India Today Conclave 2014 मधे अत्यंत सधन, निष्पक्ष आणि विचारवंत लोकांसमवेत अरविंद केजरीवालांचा झालेला हा पूर्णपणे खुला संवाद तुमच्या-माझ्या मनातल्या सर्व प्रश्नांची उत्तरं देतो. दीड तास लोकांचं अवधान एकचित्त आहे आणि कुणाही पूर्वग्रहरहित व्यक्तीचं तसं राहील यात शंका नाही.
स्वतःवर झालेल्या टिकेला दिलेली उत्तरं. स्वतः दुसर्यावर केलेल्या आरोपांचं स्पष्टीकरण. झालेल्या चुकांची प्रांजळ कबुली. देशाला पुढे नेण्यासाठी सरकारनं काय करायला हवं आणि सामान्यांचा सत्तेतल्या सहभागाची अनिवार्यता. पंतप्रधानपदाच्या संघरात त्यांची भूमिका. आणि सरते शेवटी देशासाठी एक स्वप्न अशा बहुविध अंगांनी हा मनमोकळा संवाद एखाद्या मैफिलासारखा बहरलायं.
प्रत्येक प्रश्नाकडे पाहण्याचा अत्यंत तर्कशुद्ध दृष्टीकोन, कमालीची सुसंगत विचारसरणी, कोणत्याही प्रश्नाला सामोरं जाण्याचं साहस आणि अत्यंत समतोल व्यक्तिमत्त्व या इंडिया टुडेच्या निष्पक्षिय चित्रफितीतून व्यक्त होतं.
या देशासाठी एक विधायक स्वप्न पाहणार्या प्रत्येक सुजाण नागरिकाला या विडिओमुळे समोर आलेल्या संधीचं सोनं करता येईल या अपेक्षेनं आणि खरं तर विनंतीनं ही पोस्ट संपन्न करतो.
प्रतिक्रिया
25 Mar 2014 - 1:07 pm | श्रीगुरुजी
>>> नानासाहेब नेफळे,
तुम्हाला दिग्विजयसिंघ म्हणावं कि सलमान खुर्शीद कि जितेंद्र आव्हाड कि...
अजून किती नावे देणार? त्यांचे यापूर्वीच 'ग्रेटथिंकर', 'टॉपगिअर्ड फिलॉसॉफर' इ. डुप्लिकेट आयडी होते. आता ते "नाने" हा नवीन आयडी घेऊन आले आहेत.
25 Mar 2014 - 1:04 pm | श्रीगुरुजी
>>> भाषणातून मानसिकता कळते. ज्या प्रकारची भाषा वापरली आहे ती पुरेशी बोलकी आहे.
भाषेपेक्षा कृतीतूनच मानसिकता कळते. ज्या प्रकारची कृती केली गेली आहे ती पुरेशी बोलकी असते. 'काँग्रेसचा किंवा भाजपचा पाठिंबा घेणार नाही' अशी मुलाच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेणारा पराकोटीचा तत्वनिष्ठ मानला जाईल. पण प्रत्यक्षात काँग्रेसचा पाठिंबा घेणारा हा संधीसाधू व खोटारडा आहे हे सिद्ध होते.
>>> तुम्ही फार सारवासारवी चालवली आहे. वाजपेयींना भर व्यासपीठावर `राजधर्माचे पालन करा, जातीभेद करु नका असे सांगावे लागते याचा अर्थच तो होत होता. आणि त्याच व्यासपीठावर मोदींना त्याचं (हलक्या आवाजात) स्पष्टीकरण द्यावं लागतं `वही तो कर रहे है ना साहाब'. हे परिस्थितीची कल्पना देण्यास पुरेसं आहे. जर भेदभाव होत नसता तर वाजपेयींना तसं (आणि खरं तर इतकं स्पष्ट) बोलायची गरजच काय?
जर भेदभाव होत होता, तर वाजपेयींनी "मोदी राजधर्माचे पालन करीत आहेत" असे बोलण्याची गरजच काय?
>>> आता मोदींच्या स्पष्टीकरणावर वाजपेयींना त्यांची बाजू सावरावीच लागणार. कारण दोघंही राजकीय नेते आहेत आणि जनसमुदायासमोर बोलतायंत. पण तुम्हाला वाटतंय वाजपेयींनी मोदींची पाठ थोपटली!
