✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

१०५( की १०७?) हुतात्मे आणि वेगळा विदर्भ

स
स्वामी संकेतानंद यांनी
Fri, 03/25/2016 - 15:49  ·  लेख
लेख
पूर्वी १०५ आकडा दिला जाई, हल्ली हल्ली १०७ म्हटले जाते.( एक कोल्हापूरकर नाव आहे, दुसरे माहीत नाही). तर आपण सोयीसाठी १०७ हुतात्मे धरू. त्यांची संख्या इथे महत्वाची नाही तर त्यांच्या हौतात्म्याचे कारण महत्वाचे आहे. वेगळ्या विदर्भाचा विषय निघाला की एकदम भावनिक मुद्दा काही हळवे मावळे पुढे आणत असतात. ' संयुक्त महाराष्ट्रासाठी १०७ हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे, त्यांचे बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही' या आशयाचे वाक्य फेकले जातात. मी म्हटलं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा इतिहास पाहू जरा. मराठी विश्वकोश वाचले(विकिपंडित म्हणू नये म्हणून. ;) ) तर कळले की हे बळी मुंबई महाराष्ट्राला मिळावी म्हणून गेले होते! विदर्भ महाराष्ट्रात यावा म्हणून नाही. मुंबई सोन्याचे अंडे देणारी कोंबडी होती जणू, महागुजरात आणि महाराष्ट्र दोघांनाही पाहिजे होती. केंद्र सरकारने मुंबईच्या प्रश्नाचा तिढा सोडविण्यासाठी ‘त्रिराज्य योजना’ जाहीर केली. या योजनेत सौराष्ट्रासह गुजरात, विदर्भ व मराठवाडयासह महाराष्ट्र आणि मुंबई हे शहरराज्य अशा प्रकारची तीन राज्ये स्थापन करण्याचा विचार मांडला. महाराष्ट्रास मुंबई दयावयास केंद्र सरकार तयार नव्हते. या वेळी घडलेल्या हिंसाचारात १५ माणसे ठार झाली. पुढे केंद्राने जेव्हा मुंबई केंद्रशासित करायचा निर्णय घेतला तेव्हा पुन्हा उद्रेक झाला. या खेपेला ७६ लोकांचा बळी गेला. तसेच निवडणुकांचे निकाल पाहिले तर महाराष्ट्र एकीकरण समितीला यश फक्त कोंकण आणि पश्चिम महाराष्ट्र इलाख्यात मिळाले. मराठवाड्यात किंचित आणि विदर्भात अजिबात नाही. म्हणजे लक्षात येईल की, संयुक्त महाराष्ट्र किंवा मुंबईसह महाराष्ट्र हा विदर्भासाठी मुद्दा कधीच नव्हता! तेव्हा हुतात्मे, संयुक्त महाराष्ट्राचा लढा वगैरे भावनिक मुद्दे विदर्भासाठी लागू होऊ शकत नाही. उद्या मुंबई वेगळी करायचे कोणी बोलले तर नक्कीच विरोध व्हावा, बळी मुंबईसाठी गेले आहेत! या लेखाचा मुद्दा विदर्भ वेगळा व्हावा की नाही हा नाही, तर वेगळ्या विदर्भाचा मुद्दा आला की पश्चिम महाराष्ट्रातले लोकच जास्त तावातावात बोलतात हा आहे! मी विदर्भातला आहे त्यामुळे एवढे नक्की सांगू शकतो की आम्हाला मुंबई महाराष्ट्रात असावी की नको याचे सोयरसुतक नाही, आधीही नव्हते, आताही नाही. त्यामुळे मुंबईसाठी झालेल्या आंदोलनाचा संबंध विदर्भाशी जोडून उगाच भावनेला हात घालणाऱ्या पोस्टी टाकण्यात आणि भाषणे करण्यात अर्थ नाही. विदर्भ पूर्वी वेगळा होता, विदर्भाच्या लोकांनी महाराष्ट्रात समावेश व्हावा म्हणून आंदोलन केलेलं नव्हतं तर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा या मागणीस बळ मिळावे म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांनी विदर्भासोबत नागपूर करार करून त्यांना सोबत घेण्यात आले. आणि विदर्भ वगळता द्वैभाषिक राज्य मान्य होत नव्हते म्हणून समितीने नव्या द्वैभाषिक राज्यात विदर्भाला घेतले अन्यथा विदर्भ वगळून पण ते मुंबईसह द्वैभाषिक राज्याला तेव्हा तयार होते हे लक्षात घेतले पाहिजे. सगळे लफडे मुंबईपायी झालेत, विदर्भासाठी कुणी गोळ्या खाल्ल्या नाहीत तेव्हा. अजून एक उदाहरण देता येईल ते आंध्रचे. आंध्र वेगळे व्हावे म्हणून पोट्टी श्रीरामुलु या नेत्याने (खरेखुरे) आमरण उपोषण केले. त्यांच्या बलिदानानंतर जे राज्य अस्तित्वात आले त्यात तेलंगण नव्हते. आताचे रायलासीमा आणि सीमांध्र होते. नंतर तेलंगण आले. आता जेव्हा तेलंगण राज्यासाठी चळवळ सुरु होती तेव्हा कोणीही पोट्टी श्रीरामुलु ह्यांच्या बलिदानाची आठवण करून देत बसले नाहीत. सगळे झगडे हैदराबादसाठी होते. हैदराबाद तेलंगणात नसते तर आंध्रच्या नेत्यांनी परत तेलंगण वेगळे करायला विरोधही केला नसता. आम्ही ना मुंबई मागत आहोत ना पुणे! नागपूरात पण असे काही नाही की पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांनी त्यासाठी गोळ्या खाव्यात! उलट गोंदिया-गडचिरोलीला पोस्टिंग आली की जणू काळ्या पाण्याला पाठवले असे वाटते आणि मंत्रालयात खोके पोचवून ट्रान्सफर करवून घेतात. किती लोक तिकडून इकडे आनंदाने पोस्टींगवर पूर्ण वेळ राहतात? म्हणजे विदर्भावर तुमचे प्रेम उतू चालले आहे असेही नाही! मग वेगळ्या विदर्भाचा मुद्दा आला की एकदम चिडून जाण्यासारखे काय आहे? आपण काहीतरी मोठ्ठे गमावतोय असे का वाटते? विदर्भ हा फक्त तुमच्या इगोला सुखावणारा एक फील गुड फॅक्टर आहे का? की विदर्भ म्हणजे 'प्राइझ्ड पजेशन' आहे तुमचे? आपने खुल के मुहब्बत नहीं की है हमसे आप भाई नहीं कहते हैं मियाँ कहते हैं --मुनव्वर राना
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
राजकारण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
27877 वाचन

