री!!!

In reply to by नाना स्कॉच

काटेरी, आगलावू प्रतिसाद देण्याची शक्ती विशिष्ट आयडींकडे मुक्तपणे उपलब्ध असे पर्यंत आपण मूग, चणा, शेंग गिळत राहू.

In reply to by तर्राट जोकर

मोगांचे नावही घेऊ नका!! ;) चढ़ली दारू उतरंल!! काटेरी प्रतिसाद देणारे तेच एक आहेत !! बाकी सगळे प्रतिक्रियावादी भद्रजन आहेत! काय समजलात मिस्टर!!!

In reply to by नाना स्कॉच

प्रतिक्रियावादी भद्रजन =)) प्रतिक्रियावादी हा शब्द ब्रँचमधे शंभरदा घोटायला लावत असतील, तेव्हाच सगळीकडे यायला लागलाय.

In reply to by नाना स्कॉच

असे चुकीचे शब्द आपणच परत परत वापरतो...आणि नंतर मराठी बिघडली म्हणून गळे काढतो...तस्मात एखाद्याने चूक दाखवली तर त्यालाच सुनवण्यापेक्षा चूक दुरुस्त करण्याकडे लक्ष द्यावे... सौजन्य काय अस्ते/कशाशी खातात याचे चांगले ज्ञान आहे मला "प.महा.मधील लोक" असे लिहित चला की रच्याकने तुम्ही पुणेकर असाल तर माझा पास

In reply to by टवाळ कार्टा

असे चुकीचे शब्द आपणच परत परत वापरतो...आणि नंतर मराठी बिघडली म्हणून गळे काढतो... हे अगोदरच बोलला असतात तर काय प्रश्न होता राजे! सेम शब्द ! समजुतीचा सुर कामे तड़ीस नेतो इतके फ़क्त ह्या निमित्ताने सांगतो देवा. तस्मात एखाद्याने चूक दाखवली तर त्यालाच सुनवण्यापेक्षा चूक दुरुस्त करण्याकडे लक्ष द्यावे... चुक दाखवण्याला आक्षेप असता तर खाली "मग नेमके कसे लिहावे" विचारले नसते साहेब, आक्षेप चुक दाखवायला नसुन चुक दाखवायच्या पद्धतीला आहे , हे परत एकदा लक्षात आणून देतो. आपण वरती जे गळे काढणे वगैरे लिहिले आहे त्यात "आपण गळे काढतो" म्हणला आहात आपण बरे वाटते ते! हेच आधी बोलला असता तर आपल्याला आपल्या सौजन्याची सेल्फअट्टेस्टेड कॉपी (स्वसत्यापित प्रत) दाखवावी लागली नसती इतकेच ! :) असो. लोभ असावा की नाही हा आपला वैयक्तिक प्रश्न आहे पण रोष असू नये ही माझी वैयक्तिक विनंती आहे! -नाना

In reply to by नाना स्कॉच

आपल नक्की काय विवेचन आहे लेखकान विचारलेल्या मुळ प्रश्नावर. आपले सर्व प्रतिसाद इतर प्रतिसादांना उत्तर दिसताहेत.