तुम्ही व्हिडिओबद्दल लिहिताना अर्धाच भाग लिहिलात. पुढचा अर्धा लिहिलाच नाहीत. यावरूनच तुमची मानसिकता स्पष्ट होते. समजा वाजपेयी आणि मोदी एकाच पक्षाचे म्हणून वाजपेयी त्यांची बाजू सावरत होते असं क्षणभर गृहीत धरलं तरी मोदींच्या विरूद्ध पक्षाच्या काँग्रेसने त्यांची बाजू घ्यायचं काय कारण होतं? उलट भेदभावाचे एक शुल्लक उदाहरण जरी सापडलं असतं तरी टिस्टा/महेश्/अरूंधती इं. च्या बरोबरीने काँग्रेसने रान उठविलं असतं. प्रत्यक्षात काँग्रेसला रिलीफ कॅम्प्सचं कौतुक करावं लागलंय यातच सर्व काही आलं.
>>> तुम्ही दरवेळी पुरावे द्या आणि आरोप मागे घ्या हा घोषा लावला आहे. जर उघड पुरावे असते तर मोदींची कारकिर्द केंव्हाच संपली असती आणि त्यांच्या मानसिकतेचा उहापोह झालाच नसता.
इतके गंभीर आरोप पुराव्याशिवाय करणे अयोग्य आहे हेच तुम्हाला समजत नाही.
>>> मी माझा आरोप मागे घेणार नाही कारण मोदींच्या प्रत्येक भाषणात निव्वळ भावनांना हात घालणे हा एकच अजेंडा दिसतो.
शेवटी काही झालं तरी तुम्ही केजरीवालसारख्या भोंदूचे समर्थक. पुराव्याशिवाय खोटे आरोप करणे, वाटेल ती आश्वासने देणे आणि कृती करायची वेळ आली की शेपूट घालून सुंबाल्या करणे हे 'आप'वाल्यांचं व्यवच्छेदक लक्षण आहे.
>>> वाराणसीच्या सभेत तर ते सरळ म्हणाले `भाई, रामराज्य तो लाना ही होगा'. आता त्यांना साळसूद समजणारे म्हणणार `बांधलंय का मंदिर अजून?' दाखवा पुरावा! आणि माझं म्हणणंय की हेतू उघड दिसतोयं, कशाला (पुन्हा) विषाची परिक्षा घ्यायची?
भारतात 'रामराज्य' यावे अशी गांधीजी सुद्धा म्हणत असत.
>>> या उलट केजरीवाल इश्यू बेस्ड आहेत : भ्रष्टाचार मुक्त राजकारण आणि विनम्र प्रशासन! दॅट इज ऑल.
कसलं डोंबलांचं भ्रष्टाचारमुक्त राजकारण आणि विनम्र प्रशासन! सगळं ढोंग आणि लबाडी. ज्या रिलायन्सला जाहीर शिव्या घालतात त्याच रिलायन्सला सबसिडी दिली. नायजेरिअन महिलांना अटक करावी म्हणून यांच्याच मंत्र्यांने अधिकाराच्या बाहेर जाऊन धाड टाकून पोलिसांना दमदाटी केली. येवढं करूनसुद्धा केजरीवाल याच मंत्र्याची पाठराखण करताहेत. आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून गुजरातमध्ये पोलिसांनी अडविल्यावर यांच्याच कार्यकर्त्यांनी दिल्लीत आणि लखनौमध्ये भाजपच्या कार्यालयावर जाऊन दगडफेक करून धुमाकूळ घातला. अंदाजपत्रकात तरतूद न करताच विजेची बिले निम्मे करण्याचे ढोंग करून जनतेची फसवणूक केली. काँग्रेसला प्रचंड शिव्या घालून शेवटी काँग्रेसचाच पाठिंबा घेतला.
>>> मी माघार घेणार नाही आणि तुम्ही पुरावे मागत राहणार त्यामुळे तुमच्याशी चर्चा होऊ शकत नाही. पण एक नक्की जेंव्हा पुरावे समोर येतील तेंव्हा अपरिमीत नुकसान झालेलं असेल आणि वेळ निघून गेलेली असेल.