💬 प्रतिसाद (130)

प्रतिक्रिया

पूर्णपणे सहमत

श्रीरंग_जोशी
Fri, 03/25/2016 - 16:17 नवीन
लेखाच्या आशयाशी पूर्णपणे सहमत.
  • Log in or register to post comments

२ वर्षांपूर्वी उन्हाळ्यात

विवेकपटाईत
Fri, 03/25/2016 - 16:23 नवीन
२ वर्षांपूर्वी उन्हाळ्यात चंद्रपूरला गेलो होतो. घरा शेजारी मोठे विद्यत केंद्र, पंचक्रोशीत हि ४-५ सरकारी आणि निजी. तरीही रोज १० तास वीज नव्हती. (विदर्भाच्या गरजेपेक्षा किमान १० पट जास्त वीज निर्मिती विदर्भात होते). ज्या राज्यांत वीज निर्मिती जास्त आहे, तिथे विजेचे बिल कमी असते. उदा: हिमाचल प्रदेशला प्रत्येक जल विद्युत योजनेत १५-२५% वीज मुफ्त मिळते. ३ रुपये निर्मिती लागत असलेल्या विजेसाठी विदर्भकराना, मुंबई सारखे बिल भरावे लागत. मुंबईला २४ तास वीज मिळते आणि विदर्भातल्या अनेक गावांत वीज नाही आहे. शिवाय चंद्रपूर नागपूर सारख्या शहरांत हि वीज कट असतेच. विदर्भ अलग झाला तर छत्तीसगड सारखे विदर्भात २४ तास वीज राहील. विदर्भाचा विकासाला वेग येईल. सोन्याची मुर्गी हातची जाईल.
  • Log in or register to post comments

विवेकसाहेब निर्मीती पारेषण व

मितभाषी
Fri, 03/25/2016 - 23:39 नवीन
विवेकसाहेब निर्मीती पारेषण व वितरण या वेगळ्या कंपण्या आहेत. कंपण्यांच्या नावावरून त्यांची कार्यकक्ष कळते. लोडशेडींग रिकव्हरीवर अवलंबून आहे. एक महिना बिल भरले नाही तर काय होते ते एखाद्या मुंबईकराला विचारा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

विज नियामक आयोग एक संस्था आहे.

