मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

द्रौपदी वस्त्र हरण

साहना · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
आपल्या सर्वांना हे माहिती आहेच की युधिष्ठीर दुर्योधनाशी द्यूतात द्रौपदी हरला. दुर्योधनाने मग दुष्यासनाला सांगितले की द्रौपदीला धरून ओढत फरपटत दरबारात घेऊन यावे. तिला तिथे आणल्यावर दुर्योधनाने दुष्यासनाला द्रौपदीला विवस्त्र करायला सांगितले. द्रौपदीने सर्वांकडे मदतीची याचना केली - आपले पती, भीष्म पितामह, राजा धृतराष्ट्र, परंतु कोणीही हा अन्याय, अनर्थ थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. त्या क्षणी त्या ठिकाणी कृष्णाने शपथ घेतली की तो तिथे उपस्थित असलेल्या त्या सर्व लोकांचे प्राण घेईल ज्यांनी द्रौपदीच्या या बेअब्रू होण्याचा देखावा पाहिला आणि तिची मदत केली नाही. कृष्णाने पांडवांचे देखील प्राण घेतला असता , परंतु द्रौपदीचे कुंकू, तिचे सौभाग्य असल्यामुळे ते वाचले. पांडवांच्या व्यतिरिक्त एक आणखी असामी होती जी त्याच्या क्रोधापासून बचावली - ते होते कृपाचार्य. कारण जेव्हा द्रौपदी सगळ्यांकडे मदत मागत होती तेव्हा त्यांनी एक बोट दर्शवून तिला इशारा केला होता की सर्वांकडे मदतीची याचना करण्यापेक्षा त्या एका शक्तीकडे मदत माग. द्रौपदीला त्यांचा इशारा क्षणात समजला आणि तिने स्वतःला कृष्ण्चरणी अर्पण केले. "आम्हाला काळजी नाही त्याची, त्याला आपली काळजी आहे आपल्या प्राणांचा रक्षक सुदर्शन चक्रधारी आहे" केवळ कथा आहे. काथ्याकुट करायची गरज नाही.

वाचने 23979 वाचनखूण प्रतिक्रिया 128

In reply to by अत्रुप्त आत्मा

निरर्थक स्वात्मकुंजन च पण सुधारित पुरोगामी अंनिसअ‍ॅप्रुव्ह्ड सत्यनारायणापेक्षा नक्कीच सुंदर !

In reply to by अत्रुप्त आत्मा

बॅटमॅन Sat, 04/02/2016 - 13:22
बुव्या अलीकडे फार अतीच कुंथू लागलाय. त्याच त्या स्मायल्या आणि तेच ते शब्द वापरून दरवेळेस नवा अर्थ पैदा होतो असे वाटतेय का ;)

हेमंत लाटकर Sun, 03/27/2016 - 11:56
महाभारत युद्धासाठी योग्य ठिकाण जेव्हा युद्ध सुरु होण्याची चिन्ह दिसत होती तेव्हा कृष्ण योग्य जागेच्या शोधात होता. तो एका ठिकाणावरून जात असताना त्याने पाहिलं की एक स्त्री आपल्या एका हातात लहान मूल आणि दुसऱ्या हातात आपल्या पतीसाठी जेवण घेऊन शेतावर जात होती. काही कारणाने शेताची वई (संरक्षक भिंत) मोडली होती आणि त्यातून पाणी बाहेर वाहून जात होतं. स्त्रीने मुलाला त्या जागेत बसवलं, जेणेकरून पाणी वाहायचं थांबेल आणि तिच्या पिकाला नुकसान होणार नाही. हे पाहून कृष्णाला वाटलं की हेच स्थान योग्य आहे, कारण या स्थानावर त्याने एका आईच्या वात्सल्याचा खून होताना पाहिला, आणि त्याने त्या स्थानाला कुरुक्षेत्राच्या युद्धासाठी निवडलं.

In reply to by हेमंत लाटकर

DEADPOOL Sun, 03/27/2016 - 13:32
मस्त स्टोरी सांगितली लाट्कर सर! आजपर्यंत बऱ्याचदा महाभारत वाचल्यावरही ही गोष्ट माहिती नव्हती!

