शेतकऱ्याच्या तळतळाटानेच तुमचं स्टेज पेटलं
गिरगाव चौपाटीवर मेक इन इंडिया च्या अंतर्गत महाराष्ट्र रजनी हा कार्यक्रम सुरु असताना स्टेज ला आग लागली व खूप गोंधळ उडाला. त्यावरच प्रहारचे ज्येष्ठ पत्रकार श्यामसुंदर सोन्नर यांनी शेतकऱ्यांच्या वेदनेवर कविता मांडली आहे. श्याम सुंदरसोन्नर यांनी आपल्या कवितेतून सरकारवर आसूड ओढले आहेत, ही कविता सोशल मीडियावर प्रंचड लोकप्रिय होत आहे, फेसबुक तसेच व्हॉटसअॅपवर ही कविता व्हायरल होत आहे.वाचा, श्यामसुंदर सोन्नर यांची कविताशेतकऱ्याच्या तळतळाटानेच तुमचं स्टेज पेटलं
.....................................
जगाच्या पोशिंद्याचं दुःख
आभाळाला खेटलं
शेतकऱ्याच्या तळतळाटानेच
तुमचं स्टेज पेटलं
उद्योगपतीच्या समोर
तुम्ही नाचवता बायका
शेतकऱ्याला द्यायला
नाही म्हणता पैका
शेतकरी झालं उध्वस्त
ते आयुष्यातून उठलं
शेतकऱ्याच्या तळतळाटानेच
तुमचं स्टेज पेटलं
उद्योगपतींना खुशाल देता
मोठमोठ्या संधी
कांद्याचे जरा भाव वाढले
की निर्यातीवर बंदी
असं दुटप्पी वागणं कसं
तुम्हालाच पटलं
शेतकऱ्याच्या तळतळाटानेच
तुमचं स्टेज पेटलं
मेक इन इंडियाचा
केवढा मोठा बोलबाला
तिकडे शेतकरी मात्र
नुसते कष्ट करून मेला
उद्योगपतीची वाढते ढेरी
अन् शेतकऱ्याचं रक्त आटलं
शेतकऱ्याच्या तळतळाटानेच
तुमचं स्टेज पेटलं
नफेखोर उद्योगपतीसाठी
केवढा तुमचा आटापिटा
जगाला जगविणारा मात्र
मुदलामध्ये सोसतो तोटा
किती मांडू हिशेब सारा
मन पार विटलं
शेतकऱ्याच्या तळतळाटानेच
तुमचं स्टेज पेटलं
- शामसुंदर महाराज सोन्नर
एकच बाजू मांडायची असेल तर छान
अतिशय मुद्देसुद प्रतिसाद.
छान
+१
वेल, जबरदस्त लिहिलेय!
मस्त प्रतिसाद
वेल व्हेरी वेल.
वेल डन, एकच नंबर!!!!!
नेमकं...
मुद्देसुद लेखन ! मुख्य म्हणजे
प्रचंड सहमत... प्रतिसाद आवडला
+11111 प्रतिसाद आवडला...
उत्तम प्रतिसाद!
ही कविता लिहिणार्या ज्येष्ठ
हाफशेंच्युरी निमीत्त सर्वांना
आम्ही गावी शेतीच करतो , गावी
धन्यवाद
धन्यवाद , १५ दिवसांनी
नमस्कार,
१२५ मूर्ख
:(
अप्रतिम !!
कविता जमलीय..
ते वीर मराठे, शिवाजी महाराज
बरीच लांबलचक..
मागच्या सरकारच्या कार्यकाळात
च्छ्या
दिलीप सानंदा
१९८२ मध्ये झालेल्या गिरणी संपात
कवी जो कोणी आहे. पागल झालेला
पानटपरी चालवून दाखवावी हरामखोरांनी
Pagination