मितभाषी
Fri, 03/25/2016 - 23:43 नवीन
लिहीण्यासारखे खूप आहे. पण आता टंकाळा आला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितभाषी

एकदा चंद्रपूरला या आणि वास्तव

विवेकपटाईत
Sat, 03/26/2016 - 13:16 नवीन
एकदा चंद्रपूरला या आणि वास्तव अनुभवावा. विदर्भचे लोक हि बिल नियमित पणे. विजेची सर्वस्त जास्त चोरी उद्योगात होते. विश्वास नसेल तर वितरण वितरण कंपनीत कार्य करणार्याला विचारा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितभाषी

विश्वासाचा प्रशन नाही साहेब.

मितभाषी
Sat, 03/26/2016 - 23:52 नवीन
विश्वासाचा प्रशन नाही साहेब. तुम्ही क्रूपया अभ्यास वाढवा. मी गेले २१ वर्षे याच क्षेत्रात काम करत आहे. विदर्भात माझे आजही काम चालू आहे व सर्व फर्सटहॅड आकडे माझ्याकडे आहेत. फक्त फेकाफेकी करू नका हि विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

विदर्भ अलग झाला तर छत्तीसगड

काळा पहाड
Fri, 03/25/2016 - 23:54 नवीन
विदर्भ अलग झाला तर छत्तीसगड सारखे विदर्भात २४ तास वीज राहील.
म्हणूनच अर्थशास्त्र हा विषय शाळेत असताना कंपल्सरी शिकवला पाहिजे. तो फार महत्वाचा विषय आहे. मुंबई वेगळ्या विदर्भाकडून वीज सहज विकत घेवू शकतो. खरं तर सध्या जी वेगवेगळी राज्ये वीज विकतायत, त्या मधून मुंबई सहज सर्वात कमी खर्चाचा पुरवठादार शोधू शकतो. मुंबई फक्त वीजेवर अवलंबून नाहीये. तिला लागणारी ती फक्त एक गोष्ट आहे. बाकी विदर्भ वेगळा झाला तर ते पश्चिम महाराष्ट्रासाठी चांगलंच आहे. एक तर नोकरशाही विभागली जाईल, त्यामुळे सरकारवरचा नोकरशाहीवरचा खर्च वाचेल. दुसरं म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात उगम पावणार्‍या गोदावरी चं पाणी मराठवाड्याकडे वळवता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

सहमत!

DEADPOOL
Fri, 03/25/2016 - 16:26 नवीन
सहमत! पण काय आहे ज्यांनी विदर्भ मागणी पुढे रेटायचि तेच आज मुम्बईच्या सिंहासनावर बसून विदर्भचा अनुशेष भरून काढू अशा वल्गना करतायेत! वेगळ्या विदर्भाचा विषयच नाही! जोपर्यंत वेगळा विदर्भ होणार नाही तोपर्यंत विकास नाही! ----एक पश्चिम महाराष्ट्रीय
  • Log in or register to post comments

लेखकाने

नाना स्कॉच
Fri, 03/25/2016 - 16:38 नवीन
स्पष्ट लिहिलेले खालील वाक्य आपण वाचलेले नाहीत काय?? या लेखाचा मुद्दा विदर्भ वेगळा व्हावा की नाही हा नाही, ************************************** तर वेगळ्या विदर्भाचा मुद्दा आला की पश्चिम महाराष्ट्रातले लोकच जास्त तावातावात बोलतात हा आहे! हे ही लेखक महाशय बोलले आहेत, अन ते उगाच अभिनिवेषात येऊन कंसात पश्चिम महाराष्ट्रियन वगैरे लिहून आपण सिद्ध करताय इतके नोंदवतो!! असो!.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: DEADPOOL