'पडलो तरी नाक वर' अशी तुमची मानसिकता आहे. तुम्हाला मी पूर्ण उघडे पाडलेले आहे. तुम्ही केलेले आरोप पूर्ण खोटे आहेत हे सिद्ध झालेले आहे. खोटे आरोप करणार्याने आरोप सिद्ध करण्यासाठी सबळ पुरावे द्यावे लागतात. तुमच्याकडे कणभरही पुरावे नाहीत आणि तरीसुद्धा खोटे आरोप मागे घ्यायची तयारी नाही. अर्थात तुमचं वागणं तुमच्या केजरीवालांच्या वागण्याशी सुसंगतच आहे. ढोंग, नाटकीपणा, खोटारडेपणा, पळपुटेपणा, फसवणूक ... याव्यतिरिक्त दुसरे कोणतेही 'आप'कडून वा केजरीवालांकडून अपेक्षित नाही.
असो. तुम्ही केलेल्या खोट्या आरोपांच्या निमित्ताने 'दूध का दूध, पानी का पानी' हे सिद्ध करण्याची संधी मिळाली याबद्दल आभार! निदान भविष्यात तरी पुरेशी पूर्वतयारी करून मगच खोटे आरोप करा ही विनंती.
25 Mar 2014 - 1:15 pm | प्यारे१
अशं नै कलायचं बाबा...
आमी वेगला धागा काल्लेला ना? मग?
आम्ची बॅत हाये. आमीच जिंकनाल.
तुमी नुस्ते फुल्तॉस ताकाचे. मग आमी शिक्श माल्नाल.
पलत खेला पलत. ;)
- आपण हसे लोकाला .... आपल्या नाकाला. असो.
गुरुजी, आज ओपनचा रेट किती सुरु आहे?
25 Mar 2014 - 1:21 pm | मंदार दिलीप जोशी
श्रीगुरुजी, माझा दंडवत स्वीकारा. इतक्या "आप"मतलबी, हेकेखोर, बिनडोक युक्तीवादाचा अगदी मुद्देसूदपणे आणि मुख्य म्हणजे प्रचंड चिकाटीने थोबाडफोड उत्तर द्यायला खूप प्रामाणिकता आणि जिगर लागते. शिवाय तल्लख बुद्धी देखील.
25 Mar 2014 - 1:23 pm | संजय क्षीरसागर
लै खास! याला म्हणतात जस्टीफिकेशन.
तर एकूण तुमच्या मते मोदी साळसूद आहेत आणि केजरीवाल चालू आहेत. कारण आता मोदी गांधीचीच अभिलाषा पूर्ण करतायंत म्हटल्यावर काय बोलणार? कहर झाला! धन्यवाद!!
25 Mar 2014 - 1:24 pm | मंदार दिलीप जोशी
म्हणजे नरेन्द्र मोदी हे गांधीवादी आहेत नैका.
25 Mar 2014 - 1:28 pm | श्रीगुरुजी
>>> तर एकूण तुमच्या मते मोदी साळसूद आहेत आणि केजरीवाल चालू आहेत. कारण आता मोदी गांधीचीच अभिलाषा पूर्ण करतायंत म्हटल्यावर काय बोलणार? कहर झाला! धन्यवाद!!
पुन्हा एकदा तुम्ही खोटं बोलतात. माझ्या मते मोदी साळसूद नाहीत. ते कमालीचे स्वच्छ, प्रामाणिक व अत्यंत कार्यक्षम आहेत.
तसेच माझ्या मते केजरीवाल नुसतेच चालू नाहीत, तर ते ढोंगी, खोटारडे व पळपुटे आहेत.
>>> कारण आता मोदी गांधीचीच अभिलाषा पूर्ण करतायंत म्हटल्यावर काय बोलणार? कहर झाला! धन्यवाद!!
स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्ष बरखास्त करावा अशी गांधीजींची इच्छा होती. या निवडणुकीत मोदी गांधीजींचीच अभिलाषा पूर्ण करत आहेत. तुमच्यापाशी खोट्या आरोपांशिवाय बोलण्यासारखं काहीच नाही.
25 Mar 2014 - 2:05 pm | संजय क्षीरसागर
आधी मोदींना जस्टीफाय करायला म्हणालात :
मग रामराज्याचा गांधींना अपेक्षित अर्थ आणि मोदींचा अर्थ ही विरुद्ध टोकं आहेत हे लक्षात आल्यावर आता म्हणतायं :
मला न मोदींचा कळवळा ना आडवानींचा पण आडवानींना स्वतःचे गुरु आणि देशाच्या पंतप्रधानपदाचे एकमात्र लायक उमेदवार मानणारे मोदी डायरेक्ट गुरुंनाच बरखास्त करु शकतात याची कल्पना या यू टर्न वरुन येईल :
सत्तालोभापायी ते केंव्हाही आणि काहीही बरखास्त करु शकतात हे नक्की. आता कोण ढोंगी आहे ते पाहा म्हणजे झालं.