In reply to by हेमंत लाटकर

Ram ram Sun, 03/27/2016 - 15:23
हमरे गांव में एक बाबा आया था उसने बताया एेसा था कि खेत से पानी बह न जाए इसलिए उस आैरत ने फावडे से बच्चे का सर काटकर वहां लगा दिया, उसके पतिने पुछा ताे आैरत ने कहा बच्चे का क्या बच्चे आैर पैदा करेंगे

In reply to by प्रचेतस

चौथा कोनाडा Sun, 03/27/2016 - 12:30
निम्बुडा .... निम्बुडा..... निम्बुडा, काच्या, काच्या छोटा छोटा निम्बुडा लाई दो... (भारी चर्चा धागा, पण शेवटच्या वाक्यात काथ्याकुट करायचा नाय या धमकीवजासुचने मुळे आता गाण्याच्या भेंड्याची धमाल येणार ! :-))) )

भाऊंचे भाऊ Sun, 03/27/2016 - 12:38
मुझसे प्यार करना है इतना तु समजले अछ्चा लगूं आजा नैते बचके तू निक्कले जय माता के भक्त है वादोंके सख्त है आकाशसे हम आये और मनके हम है सच्चे मरती है हमपे लडकिया बुढे और बच्चे ....... अरे ना हम अमिताभ ना दिलीपकुमार, ना किसी हीरो के बच्चे हम है सीधे साधे अक्षय अक्षय कभी बांग कभी बूंग ऐसे अक्षय

In reply to by भाऊंचे भाऊ

चौथा कोनाडा गुरुवार, 03/31/2016 - 17:29
सॉरी, टाईमप्लिज मोड मध्ये होतो... आता सुरु... हे घ्या य वरनं गाणं ... यम्मा यम्मा, यम्मा यम्मा, ये खुब सुरत समॉ ... बस आज की रात हैं जिंदगी कल हम कहां, तुम कहां !

विवेक ठाकूर Sun, 03/27/2016 - 14:04
१) सध्या जुगारात हरल्यास द्रौपदी म्हणेल, `तुम्ही तुमची (देणी) फेडा,.... मी काहीही फेडणार नाही'. २) आधुनिक दुर्योधनाला फेडरर म्हणतात आणि बघ्यांना आंबट शोकर्स. फेडाफेडी आंगलट येईल हे ओळखून फेडरर्सनी वेगळे दरबार काढले आहेत त्यांना डान्स बार म्हणतात. तिथे जुगारात हरले तरी देणी पैश्यातच फेडावी लागतात,... त्यामुळे वस्त्र फेडण्याची पाळी येत नाही. ३) ही केवळ वस्तुस्थिती आहे. यावर काथ्या कुटल्यास सुदर्शन चक्र सोडण्यात येईल.

Ram ram Sun, 03/27/2016 - 15:31
जर कृष्ण शहाणा हाेता तर त्याने पांडवांना जुगार वाईट असताे हे का शिकवले नाही, महाभारत घडण्यास केवळ ताेच कारणीभूत हाेता. रच्याक ने बायकाेला जुगारात लावणारे पांडव किती xxxx असतील?

In reply to by असंका

पिलीयन रायडर Mon, 03/28/2016 - 14:50
वेगळं.. एकाच प्रसंगाची तीन गाणी मला माहिती आहेत. अजुनही असतील.. १. चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला.. भरजरी फाडुन शेला.. २. भरजरी ग पितांबर दिला फाडुन, द्रौपदीसी बंधु शोभे नारायण.. ३. माझीया मंदिरी, नाही एकही चिंधी, शालु शेले अपरंपार.. कृष्णा.. कशी रे लागली रक्ताची धार, तुझीया बोटाला..

In reply to by पिलीयन रायडर

lgodbole Tue, 03/29/2016 - 12:44
पितांबर बायका नेसायच्या की पुरुष ?

सिरुसेरि Mon, 03/28/2016 - 07:48
शामची आई मधले "द्रौपदीसी बंधु शोभे नारायण" हे गाणे आठवले . त्या सिनेमात एरवी सदा न कदा भांडत असलेल्या बायका हे गाणे मात्र एकजुटीने मिळुन मिसळुन म्हणतात .

गॅरी शोमन Mon, 03/28/2016 - 12:05
एकच कृष्ण राजकारणात आहे त्याच नाव लालकृष्ण. वयाच्या ८८ व्या वर्षी ( चुक भुल द्यावी घ्यावी ) तो भाजपच्या बाजुने आहे. सध्या कन्हैया जे करतोय त्या बाललीला आहेत. जे एन यु नावाचे गोकुळ आहे तिथे म्हणे त्याने एका गोपीला त्रास दिला होता.