शुद्धिपत्रक

नाना स्कॉच
Fri, 03/25/2016 - 16:53 नवीन
ते कंसात असे न वाचता स्वाक्षरीत असे वाचावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

हम्म या न्यायाने

भाऊंचे भाऊ
Fri, 03/25/2016 - 17:00 नवीन
भारतातील बरीच राज्ये एक स्वतंत्र देश बनू शकतात... आणि एक पश्चिम महाराष्ट्रीयन म्हणून मी त्याचा निषेध करतो
  • Log in or register to post comments

Nation ही संकल्पना लक्षात

स्वामी संकेतानंद
Fri, 03/25/2016 - 17:24 नवीन
Nation ही संकल्पना लक्षात घेतली तर तुमचे म्हणणेही खरेच आहे हे लक्षात येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाऊंचे भाऊ

काय भाऊ राज्य अन देश ह्यात

नाना स्कॉच
Fri, 03/25/2016 - 17:25 नवीन
काय भाऊ राज्य अन देश ह्यात तरी फरक करा! अन त्याहुन जास्त म्हणजे तुम्ही परत परत लेखकाचाच मुद्दा सिद्ध करताय झाले!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाऊंचे भाऊ

लेखकाला इतकेच म्हणायचे आहे की

भाऊंचे भाऊ
Fri, 03/25/2016 - 17:45 नवीन
पश्चिम मराठी लोकांनी आपले तोंड बंद ठेवावे अन एक पश्चिम मराठी माणुस म्हणून माझे तोंड उघडून मी हेच सांगेन की काश्मीर हां भारताचा अविभाज्य भाग आहे भलेही उभ्या आयुष्यात मी कधीही काश्मिरला स्थायिक होणार नसेन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

आराररा

नाना स्कॉच
Fri, 03/25/2016 - 17:50 नवीन
आराररा मालक जरा गुळ पाणी घेता काय वैच?? कच्याला जीव तापविता जनु!! एकाव एक उदाहरणे गोळ्याझाडल्यागत हानतायसा तुमी पर सगळी हुकल्याली हैती हो!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाऊंचे भाऊ

भाऊ की गोली अपना निशाना खुद ढूंड लेती है

भाऊंचे भाऊ
Fri, 03/25/2016 - 17:56 नवीन
हुकने का चान्सिच नय बस थर्ड हम्पायर प्रामाणिक होना मंगता... पश्चिम मराठी म्हणून पुन्हा सांगतो केवळ गवतही उगवत नाही आशा जमिनीवर रहायला मी जाणार नाही पण म्हणून ती जमीन मी चीनच्या ताब्यात द्यायला माझा स्पष्ट विरोध आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

लेख आवडला

पैसा
Fri, 03/25/2016 - 17:15 नवीन
लहान राज्ये जास्त जास्त कार्यक्षमरीत्या चालवली जातात असे वाटते. हिंदीभाषी अनेक राज्ये असू शकतात तर मराठीभाषी का नकोत? तसे वर्‍हाडातल्या लोकांना मुंबई फार लांब आहे. गोवा सार्वमताच्या वेळी मुंबई फार लांब आहे, त्यापेक्षा पणजी राजधानी असली तर जास्त बरे हा एक मुद्दा प्रभावी ठरला होता. परंतु विदर्भाकडे उत्पन्नाची मुंबईसारखी काय साधने आहेत? की वेगळे राज्य केल्यावर निधीसाठी केंद्र सरकारवर अवलंबून रहावे लागेल?
  • Log in or register to post comments

पण मुद्दा सध्या तो नाहीच्चै

स्वामी संकेतानंद
Fri, 03/25/2016 - 17:22 नवीन
पण मुद्दा सध्या तो नाहीच्चै!मुद्दा हा की संयुक्त महाराष्ट्र समर्थक आवाज विदर्भातून कमी, पश्चिम महाराष्ट्रातूनच जास्त निघत आहेत हा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