In reply to by सातारकर

हेच आहे की , 1 विदर्भ वेगळा व्हावा की नाही ह्यावर लेखकाने भाष्य केलेले नाही (तसे मलाही ते करण्यात रस नाही) 2 लेखकाच्या म्हणण्यानुसार वेगळा विदर्भ ह्या विषयावर एकंदरित पश्चिम महाराष्ट्रातील जनता जास्तच आवेशपुर्ण होते (वरील काही दिव्य प्रतिक्रियांचा लाभ घ्यावात परत फिरून एकदा ही विनंती), अन लेखकाचे हे मत काही प्रतिक्रिया अन काही सदस्यांनी शब्दशः बरोबर ठरवले आहे 3 पुढे माझ्यामते लेखकाने हा प्रश्न विचारला आहे की असे का होत असावे?, त्याला कोणीच समाधानकारक उत्तर देऊ शकलेले नाही, अगदी आपणही *"पश्चिम महाराष्ट्रातली माणसे लष्कराच्या भाकरी...." वगैरे वगैरे भावनिक खेळ केले आहेत. ते एक असोच्. पण वेगळा विदर्भ किंवा एकुणच विदर्भ म्हणले की पश्चिम महाराष्ट्रातील लोकं इतकी हाइपर का होतात हा प्रश्न अजुन अनुत्तरीत आहे! हे मात्र खरे! *बरं लेखकाने "मग पश्चिम महाराष्ट्रातली जनता पोस्टिंग विदर्भात आल्यास मंत्रालयात खोके पोचवुन बदली का करून घेतात"?? असा ही प्रश्न विचारला आहे! एक उदाहरण डोळ्यासमोरचे आहे ते नंतर कधीतरी! एकंदरित , लेखकाच्या लिखाणात मला तरी कुठेही अभिनिवेष दिसला नाही मात्र थेट प्रश्न दिसले जे बऱ्याचजणांस दुखवु शकतात, त्या प्रश्नांना उत्तरे नाहीत किंवा तेच प्रश्न वर्मावर वगैरे आहेत असेही मला वाटत नाही, फ़क्त एक निरिक्षण हे ही आहे की त्या प्रश्नांना बहुतांशी पश्चिम महाराष्ट्रातील जनतेने भावनात्मक जिंगोइसम आधारीत उत्तरे दिली आहेत , कोणीही त्या प्रश्नांना तर्काने कापू शकलेला नाही, उगाच स्वाक्षरी मधे " एक पश्चिम महाराष्ट्रियन माणुस" "मी एक पश्चिम महाराष्ट्रियन मराठी" वगैरे बोलून उपयोग नसतो/ इथे नाही!. मी तरी माझ्यापरीने ह्याला उत्तरे शोधून मग जरूर बोलल पण तुर्तास लेखकाचे मुद्दे भावनावेगात येऊन स्वहस्ते सिद्ध करायची आमची अजिबात मनीषा नाही.

In reply to by नाना स्कॉच

वरील प्रतिसाद दोन वेळा वाचला. हे (प.म. मधले) लोक अस का करतात (अस आपल्याला वाटत) ते कुठही कळल नाही. आमच्या मते मुळ कारणच भावनिक आहे म्हणून आम्हाला वाटत की हे (प.म. मधले) लोक तस करत असावेत, म्हणून ते तस आहे अस आम्ही लिहिल. तस नसेल आणि आपल्याकड एखाद अ-भावनिक स्पष्टीकरण (कारण) असेल तर ते सांगा. अभिनिवेष (शब्द) आपल्या आवडीचा आहे हे एक कळल.

In reply to by नाना स्कॉच

वरील प्रतिसाद दोन वेळा वाचला. हे (प.म. मधले) लोक अस का करतात (अस आपल्याला वाटत) ते कुठही कळल नाही. आमच्या मते मुळ कारणच भावनिक आहे म्हणून आम्हाला वाटत की हे (प.म. मधले) लोक तस करत असावेत, म्हणून ते तस आहे अस आम्ही लिहिल. तस नसेल आणि आपल्याकड एखाद अ-भावनिक स्पष्टीकरण (कारण) असेल तर ते सांगा. अभिनिवेष (शब्द) आपल्या आवडीचा आहे हे एक कळल.

In reply to by सातारकर

1 प म मधील लोकं ही असं का करतात हे समजून घ्यायला मला बरेच सायास पडले बघा कारण आम्हाला आमचा कोष (*शब्द लक्षात ठेवा) तोडून बाहेर पडून ते पाहता ते एक टक्का समजले आहे असा आमचा समज आहे बघा, आपण केलेल्या भावनिक प्रतिपादनात अन मुळ प म मधील लोकांच्या वागणुकीत जमीन अस्मानाचे अंतर आहे ! असे एक "वेंटेज पॉइंट वर" बसता दिसुन येते बघा साहेब!! (U may please take all the offence in return of this hard truth) तुम्ही म्हणता तसे आम्ही किंवा आपण पश्चिम महाराष्ट्रातले लोक भारत/मराठी तेतुका एक ठेवायला झटतो . ओके ! पण आपण आपल्या सारखे नाहीत म्हणून इतर लोकांस हसतो सुद्धा! माना वा ण माना ती आपली मर्जी पण एखाद्या वैदर्भ माणसाने जर "बुआ आमच्याकडे अमुक गोष्ट अमुक पद्धतीने खातात" म्हणले की आपली रिएक्शन काय असते?? "आम्ही 'तसलं' खात नसतो" पुढे अजुन सुलभ करायचे म्हणले तर आपण ओवर सिम्पलीफिकेशन करतोय साहेब, आंबट चव घातलेल्या वरणाला "आमटीच" म्हणायचे "त्याला कुठं चिंचगुळ वरण म्हणतात वह्य!!!"