25 Mar 2014 - 2:08 pm | मंदार दिलीप जोशी
ज्या देशात ८०% लोकांना उरलेल्या २०% च्या भीती बाळगून रहावे लागते तिथे असेच बोलावे लागते.
जय मोदी
जय मोदी
जय मोदी
जय मोदी
25 Mar 2014 - 2:14 pm | संपत
म्हणजे मोदी हे घाबरून बोलत आहेत का ? कोणाला घाबरत आहेत ते? आणि जर ते घाबरून बोलत असतील तर विडिओमधले 'मै किसीसे नाही डरता' उगीचच काय?
25 Mar 2014 - 2:28 pm | मंदार दिलीप जोशी
मोदी नव्हे तर लोक घाबरतात असा त्याचा अर्थ
25 Mar 2014 - 2:15 pm | नानासाहेब नेफळे
असे काही नाही ,असा भ्रम मुस्लिमांविषयी पसरवला गेला आहे.
राममंदीराच्या मुद्द्यावरुन भांडणं लावणार्यांच्या जाहारनाम्यातही 'राम मंदीर' नाही यावरुन काय तो बोध घ्यावा. विस वर्षांपुर्वी मंदिराचा वापर सत्ताकारणासाठी करणारे आता 'देवालय से पहले शौचालय चाहीए' असे म्हणत ,हिंदू धर्माचा अपमान करत, आपल्या दूट्प्पी नितीचे दाखले देत आहेत...
25 Mar 2014 - 2:18 pm | नानासाहेब नेफळे
हे पहा मोदींचे विचार.http://m.timesofindia.com/india/Build-toilets-first-and-temples-later-Na...
25 Mar 2014 - 2:21 pm | आत्मशून्य
कठिन आहे.
25 Mar 2014 - 2:25 pm | बॅटमॅन
ठ्ठो =))
24 Mar 2014 - 6:02 pm | मराठी कथालेखक
मी गुजरात मधील अहमदाबादच्या BRT bus बद्दल्चा एक विडिओ (whats app वर) पाहिला. त्यात शेवटी सुप्रिया सुळेंनी या प्रकल्पाचे कौतुक केलेले होते... मला वाटते जे चांगले आहे ते कबूल करण्याची प्रगल्भता असावी AK ला खोकणे आणि गळा काढणे यातच जास्त रस आहे..
24 Mar 2014 - 9:26 pm | प्यारे१
काय ठरलं शेवटी?
24 Mar 2014 - 9:29 pm | विकास
शेवटी?
ही तर सुरवात आहे... ये तो पेहला जाम है, अभि तो शाम है... ;)
24 Mar 2014 - 10:08 pm | प्यारे१
>>>अभि तो शाम है
इकडे पण 'शाम'? नका हो नका आमच्या 'कोमल मणा'वर आत्या चार -आपलं - अत्याचार करु! ;)
26 Mar 2014 - 1:13 am | मूकवाचक
.
25 Mar 2014 - 10:09 am | मंदार दिलीप जोशी
Setback for AAP in Gurgaon as office-bearers quit
According to Ramesh Yadav, the Gurgaon AAP had around 400 members before the mass resignations happened on Sunday. (Reuters)
The Aam Aadmi Party (AAP) suffered a massive blow on Sunday when scores of office-bearers led by a senior leader of its Gurgaon unit, Ramesh Yadav, resigned, protesting against its policies. Ten of them, including Yadav, publicly tendered their resignations to party president Arvind Kejriwal at the Ramlila Maidan in Gurgaon, where he concluded his roadshow on Sunday evening.
Yadav, who was AAP’s Gurgaon convenor, said around 250 workers had resigned with him, including the Gurgaon unit’s general secretary and treasurer. “There has been unrest within the Gurgaon unit for the past four weeks regarding the kind of actions the party has taken. Look at Delhi. They have run from their responsibilities. They are giving tickets to candidates who don’t have a clean record. The decision-making in the party is no longer democratic and happens behind closed doors. They say something and do something else,” Yadav said.