ओके

पैसा
Fri, 03/25/2016 - 17:29 नवीन
स्वतंत्र विदर्भाला विरोध पश्चिम महाराष्ट्रातून इमोसनल कारणे दाखवून केला जातोय असे तुम्ही म्हणताय ते ठीक. पण स्वतंत्र विदर्भाची मागणी पुरी झाली तर पुढे राज्य कसे चालेल याचा काही विचार असेल ना. विदर्भातलेच फडणवीस आता सगळ्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि गडकरी मोठ्या पदावर आहेत, मग ते स्वतंत्र विदर्भासाठी काय करतील? फडणविसाना स्वतंत्र विदर्भाबद्दल बोलायचे नाही अशी अट घालून मुख्यमंत्री केलंय का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद

म्हणूनच मी कंसात पश्चिम

DEADPOOL
Fri, 03/25/2016 - 18:34 नवीन
म्हणूनच मी कंसात पश्चिम महाराष्ट्र म्हटले! कारण माझ्या मताचे सार्वत्रिकरण व्हायला नको!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद

तसं बघाया गेलं तर आमच्या कवठे

सतिश पाटील
Fri, 03/25/2016 - 17:24 नवीन
तसं बघाया गेलं तर आमच्या कवठे महांकाळ आन तासगाव तालुक्यात बी द्राक्ष आन उसाचं अमाप पिक हुतया तरीबी आम्हाला द्राक्ष आन साखर स्वस्त मिळत न्हाई,अर्धी अधिक साखर इदर्भातील लोक उन्हाळ्यात सरबत करून आणि थंडीत च्या करून पेत्यात, आमचा कवठे महांकाळ आणि तासगाव तालुकाबी येगळा करा म्हंजी आमच्याकड बी बक्कळ पाऊस पडील आन आमचा इकास हुईल, आपने खुल के मुहब्बत नहीं की है हमसे शायद आपकी पैलेच शादी हुई है -सुन्नव्वर शाणा
  • Log in or register to post comments

हाहा!

पैसा
Fri, 03/25/2016 - 17:31 नवीन
आम्हाला पण मुंबईसह स्वतंत्र कोकण पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश पाटील

घेऊन टाका

सातारकर
Fri, 03/25/2016 - 17:54 नवीन
घेऊन टाका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

कोकण गोव्यात समाविष्ट करा

निनाद मुक्काम …
Fri, 03/25/2016 - 18:47 नवीन
कोकण गोव्यात समाविष्ट करा त्यामुळे तरी तेथे पर्यटन व इतर व्यवसाय वाढेल सुब्बता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

नाका रे! गोयां आसा तितलें

यशोधरा
Fri, 03/25/2016 - 23:29 नवीन
नाका रे! गोयां आसा तितलें पुरो. सुशेगाद रावच्या बरें नीऽऽ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

लेखकांचे मुद्दे सिद्ध करायची

नाना स्कॉच
Fri, 03/25/2016 - 17:26 नवीन

लेखकांचे मुद्दे सिद्ध करायची पश्चिम महाराष्ट्रियन जनतेत जबरी चुरस !

  • Log in or register to post comments

बरोबर राजेहो! तुमी बी

स्वामी संकेतानंद
Fri, 03/25/2016 - 17:35 नवीन
बरोबर राजेहो! तुमी बी इदर्भातलेच दिसून रायल्या मले!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

नाही मी प्रॉपर पश्चिम

नाना स्कॉच
Fri, 03/25/2016 - 17:42 नवीन
नाही मी प्रॉपर पश्चिम महाराष्ट्रियन आहे हो! फ़क्त मी अभिनिवेष ठेवत नाही हे एक कारण असू शकेल !! थोडक्यात आमच्याकडली जनताच ते विदर्भाला एक प्राइस पोससेशन सारखे पाहतात हे आपापल्या प्रतिसाद अन स्वाक्षरी मधुन सिद्ध करीत आहेत इतके मात्र जाणवले!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद

नाही मी प्रॉपर पश्चिम

विशाल कुलकर्णी
Sun, 03/27/2016 - 13:52 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

नाही मी प्रॉपर पश्चिम

विशाल कुलकर्णी
Sun, 03/27/2016 - 13:52 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

नाही मी प्रॉपर पश्चिम

विशाल कुलकर्णी
Sun, 03/27/2016 - 13:54 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

नाही मी प्रॉपर पश्चिम

विशाल कुलकर्णी
Sun, 03/27/2016 - 13:57 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

पुढं बोला की देवा !!