In reply to by गॅरी शोमन

भाऊंचे भाऊ Tue, 03/29/2016 - 12:54
बालपणी कृष्ण गोप्यांच्या चोळ्या लुगड़े पळवुन त्रास देतच असत पण मोटेपनी तेच द्रौपदीसाठी वस्त्र घेउन धावू रायले ना भावा

In reply to by DEADPOOL

भाऊंचे भाऊ Sat, 04/02/2016 - 12:19
पण बायकोला नसेल आशा परिस्थितीत बायकोने कृष्णाचा धावा सुरु केला तर कृष्ण कोणाची बाजू घेइल विशेषत: धर्माला मान्य असलेला काम तो मीच असे तो छातीठोक पणे अर्जुनाला सुनावतो ?

In reply to by टवाळ कार्टा

तर्राट जोकर Wed, 03/30/2016 - 18:06
असं नाय करायचं टकाभाऊ, अडचणीचे प्रश्न आले की संस्कृत श्लोक द्यायचा असा प्रघात आहे ना? आता संस्कृतचे अर्थ हजार. तुम्हाला पाहिजे तो काढून घ्या . =))

In reply to by टवाळ कार्टा

तर्राट जोकर Wed, 03/30/2016 - 18:08
भावार्थ : अपनी योगमाया से छिपा हुआ मैं सबके प्रत्यक्ष नहीं होता, इसलिए यह अज्ञानी जनसमुदाय मुझ जन्मरहित अविनाशी परमेश्वर को नहीं जानता अर्थात मुझको जन्मने-मरने वाला समझता है.

In reply to by टवाळ कार्टा

तर्राट जोकर Wed, 03/30/2016 - 20:05
मी सर्वत्र असलो तरी माझ्या योगमायेमुळे प्रकट नसतो. त्यामुळे अज्ञानी जन मला जन्म मरण घेणारा समजतात पण मी तसा जन्म मरण नसलेला अविनाशी परमेश्वर आहे. अर्थ असा आहे की लाटकर सर पांडवांबरोबर झालेल्या प्रकाराला श्रीकृष्ण थांबवू शकले असते असे म्हणतात. पण श्रीकृष्ण म्हणतो मी तर प्रत्येक ठिकाणी आहे पण अज्ञानी जनास दिसत नाही. पांडव अज्ञानी होते म्हणून द्युतास सामोरे गेले, हे त्यांचे कर्मच आहे, हे कर्म स्वत: भगवानांनी करुन घेतले. त्यानंतर झालेले दुष्परिणाम हेही भगवंतांचीच लिला आहे. मग अशा वेळेस भगवंत तिथे नव्हते असे कसे म्हणायचे? मी म्हणालो की वेळेवर हजर नसतात. कारण भगवंत म्हणतात मी माझ्या योगमायेमुळे प्रकट होत नाही, म्हणजे जिथे गरज आहे असे आपल्याला वाटते तिथे भगवंताला गरज वाटत नाही हजर असण्याची. तुमची कर्म तुम्हाला त्या क्षणापर्यंत आणतात. दु:खद प्रसंगात भगवंत हवे असतात, पण भगवंत असतील तर दु:खाचे प्रसंग का निर्माण होतात? आता ह्या प्रश्नाचे उत्तर वरचा परिच्छेद आहे. आप कन्विन्स हुए या मै और बोलू?

In reply to by तर्राट जोकर

आनंदी गोपाळ Wed, 03/30/2016 - 20:50
तुमच्या पेशन्सचे अभिनंदन @ तजो. इतका सर्वशक्तीमान तो विश्वरूपदर्शन दाखवणारा कृष्ण, साक्षात विष्णूभौंचा अवतार, द्रौपदीने धावा केल्यानंतर दुर्योधनाच्या कानाखाली जाळ काढायचा सोडून तिच्या अंगावर लुगडी का फेकत बसलेला हेच मला कळत नाहिये. भाकडकथा सांगायची अन तिच्या स्पष्टीकरणाला दुसरी भाकडकथा, हे लय भारी आहे या सगळ्या ष्टोर्‍यांतून.

In reply to by आनंदी गोपाळ

तर्राट जोकर Wed, 03/30/2016 - 21:12
भाकडकथा सांगायची अन तिच्या स्पष्टीकरणाला दुसरी भाकडकथा, हे लय भारी आहे या सगळ्या ष्टोर्‍यांतून. सत्यवचन. असेच रावणाने सीतेला स्पर्श न करण्याला काहीतरी शापाचे कारण देतात. मुळात रावण एक मर्यादापुरुषोत्तम, पण तसे दाखवले तर रामाचा इम्पॉर्टन्स कमी होइल म्हणून शापाची ष्टुरी.