He added that he along with other party members had held discussions on these issues with the party’s Gurgaon candidate Yogendra Yadav and Kejriwal, but could not reach a solution. “Yogendra Yadav would say that it is not in his hands and that the party will decide. Kejriwal would listen to us, even accept that some things went wrong, but then do nothing,” Yadav said.
According to him, the Gurgaon AAP had around 400 members before the mass resignations happened on Sunday.
Sources said Yadav was peeved at the entry of so many new faces and felt that he was being sidelined. He was among the founder members of the party in Gurgaon. According to the sources, he wields considerable clout in certain pockets of Gurgaon and that his resignation would adversely impact AAP’s campaign in this region
25 Mar 2014 - 10:42 am | अर्धवटराव
आआपला असे धक्के पचवावेच लागतील. नव्या-जुन्यांची नाराजी, विरोधि पक्षांकडुन फोडाफोडीचे प्रयत्न, हे सर्व आआपच्या वाट्याला देखील येईल. त्यांचं प्लॅस्टर बरच ओलं आहे सध्या. काँक्रीट बनायला थोडा वेळ लागेल... पार्टीला आणि नेत्यांना सुद्धा. जर यदाकदाचीत आआपची भुमीका केंद्रात सरकार बनवायला निर्णायक ठरणार असेल तर पक्ष उभा दुभंगायचे देखील चान्सेस आहेत.
25 Mar 2014 - 11:42 am | चिरोटा
निवडणूक आहे तेव्हा रूसवे,फुगवे चालायचेच.कॉन्ग्रेस्,भाजपा दोघेही अनेक 'अपवित्र' पुढार्यांना आपल्या पक्षात पावन करून घेत आहेत्.
कार्यकर्त्यंना पैशाचे,सत्तेचे गाजर दाखवायचे व सत्ता मिळेस्तोवर दाणे टाकून कोंबड्यांसारखे झुंजत ठेवायचे.पक्षातल्या पहिल्या फळीतल्या नेतृत्वाला हे शिकावेच लागेल.
25 Mar 2014 - 2:16 pm | आत्मशून्य
एक नागरीक म्हणुन कोणीही सामान्य व्यक्ती अशी विनंती पोलिसांना करु शकतो. व पोलीसांना ती मानणे कायद्याने भाग आहे. अधिकाराचे कोणतेही उल्लघन नाही, कर्तव्याची जाणीव करुन देणे दमदाटी कशी बुआ ? उगा वॉरंट/परवानग्या वगैरेमधे वेळ घालवला असता तोपर्यंत हप्तेखोरांकडुन फोनाफोनी होऊन धाडिच्या आधिच गुन्हेगारांनी सुंबाल्या ठोकल्या गेल्या असत्या, जे टाळणे आवश्यक होते.
25 Mar 2014 - 2:46 pm | माहितगार
निवडणूक प्रक्रीयेतील (मला) अपेक्षीत बदल
25 Mar 2014 - 2:46 pm | मंदार दिलीप जोशी
सनी लिऑन आम आदमी पार्टी तर्फे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे अशी अफवा आहे.
25 Mar 2014 - 3:04 pm | Dhananjay Borgaonkar
केजरी हा अत्यंत भंपक माणुस आहे.काँग्रेसने पोसलेलं पिल्लु.दिल्ली मधे माती खाल्ली.
राजीनामा द्यायची गरजच काय होती याला? मिडीयासमोर कसे माकडचाळे करुन लोकांचं मनोरंजन करायचं हे पक्के ठाउक त्यास.
भ्रष्टाचारा विरुद्ध लढायला निघालाय आणि काँग्रेसविरुद्ध काहीच बोलत नाही?? हा सगळ्यात मोठाठा जोक आहे.
म्हणे शिला दिक्षितच्या विरुद्ध माझ्याकडे पुरावे आहेत आणि आम्ही कोर्टात जाउ तिच्या विरुध्द्द. नंतर सत्तेत आल्यावर विसरला हे सगळं.
अत्यंत ढोंगी आणि खोटारडा माणुस. आण्णनी बरोबर ओळखला त्याला आणि बाहेर काढला.