नाना स्कॉच
Sun, 03/27/2016 - 14:04 नवीन
पुढं बोला की देवा !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी

च्यायला , आता मिपाला माझे

विशाल कुलकर्णी
Sun, 03/27/2016 - 16:17 नवीन
च्यायला , आता मिपाला माझे प्रतिसाद सुद्धा नकोसे झाले कि काय? बादवे नाना, अभिनिवेश नसला तुमच्या बोलण्यात तरी 'कुंपणावरचे' दिसताय एवढेच सांगायचे होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

ऑ, आम्हालातर कुंपणावरही

सोत्रि
Sun, 03/27/2016 - 16:25 नवीन
ऑ, आम्हालातर कुंपणावरही अभिनिवेश दिसला ब्वॉ! - (कुंपणकरी) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी

तसे नसेल,विदर्भाच्या वाटयाचा

श्री गावसेना प्रमुख
Fri, 03/25/2016 - 18:00 नवीन
तसे नसेल,विदर्भाच्या वाटयाचा पैसा हि पश्चिम महाराष्ट्रातील मंडळी पळवून नेतात ना त्याला विदर्भ वेगळा झाल्याने पायबंद बसेल म्हणून हि वेगळ्या विदर्भाच्या मागणीविरोधात तावातावाने बोलत असतील।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद

खाज

सातारकर
Fri, 03/25/2016 - 17:41 नवीन
पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना लष्कराच्या भाकरी भाजायची जुनी खोड आहे म्हणून असेल. मग ते राज्य पातळीवर असो नाहीतर देशपातळीवर. कुठे देशच एकसंध ठेवायला मारतील / मरतील फौजेत जाऊन तर कुठे सगळे मराठी जन एकत्र ठेवायला.
  • Log in or register to post comments

मराठी भाषिक 2 राज्ये झाली तर

नाना स्कॉच
Fri, 03/25/2016 - 17:44 नवीन
मराठी भाषिक 2 राज्ये झाली तर बॉर्डरी काय भारत पाकिस्तान असतील अशी काहीशी आपली समजूत आहे का सातारकर?? :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सातारकर

कर्णाटक च्या

सातारकर
Fri, 03/25/2016 - 17:48 नवीन
कर्णाटक च्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे; बेळगाव महाराष्ट्रात जायचं असेल तर पाकिस्तान युद्धापेक्षा जास्त सेना लागेल. यावर आपल काय म्हणण आहे? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

कर्नाटक महाराष्ट्र जो

नाना स्कॉच
Fri, 03/25/2016 - 17:57 नवीन
कर्नाटक महाराष्ट्र जो प्रॉब्लम झालाय तो भाषेमुळे झालाय नै का पावनं?? मी दोन स्वतंत्र मराठी भाषिक राज्यं असं बोललो सुद्धा हाय की, वाचले नै काय? विदर्भ वेगळा करण्यात तो मुद्दा होता/ आहे वह्य?? हे म्हंजी सोमालिया अमेरिका परराष्ट्र संबंध कसे आहेत ह्यावर आज जेवाय आमटी नको ठरवल्यागत झाले आहे बरंका. उगा कच्याला वडाची साल पिंपळाला म्हणतू मी! कर्णाटक महाराष्ट्र वेगळे उर्वरीत महाराष्ट्र विदर्भ वेगळे असे वाटते बुआ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सातारकर

खरा इतिहास - नानांचा

सातारकर
Fri, 03/25/2016 - 18:11 नवीन
माझा समज (आता गैरसमज) असा होता कि हा प्रश्न नको त्याला नको त्याच्यात घातल्यामुळ आणि मग नको त्याचि बळजबरि केल्यान झाला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

तुमच्या म्हणन्यानुसार

नाना स्कॉच
Fri, 03/25/2016 - 18:24 नवीन
मराठी भाषिक बेळगावला बळजबरी कर्नाटकात घातल्यामुळे अन त्यांच्यावर कन्नड़ भाषेची बळजबरी केली गेली, त्यामुळे प्रॉब्लम झालाय असेच आपण म्हणता आहात काय? बरं, ह्यातले काय विदर्भ - उर्वरीत महाराष्ट्राला लागु होईल ते ही सांगा , माझेच खरे असे म्हणणे नाही फ़क्त मुद्दा नीट सांगा , श्लेष अलंकार नको पुस्तकी प्रमाण भाषेत नीट सांगा. मुळात तर भाषिक वादच आहे न? का कसे? अन तो वाद विदर्भ उर्वरीत महाराष्ट्रात कुठे आला म्हणे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सातारकर