In reply to by तर्राट जोकर

भाऊंचे भाऊ गुरुवार, 03/31/2016 - 08:08
फार सोपे असते. नाही ? आपली बायको थोडीच त्याने पळवलेली असते

In reply to by भाऊंचे भाऊ

तर्राट जोकर गुरुवार, 03/31/2016 - 13:04
अगदी बरोबर. आपली बायको तिच्या मर्जीविरूद्ध पळवून नेल्या जाते, तिचे संरक्षण करण्यात आपण कमी पडतो वरुन तिचीच सत्वपरिक्षाही घेतो तीही एकदा नाही दोनदा, एवढे होऊनही फालतू लोकांच्या सांगण्यावरुन गर्भवती पत्नीचा त्याग करुन मोकळे होतो. आणि आम्ही मर्यादापुरुषोत्तम असतो. असो. काल्पनिक कथेतल्या कॅरेक्टर्सबद्दल आप आपले इंटरप्रिटेशन असणे साहजिक आहे. कोणासाठी राम महान कोणासाठी रावण. बाकी कोणी रामायणाला इतिहास समजत असेल तर समजो बापडा. इतिहास जरी असला तरी जेत्यांचाच आहे. त्यामुळे भांडण्यात काही अर्थ नाही. ;-)

In reply to by तर्राट जोकर

भाऊंचे भाऊ गुरुवार, 03/31/2016 - 13:34
पण आपण भडास काढत आहात तर हो रामाने जनतेला त्रास दिला नाही, दुसर्यांच्या बायका पळवल्या नाहित. देवताना(?) बंदी बनवले नाही व रावणाला पुरून उरला या गोष्टी तोच रावणाविरुध्द विजेता ठरावा यासाठी पूरक आहेत. इतिहास जेत्यांनिच लिहायचा असतो. हो मर्यादा पुरुषोत्तमच. कारण पत्नीचा त्याग करून त्याने दुसरे लग्न केले नाही तो ही व्रतस्थ राहिला. याची बायको दोन दिवस माहेरी गेली की उच्छाद मांडनार्यानी विशेष नोंद घ्यावी मर्यादा पुरुषोत्तमच. तसेच कोणालाही फालतू न समजायची त्याची प्रवृत्ती वर्णव्यवस्थेला लगावलेली कान्फ़टात आहे

In reply to by भाऊंचे भाऊ

तर्राट जोकर गुरुवार, 03/31/2016 - 15:09
गुड =)) मग रावणाला मर्यादापुरुषोत्तम म्हटले तर का भडकले ब्वा लोक? रामाला तर मूळ प्रतिसादात काही बोल लावले नव्हते. स्त्रेंज.

In reply to by तर्राट जोकर

टवाळ कार्टा गुरुवार, 03/31/2016 - 13:46
राम जेता होता त्यामुळे त्याच्या श्टोरीत तोच हिरो असणार...इतिहास्/कथा नेहमी जेते लिहितात असे तुम्हीच मान्य केलेत की http://www.misalpav.com/comment/823511#comment-823511 कदाचित लंकेत गेलात तर तिथे रावणाला हिरो बोलणारे कदाचित भेटतीलही तुम्हाला...तिथे गेल्यावर मग त्याला राम कसा ग्रेट होता असे सांगू नका =))

In reply to by टवाळ कार्टा

तर्राट जोकर गुरुवार, 03/31/2016 - 15:13
असु देत ना हिरो, रामायण महाभारतातल्या कॅरेक्टर्सची चिकित्सा करायला मनाई आहे का इस्लाममधे पैगंबरची आहे तशी?

In reply to by आनंदी गोपाळ

टवाळ कार्टा गुरुवार, 03/31/2016 - 13:46
आपण मला लहान बाळ समजत असाल तर तुमचा गैरसमज दूर करण्याचा मस्त उपाय आहे माझ्याकडे पण असो बाकी भाकडकथा असो वा कोणतीही दुसरी कथा असो...त्यात एक चांगला आणि एक वाईट असेच असणार....त्याशिवाय लोक ती कथा विंट्रेश्ट घेउन वाचणार कशी...आता भारतीयांना राम चांगला वाटणार तर कदाचीत श्रीलंकेत रावणाला पुजले जात असेल (खखोदेजा) पण त्याचे कारण म्हणजे इतिहास / कथा नेहमी जेतेच लिहितात...अब्दाली आपल्यासाठी व्हिलन असला तरी अफगाण लोकांसाठी सम्राट होता/आहे....तसेच आहे हे....असो