27 Mar 2014 - 10:33 am | आयुर्हित
If Kejriwal and AAP have something to fear, it is Kejriwal's inconsistency. You started off fighting corruption. Then you fought Modi, then the media. Now, you guys are fighting the truth. You want instability over the next 5 years to prove your presence. Let your negativity not get the better of you. Instead utilize these 5 years to emerge as a responsible Opposition party.
Refer:The bankruptcy of compulsive Modi bashing
19 Feb 2016 - 3:01 pm | होबासराव
प्रत्येक प्रश्नाकडे पाहण्याचा अत्यंत तर्कशुद्ध दृष्टीकोन, कमालीची सुसंगत विचारसरणी, कोणत्याही प्रश्नाला सामोरं जाण्याचं साहस आणि अत्यंत समतोल व्यक्तिमत्त्व
हाण तेजायला :)
19 Feb 2016 - 3:06 pm | गॅरी ट्रुमन
या धाग्याचे विडंबन म्हणून 'सनी लिऑनीबरोबर सहा मिनिटे' म्हणून कोणी धागा काढला होता तो मिळत नाही. तो उडविला का?
19 Feb 2016 - 3:09 pm | नया है वह
लोल
19 Feb 2016 - 5:26 pm | वेल्लाभट
अॅक्शन्स स्पीक लाउडर दॅन वर्ड्स. अँड हिज अॅक्शन्स वर थरोली स्टूपिड.
28 Apr 2017 - 5:45 pm | सचु कुळकर्णी
स्वतःवर झालेल्या टिकेला दिलेली उत्तरं. स्वतः दुसर्यावर केलेल्या आरोपांचं स्पष्टीकरण. झालेल्या चुकांची प्रांजळ कबुली. देशाला पुढे नेण्यासाठी सरकारनं काय करायला हवं आणि सामान्यांचा सत्तेतल्या सहभागाची अनिवार्यता. पंतप्रधानपदाच्या संघरात त्यांची भूमिका. आणि सरते शेवटी देशासाठी एक स्वप्न अशा बहुविध अंगांनी हा मनमोकळा संवाद एखाद्या मैफिलासारखा बहरलायं.
प्रत्येक प्रश्नाकडे पाहण्याचा अत्यंत तर्कशुद्ध दृष्टीकोन, कमालीची सुसंगत विचारसरणी, कोणत्याही प्रश्नाला सामोरं जाण्याचं साहस आणि अत्यंत समतोल व्यक्तिमत्त्व
वर उल्लेखीत एक तरी वाक्य सत्यात उतरतांना पाहिलय का कोणि ? प्रांजळपणा, साहस, समतोल व्यक्तिमत्व, तर्कशुद्ध दृष्टीकोन, ब्ला ब्ला ब्ला हे आलय का अनुभवास.
28 Apr 2017 - 5:46 pm | सचु कुळकर्णी
Ohh Really
22 Mar 2024 - 1:13 pm | वेडा बेडूक
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आलेली आहे. उत्पादनशुल्क गैरव्यवहारप्रकरणी चौकशीसाठी वारंवार समन्स बजावून देखील त्याकडे दुर्लक्ष करणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घराची ईडीच्या अधिकाऱ्यांनी २१ मार्चला रात्री झडती घेतली. केजरीवालांचे दूरध्वनी जप्त करून त्यांची तब्बल दोन तासांपेक्षाही जास्त काळ चौकशी करण्यात आली. आणि यानंतर केजरीवालांना अटक करण्यात आली.
22 Mar 2024 - 2:12 pm | अमरेंद्र बाहुबली
किती ती भिती असावी एखाद्याची?
23 Mar 2024 - 6:11 pm | मुक्त विहारि
ह्या भीती पाईच, केजरीवाल यांनी, ED चे बोलावणे टाळले...
ED, CBI आणि NIA, ह्यांच्या पाठीमागे, न्यायालय देखील उभे आहे...
23 Mar 2024 - 6:16 pm | मुक्त विहारि
https://www.indiatv.in/india/national/sukesh-wrote-a-letter-to-cm-arvind...
-------
24 Mar 2024 - 12:54 pm | मुक्त विहारि
केजरीवाल की गिरफ्तारी-रिमांड पर हाईकोर्ट का अर्जेंट सुनवाई से इनकार:कहा- बुधवार को मामला सुनेंगे; आतिशी का आरोप- हमारा दफ्तर सील किया गया
https://www.bhaskar.com/national/news/delhi-cm-arvind-kejriwal-ed-arrest...