अहो सातारकर

सतिश पाटील
Fri, 03/25/2016 - 18:01 नवीन
आम्ही तर बाबा जन्मभूमी कर्नाटक असूनसुद्धा, बेळगाव, कारवार,अथणी आणि निप्पानीसह संयुक्त महाराष्ट्राचा पुरस्कार करतो. आणि आमच्या महाराष्ट्राला वैदर्भीय मुख्यमंत्री लाभले असून ते कर्नाटकच्या मुख्य मंत्र्यासारखे बरळत नाहीत याचं आम्हाला विशेष कौतुक वाटते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सातारकर

मग आपण एकाच पार्टीचे की

सातारकर
Fri, 03/25/2016 - 18:13 नवीन
फक्त विदर्भवाद्यांना पश्चिम महाराष्ट्रान मांडिखाली दाबून ठेवलय (आणि ते तसे राहीलेत) अस कुणी म्हटल की मला हसू येत, त्याला माझा नाइलाज आहे. तरी आर्थिक्दॄष्ट्या मराठवाडा जास्त गरिब असूनही ते बिचारे असल काही म्हणत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश पाटील

इतर कोणत्याही

धर्मराजमुटके
Fri, 03/25/2016 - 17:55 नवीन
इतर कोणत्याही प्रश्नांपेक्षा हिंदू-मुस्लीम, आतले-बाहेरचे, महाराष्ट्र-कर्नाटक, वेगळा विदर्भ, भारत पाकीस्तान, आईची जय हेच विषय जास्त महत्वाचे आहेत हे एकंदरीत मिडियात डोकावून पाहिलं तर लक्शात येते. प्रजेचा इंटरेस्ट अशाच प्रश्नांत जास्त तर राजकीय पक्षांकडून वेगळी अपेक्षा तरी कशी ठेवायची ? महागाई, भ्रष्टाचार, दुष्काळ, पाणी टंचाई, शिक्षण यासारख्या विषयांवर किमान साधक बाधक चर्चा करण्याला आणि जमलेच तर त्या दिशेने हात पाय हलवायला आपण प्राधान्यक्रम कधी देणार आहोत देव जाणे !
  • Log in or register to post comments

असहमत

श्रीरंग_जोशी
Fri, 03/25/2016 - 18:05 नवीन
तुम्ही इशारा करताय ते मुद्देही महत्वाचे असले तरी मोठ्या प्रमाणावर ज्या भागांतील लोक विकासाच्या व संधींच्या अनुशेषामुळे दीर्घकाळापासून बाधित आहेत त्यांच्या मुद्द्यांचे महत्व अजिबात कमी होत नाही. त्यावर भावनिक उत्तरे देणे तर अतिशय चुकीचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

त्यावर भावनिक उत्तरे देणे तर अतिशय चुकीचे आहे.