'ही रूपकात्मक उदाहरणे आहेत बरंका ! नाहीतर शब्दप्रमाणिक अर्थ शोधत वरडत हिंडसाला!!'

मालक पश्चिम महाराष्ट्र हाच प्रमाणित महाराष्ट्र आहे असा गोड गैरसमज तुम्हाला असलेला जाणवतो आहे, पण त्यांची संस्कृती वेगळी आहे!एनी आहे का? आता नका म्हणू झेपले नाही! सार्वजनिक संस्थळावर अजुन स्पष्ट बोलणे शक्य नाही आम्हाला! झेपले नाही तर आम्ही यड़े म्हणून सोडुन द्या ! टिप :- आपण आमचे आवड़ते शब्द हुड़कत बसा आम्हाला हरकत नाही फ़क्त उद्या त्याचा रोजमुरा मागु नका ही विनंती!!

In reply to by सातारकर

'अभिनिवेश' शब्दावर नाना स्कॉच ह्यांचे प्रेम पाहता त्यांना यंदाचा 'अभिनिवेश गुप्त' पुरस्कार जाहीर करण्यात येतो!

In reply to by नाना स्कॉच

वरील प्रतिसाद दोन वेळा वाचला. हे (प.म. मधले) लोक अस का करतात (अस आपल्याला वाटत) ते कुठही कळल नाही. आमच्या मते मुळ कारणच भावनिक आहे म्हणून आम्हाला वाटत की हे (प.म. मधले) लोक तस करत असावेत, म्हणून ते तस आहे अस आम्ही लिहिल. तस नसेल आणि आपल्याकड एखाद अ-भावनिक स्पष्टीकरण (कारण) असेल तर ते सांगा. अभिनिवेष (शब्द) आपल्या आवडीचा आहे हे एक कळल.

मी स्वतः वेगळ्या विदर्भ राज्याचा समर्थक आहे तरीसुद्धा लेखातील खालील गोष्टी विशेष मानसिकता दर्शवतात,
संयुक्त महाराष्ट्र किंवा मुंबईसह महाराष्ट्र हा विदर्भासाठी मुद्दा कधीच नव्हता! तेव्हा हुतात्मे, संयुक्त महाराष्ट्राचा लढा वगैरे भावनिक मुद्दे विदर्भासाठी लागू होऊ शकत नाही. उद्या मुंबई वेगळी करायचे कोणी बोलले तर नक्कीच विरोध व्हावा, बळी मुंबईसाठी गेले आहेत!
मला वाटते की समस्या इथेच आहे. मुंबई तत्कालीन प्रदेशातील सर्वात महत्वाचे शहर असल्याने आंदोलन तेथे झाले होते. याचा अर्थ ते फक्त मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा आणि विदर्भाचा त्याच्याशी काही संबंध नाही असा होत नाही. वैदर्भीयांना संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्यांनी "आमचे आंदोलन मुंबई, पुणे, बेळगाव, मराठवाडा, विदर्भ यासह संयुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी आहे" अशी घोषणा करणे अपेक्षित होते का? ज्यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिले ते फक्त मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा याच करता होते हा पूर्वग्रह करून लेख लिहिला आहे असे मला वाटते. महाराष्ट्र एकीकरण समितीची निवडणुकीतली कामगिरी आणि त्यांना "केवळ" फक्त मुंबई कोकणात मिळालेले यश याचा मुद्दा मांडून वाचकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न इथे दिसतो कारण हीच महाराष्ट्र एकीकरण समिती गेली कित्येक दशके बेळगावमध्ये महानगरपालिका निवडणूक अविरतपणे जिंकत आहे याचा उल्लेख लेखकाने सोयीस्करपणे टाळलेला दिसतो. विदर्भाप्रमाणेच मराठवाड्यातील लोकांनीसुद्धा संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाशी आपला काही संबंध नाही असे म्हणावे का? राहिला मुद्दा वेगळ्या विदर्भाच्या विषयावर पश्चिम महाराष्ट्रातून होणाऱ्या आरडा ओरड्याचा, सगळे राजकारण आहे हो. जसे विदर्भ आणि मराठवाड्यात होणाऱ्या प्रत्येक वाईट गोष्टीसाठी जसा पश्चिम महाराष्ट्र जबाबदार असतो तसाच तो वेगळ्या विदर्भाच्या मागणीला होणाऱ्या विरोधालासुद्धा आहे, नाही का?

In reply to by विद्यार्थी

विदर्भातील लोकांचीमानसिकता आपण अचूक पकडलीत. या धागालेखकापेक्षा जास्त योग्य प्रतिवाद आपले ते हे सरही करतील इतका एकतर्फी धागा आहे हां बर काही बोलले की लेखकाचे मुद्दे सिध्द करत असल्याची ओरड अन न बोलले की आपोआप सहमती लेखकाला मिलनार... वा रे वा. मला वाटते या धाग्याच्या प्रिन्ताउत काढून लेखकाचे म्हनने मान्य होस्तवर सर्व पश्चिममराठी लोकांनी पुन्हा पुन्हा वाचायला हव्यात

त्यापेक्षा असं केलं तर - कोकण, पच्चिम म्हाराश्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश अशी ५ राज्यं करून टाकू. असंही महाराष्ट्रात एक सरकारवरचा कर्जाचा डोंगर सोडला तर 'महा' म्हणावं असं काय उरलंय?

विदर्भ आणि मराठवाड्या बद्दल प्रत्येक मुद्द्यावर विस्तृत लिहिण्याची गरज आहे. शेवटी लोकांचे ज्यात कल्याण असेल ते करावे पण खालील मुद्दे दुर्लक्षित करण्या सारखे नाहीतच: १) विकासाचा कालावधी: पश्चिम महाराष्ट्राचा विकास केवळ स्वातंत्र्य नंतर झालेला नाही. शिव-काळा पासून याची सुरुवात झाली आणि एक-एक क्षेत्रात विकास होत गेला. उदा. शिव-काळा पासून नेतृत्व विकास हि प्रक्रिया सुरु झाली आणि शिंदे-होळकर- गायकवाड हे सरदार उत्तरेत निर्माण झाले. त्या शिवाय संभाजी महाराजांच्या मृत्यू नंतर सामान्य जनतेने नेतृत्व करून दाखविले. अवघड परिस्थिती असताना कसे लढावे याच तंत्र पश्चिम महाराष्ट्रात रुजले. म्हणून लोकशाहीत सामान्य नेते पुढे येउन नेतृत्व करतात (यशवंतराव चव्हाण, आर आर पाटील, राजू शेट्टी, अन्ना हजारे). शिक्षण क्षेत्रात सावित्रीबाई फुले (१८९०), कर्मवीर भाऊराव पाटील, धोंडो केशव कर्वे, टिळक, आगरकर यांनी पश्चिम महाराष्ट्रात पूर्वी पासून काम केले. याच वेळी विदर्भ मध्य प्रांत मध्ये होता आणि मराठवाडा निजामाच्या राजवटीखाली होता. म्हणून तिकडे शिक्षणाचा प्रचार कमी आहे आणि उशिरा सुरुवात झालीये.थोडक्यात पश्चिम महाराष्ट्रात विकास प्रक्रिया २०० वर्ष पासून सुरु आहे. मराठवाडा आणि विदर्भात ती आत्ता सुरु झालीये. २) सामाजिक विकास पश्चिम महाराष्ट्रात फक्त आर्थिक विकासावर भर नसून सामाजिक विकास हा त्याच्या केंद्र स्थानी आहे. उदा. गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान: गाडगेबाबा विदर्भातले पण त्यांच्या नावाने स्वच्छता अभियान आर आर पाटीलांनी सुरु केले. कोणत्याही विदर्भ किंवा मराठवाड्यातील नेत्याला हि योजना का सुचली नाही? १९७२ च्या दुष्काळात आणलेली रोजगार हमी योजना जी आज म न रे गा म्हणून अख्या देशाने स्वीकारली ती वि स पागे (सांगली) यांची कल्पना आहे. जातीय आरक्षण हे कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी पहिल्यांदा दिले. विदर्भ आणि मराठवाड्यात मागासवर्गीय जास्त असताना तिकडे कोणी का अशा योजना आणू शकले नाही. फडणवीस सरकारची जाल्युक्त शिवार हि मागील सरकार च्या शेततळे उपक्रमाची कोपी आहे.सहकार पश्चिम महाराष्ट्रात जसा रुजला तसा तो विदर्भात का नाही रुजला? सहकारातून ग्रामीण रोजगार मोठ्या प्रमाणावर आहे. सामाजिक सुधारणांची जी मोठी पार्श्वभूमी पश्चिम महाराष्ट्राला आहे तशी तिकडे नाही. ३) तंत्रज्ञान तंत्रज्ञान सर्वाना समान आहे.पण ग्रामीण भागासाठी शेतीची उपकरणे तयार करणारे किर्लोस्कर कुठे तयार झाले? भारत फोर्ज कुठली? अशा किती कल्पना तिकडे तयार झाल्या? नागपूर चा पर्सिस्तंत सोफ्टवेर वाला पुण्यात का कंपनी काढतो? त्याला विदर्भात लोक मिळत नाहीत का? विजय भाटकर नागपूरचे. पण पुण्यात का राहावे लागते? कुठे तरी मूळ तंत्रज्ञान पुण्यात होते आणि संधी होत्या म्हणूनच. असे मूळ तंत्रज्ञान कुठेहि निर्माण होऊ शकते. ते तिकडे का केले जात नाही हा पश्चिम महाराष्ट्राचा दोष नाही. chaitanya wingkar Mar 23 (3 days ago) to Sunil तंत्रज्ञान सर्वाना समान आहे.पण ग्रामीण भागासाठी शेतीची उपकरणे तयार करणारे किर्लोस्कर कुठे तयार झाले? भारत फोर्ज कुठली? अशा किती कल्पना तिकडे तयार झाल्या? नागपूर चा पर्सिस्तंत सोफ्टवेर वाला पुण्यात का कंपनी काढतो? त्याला विदर्भात लोक मिळत नाहीत का? विजय भाटकर नागपूरचे. पण पुण्यात का राहावे लागते? कुठे तरी मूळ तंत्रज्ञान पुण्यात होते आणि संधी होत्या म्हणूनच. असे मूळ तंत्रज्ञान कुठेहि निर्माण होऊ शकते. ते तिकडे का केले जात नाही हा पश्चिम महाराष्ट्राचा दोष नाही. कापूस पिकतो विदर्भात पण कापूस एकाधिकार योजना बनवायला पश्चिम महाराष्ट्राचा सहकार मंत्री व्हावा लागला तेव्हा ती योजना झाली. कच्च्या मालावर प्रक्रिया करणारे उद्योगाच तिकडे नाहीत. संत्री, कापूस बाहेर पाठवावा लागतो यांना. उलट इचलकरंजी मध्ये कापूस पिकत नसताना प्रक्रिया केंद्र उभी केली ती बुद्धीच्या जोरावर. ४) मुलभूत क्षमता: प्रत्येक प्रदेशाची मुलभूत बलस्थाने आणि कमतरता असतात. त्याचा योग्य वापर करणे राज्यकर्त्यांना जमावे लागते. उदा. गोव्याला निसर्ग आहे म्हणून पर्यटन व्यवसाय आहे.कोकणात का नाही एवढा व्यवसाय? कारण तशी दृष्टी नाही. राजस्तान आणि गुजरात कडे पाणी नाही पण एकाने इंडस्ट्री आणि दुसर्याने पर्यटन विकसित केले. पश्चिम महाराष्ट्रात आज उस, साखर, गुळ, हळद, द्राक्षे, डाळिंब, दारू, सोफ्टवेर, मेटल-कास्टिंग, चादर आणि टेक्स्तैल असे अनेक उद्योग आहेत. नाशिक ला द्राक्ष होतात, कोकणात आंबे, नागपूर ला संत्री. मराठवाड्या बद्दल असे एक प्रोडक्ट सांगू शकाल? ज्या-त्या भागातील मुलभूत क्षमता ओळखून विकास करणे गरजेचे आहे. पाणी नसताना पण उसाच लावू हा अट्टाहास मराठवाड्याने का केला? स्वताच्या क्षमता माहित नसताना केवळ पैशासाठी हे उद्योग केलेत. मुद्दा हा आहे कि स्वताची बलस्थाने आणि कमतरता लक्षात घेऊन उद्योग उभारणी केली पाहिजे. ५) इतर घटक: कला-क्रीडा, मनोरंजन हि क्षेत्रे पण याला अपवाद नाहीत. सांगली नाट्य पंढरी आहे. कोल्हापूर हे कलापूर आहे.पुण्या मध्ये शास्त्रीय संगीत खोलवर रुजले आहे. अनेक कुस्तीपटू, धावपटू, स्वीमर्स, मल्लखांब खेळाडू, क्रिकेटर, बेड्मिन्तन, कब्बडी अशा अनेक खेळातील दिग्गज हे पश्चिम महाराष्ट्रात होतात ते त्यांच्या जिद्द आणि चिकाटीवर. अनेक गरीब कुटुंबातील मूल केवळ जिद्दीवर पुढे जातात. विदर्भ मराठवाड्यात खरा Deficit हा या जिद्दीचा आहे. दूरदृष्टीचा डेफ़िसिट आहे. वेगळे केल्याने या दृष्टीकोनात फरक पडायची काहीच शक्यता नाही. महाराष्ट्राच्या पैशावर या प्रदेशांना थोडातरी आधार मिळेल नाहीतर इथले नादान राज्यकर्ते लूट माजवतील हे आज पर्यंतच्या राजकीय इतिहासावरून स्पष्ट आहे. भाजपवाल्यांना हि महाराष्ट्राची नस सापडलेली नाही. शरद पवारांना हे पक्के माहित आहे म्हणून एवढे वर्ष सत्ता टिकवू शकले. हि पार्श्वभूमी विसरून भाजप काही उलटे करेल तर पुढे यश मिळायची शक्यता कमी आहे

In reply to by पुतळाचैतन्याचा

मनापासून मांडलेय सारे. बर्‍याच त्रुटी पण आहेत मराठवाड्याच्या आकलनात. उसाचा अट्टाहास हा मुद्दा सोडता जिद्द वगैरे कुणा एका प्रांताची मिरासदारी नसते. मराठवाड्याने निजामाशी जिद्दीनेच टक्कर देऊन मराठवाडा मिळवलाय. कित्येक मराठवाड्याचे लोक पुण्यामुंबईत जाउन यशस्वी झालेत. तेंव्हा जिद्द हा मुद्दा बाजूला ठेवा. दूरदृष्टीचे नेते लाभले नाहीत असे म्हणू शकतो. त्यामुळे भागाचा विकास, इन्फ्रास्ट्रक्चर आदी गोष्टी नाहीत अ‍ॅव्हेलेबल. विकास म्हणजे पुण्यामुंबईसारखेच मोठमोठे रस्ते, उड्डाण पूल, कंपन्यांचे चकचकीत आउटलेट, मॉल्स हे नव्हे. आणि तो तसा होऊ पण नये. प्रत्येक भागाची एक संस्कृती असते, त्या संस्कृतीला डोक्यात ठेउन दूरदृष्टीने विकास घडवण्याच्या एवजी राजकारण्यानी एकगट्ठा मतपेटी अशा दृष्टीने पाहिले. त्याचे दुष्परिणाम आज विदर्भ अन मराठवाड्याची जनता भोगतेय.

स्वाम्या, कामं नोत का तुले इचिभना!!! अब्यास कर ना सायच्या!! आईएएस व्हाचं न तुले? बापा काय इषय काळतं रे! इथं लेका मी बी प्रांतवादी सैनिक ठरतो!! तुयं लॉजिक कौन आइकन!!! सब्बन मोठे लोकं रायतेत अटीसा!!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

काहून फडफड करून र्‍हायले बाप्पू ! सब्बन मोठे लोकं रायतेत अटीसा!! हे कम सही बोल्ले भाउ. आपन आपलं चुपचाप कोपर्‍यात बसाव, मजा पहाव आनि टाईम आला की हळूचकन एक जोर्दार रट्टा हानाव.

In reply to by ए ए वाघमारे

आपन आपलं चुपचाप कोपर्‍यात बसाव, थेच तर नळते न भाऊ!!! आपुन अकोल्याचे लेकरं!आपल्याले दलिंद्री ज्यमत ना न भाऊ!! छाती ले माती अन नेमक्या जागी खुटे हाच आपला तेटरपना!! इकळे नथी मांगून तीर मारनारे भेटले म्हणून येणे सोल्डले अटीसा!!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

टाईम आला की हळूचकन एक जोर्दार रट्टा हानाव. हे नाइ वाचलं वाट्टे तुमी. आता रट्टे हानायचा टाइम आला हेच तं सांगून राहलो मी राजेहो. देवेंद्रभाउ अन नरेन्द्रभाऊ गळबळ करते वाट्टे २०१८त.

In reply to by स्वामी संकेतानंद

लढा बाप्पू. आमी हावोत पाठिंब्याला. निंघाला गर्दीत टांगा तर मराठवाडा बी निघन आल्लाद. ;)

In reply to by अभ्या..

आभारी हाय जनु मंडळ आपले! पर इच्छा नाही आता! ह्या स्वाम्या सारखे मित्र धागे टाकते झाले तर पसरतो बाकी जागी बोलायची इच्छा नसते!

In reply to by स्वामी संकेतानंद

लाज वाटते का फोकन्या स्वाम्या!! हरामखोरा मेगाबायटी धागे कहाड़तो अन नेमक्या जागी मले म्हावरे करतं काय चोट्ट्या सायच्या !! :D

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

सगळे प्रांतवादी आले म्हणून आम्हालाही यावंच लागेल. त्या सब्बन मोठ्या लोकाईच्या बैलाला होssssss ज्यांना आपला इथला वावर आवडत नाही त्यांच्या बैलाला होssssss

In reply to by संदीप डांगे

काय संदीपान्भो. दोन दिस लेट केलात जणू. लै गिराइक होतं धुळवडीला. कट्टाळून सोडून दिलं. जौ दे. तवा न बोंबलाणार्‍याच्या बैलाला होssssss

In reply to by अभ्या..

आरं बाबा. हिथं नाशकात हाय बाकी अजून धुळवड. ती असते पंचमीला. अजून आमची धूळवड सुरुच झाली नाही. तुम्ही चालू ठेवा आम्ही आहोत बोंबा मारायला. ;-)

लेख प्रचंड आवडला आहे. महाराष्ट्राचा भाग असण्यापेक्षा स्वतंत्र राज्य केल्यामुळे प्रशासनिक/आर्थिक/सामाजिक फायदे होणार आहेत का एवढाच स्वतंत्र विदर्भ करावा की नाही हे ठरविण्याचा मापदंड हवा. फुकाच्या मराठी बाण्यांना अगदी फाट्यावर मारावे. हे असले बाणे मातोश्री आणि कृष्णकुंज या ठिकाणच्या डेमॉगॉगच्या राजकारणाला साजेसे आहेत. आपल्यासारख्या सामान्य माणसांनी या असल्या भावनिक लढाईमध्ये न पडलेले श्रेयस्कर. स्वतंत्र विदर्भ झाला तरी भारत-पाकिस्तानसारखी फाळणी थोडीच होणार आहे? विदर्भ हे भारताचेच एक राज्य म्हणून राहणार आहे ना? मग काय फरक पडणार आहे विदर्भाचे वेगळे राज्य झाले तरी?

वरती बरेच जणांनी अस म्हटलं आहे की वेगळ राज्य मागत आहेत, वेगळ राष्ट्र नाही. मला दोन्ही मधला गुणात्मक (qualitative) फरक जाणून घ्यायचा आहे. व्हिसा लागेल वगैरे माहित आहे, पण बाकीच्या राज्यामुळ प्रगती होत नाही (किंवा बाकीच राज्य करू देत नाही) हा नियम असाच्या असा दोन्हीकड लागू होतोच की. शिवाय त्या जनतेला ठरवूद्या, इतरांनी नको हे देखील काही जणांनी म्हटलं आहे. हाच न्याय काश्मीर ला का लावू नये?

In reply to by सातारकर

लावायला हरकत नाही पण राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने ते भारताला परवडणार नाही असे वाटते!

In reply to by स्वामी संकेतानंद

म्हणजे भारताला त्रास होउ नये म्हणून आपण तो आपल्या मांडीखाली दाबून ठेवला तरी चालेल अस म्हणण आहे स्वामींच.

In reply to by सातारकर

हेच तर कन्हैय्या आणि पार्टी म्हणत होते की मग! पण ते देशद्रोही ठरले. तोच न्याय तुम्हालापण लावावा काय? - (स्वयंघोषीत देशभक्त) सोकाजी

ह्या स्वामीच्या धाग्यावरच सगळे सोयरे अन जुने हुच्चभ्रू पुंड का ब्रे भेटत असावेत असा एक प्रश्न माझ्यासारख्या सालस सज्जन मुलाला पडला आहे म्हणे मी!!

मला वाटत भावनिक मुद्द्यांकडे जितके दुर्लक्ष करता येइल ते योग्य. जेंव्हा प्रश्न सोडवायचे नसतात तेंव्हा भावनिक मुद्दे उचलले जातात. १०७ हुतात्मे, मराठी माणसाचे तुकडे हे तसेच भावनिक मुद्दे आहेत. तसेच पश्चिम महाराष्ट्रामुळे आमचा विकास झाला नाही हे विदर्भातल्या राजकारण्यांची ओरड तितकीच चुकीची आहे. स्वतःच्या नाकर्तेपणाचे खापर दुसऱ्यावर फोडण्यासारखे आहे. वेगळा विदर्भ हे आज काय परिस्थिती आहे आणि काय असावी हे बघून ठरावे. कदाचित महाराष्ट्र राज्य आज बरेच मोठे असेल. ठाणे जिल्हा मोठा होता प्रशासकीय दृष्टीने योग्य नव्हते म्हणून पालघर जिल्हा केलाच ना. तीच गोष्ट चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याची. पूर्वी विदर्भातल्या लोकांचे रोटीबेटीचे व्यवहार मध्यप्रदेश, छत्तिसगड, तेलंगणातल्या लोकांशी व्हायचे आजही होतात. फार फरक पडला नाही. इतर महाराष्ट्र सोबत रोटीबेटीचे व्यवहार पूर्वी व्हायचे, आज होतात, पुढेही होत राहतील.तेंव्हा भाषा, संस्कृती असले मुद्दे बाजूला सारुन प्रशासकीय सोय, राजकीय व्यवस्था, अर्थव्यवस्था या मुद्द्यांकडे बघून विदर्भ किंवा इतर कुठलेही राज्य बनवताना करायला पाहीजे. राज्य वेगळे झाले म्हणून ना भाषा बदलत ना संस्कृती.

In reply to by मित्रहो

राज्य वेगळे झाले म्हणून ना भाषा बदलत ना संस्कृती.
हेच म्हणतो, भाऊ..

एक अडाणी प्रश्न! महाराष्ट्राच्या पश्चिमेला भौगोलिकदृष्ट्या कोकण आहे. मग पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर विभागाला पश्चिम महाराष्ट्र का म्हणतात? :-)