धर्मराजमुटके
Fri, 03/25/2016 - 18:33 नवीन
तेच तर मी म्हणतोय. मी उल्लेख केलेला कोणताही मुद्दा बघीतला की त्यात व्यवहार्यता कमी आणि भावनिक मुद्द्यांवरची लढतच जास्त दिसतेय. मला प्रामुख्याने खालील प्रश्न आहेत. १. वेगळा विदर्भ किंवा मराठवाडा करायचा की नाही हे कोणी ठरवायचे ? राज्यकर्त्यांनी की तिथल्या बाधित जनतेने ? की उर्वरीत महाराष्ट्राने ? २. वेगळे राज्य निर्माण झाल्यास त्याचा आर्थिक व्यवहार कसा चालणार याचा अभ्यास येथून मागे स्थापन झालेल्या अनेक समित्यांनी केला असेलच. किंवा मागास जिल्ह्यांचा अनुशेष कसा भरुन काढायचा यावरही कित्येक वेळा चर्चा झाल्या आहेत. केळकर समितीचा अहवाल त्यातल्या त्यात जास्तीत जास्त आदर्श मानला जातो. (इच्छुकांना अहवाल येथून उतरवून घेता येईल. ३. विदर्भ / मराठवाडा मागास राहण्यात केवळ सरकारी अनास्था कारणीभूत आहे की काही तांत्रिक / व्यवहार्य अडचणी देखील आहेत काय हे तपासून बघीतले आहे काय आहे ? की ही कारणे केवळ आणि केवळ राजकीय आहेत ? मनात बरेच प्रश्न आहेत पण ज्याची प्रामाणिक उत्तरे मिळणे आणि मिळालेली प्रामाणिक उत्तरे पचविणे हा एक वेगळाच विषय आहे. शेवटी माझा अंदाज : सध्याचे महाराष्ट्रातील भाजपा सरकार आपल्या पाच वर्षातील शेवटच्या कार्यकालात यावर निर्णय घेऊ शकते. जर महाराष्ट्रात पुन्हा सरकार स्थापनेची संधी असेल तर तो निर्णय घेणे पुढे ढकलला जाऊ शकेल. मात्र जर महाराष्ट्र हातातून जातेय हे दिसले तर कमीतकमी विदर्भ तरी हाती असावा म्हणून राज्यविभाजनाचा निर्णय होऊ शकतो. मात्र सध्याची दुष्काळी परिस्थिती बघता अनुशेष भरुन काढण्याचा पर्याय वापरता येईल की नाही याबद्दल साशंकता वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

धन्यवाद

श्रीरंग_जोशी
Fri, 03/25/2016 - 18:40 नवीन
तपशीलवार प्रतिसादाबद्दल धन्यवाद. गेल्या दोन वर्षांत मिपावर या विषयावर चर्चा झाल्या आहेत. त्यांचे दुवे इथे देतो.
  • तेलंगणा नंतर स्वतंत्र विदर्भ मागणीस जोर येणार का ????
  • वेगळा विदर्भ
  • स्वतंत्र विदर्भाचे तुणतुणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

चर्चांवर लक्ष ठेऊन असतोच.

धर्मराजमुटके
Fri, 03/25/2016 - 18:51 नवीन
धन्यवाद ! चर्चांवर लक्ष ठेऊन असतोच. आपण निर्देश केलेल्या सगळ्या चर्चा वाचल्या आहेत. पण आख्याड्यात उतरायचा कंटाळा करतो. १००-१२५ प्रतिसांदांत १०-१५ प्रतिसाद लक्ष देण्यालायक असतात पण ते जरी वाचायला मिळाले तरी संस्थळावर आल्याचे सार्थक होते. धाग्यांबद्दलदेखील असेच म्हणता येईल. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

श्री गजू तायडे यांच्या शब्दांत

श्रीरंग_जोशी
Fri, 03/25/2016 - 18:02 नवीन
हाच मुद्दा माझे मित्र श्री गजू तायडे यांच्या शब्दांत.... ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ : भाऊ? : काय होय बे? : तुमच्या घरात राहाचं नाही मले. मले अल्लग राहाव वाटते. : काहून बे? मस्ती आली का तुले? : तुमी रोज तूप-साखर-पोयी खाता. आम्हाले शियापाक्या भाकरी खाऊ घालता. : अबे पन अल्लग होऊन घरान्याच्या इज्जतीले बट्टा लावशीन काय बोहार्‍या? : मंग काय कोरड्या भाकरीचे कुटकेच चावत बसू काय अथीसा? : अल्लग व्हाची भाषा करशीन तर तंगडंच तोडंन तुहं! : मले वाटलंच होतं तुमी धमक्या द्यान म्हनून. त्याच्यापेक्षा प्रेमानं तूप-साखर-पोयी वाटून घेतली असती तं? : अबे, अल्लग निंघशीन तं शिया भाकरीची तरी सोय हुईन काय तुही? : ते माहंवालं मी पाहून घीन ना! तुम्ही कायले फिकर करता? खरं म्हनसान तं तुमची फिकर दुसरीच हाये. : मले कोन्ची फिकर हाये बे? : तुम्हाले फिकर हाये का मी अल्लग झालो तं तुमची तूप-साखर-पोयी बंद हून जाईन! ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा